नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा
साल कुठलं नेमकं आठवत नाही पण उन्हाळ्याच्या सुट्टीत आत्याच्या गावी गेलो होतो.नुकताच नोकरीला लागलो होतो.सकाळच्या अकरा वाजल्या असतील . इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या रविवारचा दिवस असल्याने डवरी पतर भरण्यासाठी ( वाळलेल्या भोपळ्याचे पात्र,डमरु त्रिशूळ वगैरे घेऊन) भिक्षा मागण्यासाठी आला होता.त्यांच वय बरंच झालं होतं पण तरीही ते घोड्यावरून फिरत असतं.मला नवागत बघून विचारलं.
जगदीशची आई म्हणजे नंबर एकची खोटारडी बाई होती. अशी खोटारडी ‘आई’ जगाच्या पाठीवर नसेल, हे माझे नाही तर, जगदीशचेच म्हणणे आहे! आयुष्यभर (अर्थात तिच्या) ती आपल्या लाडक्या जगूला खोटंच बोलत आली म्हणे!
मी घरी आलो तेंव्हा खूप उशीर झाला होता. आईला काळजी वाटत होती. आप्पांना (माझ्या व़़डलांना)ही काळजी वाटत असावी. मी आईला सांगून गेलो होतो असं म्हणट्ल्यावर त्यांचं समाधान झालं.

फ्रँक स्टॉकटन हा खास करून मुलांचे वाडमय लिहिण्यासाठी खूप प्रसिध्द होता. त्याची ही गोष्ट इंग्रजी वाडमयात अतिशय लोकप्रिय आहे. कारण ती एक सुंदर रूपक कथा आहे. त्यात दैव आणि स्वेच्छा (Determinism versus Free Will) यांचा सनातन झगडा दाखवला आहे. राजा त्याला आरोपी करून त्याची व राजकन्येची स्वेच्छा हिरावून घेतो. परंतु राजकन्या गुपित जाणून घेऊन पुन्हा आपल्या इच्छेनुसार निर्णय घेऊ शकते. तसाच जंगलीपणा आणि सुधारणावाद यांतील द्वंद्वही दाखवले आहे.
आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण रहात असे. तो दारिद्र्याने फारच त्रासलेला होता. त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली. तिनं आपल्या गरिबीचं गाणं गायलं. शेजारणीने तिला शुक्रवारचं व्रत संगितलं. ती म्हणाली, “ बाई, शुक्रवारचं व्रत कर. हे शुक्रवार तू श्रावणापासून धर. सारा दिवस उपास धरावा. संध्याकाळी सवाष्णीला बोलवावं. तिचे पाय धुवावेत, तिला हळद कुंकू द्यावं. तिची ओटी भरावी.

ते आवाज आता वजनदार आणि जास्त जोरात येवू लागले…. पालापाचोळ्यावरील त्या आवाजांचा वेग तिला जाणवू लागला…. सगळं बळ एकवटून, मनाचा हिय्या करून ती येणार्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी, येणार्या आवाजांचा कानोसा घेत सावधपणे त्या दिशेने पाहू लागली आणि …..

ती दोघं आता त्या चढाच्या वळणावर पोहोचली होती…. तेवढ्यात त्यांना परत एका चारचाकी गाडीचा उजेड दिसला….. आता मात्र दोघंही त्यांचे हात हलवत मोठमोठ्यांदा हेल्प, हेल्प म्हणत रस्त्याच्या थोडे पुढे आले…..
एक जंगल होते. जंगलात अनेक प्राणी राहत होते. वाघ, कोल्हा, लांडगा, अस्वल अशा हिंस्त्र प्राण्यांचे वास्तव्य तिथे होते. एके दिवशी कोल्हा जंगलात फिरत असताना खूप जोरात पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू झाला. कोल्हा घाबरला. पळत सुटला.

दी सांगू लागली …… “आमच्या पूर्वजांनी गढीमध्येच एक तीन मजली गोल असा सुंदर महाल बांधला होता. त्या महालाच्या मध्यभागी २५ फूट व्यासाची आणि तीन मजले खोलीची, म्हणजे अंदाजे चाळीस फूट खोल,गोड्या पाण्याची विहीर होती. गढीच्या शेजारूनच नदी जात असल्यामुळे विहिरीला बारमाही पाणी असे. शिवाय महालाच्या बाहेरील बाजूसही मोठमोठे चर खणून पावसाळ्यातील पाणी त्यात साठवून ते पाणी विहिरीत मुरवले जाईल अशी व्यवस्था केली होती.
राष्ट्रभक्तीची भावना प्रखर असली, की समोर मृत्यू जरी येऊन उभा राहिला तरी त्याची तमा नसते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत मृत्यूला कवटाकेल्या अनेक क्रांतिकारकांनी हे सिद्ध केले आहे. या राष्ट्रभक्तीला कशाचेच बंधन नसते. ना वयाचे, ना जातीचे, ना धर्माचे. खान्देशातील बाल शिरीषकुमारची कथा हेच सांगून जाते. इंग्रजांच्या गुलामगिरीविरुद्ध लढा देण्यासाठी सुरू झालेल्या महात्मा गांधीजींच्या चले जाव आंदोलनाची लाट देशभर उसळली होती व हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी इंग्रज सरकारचेही जोरदार प्रयत्न चालू होते. नंदूरबारला एका शाळेत शिकणाऱ्या बारातेरा वर्षांच्या शिरीषकुमारचे मन इंग्रजांविरुद्ध बंड करून उठले. गोऱ्या राजवटीविरुद्ध असंतोष व्यक्त करण्यासाठी जेव्हा नंदूरबारला मिरवणूक निघाली, तेव्हा शिरीषकुमार तिरंगा झेंडा घेऊन मिरवणुकीच्या अग्रभागी होता. इंग्रजी सैनिकांनी मिरवणूक हाणून पाडण्यासाठी प्रथम लाठीमार केला; तरीही मिरवणूक पांगली नाही' शेवटी बंदूकधारी इंग्रज सैनिक आले. त्यांनी गोळीबार करायला सुरुवात केली तरीही बहादूर शिरीषकुमार डगमगला नाही. तो आपला तिरंगी झेंडा घेऊन पुढे चालतच राहिला आणि कोठूनतरी एक गोळी सूऽऽ सूऽऽ करीत आली अन् शिरीषकुमारच्या छातीत घुसली आणि तो खाली कोसळला. मात्र हातातील झेंडा त्याने शेवटपर्यंत सोडला नाही. ' भारतमाता की जय' असे म्हणतच त्याने शेवटचा श्वास मोडला. शिरीषकुमारची ती प्रखर राष्ट्रभक्ती पाहून सारेच धन्य झाले. आजही नंदूरबार म्हटले की, सर्वप्रथम हुतात्मा शिरीषकुमारची आठवण येते.
Copyright © 2025 | Marathisrushti