(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • संगीतकार व गायक जितेंद्र अभिषेकी

    अभिषेकींनी मराठी रंगभूमीसाठी खूप मोठं योगदान दिलेले आहे. प्रयोगशीलता हा त्यांच्या संगीत दिग्दर्शनातला महत्वाचा गुणधर्म. त्यांनी त्यांच्या संगीतदिग्दर्शनात केलेले प्रयोग लोकांनाही खूप आवडले. उदा. मैलाचा दगड ठरलेल्या कट्यार काळजात घुसली या नाटकाची सुरुवात त्यांनी भैरवीने केली होती. तर १९६६ साली रंगभूमीवर आलेल्या लेकुरे उदंड झाली या नाटकात मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्राया नाट्यप्रकारातल्या संगीताचा बाज त्यांनी वापरला.

  • ब्राझीलचा महान फुटबॉलपटू पेले

    पेलें यांना ब्रिटनच्या राणीने ‘सर’ हा किताब दिला. रोनाल्ड रेगन अमेरिकेचे अध्यक्ष असताना अमेरिकन कॉग्रेसने त्यांचा सत्कार केला.

  • बालसाहित्यिक गोपीनाथ तळवलकर

    कणिका, खंडकाव्य, बालकविता असे विविध काव्यप्रकार हाताळूनही त्यांचे नाव झाले नाही. आकाशमंदिर, छायाप्रकाश, नंदिता या कादंबर्या , ज्ञानेश्वरीतील सौंदर्यविश्व हे रसग्रहण, तसेच मुलांसाठीची अनेक पुस्तके त्यांनी लिहिली होती. त्यांचे काही लिखाण ’गोपीनाथ’ या टोपणनावाने केलेले आहे.

  • अभिनेता गश्मीर महाजनी

    मराठीमध्ये काम करता करता ‘पानीपत’ या बिग बजेट ऐतिहासिक हिंदी चित्रपटामध्ये गश्मीर महाजनीने एका वीर मराठा योद्धाची भूमिका केली होती. गश्मीर महाजनीने आपल्या वडिल रवींद्र महाजनी यांच्या बरोबर ‘पानिपत’ या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे. गश्मीरने ‘जनकोजी शिंदे’ तर रवींद्र महाजनी यांनी ‘मल्हारराव होळकरांचे’ काम केले आहे.

  • रँग्लर परांजपे

    हिंदुस्थान सरकारची शिष्यवृत्ती घेऊन रॅंग्लर परांजपे इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठ क्षेत्रातील सेंट जॉन्स महाविद्यालयात दाखल झाले. तेथे त्यांनी गणित विषयातील सगळ्यात कठीण ‘ ट्रायपॉस ‘ परीक्षा दिली आणि ते त्या परीक्षेत प्रथम आले. यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्याला सीनियर रँग्लर असे म्हणतात. केंब्रिज विद्यापीठाचा वरिष्ठ रँग्लर हा किताब पटकावणारे ते पहिले भारतीय होते .

  • रसिकांवर मोहिनी घालणारे कवी, गीतकार जावेद अख्तर

    जावेद अख्तर यांचं नाव लहानपणी ‘जादू’ असं होतं. त्यांचा जन्म १७ जानेवारी १९४५ रोजी ग्वाल्हेर येथे झाला. शायरीचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला आहे आणि वडिलांनी लिहिलेल्या उर्दू शेरमधील एका वाक्यातून त्यांचं नाव निवडलं गेलं होतं. गीतकार म्हणून त्यांची कारकीर्द त्यांनी आजवर जपली असली तरी ‘पटकथाकार’ म्हणून एकेकाळी हरएक चित्रपटामागे असलेलं त्यांचं नाव गेल्या कित्येक वर्षांत पडद्यावर उमटलेलंच नाही.
    जुन्या लोकप्रिय गीतांच्या निवडक गीतकारांच्या यादीतील अव्वल नाव अख्तर यांचे आहे. गीते व पटकथा लेखनापलीकडे सामाजिक कार्यकर्ता व विद्रोही विचार मांडणारे लेखक अशीही त्यांची ख्याती आहे. ‘लावा’, ‘तरकश’ त्यांच्या या गाजलेल्या पुस्तकांच्या अन्य भारतीय भाषांमध्ये आवृत्त्याही निघाल्या आहेत. आजवरच्या या लिखाणातून त्यांनी भारतीय तरुण मनांना अनोखी ऊर्जा दिली आहे. धार्मिक गुंतागुंत मानवाला पुढे जाण्यापासून रोखत असल्यानेच त्यांनी निरिश्वरवादाचा वेळोवेळी पुरस्कार केला आहे. मा.जावेद अख्तर यांची अशी विशेष ओळख आहे. १९७० ते १९८० च्या दशकात सलीम खान-जावेद अख्तर या जोडीने अनेक दर्जेदार चित्रपट रसिकांना दिले. ‘अंदाज’, ‘सीता और गीता’, ‘शोले’, ‘जंजीर’, ‘दीवार’ आणि ‘डॉन’ या त्यांच्या चित्रपटांना सिनेरसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले, एका वादानंतर हा इतिहास घडवणारे दोन्ही पटकथाकार बाजूला पडले ते आजतागायत. १९९३ साली जावेद अख्तर यांनी ‘रूप की रानी चोरों का राजा’ या चित्रपटासाठी स्वतंत्रपणे शेवटची पटकथा लिहिली होती. ‘सिलसिला’ चित्रपटापासून अलीकडच्या ‘दिल चाहता है’ चित्रपटामधील गीतांनी युवापिढीचे भावविश्व भारून टाकले. आज चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कारकिर्दीला पन्नास पेक्षा जास्त वर्ष पूर्ण झाली आहेत. सध्या हिंदी चित्रपटक्षेत्रात अख्तरांचे गीतकार म्हणून मोठे नाव आहे. एक प्रभावशाली गीतकार म्हणून त्यांना स्वत:ला हिंदी चित्रपटांमधील कुठली गाणी आवडतात, असे विचारल्यावर साठ आणि सत्तरचे दशक हे चित्रपट संगीताच्या दृष्टीने फार महत्त्वाचे होते असे ते सांगतात. सत्तरच्या दशकांमधली चित्रपटांसाठी लिहिलेली गाणी, त्यांचे बोल, त्यांचं संगीत, त्यांचं दिग्दर्शन आणि ज्या कलाकारांवर ती चित्रित केली गेली ते कलाकार अशा अनेक गोष्टी अनमोल होत्या. मा.जावेद अख्तर यांना ‘पद्मभूषण’, उर्दूतील उत्तम काव्य लेखनासाठी ‘साहित्य अकादमी’ पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या अनेक गाण्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.अभिनेत्री शबाना आझमी जावेद यांच्या दुसरी पत्नी आहेत.जावेद विवाहित असून दोन मुलांचे(फरहान आणि जोया)वडील होते.तरीदेखील शबाना यांचा जावेद यांचा जीव जडला होता.शबाना यांचे कुटुंबीय यांच्या लग्नाच्या विरोधात होते.परंतु त्यांनी ठाम निश्चय केला होता आणि जावेद यांच्याशी लग्न केले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज

    भय्यूजी महाराज यांचे खरे नाव उदयसिंह देशमुख. राष्ट्रसंत म्हणून ओळख असणारे भय्यूजी महाराज यांचा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात मोठा अनुयायी वर्ग होता. २०१६ मध्ये भय्यूजी महाराज यांनी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती जाहीर केली होती. त्यांचा इंदूर येथे आश्रम असून, त्याच्या महाराष्ट्रातील अन्य शहरांतही शाखा आहेत.

  • सूर संस्काराचा – डॉ. वरदा गोडबोले

    डॉ. वरदा गोडबोले किराणा गायन शैलीतील एक आश्वासक नाव. सुरांच्या वाटेवर तिची वाटचाल सुरू आहे.
    हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील किराणा घराण्याची संस्कारसंपन्न गायकी अंगी बाळगलेल्या गायक आणि गायिकांची यादी फार तगडी आहे. किराणा घराण्याचे उस्ताद करीम खां यांच्या तालमीत के. डी. जावकर, सवाई गंधर्व आणि बाळकृष्ण बुवा कपिलेश्वरी हे दिग्गज गायक तयार झाले. पुढे सवाई गंधर्व यांच्याकडे पं. फिरोज दस्तूर, पं. भीमसेन जोशी आणि श्रीमती गंगुबाई हनगल या तयार झाल्या, तर त्यानंतर पं. फिरोज दस्तूर यांच्याकडे दिवंगत पं. ए. के. अभ्यंकर घडले. पं. ए. के. अभ्यंकर हे देशपरदेशात आपल्या गायकीमुळे सुप्रसिद्ध असे नाव. गेल्या आठवडय़ात पं. अभ्यंकरांचा हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक मृत्यू झाला.

    ‘आपल्या शिष्याने आळविलेले सूर’ हीच खरी गुरुदक्षिणा असं मानणाऱया पं. अभ्यंकरांनी अनेक शिष्य घडवले. या शिष्यांपैकी हिंदुस्थानी शास्त्र्ीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्यात गुंतलेली आणि गुरू पं. अभ्यंकरांचा सुमारे ३५ वर्षांचा सहवास लाभलेली डॉ. वरदा गोडबोले ही एक संस्कारसंपन्न गायिका.

    १६ मे २०१३3 रोजी मी पं. ए. के. अभ्यंकर ऊर्फ पं. अच्युत केशव अभ्यंकर यांच्या घरी गेलो होतो. पं. अभ्यंकर तेव्हा ७६ वर्षांचे होते. त्यांचा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातला कित्येक दशकांचा प्रवास तसच दिवेआगर ते ठाणे व्हाया गिरगाव या प्रवासात त्यांची नोकरी, शास्त्रीय संगीताचा अभ्यास, घरातले सदस्य आणि त्यांचे शिष्य अशा सगळ्या विषयांवर आम्ही सुमारे दोन – अडीच तास गप्पा मारत होतो. या दिग्गज गायकासोबत बोलता बोलता मध्येच त्यांना थांबवत त्यांची काही पोर्ट्रेट मी टिपली. त्यांच्या गायकीचा वारसा पुढे नेण्याचं काम त्यांची शिष्या डॉ. वरदा गोडबोले उत्तम करत असल्याची पावती खुद्द त्यांनीच मला दिली. याच विश्वासानं मी त्याच दिवशी डॉ. वरदा गोडबोले यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांची वेळ घेऊन दुसऱयाच दिवशी त्यांच्या घरी पोहोचलो.

    वयाच्या सातव्या वर्षापासून शास्त्रीय संगीताच्या अभ्यासात गुंतून पुढे गांधर्व महाविद्यालयातून पहिल्या श्रेणीत संगीत अलंकार ही पदवी, तर त्यानंतर गांधर्व महाविद्यालयाच्या संगीताचार्य परीक्षेत देशातून पहिला येण्याचा मान पटकावणाऱया डॉ. वरदा गोडबोले या अभ्यासू गायिका. डॉ. वरदा यांना गायनाची आवड बालपणापासून होतीच. मात्र त्यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष केले नाही. संगीतासोबतच अभ्यासाची प्रगतीही त्यांनी समांतर गाठली. कला शाखेतल्या संस्कृत विषयाच्या पदवी परीक्षेत मुंबई विद्यापीठात सर्वाधिक गुणांची कमाई करत प्रथम क्रमांक आणि सुवर्ण पदक पटकावणाऱया डॉ. वरदा यांनी हाच यशाचा आलेख कायम राखत मुंबई विद्यापीठाच्या एमए संगीताच्या परीक्षेतही सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला.

    सुमारे दोन तास यशाचा हाच आलेख समजून घेत मी डॉ. वरदा गोडबोले यांचे पोर्ट्रेट टिपत होतो. यादरम्यान त्यांच्या गुरूंविषयी त्या बोलत होत्या. श्रीमती लीलाताई शेलारांकडून प्राथमिक शिक्षण तर त्यानंतर पं. अभ्यंकर यांच्याकडे किराणा घराण्याचं शिक्षण तब्बल बारा वर्षे घेतलं. पं. अभ्यंकरांकडच्या या बारा वर्षांत डॉ. वरदा यांच्या गायकीने आकार घेतल्याचं त्या मानतात. त्यानंतर आग्रा घराण्यातील पं. यशवंत महाले, ग्वाल्हेर घराण्यातील पं. मधुकरबुवा जोशी तसेच अजय पोहणकर आणि डॉ. सुशीलाताई पोहनकर यांच्याकडे पूर्ण केलं, तर माणिक वर्मा यांच्याकडे नाटय़ संगीताचा अभ्यास त्यांनी केला.

    एरवी मॉडेल फोटोग्राफी करताना अनेक बाबी लक्षात घेऊन फोटो टिपण्याचा प्रयत्न करावा लागतो. मात्र गायक, गायिका यांच्या फोटोच्या वेळी त्यांचे हावभाव हे अधिक महत्त्वाचे असतात. त्यांच्या पोर्ट्रेटमध्ये त्यांच्या चेहऱयाचा तजेलपणा, डोळ्यांतली चमक, कलेबाबत असलेली ओढ, त्या कलेशी असलेली निष्ठा आणि त्यातला प्रामाणिकपणा या सगळ्यांची एकूण जुळणी करत टिपलेलं पोर्ट्रेट हे उत्तमच येत. इथे एरवी लागणाऱया मेकअप, हेअर, कॉस्च्यूम या बाबी तशा गौण ठरतात. डॉ. वरदा यांचे मी त्यांच्या घरी त्यांच्या तंबोऱयासोबत टिपलेले पोर्ट्रेट हे याचंच उत्तम उदाहरण.

    यानंतरही डॉ. वरदा गोडबोले यांचे फोटोशूट करण्याची संधी मला अनेकदा आली. संगीत मैफलीत प्रत्यक्ष फोटोदेखील टिपण्याची संधी मला लाभली. मैफलीत उपलब्ध लाईटचा वापर करत कँडिड फोटो मी टिपले, तर विविध माध्यमांसाठी स्टुडिओतही फोटोशूट करायला मला मिळालं. स्टुडिओत लाइटींच्या सहाय्यानं फोटो टिपताना काही तास मला घालवायला लागले होते. केवळ फोटोशूटकरिता पोझेस न देता डॉ. वरदा यांनी त्या स्टुडिओतही आपला रियाझ सुरू केला आणि मला त्या रियाझावेळी फोटो टिपायला सांगितले होते.

    डॉ. वरदा यांचा संगीत प्रवास मला मधूनमधून समजत होता. शास्त्रीय संगीताच्या ज्ञानाची शिदोरी आपल्याकडे जमा केल्यानंतर डॉ. वरदा यांनी देशभरात विविध ठिकाणी आपलं गायन सादर केलं, तर ‘बालगंधर्व’ या मराठी सिनेमातल्या ‘नाथ हा माझा…’ या लोकप्रिय गाण्याचा आवाजही डॉ. वरदा यांचा आहे. संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या हेतूने डॉ. वरदा यांनी स्वरदायिनी ट्रस्टची स्थापना केली.

    या संस्थेच्या अध्यक्षपदी पं. अभ्यंकर हे होते, तर डॉ. वरदा यांच्याकडे शिकायला येणाऱया शिष्यांसाठी तसेच गायन, कथ्थक आणि तबला यांचे शास्त्रोक्त धडे देण्यासाठी स्वरदा संगीतालयाची स्थापना केली. आज शेकडो विद्यार्थी या संगीतालयात शिकत आहेत हे विशेष. संगीत क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवत विविध घराण्यांची गायकी त्याच ताकदीनं सादर करत आपल्याकडे असलेल्या संगीताचा गुणोत्तराने प्रचार आणि प्रसार करणाऱया डॉ. वरदा गोडबोले यांनी नव्या पिढीसमोर आपला स्वतःचा आदर्श घालून दिला आहे.

    धनेश पाटील
    dhanuimages@gmail.com

  • जेष्ठ मराठी, हिंदी अभिनेत्री सुहासिनी मुळे

    डॉक्यूमेंट्री फ़िल्मसाठी प्रसिद्ध असलेल्या विजया मुळे यांच्या कन्या. त्यांचा जन्म २० नोव्हेंबर १९५१ रोजी पटणा येथे झाला. वयाच्या सोळाव्या वर्षी 'भुवन शोमा' या सिनेमात त्यांनी पहिल्यांदा अभिनय केला. सत्यजीत राय यांनी 'भूवन शामा' या सिनेमातील नायिका सुहासिनी मुळे यांच्याविषयी म्हटले होते, की एक चांगली अभिनेत्री सिनेमाच्या प्रत्येक फ्रेममध्ये नसली तरीदेखील प्रत्येक ठिकाणी तिची उपस्थिती जाणवते. त्यानंतर अभिनय करण्याऐवजी कॅनडात गेल्या आणि कृषी अध्ययन करण्याचा निर्णय घेतला. अॅग्रीकल्चरमध्ये पदवीप्राप्त केल्यानंतर भारतात परतून शेतक-यांची मदत करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतात परतल्यानंतर हे काम जुळून आले नाही.

    मग मास कम्युनिकेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करुन दुरदर्शनवर काही दिवस काम केले. मात्र येथेही मन न रमल्यामुळे लवकरच राजीनामा दिला. त्यांनी अनेक डॉक्युमेंट्रीसुद्धा बनवल्या आहेत. सुहासिनी मुळे यांनी गुलजार यांच्या 'हुतुतु' या सिनेमात अभिनय केला होता. या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आशुतोष गोवारिकर यांच्या 'लगान'मध्ये आमिर खानच्या आईची भूमिका केली होती. त्यांनी 'दिल चाहता है' या चित्रपटात काम केले होते.

    सुहासिनी मुळे यांनी 'जोधा अकबर','बिग ब्रदर', 'पेज 3', 'ये तेरा घर ये मेरा घर', 'लव' ,'भुवन शोम' या या सिनेमांमध्ये काम केले. टीव्हीवर 'देवों के देव...महादेव', 'विरासत', 'देश की बेटी नंदिनी' आणि 'एवरेस्ट' या मालिकांमध्ये त्या झळकल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. त्यांनी ४ वेळा डॉक्यूमेंट्री फ़िल्मसाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आहे. सुहासिनी मुळे यांनी अनेक वर्षे एकटी घालवल्यानंतर वयाच्या साठाव्या वर्षी भौतिकशास्त्रज्ञ अतुल गुर्टु यांच्यासोबत लग्न केले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी

    ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी यांची निवड करण्यात आली आहे.

    प्रेमानंद गज्वी हे मराठी नाटककार, लेखक व कवी आहेत. सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून समाजातील विदारक सत्य प्रभावीपणे मांडणे यासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांचे ‘घोटभर पाणी’ अनेक भारतीय भाषांत अनुवादित झालं. ‘श्रेष्ठ भारतीय एकांकी’ या द्विखंडीय ग्रंथात प्रसिद्धही झालं. इंग्रजीत शांता गोखलेंनी ते अनुवादिलं आणि त्याचे प्रयोगही बंगलोरच्या एका नाटय़संस्थेनं केले. त्यापैकी एक प्रयोग एनसीपीएच्या मिनी थिएटरमध्ये अलेक पदमसींनी आयोजित केला होता. पण ‘लघुनाटय़’रूप असल्यामुळे असेल कदाचित, समीक्षकांनी त्याची विशेषशी दखल घेतली नाही.

    ‘तन-माजोरी’ मराठीत विलक्षण गाजलं. त्याला राम गणेश गडकरी, मामा वरेरकर, अनंत काणेकर आदी लेखन पुरस्कारही मिळाले. नाना पाटेकरांना घेऊन ते व्यावसायिक रंगमंचावर आलं. महाराष्ट्र मंडळाच्या प्रेमामुळं त्याचा प्रयोग आणि ग्रंथप्रकाशन सोहळा लंडनमध्येही झाला. गोवा विद्यापीठात एम.ए.च्या अभ्यासक्रमात ते शिकवलं जाऊ लागलं. कोकणीत त्याचा अनुवाद झाला. पुढे सगीर अहमद चौधरी या मित्रानं ते हिंदीत अनुवादित केलं. त्याचे पृथ्वी थिएटरला प्रयोग झाले. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं त्याची दखल घेतली. अजमेरच्या (राजस्थान) ‘कृष्णा ब्रदर्स’नं ग्रंथरूपात ते प्रसिद्धही केलं. एवढंच कशाला, अमिताभ बच्चन आणि नासिरुद्दीन शाहला घेऊन त्यावर फिल्म करण्याची घोषणाही दिग्दर्शक राहुल रवैल यांनी केली होती.

    ‘किरवंत’ खरं तर त्यांनी लिहिलं होतं १९८१ साली; पण त्याचं समीकरण नीट सुटलं नव्हतं. मग ते समीकरण पुन्हा सोडवून पाहिलं. डॉ. श्रीराम लागूंनी ते व्यावसायिक रंगमंचावर सादर केलं. आणि मग हा-हा म्हणता प्रेमानंद गज्वी हे नाव सर्वतोमुखी झालं. स्मशानकर्मे करणाऱ्या ‘किरवंता’चं उपेक्षित जीणं त्यातून प्रथमच मराठी साहित्याच्या केंद्रस्थानी आलं होतं. पं. वसंत देवांनी ‘किरवंत’चा हिंदी अनुवाद केला. तो ‘समकालीन भारतीय साहित्य’ या साहित्य अकादमीच्या नियतकालिकात प्रसिद्ध झाला नि पुढं दिल्लीच्या श्रीराम सेंटरनं ‘महाब्राह्मण’च्या रूपात हिंदी रंगमंचावर तो सादर केला. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’च्या भारत रंगमहोत्सवातही ते सादर झालं व गाजलं. बघता बघता ‘किरवंत’ इंग्रजीत (अनुवाद- म. द. हातकणंगलेकर) आलं. कोलकाताच्या सीगल बुक्सनं ते प्रकाशित केलं.

    त्यांची गाजलेली नाटके व एकांकिका: किरवंत, गांधी आणि आंबेडकर, छावणी, जय जय रघुवीर समर्थ, डॅम इट अनू गोरे, तन-माजोरी, देवनवरी, नूर महंमद साठे, शुद्ध बीजापोटी.

    घोटभर पाणी, पांढरा बुधवार, बेरीज-वजाबाकी, (प्रेमानंद गज्वी) समग्र एकांकिका. प्रेमानंद गज्वी यांना वि. वा. शिरवाडकर पुरस्कार, मसापचा जीवनगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

    प्रेमानंद गज्वी यांचे पहिले नाव आनंद गजभिये.. या बद्दल ते म्हणतात. मुळातच मला कव्वालीचा भारी नाद होता. गावी आमच्या बौद्ध समाजाचं ‘भीमबुद्ध भजनी मंडळ’ होतं. ते गावोगावी भजन गात. अशाच एका गावी कव्वालीचा सामना मी केला होता. सिनेमातील गाण्यांच्या चालीवर शेदीडशे गाणी मी लिहिली आहेत. तर मुद्दा मी प्रेमानंद गज्वी कसा झालो? आपली अंगीभूत आवड आपल्याला योग्य ठिकाणी घेऊन जाते. गोविंद म्हशीलकर हा मुंबईमधील प्रसिद्ध कव्वाल. मालाडमध्ये त्यांचा कार्यक्रम ठरलेला होता. ते यायला उशीर होत चालला होता.

    लोक चुळबूळ करायला लागले. कुणीतरी मला म्हणालं, ‘म्हशीलकर येईपर्यंत ‘गा’ की लेका.’ तोवर कुणीतरी तबला-पेटी आणली. मी गावू लागलो. दरम्यान म्हशीलकर आले. ‘आले; आले! ए तू थांब आता!’ मी थांबलो. गोविंद म्हशीलकरांची कव्वाली सुरू झाली. मी स्टेजवरच मागे बसलेला, ‘कोरस’ करीत. म्हणजे म्हशीलकर पुढं म्हणतील त्याच ओळी मागच्यांनी पुन्हा आळवणं. सकाळी कव्वाली संपली. जाता-जाता म्हशीलकरांनी विचारपूस केली. म्हणाले, ‘मला घरी येऊन भेट.’ मी परेलच्या बी.आय.टी. चाळीत त्यांच्या घरी भेटलो.

    मैत्रीचे धागे जुळले. मी गाणी लिहित होतो सिनेमातील गाण्यांच्या चालीवर नि गातही होतो कोरसमध्ये. एक दिवस ते म्हणाले, कितना लम्बा है तुम्हारा नाम.. ‘ग-ज-भि-ये’? छोटा कर दूँ? ‘गज्बी’! मी तसा शागिर्दच त्यांचा. कशाला नाही म्हणतो? दरम्यान माझ्या कानावर एक नाव आलं ‘गज्वी’ हे मुस्लीम आडनाव. गज्बीपेक्षा ‘गज्वी’ मला अधिक बरं वाटलं. मी गज्वी हे नाव स्वीकारलं. मी गाणी लिहित होतोच. आपल्या गाण्याची एखादी पुस्तिका प्रसिद्ध व्हावी ही इच्छा. तशी तयारी केली. पण पुस्तिकेला नाव काय देणार? म्हशीलकरांचा प्रश्न. मी म्हटलं ‘आनंद गीते’. तर ते म्हणाले, ‘या नावाची किताब तर आहे, मार्केटमध्ये.’ मी लगेच म्हणालो, ‘आनंद को प्रेमानंद कर देते है!’ आणि अशाप्रकारे मी आनंद गजभियेचा ‘प्रेमानंद गज्वी’ झालो. बाजारात माझी पुस्तिका आली. ‘प्रेमानंद गीते’ हे पुस्तक छापलं गेलं ‘बुद्धभूषण प्रिंटींग प्रेस’मध्ये. भैयासाहेब आंबेडकरांनी ते छापून दिलं. भैयासाहेब; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चिरंजीव.

    मराठी रंगभूमीदिनाचे औचित्य साधून रंगभूमी/थिएटर, कला, प्रतिभा याविषयावर ड्रामा स्कूल मुबईच्या वतीने निलम सकपाळ यांनी प्रेमानंद गज्वी यांच्याशी साधलेला संवाद.
    https://www.youtube.com/watch?time_continue=36&v=B65YsRASIng

    संकलन. संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट