इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
स्वातंत्र्यवीर सावरकर, मदनलाल धिंग्रा, अनंत कान्हेरे, वान्ची अय्यर यासह महाराष्ट्र, बंगाल आणि पंजाबात अमरत्वाचे कुंभ घेऊन उडणार्या गरूडांच्या पंखात प्रेरणेचं आकाश भरणारे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे विसाव्या शतकातल्या क्रांतीचे प्रणेते.
लौकिक अर्थाने भारताचा पहिला मुकचित्रपट म्हणून ज्याची ख्याती आहे असा राजा हरिश्चंद्र ३ मे १९१३ रोजी प्रदर्शित झाला अन् भारतात रुपेरी तसंच मनोरंजन उद्योगाचा उदय झाला, जो आजतागायत सुरु आहे आणि राहील.
Running Time- 53:49
भारतीय स्वातंत्र्यासाठी झालेल्या क्रांतीच्या महाभारतात अभिमन्यूच्या शर्थिने लढून शहीद झालेल्या सच्चरित्र व चतुरस्र ’चेतनाशक्तीचं नाव आहे चंद्रशेखर आझाद. दि. 27 फेब्रुवारी 1931 या दिवशी अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्कमध्ये त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध जो घनघोर रणसंग्राम केला त्याला तोड नाही.
गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या व्यक्तित्वाचा वेध घेणाऱ्या ‘आदिशक्तीचा धन्योद्गार!’ या पुस्तकाचे प्रकाशन डिसेंबरमध्ये करण्यात आले. ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांनी या पुस्तकात किशोरीताईंच्या निमित्ताने प्रतिभावंत कलाकार, त्याची चंचलता, अस्वस्थता, प्रतिभेचं देणं सांभाळताना त्याची होणारी होरपळ यावर मुक्त चिंतन केलं आहे.
1962 भारत चीन युद्ध लेफ्टनंट विष्णू आटले यांची वीरगाथा,आणि चीनी भारताविरुद्ध मल्टी डोमेन युद्ध “शूरा मी वंदिले” या सतीश अंभईकर लिखित आणि सौ माधवी श्रीनिवास नाटेकर ( कॅप्टन विष्णू आठवले यांच्या भगिनी) यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पुस्तकाचे, सांगलीत विमोचन झाले. माझे मित्र, मार्गदर्शक, गुरू , डॉक्टर श्रीनिवास नाटेकर सरांच्या, सख्ख्या मेव्हण्यानी अर्थात अकोल्याच्या कॅप्टन विष्णू आठल्ये यांनी 1962 च्या भारत चीन युद्धात नेफा बॉर्डरवर, बलॉंग क्षेत्रातील भीषण रणसंग्रामात हौतात्म्य पत्करले या बद्दलची माहिती या पुस्तकात आहे. या दरम्यान प्रख्यात लेखक, संरक्षण तज्ञ, ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचे, “भारत चीन संबंध” यावर व्याख्यानही झाले. व्याख्यानामध्ये आपण 1962 चे चीन सोबतचे युद्ध हरलो आणि 2014 नंतर चीन सोबतचे युद्ध आपण हरणारच नाही, याचे दोन्हीचे कारण हे त्या त्या काळचे राजकीय नेतृत्वच आहे, हे पुराव्यानिशी सिद्ध केले.
सुरत पिया की – राहुल देशपांडे आणि महेश काळे. कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील हे गीत.
शेवटी मैफिलीत गदिमा आणि माझा संगीतप्रेमी मामा असे दोनच श्रोते ऊरले. पण पानाचा डबा काही आला नाही. शेवटी गदिमा रागारागाने खाली आले आणि म्हणाले “अरे ! तुम्हाला यायचं नसलं तर येऊ नका. पण पानाचा डबा तरी द्याल कि नाही?”
आचार्य अत्रे लिखित आणि दिलीप कोल्हटकर दिग्दर्शित मराठी कॉमेडी
2:13:35
पंडित वसंतराव देशपांडे यांच्य आवाजातील `कट्यार काळजात घुसली’ या नाटकातील हे अजरामर पद.
रवी पटवर्धन आणि आशालता यांचा अप्रतिम अभिनय
Copyright © 2025 | Marathisrushti