नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

विजयच्या वाचण्यात एक सर्वेक्षण आले हल्ली जास्त पैसे कमावणारे जास्त आंनदी असतात.आणि विजयला त्याच्या दुःखी असण्याचे कारण उमगले.चांगुलपणा म्हणून विजय केलेल्या कामाच्या पैशाचा फार विचार करत नसे.त्यामुळेच तो आयुष्यात आर्थिक दृष्ट्या यशस्वी होऊ शकला नाही. त्याने केलेल्या प्रत्येक कामाचा जर त्याने योग्य मोबदला घेतला असता तर आज तो आनंदी असता. आज त्याला स्वतःच्या सर्व आर्थिक गरजा भागवताना नाके नऊ आले नसते.
रसवंतीच्या दुकानावर वरील शब्द कानी पडले, आणि चमकून बघितले तर, एक अकरा बारा वर्षाचा कोवळा मुलगा अंगावर मळकट झालेले कपडे,तुटलेली पायातली चप्पल, व्हिटॅमिन्सच्या डेफिसियन्सी मुळे चेहर्यावरील पांढरे डाग. असे रूप घेऊन माझ्या नजरेस पडला. ‘बरं साहेब’ म्हणून तो लगबगीने रस काढावयाचा यंत्रा जवळ जाऊन, सराईतपणे दोन हातात चार रसाचे ग्लास घेऊन आला पटकन.
मी माझ्या बालपणात रमले आणि नकळतपणे आपल्या आणि त्या मुलाच्या बालपणाची तुलना करू लागले. आपले किंवा इतर सुखवस्तू घरातील मुलांचे बालपण किती सुखावह असते. सुरुवातीला चार पाच वर्षाचा काळ खूपच लाड होत असतो.त्यानंतरही तोंडातून पडेल तो शब्द झेलला जातो. अतिशय चांगल्या प्रतीचे शिक्षण होईल अशी शाळा निवडली जाते. कपड्यांचे खाण्याचे काय लाड होत असतात! हे असं होतं म्हणूनच असे निरागस बालपण पुन्हा पुन्हा यावे असे वाटून, ‘लहानपण देगा देवा’ तोंडातून सहजपणे बाहेर पडते.

आजी पुढे बोलू लागली, ….. ती म्हणाली, ” आता मी तुम्हाला आवळ्याचा खूप खूप महत्वाचा उपयोग सांगणार आहे. सगळेजण एकचित्त होऊन ऐका….”

ती त्या दिवशी माझा नंबर घेऊन गेली ती गेलीच. मी पण विसरून गेलो, म्हणा अशा अनेक भेटतात ..

लीसन कांचेतून दिसणाऱ्या ताऱ्याला सहज “बिली जॅक्सन” हे नांव देते आणि अखेर त्याच नांवाचा डॉक्टर रूग्णवाहिकेंतून तिला वाचवायला येतो. चेटकीणीचे पाव मधे प्रेमिकेच्या आशेचे अचानक निराशेत परिवर्तन झाले तर ह्या कथेत संपूर्ण दु:खद गोष्टी घडत अखेरचे वळण आशादायी करते.
तरूण कर्तव्यदक्ष डॉक्टर चार चार पायऱ्या ओलांडत जिना चढून जातो रूग्णवाहिकेत तिला खाली ठेवत नाही आणि तिला प्रयत्नांची पराकाष्ठा करून उपचार करत असतो.

घरी….आज काय आहे… माहीत आहे ना… काय आहे? गटारी… अरे विसरलेच.. आज तर भेटू. तू घरी आहे…आपल्याकडे स्टॉक आहे. मी म्हणालो…

मुंबईत राहणाऱ्या माणसाला काही वास येत असेल यावर माझा विश्वास नाही. चोवीस तास फॅक्टरीतलं प्रदुषण, चमत्कारिक वासाचे विषारी वायू, टनानं साठणारा कचरा, प्रचंड आकाराच्या दाट लोकवस्त्या, दलदल, चिखल, अपुऱ्या सोई यामुळे सकाळी उठल्यापासून झोपी जाईपर्यंत दुर्गंधीचं सदोदित आक्रमण होतच असतं.

तिचे वडील मला भेटले म्हणाले तू काहीतरी कर तिच्यासाठी . तिची अवस्था गेले वर्षभर तशीच होती. चांगले लग्न ठरले होते , मुलगा चांगला होता . पण एक दिवशी स्कुटरचा अपघात झाला आणि तो गेला. फक्त लग्नाची तारीख ठरायची राहिली होती.

“तुमची मानव जमात अगदी भांडखोर, क्षुद्र आणि कोत्या मनोवृत्तीची आहे. हेवा, दावा, स्वार्थ मत्सर शी. हे सगळे वाईट गुण आम्हाला आमच्या ग्रहावर नको होते. या गुणांची लागण आमच्यातल्या काही कमकुवत देवांनाही झाली. ते कोपिष्ट होऊ लागले. ज्याला त्याला शाप देऊ लागले. शेवटी आम्ही सर्वांनी ठरवलं की तुम्हा मानवांचा सहवासच टाळला पाहिजे. म्हणून एकूण एक मानवप्राणी शोधून काढला आणि पृथ्वीवर पाठवून दिला. बसा भांडत. आम्ही तुमच्यावर नजर ठेवून होतो. किती तन्हांनी भांडता येतं. किती तन्हांनी मानवा मानवात भेद पाडता येतात आणि लोकांना आणि स्वतःलाही कष्टी करता येतं हे तुमच्यावरून आमच्या लक्षात येत होतं. तुमचा अर्ध्यापेक्षा जास्त वेळ आणि शक्ती नुसती भांडणात आणि दुसऱ्यांचं वाईट करण्यात जाते

संगीताच्या बांद्रा पोलीस स्टेशनच्या खेपा वाढतच चालल्या होत्या. एक दोन वेळा पोलीसां बरोबर बिपीनच्या ऑफीस मध्ये चौकशी साठी जावे लागले. कलकत्ता ऑफीस काय काय काम करते, तेथे त्याचे कोणाशी संबंध होते, त्यांचे पत्ते टेलीफोन नंबर घेतले गेले.
Copyright © 2025 | Marathisrushti