सावळारामांनी जवळजवळ सातशे-आठशे गीते लिहिली. त्यांपैकी पाचशे-सहाशे रेकॉर्डवर आली. पी. सावळाराम यांना ‘जनकवी’ ही उपाधी देताना कुसुमाग्रजांना नेमके काय अभिप्रेत होते, हे त्यांनी पुढील शब्दांमध्ये व्यक्त केले आहे.. ‘ पी. सावळाराम त्यांच्या रसपूर्ण आणि भावगर्भ गीतांच्या द्वारा महाराष्ट्रातील असंख्य घरांपर्यंत- नव्हे, घरातल्या स्वयंपाकघरांपर्यंतही पोहोचले आहेत. खानदानी दिवाणखान्यापासून गोरगरीबांच्या ओटी-ओसरीपर्यंत सर्वत्र या नावाचा संचार झाला आहे. नागरवस्तीच्या वेशीवरच ते थांबले नाहीत. ग्रामीण भागातील झोपडय़ांत आणि चावडी-चव्हाटय़ावरही त्यांचे स्वागत झाले आहे.
हिंदी सिनेमाच्या ग्लॅमरस दुनियेत कारकीर्द घालवूनही शशी कपूर यांचं मन घुटमळत राहिलं ते पृथ्वी थिएटरपाशी. काही वर्षांपूर्वी पं. सत्यदेव दुबे यांना मानवंदना म्हणून पृथ्वी थिएटरने महोत्सव आयोजित केला होता, तेव्हा शशी कपूर व्हीलचेअरवर बसून पृथ्वी थिएटरमध्ये आले होते एका कोपऱ्यात शांतपणे बसून नाटकवाल्यांचा चाललेला जल्लोष शांतपणे निरखत होते आणि स्मितहास्य करत होते.
चितळे ग्रुपचा अवघ्या ३१ वर्षांचा तरुण सी.ई.ओ. इंद्रनील गेली दहा वर्षे या ग्रुपचा कारभार पाहत आहे. चव, दर्जा आणि विश्वास या त्रिसूत्रीला पुढे नेत त्यात स्वतःच्या इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट स्किल्सची भर टाकून त्याने आपल्या एक दशकाच्या कारकिर्दीतील ग्रुपची उलाढाल (टर्नओव्हर) दुपटीहून अधिक वाढवली, शिवाय खाद्य पदार्थ टिकवण्याच्या क्षेत्रात नवनवे प्रयोग करून पुण्याची बाकरवडी अमेरिकेत पोहोचवली आणि वर्ष-वर्ष टिकवली.
इंग्रजी आणि मराठीमधील वैज्ञानिक नियतकालिकांत त्या सातत्याने लेखन करीत असत. ‘समाजविकासासाठी व्यक्तिविकास’ हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. महाराष्ट्रातील एक विचारवंत व शिक्षणतज्ञ गोवर्धन पारीख यांच्या त्या पत्नी होत.
शम्मी कपूर यांनी गंभीर भूमिका म्हणता येतील, तशा फारशा भूमिका केल्याच नाहीत. एक मस्त कलंदर, काहीसा खुशालचेंडू तरुण अशी त्यांची प्रतिमा होती. त्यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला. पण प्रेक्षकांना जसे गंभीर भूमिका करणारे अभिनेते हवे असतात, तसेच जीवनावर ओसंडून प्रेम करणारे, आनंदी, मन प्रसन्न करणारे अभिनेतेही हवे असतात. जे आपल्याला आयुष्यात करणे शक्य नाही, ते पडद्यावरील अभिनेत्याच्या माध्यमातून उपभोगून घेण्याची ही सामान्य माणसाची गरज शम्मी कपूर यांनी यशस्वीपणे पूर्ण केली.
‘तुमसा नही देखा’ या चित्रपटाने त्यांना यशाची खरी चव चाखायला मिळाली, तरी तोपर्यंतचे त्यांचे चित्रपट साफ कोसळले होते. इतके की चित्रपटसृष्टीला रामराम ठोकून चहाच्या मळ्याचे व्यवस्थापक म्हणून काम करण्याची त्यांनी तयारी चालविली होती. तेव्हा ‘तुमसा नही देखा’ लोकप्रिय झाला. हिंदी नायकाला लागणारे देखणेपण त्यांच्याकडे होते, पण नायकाची बांधेसूद व कमावलेली देहयष्टी नव्हती. त्यांनी जी वैविध्यपूर्ण नृत्ये केली आहेत, तशी सध्या नृत्याचे पध्दतशीर शिक्षण घेतलेल्या अभिनेत्यांनाही करणे जमणार नाही. त्यातही पडद्यावरील त्यांची बरीचशी नृत्ये ही त्यांची स्वत:ची होती. त्याकाळी स्वतंत्र नृत्यदिग्दर्शक नेमण्याची पध्दत नव्हती. त्यामुळे अभिनेत्याला स्वत:लाच गाण्याच्या भावार्थानुसार नृत्य करावे लागे.
धसमुसळा, रांगडा प्रणय, नायिकांना थकविणारी भन्नाट नृत्यशैली आणि गीत संगीताची मेजवानी देत एका पाठोपाठ मनोरंजक चित्रपटांचा धडाका लावणारे म्हणून शम्मी कपूर यांची खासीयत होती. १९६०च्या दशकावर शम्मी कपूर यांनी अधिराज्य गाजविले होते. ‘जंगली’ या चित्रपटात त्यांनी ठोकलेल्या ‘याहू’ अशा रोमॅंटिक आरोळीने त्यापुढील चार पिढय़ांवर आपली मोहिनी कायम ठेवली आहे.
ही त्यांच्या वागण्या-बोलण्याची विशिष्ट ढब, नाच करतानाची बेभान अदा यासारख्या गोष्टींमुळे शम्मी कपूर यांनी आपले एक स्थान निर्माण केले होते. ‘जंगली’, ‘काश्मीर की कली’, ‘ऍन इव्हनिंग इन पॅरीस’, ‘तीसरी मंझील’, ‘ब्रह्मचारी’ यासारख्या चित्रपटांनी त्यांना बॉलीवूडमध्ये अढळस्थान मिळवून दिले. नव्या अभिनेत्रींना पदार्पणाची संधी देण्याबद्दल त्यांचे स्थानही महत्त्वाचे आहे.
जगात नवीन काय घडत आहे, याबद्दल त्यांना उत्सुकता होती. संगणक आणि इंटरनेटशी दोस्ती करणाऱ्या भारतातील अगदी प्रारंभीच्या व्यक्तींपैकी शम्मी कपूर हे एक होते. ‘याहू!’ कंपनीने आपले भारतातील कार्यालय सुरू केले तेव्हा शम्मी कपूर हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. ‘याहू!’शी शम्मी कपूर यांचे असलेले रुपेरी नाते हे जसे त्यास कारण होते, तसेच त्यांचे इंटरनेटचे प्रेम आणि त्याबद्दलची माहिती हेही त्याचे कारण होते. ‘याहू!’ ही त्यांच्या मालकीची वेबसाइट आहे का, अशी विचारणा अनेकदा लोक त्यांना करीत. स्वत:ची वेबसाइट निर्माण करणारे ते पहिले भारतीय अभिनेते होते.
शम्मी कपूर यांचे निधन १४ ऑगस्ट २०११ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
https://www.youtube.com/watch?v=0prXbQEgFkI
शम्मी कपूर यांची माहिती आजकी फनकार कार्यक्रमात.
https://www.youtube.com/watch?v=igrDASLbC2w
शम्मी कपूर यांची अभिनय केलेल्या चित्रपटातील काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=A-4aWPj2u4U
https://www.youtube.com/watch?v=A3UaHh41EFk
https://www.youtube.com/watch?v=95pl9bqnFdA
‘हम अंग्रेजोंके जमाने के जेलर है’ या शोलेतल्या संवादाने व आपल्या अनेक वैविध्यपूर्ण भूमिकांनी रसिकांना रिझवणारे ज्येष्ठ अभिनेते असरानी यांनी अनेक हिंदी चित्रपटात भूमिका केल्या आहेत. त्यांचा जन्म १ जानेवारी १९४१ रोजी झाला. ‘फॅमिली ४२०’ या मराठी चित्रपटात सुद्धा असरानी यांनी काम केले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
बॉलिवूडची 'उलाला गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. तिचा जन्म १ जानेवारी १९७८ रोजी झाला.विद्या बालन लहानपण मुंबई मध्ये गेले. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.
एकदा तिने माधुरी दीक्षितला टीव्हीवर 'तेजाब' सिनेमातील 'एक दो तीन' या गाजलेल्या गाण्यावर डान्स करताना बघितले आणि तेव्हाच निश्चय केला, की ती अभिनेत्रीच होणार. विद्या डान्स आणि गायन शिकली. मात्र विद्याने अभिनेत्री व्हावे, अशी तिच्या पालकांची इच्छा नव्हती. मात्र पालकांच्या इच्छेविरुद्ध कॉलेजमध्ये गेल्यानंतर विद्या अभिनय करायला लागली. सिनेमात पदार्पण करण्यात अपयशी ठरलेल्या विद्याने जाहिरातीत काम करण्यास सुरुवात केली. 'हम पांच' या टीव्ही शो मिळेपर्यंत तिने खूप संघर्ष केला. समाजशास्त्रमध्ये मास्टर डिग्री मध्ये करण्यापूर्वी तिने जवळपास ९० जाहिरातीत काम केले होते. समाजशास्त्रमध्ये एम.ए केल्यानंतर विद्याला मोहन लाल यांच्या मल्याळम सिनेमात ब्रेक मिळाला. परंतु मोहन लाल आणि दिग्दर्शक यांच्यामध्ये वाद झाला आणि सिनेमाचे शूटिंग थांबवण्यात आले. मोहन लाल आणि दिग्दर्शक कमालने त्यापूर्वी आठ सुपरस्टार सिनेमे दिले होते, म्हणून या वादासाठी विद्या बालनला दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर विद्याने जेवढे मल्याळम सिनेमे साइन केले होते, त्यामधून तिला काढून टाकण्यात आले.
त्यामुळे विद्या स्वतःला कमनशिबी समजू लागली होती. विद्याला नंतर प्रदीप सरकारने त्यांच्या एका अल्बमसाठी साइन केले. 'यूफोरिया' हा त्याकाळचा गाजलेला अल्बम होता. विद्याने नैराश्य बाजुला सारुन या अल्बममध्ये काम केले आणि तिला नशीबाची साथ मिळाली. प्रदीप सरकारने तेव्हा तिला सांगितलं होते, की 'मी तुझ्यासोबत एक सिनेमा बनवेल.' यामुळे विद्याचा आत्मविश्वास वाढला. त्यांच्या वचनाच्या आधारे सरकारने तिला 'परिणीती' सिनेमासाठी साइन केले.'परिणीती'नंतर विद्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. या सिनेमात तिने उत्कृष्ट अभिनय केला. पहिल्याच सिनेमासाठी विद्याला अनेक पुरस्कार मिळाले आणि विद्या बॉलिवूडच्या उत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये सामील झाली. परिणीतासाठी विद्याला २००५ मध्ये सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर विद्याने 'मुन्ना भाई MBBS', 'कहानी', 'द डर्टी पिक्चर', 'कहानी' यांसारखे अनेक सुपरहिट सिनेमे दिले आणि प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. साऊथ इंडियन असूनदेखील विद्याचे बंगालसोबत खास कनेक्शन आहे. तिला बंगालीत बोलायला आवडते.
प्रथम सलग चार वर्षे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवण्याचा विक्रम तिने केला आहे. विद्याची प्रत्येक भूमिका एक नवीन ठसा उमटवते. प्रेक्षकांना तिची प्रशंसा करायला भाग पाडणारा तिचा अभिनय सर्वांनाच आकर्षित करतो. परंतु विद्याला हे यश इतक्या सहजासहजी मिळालेले नाहीये. यासाठी तिने खूप मेहनत केली. ४० स्क्रिन टेस्ट, १७ मेकअप शूट दिल्यानंतर तिला 'परिणीता' मिळाला होता. विद्या बालनने ‘एक अलबेला’ या मराठी चित्रपटात काम केले आहे. ‘द डर्टी पिक्चर’, ‘कहानी’ सारखे चित्रपट विद्या बालनने केले तेव्हा त्या भूमिका साकारण्याचं धाडस कोणी केलं नव्हतं. विद्याने ते आव्हान पेललं, आणि साहजिकच तिला ‘हिरो’ हे बिरुद चिकटलं. तिथून पुढे येताना या बदलाचा चेहरा असलेल्या विद्याला लोक ‘लेडी आमिर खान’ म्हणू लागले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
विश्राम बेडेकर पटकथेच्या अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळवून लंडनला निघून गेले . वर्षभरात परतल्यावर ‘ प्रभात ‘ स्टुडिओत व्ही. शांताराम यांचे सहाय्यक म्ह्णून राहिले. त्यांनी एक महिन्यात ‘ शेजारी ‘ या चित्रपटाची पटकथा लिहून दिली.
नोबेल पुरस्कार हा जागतिक पातळीवरचा एक सर्वोच्च सन्मान आहे. हा सन्मान दरवर्षी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, जीवशास्त्र, अर्थशास्त्र, शांतता अशा विविध क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. गणित विषयासाठी मात्र हा नोबेल पुरस्कार नाही.
‘देवमाणूस’, ‘बैजू’, ‘अशी बायको हवी’, ‘वऱ्हाडी माणसे’, ‘संगीत सौभद्र’, ‘मानापमान’, ‘एकच प्याला’, ‘ब्रह्मचारी’, ‘लग्नाची बेडी’, ‘संशयकल्लोळ’, ‘सुवर्णतुला’, ‘मैलाचा दगड’ ‘भावबंध’सारख्या संगीत नाटकांमधून त्यांनी विविध भूमिका केल्या. ‘देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर’ हा ‘प्रीतिसंगम’ नाटकातील त्यांनी गायलेला अभंग अजरामर ठरला.
Copyright © 2025 | Marathisrushti