(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • मराठीतील ‘गझल सम्राट’ सुरेश भट

    सुरेश भट हे मराठी गझल विश्वातील एक अजरामर नाव. मराठीतील 'गझल सम्राट' सुरेश भट यांचा जन्म १५ एप्रिल १९३२ रोजी झाला. त्यांच्याशिवाय मराठी गझल हा विषयच पूर्ण होत नाही. मराठी गझल आणि सुरेश भट हे समीकरण झालेलं होते. गझल मराठी माणसांपर्यंत पोहचवली ती सुरेश भट यांनी. गझलचे सादरीकरणाचे वेगवेगळे कार्यक्रम करून त्यांनी गझलचा प्रसार आणि प्रचार केला. ‘लाभले आम्हास भाग्य’ ही त्यांची गझल अनेक लोक म्हणतात, ऎकतात.

    सुरेश भटांनी यांनी उर्दू भाषेतील शेर शायरी, गझल यांचा आयुष्यभर मनापासून आभ्यास केला. गझल हा काव्य-प्रकार मराठीत रुजवला.हा त्यांचा प्रयास त्यांना ‘गझल सम्राट’ हा मनाचा किताब देवून गेला. विदर्भातील अमरावती या शहरात सुरेश भटांचा जन्म झाला. तिथेच ते लहानाचे मोठे झाले. वडील डॉक्टर असल्याने घरची परिस्थीती बरी होती. आणि त्यांच्या आईला कवितेची खूप आवड होती. यातूनच सुरेश भटांना कवितांची आवड निर्माण झाली. सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली. ते अडीच वर्षाचे असताना त्यांना पोलियोची बाधा झाली होती. त्यामुळे त्याचा उजवा पाय जन्मभरासाठी अधू झाला होता. त्यांचे सर्व शिक्षण अमरावती येथे झाले. बी.ए.ला अंतिम वर्षाला दोन वेळा नापास झाल्यानंतर शेवटी १९५५ साली ते बी.ए. पास झाले. त्यानंतर ते शिक्षकी व्यवसायात आले. अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचे कविता लेखन सुरू ठेवले होते. पण ते काही लिहित होते ती गझल आहे हे त्यांनाही माहिती नव्हते. त्यांना उर्दू भाषेचाही चांगलाच अभ्यास होता. सुरेश भट हे जरी विदर्भातील असले तरी महाराष्ट्राच्या कानाकोप-यात त्यांची ओळख होती.

    हॄदयनाथ मंगेशकर यांनी सुरेश भट यांना शोधून काढले आणि भटांच्या कविता, गझल त्यांनी संगीतबद्ध केल्या. मराठीतील अनेक प्रसिद्ध सिनेमांमध्ये त्यांच्या गझल घेण्यात आल्या. मा.सुरेश भटांनी एकूण पाच गझलसंग्रह लिहिले त्यात ‘रूपगंधा’, ‘रंग माझा वेगळा’, ‘एल्गार’, ‘झंझावात’, ‘सप्तरंग’ यांचा समावेश आहे. वेगवेगळे रस, रंग असणारी मराठी गझल त्यांनी रेखाटली. फक्त श्रृंगार, प्रेम, विरह इतकच नाहीतर त्यांनी आपल्या गझलमधून समाजाचे दु:ख मांडले, राजकीय लोकांचा भ्रष्टाचार मांडला. बदलता समाज, बदलती माणूसकी मांडली. त्यांच्या अनेक गझल बी.ए.च्या अभ्यासक्रमात घेण्यात आल्या. माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य गझलसम्राट म्हणजे सुरेश भट असे वर्णन सुरेश भट यांचे करता येईल. आज त्यांच्यमुळे मराठी गझलला मानाचे स्थान मिळाले आहे. त्यांच्या गझल संग्रहांना आजही मोठी मागणी आहे. त्यांची गझल ही कोणत्याही एका वर्गाची नव्हती. अनेक साहित्यिकांनी गझलला मान्य केले नव्हते पण सुरेश भट लढले आणि त्यांनी गझलला अधिकॄत सन्मान मिळवून दिला.

    सुरेश भटांनी गझल फक्त त्यांच्यापुरतील मर्यादीत न ठेवता अनेकांना ती शिकवली. आज महाराष्ट्रात त्यांच्याकडून गझल शिकलेले कित्येक गझलकार आहेत. मा.सुरेश भट हे फक्त गझलकारच नाही तर एक तडफदार पत्रकार देखील होते त्यांनी त्यांचे एक साप्ताहिक देखील सुरू केले होते. ज्यातून त्यांना परखड लिखाण केले. समाजातील प्रत्येक घटनेवर त्यांचं चौकस लक्ष असायचं. त्यावर ते बेधडकपणे लिहायचे. त्यांची व्यक्तीमत्व कलंदर व्यक्तीमत्व होतं असं अनेकदा बोललं जायचं. आणि त्यात तथ्यही आहे. इतकी प्रसिद्धी मिळाल्यावर देखील त्यांनी कधीही पैशांना महत्व दिले नाही. त्यांनी फक्त गझलचा प्रसार केला. ते लिहित गेले. त्यांनी भरभरून लोकांना दिले. त्यांच्या शिष्यांमध्ये कधीही भेदभाव केला नाही. जो येईल त्याला ते शिकवायचे. त्यांच्या झोळीत ते काहीच शिल्लक ठेवत नव्हते. सर्व लुटवून टाकायचे. मा.सुरेश भटांनी गझलकारांना गझलेच्या तंत्रावर, व्याकरणावर माहिती म्हणून ‘गझलेची बाराखडी’ नावाची एक पुस्तिका लिहिली होती. वाचक-रसिक, सगळ्यांनीच ही पुस्तिका वाचावी, संदर्भासाठी जवळ बाळगावी अशी आहे. नवोदित कवींना गझल कळावी म्हणून ते ही पुस्तिका त्यांना स्वखर्चाने पत्रासोबत पाठवीत असत. सुरेश भटांनी गझलसाठी आपलं जीवन वाहून टाकलं होतं. आज मराठी गझल लिहिणारे, गाणारे कित्येक गझलकार तयार झाले आहेत. पण सुरेश भटांनी जे पेरलं होतं ते पुन्हा उगवेल याची जरा शंकाच आहे. त्यांनी अनेकांना एकत्र आणून गझलचा प्रसार केला होता. पण आता परिस्थीती जरा वेगळी आहे. सुरूवातीच्या काळात मराठी गझल एकीकडे आणि मराठी कविता एकीकडे असे होते. आज मराठी गझल लिहिणा-यांमध्येच कित्येक ग्रुप तयार झाले आहेत. मी मोठा की तो मोठा ह्या गोष्टी आता पुढे यायला लागल्या आहेत. त्यामुळे सुरेश भटांनी ज्या उद्देशाने गझलला जीवन अर्पण केले होते, तो उद्देश आजच्या पिढीतील गझलाकारांमधून हरवल्याचे चिन्ह दिसत आहेत. पण तरीही एक गोष्ट मात्र, नक्की की सुरेश भटांप्रमाणे गझलेचे तंत्र जपणारा सुद्धा एक वर्ग आहे हे महत्वाचं. सुरेश भट यांनी मराठी गझलच्या विश्वात अमूल्य असं काम केले होते. त्यांच्या गझल व कविता हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर, भिमराव पांचाळे यांसारख्या अनेक मोठ्या गायकांनी गायल्या आहेत. गडचिरोली येथे भरलेल्या ३९ व्या विदर्भ साहित्य संमेलनचे ते अध्यक्ष होते. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता. सुरेश भट यांना दोन मुले. त्यापैकी चितरंजन हे सुद्धा वडीलांच्याच पावलावर पाऊल देत एक उत्तम गझलकार म्हणून प्रसिद्ध आहेत. सुरेश भट यांचे १४ मार्च २००३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    सुरेश भट नक्षत्रांचे देणे
    https://www.youtube.com/watch?v=DygZQRv4JD8
    रंग माझा वेगळा
    https://www.youtube.com/watch?v=r8LGpFQKkpQ
    https://www.youtube.com/watch…

  • दिनकर द. पाटील

    आज ६ नोव्हेंबर..आज चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक मा.दिनकर द. पाटील यांची जयंती.
    दिनकर द. पाटील यांचा जन्म ६ नोव्हेंबर १९१५ रोजी झाला.
    ‘राम राम पाव्हणं’ या चित्रपटापासून मा.दिनकर द. पाटील यांनी चित्रनिर्मितीत पाऊल टाकले. त्यांच्या ‘उदय कला चित्र’ व ‘दिनकर चित्र’ तर्फे नंतर त्यांनी ‘पाटलाचा पोर’, ‘तारका’, ‘मूठभर चणे’, ‘कुलदैवत’, ‘भैरवी’ अशा अनेक चित्रपटांची निर्मिती केली. दिनकर पाटलांनी आपल्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत शंभरहून अधिक चित्रपटांचे लेखन व सुमारे चाळीस चित्रपटांचे दिग्दर्शन वा दहा अनुबोधपट चे दिग्दर्शन केले. साहित्यक्षेत्रातही त्याची कर्तबगारी उल्लेखनीयच होती. पाच नाटके, दोन एकांकिका संग्रह, चार कथासंग्रह, चार व्यक्तिचित्रांचे संग्रह, ‘रूपेरी पडदा’, ‘तंत्रमंत्र’ हे चित्रपटविषयक पुस्तक आणि ‘पाटलाचा पोर’ हे आत्मचरित्र अशी त्यांची ‘साहित्यसंपदा’ आहे. मा.दिनकर द. पाटलांच्या उमज पडेल तर , प्रेम आंधळं असतं व ते माझे घर या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार लाभले. त्यांना ग. दि. माडगूळकर पुरस्कार, जनकवी पी. सावळाराम पुरस्कार आणि व्ही. शांताराम पुरस्कार असे मानाचे पुरस्कार लाभले. चित्रपट महामंडळाच्या ‘चित्रभूषण पुरस्कारा’चेही ते मानकरी होते. मा. दिनकर पाटील यांचे २१ मार्च २००५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • मेंडोलिन वादक उप्पलपू श्रीनिवास उर्फ  यू श्रीनिवास

    मेंडोलिन आणि यू. श्रीनिवास ही काही वेगळी नावं नव्हती एवढं त्यांच्यात जीवैक्य होतं. मैफलीत यू. श्रीनिवास आपल्या बोटांच्या नाजुक करामतीतून मेंडोलिनमधून अशी काही जादुई सुरावट निर्माण करायचे की, रसिकांसमोर सुरांचं एक अनोखं मायाजाल विणलं जायचं.

  • लाखात अशी देखणी – सुरेखा पुणेकर

    लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर… खास लावणीचा शृंगार, नखरे… कॅमेऱयाने टिपलेल्या तिच्या अदा…

    कारभारी दमानं’, ‘या रावजी, तुम्ही बसा भावजी’, ‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा’, ‘झाल्या तिन्हीसांजा’ अशा अनेक लावण्यांनी अवघ्या महाराष्ट्रावरच नव्हे तर सातासमुद्रापार संपूर्ण जगावरही भुरळ पाडली. महाराष्ट्राचा अतिशय लोकप्रिय लोककला प्रकार म्हणून ओळखली जाणारी लावणी ही केवळ नृत्यकलेतून सादर न करता ती आपल्या अदाकारीने अन् गोड गळ्याने गाऊन सादर करणारी लावणीसम्राज्ञी म्हणजे सुरेखा पुणेकर.

    ‘लावणी’ या विषयावर फोटो डॉक्युमेंटरी करण्याचं काम सुमारे दहा वर्षांपूर्वी मी सुरू केलं. या कामाची गरज म्हणून तेव्हा आघाडीच्या कलाकारांना, कलावतींना भेटण्याची, त्यांची कला समजून घेऊन ही माहिती सचित्र टिपण्याची मोहीमच मी सुरू केली. यासाठी अवघा महाराष्ट्र पालथा घालत असतानाच गावागावांत रात्री उशिरापर्यंत, किंबहुना रात्री उशिरा सुरू होणाऱया तमाशा आणि लावण्या कॅमेराबद्ध करण्याचं वेड मला लागलं होतं. हे सुरू असतानाच या कलेला आपला श्वास मानणाऱया सुरेखाची ओळख मला अप्रत्यक्ष होती. मात्र प्रत्यक्ष झाली ते पुण्यातल्या बालगंधर्व नाटय़गृहातल्या एका लावणी शोच्या निमित्तानं. ‘लास्य’ रसाचे दर्शन घडविणारी लावणी. लास्य रस म्हणजेच शृंगाराचा परिपोष असणारा रस. लावणी सादर करणाऱया कलावतीचा एक शृंगार असतो. या शृंगारात स्त्रीने नेसलेलं रूपड़ं साडीचं वस्त्र, अंगावर भरजरी दागिने, कपाळावर असलेली टिकली, हाताला लावला जाणारा लाल रंगाचा अल्टा, कंबरपट्टा, हाताच्या दंडावर असलेले दागिने आणि कलावंताचं देखणं रूपडं या साऱयाचा उल्लेख करता येईल. हाच शृंगार कॅमेराबद्ध करण्याविषयी मी सुरेखाबरोबर फोनवर बोललो.

    थोडय़ाच वेळात आतून आवाज आला आणि सुरेखाची नि माझी भेट झाली. सुरेखाची मूलभूत तयारी झाली होती. आता तिचा शृंगार सुरू होता. हा शृंगार टिपण्यासाठीची माझी लगबग सुरू झाली. शो सुरू व्हायला थोडासा अवधी होता. वरवरच्या गप्पा झाल्या आणि थोडय़ाच वेळात सुरेखा खुलली. मेकअप रूममध्ये काही मोजके फोटो टिपून मी स्टेजवरचं सुरेखाचं नृत्य, तिची अदा अन् गायन टिपण्यासाठी स्टेजसमोर गेलो. यावेळी मला सुरेखाचे अनेक कॅण्डिड टिपता आले.

    काही दिवसांनंतर पुन्हा सुरेखाचे फोटो टिपण्यासाठी मी ठाण्यातल्या गडकरी रंगायतनला गेलो. शोला बराच वेळ होता. मी मेकअप रूममध्ये फोटो टिपत होतो अन् सुरेखा तिचा जीवन प्रवास हळूहळू उलगडून सांगत होती. सुरेखाचे वडील सोंगाडय़ाचं काम करत, तर कधी तमाशात गायन, नृत्य सादर करत. त्या काळी तमाशात वा लावणीच्या फडात स्त्रिया नृत्य सादर करीत नसत आणि म्हणूनच सुरेखाची आई तमाशात गायन, अभिनय सादर करत असे, तर आईचे आईवडील हेदेखील नृत्य, गायन आणि अभिनयात पारंगत असल्याचं सुरेखा सांगते. आईचं घर स्मशानभूमीजवळ होतं. वडिलांकडची परिस्थितीही जेमतेम. वडील पुणे रेल्वे स्टेशनवर दिवसा हमालीच काम करत अन् रात्री कला सादर करण्यासाठी लावणी अन् तमाशाच्या फडात जात. नंतर तिच्या आईवडिलांनी तमाशाचा फड सुरू केला. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षापासून सुरेखाचा हा प्रवास सुरू झाला. शाळेची पायरी ती कधीच चढली नाही. ‘‘माझ्या पाच पोरींपैकी एकीचा तरी तमाशाचा फड असेल अन् ती त्याची मालकीण होईल’’ हे तिच्या बाबांनी लहानपणी रंगवलेलं स्वप्न अखेर १९८६ साली पूर्ण झालं. तिच्या बहिणीसोबत ‘लता-सुरेखा पुणेकर’ नावाने स्वतःचा फड सुरू केला. पुढे चार वर्षे तो चालला.

    त्यानंतर १९९८ ला मुंबई येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता. ‘तुम्हा बघूनी डावा डोळा’ या सुरेखाच्या दिलखेच अदाकारीने रसिकमन जिकलं. त्यानंतर सुरेखाला खऱया अर्थाने प्रसिद्धी मिळाली अन् आर्थिक मानधनही. या शोसाठी दोन लाखांचं मानधन मिळालं. यापूर्वी एकहाती एवढा पैसा बघितलाही नसल्याचं सुरेखाने कबूल केलं. पोटाची खळगी भागवण्यासाठी सुरेखाच्या बैलगाडीतून गावोगाव हिंडण्याच्या प्रवासाला आता खऱया अर्थानं गती मिळाली अन् पुढे बैलगाडी ते विमान आणि नारायणगाव ते न्यूयार्कच्या मेडिसन स्क्वेअर हा तिचा प्रवास केवळ लावणीमुळेच शक्य झाल्याचं सांगताना ती भावुक झाली. इतक्यात शोसाठीची घंटा वाजली अन् आपल्या भावनांना आवर घालत सुरेखा पायात घुंगरू बांधण्यात गुंतली. यावेळी मला तिचे उत्तम कॅण्डिड टिपता आले. कॅमेऱयात मी सुरेखाच्या अनेक भावमुद्रा टिपल्या होत्या, परंतु एकदा रंग चेहऱयावर लागला की, कलाकार त्याच्या भावना, वेदना विसरून त्याच्या कलेत कसा एकरूप होतो अन् क्षणार्धात चेहऱयावर एक वेगळं तेज घेऊन हसऱया चेहऱयानं आपली कला सादर करण्यासाठी कसा सरसावतो याचं जिवंत उदाहरण माझ्या मनाच्या कॅमेऱयात कायमचं बंदिस्त झालं.

    धनेश पाटील
    dhanuimages@gmail.com

  • भारतीय फिरकीपटू इरापल्ली प्रसन्ना

    प्रसन्ना यांनीच भारताला परदेशी भूमीवरचा आपला पहिला टेस्ट सिरीज विजय न्यूझीलंडमध्ये मिळवून दिला. त्या सिरीजमध्ये त्यांनी एकूण २४ विकेटस काढल्या होत्या. कारकिर्दीतल्या १०० विकेट्सचा टप्पा गाठायला त्यांना अवघ्या २५ मॅच लागल्या. तो देखील एक विश्वविक्रम ठरला होता, जो पुढे त्यांचा वारसदार समजल्या जाणाऱ्या आर. अश्विनने पन्नास वर्षांनी मोडला.

  • बडोद्याचे महाराज फतेहसिंग प्रतापराव गायकवाड

    रणजी स्पर्धेत खेळणारे लोकसभेचे ते एकमेव खासदार होते. फतेहसिंग गायकवाड हे १९५७ ते १९६२, १९६२ ते १९६७, १९७१ ते १९७७ व १९७७ ते १९८० पर्यत कांग्रेस पक्षाचे बडोद्याचे सांसद होते. भारतातील टीव्हीवर समालोचन करण्याचा पहिला मानही त्यांना जातो.

  • संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री विदुषी कीर्ती शिलेदार

    वयाच्या दहाव्या वर्षी शिलेदारांच्या ‘त्रिपात्री’ ‘सौभद्र’ पासून कीर्ती शिलेदारांचे संगीत रंगभूमीवर पदार्पण झाले. ‘संगीत सौभद्र’ या नाटकातील नारदाची भूमिका त्यांनी प्रथमच केली आणि रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. संगीत आणि अभिनय याचे धडे घेत असतानाच आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मराठी या विषयातील ‘बी.ए. ‘ची पदवीही कीर्ती शिलेदार यांनी मिळविली.

  • तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक,लेखक केशव विष्णू बेलसरे

    तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक,लेखक केशव विष्णू बेलसरे यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९०९रोजी झाला. केशव विष्ण बेलसरे हे पूज्य बाबा बेलसरे या नावानेच ओळखले जात असत. ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांनी आपलं जीवन अध्यात्माच्या प्रसाराला वाहिलं होतं.

    त्यांनी पन्नास वर्षांहून अधिक काळ नामस्मरणाच्या शास्त्रशुद्ध अभ्यासात घालवून स्थूल देहबुद्धीतून सूक्ष्म आत्मबुद्धीत शिरण्याचा समजून अभ्यास केला होता आणि सामान्यजनांना त्याचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी त्यांनी ‘नामसमाधी सहजसमाधी’ हा ग्रंथ लिहिला. त्याचबरोबर भारतीय अध्यात्म या विषयावरही त्यांनी लेखन केलं होतं.

    सार्थ श्रीमत् दासबोध, अध्यात्म दर्शन, आनंद साधना, भगवंताचें अनुसंधान साधनेचा प्राण, भगवंताच्या नामाचे दिव्य संगीत, भावार्थ भागवत, ज्ञानेश्वरी, मनाची शक्ती, नामसाधना परमार्थ प्रदीप, प्रा. के. वि. (पू. बाबा) बेलसरे यांचे साधकांबरोबर झालेले अध्यात्म संवाद, साधकांसाठी संतकथा, शरणागती, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, अंतर्यात्रा, ईश्वरभक्ती दर्शन अथवा प्रेमयोग, श्रीचैतन्य गीता असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.

    केशव विष्णू बेलसरे यांचे ३ जानेवारी १९९८ रोजी निधन झालं.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • हिंदी पार्श्वगायक कुमार शानू

    १९९० मध्ये आलेल्या आशिकीमुळे कुमार शानू यांच नशीब फळफळलं. महेश भटच्या या सिनेमातली गाणी खूपच गाजली. कुमार शानू व टी सिरीज वाला गुलशन कुमार यांची ९० ची सहज लोकांच्या ओठावर रुळतील अशी कर्णमधुर गाणी ज्यात सिंहाचा वाटा कुमार शानू यांचा होता. आशिकी मधील गाणी प्रेमाच्या सर्व भाव व्यक्त करणारी सर्व गाणी लोकांनी डोक्यावर घेतली.

  • ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू आणि समालोचक रिची बेनो

    ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू आणि समालोचक रिची बेनो यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९३० रोजी झाला.

    बेनो हे ऑस्ट्रेलिया संघातील महान अष्टपैलू खेळाडू होते. ऑस्ट्रेलियाकडून ६३ कसोटी सामने खेळतानाच त्यांनी २८ सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले. यात हजारांपेक्षा अधिक धावा तसेच २०० पेक्षा अधिक बळी मिळवण्याची कामगिरी केली. १९६४ मध्ये त्यांनी निवृत्ती स्वीकारली. तत्पूर्वी, कारकीर्दीत एकही मालिका गमावणारा कर्णधार म्हणून त्यांनी विक्रम रचला होता. बेनो यांनी त्यांच्या क्रिकेट करीअर मधील सर्वात रोमांचक सामना १९६०-६१ मद्ये वेस्टइंडीज आणि ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या गाबा मैदानात खेळला. हा सामना टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील पहिला टाय सामना ठरला. पाकिस्तानात श्रॄंखला जिंकणारे पहिले कर्णधार सुद्धा ठरले. बेनो फलंदाजीतही त्यांची छाप सोडण्यात यशस्वी ठरले. त्यांनी त्यांच्या करीअरमध्ये तीन शतकं लगावले. त्यांनी एकूण २,२०१ रन्स काढले आहेत.

    बेनो यांनी १९६०च्या दशकात बीबीसी’साठी कमेंटेटर म्हणून काम करणे सुरू केले. त्यानंतर १९७७ मध्ये केरी पॅकर्स वर्ल्ड सिरीज क्रिकेट स्पर्धेसाठी कॉंमेंन्ट्री करण्यासाठी ऑस्ट्रेलियन चॅनल नाइन सोबतही जुळले होते.

    बेनो यांना २००७ मध्ये एलन बॉर्डर सन्मान समारोहात क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या हॉल ऑफ फेम’ मध्येही जागा देण्यात आली आहे. त्यानंतर दोन वर्षांनी क्रिकेट परीषदेच्या हॉल ऑफ फेम’ यादीतही त्यांचे नाव नमूद करण्यात आले.

    रिची बेनो यांनी तारुण्यात क्रिकेटचे मैदान गाजवले, तर नंतर मैदानाबाहेर राहूनही क्रिकेटशी असलेले नाते तुटू दिले नाही. ऑस्ट्रेलिया क्रिकेटमधील आजी-माजी खेळाडूंचे ते आदर्श राहिले आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेट आणि बेनो हे एकमेकांस पूरक असे अविभाज्य घटक झाले होते. रिची बेनो यांचे निधन १० एप्रिल २०१५ रोजी झाले.