(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • धौम्य व उपमन्यू

    फार प्राचीन काळी धौम्य या नावाचे एक महान ऋषी होऊन गेले. ते आपल्या शिष्यांना केवळ ज्ञान देत नसत, तर ज्ञानाच्या जोडीला व्यवहार शिकवीत असत. त्यासाठी शिष्यांना आश्रमात पडतील ती कामे करावी लागत.

  • कुदरत की गत न्यारी !

    कुमारजींच्या गाण्यातला दर्द आत्ता त्याच्या ध्यानात आला. त्याच्या लक्षात आलं, सगळ्याला उशीर झालाय. सगळं संपत आलंय. कोरोना हे निमित्त झालंय, पण प्रत्यक्षात फक्त निर्गुणी भजन तेव्हढं चिरंजीव होऊन राहिलंय…

  • भुयारी रेल्वे

    खरं पहाल तर भुयारी रेल्वे हा एकच मार्ग आहे. काही कोटीत ती वीस-पंचवीस वर्षापूर्वी तयार झाली असती. आता हजारो कोटी लागतील. त्यावेळी का झाली नाही? उत्तर नाही. गेटवेपासून उरणपर्यंत पूल का बांधला नाही? उत्तर नाही. या शहराच्या कोणत्याच प्रश्नाला उत्तर नाही.

  • एक होती कळी

    एक होती कळी. सुंदर, टपोरी. जाणाऱ्या येणाऱ्यांच्या नजरा तिच्यावर पडल्या की, लोक म्हणायचे काय सुरेख आहे ही कळी ! तो तो कळी भाव खायची. आपल्या सौंदर्यावर भारी भरायची. मस्का मारायची. शेजारच्या कळ्या तिच्याशी बोलायच्या, हसायच्या. पण कळी काही कुणाशी बोलायची नाही की, हसायची नाही की, खेळायची नाही.

  • पाणिनीची प्रतिज्ञा

    आपल्या हातावर अनेक प्रकारच्या रेषा असतात. ज्योतिषशास्त्राच्या मते त्यातील काही रेषा विद्येच्या, धनाच्या तसेच आयुष्याच्या कालमर्यादेच्या असतात. अर्थात अनेकांच्या मते हे थोतांड आहे. त्यामुळे बऱ्याचजणांचा हातावरील या रेषेवर विश्वास नसतो. मात्र या संदर्भात प्रसिद्ध व्याकरणकार पाणिनी यांची मजेदार कथा सांगितली. पाणिनी तरुण असताना एका आचार्याकडे शिक्षण घेत होता. पाणिनीसारखेच आचार्यांचे असंख्य शिष्य त्यांच्या आश्रमात त्यांच्याकडून शिक्षण घेत होते. एकदा आचार्यानी सर्व शिष्यांना एक गृहपाठ दिला व दुसर्‍या दिवशी त्याची संपूर्ण तयारी करून द्यायला सांगितले. अनेक शिष्यांनी गृहपाठ तयार केला होता, मात्र काही शिष्यांची या ना त्या कारणामुळे गृहपाठाची तयारी झाली नव्हती. त्यामध्ये पाणिनीही होता. दुसऱ्या दिवशी सर्व शिष्य एकत्र आल्यावर आचार्यानी त्यांना गृहपाठाविषयी विचारायला सुरुवात केली. ज्यांचा गृहपाठ तयार नव्हता अशा शिष्यांना त्यांनी छडी मारायला सुरुवात केली. छडी खाल्लेले शिष्य आपापल्या जागी जाऊन बसले. पाणिनीची वेळ आली तेव्हा त्यानेही आपला हात पुढे केला. त्याचा हात पाहताच आचार्य म्हणाले, ' अरे, तुझ्या हातावर तर विद्येची रेषाच नाही. मग तू कसला गृहपाठ करणार. जा तुझ्या जागेवर जाऊन बैस. ' असे म्हणून आचार्यांनी पाणिनीला छडीही मारली नाही. आचार्यांचे ते म्हणणे ऐकून इतर सर्वशिष्यांना हसू आले. पाणिनीला त्याचा भयंकर अपमान वाटला. त्याने तेथेच प्रतिज्ञा केली, की मी एवढा अभ्यास करेन, की माझ्या हातावर विद्येची रेषा काढीनच. त्यानंतर त्याने संस्कृत भाषेचा परिश्रमपूर्वक अभ्यास करून 'व्याकरणकार पाणिनी' म्हणून नावलौकिक मिळविला.

  • सैनिकाच्या मुलाची दिवाळी

    दिवाळी जवळ आली होती. शकुंतला हॅास्पिटलमधील नित्याची कामे पटापट करत होती. संवयीने बिनचूक करत होती पण आज तिच्या मनांत मुलाची काळजी होती. मुलगा राजस आता नऊ वर्षांचा झाला होता. घरी एकटाच होता. वर्षांपूर्वी आजी गेली आणि तो खरंच एकटा पडला. आजी गेली तेव्हां बाबा येऊन लगेच परत गेले. जास्त रजा नव्हती त्यांना. आता परत कधी येतील, कुणास ठाऊक? सैनिकाचा काय भरोसा? त्याचे सुखरूप येणे हेच महत्वाचे! यंदा दिवाळीला फक्त दोघंच असणार होती घरी, ती आणि राजस. दिवाळीची कांहीच तयारी तिला करतां आली नव्हती. बऱ्याच सहकारी नर्सेस रजेवर होत्या. तिला रजा तर मिळत नव्हतीच पण अधून मधून डबल ड्यूटी करावी लागत होती. दोन दिवसांवर दिवाळी आली होती. विशेष खरेदी तर सोडाच पण निदान फराळासाठी लागणारं सामान आणि राजस साठी थोडे कपडे घ्यायला हवे होते ना! ह्यांतल कांही तिला करतां येत नव्हतं. तिला मदत करायलाही कुणी नव्हतं. राजस घरी एकटाच असायचा. शेजारी चांगले होते पण ते सतत कसे पहाणार. कितीही चांगल्या ठीकाणी राजस रहायला तयार नव्हता. तो आता पाळणाघरांत रहायला काय लहान होता काय?

  • एक परीस स्पर्श ( भाग – ३४ )

    मूंबईतील प्रत्येक गल्लीत एक दोन कुत्री असतातच आणि ती बाहेरच्या माणसांवर हमखास भुंकत असतात आणि कधी कधी चावाही घेत असतात. त्या कुत्र्यांना गोंजारणाऱ्या लोकांचा विजयला प्रचंड राग येतो. काही महिन्यांपूर्वी विजय जेंव्हा मॉर्निंग वॉकला जात होता. तेंव्हा त्याला काही लोक सकाळी स्वतः चालायला येतात कि कुत्र्याला चालवायला घेऊन येतात तेच कळत नव्हते. विजयने त्या कुत्र्यांना रस्त्यावर घाण करताना पहिले कि त्याच्या तळपायाची आग मस्तकात जायची. विजयच्या मनात कुत्र्याविषयी बसलेली ती भीती अजूनही नाहीशी झालेली नाही. विजय तर या मताचा आहे की मुंबई या भटक्या कुत्र्यांपासून पूर्णपणे मुक्त व्हायला हवी.

  • एक परीस स्पर्श ( भाग – १८ )

    मेनका त्याच्या आयुष्यात आलेली एकमेक मुलगी होती. जी त्याची सच्ची मैत्रीण आणि प्रेयसी होती. विजयला माहित होते की तिचे त्याच्यावर प्रेम आहे पण तिला माहित नव्हते की विजयचेही तिच्यावर प्रेम होते. मेनका जर स्वतःच्या तोंडाने म्हणाली असती की तिचे त्याच्यावर प्रेम आहे! तर विजयने नक्कीच तिच्याशी विवाह केला असता. पण ती व्यक्त झाली नाही आणि विजयला व्यक्त व्हायचं नव्हतं. प्रेमात मुली सहसा पहिल्यांदा व्यक्त होत नाहीत हे विजयला उशीर कळले म्हणून अनामिका समोर त्याने त्याचे हृदय मोकळे करण्याचा प्रयत्न केला पण ते जमले नाही की ते तिला कळले नाही.

  • प्रेम काय काय करायला लावते

    प्रेमकथा

  • सार्वजनिक वाचनालयांतील एक पुस्तक

    मुंबईच्या XXXX उपनगरापैकी एकात दीड महिन्याच्या कालावधीत तिघांनी आत्महत्या केली होती.
    तीनही प्रकरणात ती आत्महत्या होती की खून होता, हे सांगता येत नव्हते.