किमान तीन दशके तरी आपल्या सौंदर्याबरोबरच, सशक्त अभिनयाने सुचित्रा सेन या बंगाली चित्रपटाच्या सुवर्णयुगातील एक महत्त्वाच्या साक्षीदार ठरल्या. कन्नन देवी यांच्यानंतर बंगालमधील एकाही अभिनेत्रीला सुचित्रा सेन यांच्याइतके चाहते मिळाले नाहीत. त्यांची लोकप्रियता इतकी होती, की दुर्गापूजेच्या वेळी दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती यांच्या प्रतिमा सुचित्रा सेन यांच्या चेहऱ्यावर बेतल्या जात असत.
January 18, 2018
ओमप्रकाश यांचे पूर्ण नाव 'ओम प्रकाश बक्शी' होते. शिक्ष लाहोर मध्ये झाला. त्यांचा जन्म १९ डिसेंबर १९१९ रोजी झाला. त्यांना लहानपणापासून संगीताची आवड होती. १९३७ मध्ये ओमप्रकाश 'ऑल इंडिया रेडियो सिलोन' मध्ये 25 रुपये वेतनावर नोकरी करत होते. रेडियो सिलोन वर त्यांचा 'फतेहदीन' हा कार्यक्रम लोकप्रिय होता.
ओम प्रकाश आपल्या कारकिर्दीत ३५० चित्रपटात कामे केले आहे. त्यांच्या प्रमुख चित्रपटात 'पड़ोसन', 'जूली', 'दस लाख', 'चुपके-चुपके', 'बैराग', 'शराबी', 'नमक हलाल', 'प्यार किए जा', 'खानदान', 'चौकीदार', 'लावारिस', 'आंधी', 'लोफर', 'ज़ंजीर' यांचा समावेश आहे 'कोणीही' वादळ ',' भटक्या ',' जंजीर ', त्यांचा 'नौकर बीवी का' थी हा चित्रपट होता. अमिताभ बच्चन यांच्या बरोबर त्यांचे खूप छान ट्युनिंग होते. 'नमक हलाल' मधील दद्दू व 'शराबीतील' मुंशीलाल या व्यक्तिरेखानी ओमप्रकाश यांनी कमालकेली होती. देव आनंद यांना कोणतीही चित्रतारका 'भैय्या' असे म्हणत नाहीत, पण आपणाला मात्र त्या अगदी तरूण वयात असल्यापासून 'भैय्या' म्हणतात अशी तक्रार चरित्र अभिनेता ओमप्रकाश अनेकदा करीत असत.
ओमप्रकाश यांचे निधन २१ फेब्रुवारी १९९८ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 21, 2018
गुजरातच्या जुनागढमधील एका मध्यम वर्गीय मुस्लिम कुटूंबात परवीन जन्माला आली होती. त्यांचा जन्म ४ एप्रिल, १९४९ रोजी झाला. तिच्या आईवडिलांची ती एकुलती एक मुलगी होती. परवीन यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण अहमदाबादेत झाले. इंग्लिश साहित्यात तिने मास्टर्स पदवी प्रथम श्रेणीतून मिळवली होती. तिचे इंग्लिश अगदी अस्खलित होते, परवीन वली मोहम्मद खान बाबी उर्फ परवीन बाबी यांनी आपल्या करिअरची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली होती. तिच्या आरसपानी सौंदर्याने तिला बॉलीवूडने खुणावले. ती आली, तिने पाहिले अन तिने जिंकले अशी तिची अवस्था झाली. तिचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले अन अनेक फ्लॉपही झाले. पण ती ग्लॅमरची आयडॉल बनून राहिली. ८० च्या दशकात झीनत अमानच्या बरोबरीने परवीन बाबीसुध्दा बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून नावारुपास आली होती. या दोघींमध्ये काही फरक होते. झीनतचे विचार पूर्णत: व्यवसायिक होते. तिने आपल्या प्रत्येक यशाला आणि अपयाशाला समजून-उमजून संभाळले. परंतु परवीनने असे कधीच केले नाही. कदाचित छोट्या शहरातून आलेली परवीन ग्लॅमरस आणि श्रीमंत आयुष्य संभाळू शकली नाही. तिच्या वाट्याला आलेले बेसुमार ग्लॅमरस आयुष्य आणि यश हेच तिचे शत्रू बनले. त्यामुळे बॉलिवूडध्ये तिला प्रत्येकजण आपला शत्रुच्या रुपात दिसत होता. तिच्या या वागण्यानेच सर्वांनी तिच्या व्यवसायिक आणि खासगी आयुष्याचा फायदा घेतला. ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी परवीन १९७६ मध्ये टाइम मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकली होती. या मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकणारी परवीन पहिली भारतीय अभिनेत्री होती. खासगी आयुष्यात ती बोल्ड आणि बिनधास्त होती. यश चोप्रांच्या 'दीवार' या सिनेमात तिने बोल्ड सीन्स दिले होते. सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि परवीन बाबीच्या जोडीला त्याकाळात बरेच पसंत केले गेले होते. 'अमर अकबर एंथोनी', 'दीवार', 'शान', 'ख़ुद्दार', 'काला पत्थर', 'सुहाग', 'नमक हलाल' या सिनेमांमध्ये ही जोडी झळकली. १९७३ मध्ये 'चरित्र' या सिनेमाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात करणा-या परवीनने आपल्या करिअरमध्ये ५० सिनेमांमध्ये अभिनय केला. १९८८ मध्ये आलेला 'आकर्षण' हा तिचा शेवटचा सिनेमा होता.
१९७४ मध्येय प्रदर्शित झालेला मजबूर आणि १९७७ मध्ये अमर अकबर एंथोनी ही त्यांची करिअरमधील सर्वात हिट राहिलेली चित्रपट राहिलेली आहेत. त्या पडद्यावर जितक्या धाडसी आणि बिनधास्त होत्या, तेवढ्या खासगी जीवनात खूप एकाकी होत्या. बॉलीवूडमध्ये एकेकाळी टॉपच्या अभिनेत्रींमध्ये स्थान मिळविणाऱ्या अभिनेत्री परवीन बाबी हिच्या आयुष्याचा अखेरचा काळ खूपच बिकट गेला. डॅनी, महेश भट्ट, कबीर बेदी सारख्या प्रसिध्द' कलाकरांबरोबर त्या लिव्ह इन रिलेशनशीपमध्येव राहिल्या. मा.परवीन बाबी यांचे निधन २० जानेवारी, २००५ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- समीर गायकवाड./ इंटरनेट
January 20, 2017
कडकडे कुटुंबीय मूळचे गोव्याजवळील डिचोली गावचे. इंटरपर्यंतचे त्यांचे शिक्षण गोव्यातच झाले. कडकडे घराण्यात किंवा आजोळीही गाण्याचा वारसा नव्हता. केवळ घरच्यांनी सांगितले म्हणून ते गोव्यातील माडीये गुरुजींकडे गाणे शिकायला जाऊ लागले. अजित कडकडे यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे प्राथमिक धडे पं. गोविंदराव अग्नी व पं. गोविंदप्रसाद जयपूरवाला यांच्याकडे घेतले. नंतर पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे त्यांनी दहा वर्षे संगीताची तालीम घेतली.
अजित कडकडे यांनी सुरुवातीच्या काळात 'संगीत शारदा', 'संगीत सौभद्र' या संगीत नाटकांतून गाणाऱ्या पात्रांच्या भूमिका केल्या होत्या. एका मुलाखतीत त्यांनी सांगीतले होते की ‘संगीताचा कोणताही वारसा आमच्या घरात नव्हता. माझ्या मनात गाण्याचा कसलाही विचार नव्हता. मला डॉक्टहर व्हायचे होते. परंतु पं. अभिषेकीबुवांमुळे मी या क्षेत्रात आहे. मा.आर.एन.पराडकर यांची परंपरा अजित कडकडे चालवताना दिसतात. मा.अजित कडकडे यांनी गेल्या तीस वर्षांत दत्तगुरूंवर सुमारे चाळीस-पन्नास अल्बम केले आहेत, यातल्या बहुतांश रचना कवी प्रवीण दवणे यांच्या आहेत तर संगीत नंदू होनप यांचे आहे. ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी, अलौकिक दत्तात्रेय अवतार’ आदी त्यांची गाणी भक्तप्रिय ठरली आहेत.
दत्तगुरूंवरील अन्य रचनांपैकी ‘त्रिगुणात्मक त्रमूर्ती दत्त हा जाणा’ ही पारंपरिक आरती तर घरोघरी म्हटली जाते. ‘मला हे दत्तगुरू दिसले’ हे आशा भोसले यांचं गीतही (आम्ही जातो आमच्या गावा) अजरामर आहे आणि रघुनाथ साळोखे यांनी गायलेलं ‘दत्त दर्शनाला जायाचं, जायाचं, आनंद पोटात माझ्या माईना’ हे गीतही आगळंवेगळं आहे. अजित कडकडे आणि संगीतकार मा.नंदू होनप यांच्या भक्तिसंगीताने रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. तब्बल ३५ वर्षे या जोडीने एकत्र काम केले. अजित कडकडे यांनी अनेक भावगीतेही गायली आहेत..
हे हासणे गुलाबी..
सजल नयन नीत धार..
मैफलीचे गीत माझे..
अशी सुमारे दहा..
तुझ्या कृपेने दिन उगवे..
भक्तिवाचुनि मुक्तीची मज..
अशी कित्येक भक्तिगीते..
तर चक्क
"चल गो चंपा.." हे कोळीगीतही गायले आहे.
"आर. एन. पराडकर" यांची भक्तीगीतांची व्हर्शन्स त्यांनी खास आग्रहाखातर केली हे विशेष.. मा.अजित कडकडे यांना "संगीतकार प्रभाकर पंडित स्मृती पुरस्कार‘ मिळाला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ लोकसत्ता
January 11, 2018
वयाच्या अवघ्या ४ थ्या वर्षी त्यांनी स्वदेश हितचिंतक नाटक मंडळीत प्रवेश घेतला. त्यांचा जन्म ९ ऑगस्ट १८९० रोजी झाला. संगीत शारदा ह्या नाटकातील मूर्तिमंत भीती उभी ह्या पदाने त्यांना प्रसिद्धी दिली. वयाच्या १८व्या वर्षी त्यांनी सिद्धारूढ स्वामींच्या आशीर्वादाने हुबळीमध्ये ललितकलादर्श नाटक मंडळी स्थापन केली. ह्या नाटक मंडळींचे पहिले नाटक संगीत सौभद्र १९०८ मध्ये गणेशपीठ, हुबळी येथे सादर केले गेले. त्यानंतर हे नाटक महाराष्ट्रातही सादर केले गेले. केशवराव महाराष्ट्रात प्रसिद्ध असल्यामुळे प्रेक्षकांना हे नाटक विशेष आवडले. त्यांच्या स्वत:च्या कोल्हापूर शहरातून त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला.
केशवरावांनी वीर वामनराव जोशी यांजकडून राक्षसी महत्त्वाकांक्षा हे नाटक लिहून घेऊन १९१३ साली ते रंगभूमीवर आणले. हे नाटक त्याकाळी अतिशय लोकप्रिय झाले. त्यातील केशवरावांनी केलेली मृणालिनीची भूमिका अप्रतिम होत असे. याच काळात त्यांनी गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे यांच्याकडून गाण्याची दीक्षा घेतली व गायनकलेतही त्यांनी प्रावीण्य मिळविले.
मानापमान नाटकात केशवरावांची धैर्यधराची भूमिका फार तडफदार पणे करणारे संगीतसूर्य केशवराव भोसले मराठी रंगभूमीवरील एक सुप्रसिद्ध संगीतगायक नट.स्त्री भूमिका करणारे ,दिग्दर्शक ,निर्माते अशी त्यांची ओळख होती टिपेच्या सुरांना सहज व स्वच्छपणे पोहोचणारा आवाज आणि अत्यंत प्रभावी तान हे त्यांच्या गायनाचे वैशिष्ट्य होते. रंगभूमीवरील सजावटीबाबत नवनवीन प्रयोग करून केशवरावांनी त्यात अनेक सुधारणा केल्या. कालांतराने त्यांनी स्त्रीभूमिका सोडून पुरुषभूमिका करण्यास सुरुवात केली. हाच मुलाचा बाप, संन्याशाचा संसार, शहाशिवाजी इ. नाटकांतील त्यांच्या नायकाच्या भूमिका अतिशय गाजल्या होत्या. जुन्या नाटकांपैकी मानापमान नाटकात केशवरावांची धैर्यधराची भूमिका फार तडफदार होत असे. त्यातील त्यांची पदे त्याकाळी अतिशय लोकप्रिय झाली.
१९२१ साली टिळक स्वराज्य फंडाच्या मदतीसाठी ‘गंधर्व’ व ‘ललितकलादर्श’ या नाटकमंडळ्यांतर्फे मानापमान नाटकाचा संयुक्त प्रयोग झाला. त्यात साहजिकच केशवरावांकडे धैर्यधराची भूमिका आली. त्यांच्या जोडीला बालगंधर्व-भामिनी आणि गणपतराव बोडस-लक्ष्मीधर असा मातबर संच जमल्यामुळे हा प्रयोग दृष्ट लागण्यासारखा झाला. १९२१ सालची संगीत शाह शिवाजी नाटकातील शिवाजी महाराजांची भूमिका हि त्यांच्या आयुष्यातील शेवटची भूमिका होती. केशवराव फक्त ३१ वर्ष जगले. केशवराव भोसले यांचे ४ ऑक्टोबर १९२१ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.विकीपिडीया
October 4, 2017
लोकसत्ता मधील नितीन देसाई यांच्या वरील लेख.
‘‘गुलजारजींबरोबर मी ‘लेकीन’ आणि ‘माचिस’ हे चित्रपट केले. अभिजात अनुभव होता तो. ‘माचिस’च्या वेळी लोकेशन शोधत मनालीला पोचलो. भल्या पहाटे माझ्या खोलीचा दरवाजा वाजला. गुलजारजी आत आले. खिडक्यांकडे गेले व फर्रकन पडदा सरकवला. मोठय़ा विशाल खिडक्यांतून अद्भुत दृश्य दिसत होते. खालच्या दऱ्याखोऱ्या बर्फानं भरल्या होत्या, चिनार वृक्षांच्या टोकांवर बर्फ साठलेलं दिसत होतं. पूर्वेस पहाटरंगाची मस्त उधळण होत होती. गुलजारजी म्हणाले, ‘‘नितीन, मुझे ऐसा दृश्य चाहिये।’’ त्यांच्या अपेक्षेनुसार सेट करायचा प्रयत्न मी चित्रनगरीत केला. ते आले, सेट पाहिला, काहीही न बोलता त्यांनी मला हलकेच मिठी मारली. म्हणाले, ‘‘तुम्हारे सेट को हर अँगलसे जस्टिफाय करने की कोशीश करुंगा।..’’
‘पानी पानी रे’ हे गाणं आठवून पाहा, त्यांनी आपला शब्द सत्यात उतरवला..’’ सांगताहेत भूत, वर्तमान आणि भविष्यकाळालाही साकार करणारे सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई.
पुणे-मुंबई जुन्या हायवेवरून माझी गाडी ९० अंशाचं वळण घेऊन कर्जतच्या दिशेने डावीकडे वळते. अर्धा किलोमीटर आत गेल्यावर एक भव्य दरवाजा सामोरा येतो..
त्या भारदस्त दरवाजावर पाटी असते – एन्. डी. स्टुडिओ!
मी गाडीतून खाली उतरतो, त्या दरवाजाला स्पर्श करतो, खाली वाकून मातीला नमस्कार करतो.
अंगांग थरारतं माझं!
डोळ्यांसमोर उभी राहतात मागची ४०-४५ वष्रे!
वरळीची ती बी.डी.डी. चाळ, मुलुंडसारख्या उपनगरातली ती वस्ती, माझी वामनराव मोरारजी शाळा, शाळेतल्या चित्रकला स्पर्धा, नंतरचं जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सला आणि तेथून रहेजा स्कूल ऑफ आर्टमध्ये जाणं, वयाच्या एकविसाव्या वर्षी स्वत:ची कलर लॅब काढणं आणि नितीश रॉय यांच्या ‘तमस’च्या सेटवरचा तो पहिला दिवस.. आणि आज ५० एकरांवर उभा असलेला आमचा भव्य एन. डी. स्टुडिओ!
..सगळं डोळ्यासमोर उभं राहतं. त्यावेळी वाटतं, हे माझं काहीच नाही. कोणीतरी अज्ञातातून हाकारत-पुकारत, आंजारत-गोंजारत तर कधी फटकारे मारत माझ्याकडून हे सारं करवून घेत आहे. माझी त्या अज्ञात शक्तीवर अतूट श्रद्धा आहे, जिनं माझी निवड केली ह्य़ा कला क्षेत्रासाठी. त्या अनाहत नादाचा मी ऋणी आहे, जो मला सतत हाकारत असतो.
एका विशिष्ट दिशेने नेत असतो- सर्जनशीलतेच्या! हा प्रवास सतत सुरूच आहे, जेव्हापासून मला जाणीव झाली की तुझा जन्म रंगांसाठीच आहे. त्या रंगांच्या शोधात मी इथवर आलो. प्रत्येक टप्प्यावर मला जाणवत आलं की हे रंग आपलं जगणं उजळवून टाकतात, इंद्रधनुषी करतात. या रंगांच्या उधळणीवर आपलं नियंत्रण हवं नाही तर ते आपल्याला फरफटवत नेतात. या रंगांवर नियंत्रण आलं की मग मात्र ते त्या ठरावीक चौकटीत धुंद करतात, नवसर्जन देतात. या महाराष्ट्राच्या मातीचा तांबडा रंग, सह्य़ाद्रीचे काळेकभिन्न फत्तर, झाडा-झुडपांचे हिरवेगार रंग, विठोबा-रखुमाईचा गजर करत भगव्या पताका नाचवणारे वारकरी, निळंभोर आकाश या साऱ्याविषयी मी कृतज्ञ आहे. ही कृतज्ञताच मला इथवर घेऊन आली आहे. नाही तर वरळीच्या साध्या मध्यमवर्गीय घरात जन्मलेला मी सव्वाशे चित्रपट, शेकडो जाहिराती, काही मालिकांची चित्रपटांची निर्मिती आणि बरंच काही अवघ्या २५ वर्षात कसा करू शकलो असतो?
माझी मुलुंडची शाळा वामनराव मोरारजी. पहिल्याच दिवशी शाळेत जोशीबाईंनी कविता शिकवली तो दिवस आठवतोय- टप टप पडती अंगावरती, प्राजक्ताची फुले! बागेत न जाताही केशरी देठाच्या नाजूक चणीच्या पांढऱ्याशुभ्र फुलांनी माझ्या मनावर मोहिनी घातली. शब्दांनी मनात रंगांची उधळण केल्याचा तो अनुभव मला लख्ख आठवतोय! नंतरचा तास चित्रकलेचा होता. चित्रकलेच्या शिक्षकांनी कोणतेही आकार काढायला सांगितले होते. मी काय काढलं ते मला आठवत नाही, पण शिरोडकरसरांना त्यातील रेषांमागील फोर्स जाणवला असावा. सरांनी माझ्याकडून मग भरपूर मेहनत करून घेतली.
कॅम्लिनच्या प्रत्येक स्पध्रेला बसायचो, बक्षिसं मिळवायचो. माझी रंगांबद्दलची ओढ वाढत गेली. त्यात आम्ही मुळातले कोकणातले, पाचवल्याचे. प्रत्येक सुट्टीत पहिल्या दिवशी पाचवल्याला जायचं. वाटेत कोकणातल्या घाटाचं सौंदर्य अधाशासारखं पाहत बसायचं. आजचं कोकण बदलतंय, उद्यमशील बनतंय, पण मनातलं कोकण तसंच आहे! आम्ही मुलं वेगवेगळे खेळ खेळायचो. त्यात राम-रावण युद्ध, शिवाजी महाराज आणि मोगल युद्ध हे आवडते. त्यासाठी हत्यारं लागायची. ती मी झटपट तयार करायचो. धनुष्य-बाण, तलवारी, मुकुट वगरे सारे! तिथल्याच झाडांच्या फांद्यांमधून मला आकार गवसायचे. आमच्या सिनेजगतात सर्व गोष्टी वेगात कराव्या लागतात, त्याची बीजं कदाचित तिथं असावीत.
मी दहावीची परीक्षा पास झाल्यावर आई-बाबांसमोर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सला जाण्याचा बेत सांगितला. वेगळी पायवाट चोखाळण्याचं शिक्षण त्यांनीच दिलं होतं. मी जे. जे.ला जाऊ लागलो. पण नंतर मी रहेजामध्ये प्रवेश घेतला, कारण मला रेल्वेप्रवास आवडत नाही. रहेजाला जायला बस होती. पण दोन्हीकडे माझ्यावर उत्तम शिक्षकांचा प्रभाव पडला. प्रभाकर कोलते आणि टिकेकरसरांचा प्रभाव जास्त होता. कोलतेसरांनी एक प्रकल्प दिला होता- ‘६४ ब्लॉक्समधल्या ५२ ब्लॉक्सचा वापर करून सर्व ब्लॉक्स भरले गेले आहेत असा आभास निर्माण करणारे चित्र तयार करणे’; आजही तो प्रकल्प कला दिग्दर्शनाच्या क्षेत्रात मला उपयोगी पडतो. उपलब्ध सामग्रीतून सर्व काही निर्माण करता आलंच पाहिजे, याचा तो धडा होता. कोलतेसर कॅनव्हासच्या प्रतलावर ज्या प्रकारे रंगांची उधळण करतात, ती पाहणे, अभ्यासणे मनोज्ञ असते.
रहेजामधलं शिक्षण संपताच काय करायचं हा प्रश्न नव्हताच, मी कलर लॅब काढायची ठरवली होती; त्यावेळी माझ्या बाबांनी कर्ज घेण्याचा सल्ला तर दिलाच पण वरती म्हणाले, ‘‘कर्ज जरूर काढ, टाटा-बिर्ला हेही कर्जं काढतात, पण वेळच्या वेळी त्याचे हप्ते भरून त्याची परतफेड कर.’’ वयाच्या एकविसाव्या वर्षी स्वत:ची कलर लॅब काढली. झपाटय़ानं जम बसला. मित्र सोबत होतेच. तेवढय़ात माझ्या मामीनं कला दिग्दर्शक नितीश रॉय यांचं एक काम माझ्याकडे दिलं. मी ते किचकट काम वेळेच्या मर्यादेत दिलं. ते खूश झाले. मामीजवळ त्यांनी निरोप पाठवला, ‘‘कला दिग्दर्शनात यायचंय का?’’ मी सहजपणे ‘हो’ म्हणून गेलो. त्या एका होकारात जीवनातले सगळे होकार भरले गेले.
९ मे १९८६ रोजी मी ‘तमस’च्या सेटवर फिल्मसिटीत दाखल झालो आणि आजवर तेथेच आहे.
रॉयसाहेबांनी माझ्या हाती काही रेखाटनं ठेवली आणि मी प्लॅस्टर ऑफ पॅरिसमध्ये हात घातला. नंतरचे सलग १३ दिवस, १३ रात्री मी सेटवर होतो. हे झपाटलेपण माझ्यात पहिल्यापासून आहे. नितीश रॉय, गोिवद निहलानी, श्याम बेनेगल यांच्या सान्निध्यात ही बाब अधोरेखित झाली. बेनेगलसाहेबांच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’च्या सेटवर ४८० दिवसांपकी ४७५ दिवस सलग होतो. त्या काळात अवघे पाच दिवस मी घरी गेलो होतो. त्यातील तिसऱ्या खेपेला माझ्या यामाहा मोटारसायकलला अपघात झाला. मला हॉस्पिटलमध्ये सलाईनही लावलं होतं आणि मी दुसऱ्या दिवशी सेटवर पोचलोही होतो. बेनेगलसाहेब म्हणालेही, ‘‘यार क्या आदमी है तू, चला जा घर और आराम कर ले.’’ पण माझा आराम तो सेटच होता.
कोणताही चित्रपट किंवा मालिका (मग तो चांगला असो की टुकार) हा एक टीम एफर्ट असतो. ती संघभावना असते. तुमच्या हाती आधी स्क्रिप्ट सोपविले जाते. ते वाचून कला दिग्दर्शकाला अभ्यास करून रेखाटनं करावी लागतात. माझी पहिली स्वतंत्र मालिका चाणक्य! ती ऐतिहासिक स्वरूपाची मालिका होती. मी खूप अभ्यास केला. तो करून चर्चात भाग घ्यायचो. कला दिग्दर्शकाला त्याने तयार केलेली रेखाटनं कॅमेरामन, दिग्दर्शक, कथालेखक, पटकथालेखक, निर्माता या साऱ्यांसमोर सादर करावी लागतात. त्या चच्रेतून मग अंतिम रेखाटनं बनतात, त्यांच्या आधारे सेट उभे राहतात. त्या सेटची रंगसंगती, कलावंतांच्या कपडय़ांची रंगसंगती, पाश्र्वभूमी याचा मेळ बसवावा लागतो. पूर्वी कला दिग्दर्शकाला आपल्या देशात महत्त्व नव्हतं, पण गेल्या २५ वर्षांत कला दिग्दर्शकाचं स्थान महत्त्वाचं मानलं जातंय.
कला दिग्दर्शकाला विशिष्ट कालावधीतला संपूर्ण काळ नेपथ्यातून उभा करावा लागतो. प्राचीन काळातील एखादा किल्ला, एखादे शहर, एखादी बाजारपेठ उभी करावी लागते. आग्रा किल्ला बांधायला ३२ वष्रे लागली होती, पण ‘जोधा अकबर’साठी मला तो उभा करायला फक्त तीन महिने मिळाले होते. रायगडावरची बाजारपेठ उभी करायला आम्हाला पंधरवडा मिळाला होता, पण दोन्ही ठिकाणची विश्वासार्हता आम्ही सांभाळली होती. ते आव्हान असतं. मला आव्हानं स्वीकारायला आवडतात.
‘चाणक्य’च्या वेळी माझ्या आई-बाबांना घेऊन मी सेटवर गेलो होतो. एकेक गोष्ट आईला दाखवत होतो, ‘‘हा राजवाडा, ही बाजारपेठ, हे गुरुकुल..हे करवसुली केंद्र.’’ तिनं विचारलं, ‘‘हे ठीक आहे रे, पण तू नेमकं काय केलंस?’’ मी तिचा हात धरून सेटच्या मागच्या बाजूला गेलो, सारं समजावून सांगितलं. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. दोघांचेही समाधानी चेहरे पाहिले. त्या कृतार्थधारांतच माझं आयुष्य सामावलं गेलंय.
मी स्वतंत्ररीत्या केलेला पहिला चित्रपट म्हणजे अधिकारी ब्रदर्सचा ‘भूकंप’. माझं कला दिग्दर्शक म्हणून नाव झालं ते विधू विनोद चोप्राच्या ‘१९४२- अ लव्ह स्टोरी’मुळे. ‘पिरदा’च्या वेळी माझं काम त्याला आवडलं होतं. ‘पिरदा’तली बोट आठवून पाहा, तो सारा सेट होता. मी त्या बोटीच्या भिंतींना असणारे अस्तरही अभ्यास करून दाखवलं होतं, त्याचा वापर दिग्दर्शकाला नीट करून घेता आला होता. विनोदनं मला ‘१९४२..’ चं स्क्रिप्ट दिलं. १९४२च्या पाश्र्वभूमीवरील तो चित्रपट. चंबा ते डलहौसी हा सारा पट्टा आम्ही फिरलो, स्केचेस केली, फोटो काढले. स्क्रिप्ट आणि क्लायमॅक्स फायनल झाला आणि आम्ही ठरविलं की सगळं शूटिंग चित्रनगरीत करायचं. एप्रिल-मे मध्ये मी चित्रनगरीतल्या परिसराचा अभ्यास करून लोकेशन ठरवलं. तिथला तलाव, त्याच्या काठावर व तलावात सेट उभा कसा करता येईल यावर नोट्स तयार केल्या. नोव्हेंबरमध्ये मीटिंग होती. टीममधल्या जुन्या लोकांना वाटलं की तलावावर सेट उभा करायचा, जेमतेम पाच-सहा वर्षांचा अनुभव असणाऱ्या या मुलावर कसा भरवसा ठेवायचा? खूप भवती न् भवती झाली. आमच्या टीमचे पाच-सहा महिन्यांचे श्रम पणाला लागलेले. माझा चेहरा उतरला. अखेर विनोद चोप्रा म्हणाला, ‘‘आपण यावर उद्या निर्णय घेऊ.’’
दुसऱ्या दिवशी नऊ वाजता मीटिंग ठरलेली. मी भल्या पहाटेच तलावाच्या काठावर जाऊन बसलेलो. विचारात मग्न. आठच्या सुमारास माझ्या खांद्यावर हात पडला आणि आवाज आला, ‘‘क्या तू भी वही सोच रहा है, जो मं सोच रहा हूँ?’’ मी उत्तरलो, ‘‘हां विनोद!’’ नऊ वाजता आम्ही जमलो. विनोद चोप्रा म्हणाला, ‘‘डिस्कशन वगरे कुछ नहीं करना है। नितीन काम कर रहा है। सब लोग अपने अपने काम में जूट जाओ।’’ आणि मग मी मागे वळून पाहिलेच नाही. गोिवद निहलानी, गुलजारसाहेब, केतन मेहता, एन्. चंद्रा, आशुतोष गोवारीकर, संजय लीला भन्साली, विनोद चोप्रा, राजू हिरानी, इंदरकुमार, डेव्हिड धवन, आता सूरज बरजात्या, प्रभुदेवा अशा सर्व पिढय़ांतील दिग्दर्शकांसोबत काम करायची संधी मिळाली. त्या प्रत्येकानं मला काही ना काही शिकवलं.
संजय लीला भन्सालीसोबत माझा अनेक वर्षांचा ऋणानुबंध! ‘डिस्कव्हरी’च्या वेळी तो एडिटिंग करायचा. ‘देवदास’च्या वेळी आम्ही आधी झालेले नऊ ‘देवदास’ पाहिले. ते पाहिल्यावर संजय मला म्हणाला, ‘‘यासारखं आपण काहीही करायचं नाही. आपण भव्य, अतिभव्य करायचं.’’ ऐश्वर्या रायचं म्हणजे पारोचं घर केवढं तरी मोठं केलं. त्याच्या पाचपट मोठी देवदासची हवेली बनली. या प्रत्येक वेळी मला कोलतेसरांनी दिलेला ६४ ठोकळ्यांचा तो प्रकल्प उपयोगी पडला. दिलेल्या वेळेत, दिलेल्या खर्चात आणि दिलेल्या अवकाशात तुम्हाला काम करावं लागतं. हा तो धडा होता. मला वेळ वाया घालवलेला आवडत नाही. म्हणूनच सकाळी आंघोळ झाल्यावर माझ्यासमोर पांढरा शर्ट आणि जीन्सची पँट असते, ती घालायची व कामाला लागायचं. कोणते कपडे घालायचे यापेक्षा विचार करायला किती तरी गोष्टी आहेत ना! टाईम मॅनेजमेंट हवी.
गुलजारजींबरोबर मी ‘लेकीन’ आणि ‘माचिस’ हे चित्रपट केले. अभिजात अनुभव होता तो. ‘माचिस’च्या वेळी लोकेशन शोधत शोधत मनालीला पोचलो. विमानतळावर उतरताना प्रचंड बर्फ सभोवती दिसत होता. आम्हाला जवळच्या एका पर्वतावर जायचं होतं. आम्ही पाच जण होतो. गुलजारसाहेब, कॅमेरामन मनमोहनसिंग, सुदेशजी आणि आणखी एक जण! सुदेशजी आणि मनमोहनसिंग म्हणाले, ‘‘नको जाऊ या.’’ गुलजारजींना पर्वतावर जायचंच होतं, मलाही जायचं होतं. मी, ‘‘जाऊ या’’ म्हणालो आणि मग आम्ही पोचलो. रात्री गुलजारजींची शायरी ऐकली. थोडंसं उशिरा झोपलो आणि भल्या पहाटे गुलजारजीनी माझ्या खोलीचा दरवाजा वाजला. ते आत आले. खिडक्यांकडे गेले व फर्रकन पडदा सरकवला. मोठय़ा विशाल खिडक्यांतून अद्भुत दृश्य दिसत होते. खालच्या दऱ्या-खोऱ्या बर्फानं भरल्या होत्या, चिनार वृक्षांच्या टोकांवर बर्फ साठलेलं दिसत होतं. पूर्वेस साडेपाचच्या पहाटरंगाची मस्त उधळण होत होती. आम्ही अनिमिष नेत्रांनी ते अद्भुत पाहत होतो. पुन्हा ते कधीच दिसणार नव्हतं.
निसर्गाची तीच तर किमया आहे. तो एकदाच एखादी कलाकृती निर्माण करतो. त्याला स्वत:लाही ते दृश्य परत निर्माण करता येत नाही. कलावंतालाही तसंच असायला हवं. माझे सेट्स मी परत बनवत नाही. त्यात बदल हवाच. तसा लाल रंग माझ्या सेट्समध्ये पुनरावृत्त होताना दिसतो, पण तो प्रत्येक वेळी वेगळ्या प्रकारे येतो. तसा हा रंग हाताळता येणे अवघड, पण एकदा का त्याच्यावर ताबा मिळाला की त्याच्यासारखा रंग नाही. गुलजारजी म्हणाले, ‘‘नितीन, मुझे ऐसा दृश्य चाहिये।’’ नंतरचे तीन दिवस आम्ही तिथं अडकून पडलो होतो. त्या परिसरात सेट उभा करता येणं शक्य नव्हतं. गुलजारजींच्या अपेक्षेनुसार सेट करायचा प्रयत्न मी चित्रनगरीत केला. ते आले, सेट पाहिला, काहीही न बोलता त्यांनी मला हलकेच मिठी मारली, पाठ थोपटली, (आजही पाठीवर ती प्रेमळ थाप जाणवते). ते म्हणाले, ‘‘तुम्हारे सेट को हर अँगलसे जस्टिफाय करने की कोशिश करूंगा।’’ लक्षात घ्या हे गुलजारजी बोलताहेत. ‘पानी पानी रे’, हे गाणं आठवून पाहा. तो सारा सिक्वेन्स चित्रनगरीत उभा राहिलाय.
आशुतोष हाही माझा जुना मित्र. त्याच्या सर्वच चित्रपटांसाठी मी काम केलंय. ‘पहला नशा’पासून आजपर्यंत प्रत्येक! ‘पहला नशा’ आणि ‘बाजी’ हे त्याचे चित्रपट फारसे यशस्वी झाले नाहीत, पण त्यांची दखल मात्र घेतली गेली. ‘लगान’ हा अफलातून अनुभव. आमीर आणि आशु. दोघेही प्रतिभावंत, चिकित्सक. आम्ही लोकेशन्स शोधत फिरत होतो. ‘हम दिल दे चुके सनम’च्या शूटिंगवरून परत येताना अचानक भूजचा परिसर दिसला. आमीर आणि आशुतोष दोघांना मी आणखी जागा दाखवल्या. पण आम्ही भूज फायनल केलं आणि नंतर घडला तो इतिहास होता.
मी या चित्रपटसृष्टीचा एक घटक आहे. त्यामुळे यातील प्रत्येक घटकावर माझं प्रेम आहे. इथला पसा मी इथेच खर्च करतो. आज कर्जतला आम्ही स्टुडिओ उभारला. या स्टुडिओमुळे या परिसरातील अनेक कुटुंबांना रोजगार मिळाला, स्थानिकांचं अर्थकारण बदललं. बॉलिवूडमधील मोठमोठे कलाकार येथे येऊन राहतात, शूटिंग चालतं. या मातीचं मी देणं लागतो, ते अल्प कुवतीप्रमाणे मी परत देण्याचा प्रयत्न करतो म्हणूनच तर भारताचा स्वाभिमान असणाऱ्या शिवछत्रपतींवर एक मालिका माझ्या हातून घडली, बाजीराव-मस्तानीची प्रेमकथा देता आली, स्वरांचा जादूगार असणाऱ्या बालगंधर्वावर त्याच दृष्टिकोनातून चित्रपट बनवला. तरुणांच्या आयपॉडवर बालगंधर्वाची गाणी आली, हीच मोठी गोष्ट झाली. मला सर्वच अनुभव घ्यायला आवडतात. अनेक वर्षे पडद्यामागे राहिल्यावर, पडद्यावर अभिनय करूनही पाहिला. कला दिग्दर्शनानंतरची पुढची पायरी दिग्दर्शनाची. तीही ओलांडली. यशापयश महत्त्वाचे नाही, पण प्रयत्न महत्त्वाचे असतात. ते मी करत राहतो, करत राहीन.
एक सांगू का, रंगांच्या उधळणीतच मला माझा परमेश्वर सापडतो. माझी अनुभव घेण्याची क्षमताच मुळी रंगांत आणि विविध आकारात सामावली गेली आहे. जेव्हा एखादा निर्माता किंवा दिग्दर्शक माझ्याशी चर्चा करत असतो तेव्हाच ते कथानक माझ्यासमोर शब्दांच्या नव्हे, तर चित्राकृतींच्या माध्यमातून उभं राहतं.
रंग, आकार माझ्या डोळ्यांसमोर नाचू लागतात. लेखन करण्यापेक्षा १०-१२ स्केचेस काढून माझ्या मनातील भाव मी पटकन व्यक्त करू शकतो. ही स्केचेस करतानाही माझ्या मनात जाणीव असते की, त्या अनुभवाला मी साक्षात करू शकत नाही, पण त्या अनुभवाचा वेध मात्र नक्की घेऊ शकतो. या वेध घेण्यातच आयुष्याची इतिकर्तव्यता सामावली गेली आहे. प्रस्तुत लेखनामध्ये वारंवार ‘मी’ हे प्रथम पुरुषी सर्वनाम येते आहे. पण मी हे जाणून आहे, यामागचा बोलविता धनी वेगळाच आहे, ‘तो’ हे सर्व करून घेत आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दांत थोडासा बदल करून काही मांडू इच्छितो :
‘तेणे कारणें रंगेन। रंगीं अरूपाचे रूप दावीन।
अितद्रिय परि भोगवीन। इंद्रियांकरवी॥’’
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
शब्दांकन-नितीन आरेकर
August 6, 2017
"जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा" अशी गर्जना करून शाहीरी परंपरा अगदी अलिकडच्या काळापर्यंत जपून ठेवणारे शाहीर म्हणजे शाहीर कृष्णा गणपत साबळे यांचा जन्म ३ सप्टेंबर १९२३ रोजी झाला. तिसऱ्या इयत्तेत असताना शाहीर अमळनेरला गेले. तेथे गेल्यावर आपल्याला चांगला आवाज आहे, हे त्यांच्या ध्यानात आले आणि त्यांची आवड आजीच्या कानावर गेल्यानंतर पुढे आणखी काही व्याप होऊ नये, म्हणून आजीने त्यांना पुन्हा पसरणीला आणून सोडले. त्यामुळे त्यांना सातवीची परीक्षाही देता आली नाही. अमळनेरला असताना हिराबाई बडोदेकर यांनी त्यांचे गाणे योगायोगाने ऐकले होते व त्यांच्या आवाजाचे कौतुक केले होते. अमळनेरला असताना साने गुरुजींचा सहवास शाहिरांना लाभला. पुढे मोठेपणीही चळवळीत गुरुजींचा आशीर्वाद मिळाला. त्यांच्या अनेक सामाजिक कार्यात शाहिरांना सक्रिय सहभाग घेतला. लहान वयात लोककलांचा आणि लोकगीतांचा संस्कार त्यांच्यावर झाला होता आणि मुंबईला आल्यावर या लोककलेचे नेटके रूप विशिष्ट संहितेसह समाजासमोर आणायचे, असा विचार शाहिरांनी केला आणि महाराष्ट्राची लोकधारा या लोककलेच्या देखण्या रूपाचा जन्म झाला.
महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अनेक ठिकाणी चक्कक मॉरिशसलादेखील मराठी माणसासमोर आपल्या महाराष्ट्राची परंपरा दाखविता आली. समाजाची दुखणी, व्यथा व सत्यस्थिती याचा अभ्यास करून शाहिरांनी अनेक प्रहसने लिहिली. नाटक व लोकनाट्य याचा योग्य समन्वय साधून त्यांनी अनेक मुक्तननाट्य लिहिली. आबुरावाचं लगीन, बापाचा बाप, ग्यानबाची मेख, आंधळं दळतंय अशी अनेक मुक्तुनाट्ये त्यांनी लिहिली आणि समर्थपणे सादरही केली. शाहिरांनी जशी मुक्त नाट्य लिहिली, तसेच अनेक पोवाडेही लिहिले. शाहिरी कलावंतांच्या व्यथा पाहून त्यांना शासनाच्या वतीने सहकार्य मिळवून देण्याचा त्यांनी निश्चीय केला व शासनाच्या वतीने सर्वच ज्येष्ठ लोककलावंतांना अनेक सवलती मिळवून दिल्या.
लोककलावंतांना मानधन मिळवून देण्यात त्यांचा सहभाग हा निश्चिनतच महत्त्वाचा आहे. शाहीर साबळे म्हटले, की सर्वांत प्रथम लक्षात येते ते त्यांचे महाराष्ट्र गीत व नंतर त्यांनी लोकप्रिय केलेली लोकगीते, भारुडे. शाहिरांना त्यांच्या कार्याबद्दल अनेक मानसन्मान व पुरस्कार मिळाले. पहिला शाहीर अमर शेख पुरस्कार त्यांना देण्यात आला. याशिवाय संत नामदेव पुरस्कार, पुणे मनपाचा शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांचा गौरव केला. पद्मश्री मिळवणारे पहिले शाहीर, अ. भा. मराठी शाहिरी परिषदेच्या अध्यक्षपदाबरोबरच अ. भा. मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणारे एकमेव शाहीर असे अनेक बहुमान साबळे यांच्या नावावर आहेत. सरकारचा पहिला शाहीर अमर शेख पुरस्कार व संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
"जय जय महाराष्ट्र माझा‘प्रमाणेच "हरे कृष्णा हरे कान्हा‘, "दादला नको ग बाई‘, "आठशे खिडक्याज नऊशे दारं‘, "विंचू चावला‘, "या विठूचा‘, "आज पेटली उत्तर सीमा‘, "पयलं नमन‘, "बिकट वाट वहिवाट नसावी‘ आणि "मल्हार वारी मोतीयाने द्यावी भरून‘ आदी त्यांच्या आवाजातील विविध प्रकारची गाणी तुफान लोकप्रिय झाली. "माझा पवाडा‘ हे त्यांचे आत्मचरित्र २००७ मध्ये प्रसिद्ध झाले. शाहीर साबळे यांचे २० मार्च २०१५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
September 3, 2017
दादा कोंडकेंच्या चित्रपटांनी आईची ही प्रतिमा बदलून रागात प्रेम व्यक्त करू पाहणारी, आपल्या मुलाच्या भल्यासाठी त्याला अस्सल गावरान शिव्या घालणारी आई रत्नमाला यांच्यारूपाने चित्रपटसृष्टीला दिली. आईच्या रूपातील रत्नमाला यांनी या आईच्या बदललेल्या भूमिकेला खऱ्या अर्थाने न्याय दिला, म्हणूनच त्यांनी साकारलेली ही ‘आये’ चित्रपटसृष्टीत अजरामर झाली. किंबहुना रत्नमाला यांचे दादा कोंडकेंची ‘आये’ हेच नाव चित्रपटसृष्टीत रूढ झाले आणि आजतागायत ते तसेच आहे.
June 22, 2022
इलाही जमादार यांनी १९६४ सालापासून काव्यलेखनाला प्रारंभ केला. कविवर्य सुरेश भटांनंतर मराठी गझलेला उत्तुंगतेवर नेणारे गझलकार अशी त्यांची ओळख होती. ते आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कवी व गझलकार होते. विविध मराठी, हिंदी, उर्दू दैनिके व मासिकांतून इलाहींच्या कविता व गझला प्रसिद्ध झाल्या आहेत.
March 1, 2022
मराठी कवितेला इंग्रजी काव्यातील आत्मविष्काराचे नवे क्रांतिकारी वळण देणार्याच या कवीने आपल्या कवितांतून स्त्री-पुरुषातील प्रेम, निसर्ग, सामाजिक बंडखोरी व गूढ अनुभूतींचा आविष्कार केला. त्यांचा जन्म १५ मार्च १८६६ रोजी झाला.‘एक तुतारी द्या मज आणून, फुंकीन मी ती स्वप्राणाने’ अशी हाक देऊन पृथ्वीला ‘सुरलोक साम्य’ प्राप्त करून देण्याचे महास्वप्न आपल्या क्रांतदर्शी प्रतिभेने पाहणार्याक कवी केशवसुत. कवी केशवसुत म्हणजे मराठी कवितेच्या प्रांतात ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ असे म्हणत; आशय, अभिव्यक्ती अन् काव्यविचार यात आमूलाग्र परिवर्तन घडवत; आधुनिक मराठी कवितेचे सुंदर लेणे खोदणारे युगप्रवर्तक कवी!
इंग्रजीतील रोमँटिक प्रवृत्तींच्या काव्यातून प्रखर व्यक्तिवादी, आत्मनिष्ठ जाणीव आणि सौंदर्यवादी दृष्टीकोन या दोन गोष्टी केशवसुतांनी प्रथम मराठीत आणल्या. कविप्रतिभा ही एक स्वतंत्र, चैतन्यमय शक्ती आहे. तिला कुणीही व कसलेही आदेश देऊ नयेत असे ते आग्रहाने सांगत. वर्डस्वर्थ, शेली, किटस् यांसारख्या इंग्रजी कवींच्या कवितांचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. इंग्रजी काव्यातील चौदा ओळींचा सॉनेट हा काव्यप्रकार ‘सुनीत’ या नावाने त्यांनी मराठीत रूढ केला.
गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी), बालकवी, रेंदाळकर यांसारखे सुप्रसिद्ध कवीसुद्धा स्वत:ला केशवसुतांचे शिष्य म्हणवून घेत असत.
करा अपुल्या तू पहा चाचपून, उरा अपुलिया पहा तपासून
प्रकृती माझीही तिथे तुज कळेल, विकृती माझी तुज तिथे आढळेल.
किंवा
आपल्या घराची, पत्नीची आठवण काढताना ते म्हणतात;
श्वासांनी लिहिली विराम दिसती ज्यांमाजि बाष्पीय ते,
प्रीतीचे बरवे समर्थन असे संस्पृत्य ज्यांमाजि ते,
कांतेची असली मला पवन हा पत्रे आता देतसे,
डोळे झाकुनि वाचिता त्वरित ती सम्मूढ मी होतसे.
अशा प्रकारे प्रेमाचे विशिष्ट तत्त्वज्ञानही त्यांनी फार सूक्ष्म रीतीने व मराठीत तर प्रथमच आपल्या कवितेतून मांडले.
त्यांच्या हयातीत त्यांची एकही कविता प्रसिद्ध झाली नाही. ’केशवसुतांची कविता’ हा त्यांचा कवितासंग्रह त्यांच्या निधनानंतर ह. ना. आपटे यांनी प्रकाशित केला.
‘वर्डस्वर्थचा प्रभाव असणार्यात केशवसुतांनी ‘भृंग’, ‘पुष्पाप्रत’, ‘फुलपाखरू’ अशा निसर्गकविता लिहिल्या. ‘तुतारी’, ‘नवा शिपाई’, ‘गोफण केली छान’ या कवितांतून आपले क्रांतिकारी सामाजिक विचार ओजस्वीपणे मांडले. ‘झुपुर्झा’ ही त्यांची गूढ अनुभूती व नावीन्पूर्ण अभिव्यक्तीची कविता. ‘म्हातारी’ या त्यांच्या गूढगुंजनात्मक कविता.
केशवसुत यांचे निधन ७ नोव्हेंबर १९०५ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
March 17, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti