(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • अशा ह्या दोन पुजा – दुसर्‍या मित्राची पुजा

    अशा ह्या दोन पुजा – पुढे चालू– दुसर्‍या मित्राची पुजा—

  • हरवलेला भक्त

    रेल्वे गर्दीने भरून गेली होती. टी. सी ला एक पाकीट सापडते. त्यात काहीच पुरावा नसल्याने काहीच अंदाज येईना शेवटी त्याने विचारले, ही पर्स कुणाची आहे ?,तेव्हा एक आजोबा येतात आणि म्हणतात माझी आहे. टी.सी म्हणतो,खात्री कशी पटणार ? आजोबा म्हणतात त्यात श्रीकृष्णाचा फोटो आहे . त्यावर टी सी म्हणतो असा फोटो कोणाकडेही पडेल.त्यात काय विशेष ? तुमचा फोटोही नाही त्यावर आजोबा शांतपणे उत्तर देतात ,मी शाळेत असताना ही पर्स मला वडिलांनी दिली होती .थोडे पैसे खाऊसाठी दिलेले असायचे.तेव्हा आई बाबांचा फोटो लावला होता जसा कॉलेज कुमार झालो तेव्हा माझा मला फोटो आवडायचा त्यांचा फोटो काढून मग माझा फोटो ठेवायला लागलो नंतर लग्न झाल माझी बायको सुंदर होती माझा फोटो काढून मग तिचा फोटो ठेवू लागलो ,काही वर्षांनी आम्हाला एक मुल झाले . आयुष्याचा नवीन पर्व सुरु झाल . मग त्याचा फोटो ठेवू लागलो .

    मात्र हे सगळ सांगताना आजोबांचे डोळे पाणावले गेले , ते बोलतच राहिले, म्हणले काही वर्षापूर्वी माझे आई बाबा गेले नंतर माझी पत्नीही साथ सोडून गेली ,ज्या मुलाला मी वाढवलं त्यानेही मला सोडलं तो आता त्याच्या आयुष्यात व्यस्त झाला , मला पाहायला त्याच्याकडे वेळ हि नाही . म्हणून आता माझ्या पर्स मध्ये मी श्रीकृष्णाचा फोटो लावलाय . मला कळून चुकलय की भगवान श्रीकृष्ण माझे शाश्वत साथी आहेत . माझी साथ कधीच सोडणार नाही, जर मला आधीच कळलं असत की जे प्रेम मी माझ्या कुटुंबावर केले तेच मी देवावर केले असते तर असे एकटे पडलो नसतो .

    टी. सी ने त्या आजोबांची व्यथा समजून घेतली आणि पर्स परत केली . तो टी सी पुढच्या स्टेशन ला उतरून एका पेपर विक्रेत्याकडे जाऊन विचारले "भगवान श्रीकृष्णाचा फोटो आहे का ? मला माझ्या पर्स मध्ये ठेवायचा आहे.........

    गोष्ट व्यावहारिक दृष्टीने touching असली तरी येत्या काळाची चुणुक दाखवणारी आहे. कुटूंब छोटी छोटी होत चालली आहेत, स्वयंकेंद्रित होत चालली आहेत. आपण स्वत: पुढच्या अशा परिस्थिती साठी तयार असले पाहिजे म्हणजे नैराश्य येणार नाही. ह्या सगळ्यावर उपाय म्हणजे 'योग' आणि 'ध्यान' यांची कास आपण धरली पाहिजे.

    जय श्रीकृष्णा !!

  • प्लेगमुळे स्थलांतर

    अनेक रोग शरीरावर आघात करतात. ते देहाला घातक वा मारक देखील असतात. मनुष्यप्राणी आपल्या बुद्धीप्रभावानें त्यांच्यावर मात करण्याचा प्रयत्न करतो. दोन आघाड्यावर हे प्रयत्न झालेले जाणवतात. निश्चीत विज्ञान ज्ञान प्राप्ती व लोक अनुभवानुसार त्याची उकल करतात. कॉलरा, प्लेग, नवज्वर,धनुर्वात, क्षय आणि अशाच रोगाविषयी असेच झाले. प्रथम ते रोग अज्ञात होते, परिणामाची भिती होती. त्याच्या पासून बचाव म्हणजे, त्या वातावरणापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न. तांत्रिक द्रिष्टीने ते फार गैर सोईचे होत असे. आता त्यावर अनेक उपाय निघालेत. लसीकरण हे महत्वाचे हत्यार सापडले. प्लेग असाच जीव घेणारा रोग. त्याने प्रचंड संखेने बळी घेतले. आता तो काबूत आलेला आहे. त्यारोगाचे भयानक तांडव, त्यानी उडवलेला हाःहाःकार प्रत्यक्ष बघण्याचा, अनुभवन्याच्या दुर्दैवी काळातून आम्ही गेलो. आता विज्ञान प्रगतीमुळे सुदैवाने तो प्रसंग दुर्मिळ झाला आहे. परंतु आज देखील त्याची आठवण अंगावर शहारे आणतात.

    फार जुनी गोष्ट, सत्तर वर्षा पुर्वीची. बीड जिल्ह्यातील माजलगांव हे तालुक्याच्या ठिकाण. माझे वडील शासकीय सेवेत तेथील प्रमुख आधिकारी होते. मी बालवयांत होतो. कळले की प्लेग ह्या रोगाची साथ सुरु झाली. अनेकजण मृत्युमुखी पडत होते. त्याला कारणीभुत असलेल्या उंदरांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली होती. अर्थात उंदीर हे लक्ष्य ( Target ) केले जाते. पिसा मुळे हे होते. पिसांचा दुसरा हल्ला माणसावर होतो. ताप, अंगदुखी, वांत्या, काखेमध्ये गोळा (सुज) येऊन रोग झपाट्याने वाढत जातो. हा रोग शरीराला थोड्याच वेळांत नष्ट करतो. त्या रोगवर त्याकाळी योग्य रामबाण उपाय नव्हते. त्या काळी रोगाचा प्रतिकार करताना त्या रोगाच्या वातावरणामधून त्वरित अलिप्त होणे हे केले जात होते. हे कांही काळासाठी असे.

    गांवामध्ये त्याकाळी दवंडी पिटून जनजागृण केले गेले. त्याप्रमाणे सर्वाना स्थलांतर करण्यास मार्गदर्शन केले गेले. सर्व गांव सोडून त्या दुषीत व प्लेगयुक्त वातावरणातून दूर जावे लागले. शासकीय आदेश सर्व स्थानिक जनतेला दिले गेले. स्थलांतराची प्रक्रिया त्वरीत होऊ लागली. आम्ही गावातील सर्व जनतेचे स्थलांतर, त्यांची धावपळ, कष्ट, गैरसोयी, निराशा बघीतली. लहान असलो तरी त्यांची दुःखे जवळून अनुभवली. आठवणीने आज त्याची सत्यता व गांभिर्य मनाला पिळवटून टाकते. निसर्गाच्या चक्रांत माणसे कशी हातबल होतात, हे बालपणीचे द्दष्य आजही चटका लावते. मृत्युच्या थैमानाला रोकण्यास सारे असमर्थ वाटत होते. आम्ही पण माजलगांवाच्या बाहेर २-३ मैलाच्या अंतरावर शेतामध्ये झोपड्या उभारुन राहू लागलो. वडीलांचे तेथेच ऑफिसपण उभारले गेले. सर्वजण नजदीकच राहात होते. सर्व शाळा दोन महीने बंद होत्या. तो काळ आम्ही मुलानी निसर्गाच्या सान्निध्यात घालविला. न विसरणाऱ्या त्या आठवणी होत्या. गेल्या ७५ वर्षामध्ये त्यानंतर प्लेगसाठीचे गांव स्थलांतर झाल्याचे बघण्यात वा ऐकण्यांत आले नाही. आजच्या आधुनिक वैद्यकीय विज्ञान शास्त्राने बरीच प्रगती केली आहे. बऱ्याच जुन्या रोगांना समुळ नष्ट केले आहे. अर्थात त्याच वेळी नविन नविन रोगाबद्दल माहीती पुढे येत आहे. मात्र कोणत्याही नविन रोगाची केवळ चाहूल लागताच, जगातील सर्व विद्वान वा शास्त्रज्ञ एकत्र येतात. चर्चा करतात, अभ्यास करुन, प्रयोग करुन उपाय शोधतात. निसर्ग व मानव ह्यांचा असा संघर्ष चालूच राहणार.

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • कर्त्यापेक्षा कला श्रेष्ठ

    ईश्वर, चिंतन सानिध्य ईश्वराची महानता, सर्व व्यापीपणा असे अनेक दिव्य भव्य गुणांनी परिपूर्ण असलेले वर्णन, बालपणापासून समजावले गेले, अंगीकारले गेले. सतत त्याचा भडीमार मन- विचारांवर होत होता.पौराणीक कथा, श्लोक, काव्य, रचना, सुत्रे अशा अनेक माध्यमातून ईश्वरी श्रेष्ठत्व गायले गेले.

  • पालकांसाठी थोडं महत्वाचं

    एकसारख्या दिसणाऱ्या दोन घरांमध्ये दोन वेगवेगळ्या व्यक्ती रहात होत्या. पहिल्या घरामध्ये एक सेवानिवृत्त आजोबा आणि दुसऱ्या घरामध्ये गलेलठ्ठ पगाराचा आय. टी. इंजिनिअर.
    घराच्या कुंपणासाठी एकाच प्रकारची शोभेची झाडं दोघांनी लावली होती. इंजिनिअर साहेब आपल्या झाडांना भरपूर पाणी आणि खत देत असे. आजोबा मात्र फारचं थोडं पाणी आणि खत देत असत. इंजिनिअर साहेबांची झाडं एकदम भरगच्च आणि घनदाट वाढली होती, आणि आजोबांची झाडं टुमदार, छान अंग धरून होती.

    एका रात्री अचानक जोराचा वारा आणि पाऊस आला. दुसऱ्या दिवशी सकाळी नेमकं काय घडलाय हे पाहायला दोघेही घराबाहेर आले. समोरच चित्र पाहून इंजिनिअर साहेबांना धक्काच बसला. कारण त्यांची सर्व झाडे अगदी मुळापासून उखडून पडली होती आणि आजोबांची मात्र छान शाबूत होती.

    इंजिनिअर साहेब विचारात पडले, भरपूर पाणी आणि मुबलक खत देऊनसुद्धा एका साध्या वाऱ्यात आणि पावसात माझ्या झाडांची अशी दशा आणि गरजेपेक्षा कमी गोष्टी मिळणाऱ्या आजोबांची झाडे जशीच्या तशी. शेवटी न राहून इंजिनिअर साहेबांनी आजोबांना याचे कारण विचारले.त्या निवृत्त आजोबांचे उत्तर म्हणजे आजच्या सर्व पालकांसाठी खूप मोठी शिकवण आहे.

    आजोबा म्हणाले "इंजिनिअरने झाडांना लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरविल्या पण अति प्रमाणात आणि त्यामुळेच झाडांची मुळे पोषणाच्या शोधार्थ खोलवर गेली नाहीत. तेच मी माझ्या झाडांना गराजेपुरतेच किंवा थोडे कमी खत आणि पाणी दिले, त्यामुळेच त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झाडांची मुळे खोलवर गेली. इंजिनिअर साहेबांच्या झाडाची मुळे खोलवर गेली नसल्याने थोड्याश्या वाऱ्याला आणि पावसाला बळी पडले. माझ्या झाडांची मुळे खोलवर गेल्याने त्यांना मजबुती मिळाली आणि वाऱ्याला आणि पावसाला न जुमानता माझी झाड मस्त उभी आहेत."

    आपल्या मुलांच्या बाबतीतही असेच असते.

  • वेळेची एक संकल्पना

    वेळ ही एक हालचाल ( Movement ) समजली गेली आहे. वेळ कधीच स्थीर नसते. जगाच्या चक्राप्रमाणे ती फिरत असते. प्रत्येक हालचालीसाठी वेळ लागते. त्यामुळे वेळ व हालचाल अर्थात Time and Movement ह्या एकच समजल्या गेल्या. हे शारीरिक स्थरावर.

    मानसिक स्थरावर ही संकल्पना वेगळी ठरते.

    दोन प्रश्न आहेत. १) काय ? अर्थात काय असावे . २) कसे ? अर्थात कसे असावे.

    स्वच्या ( Self ) वा मनाच्या ( Mind ) गरजा, वासना, इच्छा सतत "काय आहे", हे जाणण्याचा प्रयत्न करुन, "कसे असावे" ह्या संकल्पनेंत जातात.

    " काय आहे " हे समजण्याने वासनेचे प्रश्न सुटत नाही. वासना ( Desire ) ही एक नैसर्गिक गुणधर्म जन्माच्या उपजत असते. "काय आहे " ह्या विचारांत बदल होवून स्वतःसाठी, मनासाठी " काय असावे " हा विचार येऊ लागतो. म्हणजे " काय असावे " ही मनाची वा स्वतःची वासना. हा बदल, हा संघर्ष हाच स्वचा मुळ पाया आहे.

    वासना ( Desire) व अहंकार (Ego ) हे मुळ निसर्गानी दिलेले स्वभाव आहेत. देहाच्या जगण्यासाठी, अत्यंत महत्वाचे गुणधर्म. ह्याच चैतन्यमय गुणधर्मामुळे कोणत्याही परिस्थितीवर मात करुन, देह अर्थात जीवन जगविले जाते. निसर्ग जे देऊ करतो, त्याला " काय आहे " ही समज असते. जे आहे तसे. हा त्याचा सरळ व सोपा अर्थ. हे जगण्यासाठी, जीवनासाठी पूर्ण असते. परंतु आमच्या वासनेला फाटे फुटून " काय आहे" ऐवजी " कसे असावे " हा विचार पक्का होऊ लागतो. "काय आहे" मध्ये किमान गरज असते. परंतु " कसे असावे " ह्याला मर्यादा नसतात. निसर्ग देत असलेले "काय आहे" व देह मनाला ( Self ) वाटते " कसे असावे " हाच मुळ संघर्षनात्मक मुद्दा असतो. उदा. अन्न, पाणी, हवा, जमीन, इत्यादी निसर्गाने दिलेल्या आहेत. मानवाने त्या "कशा असाव्यांत" ह्या कल्पनेने अनेक बदल केलेत.

    स्वचा ( Self ) दुसरा गुणधर्म म्हणजे इच्छा ( Will ). इच्छा होण्याची वा इच्छा बदलण्याची. इच्छा कांहीतरी होण्याची. इच्छा कांही तरी बदलण्याची. इच्छा होत जाणे, इच्छा बदलत जाणे. हा गुणधर्म. इच्छेला आम्ही लहानपणापासून जाणले असते. आमच्या वाढीत. मग ती आर्थिक, सामाजिक, वा धार्मिक असो. आमच्या ध्येयांत इच्छेचा सहभाग असतो. एका विचारावर दुसऱ्या विचाराने ताबा करणे, एका वैचारीक हलचालीवर दुसऱ्या वैचारीक हलचालीने ताबा मिळविणे हे इच्छा करते.

    " मी माझ्या विचारावर ताबा मिळवला पाहीजे " ह्यांत मी व विचार भिन्न आहेत. म्हणजे माझा संबंध विचाराशी असतो. तसे दोन्हीही एकरुप वाटतात. विचार म्हणजे ते ज्ञान ज्यांत आठवणी ( Memaries ) आणि ( Experiences ) अनुभव ह्यांची साठवण असते. एक विचार -- हा सतत दुसऱ्या विचारावर ताबा करणे. (Control ) आकार देणे ( Shape ) अथवा अमान्य करणे (Deney ) ही क्रिया करीत असतो.

    समजण्यासाठी थोडे भिन्न करु या. Self म्हणजे माझ्यांत मी वेगळा असून, जो सर्व गोष्टी बघतो, जाणतो, तो वेगळा Observer अर्थात बघणारा असतो. Observer जवळ म्हणजे बघणाऱ्याजवळ गेलेल्या, जमा झालेल्या आठवणी व अनुभव होय. हीच आठवणीची विचारांची साठवणूक.

    मेंदू कार्य करुन प्रत्येक क्षणाची हलचाल अर्थात विचार यांची साठवणूक करतो. जसे प्रसंग, जसा अनुभव तशा विचार लहरी उत्पन्न होऊन ज्ञानेद्रियाच्या मार्फत मेंदूत जमा होतात. आणि साठवल्या जातात. वासना ( Desire ) आणि अहंकार ( Ego ) जे मुळ गुणधर्म आहेत, ते जीवला कर्म करण्यास चेतना देतात. तरी हे सर्व शरीर गुणधर्माप्रमाणे होत जाते. येथे " मी " म्हणजे स्वतः ह्या भागाची भूमिका नसते. " मी " फक्त उर्जा देण्याचे काम करतो. म्हणून " मी " वा स्वतः ( Self ) वेगळा आणि त्याच्या विचार लहरी, past, memories, experiences ह्या वेगळ्या. ज्याला आपण ( Observer ) बघणारा म्हटले आहे. ध्यान प्रक्रियेमध्ये हा Observer ( विचार शक्ती ) देहा मधल्या ( उर्जा शक्तिला –प्राणाला ) अर्थात Observer ला जाणण्याचा प्रयत्न करतो. मी स्तः ( Self ) आणि माझा देह ह्या भिन्न संकल्पना आहेत. मी ( I ) म्हणजे आत्मा आणि देहातील मेंदू, बुद्धी, मन हे घटक येतात. त्यामुळे देहाचे कार्य वेगळे, आत्म्याचे अर्थात मीचे भिन्न. समजण्यासाठी "तू "चे कार्य म्हणजे देह बुद्धीचे कार्य. व "मी " चे कार्य म्हणजे आत्म्याचे कार्य. आत्मा स्वतः कार्य करीत नसतो. तो फक्त प्राणरुपी चेतना देतो. यंत्रामधल्या विजेप्रमाणे.

    म्हणजे माझी बुद्धी, मन, विचार हीच बघणारी Observer बनते. मी (I ) हा मलाच ( Me ) ला वेगळा करतो. मी मलाच बघतो.

    माझा देह ( ज्यांत मन, बुद्धी, विचार, इत्यादीचा सहभाग आहे. ज्याला Observer म्हणजे बघणारा म्हटले आहे. हा कुणाला बघतो. तर मला स्वतःलाच. म्हणजे माझ्या प्राण शक्तीला. ज्याला आत्मा संबोधले आहे. म्हणजे मी मलाच बघण्यासारखे, जाणण्यासारखे आहे. कुणीतरी व्यक्ती आरशामध्ये स्वतःला बघतो. येथे आरशामुळे तो आपली छबी वा प्रतिमा आपणच बघत असतो. हे बाह्य झाले. मी " आत " कसा आहे, कोण आहे, याचे ज्ञान होणे हे देखील त्याच प्रमाणे म्हणजे आरशांत स्वतःची प्रतिमा बघण्या सारखेच आहेत. मी आणि आरशातील प्रतिमा वेगळ्या आहेत.तरी आपण म्हणतो की मीच मला ह्या अरशांत ( प्रतिमा रुपाने ) बघतो. जर देहांत देखील तशाच दोन प्रतिमा असल्याप्रमाणे आहेत. एक मी जो सर्व बघणारा. (Observer) आणि मला त्या बघीतल्या जाणाऱ्या observed प्रतिमेलाच बघायचे आहे. अर्थात जाणावयाचे आहे. ह्या Observed ला रंग रुप आकार नाही. त्याचे फक्त अस्तित्वच असते. ह्या अस्तित्वाला मला जाणावयाचे आहे. समजायचे आहे. म्हणजे त्या consciousness ला अनुभवायचे आहे. जेंव्हा एखादी गोष्ट वा घटना मी बघतो, त्याच वेळी मला ह्याची पुर्ण कल्पना असते. की तीच घटना वा गोष्ट माझ्या व्यतरिक्त कुणीतरी दुसरा देखील बघत असतो. आपण म्हणताना म्हणतोकी तो ईश्वर तेच बघत असेल. ईश्वर अर्थात अज्ञात शक्ती. माझ्या बाबतीत, सर्वांच्या बाबतीत ती शक्ती माझ्यामध्येच वास करते. ती हे सारे जाणते वा बघते. म्हणजे जे मी बघतो, जाणतो, हे त्या माझ्याच मधल्या अव्यक्त व्यक्तीलाही समजते. आता माझा प्रयत्न असेल की मी त्या माझ्यातच असलेल्या मला जाणणऱ्या शक्तीला बघायचे, जाणायचे, अनुभवायाचे आहे. मी मलाच हा जाणण्याचा प्रकार आहे. To experience the self consciousness or objectless awareness

    एक " स्व " चा म्हणजे माझा गुणधर्म म्हणजे स्वतःलाच बघणे, जाणणे, हा. तोच बघणाराची भुमिका करतो. बघणारा म्हणजे Observer. ज्यानी बघीतले आहे. बघणारा म्हणजेच ज्यानी गेलेला काळ बघीतला. त्याचे साठलेले ज्ञान, आठवणी, अनुभव ह्या साऱ्या गोष्टी. मी ( I ) हा मलाच ( Me ) बघतो, जाणतो हे होते. जसे मी तुला बघण्याचा, जाणण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे माझ्यातला बघणारा ( Observer ) मलाच बघतो, जाणतो. एक साक्षी भावाने मीच मलाच समजण्याचा जाणण्याचा, अनुभवण्याचा, बघण्याचा प्रयत्न करतो. बघणारा मीच आणि द्दष्य देखील मीच. Observer आणि Observed मीच असतो. ह्याचाच अर्थ मी कोण आहे हा जाणण्याचा प्रयत्न.

    जाणीव ( Awareness ) हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. आपण जे बघतले ते जाणणे. फक्त जाणणे महत्वाचे. ज्यांत तुमचे विचार, विश्लेशन, कल्पना,इच्छा ह्यांचा कोणतांच स्पर्ष नसावा. हे कठीण आहे. अशक्य देखील. कारण तुम्ही Observer असून जाणण्याचा प्रयत्न करणारे आहांत. आणि Observer म्हणजे बघणारा, म्हणजेच अनुभव, ज्ञान, आठवणी, यांचा साठा असलेला. असे तुम्ही जाणणारे फक्त जाणणारेच रहाल कां ज्या जाणण्यामध्ये फक्त जाणणेच ( Awareness ) असेल. बघणेच असेल. परंतु जाणणारा फक्त बघूच शकत नाही. कारण जे दिसेल ते त्याला जाणण्याचा प्रयत्न हा त्याच वेळी होईल. त्याच वेळी तुम्ही Observer व्हाल.

    जाणणे ही ( Awareness ) मनाची अशी अवस्था होते की ज्यांत बघणाराला Observer ला दुसरा मार्ग नसतो. कारण त्यांत तुम्ही व्यवहार बघता. क्रिया देता. जे जाणता, जे बघता त्याला तसाच स्विकार करीत नसता.

    "मी याचे काय करु " ? " हे मी बघीतल्या शिवाय कसा जाणू " ? म्हणजे तुमची लगेच क्रिया सुरु होते. तुम्ही नुसते जाणणे मान्य करीत नाही. हे काय आहे, कसे आहे, हे जाणत बघण्याचा प्रयत्न होतो. जसे एका सुंदर, सुवासीक, मोहक फुलाचे. तुम्ही फूल बघता. झाडावरुन तोडता. सुवास घेता. त्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या करीत विश्लेशनात्मक त्या फुलाला बघण्याचा आणि जाणण्याचा प्रयत्न करीतात. म्हणजे ते फुल जसे आहे तसेच न जाणता, तुम्हाला वाटणाऱ्या प्रश्नांची त्या फुलासंबंधी उकलन करण्याचा प्रयत्न होतो.

    " ते काय आहे " ? हेच बघणाऱ्यानी बघावे. परंतु जेंव्हा तुम्ही " जाणता " ( Aware ) त्यावेळी तुम्हाला वाटते " ह्याच्याशी मी काय करु " ? म्हणजे ते काय आहे, ह्यापेक्षा ते कसे असावे, ह्यांत तुम्ही गुंततात. फुल त्यातील " सुवास Fragrance " हेच एक सत्य असते. तेच फक्त अनुभवायचे असते. परंतु फुल काय आहे, सुवास काय आहे, ह्याच्या पासून तुम्ही दुर जाता. सत्य जाणण वेगळ आणि तुम्हाला काय वाटत हे वेगळ.

    येथेच तुम्ही " परिस्थितीजन्य सदा संभ्रमी अवस्थेत राहता, हेच खरे ना " ?

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • चार “हिश्श्या”तील सुख

    बंकटमल नावाचे एक व्यापारी होते. चांगला व्यापार करून त्यांनी भरपूर धन मिळविले होते. इतके, की ही संपत्ती ठेवायची तरी कोठे या चिंतेने त्यांना ग्रासलेले होते. त्यामुळे एवढा प्रचंड पैसा असूनही त्यांना सुख म्हणजे काय? हेच माहीत नव्हते.

    एकदा ते असेच संपत्तीची काळजी करत करत गावाबाहेर फिरायला गेले. सायंकाळ सरत आली होती. पाखरे आपल्या घरट्यात परतत होती. निसर्गामुळे वातावरण सुंदर बनले होते. रस्ताच्या एका कडेला असलेल्या शेतात एक शेतकरी अत्यंत आनंदाने व उत्साहाने गाणे गात आपले काम करत होता.

    बंकटमल त्याच्या जवळून जाताना त्याने त्यांना पाहिले व गाणे थांबवून स्मितहास्य केले. ते पाहून बंकटमलही तेथे थांबले. त्यांना त्या शेतकऱ्याच्या आनंदाचे रहस्य जाणून घ्यायचे होते. ते त्या शेतकऱ्याला म्हणाले, ' आज तुम्ही भलत्याच खुशीत दिसता. काय कोठे जमिनीत पैशाचा हंडा सापडला की काय?'

    त्यावर शेतकरी म्हणाला, ' ' छे छे, मी एक साधा शेतकरी आहे. दिवसभर शेतात राबतो. जी काही कमाई होते तिचे मी चार हिस्से करतो व माझी ती जबाबदारी आहे, असे समजून कर्तव्यपूर्तीच्या आनंदात समाधान मानतो.

    त्यावर बंकटमल म्हणाले, की चार हिस्से म्हणजे? त्यावर शेतकरी म्हणाला, ''माझ्या आई-वडिलांनी मला वाढविले. मात्र आता ते थकले आहेत; त्यामुळे कमाईचा एक हिस्सा त्यांना देतो. दुसरा हिस्सा माझ्या लहान मुलाबाळांना देतो कारण त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी माझी आहे तर समाजाचे ऋण म्हणून तिसरा हिस्सा दानधर्मात खर्च करतो व चौथ्या हिश्श्यात मी माझे घर चालवितो. ''
    बंकटमलला पैसा कसा खर्च करायचा व आनंद कसा मिळवायचा याचा वस्तुपाठच मिळाला होता. त्याप्रमाणे त्याने 'सुखी' होण्याचा निर्णय घेतला.

  • माझा चड्डी यार – भाग १

    आजकाल वयाच्या तीन वर्षापर्यंत लंगोटीचा काळ. अर्थात अधुनिक काळाप्रमाणे डायपर हा शब्द प्रचलीत झालेला. नंतर येतो चड्डी घालण्याचा काळ. त्याची जागा घेतो लेंगा. अर्थात पुढे पँट, इत्यादी हे सारे वर्णन केवळ गम्मत म्हणून. करण कपड्यावरुन वयाचा अंदाज हे कालबाह्य होत आहे. आतातर स्वातंत्र्य ह्या शब्दाची जशी व्याख्या बदलते,  तशी ती सांगणारे बदलतात. सांगणारे स्वतःलाच महान समजतात. त्यामुळे व्यक्त होणारे विचार खरे समजावे लागतात.

  • माझा चड्डीयार (अनेक भागामध्ये )

    माझ घर म्हणजे एक प्रचंड विशाल बंगला होता. शासकीय कॉर्टर. वडील शासनाचे जिल्हाधीकारी अर्थात् Collector of District होते. एक मोठे सरकारी आधिकारी. नोकर चाकर, घरांत काम करणारे अनेकजण, सर्वांचा एक दबदबा दिसून येई. सर्व आधिकारी वर्ग व सामान्य नागरिकांची तेथे सतत जा ये चालू असे. आम्ही ब्राह्मण असलो तरी बडीलांचे शिक्षण व अधिकार यांचा त्यांच्या मनावर जबरदस्त पगडा झालेला होता. ते जात पात ह्या संकल्पनेला केव्हाच मानीत नव्हते. शिज्ञण व ज्ञानच माणसाला खऱ्या अर्थाने संस्कारीत करत असते ही त्यांची धारणा. धर्म व कर्मकांड जर पाळावयाचे असतील तर ते फक्त घराच्या चौकटीतच असावे ही त्यांची धारणा.

    ( काळाप्रमाणे चालावे लागते म्हणतात , माझी आजी अर्थात त्यांची आई हीचे देखील केशवपन झालेले होते. ती खुप धार्मिक व जुनी विचारसरणी सांभाणारी होती. मात्र हे सारे स्वतः भोवतीच असे. देवघर व स्वयंपाकघर हेच तिचे लक्ष होते. )

    माझ्या आग्रहाने मारुती प्रथम माझ्या घरी आला. त्याच्या चेहऱ्यावर थोडासा दबकेपणा स्पष्ट दिसत होता. भव्य घर, प्रशस्त हॉल, फर्नीचर, सोफासेट, पंखे, पडदे, नोकर चाकर, हे बघून मारुती हादरुन गेला. सभोवतालची भव्यता त्याचे डोळे टिपून घेत होत असलेले जाणवले. त्याला मी खुर्चीवर बसवले. समोर आराम खुर्चीवर वडील पेपर वाचीत बसले होते. मी त्याना सांगितले. “ हा मारुती माझा मित्र. आम्ही रोज शाळेच्या मैदानांत एकत्र खेळतो. “ वडीलांनी त्याच्याकडे नजर टाकली.

    “ छान खुप खेळत जा. अभ्यासही मन लाऊन करीत जा. ज्ञान व आरोग्य ह्या अत्यंत महत्वाच्या जीवनातील गोष्टी “

    मारुतीने उठून त्यांच्या पुढे जात वाकून नमस्कार केला. आईने नोकरातर्फे कांही फळे बशामध्ये घालून पाठविली, ती दोघानी खाली. नंतर मारुती व मी दोघेजण बाहेर खेळण्यासाठी गेलो.

    अर्थात हे सारे त्यावेळच्या काळ व परिस्तिती प्रमाणे होते. जीवनाची दोन टोके. एकात होती भव्य दिव्यता. सुस्थिर आर्थिक परिस्थिती. हाताशी प्रत्येक गोष्ट सहजपणे साध्य

    होण्याची शक्यता. तर दुसरीकडे नजरेंत भरेल अशी गरीबी, असहायता, जगण्यासाठीची धडपड. परंतु हे सारे आजच्या चश्म्यातून बघताना, त्यावेळी जरी हेच होते, तरी त्या बाल वयांतील मनाला कोणतीच पर्वा नव्हती. काळजी नव्हती. आम्ही फक्त मित्र एकत्र राहू, खेळू, इच्छीणारे होतो. ह्याच अंतरीक इच्छेपायी परिस्थितीच्या भिन्नतेची गढद काळी छाया आमच्यावर पडू शकली नाही. त्याचा आम्ही केंव्हाच स्विकार केला नव्हता. याच कारणास्तव जीवनरेखा वेगळ्या तरीही समांतर जात होत्या.

    बाल वयांत मारुती सर्वच खेळांमध्ये माझ्या बरांच वरचढ होता. मोज मापत जर बोलावयाचे तर तो पाचपट माझ्यापेक्षा खेळांत पुढेच असावयाचा. हां ! मात्र त्याच काळातील अभ्यासामधील प्रगतीचा जर शोध वा आलेख घेतला, तर मी त्याच्या पुढे नेहमी दोन पाऊले जास्त होतो. हे ही एक सत्य आहे. माझ्या शैक्षणिक क्षेत्रातील, त्याच्यापुढे असण्याचे कारण, मला त्याच वेळी नजरे समोर आलेले मी जाणले.

    मारुती नियमीत घरी येत असे. गप्पा, चर्चा, सतत होत असे. तो खेळण्याच्या गप्पामध्ये रस घेत होता. तर मी पुस्तकामधील वाचलेले सांगुन त्याची व पर्यायाने दोघांची करमणूक करीत असे.

    एका दिवसाची घटना मला फार चांगली आठवते. आम्ही दोघे बोलत बसलो होतो. अभ्यासा संबंधी विषय होता. मी त्याला म्हटले “ मारुती ह्या पुस्तकामधील पांच गणित मी सोडवतो. तीच तु पण सोडव. आपण दोघे उद्या सकाळी त्याची उत्तरे बघूत.” मारुती लगेच म्हणाला “ मी रात्रीचा अभ्यास करीत नसतो. जेव्हां जमेल तेव्हां फक्त दिवसाच करतो. मला आश्चर्य वाटले. “ आरे मी तर रोज रात्री तासभर तरी अभ्यास करीत असतो. रात्री जेवणानंतर एक तास मी अभ्यासांत खर्च करतो. चांगले असते. वातावरण पण शांत असते.” मारुती शांत मनाने ऐकत होता. “ भगवान मलापण रात्रीचा अभ्यास करणे आवडते. परंतु आमच्या घरी दिवा नाही. कंदील वा चिमणी नाही. अंधारांमुळे अभ्यास करता येत नाही. मारुती एकदम गप्प झाला. “

    घरांत शेजारच्या खोलीत वडील वाचत पडलेले होते. आमचे बोलणे त्यांच्या कानावर पडले. त्यानी चटकन आम्हा दोघाना हाक दिली. “ मारुती तु कोठे रहतोस.? जर जवळच असेल तर रोज रात्रीचा येथेच ये. तू व भगवान मिळून अभ्यास करा. तुझी सर्व सोय केली जाईल. फक्त तुझ्या घरी वडीलांना विचारुन दररोज येत जा. “

    हाच एक अत्यंत महत्वाचा क्षण, माझ्या जीवनाशी संबंधीत झाला होता. जो एक Life Turning point ठरला गेला. आमच्या मैत्रीचे, आपुलकीचे धागे आवळत चालले होते. त्याची चेतना व साथ घरातील वडीलधाऱ्या मंडळीकडूनच मिळत गेली. आम्ही दोघे दररोज नियमीतपणे अभ्यास करीत असू. अभ्यास करण्यासाठीच्या सर्व तांत्रीक बाबी वा

    सोई घरातूनच व्यवस्थीत मिळू लागल्या. कोणतीही गैरसोय होत नव्हती. आमची अभ्यास करण्याची वेगळीच पद्धत निर्माण झाली होती. आणि ती बाब आमच्या दोघांच्या आवडी व स्वभावानुसार निश्चीत होत होती. मला पुस्तक वाचणे आवडायचे, तर त्याला केवळ ऐकून ज्ञान मिळवण्यात आनंद वाटे. तो मात्र अतिशय लक्ष केंद्रित करुन ऐकत असे. थोडेसे वाचन, त्यावर चर्चा ही पद्धत आम्ही अंगीकारली होती.

    येथेच एक अत्यंत महत्वाचे Observation सांगतो. आमची दोघांची अभ्यास करण्याची ही सवय वा पद्धत , आम्ही फक्त बालवयांतच अंगीकारीत होतो, असे नव्हे, तर तशीच पद्धत पुढे भावी वैद्यकीय महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाही योजीत होतो. तसाच अभ्यास औरंगाबादला मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असताना देखील करीत होतो. एका खोलीत बसून अभ्यास करीत असू. Medicine, Surgery, Gynecology, आणि इतर वैद्यकीय पुस्तके आम्ही मिळून वाचीत असु. चर्चा करीत असू. तेथेही मी प्रत्यक्ष पुस्तक वाचत होतो, व तो समोर बसुन ते वाचन लक्ष देऊन ऐकत असे. चर्चा होई, एकमेकांच्या चुका वा समज दुरुस्त केल्या जात असे. हीच ज्ञान साधना पद्धती, प्रक्रिया शैक्षणीक काळ पर्यंत जोपासली होती.

    बालपणी आभ्यास करताना आई सरबत. दुध, फळे, वा खाण्याचे पदार्थ देत असे. आमचा तो विश्रांतीचा काळ ( Interval ) मजेत जात होता.

    मी माझ्या वडीलांना “ भाऊ ” व आईला “ ताई “ ह्या नावांनी संबोधीत असे. अर्थात नाम संबोधन ही प्रक्रिया जुन्या काळी साचेबद्ध नव्हती. तेथे आजकालचे मार्गदर्शन मुळीच नव्हते. घरांतील वडील मंडळी जे म्हणतील, जसे संबोधन करतील तेच लागु होत असे. तेथे न नियम होते ना पद्धती. मोठे मामा माझ्या वडीलाना “ भाऊ “ म्हणाले, माझ्या आईला ते

    “ ताई “ संबोधायचे. बस असेच आम्ही भावंडानी त्याचे नामकरण अंगीकारले. त्याला त्या काळी कुणीच विरोध केला नसेल, आणि मान्यता मिळाली. नात्याच्या स्तरावर बाबा, आई, मामा, काका, आत्या, दादा, ताई, आक्का इत्यादी नाते नामकरणे त्या काळी वेगळीच होऊन जात होती. ह्यातूनच बप्पा, आबा, बापू, मा, माई, बाई, दीदी, अम्मा, इत्यादी प्रकारची नामावळी होती. हे नांव उच्चरल्या नंतर ते माझे कोण हे कित्येक वेळा सांगणे गरजेचे होई. आई, बाबा ... म्हणताच नात्याचा इतरांना बोध होतो, तसे बापू, अम्मा .... इत्यादीत उलगडा करावा लागे.

    मारुती देखील माझ्या वडीलांना भाऊ व माझ्या आईला ताई याच पद्धतीने संबोधीत असे. जणू त्यानेच मैत्रीचे नव्हे तर बंधूत्वाचे नाते आमच्या घराण्याशी निर्माण केले होते.

    मारुती व मी दोघे रात्री अभ्यास करुन बरोबर रात्री १० वाजतां झोपत असू. घरांत एक गजराचे घड्याळ मजसाठी दिलेले होते. रोज आम्ही गजर लाऊन सकाळी पांच वाजता उठत असू. घराच्या मागील परसदारी एक मोठी विहीर होती. त्यावर पाणी काढण्यासाठी रहाटचक्र पक्के लावलेले होते. सकाळीच आम्ही पाणी काढीत असू. गम्मत म्हणजे सकाळचे पाणी खुपच गरम असायचे. वातावरणाच्या मानाने एकदम कोंम्बट ( Warm water ) . आम्ही हात पाय धुवुन खोलीमध्ये थोडावेळ अभ्यास करीत असू.

    एकदा कुलकर्णी गुरुजी म्हणाले होते सकाळी गार पाण्याने स्नान करणे प्रकृतीसाठी फार चांगले असते. बस माझ्या डोक्यांत ते शिरले. तसे सकाळचे नुकतेच उपसलेले पाणी खुपच गरम असते. मी पण ठरऊन टाकले की आपण गार पाण्याने स्नान करावे. दुसऱ्याच दिवशी मी सकाळी उठताच विहीरीच्या गार पाण्याने स्नान करु लागलो. मारुती मला मदत करीत असे. तो पाणी उपसुन देई. ती बादली भरुन काढलेले पाणी माझ्या अंगाखाद्यावर टाकीत असे. दोन चार बादल्या पाणी उपसले जाई. मारुती ह्यात सहकार्य व मेहनत घेई. असे बराच काळ पुढे चालले.

    पुढचा भाग पुढील अंकात---

    डॉ. भगवान नागापूरकर

  • गुरुची भविष्यवाणी

    एक गमतीदार परंतु मनोरंजक संत कथा वाचण्यांत आली. जीवनाचे खुपसे तत्वज्ञान कळले. सारे चिंतनीय होते. एका गावांत एक थोर संत रहात होते. तत्वज्ञानी व अध्यात्मिक क्षेत्रांत नावाजलेले. दुरदृष्टी, सत्य संवाद, आणि भविष्याचा अचूक वेध ह्यामध्ये मान्यताप्राप्त. सभोवताली अनेक शिष्यगण सदैव असत. गुरुना ते देवाप्रमाणे समजत.

    एके दिवशी त्यानी सर्व शिष्याना एकत्र बोलावले. त्यानी एक विचीत्र परंतु भावनिक विचार व्यक्त केला. ״ आज पर्यंत तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केल. माझे ऐकले. माझ्या शब्दाला प्रतिसाद दिलात. माझ्या समजूतीने, ज्ञानाने व दूरदृष्टीने मी माझ्याच भविष्यकाळाचा वेध घेतला. माझा हा देह धरणीवर ठेवण्याचा काळ जवळ आलेला आहे. दुर्दैवाने माझा पुढील जन्म एक निराशजनक योनीत होणार आहे. तो असेल डुकराची योनी. मात्र त्यानंतर माझा जन्म एका राज घराण्यांत होईल. त्यानंतरच्या पुढील सर्व योनी अत्यंत चांगल्या व ईश्वर सान्निध्याच्या असतील. मला त्याचा आनंद व अभिमान आहे. फक्त एकाच म्हणजे पुढच्या येऊ घातलेल्या जन्मचक्रातून मला क्लेशदायक जीवन व्यतीत करावे लागेल. तो जन्म असेल डुकराचा. मी अमुक काळी, अमक ठिकाणी, अमुक विशिष्ठ रंगांत असेन. मृत्यु माझ्या हाती नाही. मला ते घाणेरडे , किळसवाणे, घृणास्पद जीवन पूर्ण करावेच लागेल. तुम्ही सर्व शिष्यगण मी सुचविलेल्या वेळी व ठिकाणी जा. माझा त्या दुर्दैवी जीवनाचा त्वरीत अंत करा. माझी त्या योनीतून सुटका करा. ״

    सर्व शिष्यगण अत्यंत गंभीरतेने व आश्चर्याने गुरुंचे विधान ऐकत होते. सर्वांनी गुरुंच्या त्या विलक्षण आज्ञाची नोंद घेतली. गुरु आध्यात्मिक दृष्टे व महान भविष्यवेत्ते होते. त्यांच्या वाणीप्रमाणेच घडले.

    एका घाणेरड्या उकीरड्यावर, गटाराच्या शेजारी कांही डूकरे स्वतःचे अन्न शोधीत होती. त्यांत वर्णन केलेले डुक्कर देखील होते. सर्व शिष्यगण हाती काठ्या, लाठ्या घेऊन एकत्र जमा झाले. त्यानी त्याच डुकराला घेरले. ते तथाकथीत डुक्कर सैरा वैरा धावू लागले. आपल्यापरी आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करु लागले. सर्व शिष्यगण त्याच्यावर घाव घालणार, इतक्यांत चमत्कार झाला. ते डुक्कर मधोमध शांत उभे राहीले. आणि त्याच्या तोंडून मानवी शब्द बाहेर पडले. त्यांच्या गुरुचाच आवाज स्पष्टपणे ऐकू येवू लागला.

    ״ थांबा । माझ्या प्रिय शिष्यानो. मला मारु नका. मीच तुम्हास पूर्वी माझ्या, आजच्या जन्म चक्राबद्दल सांगितले होते. हे चक्र खंडीत करण्यास सुचविले होते. हे सत्य आहे. पण थांबा. आता पुन्हा ऐका. मी तुमचाच गुरु. आज अत्यंत वेगळ्या आवस्थेत आहे. एका डुक्कराच्या योनीत, जीला मानवानी हिनत्व देत दुर्लक्षीत केले. स्वच्छ-अस्वच्छतेच्या मोजमापांत अत्यंत घाणेरडा ठरविले. मी माझ्या पूर्व मानवी योनीत, मानवाच्या तथाकथीत श्रेष्ठत्व, महानता, विद्वत्ता ह्यांचा पुरेपुर अनुभव घेतला आहे. मानवाने इतर सर्व सजीव योनींचे ज्ञान व विश्लेशन

    ह्यांच्या साह्याने भरपुर माहीती मिळवली. ज्ञान तर मिळत गेले, परंतु अनुभवाचे काय ? कारण अनुभव हा ज्ञानानी मिळत नसतो. अनुभवासाठी निसर्गच्या दैनंदीन चक्रातुनच जावे लागते. क्षणा क्षणाची घटना जीवनाची अनुभव संपन्नता देते. आणि विशेष म्हणजे प्रत्येक घटना भिन्न तसाच अनुभव देखील. ज्ञान घटनांचे विश्लेशन करते. घटनांची जाणीव फक्त अनुभवच देऊ शकतात. त्या घटनांच्या छेदातून आरपार गेल्यानंतरच. म्हणून अनुभव ही वैयक्तीक बाब बनते. अनुभव हे ज्ञान देते मात्र ज्ञान अनुभव देऊ शकत नाही.

    ״ ईश्वराची, निसर्गाची श्रेष्ठता हिच आहे की त्याने जीवन चक्रातील प्रमुख बाबी सर्व जीवाना त्याच पद्धतीने, क्षमतेने देऊ केलेत. स्वतःच्या जीवाविषयी प्रचंड प्रेम, जगण्याची उत्कठ इच्छा, अस्तित्वासाठी झगडा, जीवाची वाढ, पुनुरुत्पादनता, आणि संरक्षण इत्यादी मुलभूत बाबी प्रत्येक सजीव प्राण्यांत तशाच दिलेल्या आहेत. 'मी' वर प्रेम म्हणजे त्याच्यातील ईश्वरी अंशावर प्रेम असते. मग ते कोणत्याही स्वरुपांत वा योनीत असो. माणसाला विचाराने समज आली. इतर सजीवांना " हे ज्ञान " कसे असावे हे ज्ञात नाही. माणसे विचारांनी तुलनात्मक बऱ्यावाईट, सोय-गैरसोय, सहजता वा कष्टमय जीवन ह्याची फक्त चर्चाच करतात. प्रत्याकाला चांगले व सुकर जीवन हवे. परंतु हाती मिळालेले जीवन नष्ट करुन, इतर अनिश्चित जीवनाचा कुणीच स्विकार करणार नाही. हा निसर्ग असतो. जीवनाची सारी प्रमेये मला देखील लागु पडतात. माझे हे जीवन अस्तित्व नष्ट करुन मी भावी अनिश्चिततेत जावू इच्छीत नाही. तुमचे गुरु म्हणून माझा आदेश आहे की मला लाभलेले आजचे जीवन, निसर्गचक्रानुसार पुरे करु द्या. मला जगु द्या आणि परत जा. ״

    सारे शिष्यगण अचंबीत झाले. त्यानी हातातल्या काठ्या लाठ्या फेकून दिल्या. त्या योनीतील समोरच्या गुरुला विनम्र अभिवादन केले. सारे आनंदीत होते. कारण त्याना गुरुकडून आज जीवनाचे एक वेगळेच तत्वज्ञान कळले होते

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com