कंगना राणावतचे वडील अमरदीप राणावत एक व्यापारी व आई आशा राणावत एका शाळेवर शिक्षिका होत्या. तिचा जन्म २३ मार्च १९८६ रोजी हिमाचल प्रदेश येथील मंदी जिल्ह्यातील भाम्बला येथे झाला.तिने चंदिगढ येथील DAV स्कूल मधून आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षण त्यांनी तेथेच विज्ञानात केले. आई वडिलांची अशी इच्छा होती कि कंगनाने डॉक्टर बनावे. परंतु १२ वीत केमिस्ट्रीच्या युनिट टेस्ट मध्ये फेल झाल्यावर तिने ऑल इंडिया प्री मेडीकल टेस्ट देण्याचे मनातून काढून टाकले. आणि आपल्या भवितव्याला योग्यरीत्या निर्धारित करण्याचे ठरविले. पुढील शिक्षणासाठी कंगना दिल्लीला वयाच्या १८ व्या वर्षी राहायला आली. तिला मेडिकल क्षेत्रात जायचे नव्हते. कोणते क्षेत्र करियर म्हणून निवडायचे अशा विचारात असतानाच अचानक एका मोडेलिंग एजन्सीला तिचे लुक्स आणि अंदाजांना प्रभावित होऊन काही मौडेलिंग असाइनमेन्टसाठी बद्ध केले.या क्षेत्राबद्दल तिला जास्त रुची नव्हती. कारण तिला वाटायचे कि या खेत्रामध्ये क्रिएटीवीटीसाठी कोणतीच जागा नाही. म्हणून तिने अभिनयाकडे आपले लक्ष केंद्रित केले. त्यासाठी तिने अस्मिता थियेटर ग्रुप मध्ये सदस्य म्हणून कार्यरत झाली. येथे डिरेक्टर अरविंद गौर यांनी तिला अभिनयाचे गुण शिकविले. त्यांच्या थिएटर ग्रुप मध्ये राहून नाट्यामध्ये प्रभावशाली अभिनय केला. एका प्रयोगात सोबतच्या पुरुष अभिनेत्याचा रोल स्वतःच्या रोल सोबत करून तिने सगळ्यांचे लक्ष आकर्षित केले. त्यानंतर कंगना मुंबईला आली अभिनयात आपले करियर व्हावे यासाठी ख्यातनाम आशा चंद्रा यांच्या ड्रामा स्कूल मध्ये चार महिन्यांचा कोर्स साठी दाखला घेतला. कंगना राणावत यांनी २००६ मध्ये आलेल्या थ्रिलर फिल्म “गैंगस्टर” नी चित्रपटात प्रवेश केला. यासाठी त्यांना बेस्ट फीमेल डेब्यू फिल्मफेअर अवार्ड सुद्धा मिळाला. यानंतर २००६ च्या शेवटी आलेली फिल्म “वो लम्हे” मध्ये तिने एक भावूक भूमिका असलेले पात्र अभीनित केले. पुढे (२००७) लाइफ इन_ _ मेट्रो आणि (२००८) फैशन सारखे सुपरहिट चित्रपट केले. यासाठी त्यांना उत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री म्हणून राष्ट्रीय फिल्मफेअर अवार्ड आणि याच श्रेणीत एक फिल्मफेअर अवार्ड सुद्धा मिळाले आहे. कंगनाने यानंतर व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपट “राज : द मिस्ट्री कंटिन्यूज” (२००९) आणि “वन्स अपोन ए टाइम इन मुंबई” (२०१०) केले. त्यानंतर त्यांनी (२०११) मध्ये बॉक्स ऑफिसवर हिट झालेली फिल्म “तनु वेड्स मनु” मध्ये अभिनेता आर.माधवन यांच्यासोबत विनोदी भूमिका केली. यानंतर त्यांनी सुपरस्टार ह्रितिक रोशन यांच्या सायन्स फिक्शन फिल्म “क्रिश 3” (२०१३) मध्ये एक उत्परीवर्ती जंतूची भूमिका केली. हि फिल्म बॉलीवूडच्या सर्वात यशस्वी चित्रपटामधील एक मानली जाते. २०१४ मध्ये चित्रपट “क्वीन” मधील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून फिल्मफेअर आणि राष्ट्रीय फिल्म अवार्ड सुद्धा मिळाला. २०१५ मध्ये कंगनाची आणखी सर्वोत्तम फिल्म “तनु वेड्स मनु रिटर्न्स” मधील दुहेरी भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर क्रिटीक्स अवार्ड आणि दुसरयांदा उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून लगातार दुसरा फिल्मफेअर आणि राष्ट्रीय फिल्म अवार्ड मिळाला हि उपलब्धी कोणत्याही महिला कलाकाराने मिळविलेली पहिली मानली जाते. त्या भारतातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्र्यामधून एक आहे. कंगना भारतीय मेडीया मध्ये इमानदारी आणि खऱ्या मनाने सामान्यासमोर आपले विचार प्रकट करण्यासाठी ओळखली जाते. भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध कलावंतांमध्ये गणल्या जाणारी कंगना तीन राष्ट्रीय फिल्म अवार्ड आणि चार विविध श्रेणीमध्ये फिल्मफेयर अवार्ड जिंकणारी अभिनेत्री आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
कथा, कादंबरी, ललित लेख, स्फुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार गौरी देशपांडे यांनी हाताळले आहेत. मराठीबरोबरच त्यांचे बरेचसे इंग्रजी लिखाण तसेच काही इंग्रजी -मराठी व मराठी- इंग्रजी अनुवादसुद्धा प्रकाशित झाले आहेत.
चित्रपट कलाकारांकडे पाहण्याचा दृष्टोकोन दूषीत होता त्या काळात दुर्गा खोटे यांना चित्रपटात येणे भाग पडले. त्यांचा जन्म १४ जानेवारी १९०५ रोजी झाला. मुलीने चित्रपटात काम करणे घरच्या लोकांना पसंत नव्हते. मा.दुर्गा खोटे यांनी चित्रपटात अशा भूमिका केल्या की चित्रपटातील महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला. चांगल्या घरातील महिलाही अभिनय क्षेत्रात येऊ शकतात असा एक प्रकारे संदेशच त्यांनी दिला. सुरूवातीस त्यांनी छोट्या भूमिका केल्या आणि लवकरच त्यांना नायिकेची भूमिका मिळाली. प्रभात फिल्म्सचा १९३२ मध्ये प्रदर्शित झालेल्या अयोध्येचा राजा या चित्रपटाने तर त्यांना ओळख करून दिली. मराठी आणि हिंदीमध्ये बनलेल्या या चित्रपटात त्यांनी राणी तारामतीची भूमिका केली.त्यावेळी स्टूडियो सिस्टमचा जमाना होता त्यावेळचे कलाकार ठरावीक पगारावर स्टूडियोमध्ये काम करायाचे. पण, आत्मविश्वासच्या जोरावर त्यांनी फ्रीलांस काम करण्यास सुरूवात करून ही पध्दत माडीत काढली. न्यू थियेटर्स, ईस्ट इंडिया फिल्म कंपनी, प्रकाश पिक्चर्स आदींसाठी त्यांनी काम केले. १९३० च्या शतकाच्या अखेरीस त्या निर्माता आणि दिग्दर्शक बनल्या आणि त्यांनी चरणों की दासी, भरत मिलाप अशा एकावर एक उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती केली. या चित्रपटांनी त्यांचा गौरव केला.चित्रपटांबरोबरच मा.दुर्गा खोटे यांनी मराठी रंगभूमीवरही आपली कारकिर्द गाजवली. इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन च्या माध्यमातून त्यांनी रंगभूमीसाठी भरीव कार्य केले. मुंबई मराठी साहित्य संघाच्या अनेक नाटकांमध्ये त्यांनी काम केले. शेक्सपीयर यांच्या मॅकबेथवर आधारीत राजमुकूट या नाटकातील त्यांचा अभिनय वाखणण्या.जोगा होता. या क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मा.दुर्गा खोटे यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानीत करण्या त आले. मुगले आजम, बॉबी, बावर्ची अशा चित्रपटातील त्यांच्या भूमिका आजही स्मरणात आहेत. त्यांनी लिहलेल्या आत्मकथेचा इंग्रजी अनुवाद 'दुर्गा खोटे' या नावाने प्रकाशित झाला आहे. मा.दुर्गा खोटे यांचे २२ सप्टेंबर १९९१ मध्ये निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
विचारवंत पत्रकार, अभ्यासू संपादक विनायक सदाशिव वाळिंबे यांचा जन्म ११ ऑगस्ट १९२८ रोजी झाला.
विनायक सदाशिव वाळिंबे उर्फ वि. स. वाळिंबे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहेत ते विचारवंत पत्रकार, अभ्यासू संपादक आणि मुख्य म्हणजे म्हणजे ‘पुलं’च्या शब्दांत सांगायचं झालं तर अत्यंत ‘वाचनीय लेखक’ म्हणून! या दोनच शब्दांत ‘पुलं’नी त्यांच्या सर्व लेखनाचं सार सांगितलंय. उमेदवारीचा काळ ‘अग्रणी’ दैनिकात, ‘रोहिणी’ मासिकात, नंतर ‘प्रभात’ आणि ‘ज्ञानप्रकाश’ वृत्तपत्रात काढल्यानंतर, वाळिंबे यांनी आपल्या पत्रकारितेचा महत्त्वाचा सर्व काळ पुण्यात ‘केसरी’ वृत्तपत्रात काढला. त्यांच्या सुहृदांनी त्यांच्यावर लिहिलेल्या लेखांचा संग्रह ‘उमदा लेखक, उमदा माणूस’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्याचं संपादन डॉ. अरुणा ढेरे यांनी केलं आहे.
गरुडझेप, हिटलर, इंदिरा गांधी बंगलोर ते रायबरेली, इस्रायलचा वज्रप्रहार, नेताजी, ऑपरेशन थंडर, पराजित-अपराजित, सत्तावन्न ते सत्तेचाळीस, सावरकर, श्री शिवराय, स्टॅलिनची मुलगी, व्होल्गा जेव्हा लाल होते, १९४७, वॉर्सा ते हिरोशिमा, स्वातंत्र्यवीर अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आणि वाचकप्रिय आहेत. वि. स. वाळिंबे यांचे २२ फेब्रुवारी २००० रोजी निधन झालं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
बॉलीवूडची शपित यक्षिणी अभिनेत्री रेखा यांचा जन्म १० ऑक्टोबर १९५४ रोजी झाला. दक्षिण भारतीय चित्रपट अभिनेते जेमिनी गणेशन आणि पुष्पवल्ली यांची मुलगी असलेल्या रेखा या गेल्या तीस वर्षांहूनही अधिक काळ बॉलीवूडमध्ये असून त्या अगदी सुरुवातीपासूनच आश्वासक अभिनेत्री म्हणून ओळखली गेली आहे. रेखा यांचे मुळ नाव भानुरेखा पण सिने सृष्टी साठी त्यांनी रेखा हे नाव धारण केले. १९७० मध्ये आलेला सावन भादो हा त्यांचा पहिलाच चित्रपट अगदी लोकप्रिय ठरला होता. त्यानंतर नमक हराम, धर्मा, कहानी किस्मत की आणि प्राण जाए पर वचन ना जाए यासारखे कित्येक हीट चित्रपट त्यांनी दिले.
दो अंजाने या चित्रपटात त्यांनी महत्वाकांक्षेसाठी आपल्या प्रेमाची तिलांजली देणाऱ्या पत्नीची साकारलेली भूमिका प्रेक्षकांना वेगळा आनंद देऊन गेली. गुलजार यांच्या घर मध्ये एक प्रगल्भ रेखा पाहायला मिळाली. त्यानंतर त्या भारतीय प्रेक्षकांचे मन जिंकत गेली आणि शेवटी बॉक्स ऑफिस क्वीन म्हणूनच ओळखली जाऊ लागल्या. मुकद्दर का सिकंदर, खुबसुरत, जुदाई, माँग भरो सजना, एक ही भूल यासारखे त्यांचे चित्रपट हीट ठरले होते. यश चोप्रा यांचा सिलसिला आणि मुजफ्फर अल यांचा उमराव जानने त्यांचे आगळ्या प्रतिमेवर शिक्कामोर्तब केले रेखा यांनी भारतीय चित्रपट इतिहासाला सुवर्णक्षणांचे संचित बनवले आहे. त्यांनी फटाकडी या मराठी सिनेमात सुद्धा काम केले आहे.
रेखा या आपल्या फिगर आणि फिटनेस साठी नावाजली जातात. त्या भारताची फार लोकप्रिय ग्लॅमर आयकॉन ठरली आहे. त्यांना अस्सल ‘मेकओव्हर क्वीन’ म्हणूनच ओळखले गेले. ४० वर्षात त्यांचे १८० हून जादा सिनेमे आले. रेखा यांना ५ फिल्म फेअर व पद्मश्री पुरस्कार मिळाले आहेत. त्या खासदार पण आहेत. तिच्या चाहत्यासाठी रेखा अजून तेवढीच 'खुबसुरत' आहे. १९७३ मध्ये रेखा यांनी विनोद मेहरा शी गुपचूप केलेलं लग्न दोघांनी नाकारलं, पण ९०-९१ मध्ये मुकेश अगरवालशी केलेलं लग्न अवघे १४ महिन्यात संपले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:-इंटरनेट
त्यांनी माधवबुवा सुकाळे यांच्याकडे जवळपास १० वर्षे टाळवादनाचे शिक्षण घेतले, पुढे पखवाजवादनही शिकले, पण खरे ते रमले ते टाळवादनात. ते बालगंधर्वांबरोबर साथ करायचे. माऊली टाकळकर यांनी पंडित भीमसेन जोशींना ४० वर्षे टाळांची साथ केली. त्यांच्यामुळेच त्यांनी जगभर दौरे केले. आपल्या टाळ वादनाने अनेक दिग्गज व आंतरराष्ट्रीय कलाकारांना त्यांनी गेली ४ दशकाहून अधिक साथ केली आहे.
‘मानवी संस्कृतीचा इतिहास’, ‘मराठी साहित्यातील उपेक्षित मानकरी’, ‘कोशकार केतकर’ असे ग्रंथ रचले. ज्ञानवंत, विचारवंत, व चिकित्सक अशा चिंतामणी गणेश कर्वे यांनी कोशनिर्मितीचे प्रचंड काम केले. महाराष्ट्रीय विद्वत्तेचा आदर्श म्हणून त्यांच्या शब्दकोशाकडे पाहिले जाते.
स्मिता शेवाळे… विलक्षण बोलका, भावदर्शी चेहरा ही तिची ओळख…
केदार शिंदे दिग्दर्शित ‘यंदा कर्तव्य आहे’ या चित्रपटातून स्मिता शेवाळेनं मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केलं आणि या इंडस्ट्रीला एक सोज्वळ, लोभस, घरंदाज चेहरा मिळाला. २००६ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची जादू आजही तितकीच टिकून आहे हेच या सिनेमाचं यश सांगता येईल. यंदा कर्तव्य आहे हा सिनेमा स्मितासाठी टर्निंग पॉइंट ठरला आणि यानंतर तिने मागे वळून बघितलंच नाही. अनेक मराठी सिनेमे, मालिका यातील अभिनयातून तिने रसिकमन जिंकलं…
रुपेरी पडदा आणि छोटय़ा पडद्यावर आपल्या अभिनयातून रसिकमन जिंकलेल्या स्मिताला काहीकाळ अभिनय क्षेत्रापासून दूर राहावं लागलं ते तिच्या वैयक्तिक कारणामुळे. लग्नानंतर बराच काळ तिने चित्रपटातून ब्रेक घेतला होता. आई, पत्नी, सून, मुलगी आणि एक व्यावसायिक अभिनेत्री या सगळ्या रूपांना न्याय देता देता स्मिताची दमछाक झाल्याचं ती सांगत असतानाच हा ब्रेक अवघ्या अडीज ते तीन वर्षांत संपवून तिने नव्या जोमाने आणि ताकदीने अभिनय क्षेत्रात पुनरागमन केलं. ‘कनिका’ या हॉरर चित्रपटातून तिने साकारलेल्या छोटय़ा मात्र ठळक भूमिकेमुळे तिच्या अभिनयातले वेगळे पैलू पाहायला मिळाले.
स्मिताने इंडस्ट्रीत ब्रेक घेण्यापूर्वी म्हणजेच २०१४ साली तिचे फोटोशूट करण्याची संधी मला मिळाली होती. शूट नेमकं काय असेल, त्याचा लूक कसा असेल हे स्मिताशी बोलून शूटची तारीख नक्की करण्यात आली. स्मिताचा सोज्वळ, लोभस, घरंदाज चेहरा लक्षात घेऊन तिच्यासाठी वेशभूषा, त्यातील रंगसंगती, दागिने, मेकअप, हेअर हे सारं काही ठरवण्यात आलं होतं. स्मिताशी माझ्या स्टायलिस्ट आणि कॉस्च्युम डिझायनरने त्यासंबंधित संपर्क करून नेमका तिला कशा पद्धतीने प्रेझेंट केलं जाईल याचा अंदाज दिला होता. शूटच्या दिवशी आम्ही ठरल्याप्रमाणे भेटलो आणि शूटला सुरुवात केली. पारंपरिक वेशभूषा, कलाकुसरीने सजलेले दागिने, त्यावरचा मराठमोळा साज आणि नयनरम्य शृंगार यातून स्मिताचा मोहक चेहरा अधिकच उठून दिसत होता. स्मिताच हे लोभस रुपडं मी कॅमेराबद्ध करण्याचा प्रयत्न मी करत होतो. हे शूट चांगलं तीन-साडे तीन तास चाललं.
वृत्तपत्रासाठी हवे असलेल्या फोटोंचा साचा ठरलेला होता त्यानुसार सुरुवातीला वृत्तपत्राची गरज असलेले फोटो मी आधी टिपले. नंतर त्याच मराठमोळ्या पेहरावात फुल लेन्थ, मिड लेन्थ, हेडशॉटस असे काही फोटो घेतले. फ्लॅट लायटिंग करून फोटो टिपल्यानंतर स्मिताच्या चेहऱयाचे वेगळ्या लायटिंगमध्ये काही फोटो मला टिपता आले. यावेळी ब्लॅक ऍण्ड व्हाईट फोटो टिपण्याचा मोह मला आवारात आला नाही. या ब्लॅक ऍण्ड व्हाईट पोट्रेट्समध्ये स्मिता अधिक खुललेली दिसली. शूट सुरू होऊन साधारणपणे तीन तास झाले असावेत. स्मिताचे पारंपरिक वेषभूषेतले फोटो टिपल्यानंतर तिचे मॉडर्न लूकमधले फोटो टिपण्यासंबंधित तिच्याशी मी बोललो. स्मिताला संकल्पना आवडली आणि आम्ही लगेच छोटा ब्रेक घेऊन पुढच्या शूटच्या तयारीला लागलो.
माझ्या स्टायलिस्ट आणि कॉस्च्युम डिझायनरशी बोलून आम्ही लगेचच तिच्यासाठीचा नवा मॉडर्न लूक ठरवला. लाल रंगावर काळ्या रंगाची डिझाईन असलेला वनपीस स्मितासाठी यावेळी आम्ही निवडला. आधीच्या पारंपरिक वेशभूषेला संपूर्णपणे तडा देणारा हा तिचा लूक होता. यासाठी तिला मेकओव्हर करावा लागणार होता. मेकअप, हेअर हे सारं काही नव्याने करायला साधारणपणे दीड तास गेला. स्मिता या मॉर्डन लूकमध्येही अतिशय सुंदर दिसत होती. तिच्या बोलक्या चेहऱयाने हा लूकदेखील तितकाच खुलवून आणला होता.
स्मिता शूटच्यावेळी मदतशीर होती. तिला सांगितलेले पोजेस ती देत होतीच शिवाय त्यात वेगळेपणा कसा आणता येईल यासाठीही तिची धडपड सुरू होती. सुरुवातीला तिचे काही रंगीत फोटो टिपल्यानंतर लायटिंग बदलून ड्रमॅटिक म्हणजे प्रकाश आणि सावलीचा खेळ करून केलेल्या लायटिंगमध्ये तिचे काही ब्लॅक ऍण्ड व्हाईट फोटो मी टिपले. यापूर्वीच्या शूटच्यावेळी स्मिताच्या पेहरावाला अनुसरून तिचा शृंगार केला होता. कपाळावर अर्ध चंद्रकोर टिकली, गळ्यात भव्य हार, दागिने, नाकात नथ असा सारा शृंगार असलेल्या स्मिताचा चेहरा मी आधी टिपला होता. यानंतरच्या मॉर्डन लूकमध्ये मात्र तिने काहीच शृंगार केला नव्हता. तरीहीदेखील तिचा हा चेहरा आधीच्या चेहऱयाएवढा किंबहुना त्याहून अधिक खुललेला दिसत होता, हे विशेष. तिच्या ही चेहऱयाची जादू यावेळी मला अनुभवता आली.
स्मिताचं शूट सुरू करण्यापूर्वी मेकअपच्यावेळी स्मिताशी मनमुराद गप्पा झाल्या. केदार शिंदेचा ‘यंदा कर्तव्य आहे’ हा सिनेमा म्हणजे तिच्यासाठी अभिनयाची कार्यशाळाच ठरल्याचं ती सांगते. मोजके सिनेमे ठरवून करणाऱया कलाकारांपैकी एक अशी स्मिताची ओळख करून देता येईल. कोणताही सिनेमा निवडण्यापूर्वी त्या सिनेमाचा अभ्यास, त्यातील बारकावे लक्षात घेऊन मगच ती सिनेमे निवडते आणि एकदा का सिनेमा निवडला की मेहनत घ्यायची तिची तयारी असते हे तिच्या बोलण्यातून वेळोवेळी जाणवत होते.
धनेश पाटील
dhanuimages@gmail.com
हिंदी चित्रपट गाण्यांचे काही ठराविक साचे आहेत आणि त्याच्यापलीकडे बहुतेक सगळे संगीतकार ओलांडून जात नाहीत.सुरवातीला गाण्याच्या चालीचे सूचन, वाद्यांच्या किंवा वाद्यमेळाच्या सहाय्याने दर्शवायचे, पुढे पहिला अंतरा, नंतर दुसरा अंतरा आणि शेवटी गाण्याचे शेवटचे चरण, असा बांधेसूद आविष्कार असतो.त्यामुळे गाण्यांच्या सादरीकरणात कधीकधी एकसुरीपणा येऊ शकतो. असे असून देखील काही संगीतकार असे असतात, याच पद्धतीने गाणे सादर करताना, चालीतील वैविध्य, वाद्यांचे निरनिराळे प्रकार, आणि गायन शैली यात प्रयोग केले जातात, दुर्दैवाने, असले प्रयोग बहुतांशी दुर्लक्षित होत असतात. वास्तविक चाल म्हणजे काय? हाताशी असलेल्या शब्दकळेला सुरांच्या सहाय्याने सजवून, गायक/गायिके पर्यंत पोहोचवायची!! चाल अशी असावी की ती गुणगुणताना, कविता वाचनापेक्षा अधिक सुरेल आणि खोल तरीही आशयाशी सुसंवादित्व राखणारी असावी. अशा थोड्या संगीतकारांच्या पंक्तीत रोशन यांचे नाव फार वरच्या स्तरावर घ्यावे लागेल. सुरवातीपासून, उर्दू भाषेची आवड आणि संगीताचा ध्यास, यामुळे सुरवातीचे शिक्षण पंडित रातरंजनकर, पुढे, उस्ताद अल्लाउद्दिन खान साहेब यांचे लाभलेले मार्गदर्शन, यामुळे रागदारी संगीताचा पाया तयार झालेला. दिलरुबा वाद्यावर त्यांचे प्रभुत्व होते आणि त्यामुळे त्यांच्या गाण्यांत तंतुवाद्यांचा आढळ भरपूर आढळतो. याचा परिणाम असा झाला, लयबंधांचे उठावदार प्रक्षेपण करणाऱ्या वाद्यांपेक्षा सुरावट धुंडाळणाऱ्या वाद्यांचे आकर्षण अधिक होते.
सारंगी, Accordion, Spanish Guitar, बासरी या वाद्यांवर त्यांचा अधिक भर आहे. काही उदाहरणे बघूया. १] सलामे हसरत कबूल कर लो, २] मैने शायद तुम्हे पहले भी कभी देखा है, ३] पांव छू लेने दो, ४] रहते थे कभी उनके दिल मे, या आणि अशा बऱ्याच गाण्यातील सारंगी मुद्दामून ऐकावी म्हणजे माझे म्हणणे पटावे. प्रेत्येक भाषिक वाक्यानंतर सारंगी आपल्या छोट्या, खेचक व दर्दभरल्या सुरावटींच्या पाउलखुणा सोडीत गीताचा दरवळ वाढवते. चालीचे स्वरूप, सारंगीस दिलेला वाव आणि तिचा स्वनरंग, यांमुळे सारंगी संगीताचे नक्षीकामात रुपांतर होण्याचा धोका भरपूर होता परंतु संगीतकार म्हणून तो धोका त्यांनी टाळला!! वाद्याची निवड, हात राखून पण विचक्षण वापर अनाजे विशिष्ट वाद्ये, आणि तरीही आवाहक योजना, ही खास वैशिष्ट्ये म्हणता येतील.
रोशन यांच्या वाद्यांच्या वापराविषयी दोन सर्वसाधारण विधाने करता येतील. १] रचनाकारांचा एकंदर कल बाजूला सारून, टिकाऊ आणि मधुर भावरंग पैदा व्हावा याकरिता खालचे - मंद्र सप्तकातील तसेच मध्य सप्तकातील स्वर आणि संबंधित स्वर-मर्यादा यांतच चालीचा वावर ठेवण्यात कसलीही कसूर केली नाही. "तेरी दुनिया मे दिल लगता नही", "कहा हो तुम" ही गाणी ऐकावीत. कुठेही विरहीवेदनेची दवंडी पिटलेली नाही. सारा परिणाम, ढाल्या स्वरांतून तरंगत राहणाऱ्या सुरावटी व आवाज यांतून सिद्ध केला आहे. असाच उदासी परिणाम, तलतच्या "मै दिल हुं एक अरमान भरा" या गाण्यात अप्रतिम येतो. तलतच्या आवाजातील सुप्रसिद्ध कंप आणि त्याला साजेसा सुरावटीचा ढाला पाया, मनार गाढा परिणाम करते.
मात्र, साठीच्या दशकात रोशन यांची शैली बदलली. जिथे मंद्र सप्तक आणि ढाला स्वर होता, तिथे उच्चस्वरी वाद्यवृंद घेतो, असे आढळते. अर्थात, त्याबद्दल आपण थोडा नंतर विचार करूया. सुरावटी आणि सुरावटींचे खास स्त्रोत यांच्याकडे या संगीतकाराचा जाणवण्याइतका ओढा असला तरी लयबंधांचा सर्जक उपयोग, हा दुसरा विशेष म्हणता येईल. एकाच गीतात, एकाधिक ताल वा लयबंध वापरणे, हा त्यांचा खास प्रयोग म्हणता येईल. "बार बार तोहे क्या समझाये" किंवा "झीलामील तारे करे इशारा" ही गाणी बघूया. संगीतशास्त्रानुसार ताल आणि ठेका, या दोन वेगळ्या पण संबंधित संकल्पना असून, त्यांची सादरीकरणे खास स्वरूपाची असतात. तसे बघितले तर, हे दोन्ही कालिक आकृतिबंध असतात, पण ताल हा मानसिक वा कल्पित कालिक नकाशा असून, त्याचे मूर्त स्वरूप वाद्यावर निर्माण केल्या जाणाऱ्या ध्वनीच्या द्वारे ठेक्यातून सिद्ध होत असते. म्हणून एकाच तालाचे अनेक ठेके अस्तित्वात असतात आणि ते कानाला वेगवेगळे प्रतीत होतात. "सलामे आली हसरत कबूल कर लो" आणि "मैने शायद तुम्हे पहले भी कभी देखा है" ही गाणी बघुया. या दोन्ही गाण्यांत निराळे ठेके योजले आहेत. "बहारो ने मेरा चमन लूटकर" या गीतात देखील १० मात्रांचा झपताल वापरला आहे पण तालाचा चेहरा-मोहरा ओळखीचा वाटत नाही.
"मैने शायद तुम्हे" या गाण्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणता येईल. भारतीय गीतरचनेत पहिल्या तालमात्रेवर, जिला आपण "सम" म्हणतो, तिच्यावर जोर दिलेला असतो. या पार्श्वभूमीवर या गाण्याची सम "निराघात" आहे. "शायद" या शब्दातील, "य" अक्षरावर सम येउन गेली, हे पहिल्यांदा ऐकताना ध्यानात देखील येत नाही!! मुळात, गाण्यात, ताल देखील अति हलक्या आवाजात आघाती ठेवलेला आहे, त्यामुळे गाणे फार बारकाईने ऐकायला लागते.
एकंदरीने, रोशन यांची रचनाप्रकृती दु:ख, अंतर्मुखता आणि खंत करण्याकडे झुकली आहे. अर्थात, याविरुद्ध देखील त्यानी रचना केल्या आहेत."कही तो मिलेगी", "सखी रे मोरा मन", "वो चले आये रे" ही सगळी गाणी चैतन्यपूर्ण, चमकदार चालींची झाली आहेत. द्रुत गती, चाल फार खाली नाही वा फार उंच स्वरांवर नेउन न ठेवणे, शब्दांच्या शेवटी खटके-मुरक्या इत्यादी नाजूक स्वरालंकार योजणे वगैरे सांगीतिक युक्त्या कुशलतेने योजलेल्या आहेत.
रोशन यांच्या गाण्यांकडे आणखी वेगळ्या नजरेने बघितल्यास, त्यांना युगुलगीतांचे आकर्षण अधिक होते, हे सहज समजून घेता येते. "हम इंतजार करेंगे","छा गये बादल","पाव छु लेने दो" ,"छुपा लो युं दिल मे प्यार" इत्यादी गाणी ऐकावीत. आपल्याकडील बहुतांशी युगुलगीते, नाट्यात्म होतात, ती संवादात्मक तत्वाच्या पाठपुराव्यामुळे, हे सर्वसाधारण सत्य लक्षात घेत, या गाण्यातील आगळेपण सहज सिद्ध होते. ही गाणी कुठेही अति नाट्यात्मक होत नाहीत तर संवाद्तत्वावर पुढे विस्तारत जातात.
आम म्हटल्या जाणाऱ्या हिंदुस्थानी रागांत रचना करणे, रोशन यांचे मनपसंद काम होते. "मन रे तू काहे ना धीर धरे (यमनकल्याण), या गाण्यातील शांत स्वरवैभव केवळ अपूर्व आहे. निगाहे मिलाने को जी चाहता है (यमन), "बता दो कौन गली (तिलंग), "मदभरी अंखीयां" (जौनपुरी) किंवा "गरजत बरसत" (मल्हार) ही देखील उल्लेखनीय गाणी म्हणता येतील. प्रत्यक्षात तो राग जरी योजला नसला तरी त्या रागाच्या छायेत या गाण्यांच्या चाली अवतरत असतात. आता, यमन राग घेतला तरी, "सलामे हसरत","गमे हस्तीसे बस बेगाना","वळला क्या बात","युं अगर मुझको ना चाहो तो" ही सगळी यमन रागाच्या सावलीत वावरतात परंतु रागाची प्रकृती वेगळी गाण्याची रचना वेगळी, असा फरक या गाण्यांमधून अप्रतिमरीत्या दिसून येतो.
"कव्वाली" हा गीतप्रकार रोशन यांनी प्रतिष्ठित केला. "अगर ये दिल" (घर घर मे दिवाली),"ना तो कारवां की तलाश" (बरसात की रात), "निगाहें मिलाने को" (दिल ही तो है) या कव्वाल्या ऐकाव्यात. "निगाहें मिलाने को" या कव्वालीत, यमन नीटसपणे येतो, पण आशा भोसलेच्या कौशल्यपूर्ण आवाजाच्या लागावास (उदाहरणार्थ खालच्या "रे" वरून एकदम अचूक वरचा "रे" घेणे!!) शब्दांच्या अंती येणारी द्रुतगती फिरत यांना भरपूर जागा आहे.
आणखी काही खास वैशिष्ट्ये बघायची झाल्यास, त्यांची बहुतेक गाणी स्वरविस्तार योग्य आहेत, म्हणजे गाताना, तुम्हाला स्वरविस्तार करण्यास भरपूर वाव असतो, अर्थात गायकी अंगाच्या रचनेचे हेच महत्वाचे वैशिष्ट्य म्हणावे लागते. रोशन यांचे, एक संगीतकार म्हणून वैशिष्ट्य मांडायचे झाल्यास, गाण्यात सांगीतिक विस्तार शक्यता असताना देखील, त्यांनी स्वरांना "बांध" घालून, गाण्याची लय कायम ठेऊन, गायन आणि वाद्यांची पट्टी ही नेहमीच मंद्र किंवा शुद्ध सप्तकात ठेवली आहे. साठोत्तरी गाण्यात मात्र काही गाणी या तत्वांना फटकून बांधली गेली आहेत. त्यांची बहुतांश गाणी ऐकताना, मला आरतीप्रभूंच्या दोन ओळी नेहमी आठवतात,
"तुटते चिंधी जखमेवरची, आणिक उरते संथ चिघळणे"
अनिल गोविलकर
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
नंदिता पाटकर एक मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री आहेत. नंदिता यांनी मुंबईतील रुपारेल कॉलेजमधून पदवी पूर्ण केली. त्यांनी सुरुवातीला आरजे आणि व्हॉईस आर्टिस्ट म्हणून काम केले आहे.नंदिता या झी मराठी वरील माझे पति सौभाग्यवती या मराठी मालिकेत त्यांनी अभिनय केला होता.
Copyright © 2025 | Marathisrushti