वाणी जयराम या दक्षिणच्या एक प्रतिभाशाली गायिका आहेत. वाणी जयराम यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९४५ रोजी झाला. त्यांनी तमिळ, तेलुगू , कन्नड, मल्याळम हिंदी आणि मराठी , गाणी गायली आहेत आहेत. त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारने तीन वेळा सन्मानित केले गेले आहे. त्याचे पार्श्वगायना मध्ये खूप योगदान आहे. वयाच्या ८ व्या वर्षी त्यानी आकाशवाणी वर गायन केले. कर्नाटक और हिंदुस्तानी शैली त्या शिकल्या नाहीत तर त्यांनी विशेष अभ्यास केला. लग्नानंतर मुंबईत आल्यावर प्रथम ब्रेक मिळाला तो संगीतकार वसंत देसाई यांनी १९७१ मध्ये 'गुड्डी' चित्रपटासाठी ३ गाणी गाऊन घेतली तेव्हा.
वाणी जयराम यांनी गायलेल्या "बोल रे पपीहरा" या गाण्याने त्यांना एका रात्रीत प्रसिद्धी मिळाली. या गाण्याला त्यांना तानसेन सन्मान मिळाला. सन १९८० साली 'मीरा' या चित्रपटा साठी फ़िल्म-फ़ेयर पुरस्कार मिळाला. दाक्षिणात्य कलाकार असूनही गायिका वाणी जयराम यांचे मराठी नाटय़संगीत आणि भावगीतांमधील योगदान मोठे आहे.`संगीतकार वसंत देसाई यांना त्यांच्या आवाजातील व्याकुळता आणि पोत आवडला आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तिची सुरुवातीची वाटचाल इथे सुरू झाली. केवळ वसंत देसाई यांनी आपल्या आवाजावर आणि सांगितिक प्रतिभेवर घेतलेल्या परिश्रमांमुळे आपली कारकीर्द यशस्वी ठरली अशा शब्दांत वाणी जयराम याही कृतज्ञता व्यक्त करतात.
‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’ हे एकमेव नाटय़पद सोडले तर वाणी जयराम यांची बाकी सर्व गाणी ही भाव आणि चित्रपट गीते आहेत. ‘प्रेम पिसे भरले अंगी’ यातून ईश्वराविषयी वाटणारी उत्कटता संत नामदेवांनी आपल्या या अभंगातून साकारली आहे. ‘टाळ मृदुंग उत्तरेकडे, आम्ही गातो दक्षिणेकडे’ असे या गीतांत नामदेव म्हणून जातात. उत्तर ही भोगाची दिशा आहे तर पश्चिम ही मुक्ती देणारी दिशा आहे. आध्यात्मात रंगलेल्या या संताला साहजिकच भोगाऐवजी मुक्तीची आस लागली आहे. कोरसमध्ये या गीताची मोहिनी काही विलक्षणच आहे.
‘प्रियतम दर्शन देई, तुजविण करमत नाही ‘पाहिलं का कुणी पाहिलं का’, देवाचे घर कुणी पाहिलं का? ‘दूर जाते ही वाट रात्र अंधारी दाट, अरे कान्हा रे मला जाऊ दे घरी’ हे उच्च पट्टीत त्यांनी बांधलेले गीत वाणी जयराम पुन्हा झकास रंगवून गेल्या आहेत. ‘यशोदा’ या चित्रपटातील ‘माळते मी माळते, केसात पावसाची फुले मी माळते’ आणि ‘जिवलग माझा नाही आला’ (परिवर्तन) ही संगीतकार दत्ता डावजेकर यांची गाणी आहेत, तर संगीतकार राम कदम यांची ‘उठा उठा हो सूर्यनारायणा’ ‘माठ पाण्यात बुडाला’ आणि ‘थांब जोडीदारा’ ‘माठ पाण्यात बुडला’ हे ‘भोळी भाबडी’ चित्रपटातील गीत.‘भोळी मात्र त्यातले ‘टाळ बोले चिपळीला, नाच माझ्या संगे’ हे रामभाऊंचे गाणे अधिक लोकप्रिय झाले होते.
‘जसा पाऊस उन्हात न्हाला’ आणि ‘झाले बेजार गर्दी ही दाटली’ दोन गाणीही चांगली गाजली होती. मा.वाणी जयराम यांची ही सर्व गाणी आता ती सहसा ऐकायला मिळत नाहीत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट. https://www.youtube.com/watch?v=SPAjRbHvobs https://www.youtube.com/watch?v=NbchuCfqBls
अभिनेत्री पूर्णिमा यांचे खरे नाव ‘मेहर बानो’ होते. पूर्णिमा यांचे वडील हे मनमोहन देसाई यांचे वडील किकूभाई देसाई जे फ़िल्म डिस्ट्रीब्यूटर होते त्यांच्या ऑफिस मध्ये अकाऊंट्सचे काम बघत होते. पूर्णिमा यांची आई मुस्लिम होती. पूर्णिमा यांना चार बहिणी व एक भाऊ. पूर्णिमा यांची मोठी बहीण शिरीन यांनी १९३०च्या दशकात ‘बम्बई की सेठानी’, ‘पासिंग शो’, ‘ख़्वाब की दुनिया’, ‘स्टेट एक्स्प्रेस’ व ‘बिजली’ अशा चित्रपटात कामे केली होती.
मराठीत ‘उत्तरायण’, ‘एवढंसं आभाळ’, ‘नटरंग’, ‘बालक पालक’, ‘बाल गंधर्व’, ‘मुळशी पॅटर्न’ आदी चित्रपट महेश लिमये यांनी केले. सलमान खानच्या ‘दबंग’साठी ‘सिनेमॅटोग्राफर’ म्हणून महेश लिमये यांना खास बोलावून घेण्यात आले. हिंदीतील ‘बिग बजेट’ आणि ‘१५० कोटी’ क्लबमध्ये गेलेला एक मोठा चित्रपट त्यांच्या नावावर जमा झाला. पुढे त्यांनी ‘दबंग २’साठी ही काम केले. ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘कॉर्पोरेट’, ‘हीरोईन’, ‘दबंग’, ‘दबंग २’ हे त्यांचे हिंदीतील गाजलेले चित्रपट होत.
हरीशचंद्र सखाराम भटवडेकर यांना सावे दादा म्हणून ओळखले जायचे. त्यांचा जन्म १५ मार्च १८६८ रोजी झाला. दादासाहेब फाळके यांच्या पूर्वी हरीशचंद्र सखाराम भटवडेकर यांनी मुंबईत लघुपटांची निर्मिती करून भारतात चित्रपट सृष्टीला सुरवात केली होती. अजूनही सिनेमा सृष्टीत हरीशचंद्र सखाराम भाटवाडेकर यांचे नाव आदराने घेतले जाते. हरीशचंद्र सखाराम भाटवाडेकर हे खरे फोटोग्राफर. ल्यूमियर यांच्या भारतातील छायाचित्राच्या प्रदर्शनाने ते प्रभावित झाले, व त्यांनी लंडन हून कॅमेरा मागवला व लघुपटांची निर्मितीला सुरवात केली. १८९९ साली मुंबईच्या हैंगिग गार्डनवर पहेलवान पुंडलिक दादा व कृष्णा नावी यांच्या मध्ये कुस्तीचे आयोजन केले गेले होते, त्याचे रेकॉर्डिंग हरीशचंद्र सखाराम भाटवाडेकर केले होते. १९०१ मध्ये कैम्ब्रिज विश्वविद्यालयच्या परीक्षेत र.पु.पराजंपे यांनी गणितात सर्वाधिक अंक मिळवले होते, व त्यांना बॅरीस्टर ही पद्वी मिळाली होती,ते भारतात परतले तेव्हा मुंबई बंदरावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. त्याचे रेकॉर्डिंग पण हरीशचंद्र सखाराम भाटवाडेकर केले होते. नंतर त्यांनी वेगवेगळ्या विषयावर फिल्मांलकन केले होते. हरीशचंद्र सखाराम भटवडेकर यांचे निधन २० फेब्रुवारी १९५८ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
एमबीबीएसला त्यांना प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन आणि फॉरेन्सिक मेडिसिन या विषयांत डिस्टिंक्शन तर स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विषयात सुवर्णपदक मिळालं होतं. मेंदू, मज्जासंस्था आदींशी निगडित न्यूरॉलॉजी या विषयात एम.डी. करून १९६० ला ते भारतात परतले.
ज्येष्ठ पटकथाकार रघुनाथ दामोदर सबनीस, ऊर्फ वसंत सबनीस यांचा जन्म ६ डिसेंबर १९२३ रोजी झाला. वसंत सबनीस यांचे शालेय शिक्षण पंढरपुरात झाले तर, पुणे येथील फग्यूर्सन महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. पुण्यातल्या वास्तव्यात, पु. ल. देशपांडे, राम गबाले, शरद तळवलकर यांच्याशी झालेली घट्ट मैत्री त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाच्या घडणीतच महत्त्वाची ठरली. 'घरोघरी हीच बोंब', 'कार्टी श्रीदेवी', या नाटकांबरोबरच, 'विच्छा माझी पुरी करा' सारखे अप्रतिम नाटय, इथून सुरुवात होऊन, सोंगाडया, एकटा जीव सदाशिव, हे गाजलेले चित्रपट दादा कोंडके यांच्यासाठी त्यांनी दिले. व्यावसायिक रंगभूमी आणि चित्रपट यामधे एक प्रतिष्ठित विनोद रूजविण्याचा सबनीसांनी केलेला प्रयत्न बराचसा यशस्वी झाला. ते हसविण्यासाठी कधीच स्वस्त झाले नाहीत. त्यांच्या अनेक कथांना राज्य सरकारचे वाङ्मय पुरस्कार मिळाले आहेत.
नाटककार राम गणेश गडकरी पुरस्कार त्यांना मिळाला आहे. 'गेला माधव कुणीकडे' सारखे तब्बल १० वर्षे मराठी रंगभूमीवर हाऊस फुल्ल जाणारे, 'कलावैभव' संस्थेला यश देणारे नाटक, 'अशी ही बनवाबनवी', 'गंमत जंमत' सारखे चित्रपट त्यांची ही खासियत अधोरेखित करतात. 'घरोघरी हीच बोंब' ’निळावंत’, 'नाटक' नावाचेचे नाटक तसेच 'सौजन्याची ऐशी तैशी', 'विच्छा माझी पुरी करा', 'गेला माधव कुणीकडे', अशी एकापाठोपाठ एक यशस्वी नाटकांची मालिका श्री. सबनीस यांच्या श्रेयनामावलीमध्ये आहे.
'सबनिशी' हा त्यांचा विनोदी लेखसंग्रह, 'थापडया', 'पखाल', हे विनोदी कथासंग्रह, तर 'माझेश्वरी' हे ब-यावाईट अनुभवांचे संकलन प्रसिध्द झाले आहे. मराठी लोककलांच्या क्षेत्रात सबनीस लीलया वावरले. त्यांनी ’विच्छा माझी पुरी करा’ लिहीले तेव्हा तमाशा, वग आदि प्रकारांना पांढरपेषांच्या कलांत वा मनोरंजनात स्थान नव्हते. दादा कोंडके हे नावही 'विच्छा' मुळे घरा घरात पोहचले. राजा, परधानजी, कलावंतीण आणि शिपाई ही पात्रे शहरातही चमकू लागली. मुंबईतील रंगभवन आणि राणीच्या बागेतील रंगमंचावरून 'विच्छा'ने सरळ दादरच्या शिवाजी मंदिर, गिरगावच्या साहित्य संघ इ. नाटयगृहांमधे धडक मारली. कित्येकदा विच्छाच्या प्रयोगात वसंत सबनीस दादांबरोबर बतावणीला उभे राहिले होते. पु. लं. समवेत त्यांनी 'तुका म्हणे' मधेही काम केले होते. वग नाटय लेखनात सबनीसांची लेखणी विशेष खुलली. 'छपरी पलंगाचा वग', म्हणजेच 'विच्छा' हे नाटक, व त्याबरोबरच 'खणखणपूरचा राजा', 'एक नार चार बेजार', 'त्रिशूलाचा वग', 'तुम्ही माझं सावकार', 'आदपाव सुतार, पावशेर न्हावी, सव्वाशेर शिंपी' अशीही अनेक नाटके त्यांनी लिहीले.
४५ वर्षे सबनीसांच्या लेखणीने विनोद फुलविले.
अनुभवापलिकडचे विनोद करण्याची त्यांच्यात जबरदस्त ताकद होती. वसंतरावांना पैशापेक्षा लेखन अधिक प्रिय होते. भालजी पेंढारकरांनी वसंतरावांची दादांबरोबर जोडी जमविली, आणि 'सोंगाडया' रूपेरी पडदयावर आला. 'एकटा जीव सदाशीव' सुध्दा वसंतरावांनी दादांसाठी लिहीला. मात्र नंतर द्वयर्थी संवादांच्या आग्रहामुळे दादांसाठी त्यांनी लिहीणेही नाकारले. साध्या साध्या गोष्टींमधून, खास कारण नसतानाही विनोदनिर्मिती करण्याची त्यांची अनोखी अदा अनेकांना मोहवून जाते. सचिन बरोबर त्यांचे 'नवरी मिळे नव-याला', 'गंमत जंमत', 'एकापेक्षा एक', 'अशी ही बनवाबनवी', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी', असे एकाहून एक धम्माल विनोदी आणि सुपरहिट चित्रपट पडदयावर आले. वसंत सबनीस यांचे १५ ऑक्टोबर २००२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
अनेक शास्त्रज्ञांनी हॅन्रिच हर्ट्झच्या बिनतारी संदेशांच्या प्रयोगांमधून हवेतून जात असलेल्या अदृश्य लहरींचे अस्तित्व स्वत:ही तसेच प्रयोग करून तपासले होते. त्यामुळे अशा लहरी आपल्या डोळ्यांना दिसत नसल्या तरी त्या प्रत्यक्षात असतात या विषयी कुणाच्याच मनात शंका नसायच्या. तसेच मॅक्सवेलनेही इलेक्ट्रोमॅग्नेटीक लहरींच्या संदर्भात मांडलेली समीकरणेसुद्धा पडताळून पाहतात येतात, हेही अनेक जणांना पटले होते. पण या सगळ्याचा उपयोग प्रत्यक्षात कुठे आणि कसा करता येईल हे मात्र कुणालाच उमगत नव्हते.
पूर्वी एक जिंगल तयार व्हायला चार ते पाच तास लागत. माझ्या बाबतीत सांगायचं तर दोन तासांत दोन जिंगल्स तयार करून मी पुन्हा तिसऱ्या कामासाठी दुसऱ्या स्टुडिओत जायचो. एक काळ असा होता की, सकाळी रेडिओवाणीला (वरळी) ८ ते १० मध्ये दोन जिंगल्स, मग १० ते ६ वेस्टर्न आऊटडोअर (फाऊंटन), पुन्हा संध्याकाळी ६ ते १० दोन जिंगल्स (रेडिओवाणी किंवा रेडिओ जेम्स- वरळी) आणि रात्री १० ते २ बॉम्बे लॅब किंवा फिल्म सेंटरला फिल्मची जिंगल्स मी करत असे आणि पहाटे तीन वाजता घरी जात असे. आणि पुन्हा सकाळी साडेसहाला उठून आठ वाजता रेडिओवाणीला हजर! अशी तब्बल २५ वर्षे मी या क्षेत्रात काम केलेलं आहे. माझं स्वत:चं, त्याचबरोबर पी. वैद्यनाथन्, वनराज भाटिया, सुरेशकुमार यांचीही कामं त्यात असायची. एक वादक म्हणून मी भरपूर काम केलंय या मंडळींबरोबर! पूर्वी अशी पद्धत प्रचलित होती, की एकाच जिंगल्सच्या तीन- तीन चाली आम्हाला लावाव्या लागत. त्यातली मग क्लायंट आणि एजन्सीला कोणती आवडलीय, हे ते फोनवरून सांगत. त्यांच्या पसंतीस उतरलेली जिंगल मग दुसऱ्या दिवशी ध्वनिमुद्रित केली जाई.
स्ट्रँड सिनेमा (कुलाबा) येथे एक स्टुडिओ होता. आर. टी. व्ही. सी. नावाने तो प्रसिद्ध होता. कुसूम कपूर व रावसाहेब यांचा तो स्टुडिओ होता. रावसाहेबांचे टुरिस्ट हॉटेल कोल्हापुरात खूप प्रसिद्ध आहे. त्यांचे त्याकाळी जिंगल्ससोबत अध्र्या तासाचे जाहिरातींचे रेडिओ प्रोग्रॅमही व्हायचे. मराठीमध्ये ‘राघू-मैना’ व हिंदीत ‘तोता-मैना’! त्यात सर्व बडी माणसं ‘ड्रामा’ करायची. छोटी छोटी गाणीही त्यात असत. तबस्सुम, सुधा चोपडा, हरीश भिमानी, विनोद शर्मा, विजय बहेल अशी त्यावेळची मातब्बर निवेदक मंडळी त्यात असायची. आणि गाणं आलं की ती स्वत:च गायचीदेखील! गाण्यांना चालीही मी तिथल्या तिथे लावून त्यांना शिकवायचो आणि रेकॉर्ड करायचो. दिवसभरात असे दोन प्रोग्रॅम होत. म्हणजे जवळजवळ १५ ते १६ गाणी!
एकदा गंमतच झाली. मला दोन-अडीचपर्यंत ताप होता. मी कुसुमजींना फोन केला, की मला ताप आहे, मी नाही येऊ शकणार. उभं राहायचीही मला ताकद नव्हती. त्या म्हणाल्या, ‘आता कसं होणार? दोन्ही प्रोग्रॅम आज रात्रीच रेडिओला पाठवायचे आहेत. उद्या ब्रॉडकास्टिंग आहे. तू टॅक्सी कर आणि इथे ये.. प्लीज!’ मलाही त्यांची अडचण कळत होती. मी अंगात ताप असताना तसाच गेलो. त्यांनी माझ्या हातात स्क्रिप्ट दिलं. मी तो दिवस अक्षरश: झोपून पेटीवर कम्पोझिशन केलं आणि त्यांना शिकवलं. तापाने फणफणलेला असूनही मी दिवसभर काम केलं. सगळ्यांना माझं भारी कौतुक वाटलं. आणि विशेष सांगायचं म्हणजे त्या एपिसोडला ‘फ.अ.ढ.अ.’ चा सवरेत्कृष्ट संगीताचा पुरस्कारही मिळाला मला!
सिनेमातल्या पाच मिनिटांच्या एखाद्या गाण्याला चाल लावणं म्हटलं तर सोपं असतं. तुम्हाला आठ-दहा दिवस आधी हातात गाणं मिळतं. त्यावर विचार करायला भरपूर वेळ असतो. निर्माता, दिग्दर्शक व कवीबरोबर त्यावर चर्चा होते. विचारांची देवाणघेवाण होते. आणि मग गाणं ध्वनिमुद्रित होतं. या साऱ्यासाठी वेळच वेळ असतो. नाटकाचंही तसंच असतं. पण जिंगल म्हणजे तुमची खरी सत्त्वपरीक्षा असते. सर्व काही उत्स्फूर्तपणे तिथल्या तिथे करावं लागतं. तीच जिंगल जर दुसऱ्या भाषेत करायची असेल तर त्याच मास्टर ट्रॅकवर प्रत्येक भाषेतल्या स्क्रिप्ट रायटरबरोबर बसून नव्याने जिंगल तयार करावी लागते. त्याच मूळ ‘मीटर’मधला त्या- त्या भाषेतला चपखल शब्द अनुवादकाला त्याकरता शोधावा लागतो. त्यानंतर गायकाला त्याचं उच्चारण शिकवावं लागतं. अमूक एक शब्द उच्चारताना जीभ कुठे लावावी? टाळ्याला की दातांना? वगैरे बारीकसारिक गोष्टी त्याला शिकवाव्या लागतात. कविता कृष्णमूर्तीला दक्षिणी भाषा तसेच बंगाली, ओडिशा, आसामी, हिंदी, इंग्लिश उत्तम अवगत असल्यामुळे तिला याचा त्रास होत नाही. पण विनय मांडके, सुषमा श्रेष्ठ, प्रीती सागर, विनोद राठोड यांना अन्य भाषांतील जिंगल्ससाठी बरीच मेहनत घ्यावी लागते.
काही एजन्सीवाल्यांना काही नवीन प्रयोग करण्याच्या भरात वाटतं की, दहा-बारा सेकंदात एखादी जिंगल करायची तर त्यात कठीण ते काय? आपण अनू मलिक वा भप्पी लाहिरींकडून ती करून घेऊ. एकदा असे एक-दोघेजण गेले त्यांच्याकडे. पण ते म्हणाले, ‘आपको टय़ून सुनाते है. लेकिन वह डेढ- दो मिनिटसे कम नहीं होगी.’ आम्हाला मात्र आता जिंगल्स निर्मितीची इतकी सवय झाली आहे, की जणू रक्तातच भिनलं आहे ते! अर्थात हा सवयीचा परिणाम आहे. मला झटपट चाल लावण्याची सवय लागली ती जिंगल्समुळेच! हातात कागद पडला की दहाव्या मिनिटाला माझी चाल तयार असते. माझी एक खासियत आहे. पेटीवर हात ठेवून सूर छेडता छेडता ओठांवर कधी हसू यायचं तेच कळायचं नाही. विनय मांडकेने याचा अभ्यास केला होता. माझ्या तोंडावर हास्य दिसलं, की तो ओळखायचा, की अशोकला हवी ती चाल सुचली आहे!
अशोक पत्की
संकलन - संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
ज्येष्ठ अभिनेत्री आणि ‘मी…मिठाची बाहुली’ या आत्मचरित्राने साहित्यविश्वात महत्त्वाचे स्थान मिळवलेल्या लेखिका वंदना मिश्र म्हणजेच पूर्वाश्रमीच्या सुशीलाबाई लोटलीकर. मराठी, गुजराथी आणि मारवाडी रंगभूमीवरचे १९४० च्या सुमारास एक नावाजलेले व्यक्तिमत्व.
आत्ता पर्यत तब्बल ६५० चित्रपटांसाठी हजारोंच्या संख्येने गीतांचे लेखन करणारा आणि तरीही अंतरंगात कुठे तरी कातर, हळव्या मनाचा कवी अशीच गीतकार समीर अंजान पाण्डेय ऊर्फ शीतल पांडे'' उर्फ मा.समीर यांची ओळख. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९५८ रोजी झाला.ज्येष्ठ गीतकार मा.अंजान हे समीर यांचे वडील. इंडस्ट्रीचा बेभरवशीपणा अनुभवला असल्याने मा.अंजान यांनी मा.समीर यांच्या गीतकार होण्याला विरोध केला. पण समीर यांचा पिंड कवी मनाचाच असल्याने घरच्या विरोधाला जुमानता तो प्रकट होत राहिला. बँक अधिकारी म्हणून करिअरची सुरुवात केलेल्या मा.समीर यांनी बॉलिवूडमध्ये करिअर करायचे या उद्देशाने त्यांनी बँकेतील सुरक्षित नोकरी सोडली आणि सिनेक्षेत्रात गीतकार म्हणून पाऊल टाकले. सुरुवातीला त्यांनी ‘बेखबर’, ‘इन्साफ कौन करेगा’, ‘जबाब हम देंगे’, रखवाला’, ‘महासंग्राम’ आदी चित्रपटांसाठी गाणी लिहिली. मात्र या गाण्यांमुळे त्यांना यश व प्रसिद्धी मिळाली नाही. सातत्याने संघर्ष केल्यानंतर अखेर १९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी’ चित्रपटातील गाण्यांनी समीर यांना प्रसिद्धी मिळवून दिली. ‘सांसो की जरुरत है जैसे’, ‘मै दुनिया भूला दुंगा’, ‘नजर के सामने जिगर के पास’ ही गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. चित्रपट रसिक व श्रोत्यांवर आपल्या शब्दांनी गारूड करणाऱ्या समीर यांनी आपल्या कारकिर्दीत शंभरहून अधिक संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. अन्नू मलिक, आदेश श्रीवास्तव, इलया राजा, ए.आर. रहेमान, जतीन ललित, दिलीप सेन-समीर सेन, नदीम-श्रवण, राजेश रोशन, शंकर एहसान-लॉय आदी संगीतकारांबरोबर समीर यांची जोडी जमली. ‘आँखे’, ’आशिकी’, ’कभी खुशी कभी गम’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कुली नंबर वन’, ‘जुर्म’, ‘तेरे नाम’, ‘दबंग-२’, ‘दिल है की मानता नही’, ‘दिवाना’, ‘देवदास’, ‘धडकन’, ‘धूम’, ‘फिजा’, बेटा’, ‘बोल राधा बोल’, ‘राजाबाबू’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘रावडी राठोड’, ‘शोला और शबनम’, ‘सडक’, साजन’, ‘सावरियाँ’, ‘हम है राही प्यार के’, ‘हीरो नंबर वन’, अशा अनेक चित्रपटांसाठी मा.समीर यांनी लिहिलेली गाणी लोकप्रिय झाली आहेत. मा.समीर यांनी मराठी आणि भोजपुरी चित्रपटांसाठीही गाणी लिहिली आहेत. मा.समीर यांनी फेब्रुवारी २०१६ पर्यंत ६१७ चित्रपटांसाठी ३ हजार ४०० गाणी लिहिली आहेत. सर्वाधिक गाणी लिहिल्याबद्दल त्यांचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंदले गेले आहे. या आधीचे रेकॉर्ड गीतकार मा.आनंद बक्षी यांचे होते; त्यांनी ६२४ चित्रपटांसाठी ३ हजार २०० गाणी लिहिली होती. मा.समीर यांना आपल्या समूहाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
समीर यांची काही गाणी
आए हो मेरी जिंदगी में
आखों ने तुम्हारी
आपके प्यार मे हम
घुंगट की आड से
चाहा है तुझको
जो हाल दिल का
तुम्हे अपना बनाने की कसम खाई है
तेरी उम्मीद तेरा इंतजार
धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना
धूम मचा ले धूम
दिल ने दिल से क्या कहा
दिल है के मानता नही
देखो जरा देखो
Copyright © 2025 | Marathisrushti