नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा
मॉर्निंग वॉक’ हा प्रकार भयंकर असतो हे तुमच्यावर जेव्हा तो ‘कंपल्सरी’ या प्रकारात येतो तेव्हाच कळते. तसे तरुणपणी आपण ‘बारीक’ असताना किंवा स्वतःची फिगर सांभाळण्यासाठी किंवा गंमत म्हणून जेव्हा आपण ‘मॉर्निंग वॉक’ साठी जात असतो तेव्हा आपण चार लोकांशी गप्पा मारताना काहीतरी विषय काढून आपण वॉकसाठी जात आहोत हे आवर्जून त्यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करत असतो.

ते दोघं एकमेकांशी गप्पा मारत थोडावेळ चालत राहिले… खरोखरच रोहनची साथ मिळाल्यामुळं हा अवघड रस्ता पार करणं सोपं होवून गेलंय असं नीशाच्या मनात आलं. मघासची आंधाराची आणि एकटेपणाची भीती नीशाच्या मनातून पार हद्दपार झाली होती… आणि क्षणात तिचं मन एका अनोख्या सुगंधानं भारलं गेलं.
बघता बघता काय होत आहे हे कळण्यापूर्वीच हातून निसटली ही मैत्रीची माला. विखरून पडला एक एक मोती. निसटलेल्या मोत्यांना पकडण्याचा जिवापाड प्रयत्न केला पण हे सगळे हाती नाहिच आले. काही हाती आलेले हे विखुरलेले मोती आठवणींच्या कुपीत अलगद उचलून दडवून ठेवले आहेत. काही छोटे आहेत काही मोठे आहे. रिकाम्या वेळात कित्येकदा त्या एक एक मोत्याला मी हरवलेल्या मैत्रीच्या माळेत गुंफायचा प्रयत्न करत असते.
तेनालीराम आणि त्याची पत्नी घराला कोणता रंग द्यावा हे ठरवत होते. पत्नीला गुलाबी रंग पसंत होता. तेनाली म्हणत होता, आपण सफेद रंग देऊ या. दोघांमध्ये काही केल्या एकमत होत नव्हते. पत्नीने अखेर निकराने सांगून टाकलं की, “मी ठरवलं आहे, गुलाबीच रंग द्यायचा. आणि त्याचं कारण एकच आहे, फक्त गुलाबी रंगामुळेच मी आनंदी राहू शकते.
सुंदर कथा…पहिल्या रात्री पर्यंतच्या न केलेल्या प्रवासाची.
१) कुलकर्ण्यांचा प्रशस्त वाडा. पंधरा वर्षांची कुमुद आजीला शोधत बागेत आली . आजी नेहमीप्रमाणे औदुंबराच्या झाडाखाली शांत बसली होती. कुमुदला माहीत होतं. आजी औदुंबराच्या झाडाकडेच असणार. आजोबा गेल्याचं दुःख ती पचवू शकत नव्हती. हा औदुंबर आजोबांना प्रिय होता. कुमुदला आजीची अवस्था पहावत नव्हती. तिला पूर्वीसारखी हसीमजाक करणारी हरहुन्नरी आजी हवी होती. कुमुद आजीला म्हणाली, “ आजी ग घरांत चल. आजोबा म्हणायचे, दिवेलागणीला असं घराबाहेर राहू नये. ” आजी म्हणाली, ” तेच तर .. आता काही म्हणायला ते आहेत कुठे ? हसत खेळत हार्टॲटॅकने निघून गेले.
आज एक आठवडा झाला. त्या लहान मुलाला मी रस्त्यावर नकळत शोधण्याचा प्रयत्न करते आहे. पण तो कुठेही नजरेस पडत नाही आहे. कुठे असेल तो?
मागच्याच मंगळवारी सकाळी दूध घेऊन येताना तो गाडीच्या समोर धावत धावत आडवा गेला होता.
रेल्वे मध्ये कामाला लागण्या अगोदर मी बिगारी काम दुसऱ्याच्या शेतामध्ये करीत होतो. त्यात वडील वारलेले घरामध्ये पैशाची चणचण फार भासत होती.वडीलतरी या जगातून निघून गेले घर रिकामे झाले वडिलांचा आधार नाहीसा झाला. गेली कित्येक दिवस वडील अंथरुणावर पडून होते आधार होता तो आधार नाहीसा झाल्यामुळे. अखंड घर दुःखात बुडाले होते घरात मला अजिबात करमत नव्हते. सोबत घरातील चारी भिंती मला खायला उठल्या होत्या. घरा मध्ये लाईट नाही दिव्याच्या मीन मिनित प्रकाशात मला काही सुचत नव्हते. वडील आजारी असल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत दोन मामानी केलेली मदत मला डोंगराएवढी वाटत होतं. या जगामध्ये कुठेतरी देव आहे आणि तो देव मामाच्या रूपाने आम्हाला मदत करीत आहे हे मला जाणवत होते. परंतु आम्ही लहान होतो त्यांचे डोंगराएवढे माझ्यासारख्या कमी वयाच्या मुलाला न पिलं न्या सारखे नव्हते. यांची परतफेड कशी करायची हा विचार माझ्या मनामध्ये राहून राहून येत होता. उपकाराचे ओझे कर्ज पेक्षा फार मोठे आहे हे मला जाणवत होते परंतु विलाज नाही आलेल्या दिवसाला तोंड देणे एवढेच बाकी होते. माझे वय कमी मला शेतीकामाला कोण देईल का हा विचार मी मनात करीत होतो. माझी आई शिंदे अण्णांच्या द्राक्ष बागेमध्ये काम करत होती मी ही शिदे अण्णांच्या द्राक्ष बागेमध्ये कामाला जावे असा मी मनामध्ये विचार केला. नाचार आला म्हणून विचार सोडू नये हे माझ्या आईचे वाक्य आहे मी मनाचा निर्णय केला आणि अण्णांच्या बागेमध्ये कामाला गेलो. हे काम करीत असताना मला काम करणारे सारे सौंगडी भेटले त्यामध्ये अशोक शिंदे. शिवाजी शिंदे गणपत शिंदे भीमा मामा अशी मंडळी मला भेटली. आमच्या घरची परिस्थिती पाहून या माणसानी प्रत्येक वेळी मला कामांमध्ये सांभाळून घेतले…।
सन १९९८ मधला श्रावण महिना...नुकत्याच भात लावण्या संपलेल्या होत्या.शेतकरी वर्ग थोडा निवांत झाला होता.शेताची उरलेली कामे,जनावरासाठी हिरव्या गवताच्या पेंढ्या कापुन आणने जनावरे सांभाळणे येवढीच काय ती कामे करायची.बाकी निवांत....
ग्रामीण भागात श्रावण महिन्यातील अतिशय सुंदर व मनमोहक वातावरण असते.सगळीकडे हिरवेगार डोंगर..व डोंगर द-यातुन पांढरेशुभ्र खळखळणारे ओढे- नाले,ओहळ आणि दुथडी भरून वाहणारी नदी..मधेच एखादी पावसाची जोरदार सर तर थोड्याच वेळात पडणारे उन व साथीला पडणारे इंद्रधनू असे विलोभणीय दृश्य असते..
गावात अनेक ठिकाणी ग्रंथ.पोथ्या- पुराणांचे पारायण असायचे.सोमवार,गुरूवार,शनिवार उपवास..असायचा.
त्या दिवशी सोमवार होता..मी आँफिसमधून नुकताच घरी येऊन हातपाय धुऊन बसलो होतो.दिवसभर उपवास असल्यामुळे कधी एकदा जेवण करतो असे झाले होते..
आणिअचानक आमच्या घरी गावातील श्री.गणपत मोहन आले.आणि म्हणाले..कपडे घालुन तयार व्हा..दामू मोहन यांच्या बायकोला सर्पदंश झाला आहे.ताबडतोब चला...दामू मोहन व त्यांचे कुटुंब म्हणजे गावातीलआदर्श कुटुंब..सर्वाबरोबर मिळुनमिसळून राहणारे कुटुंब..विशेष म्हणजे आमच्या वडीलांचे दामू मोहन हेअत्यंत
जवळचे मित्र ...
सर्पदंश म्हटल्याबरोबर कपडे घातले व जेवण न करताच लगेचच मोटार सायकल घेऊन श्री,गणपत मोहन यांना घेऊन त्यांच्या घरी निघालो.
तेथे संपुर्ण गावातील व वाड्या वस्त्यांतील खुप लोक जमा झालेले..
दामू मोहन यांची पत्नी अर्धवट बेशुद्ध अवस्थेत झोपलेली..खुप लोकांचे म्हणने असे की तीला डाँक्टर कडे घेऊन न जाता गोट्या कातक-याकडे न्या.तो औषध देईल..तेथे देवीची भक्तीन पण आहे.ती काहीतरी अंगारा देईल...मी म्हणालो..आपण डेहणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊया..परंतू खुप लोकांनी विरोध केला..त्यांचे म्हणने असे की दवाखान्यात डाँक्टर नसतात.औषधे नसतात.डेहणे थोडे लांब आहे...विष शरीरात भिनत चालले आहे..तीथ पर्यत पेशंट जगला पाहिजे....त्यापेक्षा विठ्ठलवाडी हे अंतर जवळ आहे..
लोकांच्या प्रतिक्रिया ऐकण्यापेक्षा पेशंटला उपचार मिळणे अतिशय महत्त्वाचे होते..मी माझ्या मोटारसायकलवर मी, संर्पदंश झालेल्या काकू,माझा चुलत भाऊ मारुती धर्मा तळपे व गावातील समाजसेवेची आवड असनारे व गावच्या धार्मिक कार्यात भाग घेणारे श्री.कमाजी (म्हतारबा) हुरसाळे असे चौघे निघालो.शिरगावला आल्यावर डेहण्याला जायचे की विठ्ठलवाडीला असा संभ्रम पडला..मारुती म्हणाला विठ्ठलवाडी तर कमाजी म्हणाला डेहणे..शेवटी मी डेहण्याकडे गाडी वळवली....
धुओली गावाजवळ गेल्यावर काकुंनी मान टाकली..नाडीचे ठोके थांबले...मारुती म्हणाला..गाडी मागे वळव...पेशंट संपला...माझ्या हृदयात चर्रर्र झाले...गावातील लोक आता आपल्याला खुप बोलतील व पेशंट गेल्याचा बधूपणा आपल्यावर येईल.याचे शल्य टोचत राहणार.असा विचार येऊन गेला विचाराच्या.तंद्रीत.तशीच गाडी घेऊन रात्री ८.३० वा. डेहणे गाठले..दवाखान्यात गेलो तर तेथे कुनीच नव्हते...त्यातच लाईट गेलेली..त्यामुळे अजुनच अस्वस्थ वाटू लागले.नको ते विचार मनात येऊ लागले.आणि अशातच एका स्रीचा आंधारातुन आवाज ऐकू आला..कोण आहे..?..बहुदा त्या रात्रपाळीच्या नर्स असाव्यात...
या बाईला सर्पदंश झालाय...
डाँक्टर आहेत का? मी विचारले..
हो आहेत...
थांबा मी बोलावते..
असे म्हणून नर्सबाई गेल्या.व लगेचच डाँक्टर व नर्सबाई भलीमोठी इमर्जन्सी ट्युब (विजेरी) घेऊन आल्या..
पेशंटला काँटवर झोपवण्यात आले.
डाँक्टरांनी काकूंना तपासले..तपासुन झाल्यावर डाँक्टर बोलले.पेशंट जगण्याची फक्त ५% खात्री आहे.खुप उशिर झाला आहे,. तरीही मी प्रयत्न करतो.बघुया..
तेवढ्यात कमाजीने प्लँस्टिक पिशवी डाँक्टरांकडे दिली.त्यामध्ये काकूंनी मारलेला साप होता..
डाँक्टरांनी साप निरखून पाहिला.व बोलले.Good,आता आपल्याला उपचार करणे खुप सोपे झाले..
तात्काळ काकूंना सलाइन लावण्यात आले.व त्यामध्ये इंजेक्शन भरले.सलाइन.संपल्यावर पुन्हा दुसरे..अशा प्रकारे तीन-चार सलाईन लावली.तो पर्यंत गावातील खुप लोक आले होते.व वेगवेगळ्या चर्चा करत होते..थोड्याच वेळात काकुंनी डोळे उघडले..सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.नववे सलाईन व औषध संपल्यावर काकू बोलू लागल्या..
त्यानंतर मला भुकेची तीव्र जाणीव झाली..तो पर्यंत उपवास असुनही भुकेची साधी आठवणही आली नाही हे विशेष..।
-- श्री.रामदास तळपे (मंदोशी ) ता.खेड जि.पुणे

तो माझ्याशिवाय जगू शकणार नाही हे त्याने कबूल केले. तो मला म्हणाला की, “तू मला एक संधी दे. मी तुला सिद्ध करून दाखवतो की काही झालं तरी मी यापुढे तुझ्याशिवाय कोणत्याही मुलीशी फ्री वागणार नाही. तुला न आवडणारी एकही गोष्ट मी करणार नाही.’
Copyright © 2025 | Marathisrushti