नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
तसा मी मात्र शाकाहरी ह्या खाद्य सवयीला चिटकून राहण्याच्याच विचारधारणेत होतो. मी पहीले अंडे खाण्याचा प्रयत्न केला तो केवळ मित्र मारुती ह्याच्या आग्रहामुळे.. सुटीच्या दिवशी तो अभ्यासाला येत असे. त्याचा स्वतःचा खाण्याचा डबा घेऊन येई. बऱ्याच वेळा आम्ही जवळ बसुन जेवण घेत असू.
नेहमीच्या कोपर्यावर मी मोटार थांबवली. माझे ऑफिसातले मित्र आंत चढले. मोटार ऑफिसच्या दिशेनं धावूं लागली. ‘‘आज साठे दिसत नाहीं’’, मी म्हणालो. ‘‘तुम्हाला माहीत नाहीं कां पराडकर ? साठेला मुलगी झाली.’’ पाटीलनं सांगितलं, ‘‘हो कां ? अरे वा !’’, मी. साठे हा आमच्या ऑफिसातला एक तरुण ऑफिसर. त्याच्या खेळकर स्वभावामुळे तो सर्वांनाच आवडत असे. दीडएक वर्षांपूर्वी त्याचं लग्न झालं होतं. आतां मुलगी झाली होती. बेटा अगदी खुशीत असणार ! साठे भेटला की त्याचं अभिनंदन करायचं मी ठरवलं.
दुसर्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे मित्र कारमध्ये चढले. आज साठेही होता. ‘‘साठे, अभिनंदन !’’, मी. ‘‘थॅंक्यू’’ , साठे. ‘‘बर्फी हवी बरं का साठे’’, मी. ‘‘छे छे, बर्फीनं भागणार नाही, पार्टीच हवी’’, काळेनं फर्माईश केली. ‘‘देऊं ना’’, साठे म्हणाला. पण त्याच्या बोलण्यात उत्साह दिसत नव्हता.
कार पुढे धावत होती. संभाषणाला खीळ पडली होती. नेहमीचा खेळकर साठे आज इतका गप्प गप्प कां? मी विचार करत होतो. अखेर न राहवून मी विचारले, ‘‘काय साठे, आज अगदी गप्प आहेस ? बाळ बाळंतीण ठीक आहेत ना ?’’. साठेच्या आधी पाटीलनंच उत्तर दिलं, ‘‘त्याचं काय आहे, मुलगी झाली म्हणून साठे नाराज झालाय्’’. ‘‘खरं का रे’’, मी. साठे गप्पच. त्याला समजवत मी म्हणालो, ‘‘अरे, नाराज कशाला व्हायचं? उलट खूषच व्हायला हवं. म्हणच आहे, पहिली बेटी धनाची पेटी’’. ‘‘हो धनाची पेटी ! मला आत्तांपासूनच धन जमवायच्या मागे लागायला हवं, म्हणजे मुलीच्या लग्नासाठी धनाची पेटी तयार करता येईल’’, साठे उद्गारला. ‘‘अरे साठे, मूल होणं ही किती आनंदाची गोष्ट आहे ! त्यातून तुझं तर पहिलं मूल ! मुलगा काय, मुलगी काय, सारखंच’’, काळे म्हणाला. त्याला लग्नानंतर पांच वर्षांनी मूल झालं होतं. पण साठेला काळेचं सांगणं पटलं नाही. ‘‘अरे बाबा, एवढं सोपं नाहीं तें. आज मुलीच्या लग्नाला चार-पांच लाख खर्च येतो. पंचवीस वर्षांनी पंधरा-वीस लाख तरी लागतील. आपण मध्यमवर्गीय माणसं, आपला पगार तो कितीसा, अन् त्यातून शिल्लक किती पडणार ? महागाई तर दिवसेदिवस वाढतेच आहे ! मुलीला वाढवायचं, शिकवायचं, ग्रॅज्युएट-पीजी करायचं. त्यातून तिने इंजिनियरिंग किंवा मेडिकलला जायचं म्हटलं तर झालंच ! एवढं सगळं करून इतके लाख शिल्लक टाकायचे कसे अन मुलीचं लग्न करायचं कसं ?’’, साठे व्यथित झाला होता. जणूं मुलीचं लग्न उद्यावर येऊन ठेपलं होतं !
मी वेगळा मुद्दा मांडत साठेची समजूत काढू लागलो, ‘‘पण मुलगा होणं किंवा मुलगी होणं आपल्या हातात थोडंच असतं ? मग मुलगाच व्हावा अशी अपेक्षा ठेवणं योग्य आहे कां ?’’. ‘‘पराडकर, तुमचं काय जातं असं म्हणायला?’’, साठे चिडून बोलला, ‘‘तुम्हाला दोन्ही मुलगेच आहेत. जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे !’’.
खरं म्हणजे मला साठेशी खूप बोलायचं होतं. मुलगा किंवा मुलगी असा प्रेफरन्स मला नव्हता, हे त्याला सांगायचं होतं. हल्ली मुली मुलांच्या बरोबरीने चमकतात, स्त्रिया पुरुषांपेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नाहीत, हेही सांगायचं होतं. ह्या विषयाचे वेगवेगळे पैलू आहेत, त्यांची चर्चा करायची होती. पण साठेचा मूड् बघून मी विषय वाढवला नाही. बाकीची मंडळीही उरलेला रस्ता गप्पच राहिली.
संध्याकाळी साठे ओव्हरटाईमला थांबल्यामुळे आमच्याबरोबर नव्हता. साहजिकपणें पुन्हां साठेचाच विषय सुरुं झाला. ‘‘साठेनं मुलगी झाल्याचं फारच मनाला लावून घेतलं आहे’’, मी म्हणालो , ‘‘खरं म्हणजे मुलगा किंवा मुलगी होणं किंवा न होणं हें आपल्या हातात नसतं’’. ‘‘खरं आहे, पण साठेसारखे लोक बरेच आहेत, पराडकर’’ , इति पाटील.
पाटील सांगूं लागला, म्हणाला, ‘‘माझा एक परिचित आहे, लिमये. त्याला दोन मुली आहेत. बायकोची प्रकृती यथातथाच आहे. तिसरं मूल नको असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. पण ह्या सद्.गृहस्थाला मुलगा हवाच होता, म्हणायचा, ‘मुलगा नसला तर मला सद्गती मिळणार नाहीं’. जग एकविसाव्या शतकात पोंचलंय आणि याचे असे जुनाट विचार ! बायकोला तिसर्यांदा दिवस राहिले. ह्याला कांही चैन नाहीं, मुलगा होईल की मुलगी ? गर्भतपासणी करून घेतली”. ”अरे, पण तशी चाचणी तर बेकायदेशीर आहे”. ”हो, पण तरीही घेतली करून. मुलगी आहे असा निर्णय समजला. झालं. हा पठ्ठ्या बायकोच्या मागे लागला की गर्भपात करून घे. दोनचार दिवस तिनं तग धरला. पण हा कांही पाठ सोडेना. शेवटी ती बिचारी नाइलाजानें तयार झाली. अन् सांगायची गोष्ट म्हणजे गर्भपाताच्या वेळी ती बाई रक्तस्त्रावाने जवळजवळ मेलीच होती, केवळ सुदैव म्हणून वाचली ! त्या वेळी तिची मोठी मुलगी होती चार वर्षांची अन धाकटी दोन वर्षांची. आतां बोला ! ”. ”बिचारी बाई खरोखरच जर मेली असती तर त्या लहान जिवांचे काय हाल झाले असते !’’, काळे त्वेषानं उद्गारला. ‘‘खरी गंमत पुढेच आहे’’, पाटील म्हणाला, ‘‘थोड्या दिवसांनी बाईला पुन्हां दिवस राहिले, अन या वेळी मात्र तिला मुलगाच झाला’’. ‘‘त्या लिमयेला अगदी धन्य धन्य झालं असेल!’’ मी म्हणालो. ‘‘हो ना ! त्याला आता आभाळ ठेंगणं झालंय. आतां स्वर्गात जायची सोय झाली ना !’’ पाटीलची प्रतिक्रिया.
”पण साठे काय किंवा लिमये काय, यांच्या या अवस्थेला आपली समाजरचनाच जबाबदार आहे”, काळे म्हणाला, ”अगदी माझ्या घरातलंच उदाहरण सांगतो. परवाचीच गोष्ट. माझी बायको नलू सांगत होती – ‘दुपारी मी आणि शेजारची सुमा बोलत उभ्या होतो. पलिकडच्या मालतीकाकू त्यांच्या पुष्पाच्या बाळाला घेऊन जात होत्या. त्या आमच्याशी बोलायला थांबल्या. मी कौतुकानं म्हणाले, कित्ती छान जावळ आहे बाळाचं. तर म्हणतात कशा, ‘असं बोलूं नये हो. बाळाला दृष्ट लागेल’. मला अस्सा राग आला. नंतर मी सुमाला म्हटलं सुद्धा, आमची कशी दृष्ट लागेल ? आम्हाला मुलं नाहींत की काय ?’. नलूचं बोलणं ऐकून मी थक्कच झालो . म्हटलं , ‘मालतीकाकूंचं जाऊं दे ; अल्पशिक्षित म्हातारी ती. पण तूं ! तूं तर कॉलेजात फिजिक्सची लेक्चरर आहेस ! दृष्ट लागणं अन त्यातूनही निपुत्रिकेची दृष्ट लागणं असल्या अंधश्रद्धांवर तुझ्यासारखी बाई विश्वास ठेवते म्हणजे मात्र कमाल आहे !’ . ’माझा विश्वास आहे की नाहीं ते जाऊं द्या’, नलू म्हणाली, ‘जगाचा तर आहे ना ! आपला विश्वास असो वा नसो, समाज आपल्याला अशा गोष्टींमध्ये जखडून ठेवतो. इतकी वर्ष आपल्याला मूल नव्हतं. तेव्हां याच बायकांच्या बोचर्या नजरा मला घायाळ करत, त्यांची कुत्सित बोलणी ऐकवत नसत. आतां देवानं मला सोन्यासारखी मुलगी दिली आहे. आतां मी दुसर्यांची बोलणी कां म्हणून ऐकून घ्यावी ?’ या अजब तर्कानं मी सर्द झालो”, काळेंनं गोष्ट पूर्ण केली. मग काळेनं विचार मांडला, ”सांगायचा मुद्दा असा की, समाजाची रचना, समाजाच्या रूढी बदलायला हव्यात. तरच साठे आणि लिमयेसारखे लोक मुलगी झाली म्हणून दुःखी होणार नाहींत”.
*
पाटील अन् काळे नेहमीच्या कोपर्यावर उतरून गेले. कार घराकडे धावत होती. कारबरोबर माझे विचारही धावत होते. कधी बदलणार हा समाज ? दुष्ट रुढी कधी नाहींशा होतील ? कधी स्त्रियांना समाजात बरोबरीचं, मानाचं, स्थान मिळेल ? आपल्यासारखी माणसं त्यासाठी काय काम करूं शकतील? एक ना दोन, अनेक विचार.
विचारांच्या नादात घर केव्हां आलं ते मला कळलंच नाहीं, कार पार्क करतां करतां मी ठरवलं की गेल्या गेल्या लगेचच स्त्रीस्वातंत्र्य-पुरस्कर्त्या आपल्या बायकोला आजची सर्व चर्चा सांगायची.
घरात पाऊल टाकतांच दिसलं की माझी चुलतबहीण रजनी आलेली होती अन् ‘मुलगा व्हावा’ म्हणून कुठलसं व्रत धरल्याचं ती माझ्या बायकोला सांगत होती. मी ओठावरचे शब्द तात्पुरते गिळून टाकले.
+ + +
( Note – This story is based on a real-life experience. The Author has taken some literary liberties. Name of characters have been changed ).
_ _ _
[ पूर्वप्रसिद्धी : ‘कीर्तिस्तंभ’ पाक्षिक, वडोदरा ( बडोदा) , आवृत्ती दि. ०१.०९.१९९६.
कांहीं बदल : १४ फेब्रु. २०१८ ]
= = =
- सुभाष स. नाईक Subhash S. Naik
मुंबई.
M - 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com , www.snehalaatnaik.com
ती, एक नखशिखान्त पांढऱ्या रंगात रंगवलेली, सरकारी दवाखान्याच्या तळघरातील खोली होती. फार तर दहा बाय बाराची. त्यात त्या कॉटने,ज्यावर मला आता त्या नर्सने बांधले तो,निम्या पेक्षा ज्यास्त जागा व्यापली होती. त्या खोलीला एकही खिडकी किंवा झरोका नव्हता. फक्त भिंतीशी एकरूप झालेला एक दरवाजा होता. तो ही पांढरा फटक!
तेहतीस कोटी देवांचे दर्शन घेण्यासाठी, कुणालाच कसलेही श्रम व मेहनत घ्यावी लागत नव्हती. ती गाय, जिच्यात तेहतीस कोटी देवांचे अस्तित्व असल्याची भावना, जणू दर्शन देण्यासाठीच येणाऱ्या जाणाऱ्याच्या वाटेवर उभी होती. प्रत्येकजण दर्शन घेवून स्वतःचे समाधान आपल्याच कृतीत शोधात होता.
मी: काय झालं साहेब ? पोलीस: मी तुम्हाला बायकोला विष देऊन त्यांचा खून केल्याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून अटक करतोय.
राजू नावाचा एक छोटा मुलगा. चुणचुणीत आणि गोड स्वभावाचा. सकाळी लवकर उठायचा. आंघोळ करायचा. आई वडील आणि घरातील मोठ्या माणसांच्या पायी डोके ठेवायचा. नम्रपणा हा त्यांचा विशेष गुण होता. अभ्यासातही हुशार होता. मित्रांशी सहकार्याने वागायचा. घरच्या कामाची त्याला खूप आवड होती.
त्यांचे वडील त्याला खूप जीव लावायचे. सकाळी शाळेत सोडायचे.घरी आला की नाही ते पहायचे. घरी दोन एकर जमीन होती. त्यातच हे कुटुंब राबायचे. जगण्याएवढी सालचंदी व्हायची. कष्ट करून , मोलमजुरी करून पोरांचे शिक्षण चालू होते. राजूला थोडेफार समजायला लागले. सुट्टी असली की तो आई-वडिलांना कामात मदत करत असे. वडिलांसाठी रानात भाकरी घेऊन जाई. शेळ्या सोडून चालायला नेई. कधीकधी सरपण, गवर्या वेचून आणी. कळशीने घरचे पाणी भरी.जमेल तशी मदत करी.
यासाली भयंकर दुष्काळ पडला. कोणत्याच विहीर, तलावात ,हापशाला पाणी राहीले नाही. पाणी नाही म्हणून शेती पिकेना. त्यामुळे रोजगार मिळेना.ऊसतोड, वीटभट्टी कारखाना अशा ठिकाणी लोक कामाला जाऊ लागली. काही हमालीला जात होती.काही परराज्यात जात होती. राजूच्या वडिलांनी सावकाराकडून काही कर्ज घेतले.जमीन काही पिकेना. कर्ज काही फिटेना.घेतलेले कर्ज परत करावेच लागणार होते. ते परत द्यायला काही मार्ग सापडत नव्हता. तेवढ्यात गाडीवरून पडून त्यांचा हात मोडला. राजूचे वडील अधू झाले होते. काम सुटले. खाणारी तोंडे वाढली. राजूला शाळा सोडावी लागली. परिस्थिती बिकट झाली. गुरूजी घरी यायचे. ' पोराला शाळेत पाठवा. हजेरी कमी पडतीय.
परीक्षा जवळ आलीय.' असं म्हणायचे. पण नाईलाज झाला होता.पोटापाण्याचा प्रश्न होता. एका रात्री आईवडीलांचे भांडण झाले. त्याचा अर्थ राजूला काही समजला नाही . पण वडील रागाने निघुन गेले. त्यांच्या हातात कसलातरी दोर होता. राजूच्या हे लक्षात आले. त्याच्या शाळेत वर्तमानपत्राचे वाचन व्हायचे . त्यात एक बातमी हमखास असायची. 'कर्जाला कंटाळून शेतकर्याची आत्महत्या.' सर म्हणायचे " ती नका वाचू. दुसरी वाचा चांगली." राजूच्या मनात पाल चुकचुकली.
तो ताडकन उठला. अंधारात पळाला. दगडधोंडे बघितले नाही की काट्याकुट्या. बापाला गाठलच. वडीलांसमोर धाय मोकलून रडायला लागला. विनवणी करू लागला. त्यांच्या उरात माया उत्पन्न झाली. तोपर्यंत चारदोन माणसं जमा झाली. राजूच्या वडिलांनी मनातील विचार काढून टाकले. ते घरी आले. राजूला कडकडून मिठी मारली.
विठ्ठल जाधव,शिरूरकासार, जि.बीड
सं.९४२१४४२९९५ (दिव्यमराठी)
आजच्या आधुनिक युगाने आणि संगणकासारख्या इलेक्ट्रोनिक माध्यमांनी सुध्या ओळख माण्यतेसाठी अंगठ्याचा ठसा हाच एकमेव प्रभावी साधन असल्याचे मान्य केले आहे. त्याच्या समोर अंक, शब्द, खुणा, प्रतिमा, इत्यादी दुयमच ठरतात. त्या अनामिक अशिक्षित परंतु अनुभव संपन्न मावशीला अभिवादन करून मी घरी आलो.
अवध नगरीचा राजा कुरसेन नावाप्रमाणेच अतिशय क्रूर होता. राज्यातील जनतेवर त्याने अनेक अन्याय-अत्याचार तर केलेच शिवाय शेजारील देशावर अनेकदा आक्रमणे करून तेथील राजा व प्रजेला जेरीस आणले. सत्तेबरोबरच तो संपतीचा भुकेला होता. त्यामुळे एकेका सुवर्णमुद्रेसाठी तो हिंसाचार करायला मागेपुढे पहायचा नाही. संपत्तीचे त्याचे हे वेड वरचेवर वाढतच होते. अवध नगरीच्या बाहेरच रस्त्याला लागून असलेल्या एका झोपडीत एक साधू रहात होता. अखंड ईश्वराचे स्मरण व गोरगरिबांना अडचणीच्या वेळी मदत एवढेच त्याचे ध्येयकार्य होते. त्यामुळे अनेकजण त्याच्या दर्शनाला येत व त्याचा उपदेश ऐकून जात. एके दिवशी सायंकाळी एक श्रीमंत गृहस्थ त्या साधुची कीर्ती ऐकून तेथे आला. त्याने साधूमहाराजाचे दर्शन घेतले व जाताना त्याने एक सुवर्णमुद्रा साधुच्या पुढे ठेवली.
निरीच्छ वृत्तीचे साधू महाराज त्याला म्हणाले, मला सुवर्णमुद्रा नको. तूच कोण्या गरजू माणसाला दे. त्यावर तो श्रीमंत गृहस्थ म्हणाला की मी तुम्हाला ती श्रद्धेने दिली. त्यामुळे तुम्हीच तिचा योग्य विनियोग करा. थोड्या वेळातच रस्त्यावरून राजा क्रुरसेनाची स्वारी येत होती. बरेचसे सैनिक त्याचाबरोबर होते. राजा क्रुरसेन स्वतः हत्तीवर अंबारीत बसला होता. राजाचा हत्ती झोपडीजवळ आला तसा तो साधू झोपडीबाहेर आला व त्याने त्याला दिलेली सुवर्णमुद्रा राजावर फेकून मारली. ती राजाच्या डोक्याला लागून अंबारीत पडली. ते पाहून राजा खूपच संतापला. तो खाली उतरला व त्याने त्या साधुला त्या कृत्याचा जाब विचारला. त्यावर साधू राजाला म्हणाला, मी मुद्दामच तुला सुवर्णमुद्रा फेकून मारली. कारण धनाचा तू लोभी आहेस त्यासाठी तू अनेकांवर अत्याचार केलेस म्हणून तुला ती सुवर्णमुद्रा देत आहे. ते ऐकून राजा अधिकच संतापला व त्याने साधूला पकडून ठार मारण्याचा सैनिकांना आदेश दिला. मात्र साधू अतिशय शांत होता.
राजाबरोबर असलेल्या प्रधानाला त्या साधुची योग्यता माहीत होती. त्यामुळे त्याने लगेच राजाला साधूमहाराजांना पकडू नये अशी विनंती केली. कारण मनात आणले तर त्या साधुची राजाचा सर्वनाश करायची तयारी होती. प्रधानाने राजाला समजावून सांगितल्यावर राजालाही साधूच्या दिव्यत्वाची प्रचिती आली व त्याने साधूचे पाय धरले. त्या वेळी साधूने त्याला संपत्तीसाठी हिंसाचार न करण्याचा सल्ला दिला व तो प्रमाण मानून राजा तेथून माघारी गेला.
पहाणाऱ्या साठी मी एक सुखी माणूस आहे . वयाच्या पासष्टीत हि उत्तम प्रकृती . सुंदर पत्नी ,हो अजूनही म्हणजे वयाच्या साठीत सुद्धा जान्हवीने स्वतःस सुरेख मेनटेन केलाय . मुलगी आणि जावाई दोघे डॉक्टर , ग्रीन कार्ड मिळालेले न्यू जर्सीत वेल सेटल्ड . मुलगा - सून बेन्ग्लोरला , आयटी क्षेत्रात . आम्ही दोघे पुण्यात . राहायला छोटेसेच असले ,तरी सर्व सोयीनीयुक्त घर . दोन वेळेच्या वरण भाता साठी पेन्शन मिळतीय . चार पैसे बाळगून आहे . दृष्ट लागण्या सारखा संसार आहे माझा ! माझ्या सारख्या ' सुखी ' माणसाचा 'सदरा'घेण्यासाठी मोठी वेटिंग लिस्ट लागेल . पण मी 'तो' कोणालाच देणार नाही !
का ? तुम्ही विचारलं .
आजवर याचे उत्तर मी कोणालाच दिलेले नाही . पण आज मात्र मी तुम्हाला सागणार आहे ! फक्त एकाच विनंती आहे , हे गुपित फक्त तुमच्या पुरतेच ठेवा , इतरांशी शेयर करू नका .
000
पाहता क्षणी जान्हवी मला आवडली . किंचित सावळी , नजरेत भरणारी उंची , सडपातळ बांधा ,रेखीव चेहरा ,( थोडासा गंभीर) , मधेच मंद स्मित करण्याची सवय , आणि त्या वेळेस पडणारी गालावरची खळी ! या पेक्षा अप्सरा वेगळी असते का हो ? मी त्याच बैठकीत होकार देवून टाकला . मुलगी पहाण्यासाठी घेतलेली सी. एल . प्रीव्हीलेज लिव मध्ये वाढवून घेतली . पंधरा दिवसात आमचे लग्न झालेही !
मझ्या लग्नाच्या नवलाईचे नऊ दिवस थोड म्हणजे तब्बल पाच वर्ष लांबले ! तोवर स्वाती आणि शेखर अंगणात खेळत होते . हळू हळू मला जान्हवी समजू लागली . ती घरात खूप कमी बोलायची . घरची सगळी काम करायची . आईच्या औषध पाण्याचा वेळा , मुलाचं खाण - पीण ,माझा डब्बा . सगळ व्यवस्तीत वेळच्या वेळी !
"जान्हवी , काय झाल ?तू खूप अबोल असतेस . " मी एकदा तिला विचारल .
"काही नाही . मला बोलणच कमी आहे !"
" मोकळ बोलत जा ना. लग्न झाल्या पासून पहातोय ,तू कधी काही मागितल नाहीस . कशाचा हट्ट हि केला नाहीस. मी जे आणीन ते नबोलता ठेवून घेतेस . अजून तुझी आवड -निवड पण मला कळू शकली नाही . "
"मला सगळ मिळतय .मग हट्ट का करू ?"
असतो एखाद्याचा स्वभाव समाधानी . आणि अश्या स्वभावाची बायको मिळायला शेकडो जन्माची पुण्याई लागते ! माझ्या मनातल्या तिच्या बद्दलच्या प्रेमाला आदराची प्रभावळ लाभली .
000
एक दिवस मी ऑफिस मधून येताना मला वेडावणारा गंध नाकात शिरला . मोगऱ्याच्या फुलाचा वास ! जीव टाकतो याच्या साठी मी ! पांढऱ्या शुभ्र ,ताजा टवटवीत , मोगऱ्याच्या फुलांचे गजरे त्या फुलवाल्याच्या दुरडीत ऐटीत बसले होते . गजरा मळलेली जान्हवी डोळ्या समोर तरळून गेली . आजवर कसे लक्षात आले नाही कोणास ठावूक ? जान्हवीच्या नाजूक चेहऱ्याला हा गजरा काय शोभून दिसेल ! आता रोज जानू साठी गजरा घेणार ! मी गजरा घेवून घरी आलो .
"जान्हवी ,गजरा पाहताच तुझी आठवण झाली . मुद्दाम तुझ्या साठी आणलाय . "मी जान्हवीला गजरा देत म्हणालो . तिने होकारार्थी डोके हलवून गजरा एक शब्द हि न बोलता घेवून गेली . मला तिचा अबोल स्वभाव पुन्हा खटकला .
चार दोन दिवसांनी माझ्या लक्षात आले कि जान्हवी मी आणलेला गजरा घालत नाही.
"जान्हवी , मी तुझ्या साठी मुद्दाम गजरा आणतो . पण तू घालत नाहीस . का ?"
"घालते कि !"
"मला कधी दिसल नाही. "
"---"ती पुन्हा गप्प बसली .
"आजवरच जावू दे . आज घाल . "
"हो.जेवण झाल्यावर घालते . "तिने मी दिलेली वेणी माठा वरच्या ओल्या झाकणीत ठेवली . आणि कामात गुंतली .
"जानू ,आग वेणी ?"
रात्री मी पुन्हा विचारले.
"आता कंटाळा आलाय. सकाळी घालीन. "
सकाळी घाईत ऑफिसला जाताना माझे लक्ष माठा कडे गेले. मलूल झालेला तो गजरा माठा खालच्या बादलीत तरंगत होता.
संध्याकाळी पुन्हा मी वेणी आणलीच . घरात जाताना अंगणातल्या तुळशी वृदावनात पडलेले कालच्या गजऱ्याचे कलेवर पडलेले दिसले !
"जानू ,हे काय ?तुला गजरा छान दिसतो . घालत जा ना. माझ्या साठी तरी!"
"खरे सांगू . मला मोगऱ्याचा वास नाही आवडत !आणि मोगराच काय मला कुठलीच फुल नाही आवडत . नका आणत जावू माझ्या साठी काही !"
बापरे ! किती तोडून टाकणार बोलली आज . तारुण्यात बायकांना फुलांचा तिटकारा असू शकतो ? असेल हि . नसेल तिला फुलांची आवड . मी तरी का एव्हडा 'गजरा घाल' म्हणन हट्ट करावा ? हि बळजबरी बरी नाही. माझी आवड तिच्यावर का लादावी? तिच्या दृष्टीने मी विचारच केला नव्हता . मला बराच वेळ अपराधी वाटत राहील . मग मी तिच्या साठी वेणी /गजरा आणणे बंद केले . आणि झाला प्रकार विसरूनही गेलो .
एक दिवस मिटिंग कॅनसल झाली म्हणून लवकर घरी आलो. घराला कुलूप होते. बायको माहेरी गेल्याचे शेजारच्या काकुनी सांगितले . माहेर गावातच असल्याने ती आधन - मधन माहेरी जावून येते . ऑफिस सुटण्याचा सुमासार ती परतली. मस्त लाईट मूड मध्ये होती. काही तरी गाण गुणगुणत होती. आणि मोकळ्या केसात नाजूक जाईची वेणी ! मला पहातच एकदम गप्प झाली. चेहऱ्यावर गंभीर मुखवटा आला.
"काय ,आज माहेर ?काही विशेष ?"
"हो ,आईने बोलावल होत . "
"तुला फुल आवडत नाही ना ?मग आज वेणी कशी ?"मी नको तो प्रश्न विचारल्याची झाली.
"घालते कधी कधी ! माझ्या मूडवर असत ! "तुटक उत्तर देत घरात निघून गेली! काही तरी चुकतय याची मनाला जाणीव झाली.
000
त्या दिवशी दिनकरकाका रस्त्यात भेटले. त्यांच्याच मध्यस्तीने आमचे लग्न जुळले होते.
"का हो काका , जान्हवी लहानपणा पासूनच अशी अबोल आहे का हो ?"
बोलता बोलता मी सहज विचारले.
" कोण ? बबडी ! छे रे तिला खूप बोलायला आवडत !तोडात तीळ भिजत नाही तिच्या!पण तू का विचारतोयस ?"
"काही नाही . लग्न झाल्यापासून खूप अबोल असते . "
"अरे ,नव्या संसाराच्या जवाबदारीने थोडी बावरली असेल. तू नको काळजी करूस. पोर खूप गोड आहे. लग्नाला पण 'नको' म्हणत होती, मीच तिची समजूत घालून तयार केली होती !"
मग मात्र मन सर्व गोष्टींची उकल करू लागल .गजराच काय मी आणलेल्या साड्या ,ड्रेस पण ती घालत नव्हती !तिने मला विरोध कधीच केला नाही ,पण सहकार्य पण केले नाही !' नव्या संसाराच्या जवाबदारीने थोडी बावरली असेल.'म्हणे ! हे बावरेपण पाच वर्षा नंतर हि टिकू शकत ? म्हणजे हे लग्न जान्हवीच्या मना विरुद्ध झालेलं होत! तिच्या तुटक बोलण्या -वागण्याचा अर्थ आता लागत होता! तिच्या पद्धतीने तो केलेला आणि आज तगायत चालू ठेवलेला , लग्नाचा निषेध होता!
प्रेम म्हणजे व्यभिचार आणि प्रेमविवाह म्हणजे सामाजिक गुन्हा! हा अलिखित नियम असणारा तो काळ होता . एक वेळ जगाशी दोन हात करता येतात ,पण आपल्याच आप्तांशी , जन्मदात्यांशी नाही सगळ्यानाच नाही झगडता येत! अश्या इमोशनल अत्त्याचाराचे बळी घरोघर असत. वडिलधाऱ्या मंडळीच्या संमतीनेच लग्न ठरत. पाच - सात मिनिटाच्या 'कांदा-पोह्या 'ने जन्माचा गाठी करकचून बांधल्या जायच्या. त्यातहि मुलीना खूप कमी स्वातंत्र्य असायचे. काही विरोधी सूर लावला कि ' सहवासान प्रेम होत निर्माण ! आमचे नाही का झाले संसार सुखाचे !' हा ठोकळेबाज सल्ला तयार असायचा.
मला या सर्व परस्ठीतीची पूर्ण कल्पना आहे . मी जान्हवीची बाजू समजू शकतो . हा घे 'नवरा ' अन कर प्रेम. अस नाही करता येत प्रेम ! सहवासाने आदर , आपुलकी ,वाटेलही पण प्रेमाची उस्पुर्ततता नाही येत. जान्हवी एक आदर्श गृहिणी आहे, आई आहे, सून सगळ आहे !आणि हो , काल पर्यंत ती आदर्श बायको पण होती !पण --पण आता मला तिचा छुपा विरोध जाणवतोय !
आजवर जे झाल ते झाल. या नंतर मीही खूप संयमाने वागतोय. तिच्यावर माझ्या आवडी - निवडी लादण्याच टाळतोय . पूर्वी सारख हक्काच अस काही राहिलेलं नाही. जगाच्या दृष्टीने ती एक आदर्श गृहिणी/पत्नी आहे . मी हि एक आदर्श पती आहे . सहवास , संगत ,सोबत ,सामंजस्य आहे पण ------
आज आमच्या लग्नाला चाळीस वर्ष झाली आहेत. गेल्या चाळीस वर्षात ती एकदाही ' LOVE U ' नाही म्हणाली .किवा त्या अर्थाची जाणीव पण होवू दिली नाही ! मी अजूनही वाट पहातोय ! मावळतीला आलेली एक आशाअजूनहि आहे. केव्हा तरी तिला माझ्या बद्दल प्रेम वाटेल .
000
आता सांगा ज्या माणसाच्या बायकोचे त्याचावर प्रेम नाही, आणि हे त्याला पक्के माहित आहे अश्या माणसाचा ' सदरा ' तुम्ही घ्याल का ? आणि जरी तुम्ही घेतला तरी तो मी तुम्हास कसा देईन ? न भरून येणाऱ्या जखमा साठी मी कारणीभूत का ठरू?माझे ते संस्कार नाहीत !
-- सु र कुलकर्णी
आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . Bye.
रस्त्याच्या वळणावर एका झाडाखाली एक गाय शांत उभी होती. फक्त मानेची व शेपटीची हालचाल अधून मधून चालू होती. कितीतरी वेळ ती तशीच उभी होती. जाणारा येणारा तिच्या कपाळाला, शिंगाला व अंगाला हात लावून तिला नमस्कार करू बघत होता. डोळे मिटून शांत विश्रांती घेत असालेल्या त्या गायीला, प्रत्येकाचा स्पर्श होत असल्याची जाणीव, तिच्या किंचितशा हालचालीवरून दिसून येत होती. तिला त्यांच्या स्पर्शाबद्दल काय वाटत असावे, हे समजण्यास मार्ग नव्हाता. परंतु प्रत्येक वाटसरूला तिला स्पर्श करून, जणू तेहतीस कोटी देवांचे दर्शन घेतल्याचा आनंद झाल्याचे दिसून येत होते.
तेहतीस कोटी देवांचे दर्शन घेण्यासाठी, कुणालाच कसलेही श्रम व मेहनत घ्यावी लागत नव्हती. ती गाय, जिच्यात तेहतीस कोटी देवांचे अस्तित्व असल्याची भावना, जणू दर्शन देण्यासाठीच येणाऱ्या जाणाऱ्याच्या वाटेवर उभी होती. प्रत्येकजण दर्शन घेवून स्वतःचे समाधान आपल्याच कृतीत शोधात होता.
एक दहा वर्षाचा मुलगा हातात पिशवी घेवून तेथे आला. त्याने पिशवीतून प्रथम एक मोठा ब्रेड काढला. गाईचे लक्ष जातच ती त्याचावर झेपावली. अतिशय अधाशीपणे तिने तो सर्व ब्रेड क्षणात खावून टाकला. मुलगा बघतच होता. गायीला हात लावून तो निघून गेला. गाय हलके हलके वळून दूर जाण्याऱ्या त्या अनामिक मुलाला बघत होती. तिच्या डोळ्यातून बाहेर पडनार्या नजरेमधून तेहतीस कोटी देवांचे आशीर्वाद दिले जात असल्याचा संकेत स्पष्टपणे जाणवत होता.
डॉ.भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti