नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा
सकाळ झाली तशी सखू उठून लगबगीने कामाला लागली.आज सक्रातरचा सण,घरी काही तरी गोड-धोड करायचे व्हते. सणावाराला कधी तरी गोड-धोड लेकरांना मिळायचं,न्हायी तर एरी घरात आठरा विश्व दारिद्र्यच व्हते.कालच सखूने बाजारातून गुळ आणला व्हता.
मी मधेच तुला सांगितल्या प्रमाणे मी आता कायमची लंडनला जात आहे .आईला बरोबर घेऊन .
कायमचे घर सोडायचे म्हणून सगळी आवराआवर करत असताना जुन्या फोटोत तू , शिरीष आणि तुमचे भाटे सर ( माझे आजोबा ती .आप्पा ) अशा फोटोच्या २ कॉपी मिळाल्या . त्या तुझ्या घरी वहीनी कडे दिल्या आहेत….एक शिरीष साठी आणि दुसरी अर्थात तुझ्यासाठी . तुम्ही दोघे आप्पांचे अत्यंत लाडके विद्यार्थी ना ! ….नंतरच्या काळातले त्यांचे तरुण मित्र .
…हे फोटो वहिनीला दिले तेंव्हा तिला इतके भरून आले होते ना …आणि मलाही …एक तर आमच्या दोघींचे माहेरचे आडनाव एक …आणि दुसरे म्हणजे तू आणि शिरीष चे आप्पांशी असलेले भावबंध ! ! !
दुपारच्या वेळेस जेवण उरकून थोडीशी विश्रांती घ्यावी म्हणून झोपले होते. जरा डोळा लागला होता की फोन वाजला, अगदी त्रासून फोन उचलला. समोरुन संध्याचा आवाज आला, “हॅलो, मॅडम कशा आहात? ” खरे तर ठीक आहे म्हणण्यापेक्षा ही काय फोन करायची वेळ आहे का? असे विचारवासे वाटत होते पण काय करणार असे बोलता येत नाही नां नाईलाजास्तव अगदी उसना उत्साह आणून म्हणाले, “बरी आहे, बोल कां फोन केलास ह्या वेळेस आज? ” “मॅडम, उद्या दुपारी तीन वाजता संस्थेमध्ये मिटींग ठेवली आहे,

संगीता अंधारात मुसमुसत पडली होती, नाना विचारांनी डोके भणभणत होते, आपल्या आनंदात बिपीन सहभागी नसेल तर काय अर्थ ? स्वभावाचे पैलू लग्नानंतरच कळतात, ही तर सुरवातच होती.
पोलिस ठाण्यातील ड्यूटी ऑफिसरची खुर्ची कधीही रिकामी नसते. चौकशी किंवा गुन्हे तपासाच्या निमित्ताने ड्यूटी ऑफिसरला पोलिस ठाण्यातून बाहेर जावे लागलेच तर त्याप्रमाणे ” स्टेशन डायरी ” मधे नोंद करूनच “रिलीफ ऑफिसर” म्हणजेच पर्यायी ठाणे अंमलदारकडे चार्ज देऊन तो बाहेर पडतो.

एका सकाळी उंदीरमामा आपल्या बिळांतून चमकत्या डोळ्यांनी इकडे तिकडे पहात होता.
गोदाकाठच्या परिसरात फाल्गुन महिन्यात होळी हा सण अत्यंत आनंदाने साजरा केला जातो. या होळी सणाविषयी एक लोककथा अशी सांगितली जाते: ‘विष्णुच्या दरबारात दोन द्वारपाल राहात होते. इतक्यात भृगु महाऋषी विष्णूस यज्ञाचे फळ देण्यासाठी विष्णुच्या घरी जात असतात. तेव्हा विष्णूचे द्वारपाल जय आणि विजय हे भृगुऋषीला विष्णुच्या दर्शनासाठी जाण्यास सक्त मनाई करतात. तेव्हा भृगु महाऋषी त्या द्वारपालाला शाप देतात, “तुम्ही तीन जन्म पृथ्वीतलावर उन्मत्त असे राक्षस होऊन पडाल तेव्हा द्वारपालांनी शरण येऊन भृगु महाऋषीस उःशाप मागितला. भृगु ऋषी म्हणाले “तुम्ही राक्षस होऊन पडल्यावर श्रीविष्णु तुमचा उद्धार करतील व तुम्ही पुन्हा द्वारपाल व्हाल तेव्हा ते पृथ्वीतलावर हिरण्याक्ष व हिरण्यकश्यप असे दोन राक्षस होऊन पडले. हे दोन्ही भाऊ उन्मत्त व महाअंतुरबळी युद्धिष्ठर असे बनले.
शनिवार होता, दुपारचे चार वाजले होते. मी माझ्या केबिनमध्ये बसलो होतो. त्यावेळी शनिवारी बँकेचे कामकाज दुपारी एक वाजेपर्यंत चालत असे. सोमवारी सुट्टी होती म्हणून बाहेर गावची मंडळी त्यांच्या गाडीच्या वेळेनुसार, काम संपवून किंवा उरलेले काम आपल्या सहकाऱ्यांवर सोपवून निघून गेली होती.
आपली आलीशान गाडी सर्व्हिसिंगला टाकून आपल्या ८-१० वर्षांच्या मुलासोबत तो सर्व्हिस सेंटर च्या बाहेर पडला . समोरच असलेल्या रिक्षा स्टँडवर एकंच रिक्षा उभी .. तो लगबगीने आत शिरला .. आपल्या मुलाचा हात धरून त्याला आत घेऊ लागला ..तेवढ्यात ते काहीसे वयस्कर रिक्षाचालक म्हणाले .. “ दादा …. त्या “बारक्या”ला आतमधल्या साईडला बसवा .. तिकडे पॅक पट्टी आहे न्.. तेवढीच शेफ्टी !!
भर दुपारची येळ व्हती.वर आभाळातुन सुर्य आग वकत व्हता.उन्हाळ्याचे दिवस आसल्यानं सगळा परिसर भकास दिसत व्हता.रस्त्यानं चिट पाखरूबी नवतं.आश्यात शिवराम मसनजोगी,त्याची बायको शेवंती,पोरगी सारजी आन पोरगं पिर्या बाभळगावच्या दिशेनं निंघाले होते.
Copyright © 2025 | Marathisrushti