नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा
ऐन थंडीचे दिवस होते, भर दुपारी देखील अंगावरच्या चादरीत गुरफटुन झोपण्याची मजा येत होती. पण भिंतीवरचे घड्याळ साडे चार वाजले असे आनंदाने ठण ठण करुन ओरडले आणि नाईलाजास्तव उठावेच लागले. खरे तर उठून काम करण्याची बिलकूल इच्छा होत नव्हती
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. चीनमधील ‘ताओन लिन’ या गावी एक पुजारी होता. त्याचं नाव होतं ‘वान चिंग.’ देशभर भ्रमण करून तो आपल्या गावी परतला. फावल्या वेळेत तो गावकऱ्यांना आपल्या भटकंतीतील अनुभव ऐकवत असे. गावकरी मोठ्या उत्सुकतेने त्याच्या गोष्टी ऐकत असत. विशेषतः चीनमधील भव्य आणि प्रसिद्ध अशा बुद्ध मंदिरांची जेव्हा तो वर्णने करीत असे तेव्हा लोक ती वर्णने ऐकून स्तिमित होत. ही वर्णने ऐकून ऐकून आपल्या गावातही एखादं भव्य मंदिर उभारावं असं गावकऱ्यांना वाटू लागलं.

इथला निसर्ग चारी बाजूने पोखरला जात आहे आणि भयभीत जनावरांची कोंडी झाली आहे. चारी बाजूनी माती आणि दगडांच्या शोधातील मंडळी ट्रक लावून लूट करत आहेत. किंचित आत झुडपात हात भट्टयांची मालिकाच तयार झाली आहे. त्याबरोबरच हौशी शिकारी मंडळीनीही हैदोस मांडला आहे.
बसमधून प्रवास करताना प्रतिभाला एका तरूणाने धक्का मारला. कदाचित तो चुकुनही लागला असेल पण प्रतिभाला तेव्हा तसं वाटलं नाही म्हणून ती त्याला म्हणाली,” काय रे ! आंधळा आहेस काय? की मुलगी पाहून जाणुनबुजुन धक्का मारतोस ? प्रतीभाची ही वाक्ये त्याने ऐकली नसतील हे तर शक्यचं नव्हतं. पण तरीही ऐकून न ऐकल्यासारखं करत तो पुढे निघुन गेला.
कोणे एके काळी सूर्य आणि पाणी खूप चांगले मित्र होते. पृथ्वीवर सूर्य आणि पाणी गुण्या गोविंदाने रहात होते. पाण्याला भेटायला सूर्य नित्यनेमाने येत होता. परंतु पाणी कधीच सूर्याला भेटायला जात नव्हते. एके दिवशी गप्पांच्या ओघात सूर्याने पाण्याला विचारले, ‘मित्रा मी नेहमी तुझ्याकडे येतो.
‘जोजा ही एका राजाची मुलगी, पाय घसरून पडलेल्या एका म्हातारीला कुचेष्टेने हसली. तशी म्हातारीने चिडून शाप दिला: ‘तादेव’ नावाचा मृत राजपुत्र तुला पती मिळू दे अन् तुझे खूप हाल होऊ देत !’ बिचारी राजकन्या, तिने म्हातारीची विनवणी केली. तो मृत राजपुत्र कशाने उठेल म्हणून विचारले. तशी म्हातारीने सांगितले की, त्याच्या उशाशी थडग्यात एक मोठे चांदीचे पिंप ठेवलेले आहे, ते जी तरुणी तीन दिवसांत अश्रूंनी भरून टाकील तीच त्याला जीवदान देऊ शकेल व मग त्यांचे लग्न होईल.
पावसाळ्यातल्या एका संध्याकाळी तो निवांत बाल्कनीतल्या खुर्चीत बसला होता.. पाऊसही सगळ्या परिसीमा ओलांडून बरसत होता.. अगदी त्या रात्री सारखाच !!…त्यामुळे तो जुना प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर उभा राहणं सहाजिकंच होतं …
सलून मधला प्रसंग आहे …..मी सलून मध्ये बसलो असताना बहुधा तिथेच आजूबाजूला राहणारा एक ५-७ वर्षांचा लहान मुलगा आत शिरला … मागोमाग त्याची आई आली आणि सलून मध्ये काम करणाऱ्या माणसाला आणि आपल्या मुलाला आळीपाळीने सूचना देऊ लागली .. .. “अहो , याचे केस कापून झाले न की त्याला फक्त बाजूच्या बिल्डींग च्या गेट पर्यंत सोडा …

ते आवाज आता वजनदार आणि जास्त जोरात येवू लागले…. पालापाचोळ्यावरील त्या आवाजांचा वेग तिला जाणवू लागला…. सगळं बळ एकवटून, मनाचा हिय्या करून ती येणार्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी, येणार्या आवाजांचा कानोसा घेत सावधपणे त्या दिशेने पाहू लागली आणि …..
Copyright © 2025 | Marathisrushti