इंटरनेटच्या महाकाय पसाऱ्यातून खास निवडलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडिओजचा संग्रह.
अंदमानातून परतलेल्या शचिन्दनाथ सान्यालांनी उत्तर प्रदेशात हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी नावाची क्रांतिफौज खडी केली. रामप्रसाद बिस्मिलच्या नेतृत्वात फक्त दहा क्रांतिकारकांनी काकोरी स्थानकापाशी एक रेल्वेगाडी रोखून 17 हजारांचा सरकारी ऐवज लुटला. काकोरी कटात झाडून सारे धरले गेले.
छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्राला वारसा लाभला आहे तो शौर्याचा, पराक्रमाचा आणि देशप्रेमाचा. देव, देश आणि धर्मासाठी तळहातावर प्राण घेऊन लढणाऱया शूरवीरांची ही भूमी. या भूमीत जन्माला आलेल्या अनेक वीरांनी १८५७च्या ही आधी जुलमी ब्रिटीशांविरुद्ध सशस्त्र लढे दिले होते.
बागा जतीन, जलीयनवाला बाग रणांगणात, युद्धाच्या पवित्र्यात पाय रोवून उभं ठाकणं हे क्रांतीचं दुसरं पर्व ‘गदर’द्वाराच सुरू व्हायला हवं होतं, पण ते सुरू झालं गदरनंतर ओरिसात ! जुलमी राजसत्तेला डिवचून भूमिगत होण्याऐवजी मुखोमुखी लढा देण्याची सुरुवात केली – बाघा जतीन ऊर्फ जतीन्द्रनाथ मुखोपाध्याय यांन ! बाघा जतीन यांनी ब्रिटीश सैन्यांशी हातघाईची लढाईच लढली.
क्रांतिवीरांच्या कर्तृत्वाला शाप होता फितूरीचा. या देशात जसे प्राणाची आहुती देणारे राष्ट्रभक्त वीर जन्माला आले तसेच त्यांच्या विरुद्ध फितूर होणारे राष्ट्रद्रोही नतद्रष्टही इथे होतेच. या फितूरांना ठेचणाऱ्या सत्येन बोस, कन्हाई दत्त, चारुचंद्र बसू यांच्या क्रांतीवीरांची अमृतगाथा ऐकुया या भागात.
महात्मा गांधीजीच्या चलेजाव चळवळी नंतरच्या काळात ब्रिटीश सरकारला समांतर अशी यंत्रणा महाराष्ट्राच्या काही भागात उभी करताना क्रांतीसिंह नाना पाटील यांनी स्वयंपूर्ण कारभाराचं सूत्र पुढे आणलं. त्यासाठी ग्रामीण भागातल्या बहुजन समाजात स्वाभिमान जागृतीचं काम त्यांनी निष्ठेनं आणि अथकपणे केलं. ‘स्वातंत्र्यचळवळीत सर्वसामान्यांचं योगदान’ हीच त्यांची भूमिका होती. परिणामी ‘प्रतिसरकार’ ही संकल्पना अस्तित्वात आली.
भगतसिंगाचे हौतात्म्यवेड तर पराकोटीला गेलेलं होतं! संसदभवनात बॉम्ब फेकून स्वतःहून साखळदंड पेहेरून घेतले होते त्याने! कारागृहात जगन्मातेशी स्वरचित कवितेतून त्याने अहोरात्र आळवणी चालवली होती ’मेरा रंग दे बसंती चोला…..भगतसिंग तसा इतर क्रांतिवीरांच्या तुलनेत सुदैवी ठरला. कारण त्याचं नाव माहीत नाही असा कोणी भारतीय आज सापडणार नाही.
1857 च्या चक्रीवादळानंतर सारं कसं वरकरणी शांत शांत होतं. पण त्या काळातही क्रांतीच्या ठिणग्या इतस्ततः उडतच होत्या. महाराष्ट्रात वासुदेव बळवंत फडके, पंजाबात रामसिंग कूका, मणिपुरात टिकेन्दजीत सिंग, बिहारात विरसा मुंडा कीती नावं सांगावीत? याच वीरांपैकी ‘आद्य क्रांतिकारक’ वासुदेव बळवंत फडके आणि ‘भारतीय असंतोषचे जनक’ लोकमान्य टिळक यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेध या भागात घेत आहोत.
बंगालची क्रांतीज्योत पंजाबात पोहोचली. सरदार भगतसिंगचे आजोबा अर्जुनसिंग, वडील किशनसिंग, काका अजितसिंग व पंजाब केसरी लालालजपतराय यांनी ती पेटवली आणि अनेकांनी आपल्या देहाचा अग्नी देऊन ती तेवत ठेवली.
भारतीय स्वातंत्र्यासाठी झालेल्या क्रांतीच्या महाभारतात अभिमन्यूच्या शर्थिने लढून शहीद झालेल्या सच्चरित्र व चतुरस्र ’चेतनाशक्तीचं नाव आहे चंद्रशेखर आझाद. दि. 27 फेब्रुवारी 1931 या दिवशी अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्कमध्ये त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध जो घनघोर रणसंग्राम केला त्याला तोड नाही.
भारतीय स्वातंत्र्ययुद्धात 1857चा उठाव, हे क्रांतीचं पहिलं पर्व मानण्यात येतं. बॅरकपूर छावणीत मंगल पांडे यांनी ब्रिटिशांविरुद्धातल्या युद्धाची आरोळी ठोकली. सार्जंट ह्यूसन आणि लेफ्टनंट बॉ यांना यमसदनाला पाठवून सुरू झालेल्या या युद्धामुळे 3 मे 1857 रोजी दिल्ली ब्रिटिशांच्या ताब्यातून मुक्त झाली. दुर्देवाने हा विजय केवळ 133 दिवसांचा ठरला.
Copyright © 2025 | Marathisrushti