`डोंबिवली फास्ट’मुळे माधव आपटे म्हणून घराघरात पोहोचलेले मराठी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये अभिनयाने आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
चित्रे काढून अगर प्रारूपकाराचे (ड्राफ्ट्समन) काम करून तो जगत होता. ह्याच काळात हिटलरचा श्रमजीवी वर्गाशी संपर्क आला. ह्या वर्गाविषयी त्याला सहानुभूती वाटण्याऐवजी घृणा उत्पन्न झाली. साम्यवादविरोध तो येथेच शिकला. त्याचप्रमाणे त्यांचा ज्यूद्वेषही याच वेळी जागृत झाला. ज्यू लोकांच्या पापाचा इतिहास वाचून त्यांनी आपल्या ज्यूद्वेषाचा पाया बळकट केला. लोकशाही मार्गाचा अवलंब करणे हेही मूर्खपणाचे आहे, असे त्याचे मत बनले. हुकूमशाही सर्वश्रेष्ठ आहे हे पायाभूत सत्य हिटलर व्हिएन्ना येथेच शिकला.
श्रीकांत ठाकरे, एक असं नाव ज्यामुळे मराठी संगीत सृष्टीला नव्या ढंगाची ताज्या दमाची आणि उ़डत्या चालीचा आविष्कार प्राप्त झाला; श्रीकांत ठाकरे यांची ओळख महाराष्ट्राला संगीतकार म्हणून तर होतेच; पण ते स्वत: उत्तम व्यंगचित्रकार, लेखक, समीक्षक, पत्रकार आणि आयुर्वेदाचे अभ्यासक देखील होते.
रोहिणी हत्तंगडी एन.एस.डी.मधून १९७४-७५ साली शिकून आल्या. त्यांचा जन्म १० एप्रिल १९५१ रोजी झाला.तिथून आल्यानंतर काही वर्षांनी त्यांना ‘गांधी’ हा सिनेमा मिळाला. त्याच दरम्यान त्यांचे ‘चांगुणा’ हे नाटक सुरू होतं. त्यानंतर चार वर्ष त्या थिएटरच करत होत्या. ‘कस्तुरीमृग’, ‘लपंडाव’ अशी नाटकं केली. ‘रथचक्र’ सुरू असताना १९८१-८२ मध्ये ‘गांधी’ सिनेमात काम केलं. कस्तुरबाची भूमिका केली तेव्हा त्या फक्त २७ वर्षांच्या होत्या. त्यामुळे त्यांना त्या वयात हिंदी सिनेमांमध्ये आईची भूमिका मिळत गेली. तेव्हा थोडंसं वेगळं वाटायचं. याच वेळी त्याची काही नाटकंही चालू होती. काही वर्षांनी सिनेमातल्या गुडी गुडी मदर इमेजला त्या कंटाळल्या होत्या. आता काही तरी नवीन करायला मिळायला हवं असं वाटू लागलं. पण, जे काम येईल त्यामध्ये मी चांगलं काही शोधायचा प्रयत्न करत होते. हे करायचंच नाही, ते नको, असं नको, तसं नको असं कधी काही झालं नाही. पैशांसाठी करूया असा दृष्टिकोन असला तरी त्यातही त्यांना ‘प्रतिघात’, ‘सारांश’ असे सिनेमे मिळत गेले. दरम्यान मराठी नाटकं थांबली. पण, गुजराती थिएटर सुरू झालं. दुसरीकडे आविष्कार सुरू होतंच. तिथेही अनेक नाटकं केली. ‘हम लोग’, ‘बुनियाद’ ‘खानदान’ दूरदर्शनच्या या पहिल्या मालिका. त्यापैकी त्या ‘खानदान’मध्ये होत्या. ‘चार दिवस सासूचे’मधली आशालता आणि ‘होणार सून मी ह्य़ा घरची ’मधली आई आजी लोकप्रिय झाली. जेष्ठ नाट्यकर्मीं जयदेव हत्तंगडी हे मा.रोहिणी हत्तंगडी यांचे पती. रोहिणी हत्तंगडी यांचे चिरंजीव असीम हत्तंगडी हे पण नाट्यकलाकार आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
भार्गवराम विठ्ठल वरेरकर उर्फ मामा वरेरकर यांचा जन्म २७ एप्रिल १८८३ रोजी झाला. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी, म्हणजे तिसरीत असताना ’नवीन रासक्रीडा’ नावाचे नाटक लिहिले. कोकणात येणार्या नाटक मंडळींशी मामा वरेरकरांनी परिचय वाढवला, आणि त्यांच्या नाट्य प्रयोगांचे ते सतत निरीक्षण करत राहिले या जिज्ञासेतून त्यांनी इब्सेन, मोलियर सारख्या पाश्चात्त्य नाटककारांचा अभ्यास केला.
वरेरकरांनी वाचनाची विलक्षण आवड होती. ते ललितकलादर्श’चे लोकप्रिय नाटककार होते. मा.मामा वरेरकरांनी एकूण ३७ नाटके, सहा नाटिका लिहिल्या. शिवाय कथा कांदंबर्यास आणि रहस्यकथाही त्यांच्या नावावर आहेत. मराठी वाचकांना बंकिमचंद्र, शरच्चंद्र यांची ओळख वरेरकरांमुळेच झाली. शरच्चंद्र चटर्जींच्या कादंबर्यांतच्या भा.वि, वरेरकरांनी केलेल्या अनुवादाची ४० पुस्तके वा.वि. भट यांनी प्रकाशित केली. ’एकविंसती’ या पुस्तकात रवींद्रनाथ टागोर यांच्या वरेरकरांनी अनुवादित केलेल्या २१ कथा आहेत. १९०८ साली त्यांनी 'कुंजविहारी' हे पहिले नाटक लिहिले. परंतु त्यांचे गाजलेले पहिले नाटक म्हणजे रंगभूमीवर ७ सप्टेंबर १९१८ रोजी आलेले 'हाच मुलाचा बाप' हे नाटक होय.
नाट्यलेखनात वरेरकर रमत गेल्यावर त्यांनी टपाल खात्यातील नोकरी सोडून दिली व लेखनावरच लक्ष एकवटले. १९२० ते १९५० या काळातील मराठी साहित्यातील ते प्रसिद्ध नाटककार होते.
नाटककार व साहित्यिक म्हणून ओळख असणारे वरेरकर राजकारणातदेखील सक्रिय होते. ते काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते. पुढे राज्यसभेवर त्यांची नियुक्तीही झाली होती.
मामा वरेरकर यांचे २३ सप्टेंबर १९६४ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आम्ही त्या वेळी विदर्भातील वर्धा या शहरी रहात होतो. माझे वडील वर्धा येथील गुरांच्या दवाखान्यात व्हेटरनरी डॉक्टर म्हणून नेमणुकीस होते. त्या वेळी माझे वय साधारण …..
त्यांनी अभिनयासोबत काही चित्रपटांचे दिग्दर्शक व निर्माती पण केली होती. त्यांचा जन्म ३ सप्टेंबर १९२६ रोजी झाला. त्यांनी बंगाली भाषेमधील चित्रपटांशिवाय काही हिंदी चित्रपटांमधूनही त्याने अभिनय केला. १९५३-१९७५ या काळात बंगाली चित्रपटांत उत्तम कुमार यांची सुचित्रा सेन यांच्यासोबत त्यांची जोडी चांगली जमली होती आणि या जोडीचे अनेक चित्रपट गाजले. अभिनेते उत्तमकुमार यांच्यासमवेत सुचित्रा सेन यांनी ३० चित्रपट केले होते.
उत्तम कुमार यांनी २५० हून अधिक चित्रपटांत अभिनय केला. अमानुष, छोटीसीमुलाकात,आनंद आश्रम हे त्यांचे हिंदी चित्रपट खूप गाजले.चित्रपटातील योगदानासाठी भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला. उत्तमकुमार यांचे २४ जुलै १९८० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे (१७ सप्टेंबर १८८५ – २० नोव्हेंबर, १९७३) हे मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी होते. शिवसेनेचे संस्थापक, बाळ ठाकरे हे केशव सीताराम ठाकरे यांचे पुत्र होते. आज प्रबोधनकार (केशव सीताराम ठाकरे) यांची जयंती ..
टीव्ही आणि आकाशवाणीसाठी त्यांनी तब्बल पन्नासच्यावर सुंदर जिंगल्स लिहिल्या. १९७७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘बन्या बापू’ या मराठी चित्रपटाची सर्व गीते प्रचंड गाजली. ‘प्रीतीचं झुळझुळ पाणी’, ‘मी कशाला आरशात पाहू गं…’, ‘अरे ले लो भाई चिवडा लेलो’, ‘हे गर्द निळे मेघ, बिलगून जशी वीज’ ही चार गाणी उषा मंगेशकर, शैलेंद्र सिंग, अनुराधा पौडवाल यांनी गायलेली, तर संगीत दिले होते ऋषी-राज या संगीतकाराने.
मराठी, हिंदीतील अभिनेते व दिग्दर्शक गजानन जहागीरदार यांचा जन्म २ एप्रिल १९०७ रोजी झाला.
गजानन जहागीरदार यांनी “रामशास्त्री“,“सिंहासन“, “पायाची दासी“,“वसंतसेना“, “वैजयंता“, “उमाजी नाईक“,“सुखाची सावली“, “दोन्ही घरचा पाहुणा” या मराठी चित्रपटातून तर; “होनहार“,“बेगुनाह”,“जेल यात्रा”,“ चरणों की दासी”, “किरण”, “बेहराम खान”, “महात्मा कबीर”, “ट्रॉली ड्रायव्हर”, “बंदर मेरा साथी”,“टॅक्सी स्टॅंड”,“विरहा की रात”,“धन्यवाद” अश्या हिंदी सिनेमांमधून अभिनय व दिग्दर्शन देखील केले होते. तसंच “स्वामी” या दूरदर्शन मालिकेचं जहागीरदार यांनी दिग्दर्शन केले होते तसंच दादासाहेब फाळके यांचे कर्तृत्व रेखाटणारा चित्रपट “ड्रीम्स स्केस विंग्ज”चे मा.गजानन जहागीरदार यांनी दिग्दर्शन केले होते. गजानन जहागीरदार यांचे १३ ऑगस्ट १९८८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Copyright © 2025 | Marathisrushti