शिक्षण जेमतेमच होते. झोपण्यासाठी छत नव्हते का पोटाला अन्न नव्हते . तरीपण त्यांनी प्रथम स्वतःलाच शिकवले, वाचायला-लिहावयाला शिकले.
पी.एल. संतोषी फक्त गीतकार नव्हते तर ते दिग्दर्शकही होते. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १९१६ रोजी झाला. उत्कृष्ट लेखकही होते. म्युझिकल कॉमेडी हा प्रकार त्यांनी लोकप्रिय केला केला. तसेच 'अनोखे बोल' हा गीतप्रकार 'टिका लई कली दई' (चित्रपट - शिनशिनाके बुबला बु) यासारख्या गाण्यातून रूढ केला. 'कोई किसीका दिवाना ना बने' (सरगम), 'महफिल में जल उठी शमा' (निराला), 'तुम क्या जानो तुम्हारी याद में' (शिनशिनाके बुबला बु) यांसारखी तरल भावकाव्यं त्यांच्या लेखणीतून झरली होती.पी.एल.संतोषी हे एक अफलातून व्यक्तिमत्त्व होते. ते उत्तम गीतकार होते. मग ते पटकथाकार बनले, मग दिग्दर्शक.
यानंतर त्यांना चित्रपट निर्माता होण्याची दुर्बुद्धी झाली आणि त्यापायी ते कफल्लक बनले. या माणसाने दोन्ही हातांनी पैसा कमावला व दहा हातांनी तो उधळला. नटीच्या प्रेमात पडले व तिच्यावर सारी संपत्ती ओवाळून टाकली. संतोषी यांनी १९५२ मध्ये 'शिनशिनाकी बबला बु' या नावाचा चित्रपट निर्माण केला. त्याचे लेखक, दिग्दर्शक, निर्माते व गीतकार तेच होते. संगीतकार होते त्यांचे खास मित्र सी. रामचंद्र. हा चित्रपट म्हणजे त्यांच्या काव्यप्रतिभेचा एक उत्तम नमुना होता. या सिनेमात एकीकडे त्यांनी 'अरे बाबा, ये हसी बाबा, ये खुशी बाबा, खा बाबा, पी बाबा, ' अशी निरर्थक गाणी लिहिली आणि दुसरीकडे मनाची व्याकुळता अतिशय आर्तपणे व्यक्त करणारे उत्कट गीतही लिहिली.
रेहाना नावाची नटी, संगीतकार, सी.रामचंद्र आणि पी. एल. संतोषी या त्रिकुटाने चित्रपटसृष्टीत एकेकाळी धमाल उडवून दिली होती. 'शहनाई', 'खिडकी', सरगम' हे या त्रिकुटाचे चित्रपट हाऊसफुल्लचा ठरले होते. पी. एल. संतोषीच्या 'हम पंछी एक डालके' या चित्रपटाला राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले होते. पी.एल.संतोषींबरोबर सी. रामचंद्र यांचे टयुनिंग बराच काळ जमले होते. अनेक वेळा त्यांच्या संगीतातील बरीच गाणी पी.एल.संतोषी आणि राजेंद्र कृष्ण या दोनच गीतकारापैकी एकाची तरी आढळतात. मा.पी.एल.संतोषी यांचे निधन ७ सप्टेंबर १९७८ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. श्री.पद्माकर पाठक
घारे भेदक डोळे आणि खोलवर रूतणारा आवाज या वैशिष्ट्यांचा परिणामकारक वापर करत रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन या तिन्ही माध्यमांत मोहन गोखले लीलया वावरले.
मोहन गोखले हे ज्येष्ठ पत्रकार ,स्वराज्य चे संपादक आणि सकाळचे सहसंपादक वसंत तथा बापू गोखले यांचे चिरंजीव. त्यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९५३ रोजी झाला. शालेय शिक्षण नूमवि कॉलेजचे स.प आणि फर्गसन येथे.
शाळेत असतानाच रविवार सकाळ नाट्यवाचन स्पर्धेत त्यांनी चमक दाखवली. पुढे सर परशुराम आणि फर्गसन कॉलेजात ते अभिनेते म्हणून गाजले. पुण्यातली अत्यंत प्रतिष्ठेची पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा अभिनय आणि दिग्दर्शन करून गाजविली होती. पुरुषोत्तम करंडकातील 'ती येते', 'कैद' या त्याच्या एकांकिका खूप गाजल्या होत्या. ते राज्यनाट्य स्पर्धेत विजेता पण राहिले होते. त्याच सुमारास, १९७२ साली त्यांना ' घाशीराम कोतवाल ' मधे छोटी भूमिका मिळाली. दिव्याला जाणा-या ब्राम्हणाची भूमिका त्यांनी अविस्मरणीय केली. सतीश आळेकर यांचे ' महापूर ' हे नाटक त्यांनी राज्य नाट्यस्पर्धेसाठी दिग्दर्शित केले. आळेकरांचंच 'मिकी आणि मेमसाब ' , सतीश तांबेंचं ' बीज ' ही त्यांची पुण्यात असतानाची महत्त्वाची नाटकं.
मोहन गोखले पुढे व्यावसायिक नाटकांसाठी मुंबईत आले. कानेटकरांच्या ' कस्तुरीमृग' आणि 'सूर्याची पिल्ले' मधल्या त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या. त्यानंतर ' बेबी' , 'डॉक्टर तुम्हीसुद्धा' , ' नरू आणि जान्हवी ' ही नाटकेही गाजली. राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या 'हेच माझे माहेर' , 'माफीचा साक्षीदार' आणि 'आज झाले मुक्त मी' या चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. गोविंद कुलकर्णी यांच्या 'बन्या -बापू' मधला प्रीतीचं झुळझुळ गाणी गाणारा मोहन गोखले यांचा बन्या प्रेक्षकांना आवडला.
'श्वेतांबरा' या मालिकेने मोहन गोखले यांनी टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले. 'मिस्टर योगी' मालिकेपासून घराघरात पोहोचलेले मोहन गोखले यांनी 'हिरो हिरालाल',' मोहन जोशी हाजीर हो' या सारख्या अनेक सिनेमांत अजरामर भुमिका केल्या.
समांतर सिनेमांमधेही मोहन गोखले यांनी लक्षणीय कामगिरी बजावली. केतन मेहतांच्या 'भवनी भवाई' या गाजलेल्या गुजराती चित्रपटात त्यांची प्रमुख भूमिका होती. मेहतांचाच ' मिर्च मसाला' , सई परांजपेंचा “ स्पर्श' , सईद मिर्जा यांचा 'मोहन जोशी हाजिर हो' , कुंदन शाह यांचा 'जाने भी दो यारो' , मीरा नायरच्या ' मिसिसीपी मसाला' या भूमिका चोखंदळ प्रेक्षकांना आवडल्या.
शुभांगी गोखले या मोहन गोखले यांच्या पत्नी व सखी गोखले ही कन्या. शुभांगी गोखले यांनी अनेक सिनेमे, मालिकांमध्ये कामे केली आहेत. अजूनही अनेक मालिकांमध्ये त्या दिसतात. त्यांनी 'आत्मकथा' या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केले होते. अनेक मालिका, सिनेमांतून आपली गुणवत्ता सिद्ध केल्यानंतर तेवढ्यावरच न थांबता त्यांनी कथा, ललित लेख यांद्वारेही वेळोवेळी प्रभावी लेखन केले आहे. 'श्रीयुत गंगाधर टिपरे' ही मराठी मालिका आणि 'लापतागंज' या लोकप्रिय हिंदी मालिकेतील भूमिकांमुळे त्या प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत. अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी सखीने फोटोग्राफीमध्ये डिग्री प्राप्त केली आहे. खरं तर दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेमुळे सखी घराघरांत पोहोचली आणि लोकप्रिय झाली.
कमल हसनाच्या ' हे राम ' च्या शूटिंगसाठी चेन्नईत असताना मोहन गोखले यांचे २९ एप्रिल १९९९ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मा.मोहन गोखले यांची कारकीर्द
नाटके
कस्तुरीमृग, सावित्री, महापूर, मिकी आणि मेमसाहेब, घाशीराम कोतवाल, बीज, सूर्याची पिल्ले, देणाऱ्याचे हात हजार, गिधाडे, हरी अप हरी, नरु आणि जान्हवी, डॉक्टर तुम्हीसुद्धा, हसा फुलांनो हसा, मी कुमार, बेबी, शॉर्टकट.
दूरदर्शन मालिका
श्वेतांबरा, देखो मगर प्यारसे, यात्रा,भारत एक खोज, लेखू, दोपहर का ठहराव, जंजीरें, अल्पविराम, मिस्टर योगी, भंवर, सी आय डी, करमचंद, जमीर, जुनून, आशीर्वाद, उजाले की अौर, शक्तीमान, बायबल, आहट, देखो मगर प्यारसे, दुनिया रंग रंगीली.
एकांकिका
मात, कैद, लिफ्ट, ती येते, बदाम राणी चौकट गुलाम, स्वराज्याचा कानमंत्र, झुलता पूल, खलित्यांची लढाई, डियर पिनाक, कदाचित, एका म्हाताऱ्याचा खून.
मराठी चित्रपट
बन्याबापू, ठकास महाठक, हेच माझे माहेर, संसार पाखरांचा, माफीचा साक्षीदार, अरे संसार संसार, आज झाले मुक्त मी, जगावेगळी प्रेमकहाणी, धाकटी जाऊ, अंगार, राजाने वाजवला बाजा, ध्यासपर्व, कैरी.
हिंदी चित्रपट
स्पर्श ,हिरो हिरालाल,मिर्च मसाला,अंधेरनगरी,डॉ बाबासाहेब आंबेडकर,हंगामा बॉंम्बे स्टाईल ,मोहन जोशी हाजिर हो,कल का आदमी,मिसिसिपी मसाला(English)आदि मिमांसा(अोरिया)भवनी भवाई(गुजराथी)हंसी हंसलाल (गुजराथी)हे राम (अपूर्ण)
दिग्दर्शन
महापूर,बीज,भाऊ मुरारराव,फरारी
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार म्हणतात..
एकदा एक विचार मनात आला.
कुणाला वायफळही वाटू शकतो. गायक आणि पेयांमध्ये साधर्म्य शोधायचा प्रयत्न तर कुठला गायक कुठलं पेय असेल..?
◆ मुकेश हे लिंबू सरबत आहेत.
जरा आंबटसर चव आहे त्यांच्या अनुनासिक आवाजाची. पण ताज्या लिंबू सरबताची चव इतर कशालाही येणे केवळ अशक्य..!
◆ मन्ना डे हे दूध आहेत.
पौष्टिक आणि शक्तिवर्धक.
पण ब-याचजणांना नुसते दूध पचत नाही !
◆ गीता दत्त कडक फिल्टर कॉफी आहेत.
येवू घातलेली झोप उडवतात.
◆ आशा भोसले या अतिशय उंची वाइन आहेत. जिभेवर आवाज रेंगाळत ठेवावा आणि फक्त नशा अनुभवावी.
◆ महम्मद रफ़ी हे स्कॉच व्हिस्की आहेत.
सोनेरी, उत्तम दर्जा आणि ॲएडिक्टिव्ह...!
◆ तलत मेहमूद...म्हणजे उसाचा रस..!
एकदम गोड आणि थंड पण एक किंवा
जास्तीत जास्त दोन ग्लास बस्स.
जास्त घेवू शकणे अशक्य...!
◆ महेन्द्रकपूर..म्हणजे ताक..!
जमलं तर एकदम फक्कड नाहीतर जावू दे.
◆ किशोर कुमार चहा आहेत.
कधीही, कसाही आणि कितीही अनुभवावा.
दुधात, दुधाशिवाय, तल्ल्फ येते म्हणून,
जाग येते म्हणून, सवय म्हणून, तजेला येतो
म्हणून, कामात, रिकाम्या वेळात, घरचा,
इराण्याचा, टपरीवरचा. कुठल्याही रुपात तो मस्तचं वाटतो.
शिवाय माझंही ते आवडतं पेय आहे..!
आणि शेवटी....
◆ लता मंगेशकर. त्या पाणी आहेत..!
नितळ,पारदर्शक, स्वच्छ,शुद्ध..!
तहान लागली तर ती इतर कुठल्याही पेयाने भागत नाही. प्राण वाचवू शकणारं हे एकमेव पेय..!
-- व्हॉटसअॅप वरुन
मोगॅम्बो खूश हुआ'...'त्या' भारदस्त आवाजातील हे तीन शब्द कानांवर पडले की समोरच्याचा थरकाप झालाच म्हणून समजा. त्यांचा जन्म २२ जून १९३२ रोजी झाला. 'मि. इंडिया' या सिनेमात अमरिश पुरी यांनी साकारलेली मोगॅम्बोची व्यक्तिरेखा विसरणे केवळ अशक्य. अशा एकापेक्षा एक सरस खलनायकी व्यक्तिरेखा, चरित्र भूमिका साकारणारे मा.अमरीश पुरी हे जुन्या काळातले प्रसिद्ध हिंदी चित्रपट कलाकार मा.मदन पुरी यांचे धाकटे भाऊ. अमरीश यांना हिंदी चित्रपटांमध्ये नायक बनायचं होतं म्हणून त्यांनी पंजाब सोडून मुंबई गाठली. मोठ्या भावाने सरळ सांगितलं की मी अजिबात मदत करणार नाही, जे काही या क्षेत्रात करायचं ते स्वतःच्या जोरावर करायचं.
नायक बनण्याच्या अमरीश यांच्या प्रयत्नांना यश मिळालं नाही. मग त्यांनी पृथ्वी थिएटर्समधल्या नाटकांमध्ये कामं करायला सुरुवात केली. तिथे मोठ्या दिग्दर्शकांकडे त्यांनी काम केलं. अगदी इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी अमरीश यांची नाटकं बघायला आवर्जून येत. मग हळूहळू अमरीश यांनी आपला मोर्चा परत एकदा हिंदी चित्रपटांकडे वळवला. सुरुवातीलाच चांगल्या दिग्दर्शकांचे चित्रपट अमरीश यांना मिळू लागले आणि हळूहळू त्यांनी आपले पाय हिंदी चित्रपटात घट्ट रोवायला सुरुवात केली. त्यांच्या कारकिर्दीबद्दल नव्याने लिहायची काहीच आवश्यकता नाही.
भारदस्त आवाज, भेदक नजर आणि करारी, देखणे रुप असलेले मा. अमरिश पुरी यांनी हिंदी सिनेमासृष्टीवर अनेक वर्षे राज्य केले. मा.अमरिश पुरी यांना बॉलिवूड सिनेमांमध्ये हीरो बनायचे होते. मात्र त्यांच्या नशीबात काही वेगळेच लिहिले होते. ते हीरो नाही मात्र बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायक बनले. अमरिश पुरी यांनी आपल्या तीस वर्षांच्या कारकिर्दीत सर्वाधिक नकारात्मक भूमिका साकारल्या.
पाश्चिमात्य प्रेक्षकांमध्येही अमरिश पुरी लोकप्रिय अभिनेते आहेत. स्टीवन स्पिलबर्ग यांच्याबरोबरील 'इंडियाना जोन्स' या हॉलिवूड सिनेमातील मोला रामची भूमिका आणि 'टेंपल ऑफ डूम' या सिनेमातील भूमिकेसाठी प्रेक्षक त्यांना कधीही विसरु शकत नाही. त्यांची खलनायकाची प्रतिमा सामान्य नागरिकांमध्ये एवढी परिणामकारक बनली होती की त्यांच्या मुलाचे मित्र जेव्हा घरी येत तेव्हा अमरीश यांच्यासमोर नुसतं जायलाही घाबरत असत.
खऱ्या आयुष्यात मात्र अमरीश अतिशय साधे, मन मिळावू, मृदू स्वभावाचे, आपल्या कुटुंबात रमणारे असे होते. आपल्या वडिलांविषयी राजीव पुरी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, की ''पापा तारुण्याच्या काळात हीरो होण्यासाठी मुंबईत आले होते. त्यांचे थोरले बंधू मदन पुरी सिनेसृष्टीत कार्यरत होते. निर्मात्यांनी त्यांना सांगितले, की त्यांचा चेहरा हीरोसारखा नाहीये. त्यामुळे ते खूप निराश झाले होते. अमरिश पुरी यांचे १२ जानेवारी २००५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
बॉलिवूडची एक उत्कृष्ट अभिनेत्री विद्या बालनचा जन्म १ जानेवारी १९७८ रोजी झाला. बॉलिवूडची 'उलाला गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन.
विद्या बालन लहानपण मुंबई मध्ये गेले. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. एकदा तिने माधुरी दीक्षितला टीव्हीवर 'तेजाब' सिनेमातील 'एक दो तीन' या गाजलेल्या गाण्यावर डान्स करताना बघितले आणि तेव्हाच निश्चय केला, की ती अभिनेत्रीच होणार. विद्या डान्स आणि गायन शिकली. मात्र विद्याने अभिनेत्री व्हावे, अशी तिच्या पालकांची इच्छा नव्हती. मात्र पालकांच्या इच्छेविरुद्ध कॉलेजमध्ये गेल्यानंतर विद्या अभिनय करायला लागली. सिनेमात पदार्पण करण्यात अपयशी ठरलेल्या विद्याने जाहिरातीत काम करण्यास सुरुवात केली. 'हम पांच' या टीव्ही शो मिळेपर्यंत तिने खूप संघर्ष केला.
समाजशास्त्रमध्ये मास्टर डिग्री मध्ये करण्यापूर्वी तिने जवळपास ९० जाहिरातीत काम केले होते. समाजशास्त्रमध्ये एम.ए केल्यानंतर विद्याला मोहन लाल यांच्या मल्याळम सिनेमात ब्रेक मिळाला. परंतु मोहन लाल आणि दिग्दर्शक यांच्यामध्ये वाद झाला आणि सिनेमाचे शूटिंग थांबवण्यात आले. मोहन लाल आणि दिग्दर्शक कमालने त्यापूर्वी आठ सुपरस्टार सिनेमे दिले होते, म्हणून या वादासाठी विद्या बालनला दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर विद्याने जेवढे मल्याळम सिनेमे साइन केले होते, त्यामधून तिला काढून टाकण्यात आले. त्यामुळे विद्या स्वतःला कमनशिबी समजू लागली होती. विद्याला नंतर प्रदीप सरकारने त्यांच्या एका अल्बमसाठी साइन केले.
'यूफोरिया' हा त्याकाळचा गाजलेला अल्बम होता. विद्याने नैराश्य बाजुला सारुन या अल्बममध्ये काम केले आणि तिला नशीबाची साथ मिळाली. प्रदीप सरकारने तेव्हा तिला सांगितलं होते, की 'मी तुझ्यासोबत एक सिनेमा बनवेल.' यामुळे विद्याचा आत्मविश्वास वाढला. त्यांच्या वचनाच्या आधारे सरकारने तिला 'परिणीती' सिनेमासाठी साइन केले.'परिणीती'नंतर विद्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. या सिनेमात तिने उत्कृष्ट अभिनय केला. पहिल्याच सिनेमासाठी विद्याला अनेक पुरस्कार मिळाले आणि विद्या बॉलिवूडच्या उत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये सामील झाली. परिणीतासाठी विद्याला २००५ मध्ये सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर विद्याने 'मुन्ना भाई MBBS', 'कहानी', 'द डर्टी पिक्चर', 'कहानी' यांसारखे अनेक सुपरहिट सिनेमे दिले आणि प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.
साऊथ इंडियन असूनदेखील विद्याचे बंगालसोबत खास कनेक्शन आहे. तिला बंगालीत बोलायला आवडते. प्रथम सलग चार वर्षे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवण्याचा विक्रम तिने केला आहे. विद्याची प्रत्येक भूमिका एक नवीन ठसा उमटवते. प्रेक्षकांना तिची प्रशंसा करायला भाग पाडणारा तिचा अभिनय सर्वांनाच आकर्षित करतो. परंतु विद्याला हे यश इतक्या सहजासहजी मिळालेले नाहीये. यासाठी तिने खूप मेहनत केली. ४० स्क्रिन टेस्ट, १७ मेकअप शूट दिल्यानंतर तिला 'परिणीता' मिळाला होता. विद्या बालनने ‘एक अलबेला’ या मराठी चित्रपटात काम केले आहे. ‘द डर्टी पिक्चर’, ‘कहानी’ सारखे चित्रपट विद्या बालनने केले तेव्हा त्या भूमिका साकारण्याचं धाडस कोणी केलं नव्हतं. विद्याने ते आव्हान पेललं, आणि साहजिकच तिला ‘हिरो’ हे बिरुद चिकटलं. तिथून पुढे येताना या बदलाचा चेहरा असलेल्या विद्याला लोक ‘लेडी आमिर खान’ म्हणू लागले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
देशविदेशातल्या प्राच्यविद्येतल्या संशोधन करणाऱ्या अनेक विद्वानांशी त्यांचे मैत्रीपूर्ण, जिव्हाळ्याचे संबंध आहेत. देशोदेशातल्या हस्तलिखितांचा शोध घेणं, त्यांचे जतन आणि संवर्धन करणं तसेच त्यातील ज्ञान विशेषतः भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी त्या त्याअभ्यासकांना माहिती पुरवणं, त्यांची वेगवेगळ्या प्रकारे ओळख करून देणं अशी अनेक कामे ते अत्यंत दृढ सेवाभावाने करत आहेत.
गणेश वासुदेव मावळणकर मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर जवळचे मावळंगे हे होय. त्यांचे प्राथमिक शिक्षण राजापूर येथे आणि उच्च शिक्षण अहमदाबाद येथे झाले.
हिमालयातील या सर्वोच्च शिखराला नेपाळी भाषेत सागरमाथा म्हणजे आकाशदेवता म्हटले जाते; तर तिबेटीमध्ये या शिखराला चोमुलुंग्मा म्हणजे विश्वदेवता म्हटले जाते. हिमालयाची भव्यता, तेथील गूढगंभीर आणि अंतर्मुख करणारे वातावरण, निसर्गाची हरक्षणाला पालटणारी रूपे आणि नजर बांधून ठेवणारे दिव्य सौंदर्य लक्षात घेतले तर ही नावे किती अर्थपूर्ण आहेत, हे ध्यानात येते. अशा या शिखरावर पाऊल ठेवावे ही तमाम गिर्यारोहकांची आकांक्षा असते. त्याची पूर्ती होणे अवघड आहे, हे माहीत असूनही असे स्वप्न पाहणारे अनेक असतात.
ध्येयनिष्ठा, कलाप्रेम, अथक परिश्रम करण्याची वृत्ती, जिद्द, अभ्यासूपणा, नम्रता, सामाजिक जाणीव, आई-वडील-भावंडे आणि गुरू यांच्यावरील प्रेम, निष्ठा, आदर आणि कृतज्ञता इत्यादी गुणांनी माणूस घडतो; मोठा होतो. पद्मजा फेणाणी यांच्या मध्ये हे सारे गुण आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti