(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

  • मला माहीत आहे

    मी आणि ती ‘ हल्ली अनेकांना आवडत आहे , अर्थात कारण मला ती आवडते .

  • गुंतता

    लहान असेंन मी त्यावेळी आठवी नववीत जेव्हा त्यांचे लग्न झाले तो गावाकडचा पण शहरात स्थायिक झालेला, चांगली नोकरी होती परंतु लगेचं करत नव्हता. एकदाचे त्याने उशीरा का होईना लग्न केले. ती पण जरा जास्त वयाची होती, थोडी रखडलेली होती. कमी शिकलेली , मॅट्रिकपर्यंत घरात गावी सगळी कामे करत असे.

  • खेड्यातले येडे

    लहानपणापसुन गण्या खेड्यातच राह्यलेला आसते.त्यालं त्या खेड्याच्या बाहिरच कायबी माहीत नसते…….त्यानं आयुष्यात कव्हा त्याच्या गावच्या बाहिर गेलेला नसते.गण्या नेमकाच मॅट्रिक पास झालता.त्याच्या गावातले बरेच जनं मॅट्रीकनंतर शहरात कामधंद्यासाठी जायाचे,पिर्‍या,मव्हण्या,सुरश्या,संज्या,ज्ञान्या आसे बरेचजनं मॅट्रीकनंतर शहरात गेलते.ते गावाकडं आले कि शहरातल्या लय गप्पा टप्पा सांगायचे.शहरातले लोकं आसे राहतातं,तसे राहतातं.

  • एक परीस स्पर्श ( भाग – ९ )

    त्याक्षणी विजयला लक्षात आले हा माणूस  खूपच घमेंडी आणि कुसका आहे. त्याला धंदा करायची अक्कल नाही. तो जीवनात कधीही फार यशस्वी होणार नाही. त्याक्षणी विजयने निर्णय घेतला यापुढे याच्या दुकानात कधीही पाऊल ठेवायचे नाही.

  • समृध्द प्रेमाची भेट (संक्षिप्त रुपांतरीत कथा २६)

    ह्या कथेवर १८ चित्रपट झाले. शिवाय लहान पडद्यावर अनेक कथा, मालिकांत ही गोष्ट घेण्यांत आली. शाळा/महाविद्यालये यांच्या अभ्यासक्रमांत आली. कथा इतकी लोकप्रिय आहे की ती छोट्या रूपात लेखकाचे नाव न देता सामाजिक माध्यमांवरही फिरते. खूप लोकप्रिय हळवी कथा.

  • युगांतर – भाग ९

    सुमंत जयंत परचुरे. 

    रवींद्रची पाण्यातली हालचाल मंद होऊ लागली होती. त्याचा श्वास कमी कमी होत चालला होता. तो वाचवायला आला होता खरा त्या बाळाला, पण पाण्यात उडी मारल्या पासून तो जणू काही स्वप्नातून सत्यात उतरला होता. त्या बाळाला आणि त्या अण्णांच्या सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला त्या काळोखात शोधत होता. पण तो सोडून त्या पुष्करणी मधे बाकी कोणाचंही नामोनिशाण नव्हतं. तो आता स्वतःला वाचवायच्या स्थितीतही नव्हता, त्याचा श्वास खूपच मंद होत होता आणि तो जणू आता जलसमाधी मिळणार या स्थितीत त्या पुष्करणी च्या तळाशी त्या काळोख्या रात्री बुडत होता. तळाशी बऱ्याच वेली होत्या, गाळ बसून झालेला चिखल होता. त्याचे डोळे हळूहळू मिटत होते, हात आणि पाय आता सैल झाल्या सारखे स्तब्ध झाले होते.

  • मुंगी आणि टोळ (संक्षिप्त रूपांतरीत कथा २३)

    जेव्हा मी लहान होतो, तेव्हां मला कांही नीतीकथा पाठ करायला लावल्या होत्या आणि त्यांचे तात्पर्य नीट समजावून सांगण्यात आलं होतं.
    त्यांतलीच एक कथा होती, ‘मुंगी आणि टोळ.’ ह्या अपूर्ण जगांत जो उद्योगी राहतो त्याला बक्षिस मिळतं आणि आळशी किंवा मौज करत रहाणा-यांस शिक्षा मिळते, हा धडा मुलांच्या मनावर ठसवण्यासाठी ही नीतीकथा.
    ही कथा सर्वांना माहिती असणारच तरी मी सांगतो की ह्या कथेत एक मुंगी उन्हाळ्यांतला प्रत्येक दिवस खूप मेहनत करून पावसाळ्यासाठी भरपूर अन्नाची बेगमी करत असते तर एक टोळ गवतावर बसून गाणी गात असतो.
    पावसाळा येतो.
    मुंगीकडे भरपूर अन्न असल्यामुळे ती आरामात असते तर टोळाकडे कांहीच खायला नसल्याने तो मुंगीकडे जातो आणि थोडं खायला मागतो.
    मग मुंगी तिचं ते सुप्रसिध्द उत्तर देते,
    “उन्हाळ्यांत काय करत होतास?”
    टोळ म्हणतो, “मी गवतावर बसून गात होतो.”
    मुंगी म्हणते, “मग जा आता नृत्य कर.”
    मी स्वत:ला विकृत समजत नाही तरीही लहानपणी मला समज कमी असल्यामुळे असेल, मी ह्या गोष्टीशी कधीही सहमत झालो नाही.
    माझी टोळाला सहानुभूती होती.
    कांही काळ तर मी मुंगी दिसली की पायाखाली चिरडत असे.
    अशा पध्दतीने ही गोष्ट व तिचे तात्पर्य न आवडल्याचा रोष मी प्रगट करत असे.
    मी त्या दिवशी रामला एका हॉटेलमधे एकटा बसलेला पाहिलं तेव्हा मला ह्या गोष्टीचीच साहजिक आठवण झाली.
    त्याच्या चेहरा म्लान दिसत होता.
    सर्व जगातलं दु:ख त्याच्या डोक्यावर असावं असं भासत होतं.
    मला त्याची कींव आली.
    मला वाटलं की त्याचा कमनशिबी भाऊ लखन ह्याने त्याच्यासाठी पुन्हा कांहीतरी घोटाळा करून ठेवला असणार.
    मी त्याच्याजवळ जाऊन बसलो.
    मी विचारले, “राम कसा आहेस?” त्याने उत्तर दिले, “मी कांही मजेत नाही.”
    मी विचारले, “परत लखनचा कांही घोटाळा?”
    तो सुस्कारा सोडत म्हणाला, “हो. लखनचीच नवी भानगड.”
    मी म्हणालो, “आजवर तू त्याला एवढी मदत केली आहेस तर आता त्याची जबाबदारी घेणं बंद कर.”
    मला वाटते प्रत्येक कुटुंबात एखादं चुकांवर मेंढरू असतंच!
    लखन गेले वीस वर्षे भारभूत होऊन बसला होता.
    त्याने आयुष्याला सुरूवात चांगली केली, लग्न केलं, दोन मुलं झाली, धंदा करू लागला.
    त्यांच उपाध्याय कुटुंब खानदानी होतं, सुरतमधे प्रसिध्द होतं आणि लखनही यशस्वी आणि प्रतिष्ठीत होईल ह्याची सर्वांना खात्री होती.
    पण एक दिवस त्याने जाहिर केलं की त्याचं धंद्यात व संसारात मन रमत नाही.
    तो गृहस्थीसाठी लायक नाही असं सांगून बायको आणि धंदा दोन्ही सोडून निघून गेला. कोणाचं कांही ऐकलं नाही. लखनकडे थोडे पैसे होते.
    दोन वर्षे चक्क वेगवेगळ्या शहरांमध्ये, काही काळ परदेशीसुध्दा, फिरत तो पैसे कसेही उडवत राहिला.
    त्याच्या उधळपट्टीच्या आणि व्यसनांच्या गोष्टी उपाध्याय कुटुंबाच्या कानावर येत.
    सुरूवातीला त्यांना वाटे की हा पैसे संपले की परत येईल.
    पण तसं कांही झालं नाही.
    त्याची उधळमाधळ चालूच राहिली.
    मग त्यांना कळले की तो पैसे कर्जाऊ घेत होता.
    तो उमदा आणि धूर्त होता.
    ज्याने कर्ज मागितल्यावर ‘नाही’ म्हणणं जड जाईल असा त्याच्याइतका समोरच्यावर छाप टाकणारा दुसरा कुणी मला ठाऊक नाही.
    तो आपल्या मित्रांकडून सहज पैसे उकळत असे आणि नवे नवे मित्रही सहज जोडत असे.
    तो नेहमी म्हणे की गरजेसाठी खर्च करण्यात ती मजा नाही जी चैन करण्यासाठी खर्च करण्यात आहे.
    ह्या मोठ्या खर्चासाठी लखन, त्याचा मोठा भाऊ राम, याच्यावर अवलंबून असे.
    त्यासाठी तो आपला प्रभाव वगैरे कांही वापरत नसे. राम अतिशय रूक्ष होता आणि त्याच्याकडे ह्या गोष्टींना थारा नव्हता.
    राम समाजात एक आदरणीय व्यक्ती होता.
    एकदा दोनदा तो लखनच्या सुधारण्याच्या वचनांना भुलला पण जेव्हां त्या मोठ्या रक्कमेतून त्याने कार आणि उंची सूट खरेदी केले, तेव्हा रामने पैसे द्यायला नकार दिला.
    मग लखन त्याला ब्लॅकमेल करू लागला.
    राम एक यशस्वी वकील होता.
    लखन त्याच्या ऑफीसच्याबाबेर टॅक्सीचालक म्हणून उभा राही.
    लखन म्हणे, “टॅक्सीचालक होण्यांत काय वाईट आहे?”
    कधी कधी राम ज्या हॉटेलात जाई, नेमका तिथेच वेटर म्हणून येऊन लखन समोर उभा राही. आपला भाऊ ज्याला सर्व ओळखतात, तो ह्याच शहरांत तोही वेटर किंवा टॅक्सी ड्रायव्हर असणं रामला परवडण्यासारखं नव्हतं.
    त्याऐवजी लखनला पैसे देणंच त्याला ठीक वाटे.
    एकदा तर लखन अगदी तुरूंगातच जाणार होता.
    राम खूप अस्वस्थ होता. त्याने झाल्या प्रकाराची माहिती घेतली.
    लखनने सा-या मर्यादा ओलांडल्या होत्या.
    तो उधळ्या, स्वार्थी, चैनी होता पण कायद्याचे उल्लंघन करणारा नव्हता.
    ह्यावेळी मात्र त्याने ती मर्यादा मोडली होती. जर त्याच्यावर खटला भरला असता तर तो नक्कीच तुरूंगात गेला असता.
    पण रामला आपला एकच भाऊ तुरूंगात गेलेला कसं चाललं असतं.
    कानजीभाई नांवाच्या सूडबुध्दीने वागणा-या माणसाला लखनने ५०,००० रूपयांचा गंडा घातला होता आणि तो वसुलीसाठी कोर्टात जाणार होता.
    कानजीभाई म्हणाला, “लखनसारख्याला धडा शिकवलाच पाहिजे. त्याला तुरूंगात जावं लागलं की तो शुध्दीवर येईल.”
    रामने कानजीभाईला समजावण्यासाठी मध्यस्थ गांठून, खूप खटपट करून आणि त्याचे पन्नास हजार देऊन, ते प्रकरण कसंबसं मिटवलं होतं.
    दोन दिवसांनी रामच्या खात्यांतून त्याने कानजीभाईला दिलेल्या पन्नास हजारांच्या चेकचे पैसे वजा झाले, त्याच वेळी त्याच्या कानावर आलं की तोंच कानजीभाई आणि लखन दोघे मिळून मुंबईला जुगार खेळायला गेलेत. तेव्हां तो भयंकर चिडला होता.
    इतका क्रोध कुणाला कधी आलेला मी पाहिला नव्हता.
    वीस वर्षे लखन रेस, जुगार, मुली, महागडी हॉटेल्स आणि छानसे कपडे ह्यावर लखन पैसे खर्च करत राहिला.
    तो अगदी सुटाच्या जाहिरातीतला माणूस वाटे.
    त्याचं सत्तेचाळीसावं वर्ष चालू होतं पण पहाणा-याला तो पस्तीशीचा वाटे.
    तुम्हाला जरी माहिती असलं की लखन असा छंदीफंदी आहे तरी तुम्हाला त्याची सोबत आवडली असतीच, असे त्याचे वागणे/बोलणे असे.
    तो नेहमी प्रसन्न असे, उत्साही असे आणि झोकातही असे.
    मलाही त्याच्या जगण्याला मदत म्हणून कांही वेळां चार-पांचशेची फोडणी बसे, त्याचं मला कांही वाईट वाटत नसे.
    मी जेव्हा त्याला पांचशे रूपये उसने (ते परत कधीच मिळत नसत.) देत असे, तेव्हा मलाच वाटे की मी त्याच्या ऋणांत आहे.
    सगळे मोठे लोक लखन उपाध्यायला ओळखत आणि लखनही सगळ्यांना ओळखत असे.
    तुम्ही त्याचं वागणं योग्य म्हणू शकत नव्हता पण तरीही तो तुम्हाला आवडत असे.
    आणि बिचारा राम उपाध्याय.
    त्याच्या अवलक्षणी भावापेक्षा फक्त एका वर्षाने मोठा पण आताच बिचारा साठीचा वाटू लागला होता. गेल्या पंचवीस वर्षांत त्याने कधी सुट्टी घेतली नव्हती.
    सकाळी साडेनऊला तो आपल्या कचेरीत हजर असे आणि संध्याकाळ उलटल्यानंतरच घरी परत येई.
    तो प्रामाणिक होता, उद्योगी होता आणि त्याची योग्यताही मोठी होती.
    त्याची सुशील पत्नी होती आणि तो कधी मनानेही पत्नीशी बेइमान झाला नव्हता.
    त्याला तीन मुली होत्या.
    त्याने त्या तिघींचे लालन पालन, शिक्षण मनापासून केले होते.
    तो आपल्या उत्पन्नाचा एक तृतीयांश भाग बचत करत असे कारण त्याची इच्छा होती की साठीनंतर काम करत न राहतां गांवी छोटसं घर घ्यायचं आणि बागकाम करायचं.
    त्याच्या आयुष्यात नाव ठेवण्यासारखी गोष्ट नव्हती.
    त्याचं वय वाढत होतं, त्याचाही त्याला कांही वाटत नव्हतं कारण लखनचही वय वाढत होतं.
    तो नेहमी म्हणत असे, “आता चार वर्षांत लखन पन्नाशीचा होईल.
    तरूणपणीचे रूप आणि रूबाब त्याला पन्नाशीत सोडून जातील.
    मग त्याला कोण विचारणार आहे?
    पैसे नसतांना कोण त्याच्याशी मैत्री करणार आहे?
    त्यावेळी माझी बचत कित्येक लाखात असेल आणि लखन गटारांत लोळत असेल.
    तेव्हा त्याला ते आवडेल कां?
    मग त्याला कळेल की उद्योगी असणे चांगले की नुसतीच मौजमजा करणे चांगले ते!”
    बिचारा राम! मी विचारांत पडलो.
    लखनने आणखी कांहीतरी भानगड नक्कीच करून ठेवली असणार.
    आता आणखी असं काय केलं असावं, ह्याचाच मी रामच्या बाजूला बसून विचार करत होतो.
    राम खूपच उदास आणि विमनस्क दिसत होता.
    रामने मला विचारले, “आता त्याने काय केले माहित आहे?”
    लखनने अगदी वाईटात वाईट गोष्ट केली आहे, असं आता ऐकावं लागणार, अशी मी मनाची तयारी केली.
    बहुदा लखन तुरूंगात तरी असावा किंवा लौकरच जाणार तरी होता असावा.
    रामच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. जेमतेम धैर्य गोळा करून तो बोलू लागला, “माझं संपूर्ण आयुष्य मी प्रामाणिकपणे मेहनत करत राहिलो, सर्वांचा आदर मिळवला, संयमाने वागलो. मेहनतीचं, शिस्तीचं आणि काटकसरीचं जीवन मी नेहमी जगत राहिलो, तेव्हा कुठे मी समाधानी निवृत्तीचं जीवन जगण्याचं स्वप्न पाहिलं. दैवाने माझ्या वाट्याला आलेली आयुष्यातली सर्व कर्तव्यं मी नीट पार पाडली.”
    मी म्हणालो, “खरं आहे.”
    राम पुढे म्हणाला, “आणि तू हे नाकारणार नाहीस की लखन हा आळशी, अप्रामाणिक, निरूद्योगी जीवन जगला. जगांत जर न्याय असेल!”
    मी म्हटलं, “हे ही खरं आहे.”
    पुढे बोलतांना राम लालबुंद झाला व म्हणाला, “दोन महिन्यांपूर्वी निरूद्योगी लखनने त्याची आई शोभेल अशा वृध्द बाईशी लग्न केलं आणि आतां ती वारली. मरण्याआधी तिने आपली सारी इस्टेट, ज्यांत एक इथला एक बंगला, एक मुंबईचा वरळीचा फ्लॅट, एक गावाकडचं घर, बॅंकेतले पन्नास लाख रूपये आणि वीस लाखांचे शेअर्स आहेत.”
    असं म्हणून रामने टेबलावर मूठ आपटली.
    “हाच ईश्वरी न्याय आहे कां? हे योग्य आहे कां? नाही हा तर माझ्यावर अन्याय आहे.”
    मी स्वत:ला आवरू शकलो नाही.
    मी हंसत सुटलो, अगदी जोर जोरांत. (लखनला मदत करणारा भाऊ राम, लखन अचानक श्रीमंत होतोय हे ऐकून मत्सराने दु:खी कां व्हावा? ख-या आयुष्यांत निरूद्योगी टोळाची मजा झाली होती. मला हंसू येणारच ना!)
    मी हंसलो ते रामला आवडलं नाही. तो आता माझ्याशी बोलत नाही.
    लखन मला अधून मधून बंगल्यावर मेजवानी देतो.
    कधी कधी तो माझ्याकडून उसने पैसेही मागतो पण ते केवळ संवयीमुळे आणि पन्नास रूपयांहून अधिक नाही.
    -- अरविंद खानोलकर.
    मूळ कथा - ॲंट ॲंड ग्रासोफर
    लेखक - डब्ल्यू. सॉमरसेट मॉम ( १८७४-१९६५)
  • होळी

    घड्याळात साडे आठ वाजलेले पाहून जयश्री ताईंनी दोन्ही मुलांना झोपेतून उठवायला सुरुवात केली ” मनिष…..अरे बाळा उठा आता, बघ जरा घड्याळात .. साडे आठ झाले …मृण्मयी ..चला उठा …आज होळी साठी जायचंय ना तुम्हाला तयारी करायला? चौकात सगळी मुलं आली बरं का ! ” शेवटच्या वाक्याची मात्रा मात्र लगेच लागू पडली आणि दोघं ही ताडकन उठून बसली …

  • श्रावणबाळ

    श्रावण नदीवर आला. त्याने लोटा धुतला आणि तो पाण्यात बुडविला. लोट्यात पाणी भरताना त्याचा आवाज झाला. दशरथ राजाने तो आवाज ऐकला. त्याला वाटले, हत्तीच पाणी पिऊ लागला आहे. आवाजाच्या दिशेने त्याने बाण सोडला आणि “आई ग!” अशी आर्त किंकाळी त्याच्या कानावर पडली. घात झाला असे वाटून तो घाईघाईने नदीवर आला. श्रावणाच्या बरगडीत बाण घुसल्याचे त्याला दिसले. रक्त भळाभळा वहात होते. धावत जाऊन त्याने श्रावणाचे मस्तक आपल्या मांडीवर घेतले.

  • बिबट्या खेळवणाऱ्याची गोष्ट (संक्षिप्त रूपांतरीत कथा १३)

    जॕक लंडन हा प्रसिध्द अमेरिकन कादंबरीकार, कथाकार व सामाजिक विषयांवर लिहिणारा लेखक म्हणून ओळखला जातो. व्यावसायिक नियतकालिकांमधून कथा/कादंबऱ्या मालिका स्वरूपांत लिहिणं व लोकप्रिय करणं ह्याचं श्रेय त्याला जातं. त्याने सेलर (खलाशी) म्हणून कांही वर्षे काम केलं. त्याकाळचा अमेरिकेतला “व्हायोलन्स” अनुभवला. तो आणि जगण्याचा झगडा त्याच्या लिखाणामधे दिसून येतो. त्याने पंधरा सोळा कादंबऱ्या, सुमारे तीनशे कथा व अनेक लेख लिहिले. व्यावसायिक दृष्ट्या लिखाणावर पैसे कमवून श्रीमंत होणारा तो पहिलाच लेखक. दुर्दैवाने तो केवळ चाळीसाव्या वर्षीच मरण पावला. प्रस्तुत गोष्ट त्याच्या इतर लिखाणाहून थोडी वेगळ्या धर्तीची आहे. परंतु तितकीच प्रसिध्द आहे. आपणांस आवडेल अशी अपेक्षा आहे. अभिप्राय जरूर कळवावा.