नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा
गाडीच्या अचानक थांबण्याने दोघांना झोराचा धक्का बसला. डोळे मिटून गाणी ऐकण्यात मग्न मानसी किंचाळली जोरात. अमितच्या मानेला झोरात हिसका बसला. गाडी जागच्या जागी थांबली. काय होतंय पाहायला दोघेही गाडीतून खाली उतरले. गाडीच्या बॉनेट मधून धूर येत होता. गाडीचं इंजिन खूप तापलं होतं बहुदा. पाणी संपलं होतं गाडीतलं.
अमित दुखरी मान वळवू शकत नव्हता. थोडी तिरकी मान करूनच त्याने गाडीचं बॉनेट उघडलं आणि मानसीला डिक्कीतून पाण्याचा कॅन आणायला सांगितला. मानसी धावतच कॅन आणायला निघाली आणि दोन पावलं गेल्यावर बिचकली. काहीतरी विसरल्यासाखी जीभ चावून ओशाळलेल्या नजरेनं अमितकडे पाहू लागली.

चेटकिणीचे पाव, निवडुंग, स्कायलाईट रूम, समृध्द प्रेमाची भेट आणि आता ही व्यस्त दलालाची प्रेमकथा, सर्वच प्रेमाबद्दलच्या कथा. सर्व कथांमधे वळणं आणि अनपेक्षित शेवट आहे परंतु प्रत्येक कथा दुसऱ्याहून वेगळी आहे. ओ हेन्री कथाकार म्हणून प्रसिध्द झाला, त्या कल्पनांवर अनेक, नाटके, चित्रपट, मालिका केल्या गेल्या ह्यांत नवल नाही. ह्या कथेत आनंदी शेवटही किती वेगळ्या प्रकारे सादर केलाय.
राजा राममोहन रॉय हे बंगालमधील एक प्रसिद्ध समाजसुधारक. लहानपणापासून अतिशय चिकित्सक बुद्धीचे असलेले राममोहन रॉय यांनी सर्व प्रकारच्या धर्मग्रंथांचा अभ्यास केला. वेदाचा तसेच इतर हिंदू धर्मग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी तर ते काही काळ काशीलाही (बनारस) जाऊन राहिले होते. सर्व चराचरात व्यापून राहिलेला परमेश्वर एका मूर्तीत कसा असू शकतो याचे समाधानकारक उत्तर त्यांना मिळाले नाही. त्यामुळे ते मूर्तिपूजाविरोधक बनले. समाजातील अनेक अनिष्ट प्रथा व रुढी धर्ममार्तंडांनी स्वतःच्या फायद्यासाठी व स्वतःचे वर्चस्व समाजावर राहण्यासाठी सुरू केल्या, असे त्यांचे प्रामाणिक मत होते. अशा अनिष्ट रुढींना धर्मग्रंथात कोठेही थारा नाही हे त्यांनी अनेकवेळा जाहीरपणे बोलून दाखविले. त्यामुळे त्या काळच्या समाजात ते अप्रिय बनले. त्यांच्या या सुधारकी विचारांमुळे वडील रागावल्यामुळे खुद्द त्यांना स्वतःचे घर सोडावे लागले. त्या काळी समाजामध्ये सतीची चाल रुढ होती. विशेषत : बंगालमध्ये सतीच्या चालीमुळे अनेक बालविधवा चितेच्या भक्ष्यस्थानी पडत होत्या.
राजाराममोहन रॉय यांनी सतीच्या अनिष्ट चालीविरुद्ध आवाज उठविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. नेमक्या त्याच वेळेला त्यांच्या मोठया भावाचा साथीच्या रोगामुळे मृत्यू झाला व त्याच्याही तरुण पत्नीला चितेवर चढून बळी जावे लागले. सर्वांच्या साक्षीने ढोल बडवित झालेला हा समारंभ पाहून राममोहन रॉय यांना तीव्र धक्का बसला. त्याच दिवशी त्यांनी प्रतिज्ञा केली की, ही सतीची अमानुष चाल बंद केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. त्यांनी या चालीविरुद्ध समाजजागृती करण्यास प्रारंभ केला. तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड बेटिंग यांना भेटून सतीची चाल कशी धर्मविरोधी आहे हे त्यांनी पटवून दिले. त्यांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले व लॉर्ड बेटिंगने सतीची चाल बंद करण्याचा कायदा केला. त्यामुळे राजा राममोहन गॅय हे खरेखुरे समाजसुधारक बनले.
एक चित्रकार होता. फारच सुंदर अशी चित्रे काढायचा तो. त्याची चित्रे पाहून लोक अत्यंत प्रभावीत होत असत. दूरवर त्याची ख्याती पसरली होती. त्यानं काढलेलं चित्र प्राप्त करण्यासाठी लोकांची नेहमी धडपड चालत असे. या प्रतिभावान कलावंताचे चित्र मिळविण्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्याची तयारी लोक दाखवीत.
जरी त्या राज्यातील निवडणूक असली तरी अखेर जगातील मोठ्या लोकशाहीचा महायज्ञ होता तो. त्यामुळे त्या इतमामात तो साजरा होण्याची काळजी घ्यायलाच हवी होती. पण नारायण भंडारी बावचळला होता. अस्वस्थ झाला होता .

विजयच अभिनयाचं वेड त्याच्या घरच्यांना आवडत नव्हतं. म्हणून ! नाहीतर आज तो अभिनयाच्या क्षेत्रात नक्कीच एका उंचीवर असता. त्याने एक व्यावसायिक नाटक लिहिले होते. त्या नाटकाचा प्रयोग प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात झाला होता, तेंव्हा विजय आणि त्याचे पाच सहा मित्र ते नाटक पाहायला गेले होते.

रूम उघडून ती अचानक वळली आणि तिने गोमुचा हात धरला. “आंत या, ना !” असे म्हणत तिने गोमुला रूममध्ये ओढला. भांबावलेल्या गोमुने कांहीच विरोध केला नाही. “मी आवडले कां तुम्हांला ? कालपासून माझ्या मागे मागे आहांत. मी पाह्यलेय. मग आतां कां लाजतां ?” गोमुला कांहीच उत्तर सुचेना.

सुरूवातीला मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. पण या गोष्टी सतत माझ्या कानावर येवू लागल्या आणि माझ्या लक्षात आलं की, आपली आरूपण आता मोठी झालीय. मी तिला माझ्या आणि राजच्या नात्याबद्दल कधीच बोलले नव्हते.
एक सुंदर बाग होती. बागेत एक तळे होते. तळ्याकाठी दोन बेडूक रहायचे. दोघे अगदी जिवाभावाचे मित्र. एकाचे नाव राम, दुसऱ्याचे श्याम. राम शूर, तर श्याम भित्रा. आजुबाजूला थोडा खुट्ट आवाज झाला तरी श्यामराव तळ्यातल्या पाण्यात लपून बसायचे. श्यामरावांच्या या भित्रेपणाला तळ्यातले मासे, कासव हसायचे. ‘भित्रे मंडुकराव’ म्हणून चिडवायचे. रामने श्यामला भिऊ नको म्हणून खूप वेळा सांगून पाहिले. पण त्याचा काही उपयोग होईना. तळ्यातले इतर जलचर राम बेडकाला म्हणायचे, ‘माणूस लोकात मुलांनी भिऊ नये म्हणून त्यांना हनुमान चाळीशी म्हणायला शिकवतात. तसा हा राम बेडूक श्यामला ‘मंडुकोपनिषद” शिकवतो.
आधीच रविवारचा सुटीचा दिवस. त्यातही अमर पार्टी हॉल निमंत्रकांनी भरलेला होता. राजू-राणीचे मित्रमैत्रिणी डॉ. शरदचे हॉस्पिटलमधील कर्मचारी, आदी संबंधितांनी बाळ संदेशच्या वाढदिवसाला फार शोभा आणली होती. राणी त्याच हॉस्पिटलमध्ये बरीच वर्षे परिचारिकेचे काम करीत होती. साहाजिकच साऱ्यांची ती लाडकी होती. राजेंद्र म्हणजे राजू हा तर डॉ. शरद यांचा अगदी जवळचा, मग काय विचारता? परकेपणा कुठेच नव्हता. कडक, शिस्तीची पण प्रेमळ व कामसू राणीने साऱ्यांचीच मने जिंकली होती. राजू-राणीच्या बाळाचा वाढदिवस म्हणजे जणू घरचाच कार्यक्रम.
Copyright © 2025 | Marathisrushti