(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता स्वप्नील जोशी

    आज १८ ऑक्टोबर
    आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता स्वप्नील जोशीचा वाढदिवस.
    जन्म:- १८ ऑक्टोबर १९७७

    त्यांनी आपले शिक्षण जीजीभोय या पारशी मनुष्य सेवाभावी संस्था मधून केले.आणि नंतर चे पूर्ण शिक्षण सिडनाहम कॉलेज, चर्चगेट वाणिज्य या विषयातून पूर्ण केले. वयाच्या नव्या वर्षी, स्वप्नील जोशी यांनी रामानंद सागर यांच्या काल्पनिक कार्यक्रम उत्तर रामायण यात तरुण कुश भूमिका साकारली तिथून त्यांनी त्यांची अभिनय कारकीर्द सुरू केली. २००८ सालातील मराठी चित्रपटाद्वारे त्याने चित्रपटमाध्यमात पहिल्यांदा प्रमुख भूमिका बजावली. 'टार्गेट' नावाच्या सिनेमातही त्याने काम केले आहे. 'मुंबई-पुणे-मुंबई' नंतर मुक्ता बर्वे बरोबर एका लग्नाची दुसरी गोष्टनावाच्या अत्यंत लोकप्रिय मालिकेत त्याने 'घन:श्याम' उर्फ 'घना'ची भूमिका बजावली. दरम्यान 'मुक्ता बर्वे' बरोबर त्याची जोडी सर्वच प्रेक्षकांना आवडली. 'दुनियादारी' चित्रपटात त्याने सुंदर भूमिका केलेली आहे व 'जिंदगी, जिंदगी' नावाचे गीत देखील गायले आहे. ‘कॉमेडी सर्कस’मधून त्याने सगळ्यांना हसवले. मात्र कधी अभिनय, कधी निवेदन; तर कधी परीक्षक या सगळ्या रूपात कायम राहिली ती त्याची “चॉकलेट बॉय’ची प्रतिमा. अनेक हिंदी – मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमधून त्याने अभिनय केला आहे. विनोदी अभिनेता आणि स्टँडअप कॉमेडियन म्हणून त्याची ओळख आहे. हारे काच की चुडियाँ, कॉमेडी सर्कस – १ आणि २ यासारख्या हिंदी मालिकांमधूनही तो प्रेक्षकांच्या भेटीला आला.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • रंगभूमी कलाकार मास्टर कृष्णराव

    कृष्ण गणेश फुलंब्रीकर तथा कृष्ण गणेश फुलंब्रीकर यांचा जन्म २० जानेवारी १८९८ रोजी झाला.

    आपलं सगळं आयुष्य नाटकाला वाहिलेला, सर्वार्थाने रंगभूमी कलाकार म्हणजे मास्टर कृष्णराव.

    त्यांना सुरुवातीचे संगीत शिक्षण बाबूराव फडके यांचेकडून मिळाले. कृष्णरावांचे वडील पंडित होते. त्यांच्या निधनानंतर, गरिबीच्या परिस्थितीत वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी कृष्णरावांनी नाट्यकला प्रवर्तक मंडळी या नाटक मंडळीत काम सुरू केले. कृष्णरावांची तब्येत नाजूक होती. आवाजातील गोडी, लवचीकपणा यांमुळे त्यांना काम मिळाले होते. ते 'संत सखू' नाटकात विठोबाची भूमिका करत असत. ह्याच नाटक मंडळीत त्यांचा परिचय सवाई गंधर्वांशी झाला व त्यांना नाटकातील गाण्यांसाठी सवाई गंधर्वांचे मार्गदर्शन लाभले.

    १९१० साली मास्टर कृष्णरावांनी पं. भास्करबुवा बखले यांचे शिष्यत्व स्वीकारले. आपल्या गुरूंच्या आग्रहास्तव मास्टर कृष्णरावांनी गंधर्व नाटक मंडळींत प्रवेश केला. ते बालगंधर्वांबरोबर मुख्य भूमिका करत असत. ह्या दरम्यान त्यांनी 'संगीत शारदा', 'संगीत सौभद्र', 'एकच प्याला' यांसारख्या अनेक नाटकांत स्त्री-भूमिकाही केल्या. गुरूंच्या निधनानंतर गंधर्व मंडळींच्या नाटकांसाठी संगीत रचना करण्याचे काम कृष्णरावांकडे आली. 'सावित्री', 'मेनका', 'संगीत कान्होपात्रा' यांसारख्या नाटकांना संगीत देताना कृष्णराव त्यातील अभिनेत्यांना मार्गदर्शन करत असत. बालगंधर्वही त्यांना गुरुस्थानी मानायचे.

    नंतरच्या काळात त्यांनी 'नाट्य निकेतन'साठी केलेल्या रचनांमुळे मराठी नाटकांमधील संगीताला एक वेगळी दिशा मिळाली. त्यांनी रचलेली 'कुलवधू', 'एक होता म्हातारा' यांमधील गाणी त्यांतील भाव, गेयता व शब्दसौंदर्यासाठी वाखाणली गेली. कृष्णरावांनी 'धर्मात्मा', 'माणूस', 'गोपाळकृष्ण' यांसारख्या चित्रपटांनाही संगीत दिले. त्यांनी संगीत दिलेल्या प्रभात कंपनी निर्मित या व इतर अनेक चित्रपटांतील गाणी खूप गाजली.

    त्यांनी एकूण १९ चित्रपटांना संगीत दिले. त्यात अत्रे फिल्म्सच्या गाजलेल्या 'अमरज्योती' चित्रपटाचा समावेश आहे. त्यांनी 'भक्तीचा मळा' व 'मेरी अमानत' चित्रपटांत भूमिकाही केल्या. संगीत जलशांचे कार्यक्रम करण्यासाठी मास्टर कृष्णरावांनी १९२२ ते १९५२ दरम्यान भारतभर सातत्याने दौरे केले. त्यांच्या आवाजातील लवचीकता, माधुर्य व आकर्षकपणा यांचा प्रभाव जनमानसावर लगेच पडत असे. त्यांच्या कार्यक्रमांना सर्वसामान्यांबरोबरच रसिक, दर्दी श्रोत्यांची विशेष पसंती व उपस्थिती असे. ते दुर्मिळ आणि लोकप्रिय रागांबरोबरच ठुमरी, नाट्यगीत,भजन व चित्रपटगीतेही प्रभावीपणे सादर करत असत. तसेच नव्या शक्यता पडताळून पाहणे, नवे प्रयोग करणे ही त्यांची खासियत होती. त्यांनी रचलेले 'झिंजोटी' रागातील सामूहिकरीत्या गाता येण्यासारखे 'वंदे मातरम्' वाहवा मिळवून गेले. प्रसन्न, उठावदार व प्रभावी गायन शैलीने ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असत. त्यांनी गायलेल्या गाण्यांची व राग संगीताची ७८ आर. पी. एम. ध्वनिमुद्रणेही प्रकाशित केली गेली.

    अखेरच्या कालावधीत त्यांनी बंदिशी व नाट्यगीतांच्या सुरावटींसह रचना असलेली १९ पुस्तके प्रकाशित केली. संगीत रागदारीवरील, गायन व वादन शिक्षणाबद्दलच्या पुस्तकाचे १९४० ते १९७१ या काळात लिहिलेले 'रागसंग्रह' नामक सात खंड त्यांत समाविष्ट आहेत. वंदे मातरम हे गीत, ते बॅन्डवर वाजवता येत नाही या सबबीखाली राष्ट्रगीत केले नाही याचे त्यांना फार वाईट वाटले. वंदे मातरमला अनेकानेक विविध चाली लावून, त्यांतल्या काही बॅन्डवर वाजवता येतात हे दाखवण्यासाठी त्यांनी पंडित नेहरूंची भेट घेऊन त्यांना पटवून देण्याचा प्रयत्नं केला. पण नेहरूंनी आधीच जन गण मन निश्चित केले असल्याने मास्तर कृष्णरावांची सर्व मेहनत फुकट गेली. मसापतर्फे दर विषम वर्षी एका संगीतविषयक समीक्षकास मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर स्मृति पुरस्कार देण्यात येतो.

    मास्टर कृष्णराव यांचे २० ऑक्टोबर १९७४ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • चेहऱ्याची जादू – स्मिता शेवाळे

    स्मिता शेवाळे… विलक्षण बोलका, भावदर्शी चेहरा ही तिची ओळख…

    केदार शिंदे दिग्दर्शित ‘यंदा कर्तव्य आहे’ या चित्रपटातून स्मिता शेवाळेनं मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केलं आणि या इंडस्ट्रीला एक सोज्वळ, लोभस, घरंदाज चेहरा मिळाला. २००६ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची जादू आजही तितकीच टिकून आहे हेच या सिनेमाचं यश सांगता येईल. यंदा कर्तव्य आहे हा सिनेमा स्मितासाठी टर्निंग पॉइंट ठरला आणि यानंतर तिने मागे वळून बघितलंच नाही. अनेक मराठी सिनेमे, मालिका यातील अभिनयातून तिने रसिकमन जिंकलं…

    रुपेरी पडदा आणि छोटय़ा पडद्यावर आपल्या अभिनयातून रसिकमन जिंकलेल्या स्मिताला काहीकाळ अभिनय क्षेत्रापासून दूर राहावं लागलं ते तिच्या वैयक्तिक कारणामुळे. लग्नानंतर बराच काळ तिने चित्रपटातून ब्रेक घेतला होता. आई, पत्नी, सून, मुलगी आणि एक व्यावसायिक अभिनेत्री या सगळ्या रूपांना न्याय देता देता स्मिताची दमछाक झाल्याचं ती सांगत असतानाच हा ब्रेक अवघ्या अडीज ते तीन वर्षांत संपवून तिने नव्या जोमाने आणि ताकदीने अभिनय क्षेत्रात पुनरागमन केलं. ‘कनिका’ या हॉरर चित्रपटातून तिने साकारलेल्या छोटय़ा मात्र ठळक भूमिकेमुळे तिच्या अभिनयातले वेगळे पैलू पाहायला मिळाले.

    स्मिताने इंडस्ट्रीत ब्रेक घेण्यापूर्वी म्हणजेच २०१४ साली तिचे फोटोशूट करण्याची संधी मला मिळाली होती. शूट नेमकं काय असेल, त्याचा लूक कसा असेल हे स्मिताशी बोलून शूटची तारीख नक्की करण्यात आली. स्मिताचा सोज्वळ, लोभस, घरंदाज चेहरा लक्षात घेऊन तिच्यासाठी वेशभूषा, त्यातील रंगसंगती, दागिने, मेकअप, हेअर हे सारं काही ठरवण्यात आलं होतं. स्मिताशी माझ्या स्टायलिस्ट आणि कॉस्च्युम डिझायनरने त्यासंबंधित संपर्क करून नेमका तिला कशा पद्धतीने प्रेझेंट केलं जाईल याचा अंदाज दिला होता. शूटच्या दिवशी आम्ही ठरल्याप्रमाणे भेटलो आणि शूटला सुरुवात केली. पारंपरिक वेशभूषा, कलाकुसरीने सजलेले दागिने, त्यावरचा मराठमोळा साज आणि नयनरम्य शृंगार यातून स्मिताचा मोहक चेहरा अधिकच उठून दिसत होता. स्मिताच हे लोभस रुपडं मी कॅमेराबद्ध करण्याचा प्रयत्न मी करत होतो. हे शूट चांगलं तीन-साडे तीन तास चाललं.

    वृत्तपत्रासाठी हवे असलेल्या फोटोंचा साचा ठरलेला होता त्यानुसार सुरुवातीला वृत्तपत्राची गरज असलेले फोटो मी आधी टिपले. नंतर त्याच मराठमोळ्या पेहरावात फुल लेन्थ, मिड लेन्थ, हेडशॉटस असे काही फोटो घेतले. फ्लॅट लायटिंग करून फोटो टिपल्यानंतर स्मिताच्या चेहऱयाचे वेगळ्या लायटिंगमध्ये काही फोटो मला टिपता आले. यावेळी ब्लॅक ऍण्ड व्हाईट फोटो टिपण्याचा मोह मला आवारात आला नाही. या ब्लॅक ऍण्ड व्हाईट पोट्रेट्समध्ये स्मिता अधिक खुललेली दिसली. शूट सुरू होऊन साधारणपणे तीन तास झाले असावेत. स्मिताचे पारंपरिक वेषभूषेतले फोटो टिपल्यानंतर तिचे मॉडर्न लूकमधले फोटो टिपण्यासंबंधित तिच्याशी मी बोललो. स्मिताला संकल्पना आवडली आणि आम्ही लगेच छोटा ब्रेक घेऊन पुढच्या शूटच्या तयारीला लागलो.

    माझ्या स्टायलिस्ट आणि कॉस्च्युम डिझायनरशी बोलून आम्ही लगेचच तिच्यासाठीचा नवा मॉडर्न लूक ठरवला. लाल रंगावर काळ्या रंगाची डिझाईन असलेला वनपीस स्मितासाठी यावेळी आम्ही निवडला. आधीच्या पारंपरिक वेशभूषेला संपूर्णपणे तडा देणारा हा तिचा लूक होता. यासाठी तिला मेकओव्हर करावा लागणार होता. मेकअप, हेअर हे सारं काही नव्याने करायला साधारणपणे दीड तास गेला. स्मिता या मॉर्डन लूकमध्येही अतिशय सुंदर दिसत होती. तिच्या बोलक्या चेहऱयाने हा लूकदेखील तितकाच खुलवून आणला होता.

    स्मिता शूटच्यावेळी मदतशीर होती. तिला सांगितलेले पोजेस ती देत होतीच शिवाय त्यात वेगळेपणा कसा आणता येईल यासाठीही तिची धडपड सुरू होती. सुरुवातीला तिचे काही रंगीत फोटो टिपल्यानंतर लायटिंग बदलून ड्रमॅटिक म्हणजे प्रकाश आणि सावलीचा खेळ करून केलेल्या लायटिंगमध्ये तिचे काही ब्लॅक ऍण्ड व्हाईट फोटो मी टिपले. यापूर्वीच्या शूटच्यावेळी स्मिताच्या पेहरावाला अनुसरून तिचा शृंगार केला होता. कपाळावर अर्ध चंद्रकोर टिकली, गळ्यात भव्य हार, दागिने, नाकात नथ असा सारा शृंगार असलेल्या स्मिताचा चेहरा मी आधी टिपला होता. यानंतरच्या मॉर्डन लूकमध्ये मात्र तिने काहीच शृंगार केला नव्हता. तरीहीदेखील तिचा हा चेहरा आधीच्या चेहऱयाएवढा किंबहुना त्याहून अधिक खुललेला दिसत होता, हे विशेष. तिच्या ही चेहऱयाची जादू यावेळी मला अनुभवता आली.

    स्मिताचं शूट सुरू करण्यापूर्वी मेकअपच्यावेळी स्मिताशी मनमुराद गप्पा झाल्या. केदार शिंदेचा ‘यंदा कर्तव्य आहे’ हा सिनेमा म्हणजे तिच्यासाठी अभिनयाची कार्यशाळाच ठरल्याचं ती सांगते. मोजके सिनेमे ठरवून करणाऱया कलाकारांपैकी एक अशी स्मिताची ओळख करून देता येईल. कोणताही सिनेमा निवडण्यापूर्वी त्या सिनेमाचा अभ्यास, त्यातील बारकावे लक्षात घेऊन मगच ती सिनेमे निवडते आणि एकदा का सिनेमा निवडला की मेहनत घ्यायची तिची तयारी असते हे तिच्या बोलण्यातून वेळोवेळी जाणवत होते.

    धनेश पाटील
    dhanuimages@gmail.com

  • मैहर घराण्याचे सतारवादक निखिल बॅनर्जी

    आज १४ ऑक्टोबर. भारतीय शास्त्रीय संगीतातील मैहर घराण्याचे सतारवादक निखिल बॅनर्जी यांची जयंती. त्यांचा जन्म१४ ऑक्टोबर १९१४ रोजी झाला.

    निखिल बॅनर्जी यांचे वडील जितेंद्र नाथ बॅनर्जी हे सुद्धा सतारवादक होते. वडिलांकडून प्रेरणा घेउन निखील बॅनर्जी यांनी लहानपणीच आपला संगीत प्रवास सुरु केलं. वयाच्या ९ व्या वर्षीच त्यांनी आकाशवाणीवरील अखिल भारतीय सतारवादन स्पर्धा जिंकली. अशा प्रकारे ते आकाशवाणीवर नेमणूक होणारे सर्वात लहान वयाचे संगीत कलाकार ठरले. त्यांची आवड पाहून वडिलांनी त्यांना मुश्ताक अली खान ह्यांच्याकडे पाठवले. परंतु त्यांच्याकडे निखिलजी काही आठवडेच शिकले. त्यांचे प्रमुख गुरु म्हणजे मैहर चे अलाउद्दीन खान. अल्ला उद्दीन खान साहेबांनी निखील बॅनर्जी यांची गुणवत्ता पाहून अतिशय कठीण अशा प्रकारे त्यांच्याकडून रियाज करून घेतला. फक्त हाताची तयारी व तांत्रिक क्षमताच नव्हे तर त्याहून पलीकडील सांगीतिक ज्ञान निखील बॅनर्जी यांना त्यांच्याकडून मिळाले. यामुळे निखीलजींनी आपली वैशिष्ट्यपूर्ण अशी स्वतंत्र वादनशैली निर्माण केली. अल्लौद्दिन खान यांच्यानंतर निखील बॅनर्जी यांनी व सरोदवादक उस्ताद अली अकबर खान तसेच त्यांच्या कन्या अन्नपूर्णा देवी यांच्याकडूनही संगीताचे धडे घेतले. मैहर घराण्यातून शिक्षण घेतल्यानंतर निखिलजींनी उस्ताद अली अकबर खान ह्यांच्याबरोबर जुगलबंदी चे कार्यक्रम केले. तसेच आकाशवाणी वर सुध्धा ते नियमित वादन करत असत. त्यांचे भारतभर कार्यक्रम होऊ लागले. त्यांनी अनेक पहिला परदेश दौरे केले. ध्वनिमुद्रनापेक्षा प्रत्यक्ष कार्यक्रमांवर त्यांचा भर असायचा. निखिलजींनी आपली स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण अशी वादन शैली निर्माण केली. त्यांच्या शैलीत गाण्यातील गेयता आणि सतार वादनातील तंतकारी अंग ह्याचा मिलाफ दिसतो. स्वर आणि ताल ह्या दोन्ही अंगांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांची तयारी जबरदस्त होती. परंतु त्यांनी त्यांच्या वादनात नेहमीच सौंदर्य आणि भावपूर्णतेला महत्त्व दिलेले आढळते. सुरेख संयमी आलाप, भावपूर्ण राग विस्तार, सुरेख तिहाया, स्पष्ट-वेगवान ताना, छूट तानांवरील प्रभुत्व, लयकारी ह्यामुळे त्यांच्या शैलीत संपूर्णत्व होते. त्यांचा भर पारंपारिक राग व मैहर घराण्याचे खास राग इत्यादींवर असायचा. तसेच ते अहिरी, कौशिकी, श्याम केदार इ. अनेक अपारंपरिक रागही वाजवत असत. मनोमंजरी, हेम-ललत इ. राग त्यांनी तयार केल्याचे मानले जाते. भारत सरकाने निखिल बॅनर्जी यांना १९६८ साली पद्मश्री पुरस्कार व १९८६ साली पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले होते. १९७४ साली निखिल बॅनर्जी यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला होता. मा.निखिल बॅनर्जी हे सर्वकालीन सर्वोत्तम सतार वादकांमधील एक म्हणून गणले जातात. मा.निखिल बॅनर्जी यांचे २७ जानेवारी १९८६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. मराठी विकिपीडिया

  • अभिनेत्री पूर्णिमा

    अभिनेत्री पूर्णिमा यांचे खरे नाव ‘मेहर बानो’ होते. पूर्णिमा यांचे वडील हे मनमोहन देसाई यांचे वडील किकूभाई देसाई जे फ़िल्म डिस्ट्रीब्यूटर होते त्यांच्या ऑफिस मध्ये अकाऊंट्सचे काम बघत होते. पूर्णिमा यांची आई मुस्लिम होती. पूर्णिमा यांना चार बहिणी व एक भाऊ. पूर्णिमा यांची मोठी बहीण शिरीन यांनी १९३०च्या दशकात ‘बम्बई की सेठानी’, ‘पासिंग शो’, ‘ख़्वाब की दुनिया’, ‘स्टेट एक्स्प्रेस’ व ‘बिजली’ अशा चित्रपटात कामे केली होती.

  • ज्येष्ठ पटकथाकार रघुनाथ दामोदर सबनीस, ऊर्फ वसंत सबनीस

    ज्येष्ठ पटकथाकार रघुनाथ दामोदर सबनीस, ऊर्फ वसंत सबनीस यांचा जन्म ६ डिसेंबर १९२३ रोजी झाला. वसंत सबनीस यांचे शालेय शिक्षण पंढरपुरात झाले तर, पुणे येथील फग्यूर्सन महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. पुण्यातल्या वास्तव्यात, पु. ल. देशपांडे, राम गबाले, शरद तळवलकर यांच्याशी झालेली घट्ट मैत्री त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाच्या घडणीतच महत्त्वाची ठरली. 'घरोघरी हीच बोंब', 'कार्टी श्रीदेवी', या नाटकांबरोबरच, 'विच्छा माझी पुरी करा' सारखे अप्रतिम नाटय, इथून सुरुवात होऊन, सोंगाडया, एकटा जीव सदाशिव, हे गाजलेले चित्रपट दादा कोंडके यांच्यासाठी त्यांनी दिले. व्यावसायिक रंगभूमी आणि चित्रपट यामधे एक प्रतिष्ठित विनोद रूजविण्याचा सबनीसांनी केलेला प्रयत्न बराचसा यशस्वी झाला. ते हसविण्यासाठी कधीच स्वस्त झाले नाहीत. त्यांच्या अनेक कथांना राज्य सरकारचे वाङ्मय पुरस्कार मिळाले आहेत.

    नाटककार राम गणेश गडकरी पुरस्कार त्यांना मिळाला आहे. 'गेला माधव कुणीकडे' सारखे तब्बल १० वर्षे मराठी रंगभूमीवर हाऊस फुल्ल जाणारे, 'कलावैभव' संस्थेला यश देणारे नाटक, 'अशी ही बनवाबनवी', 'गंमत जंमत' सारखे चित्रपट त्यांची ही खासियत अधोरेखित करतात. 'घरोघरी हीच बोंब' ’निळावंत’, 'नाटक' नावाचेचे नाटक तसेच 'सौजन्याची ऐशी तैशी', 'विच्छा माझी पुरी करा', 'गेला माधव कुणीकडे', अशी एकापाठोपाठ एक यशस्वी नाटकांची मालिका श्री. सबनीस यांच्या श्रेयनामावलीमध्ये आहे.

    'सबनिशी' हा त्यांचा विनोदी लेखसंग्रह, 'थापडया', 'पखाल', हे विनोदी कथासंग्रह, तर 'माझेश्वरी' हे ब-यावाईट अनुभवांचे संकलन प्रसिध्द झाले आहे. मराठी लोककलांच्या क्षेत्रात सबनीस लीलया वावरले. त्यांनी ’विच्छा माझी पुरी करा’ लिहीले तेव्हा तमाशा, वग आदि प्रकारांना पांढरपेषांच्या कलांत वा मनोरंजनात स्थान नव्हते. दादा कोंडके हे नावही 'विच्छा' मुळे घरा घरात पोहचले. राजा, परधानजी, कलावंतीण आणि शिपाई ही पात्रे शहरातही चमकू लागली. मुंबईतील रंगभवन आणि राणीच्या बागेतील रंगमंचावरून 'विच्छा'ने सरळ दादरच्या शिवाजी मंदिर, गिरगावच्या साहित्य संघ इ. नाटयगृहांमधे धडक मारली. कित्येकदा विच्छाच्या प्रयोगात वसंत सबनीस दादांबरोबर बतावणीला उभे राहिले होते. पु. लं. समवेत त्यांनी 'तुका म्हणे' मधेही काम केले होते. वग नाटय लेखनात सबनीसांची लेखणी विशेष खुलली. 'छपरी पलंगाचा वग', म्हणजेच 'विच्छा' हे नाटक, व त्याबरोबरच 'खणखणपूरचा राजा', 'एक नार चार बेजार', 'त्रिशूलाचा वग', 'तुम्ही माझं सावकार', 'आदपाव सुतार, पावशेर न्हावी, सव्वाशेर शिंपी' अशीही अनेक नाटके त्यांनी लिहीले.
    ४५ वर्षे सबनीसांच्या लेखणीने विनोद फुलविले.

    अनुभवापलिकडचे विनोद करण्याची त्यांच्यात जबरदस्त ताकद होती. वसंतरावांना पैशापेक्षा लेखन अधिक प्रिय होते. भालजी पेंढारकरांनी वसंतरावांची दादांबरोबर जोडी जमविली, आणि 'सोंगाडया' रूपेरी पडदयावर आला. 'एकटा जीव सदाशीव' सुध्दा वसंतरावांनी दादांसाठी लिहीला. मात्र नंतर द्वयर्थी संवादांच्या आग्रहामुळे दादांसाठी त्यांनी लिहीणेही नाकारले. साध्या साध्या गोष्टींमधून, खास कारण नसतानाही विनोदनिर्मिती करण्याची त्यांची अनोखी अदा अनेकांना मोहवून जाते. सचिन बरोबर त्यांचे 'नवरी मिळे नव-याला', 'गंमत जंमत', 'एकापेक्षा एक', 'अशी ही बनवाबनवी', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी', असे एकाहून एक धम्माल विनोदी आणि सुपरहिट चित्रपट पडदयावर आले. वसंत सबनीस यांचे १५ ऑक्टोबर २००२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

  • बंगालीतील महानायक अरुणकुमार चटर्जी ऊर्फ उत्तमकुमार

    त्यांनी अभिनयासोबत काही चित्रपटांचे दिग्दर्शक व निर्माती पण केली होती. त्यांचा जन्म ३ सप्टेंबर १९२६ रोजी झाला. त्यांनी बंगाली भाषेमधील चित्रपटांशिवाय काही हिंदी चित्रपटांमधूनही त्याने अभिनय केला. १९५३-१९७५ या काळात बंगाली चित्रपटांत उत्तम कुमार यांची सुचित्रा सेन यांच्यासोबत त्यांची जोडी चांगली जमली होती आणि या जोडीचे अनेक चित्रपट गाजले. अभिनेते उत्तमकुमार यांच्यासमवेत सुचित्रा सेन यांनी ३० चित्रपट केले होते.

    उत्तम कुमार यांनी २५० हून अधिक चित्रपटांत अभिनय केला. अमानुष, छोटीसीमुलाकात,आनंद आश्रम हे त्यांचे हिंदी चित्रपट खूप गाजले.चित्रपटातील योगदानासाठी भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला. उत्तमकुमार यांचे २४ जुलै १९८० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • मराठीतील कवी वसंत बापट

    वसंत बापट तरुण वयातच भारताच्या स्वांतत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. त्यांचा जन्म २५ जुलै १९२२ रोजी झाला. `माझीया जातीचे मज भेटो कोणी, ही माझी पुरवून आस, जीवीचे जिवलग असे भेटला की दोघांचा एकच श्वास' अशी कवितेवर निष्ठा असणारा कवि म्हणून वसंत बापट ओळखले जातात. राष्ट्रसेवादलाच्या मुशीत घडलेल्या वसंत बापट यांचा `बिजली' हा पहिला काव्यसंग्रह सेतु, अकरावी दिशा, सकीना, मानसी हे त्यांनंतरचे. त्यांच्या प्रतिभेची विविध रुपे रसिकांनी, वाचली, अनुभविली. लहानपणापासून बापटांवर राष्ट्रसेवा दलाचे आणि साने गुरुजींच्या सहवासाचे संस्कार झाले. शेवटपर्यंत ते राष्ट्रसेवा दलाशी संलग्नर होते. 'बिजली' ह्या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर ह्या संस्कारांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. 'अकरावी दिशा', 'सकीना' आणि 'मानसी' हे त्यांचे ’बिजली’नंतरचे काव्यसंग्रह होते. त्यांनी लहान मुलांसाठीही कविता लिहिल्या. वसंत बापट १९८३ ते १९८८ या काळात साधना नियतकालिकाचे संपादक होते. पौराणिक व ऐतिहासिक कथानकांवरची त्यांची नृत्यनाट्येही प्रभावी ठरली. ’केवळ माझा सह्यकडा' ही त्यांची कविता सर्वतोमुखी झाली.

    'गगन सदन तेजोमय' सारखे अप्रतिम प्रार्थनागीत त्यांनी लिहिले. कालिदासाच्या विरही यक्षाची व्याकुळता त्यांनी मेघहृदयाच्या रूपाने मराठीत आणली. त्यांची ’सकीना’ उर्दूचा खास लहेजा घेऊन प्रकटली आणि, ’तुला न ठेवील सदा सलामत जर या मालिक दुनियेचा, कसा सकीना यकीन यावा कमाल त्यांच्या किमयेचा’, सांगून गेली. पु.ल. यांनी एकदा वसंत बापट यांना, `बापट, बापट रोज गाणं थापट' म्हटलं पण वसंत बापटांनी मात्र आपलं गाणं `थापटत' असतांना कधी-कधी `थोपटलं' ही आहे असं म्हणंत. ते म्हणंत, नव्या कवितेतून गाणे हरविले आहे, तरुणाईने गाणी गुंफायला हवेच. बापट हे केशवसुतांच्या मालिकेतील कवी होते. देशात घडणार्याु घटनांची दखल घेऊन मत मांडले पाहिजे असे मानणारे ते कवि होते. कवींच्या संस्कृति समृध्दीमुळे त्यांच्या कवितेत भाववलयं उठत राहतात. माणसांबद्दलचे प्रेम आणि सामाजिक जिव्हाळ्यातून बापट यांचे मन घडले होते. त्यांच्या कवितेला अनेक घुमारे आहेत. रचनाशुध्दता, विलक्षण शब्दचापल्य हेवा वाटावा अशी शैली ही बापट यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होत. अंतर्गत लय सांभाळून त्यांनी अनेक रचनाप्रकार हाताळले.

    १९९९ मध्ये मुंबई येथे झालेल्या ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. युगोस्लोव्हियातील आंतरराष्ट्रीय कविसंमेलनात भारताचे अधिकृत प्रतिनिधी म्हणूनही ते सहभागी झाले. चंगा मंगा, अबडक तबडक, आम्ही गरगर गिरकी, फिरकी, फुलराणीच्या कविता आणि परीच्या राज्यात हे त्यांचे बालकवितासंग्रह आहेत, तर बालगोविंद हे बालनाट्य त्यांनी लिहिले. त्यांच्या मनमोकळ्या स्वभावामुळे त्यांना अनेक मित्र मंडळी होती. तीही वेगवेगळ्या स्तरांतली, त्यांच्या मित्र मंडळीत पं. भीमसेन जोशी, पं. कुमार गंधर्व, जेष्ठ नेते नाथ पै, मधु दंडवते, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे असत. महाराष्ट्र्सेवादलातल्या सर्वांना, `साधने'त त्यांच्याबरोबर काम करणार्या सहकार्यां नाही ते आपले वाटतात. त्यांचे मराठी, संस्कृत भाषेवरचे प्रभूत्व आणि प्रेम तर सर्वश्रुतच होते. पण त्यांचे इंग्रजीवरही प्रभूत्व होते. `शतकाच्या सुवर्णमुद्रा' हे त्यांचे अखेरचे पुस्तक. वसंत बापट यांचे १७ सप्टेंबर २००२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. माय मराठी

  • मला भावलेला चित्रकार : श्याम हुले

    आठवणीतील माणसं हे सदर लिहिताना अनेक चेहरे डोळ्यासमोर आले अन रेखाटले गेले पण काल घोडपदेव नाक्यावर लागलेला भाऊ यांचा फलक पाहिला आणि श्याम हुले नावाचं व्यक्तिमत्व अलगद अंत:चक्षूसमोर उभं राहिलं. त्यांच्या स्मृतीगंधाची दरवळ मनात रेंगाळू लागली. काळाच्या ओघात आपण अशा अनेक व्यक्ती आणि वल्ली पाहतो आणि विसरून जातो. फक्त आजूबाजूच्या आणि रोज च्या जीवनातील व्यक्ती लक्षात राहतात आणि अशा अनेक वल्ली काळाच्या उदरात गडप होऊन जातात. अशीच एक व्यक्ती श्याम हुले मनाला भावलेल्या या व्यक्तीबद्दल लिहावे आणि चार लोकांना सांगावे, अगदी मनापासून वाटले.

    रांगोळी किंवा रंगावली आणि भारतीय संस्कृतीचे अतूट समीकरण. कुठल्याही शुभ प्रसंगी रांगोळीला स्थान असतं या कलेने व्यावसायिक रूप धारण केलं नसलं तरी या रांगोळीत नांव कमावलेल्या पैकी श्याम हुले हे एक आपल्या विभागाला लाभलेले स्नेहशील सौहार्द. त्यांचा *जनजागृती* उदघाटन प्रसंगी रांगोळीतून साकारलेला वाघ शिवसेनाप्रमुखांना जागच्या जागी खिळवून ठेवतो. दाताच्या जबड्यात गुलाबाची पाकळीच्या लाल छटेमागील कारण काय....? असं शिवसेनाप्रमुखांनी विचारल्यावर भाऊंनी दिलेले उत्तर ‘वाघ म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे वाघ.जो पर्यंत वाघ शांत आहे तो पर्यंत शांत आहे.पण कोणी आडवा आला तर त्याला फाडून खाल्याशिवाय राहणार नाही.ही लाल छटा म्हणजे रक्त दर्शविते. आजही किती तरी तत्कालीन कार्यकर्त्यांना आठवत असेलच. शिवसेनेला वाघ कोणी दिला असेल तर या भाऊंनी.‘ त्याशिवाय त्यांनी कॅनव्हास पेपरवर बाळासाहेबांचे रेखाटलेले चित्र सर्वश्रुत आहे. त्यामुळे या उत्तम गुणी चित्रकाराचे नांव दसरा मेळाव्यात बाळासाहेबांच्या मुखातून घेतले गेले तेव्हा या माणसाची पत काय होती ते आपल्या लक्षात येईलच. गुणवंत मांजरेकरांच्या रांगोळी प्रदर्शनात भाऊंच्या दोन रांगोळ्या असायच्या. भाऊंच्या पाण्यावर काढलेल्या रांगोळी लक्षवेधी ठरत असत. प्रदर्शनात कमलाकर गोंजीसारख्या प्रतिभावंत रांगोळीकारांच्या सोबतीला रांगोळी हा एक बहुमानच. ही एक अशी कला आहे की, रांगोळीत जमीन आणि बोटं यांचा स्पर्श होत नाही.त्यामुळे ती अस्पर्शित राहिली. शासकीय स्तरावर उदासीनता या अर्थाने अस्पर्शित राहिली त्यामुळे यांचा गौरव कधी झाला नाही.

    आम्ही लहान असताना या व्यक्तीला आणि ते रेखाटत असलेल्या कलेल्या अगदी जवळून पाहिले आहे. त्याचा नेत्रसुखद आनंद घेतलेला आहे.पालनजी रतनजी चाळीतून जाता येताना नेहमीच दर्शन घडले. साधा माणूस हातात ब्रश घेऊन आपल्या कलेला तंत्र,मंत्र आणि मर्म यातून प्रत्यक्षात उतरविणारा .... रंग आणि रेषा यांच्या माध्यमातून कला साकार करणारा चित्रकार एक ख्यातकीर्त व्यक्तिमत्व श्याम हुले ( भाऊ) यांच्या रूपातून सहवास लाभणे हे आमचे भाग्य समजतो. त्यांच्या कलेतील तंत्रकौशल्य म्हणजे रंगछटांचे वजन थोडेही ढासळू न देता त्यांनी केलेली कल्पनारम्य, उत्कृष्ट प्रतिमा मोहित केल्याशिवाय राहत नव्हती. भाऊ या कलेत इतके रमून गेले की, त्यांना कुणाशी सवडीने बोलायला देखील वेळ मिळत नसे. पण व्यवस्थितपणा आणि व्यावसायिकपणा त्यांना कधी जमलाच नाही. अगदी लोक देतील त्या पैश्यावर कामे केली. सेनेचे काम करताना पैसे कधी मागितले नाही. वाजवून पैसे कधी घेतलेच नाही. कोणी दिले नाही त्याचे दु:ख त्यांनी मानले नाही. मुळात ते मृदुभाषी आणि कमी बोलणारे. कुणावर कधी हुकुमत गाजविणे किंवा अधिकारवाणीने बोलण्याची सवय कधी जडून दिली नाही.त्याला ते तरी काय करणार....!

    शिवसेना स्थापन झाली तेव्हा आपल्या विभागात काही मोजून कार्यकर्ते होते. तेव्हा स्थानिक सत्ताधारी आणि त्यांच्या गुंडासमोर उघडपणे काम करण्याची कुणाची हिम्मत नव्हती. त्याकाळी श्याम हुले,दत्ता घाग, दत्ता चव्हाण ( पालनजी रतनजी चाळ ) , शिवसेनेचा ढाल म्हणून संबोधले गेलेले संभा घाडगे ( वाणी चाळ,), गोविंद शिंदे ( बुवाची चाळ ) गंगाराम साळुंके ( खोजा चाळ ) अनंत मारणे ( मारुती माळी चाळ ) अन्य काही मंडळींनी सेनेची बीजे ह्या घोडपदेव सभोवतालच्या परिसरात रोवली. ही नांव आजच्या पिढीला माहित नसतीलच. ह्या छान्दिष्टांच्या मळ्यातून एकेक मोती जोडले गेले. ते आजतागायत गुंफण्याचे काम आजची पिढी करते असं आपण समजू. आता मोती मिळत नाहीत. मोत्यांनी माळेत गुंफून घेण्याऐवजी कुणाच्या तरी करंगळीत शोभिवंत म्हणून जगणे पसंत केले आहे.

    तत्कालीन नगरसेवक विजय लोके यांनी अनेकांच्या जीवनगौरवार्थ महापालिकेत सर्वाधिक नामकरण प्रस्ताव मंजूर केले होते. पण पाट्यांचे अनावरण केले नव्हते.महापालिकेने पाट्या लावल्या पण त्या काळाच्या ओघात गडप झाल्या. घोडपदेव नाक्यावर कै.बाबुराव मेटकरी चौक असाच तिष्ठत आहे. त्यांची साधी पाटी देखील आजतागायत लावलेली नाही. असंच श्याम हुले चौक विषयी घडले. मला श्याम हुले चौक विषयी झालेल्या राजकारणात पडायचे नाही. एखादा फलक पाहिला की,आम्ही श्याम आर्टची ती बारीक अक्षरे शोधीत असायचो. कारण ती वळणदार अक्षरातून त्या त्या पेंटरची प्रतिमा दिसून येत होती. आज त्या वळणदार सुंदर अक्षरांचा जमाना गेला पण खंत अशी की,श्यामभाऊ पेंटरच्या निमुळत्या बोटातून साकारलेला अविष्कार आज पाहायला मिळत नाही. काही म्हणा त्या काळात गुंफलेल्या माळेतील गडप झालेल्या या मोत्याविषयी आम्हाला आजही आदर आहे.

    *अशोक भेके*

  • गोविंद तळवलकर

    गोविंद तळवलकर यांच्यावर लोकमान्य टिळक आणि एम.एन. रॉय यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र टाइम्सचे संपादक म्हणून त्यांनी तब्बल २८ वर्षे काम केले.