बापू पटवर्धन यांनी गेले ९-१० वर्षे ब्लड कॅन्सरने आजारी होते. त्यांनी १५-२० केमो घेतल्या होत्या. त्यांनी कॅन्सरलाही मात दिली होती, असे त्यांचे शिष्यगण सांगतात. ३० किमो झाल्यानंतर त्यांनी कोलकात्याला जाऊन कार्यक्रम सादर केला.
त्यांचा पहिला कथासंग्रह त्यांच्या वयाच्या २० व्या वर्षी प्रकाशित झाला. तेव्हा त्यांचे शिक्षण चालू होते. त्याच्या आत्मचरित्रात्मक ‘ द अनफिनिशड आटोबायोग्राफी ‘ या कादंबरीत अनेक घटना त्यांनी प्रमाणिकपणे सांगितल्या आहेत.
लालन सारंग यांचा जन्म २६ डिसेंबर १९४१ रोजी झाला. ‘सखाराम बाइंडर’, ‘रथचक्र’ आणि ‘कमला’ लालन सारंग यांच्या आयुष्यातील ही तीन महत्वाची नाटकं. त्यातील त्यांच्या भूमिका कलावंत म्हणून त्यांचा कस पाहणाऱ्या तर होत्याच, पण त्याहीबरोबर जगण्याचं नवं भान देणाऱ्या होत्या. मा.लालन सारंग भारतीय रंगभूमीवरील बंडखोर अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख आहे. पण त्यांचं व्यक्तिमत्तव त्याहीपेक्षा बरच गहिरं आहे. बंडखोरपणा त्यांच्या आयुष्यातही आहेत. काळाच्या पुढे जाणार्याय असंख्य भूमिका त्यांनी केल्या आणि त्यातून निर्माण होणारी वादळं अंगावर घेतली. मा.लालन सारंग या तेंडुलकरांच्या नायिका म्हणून ओळखल्या जात. सखाराम बाईंडर, घरटे आमचे छान, बेबी, कमला अशा तेंडुलकारांच्या नाटकांनी लालन सारंग यांना बरच काही मिळवून दिलं. मा.लालन सारंग मूळच्या गोव्याच्या. पण त्यांचं जन्मापासूनचं आयुष्य मुंबईत गेलं. 'पहिल्या वर्षी ' बावळट मुलगी ' म्हणून कमलाकर सारंग यांनी जिला हिणवलं त्याच लालन सारंग यांना कमलाकर सारंग यांनी पुढच्या वर्षी स्वत:च्या नाटकात रोल दिला. हे कसं झालं ? कमलाकर सारंग त्यांच्या प्रेमात पडले होते का? या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, ' त्यावेळेस तो माझा फक्त मित्र होता. पहिल्या नाटकानंतर आमची ओळख झाली, मग वेगवेगळ्या नाटकात काम करत असताना आमची ओळख वाढत गेली. कालांतरानं आम्ही एकाच संस्थेचं काम करू लागलो आणि आमची मैत्री झाली. त्यावेळेस प्रेमात वगैरे पडण्याचा संबंधच नव्हता कारण तो त्यावेळेस दुसर्याआ मुलीच्या प्रेमात होता. माझ्यासमोर तिच्याबरोबर फिरतही होता. पहिल्यापासूनच कमलाकरचं व्यक्तिमत्त्व जरासं वेगळं होतं. एक तर जनरल कोकणी माणसाप्रमाणे तो कुजकट बोलायचा. पण साहित्य नाटक याचं त्याला प्रचंड नॉलेज होतं. एक प्रकारचं औदार्य त्याच्या व्यक्तिमत्त्वात होतं. त्यामुळे मला तो आवडायला लागला, पण त्याला तसं काही विचारायचं धाडस मी कधीच केलं नाही. पुढे त्याच्या चार्टर बँकेच्या नाटकात जेव्हा मी केलं तेव्हा आमचं संभाषण जास्त वाढत गेलं. मग त्यानं मला लग्नासाठी विचारलं आणि मी हो म्हटलं. ' कमलाकर सारंगांविषयी बोलताना त्या म्हणतात. ' नवरा वगैरेपेक्षा कमलाकर माझा चांगला मित्र होता. त्यानं उठसूठ माझी स्तुती केली नाही, पण तो एवढंच म्हणायचा की लालन जी भूमिका करते, त्याच्यासारखीच ती दिसते. त्याच्या आयुष्याला स्थैर्य कदाचित माझ्यामुळे मिळालं असेल, पण त्याच्याबरोबर माझी वाढ होत गेली. 'सखाराम बाईंडरच्या आधीही मा.लालन सारंग यांनी सहा व्यावसायिक नाटकं केली होती. पण मा.लालन सारंग यांच्या आयुष्यातला माइल स्टोन रोल म्हणजे सखाराम बाईंडरमधली ' चंपा. ' या भूमिकेनं त्यांना नवी ओळख मिळवून दिली. 'सखाराम बाईंडरमधले लालन सारंग यांचे सहकलाकार म्हणजे निळू फुले. निळू फुलेंविषयी बोलताना त्या म्हणतात, ' निळू फुले हे सहकलाकार म्हणून फार चांगले होते. ते कुठेही ओव्हरपॉवर करायला जात नाहीत ते खूप साधे होते. सहकलाकार म्हणून त्यांचा कोणताही त्रास झाला नाही. अर्थात आपल्या समोरच्या माणसाच्या बोलण्याची पद्धत किंवा अभिनयाची तर्हाी याचा समोरच्या माणसावर फरक पडतोच. आमची केमिस्ट्री एवढी छान जमली होती की कोणत्याही कॅरेक्टरनं दुसर्या ला ओव्हरपावर केलं नाही. 'सखाराम बाईंडर म्हणजे लालन सारंग यांच्या जीवनातलं एक वादळी पर्व. महाराष्ट्राच्या इतिहासात दुसर्यार कोणत्याही नाटकावरून इतके वाद झाले नाहीत. दुसर्या कोणत्याही नाटकासाठी इतकी मोठी लढाई झाली नाही. 'एवढं वादळ झाल्यावरही कमलाकर सारंग यांनी दिग्दर्शक म्हणून किंवा लालन सारंग यांनी अभिनेत्री म्हणून हे नाटक बंद पडू दिलं नाही. बाईंडर नाटकाच्या वादामुळे कमलाकर सारंग यांना नोकरी सोडावी लागली. त्यामुळे घरात पैशाची चणचण. 'सखाराम बाईंडरवरून झालेल्या वादाचा त्रास मा.लालन सारंग यांच्या सगळ्या कुटुंबियांना भोगावा लागला. गुजराती, मराठी आणि हिंदी या तिन्ही रंगभूमीवर काम केल्यावरही मराठी रंगभूमी ही लालन सारंग यांची सर्वात आवडती रंगभूमी आहे. नाटक हे लालनताईंचं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे. सध्याच्या नाट्यव्यवसायाविषयी लालनताई फारशा समाधानी नाहीत. चांगली नाटकं येतच नाहीत, असं मत त्यांचे आहे. समांतर आणि बालरंगभूमीला द्यायला हवं तितकं महत्त्व दिलं जात नाही, म्हणूनच त्याविषयी नाट्यसंमेलनाध्यक्ष असताना आवाज उठवला. मा.लालन सारंग या मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षाही होत्या. अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असणार्याल लालन सारंग या उत्तम गृहिणीही आहेत. त्या उत्तम स्वयंपाक करतात. पाककलांवर त्यांनी पुस्तकं लिहिली आहेत. मधल्या काळात त्यांनी बुटिकही काढलं. विविधांगी भूमिका केल्याचं समाधान जगण्याला नक्कीच बळ देतयं. पैशांपेक्षा आपल्यातल्या कलागुणांना वाव मिळून रसिकांच्या टाळ्यांचा कडकडाटच आम्हाला प्रोत्साहन देणारा ठरत होता. आता लालनजी दोन-तीन वर्षांपासून आराम करतात. मात्र, सध्या व्यवसायिकाच्या भूमिकेत आहे त्या आनंद घेतात, स्वयंपाक व विविध प्रकारचे पदार्थ बनविण्याची त्यांना आवड आहे. पुण्यात ‘मासेमारी’ हे हॉटेल उघडल आहे. त्या उत्तम वाचक आहेत आणि शिवाय त्यांचं लेखनही चालू आहे.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
कोल्हापूर येथून शिक्षण घेतल्यानंतर कुलदीप पवार मुंबईत दाखल झाले. तिथे प्रभाकर पणशीकर यांनी ‘इथे ओशाळला मृत्यू‘ ह्या नाटकात संभाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी दिली. त्यांची ही भूमिका खूप गाजली देखील.
नमस्ते लंडन, एक था टायगर, अजब प्रेम की गजब कहानी, जब तक है जान, धूम ३, 'एक था टायगर' असे एकाहून एक सरस व हिट चित्रपट देणारी व बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असणारी सुपरस्टार म्हणजे कतरिना कैफ. कतरिना लहान असतानाच तिच्या आई-वडीलांचा घटस्फोट झाला. तिची आई सामाजिक कार्यकर्ती असल्याने कैफ परिवाला दर दोन वर्षांनी आपला बाडबिस्तरा उचलून नवनव्या ठिकाणी, देशांत प्रवास करावा लागत असे. कतरिना लहानपणापासूनच मॉडेलिंगच्या क्षेत्रात आहे. तिचा जन्म १६ जुलै १९८३ रोजी झाला.२००३ साली कतरिना भारतात आली. तिचा पहिला चित्रपट 'बूम' दणकून आपटला, मात्र या अपयशाने खचून न जाता अथक मेहनत करत तिने बॉलिवूडमध्ये बस्तान बसवले. 'मैने प्यार क्यूं किया' या चित्रपटात ती प्रथमच सलमानसोबत मुख्य भूमिकेत झळकली. मात्र २००७ साली आलेल्या 'नमस्ते लंडन' हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर यशस्वी ठरला आणि कतरिनाने प्रथमच यशाची चव चाखली. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचेही खूप कौतुक झाले. या चित्रपटापासून तिची व अक्षय कुमारची जोडी हिट ठरली. ती दिवसातील १६-१६ तास काम करत असते. न थकता, न कंटाता काम करण्याच्या आपल्या सवयीमुळे आज आपल्याला हे यश, प्रसिद्धी मिळत असल्याचे कतरिनाचे म्हणणे आहे. शीला की जवानी, चिकिनी चमेली ही आयटम साँग खूप गाजली आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. विकीपीडीया
त्यांची मोठी बहीण सावनी शेंडे ह्या त्यांच्या आजी म्हणजेच किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका 'कुसुम शेंडे' यांच्याकडे रीतसर शिक्षण घेऊ लागल्या होत्या. त्यावेळेस शेजारी बसून बेला शेंडे बहिणीचे गाणे ऐकत असत; आई वडिलांबरोबर अनेक कार्यक्रमांना जात असत. त्यांच्या आवाजाची पट्टी वरची आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी पुरुष गायकाकडे शिकावे असे सुचवले गेले. ह्यानंतर बेला शेंडे यांनी आपल्या वडिलांकडे गायनाचे धडे घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या आजीमुळे त्यांच्या घरी माणिक वर्मा, डॉ. प्रभा अत्रे, शोभा गुर्टू अश्या गायिकांचे येणे-जाणे होते, त्यामुळे बेला शेंडे यांचे गाणे समृद्ध व्हायला खूप मदत झाली. बेला शेंडे यांनी वयाच्या ११-१२ व्या वर्षी स्टेजवर गाणे म्हणायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी झी 'सा रे ग म' ची लहान मुलांची स्पर्धा जिंकली. तेव्हा त्या १४-१५ वर्षाच्या होत्या. दहावीत असतांना ही 'सा रे ग म'ची ही स्पर्धा होती. त्या स्पर्धेत भाग घेण्याबद्दल त्या जरा साशंक होत्या, पण घरच्या आणि शाळेतल्या सार्यांचा पाठिंबा होता. अभ्यास आणि गाणे हे दोन्ही सांभाळायचे होते, आणि हे त्यांनी सांभाळले आणि त्या ती स्पर्धा जिंकल्या. मोठ्यांच्या झी 'सा रे ग म' मेगा फायनलमध्ये भाग घेण्याची संधी त्यांना लवकरच मिळाली. ही स्पर्धादेखील त्या जिंकल्या. त्या वेळेस पंडित जसराज,अनिल बिस्वास, हरिप्रसाद चौरसिया अशा अनेक महान मंडळींकडून त्यांना मार्गदर्शन आणि प्रशंसा मिळाली. तेव्हापासून बेला शेंडे यांच्या गाण्याच्या प्रवासाला खर्या अर्थाने सुरुवात झाली. त्या ह्या स्पर्धेनंतर त्यांना अनेक अल्बममध्ये, हिंदी- मराठी चित्रपट, शीर्षक गीते गायला मिळाली. पार्श्वगायनाची पहिली संधी त्यांना महेश मांजरेकर यांनी दिली.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.विकीपिडीया.
आज ८ ऑक्टोबर. देवरुख येथील 'मातृमंदिरच्या मावशी ऊर्फ मा.इंदिराबाई हळबे यांची पुण्यतिथी.
इंदिराबाई हळबे या समाजसेविका होत्या. इंदिराबाई रघुनाथ तथा मावशी हळबे मूळच्या रत्नागिरीतील केळय़े-मजगावच्या, पूर्वाश्रमीच्या चंपावती वासुदेव खेर-कुलकर्णी. प्रचंड गरीबीमुळे अवघ्या ४ इयत्तेपर्यंतचेच शिक्षण झालेल्या मावशींचे वयाच्या १३ वर्षीच लग्न झाले. लग्नानंतरचा काही काळ सुखात जात असतानाच त्यांना दुदैवाने वेढले. लग्नानंतर अवघ्या १० वर्षात त्यांना वैधव्य आले, त्यातून सावरत असतानाच त्यांना अपत्य वियोगाचे दुखही पेलावे लागले. मात्र या धक्क्यातून खचून न जाता आपली मुलगी मीनाचे डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगत त्यांनी नर्सिंग शिकण्याचा निर्णय घेतला. आपल्या एकाकी आयुष्य त्यांनी समाजसेवेसाठी वाहून घेतले. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात इंदिराबाई हळबे यांनी देवरूखसारख्या ग्रामीण भागात राहून रूग्णसेविकेसारखा खडतर कोर्स पूर्ण केला.
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरुख गावी १९५४ साली त्यांनी 'मातृमंदिर' ही संस्था स्थापली. समाजसेवेसाठी आणि गोरगरिबांना आरोग्य सेवा पुरविता याव्यात यासाठी दोन खाटांच्या प्रसूतिगृहाने मातृमंदिरची सुरवात केली. मावशींच्या धडाडीने प्रभावित होऊन देवरुखच्या लक्ष्मणराव राजवाडेंनी आपली २४ एकर जागा मावशींना सामाजिक कार्यासाठी मोफत दिली. या जागेतच मातृमंदिररुपी रोपटयाचा महाकाय वृक्ष आज विस्तारला आहे. ग्रामीण दुर्गम भागात कार्यरत असताना अनाथ मुलांची होणारी परवड नजरेत आल्यावर त्यांनी गोकुळ या अनाथालयाची स्थापना केली. मुलांवर चांगले संस्कार रुजविण्यासाठी वाचनालयासह होतकरुंना चांगले शिक्षण घेता येण्यासाठी विद्यार्थी वसतीगृहाची स्थापना केली. शिक्षणाचे महत्व तळागाळात पोहोचवण्यासाठी बालवाडय़ांची निर्मिती झाली. ग्रामीण भागातील वीज-रहदारीचे प्रश्न विचारात घेऊन ग्रामविकास हा व्यापक दृष्टीकोन विचारात घेऊन त्यांनी शेती, मृदसंधारण, वनीकरण व पाणलोटक्षेत्र विकासाचे कार्य उभारले. तालुक्यातील महिलांच्या व शेतकऱयांच्या आजच्या प्रगतीचे सार या प्रयत्नांमध्ये सामावले आहे. तालुक्यात आधुनिक तंत्रज्ञानाने होणारी शेती, शेतकऱयांचे उंचावलेले जीवनमान, आरोग्य-पाणी-स्वच्छतेविषयी झालेली जाणीवजागृती, महिलांमध्ये नेतृत्वासाठी निर्माण झालेला आत्मविश्वास यासर्वासाठी मातृमंदिरचे योगदान निश्चितच मोठे राहिले आहे.
बचत-पाणी-शेती-वनीकरणाचे ६० वर्षांत हजारो प्रयोग संस्थेने यशस्वी केले आहेत. विविध परदेशी संस्थांशी तांत्रिक सहकार्य करत येथील शेतकऱयाला अधिकाधिक ज्ञानाने समृध्द बनवून त्यांचे जीवनमान उंचावले आहे. श्रमप्रतिष्ठेचे मर्म समजावून देत नैसर्गिक जाद्धूद्बूरह्नर्द्ब व छोटय़ा नळपाणी पुरवठा योजना आखून तालुक्यातील मोठा पाणी प्रश्न संस्थेने हलका करुन आपला लोकचळवळीचा विशेष पर्टनच तयार केला आहे. त्यामुळेच संस्थेचा उल्लेख आज ग्रामविकासाचे विद्यापीठ या आदराने होताना दिसतो. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र, उद्यानपंडीत या मानांच्या पुरस्कारांसह महाराष्ट्र राज्य सिंचन परिषदेचा विशेष सन्मानही संस्थेने मिळवला आहे.
गेल्या ५६ वर्षांत देवरूख येथील मातृमंदिर संस्थेचा विस्तार विविध क्षेत्रात झाला. रुग्णालयाच्या बरोबरीने शेती, बचत गट, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अनाथालय, पाणीपुरवठा, ग्रामीण विकास आणि शेती विद्यालय अशा क्षेत्रांत संस्थेने आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे. मा.इंदिराबाई हळबे ८ ऑक्टोबर १९९८ यांचे निधन झाले.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
संपर्क :- 02354-241056
विजय नारकर, मातृमंदिर संस्था
स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले “सहकार” मंत्री म्हणून बाळासाहेब भारदे यांनी केलेले कार्य संपूर्ण देशाने गौरविले. ते त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष झाले. ते मुरब्बी राजकारणी तर होतेच त्याचबरोबर ते गांधीवादी विचारवंत, संत साहित्याचे अभ्यासक, सहकार क्षेत्रातील अग्रणी, पत्रकारही आणि कीर्तनकार होते.
सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यात झाला. लावणीच्या इतिहासात आजही ठळकपणे समोर येणाऱ्या नावात सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचे नाव अग्रस्थानी आहे. सत्यभामाबाई पंढरपूरकर यांनी लावणीसाठी वा गायकीसाठी लौकिक अर्थाने कोणतेही शिक्षण घेतले नव्हते. वयाच्या १० व्या वर्षीच त्यांच्यातल्या संगीत कलेची जाणीव झाली. त्यांनी बालवयातच एकट्याचे लावणी सादरीकरण केले. त्यानंतरच्या काळात गोदावरीबाई पुणेकर यांच्या नेतृत्वाखालील लावणी गटात त्या सामील झाल्या. म्हणजे गोदावरीबाई या एका अर्थाने त्यांच्या प्रथम शिक्षिका व सहकारी ठराव्यात. तेथे त्या नृत्य, गवळणी, गझल या गोष्टीशी वकुबाने परिचित झाल्या. गझल काय असते ती कशी म्हणावी आदी बारकावे त्यांना इथे कळाले.
लावणीच्या गायनात त्यांचे गुरु म्हणून नारायणराव उत्पात, ज्ञानोबा उत्पात, दादोबा वैरागकर, मच्छिंद्र उत्पात, विठोबा ऐतवाडकर आणि रामभाऊ उत्पात यांचा उल्लेख होतो. गोदावरीबाई पुणेकर यांच्या गटात चार वर्षे काम केल्यावर त्यांच्या मनाने उचल खाल्ली आणि त्या घरी परत गेल्या. घरी परतलेल्या सत्यभामाचा नवीन प्रतिभाशाली आणि नवे रूप बघून त्यांच्या कुटुंबियांची मने बदलली. त्यांचे शोषण करण्याचा प्रयत्न झाले. त्यांच्यावरती कामाची सक्ती होऊ लागली. त्यामुळे सत्यभामाबाई पुन्हा पुणेकर मंडळींमध्ये परतल्या. परतल्यानंतर पेशवे काळात अनेक शाहिरी लावण्या त्या शिकल्या. हा काळ अठराव्या शतकाच्या उत्तररार्धाचा होता. त्यानंतर त्यांनी जे संगीत आणि अदाकारीचे सादरीकरण सुरु केले ते पुन्हा मागे वळून पहिलेच नाही. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी लग्न केले आणि स्वतःची संगीत बारी काढली.
सुरुवातीच्या काळात स्वतःच्या घराच्या दिवाणखान्यातच त्या लावणी सादर करू लागल्या. त्यातही बैठकीच्या लावण्या जास्त असत. पण पुढे या बैठकीच्या लावण्यांचा त्यांच्यावर शिक्का बसला. अनेक सामाजिक बंधने, स्त्रीत्वाच्या मर्यादा आणि तत्कालीन नैतिकतेचे संदर्भ पाहता सत्यभामाबाईंनी ज्या नेटाने आणि जोमाने आपली लावणीची सेवा अबाधित अखंड ठेवली त्याला तोड नाही. त्यांचे आयुष्य एका जिद्दी स्त्रीच्या कलासक्तीचे तेजस्वी प्रतिक आहे. मधुचंद्राचा अनुभव घेणाऱ्या बालिका वधूच्या भावस्थितीचे दर्शन घडविणारी लावणी सत्यभामाबाई पंढरपूरकर सादर करीत तेंव्हा घाबरलेल्या बालिकावधूच्या दहा भावमुद्रांचे दर्शन त्या घडवीत. अंगाला कंप सुटणे, ओठ कोरडे पडणे, डोळ्यातून अश्रू येणे, गाल लाल होणे आदी मुद्रा सत्यभामाबाई करून दाखवीत.
पंढरपूरच्या मंदिरात लावणी सम्राट बाळकोबा उत्पात यांच्यासमोर ही लावणी सादर करताना दहावी अदा कोणती असा सवाल त्यांनी सत्यभामाबाई पंढरपूरकर यांना करताच त्यांनी जवळच्या खांबाला मिठी मारून डोळे गच्च बंद केले व ही 'दहावी अदा' असे करून दाखवले होते. पंढरपूरी बाजाचे गायन, अदाकारीची लावणी ज्ञानोबा उत्पात आणि सत्यभाबाईंनी लोकप्रिय केली होती. 'अबोल का होता धरिता सखया मजवरी`, 'झाले तुम्हावरी दंग सखया`, 'तुम्ही माझे सावकार` 'बांगडी पिचल बाई`, 'शहर बडोरे सांडून आले वर्स झाली बारा` 'पाहुनिया चंद्रवदन` अशा अनेक पारंपरिक लावण्यांचा खजिना सत्यभामाबाईंकडे होता. जवळपास पाच दशके सत्याभामाबाईंनी रंगमंचाची आणि लावणीची सेवा केली. त्यांना महाराष्ट्र सरकार आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह असंख्य पुरस्कार मिळाले. सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचे ९ सप्टेबर १९९४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
मॅक्लीन यांच्या २८ कादंबऱ्या आणि काही कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. स्वत:च्या कादंबऱ्यावर आधारित काही पटकथाही त्यांनी लिहिल्या आहेत. १९८३ साली ग्लासगो विद्यापीठाकडून त्यांना साहित्यासाठी डॉक्टरेट देण्यात आली.
Copyright © 2025 | Marathisrushti