(User Level: User is not logged in.)

कथा

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • एक पाऊल ओल्या वाळूंत- भाग ३

    सुरेशने आईचं मन वळवलं होतं. लक्कीला भेटायला तो उत्सुक झाला होता. आईने संमती दिल्यावर त्याने लक्कीला फोन केला, वेळ ठरवली आणि आईला घेऊन तो निघाला. जुहूला त्याला पत्ता फार वेळ शोधावा तागला लाहीं. ‘रंगनाथ पै’ अशी दारावरची पाटी पाहून त्यांने घंटीचं बटन दाबलं. एक वयस्कर गृहस्थ दारापाशी आले. ” Yes? Whom do you want?” त्यानी विचारलं. “Is Ms. Lilly Sequeira staying here?” सुरेशने विचारलं. त्यावर त्या गहस्थाने आंत हांक मारली.”ऐ लक्की, हंग यो गो, कॉण आयलो पळे”

  • शेवटी जातीने घात केला ….

    सूर्याची किरणे खिडकीतून प्रवेश करत प्रत्येक घरातील सदस्यांना साद घालत होती. उठा आता पहाट झाली कामाला निघायची वेळ आली .उत्साहीत होऊन रात्रभर आडोशाला गुढाळून घेतलेली निवांतपणाची चादर दुर करत पक्षी ही भुकेसाठी अन्नाचा शोधार्थ उडू लागले .

  • कष्टाचे फळ

    ठेविले अनंते तैसेचि रहावे.. चित्ती असो द्यावे समाधान

  • लोचनाबाय

    लोचनाबाय स्वभावानं भोळी भाबडी. साधा व्यवहार तिला जमत नव्हता. दहा वीस रुपयाची मोड तिला मोजता येत नव्हती. इतकी साधी भोळी ती. सेम इसरभोळ्या गोकुळासारखी. लोचनाबाय भोळी होती पण मनानं उदार होती. ती अनेकांच्या कामाला आलेली मी बघितलं होतं.

  • एकदम आयटम…

    तिला काय अपेक्षित होते ते माहित नाही पण मी बोलून गेलो. मला माझीच मजा वाटली कारण हे उत्तर मी कसे दिले .

  • उक्ती आणि कृतीतील अंतर

    कोणतेही कार्य करताना, विशेषतः सामाजिक - उक्ती आणि कृतीमध्ये अंतर ठेवून चालत नाही. हे अंतर पडले, की ते सामाजिक कार्य, सामाजिक राहत नाही. समाजकार्याचे व्रत निष्ठेने स्वीकारलेल्या सावित्रीबाईंनी आपल्या सख्खा भावाला हे सोदाहरणासह पटवून दिले होते. एकदा सावित्रीबाई खूप आजारी पडल्या. विश्रांतीसाठी म्हणून त्या आपल्या भावाकडे काही दिवस राहायला गेल्या होत्या. भावानेही आपल्या आजारी बहिणीची मनोभावे सेवा केली. आजारातून बऱ्या झाल्यावर सावित्रीबाई जेव्हा पुण्यास परत जायला निघाल्या, त्या वेळी भाऊ त्यांना म्हणाला, ' 'ताई, तुला राग येणार नसेल तर सांगतो. तू हे समाजकार्य आता ताबडतोब सोडून दे. एकतर तू खालच्या जातीमधील लोकांच्या कल्याणाचे काम हाती घेऊन आमच्या कुळाला बट्टा लावला आहेस; शिवाय समाजाने तुम्हाला वाळीत टाकल्यामुळे त्याचे दुष्परिणाम आम्हालाही भोगावे लागतात. तरीही तुमचा सामाजिक कार्य चालू ठेवण्याचा अट्टहास आहेच. '' भावाचे हे कठोर बोलणे ऐकून सावित्रीबाई त्याला शांतपणे म्हणाल्या, की '' या कार्यामुळे आमची होणारी निंदा-नालस्ती तसेच अवहेलना तुला पाहवत नसेल. आमच्यावरील प्रेमापोटीच हे तू सारे बोलला आहेस हे मला माहीत आहे. मात्र इतरांप्रमाणेच तुझी बुद्धीही कोती ठेवू नकोस. आम्ही जे काम करीत आहोत ते चांगलेच काम करीत आहोत उच्चवर्णीय आपल्यावर श्रेष्ठत्व गाजवितात ते केवळ विद्येमुळे मग ही विद्या शिकली तर बिघडले कोठे? तुम्ही प्रसंगी जनावरांनाही जवळ करता. मात्र खालच्या जातीतील माणसांना दूर लोटता. म्हणजे तुम्ही भूतदया दाखविता. मात्र मानवतेला कलंक फासता. शिवाय वारकरी म्हणून तुम्ही नुसत्याच पंढरपूरच्या वाऱ्या करता. रंजल्या-गांजल्यांना जवळ करा. असे म्हणणाऱ्या संतांचे तुम्ही गोडवे गाता. मात्र त्यांचे शब्द वा विचार कृतीमध्ये आणत नाहीत. '' सावित्रीबाईंचे हे बोल ऐकून भाऊ ओशाळला व त्यांनी आपल्या बहिणीची माफी मागितली. मात्र सावित्रीबाईंनी त्याला केव्हाच माफ केले होते.

  • काळोखी गुहेत (कथा २)

    खेड्यातील एक तरुण आदिवासी बाई आपल्या ३ वर्षाच्या छकुलीला कडेवर घेऊन पाणी आणण्या साठी एका ओढ्याकडे चालत निघाली होती. प्रेमाने तिचे नाव ठेवले होते प्रीती झिंटा. हात पायाच्या कड्या, पुढे आलेले पोट. खोल गेलेले डोळे, डोक्यावर हातात पाण्याची भांडी, खाच खळग्याची जमीन तुडवत एका डबक्याकडे चालल्या होत्या, भांडी कपडे धुवायचे आणी तेच पाणी पिण्यासाठी घेऊन यायचे, रोज ५ किमी चालणे तर कायमचे पुजलेले, पाण्याचे कायमच दुर्भिक्ष, पिण्या करता वेगळे पाणी असू शकते हे माहीतच नाही, विजेचा दीवा कधी पाहिलेलाच नाही, जेवणात भाताची पेज, व सुकी चवळी शिजवलेली, बटाटा कधी पाहिलेलाच नाही.

     

  • अजब न्याय नियतीचा – रहस्यमयी प्रेमकथा

    आरू, लता आणि राज, त्यांच्या गावी ट्रीपला आले. 14 फेब्रुवारीला राज आणि लता गढीवर फिरायला गेले. लता एकटीच परत आली. तिनं सांगितलं, राज तिच्याशी भांडण करून निघून गेलाय. त्यानंतर राज परत कधीच, कुणालाच दिसला नाही. त्याला शेवटचं भेटलेली व्यक्ती लता आहे. पण राजच्या शोधला उपयोगी पडेल असे कोणतेच उत्तर ती देत नाहीये….

  • डासांचं बेट (कथा)

    हातात धरलेला पेपर सुटून खाली पडला. हाताला कुणीतरी जबरदस्त चावा घेतला होता. इतक्या स्वच्छ, नवीन विमानतळावर काय चावणार ? उजेडात काही दिसलं नाही. पण आजूबाजूचे प्रवासी चुळबुळ करताना दिसत होते. त्यता प्रखर प्रकाशात इतस्तत: फिरणार इवले इवले डास दिसत नव्हते. पण चावत होते.

  • गणपती

    आम्ही दरवर्षी गणपतीचा उत्सव कोकणातल्या आमच्या न्हैचिआड गावी साजरा करतो. गणपतीच्या साधारणतः दोनतीन महिने आधी आमच्या घरी गणपतीची गडबड सुरु होते. ह्यावर्षी गणपती अमुक अमुक तारखेला आहेत, तेव्हा गावी जाण्यासाठी कोण कधी निघणार, कुठल्या गाडीने निघणार वगैरे चर्चा आमच्या घरी सुरु होते. घरी म्हणजे आमच्या चुलत नातेवाईकांमध्ये- रेग्यांमध्ये आम्ही सर्व चुलत बंधू एकत्ररित्या घरचा गणपती गावी साजरा करतो. यानिमित्ताने सर्व रेगे कुटुंबिय एकत्र जमतो, देवाची यथासांग पूजा पार पडते, हास्यविनोद घडतो, चार दिवस मजेत घालवून आम्ही मुंबईला परततो. देवाची पूजा झाल्याने मन शांत होतं, प्रसन्न होतं. मुंबईचे ताणतणावाचे दिवस सहन करण्यासाठी आम्ही पुन्हा सिद्ध होतो.

    गावी पोहोचल्यानंतर प्रथम गणपतीची तयारी सुरु होते. पहिलं काम देवखोली साफ करण्याचं. विहिरीवरुन पाणी काढून संपूर्ण देवखोली धुतली जाते, स्वच्छ केली जाते. त्यानंतर बाजारहाट. गणपतीसाठी घरात असंख्य गोष्टी लागतात. त्याची यादी करुन त्या बाजारातून आणव्या लागतात. आमचं गाव तसं छोटसं खेडच आहे. मुख्य बाजार भरतो तो शिरोडयाला अथवा वेंगुर्ल्याला. गणपतीच्या दोनतीन दिवस आधी या दोन्ही बाजारांमध्ये आजूबाजूच्या गावांतले हजारो लोक जमतात. गणपतीच्या सजावटीसाठी लागणारं माटवीचं सामान, स्वयंपाकाच्या भाज्या, फळं, बुंदीचे लाडू, खाजं, फुलं, फुलांचे हार, वेण्या, उमा महेशाच्या पूजेसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या वनस्पती, नाडापूडी अशा असंख्य गोष्टींची यादी सोबत असते. त्या वस्तू खरेदी करत बाजार पालथा घातला जातो. त्यानंतर थकवा घालविण्यासाठी भजी आणि चहाचा खुराक घेऊन आम्ही घरी परततो.

    घरी परतल्यावर प्रथम देवखोली सजविण्याचं काम सुरु होतं. गणपतीच्या मूर्तीच्या वर काठयांची चौकट लटकत असते. तिला माटवी म्हणतात. आंब्याचे टाळ आणि विविध रंगांची फळं व भाज्या अडकवून ही माटवी सजवली जाते. त्यानंतर चमचमत्या छोटया दिव्यांची आरास. देवखोलीच्या दारावर कागदांच्या फुलांची आणि रंगीत दिव्यांची तोरणं चढतात. सजावटीची तयारी पूर्ण होते. आत स्वयंपाकघरात बायकांची धांदल उडालेली असते. हरतालीकेपासून तीन दिवस सोवळ्याचा स्वयंपाक असतो. हरतालीकेला गुळाच्या पातोळ्यांचा नैवेद्य असतो. चतुर्थीला २१ मोदकांचा नैवेद्य, पंचमीला साखर भात असा ठरलेला नैवेद्य दाखवायचा असतो. त्यादिवशी पंचखाद्यपण करायचं असतं. आरतीनंतर प्रसाद काय वाटायचा याबाबत सगळ्यांची मतं घेतली जातात. हरतालीकेच्या आदल्या दिवशी कडधान्य भिजत घालणं, नंतर भाज्या चिरण्याचं काम अशी कामं सुरुच असतात.

    सर्व तयारी सिद्ध झाल्यावर गणपतीच्या आदल्या दिवशी गणपतीच्या मूर्तीचं घरात आगमन होतं. देवखोलीत चौरंगावर गणपती विराजमान होतो. चतुर्थीचा उत्सव सुरु होतो!

    चतुर्थीच्या दिवशी सकाळी भटजी बुवा घरी येतात. घरातल्या पुरुषांपैकी कुणीतरी एक सोवळं नेसून तयार बसलेला असतो. शास्त्रोक्त पद्धतीने मंत्रांच्या घणघणीत उच्चारांत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. त्यानंतर एकादष्ण्या. अथर्वशिर्ष अकरा वेळा म्हंटल्याने एक एकादष्णी पूर्ण होते. घरातल्या मंडळींनी अशा एकादण्या आंगवलेल्या असतात. याशिवाय ठरलेल्या वार्षिक एकादष्ण्या. आम्ही लहान असताना जवळजवळ तासभर हा एकादष्ण्यांचा कार्यक्रम रंगत असे. आता भटजींची पूजा सांगतानाच घाई उडालेली असते. एका घरची पूजा आटोपून त्यांना दुसऱ्या दहा घरी धावायचं असतं. सहाजिकच एकादण्या हा प्रकार मागे पडला. रीत म्हणून आमच्या आम्हीच एखाददुसरी एकादष्णी म्हणतो आणि गणपतीची पूजा सिद्ध होते. त्यानंतर एका ताम्हणामध्ये पाण्यावर लालकुंकू टाकून त्यात सजलेल्या गणपतीचं दर्शन घेण्याचा प्रघात आहे. फुलांनी सजलेलं, दिव्यांच्या आरासांनी उजळलेलं श्रीगणपतीचं हे प्रसन्न दर्शन मनाला अतीव समाधान देऊन जातं.

    गावातल्या अन्य रेगे कुटुंबियांच्या पूजा उरकल्या की एकत्रित आरत्यांचा जल्लोष सुरु होतो. कोकणातल्या आरत्यांच्या चाली मुंबईतील प्रचलित चालींहून वेगळ्या आहेत. एकाने एक आरती म्हटली की दुसऱ्याने दुसरी आरती म्हणायची अशी ही स्पर्धा मग रंगात येते. एकजात सर्वांच्या सर्व आरत्या पाठ. एकूण पाच घरात अशा आरत्या रंगतात. आरत्यानंतर मंत्रपुष्पांजली. 'तन्नोदंती प्रचोदयाऽऽत' च्या गजराने या आरत्यांची सांगता होते. त्यानंतर नैवेद्यांची पाने मांडली जातात. पंचपक्वानांचा नैवेद्य देवांना अर्पण केला जातो. नैवेद्य प्राशन केल्यावर थोडा विसावा मिळतो. तृप्तीचे ढेकर देत सर्वांची वामकुक्षी सुरु होते.

    सायंकाळी पाचच्या दरम्यान गावकऱ्यांच्या भजनाची गडबड सुरु होते. संपूर्ण गावातले गावकरी एकत्ररित्या सर्वांच्या घरी जाऊन भजनं म्हणतात भजनाला तबलापेटीची साथ असते. टाळ आणि झांजाच्या गजरात भजन सुरु होतं. गावकऱ्यांचा एकत्रित आवाज भजनात तल्लीन होऊन जातो. उत्तरोत्तर लय वाढत जाते. भजनी ठेक्यावर सर्वांचे पायही ताल धरतात. एका सूरात नाचत, गात भजनं सादर केली जातात. भान हरपून मी या भजनांचा आस्वाद घेत कडेला उभा असतो. भजनं सादर करताना गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस भाव मी टिपतो. छोटी छोटी मुलं आणि थकलेले वृद्ध यांच्या अंगात संचारलेला जोष मला वेगळीच अनुभूती देऊन जातो. मी उत्स्फूर्तपणे गांवकऱ्यांच्या भजनात सामील होतो.

    पंचमीच्या दिवशी सकाळी पूजेची, आरत्यांची आणि नैवेद्याची पुनरावृत्ती होते. संध्याकाळच्या आरतीनंतर देवाला गाऱ्हाणं घातलं जातं. सर्वांच्या ख्याली खुशालीची आणि क्षेमकल्याणाची याचना झाल्यावर चौरंग हलवला जातो. गणपती आपल्या गावाला जायला निघतो व सर्वांचे डोळे पाणावतात. जगातलं विज्ञान काहीही सांगो, पण यावेळी मूर्तीच्या चेहऱ्यावरही खरोखरच नाराजी उमटते. 'पुनरागमनायचं' च्या अक्षता टाकून देवाच्या हातावर दही ठेवलं जातं. देवखोलीतला चौरंग खळ्यात येतो. बाहेर गावातले सर्वांच्याच घरातले गणपती विसर्जनाला निघतात. 'मोरयाऽऽऽ मोरयाऽऽऽ'च्या ललकाऱ्या गावभर उमटत असतात. रांगेने गावातले सर्व गणपती तळ्याच्या वाटेने निघतात. शेतातल्या बांधातून मार्ग काढत गणपतींची रांग पुढे पुढे सरकते. सूर्य मावळतीला निघालेला असतो. आकाशात सांजरंग उमटत असतात. दूरवर हिरव्याकंच डोंगरांच्या रांगा तटस्थ उभ्या असतात. शेतातल्या पिकांतून वाट काढत गावातले शंभरएक गणपती तळ्यावर पोहोचतात. तिथे संपूर्ण गावाची एकत्रित आरती होते. संपूर्ण गावाच्या वतीने गाऱ्हाणं घातलं जातं. खाली उतरलेल्या अंधारात गणपतींच्या मूर्तीसमोरील कापराच्या वाती सौम्य प्रकाश देत उजळत असतात.

    'नवल होत आहेऽऽ आरतीऽऽ देवाधिदेवा ऽऽ ऽऽ' भजनाने विसर्जनाचा सोहळा संपन्न होतो. गावातले तरणेताठे गडी भराभर मूर्ती पाण्यात शेळवतात. गणपतीचा उत्सव संपतो. अंधारात वाट चाचपडत आम्ही घरी परततो.

    - सुनील रेगे