नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा

नील एक एक चित्र निरखून पाहू लागला. प्रत्येक चित्र पाहताना वाह, सुंदर, अप्रतिम, अमेझिंग, सॉलिड, क्या बात हैं असे म्हणत तो पुढे पुढे जात होता. नील चित्रं पाहत असताना चारुदी तिथेच उभी राहून त्याचे निरीक्षण करत होती. तो मनापासून चित्रांचे कौतुक करतोय हे पाहून तिच्या चेहेऱ्यावर समाधानाचे हसू झळकू लागले.

मूंबईतील प्रत्येक गल्लीत एक दोन कुत्री असतातच आणि ती बाहेरच्या माणसांवर हमखास भुंकत असतात आणि कधी कधी चावाही घेत असतात. त्या कुत्र्यांना गोंजारणाऱ्या लोकांचा विजयला प्रचंड राग येतो. काही महिन्यांपूर्वी विजय जेंव्हा मॉर्निंग वॉकला जात होता. तेंव्हा त्याला काही लोक सकाळी स्वतः चालायला येतात कि कुत्र्याला चालवायला घेऊन येतात तेच कळत नव्हते. विजयने त्या कुत्र्यांना रस्त्यावर घाण करताना पहिले कि त्याच्या तळपायाची आग मस्तकात जायची. विजयच्या मनात कुत्र्याविषयी बसलेली ती भीती अजूनही नाहीशी झालेली नाही. विजय तर या मताचा आहे की मुंबई या भटक्या कुत्र्यांपासून पूर्णपणे मुक्त व्हायला हवी.
प्रसिद्ध लेखक मंगेश कदम आपल्या केबिनमध्ये अस्वस्थपणे फेऱ्या मारत होते. त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या ऑफिसमध्ये एसी फुल्ल असूनही त्यांच्या कपाळावर घर्मबिंदू जमा झाले होते. चेहरा सुद्धा आक्रसल्यासारखा दिसत होता. मेजावरच्या ऍश ट्रे मध्ये तीन मोठ्या गोल्डफ्लेक लाइट्स अर्धवट जळालेल्या अवस्थेत होत्या. चौथी सिगरेट अर्धवट पिऊन झालेली त्यांच्या बोटाच्या चिमटीत होती.

ताल से ताल मिला हे गाणे लागले होते आणि त्याच नादात घरातून भर पडलो. वळणावरच मला दिसली जणू माझीच वाट बघत होती तिला रिक्षा हवी होती. मी स्कुटरवर , म्हणालो ड्रॉप करतो. मनातच म्हणालो आधीच तू मला काही वर्षांपूर्वी ड्रॉप केले होते.
रसवंतीच्या दुकानावर वरील शब्द कानी पडले, आणि चमकून बघितले तर, एक अकरा बारा वर्षाचा कोवळा मुलगा अंगावर मळकट झालेले कपडे,तुटलेली पायातली चप्पल, व्हिटॅमिन्सच्या डेफिसियन्सी मुळे चेहर्यावरील पांढरे डाग. असे रूप घेऊन माझ्या नजरेस पडला. ‘बरं साहेब’ म्हणून तो लगबगीने रस काढावयाचा यंत्रा जवळ जाऊन, सराईतपणे दोन हातात चार रसाचे ग्लास घेऊन आला पटकन.
मी माझ्या बालपणात रमले आणि नकळतपणे आपल्या आणि त्या मुलाच्या बालपणाची तुलना करू लागले. आपले किंवा इतर सुखवस्तू घरातील मुलांचे बालपण किती सुखावह असते. सुरुवातीला चार पाच वर्षाचा काळ खूपच लाड होत असतो.त्यानंतरही तोंडातून पडेल तो शब्द झेलला जातो. अतिशय चांगल्या प्रतीचे शिक्षण होईल अशी शाळा निवडली जाते. कपड्यांचे खाण्याचे काय लाड होत असतात! हे असं होतं म्हणूनच असे निरागस बालपण पुन्हा पुन्हा यावे असे वाटून, ‘लहानपण देगा देवा’ तोंडातून सहजपणे बाहेर पडते.
एकदम सायकली? आणखीन काही नको का?” शेटजींचं उपहासात्मक बोलणं ‘सुखा’च्या लक्षात आलं. तो म्हणाला, “रागवू नका शेठजी, आम्ही राहतो ते जव्हारच्या पुढे खूप आडगाव आहे. आदिवासी पाडे तिथे आहेत. नीट शिक्षण नाही. दवाखाने नाहीत. शाळेला पोरान्ला पाच-सहा मैल चालत जावं लागतं. दुकानं नाहीत.
कोणे एके काळी पृथ्वीवर डोंगरांच्या घळ्यांमध्ये तारा राजाचे राज्य होते. सर्व बाजूंनी उंचच उंच डोंगर आणि चहुबाजूंनी पसरलेलं घनदाट जंगल यामुळे इथे अंधाराचेच राज्य असायचे. राजाने आपल्या प्रजेला किमान गरजेपुरता का होईना प्रकाश देण्यासाठी म्हणून खास योजना आखली होती.
बिथोवन हा एक जगातील सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक. त्याच्या संगीत रचनांनी असंख्य रसिकांना अक्षरश: वेड लावले.
बिथोवन ने एकदा एका अंध मुलीला पाहिले. त्याने सहज तिची चौकशी केली, तेव्हा ती जन्मापासूनच अंधळी असल्याचे समजले. थोडक्यात तिच्या जीवनात पहिल्यापासून अंधार होता. कारण ती उगवत्या सूर्याचे दर्शन घेऊ शकत नाही वा सूर्यास्तही पाहू शकत नव्हती. पांढरेशुभ्र चांदणे म्हणजे काय असते हे त्या मुलीला माहीत नव्हते किंवा कोसळणाऱ्या धबधब्याचे सौंदर्य ती पाहू शकत नव्हती. बिथोवनला तिची ही अवस्था पाहून फारच वाईट वाटले परंतु एक संगीतकार म्हणून आपण तिच्यासाठी काहीतरी केले पाहिजे. असा विचार त्याच्या मनात घर करून राहिला. या विचाराच्या पूर्ततेसाठी त्याने निसर्गसौंदर्य ओसंडून जाणारे एक काव्य मधुर शब्दात गुंफले व ते अतिशय सुंदर संगीतात स्वरबद्ध केले. 'मूनलाइट सोनाटा' म्हणून हे गाणे सर्व जगभर गाजले व लाखो रसिकांनी ते गाणे ऐकून बिथोवनला अक्षरशः डोक्यावर घेतले. ज्या अंध मुलीसाठी बिथोवनने हे गाणे तयार केले होते. त्या अंध मुलीने ते गाणे ऐकताच तिलाही स्वर्गीय सुखाचा भास झाला. ते पाहून बिथोवन ला साहजिक आपले जीवन कृतार्थ झाल्याची भावना झाली असेल. संगीत आणि सुरांतील सामर्थ्य त्याने सिद्ध करून दाखविले होते.
एखाद्या देशाला उद्ध्वस्त करायचं असेल तर त्या देशाच्या शिक्षण क्षेत्रात प्रचंड गोंधळ , गुंता करून ठेवा . देश केव्हा उद्ध्वस्त होईल हे कुणाला कळणारही नाही . हे कुणी म्हटलं होतं कुणास ठाऊक , पण ते सत्य होतं . अगदी पूर्वनियोजित कारस्थान असावं तसंच चाललं होतं . विद्यार्थी केंद्रीभूत शिक्षणव्यवस्था , बक्कळ पैसा देणारी इंडस्ट्री केव्हा झाली , हे धुरीणांच्या लक्षात सुद्धा आले नाही . त्या व्यवस्थेत विद्यार्थ्यांचे स्थान केवळ कच्चा माल या स्वरूपाचे झाले आणि त्यांचे पालक कच्च्या मालाचे वाहक झाले .
त्यात विद्यार्थी कुठं होता ?
त्याच्या मनाचा , बुद्धीच्या स्तराचा आणि शारीरिक क्षमतेचा विचार कुठं होता ?
त्याच्या अंगभूत गुणांचा विचार कुणी , कधी केला होता ?
शारीरिक विकासासाठी मोकळी मैदाने लागतात , त्याचा विचार कुठं होता ?
चार भिंतींची शाळा आणि एकत्रित शालेय सहजीवन खूप काही शिकवत असते , याचा विचार कुठं होता ?
रमाबाईंना हुरहूर लागली होती.. असं काय घडलं आहे.. आज माझी दोन्ही लेकरं न सांगता, नमस्कार न करता गेले आहेत.. असंख्य विचार मनात येत होते. पण त्यांनी ठरवले होते की, आज डोळ्यातून पाण्याचा थेंब काढायचा नाही. त्या पुढील कामासाठी वळल्या इतक्यात संदीपचा फोन आला, ‘आई, आम्हां दोघांनाही कंपनीच्या कामानिमित्त बाहेर जावं लागत आहे, तेव्हा तू तुझी बॅग भरून ठेव.
Copyright © 2025 | Marathisrushti