नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

आरू आपल्याच नादात वर्णन करत होती, नील तिच्या चेहेऱ्याकडे पहात होता. आरुच्या तोंडून राजची माहिती ऐकताना त्याच्या चेहेऱ्यावर कधी आनंदाचे, कधी कौतुकाचे तर कधी दुःखाचे भाव झरझर बदलत होते. पण दोघेही नदीच्या पात्रात पाय ठेवून शेजारी बसले होते आणि बोलताना आरू नदीपात्राकडे पहात एक एक गोष्ट आठवत सांगत होती. त्यामुळे नीलच्या चेहेऱ्यावर तिचे अजिबातच लक्ष नव्हते.
आगरीकोळी समाजात हुंडा देत नाहीत आणि घेत नाहीत ही परंपरा आहे. आताच्या जमान्यात भाऊ बहिणीला हिस्सा द्यायला मागत नाहीत आणि बहिणी पण सोडायला मागत नाहीत.
पण काही बहिणींची माया अशी आहे की त्या अजूनही काय दिलं किंवा काय मिळणार असं मनात येऊ न देता लाडक्या भावाची माहेरी जाण्यासाठी आतुरतेने वाट बघत असतात.

निशा रोहनला म्हणाली, “रोहन, हे लोकं असं सहजासहजी माझं ऐकतील, असं मला वाटत नाही. चल, आपण जबरदस्ती त्यांच्या गाडीतून हॉस्पिटलमध्ये जाऊया.” असं म्हणून निशाने रोहनचा हात पकडला आणि ती जोरात ऍम्ब्युलन्सच्या दाराजवळ गेली. आत बसायला जागा कुठे आहे हे पाहण्यासाठी तिनं आत नजर टाकली आणि तिनं जोरात किंकाळी फोडली….. आणि ती दचकून मागं सरकली…..
बाहेर पाऊस वाढला होता हस्त नक्षत्राला सुरुवात झाली होती शिवाय दोन दिवसा मध्ये नवरात्राला सुरुवात होणार होती. या पावसाचे नक्षत्र मुळे शेतामध्ये भयंकर दलदल झाली होती. सफरातून बाहेर पडायची शिष्ट नव्हती इतका पाऊस वाढला होता त्यावेळी आम्ही सर्वजण आमच्या शेतामध्ये राहायला होतो. या पावसा मध्ये अधूनमधून वाऱ्याची झुळूक आली म्हणजे आंब्याच्या झाडाच्या डाळ्या एकमेकावर आदळत होत्या. सुनबाई च्या ओढ्याला भरपूर पाणी आले होते पूर्वेकडून वाहणारा सुनबाईचा ओढा पाण्याने भरभरून वहातहोता.

लग्नाला ६ महिने झाले होते, आएचे घर तर साफ तुटल्यासारखेच होते, बिपीनचा अहंकारी स्वभाव, आणी आईचा लग्नाला विरोध संगीताची चांगलीच कोंडी झालेली, पण कामच्या आनंदात ती बुडून गेली होती,

विजय कोणाच्याच चुकीच्या बोलण्याचे अथवा कृतीचे कधीच समर्थन करत नाही. विजयचे बोलणे कित्येकांना उद्धटपणा वाटतो. खरं तर विजयचं सहज बोलणंही एक विचार असतो हे लोकांना उशिरा लक्षात येतं.
संध्याकाळी प्रतिभा तिच्याकडील चावीने दरवाजा उघडून स्वयंपाकघरात रात्रीच्या जेवणाची तयारी करत असते इतक्यात दारावरची बेल वाजते … प्रतिभा स्वयंपाकघरातून धावत येऊन दरवाजा उघडते तर दारात यामिनी उभी असते… आता आल्या आल्या यामिनी सोफ्यावर अंग टाकते आणि
एरवी आईच्या आठवणीत आजीकडे जाऊन ती खूपदा रडायची पण सगळ्यांनी तिच्याशी प्रेमाने वागणारी आई आता परत येणार हे सांगितले तेव्हा पासून ती शांत होती. एकुलती एक असल्याने तिचे फारच लाड झाले होते .तिच्या वडिलांनी तिला काही कमी पडू दिलं नाही, पण पुढिल आयुष्य कसे जायचे म्हणून आजीने हट्टाने हा दुसऱ्या लग्नाचा घाट घातला.वनिता तिचे बाबा,आजी,आत्ता, काका अशी मोजकीच माणसे आवरून लग्नाला निघाली.वनिताचे बाबा शंकरराव वाड्यातल्या सोप्यात आपल्या पत्नीच्या फोटो कडे एकटक पाहत होते.”आपल्या वनिताला मी सांभाळेल तू काळजी करू नकोस’ हेच त्यांची नजर सांगत होती.तोवरच वाड्या समोर मोटर येऊन उभी राहिली.सारेच घाईने त्यात बसले.

सकाळी मालकीण त्याला घेऊन बाहेर यायची. कुत्रे भुंकायचे, तोही भुंकायचा. मालकीण सपासप त्याच्या पाठीवर वेताचे सपकारे ओढायची. तो फक्त कुंईऽकुंई करुन विव्हळायचा. त्याचं ओरडणं बंदच झालं ते बहुधा कायमचं. मनातल्या मनात दु:खाचे कढ पचवणाऱ्या माणसासारखा फिरताना तो मधून मधून विव्हळताना दिसतो.

विजयच्या वाचण्यात एक सर्वेक्षण आले हल्ली जास्त पैसे कमावणारे जास्त आंनदी असतात.आणि विजयला त्याच्या दुःखी असण्याचे कारण उमगले.चांगुलपणा म्हणून विजय केलेल्या कामाच्या पैशाचा फार विचार करत नसे.त्यामुळेच तो आयुष्यात आर्थिक दृष्ट्या यशस्वी होऊ शकला नाही. त्याने केलेल्या प्रत्येक कामाचा जर त्याने योग्य मोबदला घेतला असता तर आज तो आनंदी असता. आज त्याला स्वतःच्या सर्व आर्थिक गरजा भागवताना नाके नऊ आले नसते.
Copyright © 2025 | Marathisrushti