(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

  • बॉलीवुड अभिनेता विनोद मेहरा

    आज ३० ऑक्टोबर.. आज बॉलीवुड अभिनेता विनोद मेहरा यांची पुण्यतिथी.

    त्यांचा जन्म १३ फेब्रुवारी १९४५ रोजी झाला. साधारण चेहऱ्याचे अभिनेते विनोद मेहरा यांची पडद्यावरील प्रतिमा एका सामान्य शेजाऱ्यासारखी होती आणि ते कधीच सुपरस्टार पद मिळवू शकले नाहीत. मात्र, १९७१ पासून ते १९९० पर्यंत १९ वर्षांमध्ये त्यांनी १०० चित्रपटांमध्ये अभिनय केला. तसेच बालकलाकाराच्या रूपातही त्यांनी 'नरसी भगत' आणि 'शारदा' मध्ये अभिनय केला आहे. किशोरवयात 'अंगुलीमाल' मध्येही काम केले आहे. विनोद मेहरा यांचा प्रथम चित्रपट १९७१ साली रीटा हा होता, सोबत होती तनुजा ते १९७१ मध्ये राजकुमार, हेमा मालिनी आणि राखी याचा बरोबर 'लाल पत्थर' मध्ये युवा नायकाच्या रूपात सादर झाले. विनोद मेहरा यांच्या फिल्म करियर ला मौसमी चटर्जी ने हात दिला, शक्ती सामंत यांची फिल्म अनुराग (१९७२) मध्ये मौसमी-विनोद प्रथम एकत्र आले. मौसमी चटर्जी यांनी एक दृष्टिहीन युवती चा रोल अतिशय उत्तम केला होता. विनोद मेहरा यांनी एक आदर्शवादी नायकाची भूमिका केली होती. नायकाला आपल्या पित्याच्या इच्छे विरुद्ध मौसमी बरोबर लग्न करावयाचे असते.

    या नंतर त्यांनी उस पार (बसु चटर्जी), दो झूठ (जीतू ठाकुर), स्वर्ग नरक (दसारी नारायण राव) या चित्रपटात मौसमी बरोबर नायक म्हणून काम केले. तो काळ मल्टीस्टार फिल्म चा होता. विनोद खन्ना, राजेश खन्ना, संजीव कुमार, धर्मेन्द्र, जीतेन्द्र, अमिताभ असताना विनोद मेहरा यांना जादा सिनेमे मिळाले नाहीत. त्यांनी दक्षिण भारतीय फिल्म डायरेक्टर्स कृष्णन्‌ पंजू (शानदार), आर.कृष्णमूर्ति (अमरदीप), एस. रामानाथन्‌ (दो फूल तथा सबसे बड़ा रुपैया) तथा दसारी नारायण राव (स्वर्ग नरक) बरोबर काम केले.
    विनोद मेहरा व रेखा याची जवळीक व रोमांस याची चर्चा बॉलीवुड खूप दिवस चालू होती. त्यांनी लग्न केल्याची चर्चा होती. खर खोटे काय ते विनोद व रेखा यांनाच माहीत.... तसे यांनी विनोद मेहरा तीन लग्ने केली होती. मीना ब्रोका पहली पत्नी, बिंदिया गोस्वामी दुसरी, तिसरी किरण...

    ३० आक्टोबर १९९० रोजी विनोद मेहरा यांचे निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    मा.विनोद मेहरा यांचे काही चित्रपट
    लाल पत्थर (१९७२), अनुराग (१९७२), सबसे बड़ा रुपैया (१९७६), नागिन (१९७६), अनुरोध (१९७७), साजन बिना सुहागन (१९७८), घर (१९७८), दादा (१९७९), कर्तव्य (१९७९), अमर दीप (१९७९), जानी दुश्र्मन (१९७९), बिन फेरे हम तेरे (१९७९), द बर्निंग ट्रेन (१९८०), टक्कर (१९८०), ज्योति बने ज्वाला (१९८०), प्यारा दुश्र्मन (१९८०), ज्वालामुखी (१९८०), साजन की सहेली (१९८१), बेमिसाल (१९८२), स्वीकार किया मैंने (१९८३) लॉकेट (१९८६) प्यार की जीत (१९८७)

  • कोंजीवरम नटराजन अण्णादुराई

    द्रमुकचे संस्थापक, तमिळनाडूचे राजकारणी व मुख्यमंत्री सी.एन. अण्णादुराई तथा कोंजीवरम नटराजन अण्णादुराई यांचा जन्म १५ सप्टेंबर १९०९ रोजी झाला. तमिळ भाषेतील एक निष्णात लेखक असलेले अण्णादुराई आपल्या भाषणशैलीसाठी देखील प्रसिद्ध होते. पेशाने प्रथम शाळा शिक्षक व नंतर पत्रकार असलेल्या अण्णादुराईंचा पेरियार ह्या द्रविडी चळवळकर्त्या नेत्यास पूर्ण पाठिंबा होता. अण्णादुराईंनी १९३७ साली पेरियारच्या द्रविडर कळघम ह्या पक्षामध्ये प्रवेश केला. पक्षामध्ये झपाट्याने प्रगती करताना अण्णादुराई व पेरियार ह्यांमधील मतभेद वाढीस लागले. १९४७ साली भारताला मिळालेले स्वातंत्र्य पेरियारच्या मते द्रविड लोकांसाठी वाईट बातमी होती परंतु अण्णादुराई ह्यांनी स्वातंत्र्याचे स्वागत केले.

    अखेर १९४९ साली अण्णादुराईंनी आपल्या द्रविड मुन्नेत्र कळघम ह्य नव्या पक्षाची स्थापना केली. प्रामुख्याने ब्राह्मणविरोधी धोरणे व हिंदी भाषेचा तिटकारा असलेल्या अण्णादुराईंनी १९५३ साली स्वतंत्र तमिळनाडूची मागणी करण्याचे ठरवले होते परंतु १९५६ सालच्या राजकीय पुनर्रचनेदरम्यान मद्रास राज्यामध्ये केवळ तमिळ भाषिक जिल्हेच राहिले व स्वतंत्र तमिळनाडू देशाची मागणी मागे पडली. वाढत्या लोकप्रियतेमुळे १९६७ सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये द्रमुक पक्षाच्या आघाडीने २३७ पैकी १७९ जागांवर विजय मिळवून दणदणीत बहुमत मिळवले व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची येथील सत्ता संपुष्टात आणली.

    सी.एन. अण्णादुराई यांचे ३ फेब्रुवारी १९६९ रोजी निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेला जमलेल्या सुमारे १.५ कोटी लोकांच्या गर्दीची नोंद गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌समध्ये करण्यात आली होती. चेन्नईमधील मरीना बीच येथे त्यांचे स्मारक असून शहरामधील अण्णा सलाई हा सर्वात वर्दळीच्या रस्त्याला, अण्णा नगर ह्या भागाला, अण्णा विद्यापीठ ह्यांना त्यांचेच नाव देण्यात आले आहे. अण्णादुराईंच्या मृत्यूनंतर द्रमुकमध्ये फूट पडून एम.जी. रामचंद्रनने स्थापन केलेल्या अण्णा द्रमुक पक्षाला देखील त्यांचेच नाव दिले गेले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • मराठी दिग्दर्शक दत्ता माने

    दत्ता माने यांनी अभिनेता व मराठी दिग्दर्शक म्हणून काम केले. त्यांचा जन्म १९२२ रोजी झाला. त्यांनी आपल्या काळात १८ चित्रपट बनवले. काही नावे बाईसाहेब, मामा भाचे, कार्तिकी, कसे काय पाटील बरे आहे का?, पाटलाची सून.

    दत्ता माने यांचे २९ ऑक्टोबर १९८० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते सोहराब मेहेरबानजी मोदी

    सोहराब मोदी यांनी चित्रपटांतही अभिनय केला आहे. दिग्दर्शन आणि निर्मितीमध्येही त्यांनी प्रयत्न केले होते. त्यांचा जन्म २ नोव्हेंबर १८९७ रोजी झाला. आपल्या ’मिनर्व्हा मुव्हीटोन’तर्फे त्यांनी चाळीसहून अधिक चित्रपट निर्माण केले. १९३५ मध्ये आलेला त्यांचा खून का खून हा चित्रपट शेक्सुपिअरच्या हॅमलेटवर आधारित होता. सोहराब मोदी यांनी १९५६ मध्ये 'झाँसी की रानी' नावाचा भव्य हिंदी चित्रपट काढला होता. त्यात झाशीच्या राणीचे काम मोदी यांची पत्नी मेहताब हिने केले होते. हा भारतात बनलेला पहिला रंगीत चित्रपट होता.त्याचबरोबर पृथ्वीे वल्लेभ, , मिर्झा गालिब, जेलर या चित्रपटांतही त्यांनी काम केले होते. त्यांच्या चित्रपटांमध्ये नेहमीच सामाजिक आणि राष्ट्रीय विषयाचा समावेश असायचा. भारत सरकारतर्फे १९७९ साली मा.सोहराब मोदी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. सोहराब मोदी यांचे निधन २८ जानेवारी १९८४ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • कोथरुडचे शिल्पकार मा. शशिकांत सुतार

    भाऊ अशी ओळख असलेले मा.शशिकांत सुतार हे त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे शिवसेनेचे उपनेते म्हणून कायम चर्चेत राहिले आहेत. साधेपणा हे तर भाऊंचे आभूषण, पांढऱ्या पायजमा कुर्त्यात वावरणाऱ्या भाऊ हे आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जुने सहकारी होत.

  • कृषी कर्मयोगी दादासाहेब बोडके

    सोलापुर जिल्ह्यातील अनगर गावातील दादासाहेब बोडके हे एक कर्तबगार शेतकरी आहेत. अल्पशिक्षित असले तरी शेतीच्या विद्यापीठात पीएच.डी शोभतील असे दादांचे कर्तृत्व आहे. त्यांनी आपल्या शेतीत असंख्य प्रयोग केले. अनेक पिकांची लागवड केली. शेडनेट, पॉलीहाऊस आदी तंत्रे आत्मसात केली.

  • सुप्रसिद्ध अभिनेते सतीश दुभाषी

    विश्राम बेडेकरांच्या ‘ वाजे पाऊल आपले ‘ मध्ये त्यात त्यांनी डॉक्टर ऐनापुरे यांची भूमिका त्यांनी केली . ते त्यांचे पहिले व्यावसायीक नाटक. त्या वेळी त्यांना ४० रुपये नाईट मिळाली.

  • आय पी एस अशोक कामटे

    अशोक कामटे यांचे नाव ऐकताच भल्याभल्या गुन्हेगारांना घाम फुटायचा. पैलवानांना ते फडात चित करायचे. कामटे हे पुण्यातल्या जांभळीचे. त्यांचे शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेजमध्ये झाले. पुढे पाच वर्षांसाठी ते कोडाई कॅनाल आंतराष्ट्रीय प्रशालेत होते. त्यांना कॅम्प रायझिंग सनमधून आंतराष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली.

  • ज्येष्ठ अभिनेते अरविंद देशपांडे

    सुलभा देशपांडे व अरविंद देशपांडे या दोघांचं नाटय़वेड खरं तर कमालीचं टोकाचं होतं. त्यामुळे तर ओळख झाली. त्या काळात म्हणजे १९६०च्या दशकात.

  • चित्रपट कथा – पटकथाकार आणि संवाद लेखक यशवंत रांजणकर

    चित्रपट विषयक साप्ताहिक चित्ररंग चे रांजणकर हे काही काळ कार्यकारी संपादक होते. त्यांची पन्नास हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. बैरागपाडा हे पुस्तक तसेच लॉरेन्स ऑफ अरेबिया, आल्फ्रेड हिचकॉक, वॉल्ट डिस्नी – द अल्टिमेट फँटसी यांची त्यांनी लिहिलेली चरित्र वाचकप्रिय ठरली. रांजणकरांची शैली वाचक-स्नेही होती. लॉरेन्स ऑफ अरेबिया या पुस्तकाने मराठी वाचकविश्वाला सर्वस्वी अपरिचित असलेल्या टी. ई. लॉरेन्सचं हे चरित्र त्यामुळे अथपासून इतिपर्यंत वाचनीय झाली.