नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा
त्यावेळी आमचे कुटुंब रानात राहायला होते माझे बरेच दिवस रानामध्ये निसर्गाच्या सानिध्यात गेले. गावातील हवेपेक्षा रानातील हवा माझ्या मनाला अल्लाद देत होती. मनमोकळेपणाने राणा मध्ये फिरणे म्हणजे आनंदाला एक प्रकारचे उदाण येतेऐन उन्हाळ्यात राणा मध्ये अधून मधून असणारे वारे.
कासव-अस्वल शर्यत ही पळण्याची शर्यत आहे. भारतीय लोककथेतील ससा-कासवाची पळण्याची शर्यत इथे आठवणे अगदी स्वाभाविक आहे. दोन्ही कथांत मंदगती कासव कायम आहे. स्पर्धक मात्र बदलला आहे. एका ठिकाणी अस्वलासारखा शक्तिमान प्राणी आहे,
ग्रामीण भागामध्ये माणसांच्या जवळ पैसा भयंकर कमी आहे. तरीपण त्यांची जगण्याची धडपड अतिशय मोठी आहे हे मला जाणवत होते पोटासाठी मिळेल ते काम प्रामाणिकपणे गावातील बरीच मंडळी करत होती. पोटासाठी किती मोठी धडपड फक्त आणि फक्त माणूस म्हणून जगण्यासाठी. तर काही जण म्हणत असत माणसाचा जन्म पुन्हा नको संसारातील यातना सारे दुःख आणि दुःख. या दुःखातून कधी सुटका होते या विचारात ग्रामीण भागातील माणूस पूर्णपणे अडकून पडला होता.

आता ध्वनी-प्रदुषणाविरुद्ध मोहिम काढली पाहिजे, असं मत नुकतच एका जागरुक प्रतिभावान लेखकानं जाहिर केलं आहे. ते सुरु करण्यासाठी दोन-तीन लाऊडस्पीकर्स खरेदी केले आहेत. ‘आवाज कमी करा’ हे सांगितलेले कळणार कसं? ते कळावं म्हणून आहे त्या आवाजापेक्षा मोठा आवाज काढून बोललं तरच लोकांना कळणार, असं त्याच मत आहे.
आजही लहानपणचा तो किस्सा आठवला की मलं खूप खुप हसू येतं.ते झाड,ते सणाचे वातावरण,त्या परंपरांना मी खुप मिस करतो. त्या सगळ्या गमती जमती आता इतिहास झाल्यातं असं वाटाया लागतं..आताशा गावंही बदललीतं,हिरवाई कमी होऊन तिथबी सिमेंटचे जंगलं वाढलीतं.काळासंगटच परंपराबी बदलल्यातं…आठवणी मात्र तशाच आहेत….!!!
शनिवार होता, दुपारचे चार वाजले होते. मी माझ्या केबिनमध्ये बसलो होतो. त्यावेळी शनिवारी बँकेचे कामकाज दुपारी एक वाजेपर्यंत चालत असे. सोमवारी सुट्टी होती म्हणून बाहेर गावची मंडळी त्यांच्या गाडीच्या वेळेनुसार, काम संपवून किंवा उरलेले काम आपल्या सहकाऱ्यांवर सोपवून निघून गेली होती.
प्राचीन काळी ऋषिमुनी विद्यादानाचे काम करीत असत. त्यांचे आश्रम म्हणजे वेदाभ्यासाच्या शाळाच असत. अनेक शिष्य आश्रमात राहून विद्याभ्यास करीत होते. ऋषिमुनींनासुद्धा वेदविद्यापारंगत शिष्यांकडे पाहून कृतार्थ झाल्यासारखे वाटे. अध्ययन संपले की, काही ना काही गुरुदक्षिणा देण्याचा प्रघात होता. त्याशिवाय गुरुंचे ऋण फिटले असे समजत नसत.
तुरुंगातील कैद्यांची पाहणी करण्यासाठी शासनाने एक समिती नियुक्त केली होती. एक निवृत्त न्यायाधीश त्या समितीचे प्रमुख होते. या समितीने तुरुंगात जाऊन तेथील कैद्यांची पाहणी सुरू केली. सहज कुतूहल म्हणून समितीच्या प्रमुखांनी काही कैद्यांना त्यांनी कोणता गुन्हा केला व त्याला का शिक्षा झाली याची चौकशी करायला सुरुवात केली. एक कैदी म्हणाला, मी खरे तर कोणताच गुन्हा केला नव्हता, परंतु साक्षीदारानेच माझ्याविरुद्ध खोटी साक्ष दिली. त्यामुळे मला तुरुंगात यावे लागले. दुसरा कैदी म्हणाला, माझ्याविरुद्ध काही लोकांनी हेतुपुरस्सर खटला भरला. मला तुरुंगात डांबणे हाच त्यांचा उद्देश होताच तो सफल झाल्यामुळेच मी आज तुरुंगात आहे. तिसरा कैदी म्हणाला, खरे तर मी निर्दोष होतो परंतु माझ्याबद्दल न्यायाधीशांचे पूर्वग्रह दूषित होते त्यामुळेच त्यांनी मला शिक्षा ठोठावली. थोडक्यात एकही कैदी आपल्या गुन्ह्याची कबुली देत नव्हता. एका कोपऱ्यात एक कैदी मात्र खाली मान घालून बसला होता. त्याला हाच प्रश्न विचारण्यात आला. त्या वेळी त्याने खाली मान घालूनच उत्तर दिले. होय साहेब! मी चोर केली. कारण माझ्याजवळ एकही पैसा नव्हता. घरात दोन-तीन लहान मुले होती त्यांची उपासमार मला बघवत नव्हती. त्यांचे पोट भरता यावे म्हणून मी चोरी केली. व त्या गुन्ह्याबद्दल मी आज तुरुंगात येऊनशिक्षा भोगत आहेत. समितीच्या सर्व सदस्यांना त्या कैद्याची हकिकत खरी वाटली. व त्यांनी त्या कैद्याची सुटका करण्याची एकमताने शिफारस केली. त्या कैद्याला त्याच्या प्रामाणिकपणाचे फळ मिळाले होते.
एके दिवशी नदीकडे जाणाऱ्या वाटेवर हत्तीला खार आडवी आली. सम्राटासारख्या तोऱ्यात चालणाऱ्या मातब्बर हत्तीनं तिला सोंडेनं वाटेतून बाजूला सारून म्हटलं, “बाजूला हो ग भिक्कार. चिमुरडे.” खारीला हा मोठा अपमान वाटला. तीही कोणी होतीच की. ह्या हत्तीला नीट वागायचं शिकवायला पाहिजे असं तिला वाटलं.

संगीताला आपल्या जीवनाचे चक्र कसे चालू करायचे हेच उमगत नव्हते. विचारांचा गुंता वाढतच चालला होता, डोळ्यासमोरून मौशु जाता जात नव्हती. एका नराधमाने त्या दोघीना खोल समुद्रात ढकलून दिले होते, आशेचा एखादा किरणही डोकविण्याची सुतराम शक्यता नव्हती.
Copyright © 2025 | Marathisrushti