नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा
एक मौलवी होते. त्यांनी सगळीकडे आपल्या प्रामाणिकपणाचा प्रचार प्रसार केला. मशीदीत बसून दिवसभर मुलांना शिकवित असत आणि जी फी मिळे त्यात आपला उदर निर्वाह करीत असे. एक दिवस संध्याकाळी ते घरी आले आणि पत्नीला म्हणाले, “आज काय स्वयंपाक केला आहे. फार भूक लागली आहे.” ती म्हणाली, “आपण जेवावयास बसा. मी कोंबडा बनविला आहे.” “कोंबडा कुठून आणला?” मौलवीनी विचारले.
एक होता धोबी. गावाचे कपडे धुवायचा. मजेत रहायचा. धोब्याकडे एक गाढव होतं. गाढव मात्र मरतुकडं आणि म्हातारं होतं. सकाळ झाली की मालक मळलेल्या कपड्यांचा गठ्ठा गाढवाच्या पाठीवर टाकायचा. नदीवर जायचा.
सकाळी धुतलेले कपडे घेऊन घरी यायचा. रात्र होण्यापूर्वी मालक गाढवाची सुट्टी करायचा. एके दिवशी संध्याकाळी गाढव फिरायला निघालं. काम संपलं होतं. पाठीवर कपड्यांचं ओझं नव्हतं, आणि मालकाची किटकिटही नव्हती. अशा गाढवाला भेटला एक कोल्हा. दोघेही एकटे होते. कामातून मोकळे होते. त्यामुळे दोघांची चटकन बनली दोस्ती. मग दोघेही मित्र भोजनाच्या शोधात एकत्र फिरू लागले.
कुणी एकेकाळी हत्तीला चार पंख होते. जसा सकाळी कोंबडा बांग देतो
तसेच हत्ती पण देत होते. असंही म्हणतात की हत्तीवर बसून देव विश्वफेरीला
निघत असत. परंतु जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली आणि लोकांची वस्ती वाढली
तेव्हा नवनवीन अडचणी निर्माण होऊ लागल्या. आकाशात उडता उडता
थकवा आला की हत्ती घरांच्या छतावर येऊन बसत; त्यामुळे त्यांच्या वजनामुळे घरे पडायला लागली. काही माणसं मेली.
वनामध्ये युधिष्ठिराची चारही भावंडे मृत झाली होती. तो प्रसंग असा की, महाभारतात वनपर्वाच्या अखेरीस यक्षप्रश्नांचा प्रसंग वर्णिला आहे.
अकबर बादशाहच्या पदरी असलेल्या बिरबलाच्या चतुरपणांच्या गोष्टी प्रसिद्ध आहेत. त्यातीलच ही एक कथा.
अकबराच्या दरबारात एकदा एका गवयाचे गाणे झाले. ते गाणे अकबराला इतके आवडले, की त्याने त्या गाण्याला एक हत्तीच भेट दिला. ती भेट पाहून गवई आनंदी व्हायच्या ऐवजी दुःखीच झाला. कारण आधीच त्याच्या कुटुंबाचा चरितार्थ नीट चालत नव्हता. त्यात पुन्हा एवढ्या मोठ्या हत्तीला पोसणे त्याच्या दृष्टीने फारच अवघड होते. परंतु खुद्द बादशाहने हत्ती भेट दिल्यामुळे तो हत्ती नाकारू शकत नव्हता. शेवटी त्याने आपली अडचण बिरबलाला सांगितली. .बिरबलाने लगेच त्या गवयाला एक युक्ती सांगितली. त्याप्रमाणे गवयाने दुसऱ्याच दिवशी हत्तीच्या गळ्यात एक ढोलके व तंबोरा बांधला व त्याला राजधानीच्या मुख्य रस्त्यावर सोडले.
हत्ती जाताना इकडे तिकडे सोंड हलवी व ती ढोलक्यावर पडत असल्यामुळे ढोलके वाजत असे व तंबोराही अधूनमधून सूर देत असे. हत्तीचा हा अवतार पाहून बघ्यांची एकच गर्दी जमली. त्या गर्दीमुळे हत्ती बिथरला व मोकाट सुटला. शेवटी याची तक्रार बादशाहपर्यंत आली. बादशाहला खरा प्रकार
कळल्यानंतर त्याने गवयाला पकडून आणण्याचे आदेश दिला.
गवई आल्यावर अकबर बादशाह त्याला म्हणाला, 'मी तुला इनाम दिलेला हत्ती तू असा मोकळा का सोडलास!'त्यावर गवई हात जोडून बादशाहला म्हणाला, 'खाविंद माफ करा, मला या हत्तीचे पालनपोषण करणे अशक्य आहे. म्हणून मीच त्या हत्तीला सांगितले, की मी जसे गायन करून माझे पोट भरतो तसेच तूही गायन-वादन करून तुझे पोट भर. म्हणून मी त्याच्या गळ्यात ढोलके व तंबोरा अडकवून रस्त्यावर सोडला.
त्याचे उत्तर ऐकून बादशाहला त्याच्या या युक्तीमागे कोण आहे हे लगेच कळले. त्यामुळे त्याने त्या गवयाकडून तो हत्ती परत घेऊन त्याला सुवर्णमुद्राने भरलेली थैली दिली.
गवई मनापासून बिरबलाचे आभार मानत घरी परतला.

काम संपल्यावर कँन्टीमध्येच पुस्तक वाचत तो रात्र रात्र जागतो, असे त्याचे इतर सहकारी सांगत. बघता बघता रात्रीची शाळा करुन त्याने दहावी पूर्ण केली. रात्रीच कॉलेज सुरु केल. ऑफिस संपल्यावर बसल्याबसल्या टायपिस्टकडून टायपिंग शिकला. अडीअडचणीला टायपिंगची मदत करु लागला. टायपिंगची परीक्षा पास झाला.
एक राजा होता. त्याची एक राणी होती. राणी अतिशय देखणी होती. राज्य भले मोठे होते. प्रजा अतिशय सुखी व गुण्यागोविंदाने नांदत होती. पण राजा निपुत्रिक होता. त्यामुळे राजा-राणी दुःखी होते. त्यामुळे प्रजाही चिंतीत होती. राजानंतर राजगादीवर कोण बसणार? राजा राणी आपल्या प्रजेवर पुत्रवत प्रेम करीत. त्यामुळे राज्यात भांडण-तंटा, चोऱ्या-माय होत नव्हत्या.

“गेटवे” पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभातील प्रमुख पाहुणे कविवर्य मंगेश पाडगांवकर यांच्या भाषणातील निवडक मुद्दे.

मी मात्र सभ्य पांढरी कॉलरवाला, कोणता विचार करून बसलो होतो. त्या दिवशी माझी मलाच लाज वाटली.
कालची रात्र प्रचंड अस्वस्थतेत गेलेली .
मन सुन्न आणि मेंदू बधीर अवस्थेत गेलेला .
डिलीट केल्यानंतरसुद्धा अजूनही
व्हिडिओतले ते दृश्य डोळ्यांसमोर सारखं उभं राहतंय .
भयभीत करणारं .
हृदयाचे ठोके थांबवणारं .
नजरेत अंगार निर्माण करणारं.
Copyright © 2025 | Marathisrushti