(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • बंगालीतील महानायक अरुणकुमार चटर्जी ऊर्फ उत्तमकुमार

    त्यांनी अभिनयासोबत काही चित्रपटांचे दिग्दर्शक व निर्माती पण केली होती. त्यांचा जन्म ३ सप्टेंबर १९२६ रोजी झाला. त्यांनी बंगाली भाषेमधील चित्रपटांशिवाय काही हिंदी चित्रपटांमधूनही त्याने अभिनय केला. १९५३-१९७५ या काळात बंगाली चित्रपटांत उत्तम कुमार यांची सुचित्रा सेन यांच्यासोबत त्यांची जोडी चांगली जमली होती आणि या जोडीचे अनेक चित्रपट गाजले. अभिनेते उत्तमकुमार यांच्यासमवेत सुचित्रा सेन यांनी ३० चित्रपट केले होते.

    उत्तम कुमार यांनी २५० हून अधिक चित्रपटांत अभिनय केला. अमानुष, छोटीसीमुलाकात,आनंद आश्रम हे त्यांचे हिंदी चित्रपट खूप गाजले.चित्रपटातील योगदानासाठी भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला. उत्तमकुमार यांचे २४ जुलै १९८० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • Photogenic – नम्रता गायकवाड

    मधाळ हसणारी, गालावर गोड खळी असलेली, बोलक्या डोळ्यांची, सुरेख केसांची वळण लाभलेली, तरतरीत नाकाची अन् कलावतीला शोभेल अशीच उंची लाभलेली नम्रता गायकवाडची लोभस व्यक्तिरेखा सर्वांच्या डोळ्यात भरेल अशीच आहे.

    एखाद्या प्रकल्पावर काम करत असताना त्या प्रकल्पाची गरज ओळखून त्याला साजेसा ठरेल असा चेहरा छायाचित्रकाराला निवडायचा असतो. मात्र काही चेहरे असे असतात त्याला कोणताही मेकओव्हर केला तरीहि त्यात तो शोभून दिसतो. मराठी सिनेइंडस्ट्रीत अशी काही मोजकी लोक आहेत. या यादीत नम्रता गायकवाड हिचं नाव घेता येईल. मधाळ हसणारी, गालावर गोड खळी असलेली, बोलक्या डोळ्यांची, सुरेख केसांची वळण लाभलेली, तरतरीत नाकाची अन् कलावतीला शोभेल अशीच उंची लाभलेली नम्रता गायकवाडची लोभस व्यक्तिरेखा सर्वांच्या डोळ्यात भरेल अशीच आहे. तिच्यातले हेच गुण एक अभिनेत्री म्हणून तिला जितके महत्वाचे ठरतात. तितकेच ते तिला मॉडेल म्हणून प्रेजेंट करताना उपयोगी पडतात.

    गुणी अभिनेत्री म्हणून यश संपादित केलेल्या तर मॉडेल म्हणून जाहिरात क्षेत्रात वेगळं नाव कमावलेल्या नम्रताचं फोटोशूट करण्याची संधी मला एका नामांकित वृत्तपत्रामुळे मिळाली. यावेळी एथनिक लूकसाठी डिझायनर साडय़ांमध्ये तिचं फोटोशूट करण्यात आलं होतं. मात्र, नम्रताचा चेहरा खरं तर एका छायाचित्रकाराला हवा असलेला असा फोटोजेनिक असाच चेहरा असल्याने तिला मॉडेल म्हणून दिल्या गेलेल्या कोणताही पेहरावात ती उठूनच दिसेल याची खात्री मला होती. पारंपरिक वेशभूषा केलेली नम्रता मी छायाचित्रित केली होती. याच्या विरुद्ध वेस्टर्न आऊटफिटमध्येही तिचं एक छायाचित्र टिपण्याचं मी ठरवलं अन् या छायाचित्रणादरम्यानही ती अधिक खुलल्याचं मला जाणवलं.

    मॉडेलचा एक वेगळा रुबाब स्टुडिओत असतो. तो नेमका कसा जपायचा याचे एथिक्स तिला माहीत होते, तर तिच्या गालावर नेमकी खळी कुठे पडते, चेहऱयावर नेमके कुठे कटस् आहेत या सगळ्याचा अंदाज घेतल्यानंतर वेगळ्या प्रकाशरचनेत तिचे छायाचित्र टिपण्याचा मी प्रयत्न केला. या शूटनंतर अनेक प्रकल्पांमुळे नम्रता आणि माझ्यात संवाद झाले. काही प्रकल्पांवर आम्ही कामही केलं. यातून तिचा आजवरचा जीवन प्रवास उलगडला. व्यावसायिक रंगभूमीवरून एकदम छोटा पडदा आणि थेट रुपेरी पडद्यावर झळकलेली नम्रता आज तरुण अभिनेत्रींच्या यादीत महत्त्वाचं स्थान मिळवून आहे.

    नम्रताला अभिनय क्षेत्रात येण्यासाठी खरं तर पूरक असं कोणतंच वातावरण नव्हतं. शाळा-महाविद्यालयातही तिने कधी अभिनयात रस घेतला नाही. तसंच घरी अभिनय क्षेत्राचाही कोणताच धागा नव्हता. वडील राज्य शासनाच्या विद्युत विभागात नोकरी करत होते, तर आई ही गृहिणी होती. वडिलांच्या नोकरीनिमित्ताने कुटुंबाला एका शहरातून दुसऱया शहरात सतत स्थलांतर करावं लागत होतं अन् या स्थलांतराच्या काळात केवळ शालेय शिक्षण हेच नम्रताचं उद्दिष्ट नकळत ठरलं गेलं होतं.

    जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जाणारा 8 मार्च हा नम्रताचा जन्मदिवस. निसर्गाच्या कुशीत वसलेल्या नाशिकमध्ये जन्मलेली नम्रता चौथीपर्यंतच्या शालेय शिक्षणानंतर ठाणे जिह्यातल्या कल्याण इथे कायमची स्थायिक झाली अन् शहरबदलीचा तिचा प्रवास कल्याण शहरात आल्यानंतर संपुष्टात आला. कल्याणच्या नालंदा विद्यालयातून पाचवीनंतरचं शालेय शिक्षण तिने पूर्ण केलं अन् त्यानंतर तिने बिर्ला महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी कमावली. शालेय शिक्षणासोबतच कल्याणच्याच गुरू लक्ष्मी यांच्याकडून भरतनाटय़मचे धडे तिने गिरवले अन् नृत्याचं बाळकडू लहानपणीच मिळवलेली नम्रता आज रुपेरी पडद्यावर ताल धरताना आपल्याला दिसत आहे.

    नृत्यकलेत नम्रताने शालेय काळापासूनच रस घेतला होता. मात्र, अभिनय क्षेत्रापासून ती पार दूर होती. महाविद्यालयीन शिक्षणानंतर कल्याणच्या आचार्य आत्रे नाटय़गृहात वडिलांच्या कार्यालयातून भरवल्या गेलेल्या एका एकांकिका स्पर्धेला केवळ प्रेक्षक म्हणून आलेल्या नम्रतासाठी तो दिवस टार्ंनग पाईंट ठरला. अभिनयाची चंदेरी दुनिया इथे तिला फारच भावली. अनेक प्रश्नांची कालवाकालव तिच्या डोक्यात यावेळी सुरु झाली. एकांकिका स्पर्धेसाठी परिक्षक असलेले अशोक समेळ हे नम्रताच्या वडिलांचे जवळचे मित्रच होते. नम्रताला अभिनयाविषयी पडलेल्या प्रश्नांची उकल अशोक समेळांनी केली खरी. मात्र तिला या क्षेत्रात प्रवेश करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

    अशोक समेळांच्या मार्गदर्शनानंतर अभिनय प्रशिक्षण शिबिरातून नम्रताने या क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि प्रशिक्षण शिबिराच्या अंती तिला या क्षेत्रात आपलं पाऊल रोवण्यास व्यासपीठ मिळालं ते ‘ज्ञानोबा माझा’ या व्यावसायिक नाटकाचं. ‘ज्ञानोबा माझा’ या नाटकात रुक्मिणीची भूमिका साकारून नम्रता रंगमंचावर आली अन् इथे तिने रसिक मनावर चांगलीच भुरळ घातली. यापाठोपाठ ‘मंगळसूत्र’ या मालिकेतून नम्रता छोटय़ा पडद्यावर झळकली. अलका कुबल या ज्येष्ठ अभिनेत्रीच्या मुलीची भूमिका तिने या मालिकेत साकारली होती. या मालिकेच्या माध्यमातून छोटय़ा पडद्यावरून नम्रता घराघरांत पोहोचली. आपला वेगळा चाहता वर्ग तयार होतो न होतो तोच नम्रताला रुपेरी पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली ती ‘स्वराज्य – मराठी पाऊल पडते पुढे’ या सिनेमातून.

    व्यावसायिक नाटकानंतर छोटा पडद्यावर अन् लगेच रुपेरी पडद्यावर गुणी अभिनेत्री म्हणून नम्रताने अल्पावधीतच नाव कमावलं. तिच्या याच अभिनयाच्या जोरावर तिला पुढे ‘विजय असो’ या सिनेमात तसंच आता ‘विठ्ठल विठ्ठल’ या व्यावसायिक नाटकात काम करण्याची संधी चालून आली. विशेष म्हणजे येत्या 18 ऑक्टोबरला तिचा ‘वंशवेल’ हा सिनेमादेखील येऊ घातला आहे. कै. राजीव पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या या शेवटच्या सिनेमात नम्रताची मध्यवर्ती भूमिका असून स्त्रीभ्रूणहत्या, स्त्री-पुरुष समानता आणि कुटुंब जपणूक यावर आधारित असलेल्या या सिनेमाकडे नम्रताचंही आता लक्ष लागलं आहे.

    धनेश पाटील
    dhanauimages@gmail.com

  • महान क्रांतिकारक सरदार उधमसिंग

    पंजाबातील अमृतसर येथे १३ एप्रिल १९१९ ला झालेल्या जालियानवाला हत्याकांडाचे ते साक्षीदार होते. त्यामध्ये गोळी लागल्याने ते जखमी झाले होते. या घटनेत हजारो भारतीयांच्या हत्येस कारणीभूत कमांडर डायर व जनरल ओडवायर आहेत ही माहिती मिळाल्यानंतर या दोहोंचा प्रतिशोध घ्यायची खूणगाठ उधमसिंग यांनी मनात बांधली.

  • उर्दू शायर’, व स्वातंत्र्यसैनिक हसरत मोहानी

    उर्दू शायर', व स्वातंत्र्यसैनिक हसरत मोहानी यांचा जन्म १ जानेवारी १८७५ रोजी हसवा गावी (जि. फत्तेपूर) झाला.
    मौलाना ... हसरत मोहानी!

    संपूर्ण स्वातंत्र्य मागणारी भारत देशातील पहिली व्यक्ती! साहित्य निर्मीतीतून समाजाला योग्य दिशा दाखवून ब्रिटिशांवर कोरडे ओढण्यासाठी अनेकदा कारावास भोगणारे कदाचित एकमेव शायर!

    सर्वात आधी "संपूर्ण स्वराज्या"ची मागणी करणार्यांचपैकी एक. टिळकांच्या मतासारखी मागणी असलेला. लोकमान्य टिळकांचे खास समर्थक. मा.हसरत मोहानी यांचे बालपण आजोळी म्हणजे मोहाना (जि. उन्नाव) येथे गेल्याने त्यांनी कवितेत टोपणनाव घेताना मोहानी हे आडनाव लावले. ते १९0३ मध्ये बी.ए. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. हल्लीच्या भाषेत सांगायचे तर महाविद्यालयात ते टॉपर होते. त्यांना चालून आलेली सेशन जजची नोकरी केवळ इंग्रजांची आहे म्हणून त्यांनी ठोकरली. पुढच्याच वर्षी त्यांनी ‘उर्दू-ए-मोअल्ला’ हे मासिक सुरू केले. काँग्रेस पक्षाच्या एका अधिवेशनात ते सामील झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत रामप्रसाद बिस्मिलही होते. १९0८ मध्ये एकाचा लेख त्यांनी छापला आणि इंग्रजांची नाराजी ओढवून घेतली. लेखकाचे नाव न सांगितल्याने इंग्रजांनी तुरुंगात टाकले. ४५ किलोच्या बेडया त्यांना घातल्या जायच्या. कधी उलटे टांगले जायचे. रोज २0 किलो गहू दळायची शिक्षा होती.

    हसरत थकत तेव्हा बासरी वाजवत. इकडे ते दळत तर घरी खायला काही नसल्याने त्यांची पत्नी, निशात उन्नीसा, लोकांची दळणे दळून घर चालवीत होती. ते संपूर्ण स्वातंत्र्य (आझादी-ए-कामिल) मिळण्याच्या बाजूचे होते. सुभाषचंद्र बोस यांचे ते सर्मथक होते. मुस्लीम लीगच्या सभेत जीनांची त्यांची कायम जुंपायची. भरसभेत पंडित मदनमोहन मालवीय, सरदार पटेल, बॅ. जीना या सर्वांना एवढेच काय महात्मा गांधी यांनाही धारेवर धरण्यात त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. पहिल्या महायुद्धात इंग्रजांना मदत केल्याबद्दल गांधीजींवर त्यांनी जाहीर टीका केली. पण मोहानींचे भारतप्रेम इतके होते की त्यांच्यावर कोणीही रागावले नाही. भारतात कम्युनिस्ट पक्ष स्थापनेत त्यांचा खारीचा का होईना पण वाटा होता. हे आजच्या किती कम्युनिस्टांना माहिती आहे तेच जाणे. हसरत यांना अनेकदा तुरुंगाची हवा खावी लागली. त्यांच्या ७७१ पैकी ३८३ गझला तेथेच निर्माण झाल्या. त्यांनी पहिली गझल वयाच्या १२व्या वर्षी लिहिली.

    १८७५ साली उत्तर प्रदेशातील 'मोहान' या गावी जन्माला आलेल्या हसरत यांनी शिक्षणात विलक्षण प्रगती दाखवली. त्यानंतर अलीगढ विद्यापीठात पुढील शिक्षण घेतले. मात्र त्यांची खरी ओळख 'उर्दू शायर' म्हणण्यापेक्षाही स्वातंत्र्यसैनिक अशीच रास्त आहे. मौलानांना कारावासात अनेकदा टाकण्यात आले. दुसर्याद वेळेसच्या कारावासात तर अपरिमित हाल त्यांना सहन करावे लागले. खरे तर हालअपेष्टा प्रत्येकच कारावासात होत्या कारण सक्तमजूरी दरवेळेसच मिळायची. दिवसदिवसभर चक्की पिसावी लागायची. त्यांचे शरीर इतके भक्कम नव्हते की त्यांना ते सहन होईल. पण पर्याय नव्हता. मग मारहाण व्हायची. हंटरचे फटके पडायचे. त्यातच एखाद्या कैद्याने स्वतः केलेले काम वाढीव दाखवण्यासाठी यांचा आटा चोरला किंवा थोडासा जरी आटा जमीनीवर पडला तर वेगळी मारहाण व्हायची. त्यांच्या शरीरावर या मारहाणीच्या अनेक जखमा होत्या.

    मौलानांचा आणखीन जास्त अपमान करण्यासाठी त्यांना विशिष्ट प्रकारचे कपडे देण्यात आले जे अत्यंत टाकाऊ स्वरुपाचे व रफ होते. मात्र मौलानांनी तेही सहन केले. एकच स्टीलचे भांदे देण्यात आले ज्याचा वापर दिवसातील प्रत्येक गोष्टीसाठी करावा लागायचा. तेही त्यांनी सहन केले. त्यांना एक जाडेभरडे कांबळे फक्त देण्यात यायचे निजण्यासाठी!
    अतीव हालात काढलेल्या या प्रदीर्घ कालावधीत मौलानांच्या मनातून भौतिक इच्छा नष्ट होऊ लागल्या. त्यांच्यातील खमकेपणा व स्वातंत्र्याची आस तेजःपुंज होऊ लागल्या. त्याग झळाळू लागला. कोणत्याही भौतिक वासना राहिल्या नाहीत. आणि सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे कारावासात त्यांनी निर्माण केलेले साहित्यच सर्वाधिक व सर्वोत्कृष्ट ठरले. ब्रिटिश सरकारने एकदा त्यांना सक्तमजूरी व दंडही ठोठावला.

    अर्थातच, त्यांच्याकडे पैसेच नसल्यामुळे त्यांना दंड भरता आला नाही. मग सरकारने त्यांची शायरीची पुस्तके. जी मौलानांच्या मते त्यांच एकमेव पुंजी होती, ती अत्यंत अल्प किंमतीत विकून तो दंड वसूल करून त्यांचा आणखीन अपमान केला. मौलानांचे शायरीला सर्वात मोठे योगदान म्हणजे एकीकडे वझीर सारख्या शायरांची उथळ आणि काल्पनिक शायरी प्रसवत असताना आणि दुसरीकडे दागसारख्यांची जबान बयानची आणि काहीशी हझलीश शायरी प्रसवली जात असताना, मौलाना यांनी शायरीला पुन्हा एकदा नावलौकीक मिळवून दिला. मौलाना हसरत मोहानी हे कृष्णभक्त व टिळकभक्त पण होते.

    हसरत मोहानी एकदा मित्राच्या घरी गेले होते. जेवण वगैरे झाले. रात्री मित्राने झोपायला अंगणातली खाट दिली. थंडी मी म्हणत होती; पण मित्राचाही नाइलाज होता. घर लहान. उबदार ब्लँकेट दिले. सकाळी उठून मित्र पाहतो, तर काय हसरतसाहेब कुडकुडत, पोटात पाय घेऊन झोपलेले. मित्राने त्यांना उठविले आणि विचारले, ‘‘हे काय, मी छान ब्लँकेट दिले होते. तरीही तुम्ही....’’ हसरत म्हणाले, ‘‘मित्रा, ते विदेशी ब्लँकेट कसे घेऊ? मी टिळकांचा भक्त आहे ना!’’ हसरत यांची टिळकभक्ती अशी होती. त्यांनी लोकमान्य टिळकांवर लिहिलेला एक शेर वाचला तरी ही भक्ती कळते. ते म्हणतात -
    मग्मून न हो खातिरे-हसरत के तिलकतक
    पैगामे वफा बादे सहर लेके गयी है
    (हसरत तू नाराज होऊ नकोस. प्रभातकाळच्या वायूने तुझा संदेश टिळकांपर्यंत नेला आहे.)
    टिळकांवर एवढी भक्ती का? तर त्याचे उत्तर ते देत अस्तकी की, टिळकांइतका सडेतोड आणि निर्धाराचा मनुष्य माझ्या पाहण्यात आला नाही. लोकमान्यांचे जेव्हा निधन झाले तेव्हा हसरत म्हणाले होते -
    मातम न हो क्यों भारत में बपा दुनिया से
    सिधारे आज तिलक
    बलवंत तिलक, महाराज तिलक,
    आझादी के सरताज तिलक
    मौलाना हसरत मोहानी कट्टर धार्मिक होते., पण राजकारणात त्यांचे गुरू होते टिळक आणि तुरुंगात त्यांच्या सोबत होती कृष्णाची बासरी. कृष्णावर त्यांनी अनेक ठुर्मयांही लिहिल्या. जशी ही ठुमरी पाहा-
    मनमोहन श्याम से नैन लाग
    निसदिन सुलग रही तन आग
    मौलाना यांची शायरी ही दैनंदीन शब्दात, दैनंदिन जीवनातील संदर्भांसहीत मनातील भावभावनांना अत्यंत प्रभावीपणे व्यक्त करते. त्यांच्या शायरीची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे साधेपणा, प्रामाणिकपणा आणि सूक्ष्म भावना प्रकट करू शकण्याची हातोटी!
    चुपके चुपके रात दिन आसूं बहाना याद है
    हमको अबतक आशिकीका वो जमाना याद है

    खूब-रुयोंसे यारियाँ न गई
    या दोन्ही गुलाम अलींनी मशहूर करून टाकलेली गझल्स मा.हसरत मोहानी यांच्या आहेत. दिलकी बेइख्तियारियाँ न गई
    हसरत मोहानी यांची खूप मोठी साहित्यनिर्मीती उपलब्ध आहे. स्वतःचा काव्यसंग्रह, गालिबचा अनुवाद, काव्यातील महत्वाचे घटक, याशिवाय त्यांनी अनेक लेख लिहीले. पाकिस्तानात त्यांच्या नावाने एक लायब्ररी व उपक्रमही आहे. हसरत मोहानी यांचे निधन १३ मे १९५१ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट / प्रदीप निफाडकर

    खूब-रुयोंसे यारियाँ न गई.
    https://www.youtube.com/watch?v=RiH6UECmc3s&feature=youtu.be
    चुपके चुपके रात दिन आसूं बहाना याद है.
    https://www.youtube.com/watch?v=bCvtKpEsg1g

    हसरत मोहांनींचे काही इतर शेर:
    =========================================
    उनके खत की आरझू है उनके आमद का खयाल
    किस कदर फैला हुवा है कारोबारे इन्तझार
    =====================================
    कुछ समझमे नही आता कि ये क्या है 'हसरत'
    उनसे मिलकर भी न इजहारे तमन्ना करना
    =====================================
    जी मे आता है के उस शोखे-तगाफुल केशसे
    अब न मिलिये फिर कभी और बेवफा हो जाइये
    ======================================
    तेरी मैफिलसे उठाता गैर मुझको, क्या मजाल
    देखता था मै तुने भी इशारा कर दिया
    इश्कने उसको सीखा दी शायरी
    अब तो अच्छी-फिक्रे ‘हसरत’ हो गई

  • लघु लिपीचे(shorthand) जनक सर आयझॅक पिटमॅन

    अठराव्या शतकाच्या मध्याला सर आयझॅक पिटमन यांनी विकसित केलेली इंग्रजी लघुलेखन कला अलीकडे झपाट्याने वाढ होत असलेल्या संगणक युगामुळे हळूहळू लोप पावताना दिसत असली, तरी सुमारे पाच दशकांपूर्वी इंग्रजी लघुलेखन व जोडीला टंकलेखन शिकणे हा कित्येक मध्यमवर्गीयांचा झटपट नोकरी मिळवण्याचा सर्वांत स्वस्त व परवडणारा पर्याय होता.

  • जेष्ठ संगीतकार यशवंत देव

    यशवंत देव म्हणजे शब्दप्रधान गायकी. त्यांचा जन्म १ नोव्हेंबर १९२६ रोजी झाला. त्यांच्या घरात वडिलांच्या रूपातच गाणे होते. तेच त्यांचे पहिले गुरू. देवांचे वडील विविध वाद्ये वाजवण्यात पटाईत होते पण त्यांतही तबल्यावर त्यांचे जास्त प्रेम होते. त्यांच्याचकडून देवांना तालाचे बाळकडू मिळाले. जी.एन जोशी आणि गजाननराव वाटवे ह्यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच यशवंत देव सुगम संगीताकडे वळले.
    यशवंत देव यांचा प्रवास गाण्यातून कवितेकडे झाला. आजतागायत अनेक नाटके आणि चित्रपटासाठी गाणी लिहिली, संगीत दिले. त्याचप्रमाणे बालकविता, विडंबन, विनोदी काव्यप्रकारही लिहिले. यशवंत देवांनी हिंदी चित्रपटसृष्टीतले दिग्गज संगीतकार अनिल विश्वास यांना आपले गुरू मानले होते. आकाशवाणीवर सुगम संगीत विभागात सतारवादक म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. मुंबई आकाशवाणी केंद्रावर त्यांनी सादर केलेला ‘ भावसरगम ’ हा कार्यक्रम चांगलाच गाजला. त्या द्वारेच, संगीतकार, गायक आणि कवी ही त्यांची ओळख महाराष्ट्राला झाली. शब्दप्रधान गायकीचे उद्गाते, अशी त्यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण केली. आचार्य रजनीश यांच्या लेखनाचा त्यांनी केलेला भावानुवादही रसिकांना आवडला.

    यशवंत देव जसे एक संगीतकार आहेत तसेच ते एक उत्तम गायकही आहेत आणि त्याहीपुढे जाऊन ते एक अतिशय समर्थ असे कवीसुद्धा आहेत. त्यांनी रचलेली कैक गाणी ह्याची साक्ष देतील. जीवनात ही घडी अशीच राहू दे, श्रीरामाचे चरण धरावे दर्शन मात्रे पावन व्हावे, अशी धरा असे गगन कधी दिसेल का?, कोटि कोटि रूपे तूझी कोटी सूर्य चंद्र तारे, तू नजरेने हो म्हटले पण वाचेने वदणार कधी, प्रिया आज माझी नसे साथ द्याया, स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी, अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात, कुणी एकत्र नांदती कुणी दूर दहा हात, अशी ही दोन फुलांची कथा, एक शिवाच्या पदी शोभते एक शवाच्या माथा....अशी एकाहून एक सरस गाणी देवांनी रचलेली आहेत. ह्यातील काही चित्रपटांसाठी, तर काही भावगीत-भक्तिगीत म्हणून रचलेली आहेत. मा.यशवंत देवांनी कैक हिंदी मराठी चित्रपटांना संगीत दिले आहे. तसेच बावनखणी, चारचौघी, सख्खे शेजारी, घनश्याम नयनी आला अशासारख्या जवळपास ३०-४० नाटकांचेही त्यांनी संगीतदिग्दर्शन त्यांनी केले होते. ग.दि. माडगुळकरांचे गीतरामायण जसे सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केले, तसे माडगुळकरांच्या सचिन शंकर बॅले ग्रुपने सादर केलेल्या "कथा ही रामजानकीची" या नृत्यनाटिकेला यशवंत देव यांनी संगीत दिले होते. चिंतनशील कलाकार असणारे यशवंत देव एका फार मोठय़ा सांगीतिक कालखंडाचे साक्षीदार आहेत. स्वत:सोबत अनेकांची कारकीर्द घडताना त्यांनी जवळून पाहिली आहे. १९५१ मध्ये ते सतारवादक म्हणून एच. एम. व्ही.त नोकरीला लागले.

    लता मंगेशकर, वसंत प्रभू, पी. सावळाराम तसेच आशा भोसले यांची गाणी या काळात पुढे येत होती. हे सर्व देवांना जवळून बघायला मिळाले. एच. एम. व्ही. च्या नोकरीने देवांना अनुभवसमृद्ध केले. देव साहेबांनी मोजक्याच चित्रपटांना संगीत दिले. त्याबद्दल त्यांच्या मनात कोणतीही खंत नाही. आपल्याला चित्रपट क्षेत्रात संगीत दिग्दर्शक म्हणून कामे अर्थात ज्या काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले त्यातली त्यांची कामगिरी चोख होती. त्याचा आनंदही त्यांना लाभला होता. म्हणूनच ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’ (‘कामापुरता मामा’- गीत व संगीत- यशवंत देव) हे लता मंगेशकरांच्या आवाजातलं अजरामर गीत जन्माला आलं. पुलंमुळे ते गीतकार झाले. ‘झालं-गेलं विसरून जा’ या चित्रपटाची गाणी विलक्षण गाजली.

    एच. एम. व्ही.ने स्टाफ कमी केल्यामुळे देवांची नोकरी सुटली. दरम्यान, त्यांनी गाण्याचा क्लास सुरू केला. ते स्वत: खऱ्या अर्थाने गायक नाहीत. तरुणपणात फुटलेला आवाज कधीच सांधता आला नाही, असं ते स्वत:च सांगतात. त्यावर मात करण्याचे प्रयत्नही त्यांनी केले. त्यांच्या शिष्यवर्गातील एक नामवंत नाव म्हणजे प्रख्यात पाश्र्वगायिका सुमन कल्याणपूर. (तेव्हाच्या सुमन हेमाडी!) त्यांची देवांच्या संगीत दिग्दर्शनाखालील ‘मधुवंतीच्या सुरासुरातून’, ‘श्रीरामाचे चरण धरावे’, ‘पक्षिणी प्रभाती चारियासी जाये’ ही गाजलेली गाणी त्यांनी गायली.

    या गाण्यांना चाली लावताना आपली मन:स्थिती कशी होती, हेही देव विशद करताना म्हणतात, ‘गीताला सूर आपल्या डोक्यात शोधण्यापेक्षा त्या गीताच्या शब्दांतच ते दडलेले असतात हे जाणवलं. शब्दांतच सूर शोधायचे असतात हे सत्य विजेसारखं डोळ्यांसमोर आणि डोक्यात चमकलं!’’ म्हणूनच पुढच्या काळात देवांचं ‘जर कविता चांगली असेल तर त्यात चाल असतेच. मी ती फक्त शोधून काढतो!’ हे वाक्य फार गाजलं. ते नेहमी चांगल्या कवितेच्या शोधात असतात. यातूनच ‘शब्दप्रधान गायकीचे उद्गाते’ हे बिरूद त्यांना बहाल झालं. 'दिवस तुझे हे फुलायचे', 'पाऊस कधीचा पडतो', 'तिन्ही लोक आनंदाने', 'जीवनात ही घडी', 'क्षितिजावर खेळ विजेचा' अशा अनेक भावगीतांचे / चित्रपट गीतांचे / नाट्यगीतांचे संगीतकार, 'प्रिया आज माझी', 'स्वर आले दुरुनी', इ. गीतांचे कवी, 'शब्दप्रधान गायकी', 'रियाजाचा कानमंत्र', 'कृतज्ञतेच्या सरी', 'पत्नीची मुजोरी' अशा अनेक पुस्तकांचे लेखक मा. ‘प्रतिभावंत गीत-संगीतकार यशवंत देव’ हे अशोक चिटणीस यांनी पुस्तक लिहिले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • भारतीय तिरंग्याचे रचनाकार पिंगली वेंकय्या

    पिंगाली वेंकय्या.. हे नाव फारसे कुणाला माहीत नाही. भारताच्या राष्ट्रध्वजाची कल्पना मांडली ती याच पिंगाली वेंकय्या यांनी. त्यांचा जन्म २ ऑगस्ट १८७६ रोजी झाला. ध्वज कोणत्या रंगाचा असावा, त्यात किती आणि कोणते रंग असावेत, त्याचा आकार कसा असावा याचा सखोल अभ्यास करून त्यांनी तिरंगा साकारला. ते केवळ तिरंग्याचे निर्माते नव्हते तर जपानी भाषेचे शिक्षक, सिद्धहस्त लेखक आणि जिओफिजिसिस्टही होते. मछलीपट्टनममध्ये माध्यमिक शिक्षण पुर्ण करुन पिंगली वेंकय्या पुढील शिक्षणासाठी कोलंबोला गेले. भारतात परत आल्यावर प्रथम त्यांनी एका रेल्वे गार्डची नौकरी व नंतर बेल्लोरीमधे सरकारी नौकरी केली. तदनंतर त्यांनी एंग्लो वैदिकीय महाविद्यालयात उर्दु आणि जापानी भाषेच्या अभ्यासाकिरता लाहोर गाठले.

    वेंकय्या यांना ब-याच विषयांची ज्ञानप्राप्ती केलेली. त्यापैकी भुविज्ञान आणि कृषीक्षेत्राशी जास्त लगाव होता. तसेच ते हि-यांच्या खदानीत विशेषज्ञ देखील होते. वेंकय्या यांनी ब्रिटीश भारतीय सेनेमध्ये पण नोकरी केली होती आणि एंग्लो-बोअर युद्धामध्ये पण ते सहभागी झाले होते. त्याच काळात ते गांधीजींच्या संपर्कात आले आणि त्यांच्या विचारांनी प्रभावित झाले.

    १९०६ ते १९११ पर्यंत वेंकय्या कापसाच्या वेगवेगळ्या प्रकारंच्या अभ्यासात मग्न झाले. आणि त्यांनी बॉम्वोलार्ट कंबाडीया प्रकारच्या कापसावर एक अध्ययन देखील प्रकाशीत केलं. आणि त्यावरुन वेंकय्या हे कपास वेंकय्या म्हणुन प्रसिद्ध झाले. काकीनाडा मध्ये आयोजीत केलेल्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस आयोजीत अधिवेशना दरम्यान भारताचा स्वतःचा राष्ट्रध्वजाची आवश्यकता यावर भर दिला आणि त्यांचे हे विचार गांधीजीना पटला. मग गांधीजीनींच त्या राष्ट्रध्वजाची रचना करण्यास सुचवले. त्यांनंतर १९१६ ते १९२१ पर्यंत वेंकय्या यांनी तब्बल पाच वर्षे विविध ३० देशांच्या राष्ट्रध्वजाचा अभ्यास केला आणि नंतर तिरंग्याचा विचार केला.

    १९२१ साली विजवाडा येथे आयोजीत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस च्या अधिवेशनात महात्मा गांधीना त्यानी बनवलेल्या हिरव्या आणि लाल रंगाचा ध्वज दाखवला व त्यापुढे प्रत्येक अधिवेशनात हा द्विरंगाचा ध्वज वापरला जात होता. पण त्यावेळी अधिकारीकरित्या कॉंग्रेसकडुन या झेंड्याला मान्यता मिळाली नाही.

    यादरम्यान जालंधरच्या हंसराज यांनी झेंड्यामध्ये चक्रीय चिन्हाचा समावेश करण्याचा सुझाव दिला. या चक्राला सामान्य माणुस व प्रगतीच्या रुपात पाहिलं जात होतं.

    नंतर गांधीजीच्या सुचवलेल्या विचारानुसार शांतीचे प्रतिक मानलं जाणा-या पांढ-या रंगाचा समावेश देखील त्यामध्ये करण्यात आला. पुढे १९३१ मध्ये केशरी, हिरवा आणि पांढ-या रंगाच्या तिरंगा ध्वजास कॉंग्रेसने कराचीमध्ये आयोजीत अखिल भारतीय सम्मेलनामध्ये सर्वसम्मतीने स्विकारीत केल. नंतर ध्वजामध्ये असलेल्या चरख्याची जागा अशोकचक्रानी घेतली.

    पिंगाली वेंकय्या यांचे ४ जुलै १९६३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट/ संजय पेठे

  • पं.नारायणराव बोडस

    थेट विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या गायकीशी नाते सांगणाऱ्या बोडस घराण्यात नारायणरावांचा जन्म झाला. त्यांचे संगीताचे शिक्षण वडील लक्ष्मणराव तसेच प्रल्हादपंत गानू यांच्याकडे झाले. नोकरी आणि शास्त्रीय गायनाचा रियाज अशी कसरत करीत त्यांनी संगीत साधना केली. गायक नट म्हणून त्यांच्या कारकीदीर्ची सुरुवात 'सौभाग्यरमा' या डॉ. बी. एन. पुरंदरे लिखित नाटकापासून झाली. दाजी भाटवडेकर यांना या नाटकातील नारायणरावांचे व्यक्तिमत्त्व आवडले. संस्कृत भाषेत नाटके करणाऱ्या दाजींना आपल्या संस्कृत नाटकासाठी असाच बोलक्या चेहऱ्याचा, भारदस्त आवाजाचा व चांगला गायक असणारा नट हवा होता. त्यांनी लगेच 'सं. शारदम्' या नाटकासाठी त्यांची निवड केली. त्यानंतर दाजी भाटवडेकरांच्या अनेक नाटकात त्यांनी भूमिका केल्या.

    त्यानंतर त्यांनी सं. सौभद्रम्, पती गेले ग काठेवाडी, बुद्ध तिथे हरला, सं. मृच्छकटिक, सं. महाश्वेता, सं. मानापमान, सं. स्वयंवर, सं. सौभद, सं. संशयकल्लोळ, सं. धडिला राम तिने का वनी?, सुंदर मी होणार, मंदारमाला, सुवर्णतुला, बावनखणी, संत गोरा कुंभार, लहानपण देगा देवा, देव दीनाघरी धावला, तो एक राजहंस, सं. कृष्णार्जुनयुद्ध, अशा अनेक संगीत व बिगर संगीत नाटकात अविस्मरणीय व गाजलेल्या भूमिका केल्या. त्यांनी काही चित्रपट व टीव्ही मालिकांतूनही काम केले, पण त्यांना संगीत रंगभूमीच अधिक भावली. रंगभूमीवर वावरण्याचे व्यसन काही औरच असते व ते भलेभले सोडू शकत नाहीत.

    पण नारायणरावांनी वयाची साठी पूर्ण झाल्यावर रंगभूमीची कायमची रजा घेण्याचा निर्णय घेतला आणि १९९३ मध्ये गोव्यात संगीत सौभद्र मध्ये अखेरची भूमिका करून रंगभूमीचा निरोप घेतला. त्यानंतर त्यांनी संगीत अध्यापनाचे काम सुरू केले. १२ वर्ष त्यांनी मुंबई विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना संगीत शिकवले. तेथून निवृत्त झाल्यावर २००६ सालापासून ते वाशी येथील गांधर्व महाविद्यालयात संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन करीत आहेत. त्यांच्या या प्रदीर्घ संगीतसेवेचा शासनाने बालगंधर्व पुरस्कार देऊन गौरव केला होता. २७ नोव्हेंबर २०१७ रोजी त्यांचे निधन झाले.

    पं.नारायणराव बोडस यांचे चिरंजीव केदार बोडस त्यांचा वारसा पुढे नेत आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • चरीत्र अभिनेते इफ्तिखार

    सय्यादिना इफ्तिखार अहमद शरीफ उर्फ इफ्तिखार यांचा जन्म जालंदरचा. त्यांचा जन्म २२ फेब्रुवारी १९२० रोजी झाला.मॅट्रिकची परीक्षा पूर्ण केल्यानंतर इफ्तिखार यांनी कला लखनौ कॉलेज पासून चित्रकला डिप्लोमा कोर्स केला. इफ्तिखार यांना गाण्याची आवड होती आणि प्रसिद्ध गायक कुंदनला सेहगल यांच्या गायनावर ते प्रभावित होते. १९४४ साली तकरार" या चित्रपटाने त्यांनी बॉलीवुड मध्ये पदार्पण केले.
    चित्रपट समीक्षक श्री.इसाक मुजावर यांनी एका ठिकाणी लिहीले आहे.
    गायिका तथा अभिनेत्री सुरैय्या यांनी आपल्या बरोबर लग्न करावे म्हणून इफ्तिखार हे सुरैय्या यांच्या कृष्णकुंज समोर उपोषणाला बसले होते आणि त्यांना साथ देण्यासाठी दिलीप कुमार देखील सोबत होते .
    इफ्तिखार हे १९४० ते ५० च्या काळात बॉलिवूडचे अतिशय बिझी अभिनेता होते. जसे कडक पोलीस अधिकारी या भूमिकांसाठी ते प्रसिध्द होते. तसेच नंतर च्या काळात वडील, काका, मोठा काका, आजोबा, पोलीस आयुक्त न्यायाधीश आणि डॉक्टर या भुमीकेत ते दिसून आले. बंदिनी, खेल खेल में, एजंट विनोद या चित्रपटात त्यांनी नकारात्मक भूमिका केल्या होत्या.
    इफ्तिखार यांचे निधन ४ मार्च १९९५ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.

  • मराठी अभिनेते व नाट्यदिग्दर्शक मास्टर दत्ताराम

    मास्टर दत्ताराम म्हणजेच दत्ताराम वळवईकर. साहित्यसंघाच्या’कौन्तेय’, ’दुसरा पेशवा’, ’भाऊबंदकी’ , ’वैजयंती’ , ’राजकुमार’ यांसारख्या नाटकांत नटवर्य नानासाहेब फाटक, दुर्गा खोटे, मामा पेंडसे यांसारख्या बुजुर्ग अभिनेत्यांबरोबर तोडीस तोड भूमिका करून दत्तारामांनी ‘नटवर्य’ हे बिरुद मिळवले. पुढे ‘ललितकलादर्श’ च्या’दुरितांचे तिमिर जावो’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘पडछाया’ या नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या.