नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
बंकटमल नावाचे एक व्यापारी होते. चांगला व्यापार करून त्यांनी भरपूर धन मिळविले होते. इतके, की ही संपत्ती ठेवायची तरी कोठे या चिंतेने त्यांना ग्रासलेले होते. त्यामुळे एवढा प्रचंड पैसा असूनही त्यांना सुख म्हणजे काय? हेच माहीत नव्हते.
एकदा ते असेच संपत्तीची काळजी करत करत गावाबाहेर फिरायला गेले. सायंकाळ सरत आली होती. पाखरे आपल्या घरट्यात परतत होती. निसर्गामुळे वातावरण सुंदर बनले होते. रस्ताच्या एका कडेला असलेल्या शेतात एक शेतकरी अत्यंत आनंदाने व उत्साहाने गाणे गात आपले काम करत होता.
बंकटमल त्याच्या जवळून जाताना त्याने त्यांना पाहिले व गाणे थांबवून स्मितहास्य केले. ते पाहून बंकटमलही तेथे थांबले. त्यांना त्या शेतकऱ्याच्या आनंदाचे रहस्य जाणून घ्यायचे होते. ते त्या शेतकऱ्याला म्हणाले, ' आज तुम्ही भलत्याच खुशीत दिसता. काय कोठे जमिनीत पैशाचा हंडा सापडला की काय?'
त्यावर शेतकरी म्हणाला, ' ' छे छे, मी एक साधा शेतकरी आहे. दिवसभर शेतात राबतो. जी काही कमाई होते तिचे मी चार हिस्से करतो व माझी ती जबाबदारी आहे, असे समजून कर्तव्यपूर्तीच्या आनंदात समाधान मानतो.
त्यावर बंकटमल म्हणाले, की चार हिस्से म्हणजे? त्यावर शेतकरी म्हणाला, ''माझ्या आई-वडिलांनी मला वाढविले. मात्र आता ते थकले आहेत; त्यामुळे कमाईचा एक हिस्सा त्यांना देतो. दुसरा हिस्सा माझ्या लहान मुलाबाळांना देतो कारण त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी माझी आहे तर समाजाचे ऋण म्हणून तिसरा हिस्सा दानधर्मात खर्च करतो व चौथ्या हिश्श्यात मी माझे घर चालवितो. ''
बंकटमलला पैसा कसा खर्च करायचा व आनंद कसा मिळवायचा याचा वस्तुपाठच मिळाला होता. त्याप्रमाणे त्याने 'सुखी' होण्याचा निर्णय घेतला.
आजकाल वयाच्या तीन वर्षापर्यंत लंगोटीचा काळ. अर्थात अधुनिक काळाप्रमाणे डायपर हा शब्द प्रचलीत झालेला. नंतर येतो चड्डी घालण्याचा काळ. त्याची जागा घेतो लेंगा. अर्थात पुढे पँट, इत्यादी हे सारे वर्णन केवळ गम्मत म्हणून. करण कपड्यावरुन वयाचा अंदाज हे कालबाह्य होत आहे. आतातर स्वातंत्र्य ह्या शब्दाची जशी व्याख्या बदलते, तशी ती सांगणारे बदलतात. सांगणारे स्वतःलाच महान समजतात. त्यामुळे व्यक्त होणारे विचार खरे समजावे लागतात.
माझ घर म्हणजे एक प्रचंड विशाल बंगला होता. शासकीय कॉर्टर. वडील शासनाचे जिल्हाधीकारी अर्थात् Collector of District होते. एक मोठे सरकारी आधिकारी. नोकर चाकर, घरांत काम करणारे अनेकजण, सर्वांचा एक दबदबा दिसून येई. सर्व आधिकारी वर्ग व सामान्य नागरिकांची तेथे सतत जा ये चालू असे. आम्ही ब्राह्मण असलो तरी बडीलांचे शिक्षण व अधिकार यांचा त्यांच्या मनावर जबरदस्त पगडा झालेला होता. ते जात पात ह्या संकल्पनेला केव्हाच मानीत नव्हते. शिज्ञण व ज्ञानच माणसाला खऱ्या अर्थाने संस्कारीत करत असते ही त्यांची धारणा. धर्म व कर्मकांड जर पाळावयाचे असतील तर ते फक्त घराच्या चौकटीतच असावे ही त्यांची धारणा.
( काळाप्रमाणे चालावे लागते म्हणतात , माझी आजी अर्थात त्यांची आई हीचे देखील केशवपन झालेले होते. ती खुप धार्मिक व जुनी विचारसरणी सांभाणारी होती. मात्र हे सारे स्वतः भोवतीच असे. देवघर व स्वयंपाकघर हेच तिचे लक्ष होते. )
माझ्या आग्रहाने मारुती प्रथम माझ्या घरी आला. त्याच्या चेहऱ्यावर थोडासा दबकेपणा स्पष्ट दिसत होता. भव्य घर, प्रशस्त हॉल, फर्नीचर, सोफासेट, पंखे, पडदे, नोकर चाकर, हे बघून मारुती हादरुन गेला. सभोवतालची भव्यता त्याचे डोळे टिपून घेत होत असलेले जाणवले. त्याला मी खुर्चीवर बसवले. समोर आराम खुर्चीवर वडील पेपर वाचीत बसले होते. मी त्याना सांगितले. “ हा मारुती माझा मित्र. आम्ही रोज शाळेच्या मैदानांत एकत्र खेळतो. “ वडीलांनी त्याच्याकडे नजर टाकली.
“ छान खुप खेळत जा. अभ्यासही मन लाऊन करीत जा. ज्ञान व आरोग्य ह्या अत्यंत महत्वाच्या जीवनातील गोष्टी “
मारुतीने उठून त्यांच्या पुढे जात वाकून नमस्कार केला. आईने नोकरातर्फे कांही फळे बशामध्ये घालून पाठविली, ती दोघानी खाली. नंतर मारुती व मी दोघेजण बाहेर खेळण्यासाठी गेलो.
अर्थात हे सारे त्यावेळच्या काळ व परिस्तिती प्रमाणे होते. जीवनाची दोन टोके. एकात होती भव्य दिव्यता. सुस्थिर आर्थिक परिस्थिती. हाताशी प्रत्येक गोष्ट सहजपणे साध्य
होण्याची शक्यता. तर दुसरीकडे नजरेंत भरेल अशी गरीबी, असहायता, जगण्यासाठीची धडपड. परंतु हे सारे आजच्या चश्म्यातून बघताना, त्यावेळी जरी हेच होते, तरी त्या बाल वयांतील मनाला कोणतीच पर्वा नव्हती. काळजी नव्हती. आम्ही फक्त मित्र एकत्र राहू, खेळू, इच्छीणारे होतो. ह्याच अंतरीक इच्छेपायी परिस्थितीच्या भिन्नतेची गढद काळी छाया आमच्यावर पडू शकली नाही. त्याचा आम्ही केंव्हाच स्विकार केला नव्हता. याच कारणास्तव जीवनरेखा वेगळ्या तरीही समांतर जात होत्या.
बाल वयांत मारुती सर्वच खेळांमध्ये माझ्या बरांच वरचढ होता. मोज मापत जर बोलावयाचे तर तो पाचपट माझ्यापेक्षा खेळांत पुढेच असावयाचा. हां ! मात्र त्याच काळातील अभ्यासामधील प्रगतीचा जर शोध वा आलेख घेतला, तर मी त्याच्या पुढे नेहमी दोन पाऊले जास्त होतो. हे ही एक सत्य आहे. माझ्या शैक्षणिक क्षेत्रातील, त्याच्यापुढे असण्याचे कारण, मला त्याच वेळी नजरे समोर आलेले मी जाणले.
मारुती नियमीत घरी येत असे. गप्पा, चर्चा, सतत होत असे. तो खेळण्याच्या गप्पामध्ये रस घेत होता. तर मी पुस्तकामधील वाचलेले सांगुन त्याची व पर्यायाने दोघांची करमणूक करीत असे.
एका दिवसाची घटना मला फार चांगली आठवते. आम्ही दोघे बोलत बसलो होतो. अभ्यासा संबंधी विषय होता. मी त्याला म्हटले “ मारुती ह्या पुस्तकामधील पांच गणित मी सोडवतो. तीच तु पण सोडव. आपण दोघे उद्या सकाळी त्याची उत्तरे बघूत.” मारुती लगेच म्हणाला “ मी रात्रीचा अभ्यास करीत नसतो. जेव्हां जमेल तेव्हां फक्त दिवसाच करतो. मला आश्चर्य वाटले. “ आरे मी तर रोज रात्री तासभर तरी अभ्यास करीत असतो. रात्री जेवणानंतर एक तास मी अभ्यासांत खर्च करतो. चांगले असते. वातावरण पण शांत असते.” मारुती शांत मनाने ऐकत होता. “ भगवान मलापण रात्रीचा अभ्यास करणे आवडते. परंतु आमच्या घरी दिवा नाही. कंदील वा चिमणी नाही. अंधारांमुळे अभ्यास करता येत नाही. मारुती एकदम गप्प झाला. “
घरांत शेजारच्या खोलीत वडील वाचत पडलेले होते. आमचे बोलणे त्यांच्या कानावर पडले. त्यानी चटकन आम्हा दोघाना हाक दिली. “ मारुती तु कोठे रहतोस.? जर जवळच असेल तर रोज रात्रीचा येथेच ये. तू व भगवान मिळून अभ्यास करा. तुझी सर्व सोय केली जाईल. फक्त तुझ्या घरी वडीलांना विचारुन दररोज येत जा. “
हाच एक अत्यंत महत्वाचा क्षण, माझ्या जीवनाशी संबंधीत झाला होता. जो एक Life Turning point ठरला गेला. आमच्या मैत्रीचे, आपुलकीचे धागे आवळत चालले होते. त्याची चेतना व साथ घरातील वडीलधाऱ्या मंडळीकडूनच मिळत गेली. आम्ही दोघे दररोज नियमीतपणे अभ्यास करीत असू. अभ्यास करण्यासाठीच्या सर्व तांत्रीक बाबी वा
सोई घरातूनच व्यवस्थीत मिळू लागल्या. कोणतीही गैरसोय होत नव्हती. आमची अभ्यास करण्याची वेगळीच पद्धत निर्माण झाली होती. आणि ती बाब आमच्या दोघांच्या आवडी व स्वभावानुसार निश्चीत होत होती. मला पुस्तक वाचणे आवडायचे, तर त्याला केवळ ऐकून ज्ञान मिळवण्यात आनंद वाटे. तो मात्र अतिशय लक्ष केंद्रित करुन ऐकत असे. थोडेसे वाचन, त्यावर चर्चा ही पद्धत आम्ही अंगीकारली होती.
येथेच एक अत्यंत महत्वाचे Observation सांगतो. आमची दोघांची अभ्यास करण्याची ही सवय वा पद्धत , आम्ही फक्त बालवयांतच अंगीकारीत होतो, असे नव्हे, तर तशीच पद्धत पुढे भावी वैद्यकीय महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाही योजीत होतो. तसाच अभ्यास औरंगाबादला मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असताना देखील करीत होतो. एका खोलीत बसून अभ्यास करीत असू. Medicine, Surgery, Gynecology, आणि इतर वैद्यकीय पुस्तके आम्ही मिळून वाचीत असु. चर्चा करीत असू. तेथेही मी प्रत्यक्ष पुस्तक वाचत होतो, व तो समोर बसुन ते वाचन लक्ष देऊन ऐकत असे. चर्चा होई, एकमेकांच्या चुका वा समज दुरुस्त केल्या जात असे. हीच ज्ञान साधना पद्धती, प्रक्रिया शैक्षणीक काळ पर्यंत जोपासली होती.
बालपणी आभ्यास करताना आई सरबत. दुध, फळे, वा खाण्याचे पदार्थ देत असे. आमचा तो विश्रांतीचा काळ ( Interval ) मजेत जात होता.
मी माझ्या वडीलांना “ भाऊ ” व आईला “ ताई “ ह्या नावांनी संबोधीत असे. अर्थात नाम संबोधन ही प्रक्रिया जुन्या काळी साचेबद्ध नव्हती. तेथे आजकालचे मार्गदर्शन मुळीच नव्हते. घरांतील वडील मंडळी जे म्हणतील, जसे संबोधन करतील तेच लागु होत असे. तेथे न नियम होते ना पद्धती. मोठे मामा माझ्या वडीलाना “ भाऊ “ म्हणाले, माझ्या आईला ते
“ ताई “ संबोधायचे. बस असेच आम्ही भावंडानी त्याचे नामकरण अंगीकारले. त्याला त्या काळी कुणीच विरोध केला नसेल, आणि मान्यता मिळाली. नात्याच्या स्तरावर बाबा, आई, मामा, काका, आत्या, दादा, ताई, आक्का इत्यादी नाते नामकरणे त्या काळी वेगळीच होऊन जात होती. ह्यातूनच बप्पा, आबा, बापू, मा, माई, बाई, दीदी, अम्मा, इत्यादी प्रकारची नामावळी होती. हे नांव उच्चरल्या नंतर ते माझे कोण हे कित्येक वेळा सांगणे गरजेचे होई. आई, बाबा ... म्हणताच नात्याचा इतरांना बोध होतो, तसे बापू, अम्मा .... इत्यादीत उलगडा करावा लागे.
मारुती देखील माझ्या वडीलांना भाऊ व माझ्या आईला ताई याच पद्धतीने संबोधीत असे. जणू त्यानेच मैत्रीचे नव्हे तर बंधूत्वाचे नाते आमच्या घराण्याशी निर्माण केले होते.
मारुती व मी दोघे रात्री अभ्यास करुन बरोबर रात्री १० वाजतां झोपत असू. घरांत एक गजराचे घड्याळ मजसाठी दिलेले होते. रोज आम्ही गजर लाऊन सकाळी पांच वाजता उठत असू. घराच्या मागील परसदारी एक मोठी विहीर होती. त्यावर पाणी काढण्यासाठी रहाटचक्र पक्के लावलेले होते. सकाळीच आम्ही पाणी काढीत असू. गम्मत म्हणजे सकाळचे पाणी खुपच गरम असायचे. वातावरणाच्या मानाने एकदम कोंम्बट ( Warm water ) . आम्ही हात पाय धुवुन खोलीमध्ये थोडावेळ अभ्यास करीत असू.
एकदा कुलकर्णी गुरुजी म्हणाले होते सकाळी गार पाण्याने स्नान करणे प्रकृतीसाठी फार चांगले असते. बस माझ्या डोक्यांत ते शिरले. तसे सकाळचे नुकतेच उपसलेले पाणी खुपच गरम असते. मी पण ठरऊन टाकले की आपण गार पाण्याने स्नान करावे. दुसऱ्याच दिवशी मी सकाळी उठताच विहीरीच्या गार पाण्याने स्नान करु लागलो. मारुती मला मदत करीत असे. तो पाणी उपसुन देई. ती बादली भरुन काढलेले पाणी माझ्या अंगाखाद्यावर टाकीत असे. दोन चार बादल्या पाणी उपसले जाई. मारुती ह्यात सहकार्य व मेहनत घेई. असे बराच काळ पुढे चालले.
पुढचा भाग पुढील अंकात---
डॉ. भगवान नागापूरकर
एक गमतीदार परंतु मनोरंजक संत कथा वाचण्यांत आली. जीवनाचे खुपसे तत्वज्ञान कळले. सारे चिंतनीय होते. एका गावांत एक थोर संत रहात होते. तत्वज्ञानी व अध्यात्मिक क्षेत्रांत नावाजलेले. दुरदृष्टी, सत्य संवाद, आणि भविष्याचा अचूक वेध ह्यामध्ये मान्यताप्राप्त. सभोवताली अनेक शिष्यगण सदैव असत. गुरुना ते देवाप्रमाणे समजत.
एके दिवशी त्यानी सर्व शिष्याना एकत्र बोलावले. त्यानी एक विचीत्र परंतु भावनिक विचार व्यक्त केला. ״ आज पर्यंत तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केल. माझे ऐकले. माझ्या शब्दाला प्रतिसाद दिलात. माझ्या समजूतीने, ज्ञानाने व दूरदृष्टीने मी माझ्याच भविष्यकाळाचा वेध घेतला. माझा हा देह धरणीवर ठेवण्याचा काळ जवळ आलेला आहे. दुर्दैवाने माझा पुढील जन्म एक निराशजनक योनीत होणार आहे. तो असेल डुकराची योनी. मात्र त्यानंतर माझा जन्म एका राज घराण्यांत होईल. त्यानंतरच्या पुढील सर्व योनी अत्यंत चांगल्या व ईश्वर सान्निध्याच्या असतील. मला त्याचा आनंद व अभिमान आहे. फक्त एकाच म्हणजे पुढच्या येऊ घातलेल्या जन्मचक्रातून मला क्लेशदायक जीवन व्यतीत करावे लागेल. तो जन्म असेल डुकराचा. मी अमुक काळी, अमक ठिकाणी, अमुक विशिष्ठ रंगांत असेन. मृत्यु माझ्या हाती नाही. मला ते घाणेरडे , किळसवाणे, घृणास्पद जीवन पूर्ण करावेच लागेल. तुम्ही सर्व शिष्यगण मी सुचविलेल्या वेळी व ठिकाणी जा. माझा त्या दुर्दैवी जीवनाचा त्वरीत अंत करा. माझी त्या योनीतून सुटका करा. ״
सर्व शिष्यगण अत्यंत गंभीरतेने व आश्चर्याने गुरुंचे विधान ऐकत होते. सर्वांनी गुरुंच्या त्या विलक्षण आज्ञाची नोंद घेतली. गुरु आध्यात्मिक दृष्टे व महान भविष्यवेत्ते होते. त्यांच्या वाणीप्रमाणेच घडले.
एका घाणेरड्या उकीरड्यावर, गटाराच्या शेजारी कांही डूकरे स्वतःचे अन्न शोधीत होती. त्यांत वर्णन केलेले डुक्कर देखील होते. सर्व शिष्यगण हाती काठ्या, लाठ्या घेऊन एकत्र जमा झाले. त्यानी त्याच डुकराला घेरले. ते तथाकथीत डुक्कर सैरा वैरा धावू लागले. आपल्यापरी आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करु लागले. सर्व शिष्यगण त्याच्यावर घाव घालणार, इतक्यांत चमत्कार झाला. ते डुक्कर मधोमध शांत उभे राहीले. आणि त्याच्या तोंडून मानवी शब्द बाहेर पडले. त्यांच्या गुरुचाच आवाज स्पष्टपणे ऐकू येवू लागला.
״ थांबा । माझ्या प्रिय शिष्यानो. मला मारु नका. मीच तुम्हास पूर्वी माझ्या, आजच्या जन्म चक्राबद्दल सांगितले होते. हे चक्र खंडीत करण्यास सुचविले होते. हे सत्य आहे. पण थांबा. आता पुन्हा ऐका. मी तुमचाच गुरु. आज अत्यंत वेगळ्या आवस्थेत आहे. एका डुक्कराच्या योनीत, जीला मानवानी हिनत्व देत दुर्लक्षीत केले. स्वच्छ-अस्वच्छतेच्या मोजमापांत अत्यंत घाणेरडा ठरविले. मी माझ्या पूर्व मानवी योनीत, मानवाच्या तथाकथीत श्रेष्ठत्व, महानता, विद्वत्ता ह्यांचा पुरेपुर अनुभव घेतला आहे. मानवाने इतर सर्व सजीव योनींचे ज्ञान व विश्लेशन
ह्यांच्या साह्याने भरपुर माहीती मिळवली. ज्ञान तर मिळत गेले, परंतु अनुभवाचे काय ? कारण अनुभव हा ज्ञानानी मिळत नसतो. अनुभवासाठी निसर्गच्या दैनंदीन चक्रातुनच जावे लागते. क्षणा क्षणाची घटना जीवनाची अनुभव संपन्नता देते. आणि विशेष म्हणजे प्रत्येक घटना भिन्न तसाच अनुभव देखील. ज्ञान घटनांचे विश्लेशन करते. घटनांची जाणीव फक्त अनुभवच देऊ शकतात. त्या घटनांच्या छेदातून आरपार गेल्यानंतरच. म्हणून अनुभव ही वैयक्तीक बाब बनते. अनुभव हे ज्ञान देते मात्र ज्ञान अनुभव देऊ शकत नाही.
״ ईश्वराची, निसर्गाची श्रेष्ठता हिच आहे की त्याने जीवन चक्रातील प्रमुख बाबी सर्व जीवाना त्याच पद्धतीने, क्षमतेने देऊ केलेत. स्वतःच्या जीवाविषयी प्रचंड प्रेम, जगण्याची उत्कठ इच्छा, अस्तित्वासाठी झगडा, जीवाची वाढ, पुनुरुत्पादनता, आणि संरक्षण इत्यादी मुलभूत बाबी प्रत्येक सजीव प्राण्यांत तशाच दिलेल्या आहेत. 'मी' वर प्रेम म्हणजे त्याच्यातील ईश्वरी अंशावर प्रेम असते. मग ते कोणत्याही स्वरुपांत वा योनीत असो. माणसाला विचाराने समज आली. इतर सजीवांना " हे ज्ञान " कसे असावे हे ज्ञात नाही. माणसे विचारांनी तुलनात्मक बऱ्यावाईट, सोय-गैरसोय, सहजता वा कष्टमय जीवन ह्याची फक्त चर्चाच करतात. प्रत्याकाला चांगले व सुकर जीवन हवे. परंतु हाती मिळालेले जीवन नष्ट करुन, इतर अनिश्चित जीवनाचा कुणीच स्विकार करणार नाही. हा निसर्ग असतो. जीवनाची सारी प्रमेये मला देखील लागु पडतात. माझे हे जीवन अस्तित्व नष्ट करुन मी भावी अनिश्चिततेत जावू इच्छीत नाही. तुमचे गुरु म्हणून माझा आदेश आहे की मला लाभलेले आजचे जीवन, निसर्गचक्रानुसार पुरे करु द्या. मला जगु द्या आणि परत जा. ״
सारे शिष्यगण अचंबीत झाले. त्यानी हातातल्या काठ्या लाठ्या फेकून दिल्या. त्या योनीतील समोरच्या गुरुला विनम्र अभिवादन केले. सारे आनंदीत होते. कारण त्याना गुरुकडून आज जीवनाचे एक वेगळेच तत्वज्ञान कळले होते
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
आम्ही दोघे एकाच वर्गांत व एकाच शाळेत. जिल्ह्याचे ठिकाण बीडचे. असे ऐकले की बीडचे पुर्वीचे नाव चंपावती नगरी होते. तेथेच चंपावती विद्यालय ही शाळा स्थापन झाली होती. त्याच शाळेंत आम्ही दोघे आठवीच्या वर्गांत होतो. त्या वेळी तोच शाळेमधला सर्वांत मोठा वर्ग समजला जाई.
सकाळचा अभ्यास करुन आम्ही दोघे रोज धावण्यासाठी व व्यायामासाठी बाहेर पडत असू. साधारण दोन एक मैल आम्ही धावत व्यायाम करावयाचा. रस्त्याने वा शाळेच्या मैदानावर चकरा मारायचे.
एक गोष्ट गमतीची घडत असे. अचानक आठवली. शाळेच्या शेजारील शेतामध्ये, प्रासंगीक छोटी छोटी पिके लावली जात होती. त्यांत भुईमुगाच्या शेंगा, चवळी, टहाळ ( हरबरा ), मका, असायचे. ही पिके येऊ लागताच, आम्ही आमच्या व्यायामाची घोडदौड त्या दिशेने घेऊन जात असु. व सकाळच्या प्रहरी, शांत वातावरणात, कुणीही बघत नाही याचा कानोसा घेत,चक्क तेथे तारे खालून शिरुन शेतात जात असू. ते पिक आमच्या पोटाच्या क्षमते प्रमाणेच खात असू. आनंद घेत असू. ज्यांमध्ये इतर भावना, जसे भय, निर्लजापणा, दुसऱ्याचे पिक हडपणे, हे सारे बाल सुलभ दुर्गुण भरलेले होते. आज जेव्हा त्या आठवणी येतात, थोडीशी गम्मत वाटते, थोडीशी खंत वाटते. परंतु वयाचे पांघरुण त्या घटनावर चांगलेच आच्छादले जाऊन, दिलासा देत दुर्लक्ष करण्यास सांगते.
शाळेचे पटांगण हे अतिशय सुलभ, योग्य, असे साधन त्या काळांत आम्हास मिळाले होते. जेथे आम्ही मित्र मंडळी खेळत असू. एक घसरगुंडी होती. सुरपारंबा, आम्ही खेळत असू. घरांत दिलेली रींग, बॉल, बँट, रँकेट, शटल फुल, फुटबॉल हे सर्व सामान्य खेळ होते. क्रिकेट त्या काळी तेथे नव्हते. विटी दांडू हे खेळ होते. मारुतीनेच मला सायकल चालवण्याची कला व बँलेंस शिकवले.
आम्ही दोघे एकाच वर्गांत व एकाच शाळेत. जिल्ह्याचे ठिकाण बीडचे. असे ऐकले की बीडचे पुर्वीचे नाव चंपावती नगरी होते. तेथेच चंपावती विद्यालय ही शाळा स्थापन झाली होती. त्याच शाळेंत आम्ही दोघे आठवीच्या वर्गांत होतो. त्या वेळी तोच शाळेमधला सर्वांत मोठा वर्ग समजला जाई. नंतर जस जसे आम्ही पुढील वरच्या वर्गांत जाऊ लागलो, शाळेलाही वरचावर्ग स्थापन करण्याची शासकीय मान्यता मिळत गेली. आज तर ती संस्था फार मोठी झालेली कळते. चंपावती शाळेच्या व्यवस्थापनेत नवीन शिक्षकांची भरती होतच होती. शाळेच्या संस्थापनेच्या संबंधीत कांही शिक्षक मंडळी होती. माझ्या माहितीप्रमाणे व आज मला आठवते, ते होते, श्री. ना. के. महाशय गुरुजी. ते ही आम्हास शिकवायचे. तसेच घारपुरे गुरुजी, पांडे गुरुजी. तेथेच नवीन गुरुजी त्यावेळी आले ते मुकुंद घनशाम कुलकर्णी. ते सोलापुरचे होते. एका शब्दांत जर टिपणी करयची, तर खऱ्या अर्थाने माझ्या संपुर्ण शैक्षणिक क्षेत्रामधील अतिशय उत्तम, आदर्शवादी, शिक्षक म्हणून मी त्याना प्रथम प्राधान्य देईन. जीवनाची इमारत जर पायावर आधारीत असते, तर माझ्या शैक्षणिक जीवनाचा पाया जबरदस्त पक्का व मजबुत बनविताना श्री. मुकुंद घनशाम कुलकर्णी गुरुजींचा प्रमुख सहभाग त्यांत होता. त्यानी पुस्तकी ज्ञान, अभ्यास क्षेत्र, व्यायाम, ह्या प्रांतामध्ये शिक्षकी मार्गदर्शन केले. तसेच ते सतत जीवन म्हणजे काय, जीवनाला कसे सामोरे जावे, जीवनातील यश मिळवणे हेच कोणतेही शिक्षण घेण्याचे सार असते. ध्येय असावे लागते हे सांगत. अनेक सामान्य विषयांची चर्चा करीत. आमच्या विकसीत होऊ पाहणाऱ्या बुद्धीला सतत चालना व चैतन्य देत असत. अनेक छोटी छोटी उदाहरणे, सांगुन थोरा मोठ्यांच्या यश्स्वी जीवनाच्या कथा वर्णन करीत. अभ्यास, ज्ञान, आणि जीवन या तिन्ही गोष्टी यशस्वी करण्यावर त्यांचा भर होता. अनेक वेळा सांज समयी ते फिरावयास जायचे, त्याच वेळी मारुती व मी ती वेळ हेरुन त्यांच्या बरोबर जात होतो. त्यांच्या सहज वा सामान्य बोलण्यातच आम्हाला कित्तेक विषयांच्या गम्मती कळत असते. एक प्रेमळ गुरु शिष्य नाते होते. शाळेमध्ये त्यानी अनेक नव्या नव्या योजना राबवल्या. मारुती व मी, आम्हा दोघाना ते विशेष महत्व द्यायचे. आम्ही पण सारे मन लाऊन ती कामे पुर्ण करण्याचा प्रयत्न करीत असे. दोन योजनांचा मी प्राथमिकतेने उल्लेख करु इच्छीतो.
शाळा तशी खुपच लहान होती. परंतु त्यानी तीचे नांव बीडच्या परिसरांत व जिल्ह्यांत दुरपर्यंत नेऊन ठेवले. त्याच शाळेत त्यानी ज्ञान विकास ह्या नावाचे हस्त लिखीत मासिक सुरु केले होते. मासिक फक्त विद्यार्थ्यांचे व विद्यार्थ्यानीच चालविलेले हेते. सारी सकल्पना कुलकर्णी गुरुजींचीच. सर्व विद्यार्थ्याना लेखनाची गोडी निर्माण करणे हा प्रमुख हेतू. मला म्हणजे भगवान ह्या विद्यार्थ्याला “ संपादक ज्ञान विकास “ म्हणून निवडले गेले.
आज ज्येष्ठ वयाच्या वळणावर, त्या घटनेबद्दल खूप आनंद व समाधान वाटते. त्या क्षणी मला फक्त आनंद वाटला होता. कारण समाधानाचा संबंध योग्यतेशी, क्षमतेशी असतो. आणि त्याचे तसे विश्लेशन, त्यावेळी कसे असणार. अर्थात “न धरी शस्त्र करी मी “ ह्या भगवंताचा वचनाप्रमाणे कुलकर्णी गुरुजी सतत पाठीशी होते. सर्व विद्यार्थ्याचे लेख कविता जमाकरणे, वाचून संपादन करणे, चांगला वा वाईट म्हणून त्यावर टिपणी करणे, हे काम मजवर सोपविले होते. शेवटी कुलकर्णी गुरुजी त्यावर मत देऊन लेख निकाली काढीत. सर्व लेख श्री कुलकर्णी गुरुजीनी स्वतःहाच्या हातानेच लिहीले होते. त्याकाळी छपाई करणे हे मार्ग फार दुर्मिळ होते.
ज्ञान विकास हस्त लिखीत मासिक संपादक भगवान नागापूरकर वर्ग ८ वा. आज त्याची खुप गम्मत वाटते. येथेच माझी एक फजीती झाल्याची आठवण येते. माझा मित्र मारुती याने एक लेख लिहून मासिकासाठी दिला. त्यानी नांव दिले होते “ मुऱ्हाळी “
मला त्याचाच अर्थ माहीत नव्हता. त्याचा बोध मला झाला नाही. ते सारे क्षुल्लक समजुन मी तो ‘अस्विकृत” अशी टिपणी करुन बाजूस टाकला. सर्व लेखांचा गठ्ठा मी कुलकर्णी गुरुजीकडे दिला. दोन दिवसानंतर तोच गठ्ठा मला परत देण्यांत आला. माझे लक्ष वेधले गेले ते मारुतीच्या मुऱ्हाळी ह्या लेखावर. गुरुजीनी लाल शाईने पहील्या पानावर लिहीले होते
“ उत्तम लेख प्रथम क्रमांक “ मी खजील झालो. कुलकर्णी गुरुजीनी मला बोलाऊन सांगितले. “ मुऱ्हाळी ही भावनिक व्यक्तीरेखा आहे. हा प्रेमळ भाऊ असतो. तो आपल्या लग्न झालेल्या बहीणीकडे जातो. तीला दिवाळीसाठी तीच्या माहेरी म्हणजे आई वडीलांकडे घेऊन येण्याचा प्रचत्न करतो. हा अतिशय भावनापुर्ण व प्रेमळ प्रसंग असतो. मारुतीने त्यावरच बहीण भाऊ प्रेमाचा नैसर्गिक धागा धरुन, सुंदर प्रकाश झोत टाकला. तु पण असेच लिहीत जा. “
मारुतीचे हेही वेगळे स्वरुप माझ्या ध्यानी आले. त्यावेळी मला माझ्या विषयी खंत व लज्जा वाटू लागला. मारुतीने दिलेल्या शिर्षकाचे मुऱ्हाळी या शब्दाचे अवलोकनच झाले नव्हते.
गुरुजीनी दुसरी अशीच योजना फार यशस्वी केली. त्याच शाळेंत प्रदर्शन भरऊन. मारुतीला ह्या योजनेमध्ये प्रमुख केले गेले होते. त्याच्या बरोबर आम्ही आठजण इतर मित्र मंडळी होतो. गुरुजींचे मार्गदर्शन होते. मारुती सारी योजना कामे आमच्याकडून करऊन घेत असत. चित्रकला, हस्तकौशल्य, वैज्ञानीक प्रयोग, अनेक चित्र विचीत्र गोळा केलेले पदार्थ, रांगोळ्या, दैनंदीन जीवनामधील प्रात्यक्षीके, ईत्यादी अनेक अनेक दालनानी त्या प्रदर्शनांत खपच भव्यता, दिव्यता आणली होती. मारुती व मी दोघेही, त्या प्रदर्शन निर्मीती मध्येखुपच प्रयत्नशील व यशस्वी ठरलो. अर्थात कुलकर्णी गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली.
पुढचा भाग पुढील अंकात---
डॉ. भगवान नागापूरकर
ग्रामीण भागातील शेतकरी जीवनातील अनेक समस्या आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.त्याचा एक जीवंत अनुभव….
रस्त्याच्या वळणावर भाजी विक्रेत्याची गाडी बघीतली. बरीच गर्दी होती. एक वयस्कर ग्रहस्थ भाजी गिऱ्हाकाना देत होते. त्या ग्रहस्थाना बघताच आश्चर्याचा धक्का बसला. कल्पना करु शकत नव्हतो, विश्वास वाटेना. अतिशय परिचीत व्यक्ती होती. लगेच बाजूस झालो. त्या व्यक्तीला न्याहाळू लागलो. ते डॉ. विकास जोशी होते.
तसा मी मात्र शाकाहरी ह्या खाद्य सवयीला चिटकून राहण्याच्याच विचारधारणेत होतो. मी पहीले अंडे खाण्याचा प्रयत्न केला तो केवळ मित्र मारुती ह्याच्या आग्रहामुळे.. सुटीच्या दिवशी तो अभ्यासाला येत असे. त्याचा स्वतःचा खाण्याचा डबा घेऊन येई. बऱ्याच वेळा आम्ही जवळ बसुन जेवण घेत असू.
नेहमीच्या कोपर्यावर मी मोटार थांबवली. माझे ऑफिसातले मित्र आंत चढले. मोटार ऑफिसच्या दिशेनं धावूं लागली. ‘‘आज साठे दिसत नाहीं’’, मी म्हणालो. ‘‘तुम्हाला माहीत नाहीं कां पराडकर ? साठेला मुलगी झाली.’’ पाटीलनं सांगितलं, ‘‘हो कां ? अरे वा !’’, मी. साठे हा आमच्या ऑफिसातला एक तरुण ऑफिसर. त्याच्या खेळकर स्वभावामुळे तो सर्वांनाच आवडत असे. दीडएक वर्षांपूर्वी त्याचं लग्न झालं होतं. आतां मुलगी झाली होती. बेटा अगदी खुशीत असणार ! साठे भेटला की त्याचं अभिनंदन करायचं मी ठरवलं.
दुसर्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे मित्र कारमध्ये चढले. आज साठेही होता. ‘‘साठे, अभिनंदन !’’, मी. ‘‘थॅंक्यू’’ , साठे. ‘‘बर्फी हवी बरं का साठे’’, मी. ‘‘छे छे, बर्फीनं भागणार नाही, पार्टीच हवी’’, काळेनं फर्माईश केली. ‘‘देऊं ना’’, साठे म्हणाला. पण त्याच्या बोलण्यात उत्साह दिसत नव्हता.
कार पुढे धावत होती. संभाषणाला खीळ पडली होती. नेहमीचा खेळकर साठे आज इतका गप्प गप्प कां? मी विचार करत होतो. अखेर न राहवून मी विचारले, ‘‘काय साठे, आज अगदी गप्प आहेस ? बाळ बाळंतीण ठीक आहेत ना ?’’. साठेच्या आधी पाटीलनंच उत्तर दिलं, ‘‘त्याचं काय आहे, मुलगी झाली म्हणून साठे नाराज झालाय्’’. ‘‘खरं का रे’’, मी. साठे गप्पच. त्याला समजवत मी म्हणालो, ‘‘अरे, नाराज कशाला व्हायचं? उलट खूषच व्हायला हवं. म्हणच आहे, पहिली बेटी धनाची पेटी’’. ‘‘हो धनाची पेटी ! मला आत्तांपासूनच धन जमवायच्या मागे लागायला हवं, म्हणजे मुलीच्या लग्नासाठी धनाची पेटी तयार करता येईल’’, साठे उद्गारला. ‘‘अरे साठे, मूल होणं ही किती आनंदाची गोष्ट आहे ! त्यातून तुझं तर पहिलं मूल ! मुलगा काय, मुलगी काय, सारखंच’’, काळे म्हणाला. त्याला लग्नानंतर पांच वर्षांनी मूल झालं होतं. पण साठेला काळेचं सांगणं पटलं नाही. ‘‘अरे बाबा, एवढं सोपं नाहीं तें. आज मुलीच्या लग्नाला चार-पांच लाख खर्च येतो. पंचवीस वर्षांनी पंधरा-वीस लाख तरी लागतील. आपण मध्यमवर्गीय माणसं, आपला पगार तो कितीसा, अन् त्यातून शिल्लक किती पडणार ? महागाई तर दिवसेदिवस वाढतेच आहे ! मुलीला वाढवायचं, शिकवायचं, ग्रॅज्युएट-पीजी करायचं. त्यातून तिने इंजिनियरिंग किंवा मेडिकलला जायचं म्हटलं तर झालंच ! एवढं सगळं करून इतके लाख शिल्लक टाकायचे कसे अन मुलीचं लग्न करायचं कसं ?’’, साठे व्यथित झाला होता. जणूं मुलीचं लग्न उद्यावर येऊन ठेपलं होतं !
मी वेगळा मुद्दा मांडत साठेची समजूत काढू लागलो, ‘‘पण मुलगा होणं किंवा मुलगी होणं आपल्या हातात थोडंच असतं ? मग मुलगाच व्हावा अशी अपेक्षा ठेवणं योग्य आहे कां ?’’. ‘‘पराडकर, तुमचं काय जातं असं म्हणायला?’’, साठे चिडून बोलला, ‘‘तुम्हाला दोन्ही मुलगेच आहेत. जावें त्याच्या वंशा तेव्हां कळे !’’.
खरं म्हणजे मला साठेशी खूप बोलायचं होतं. मुलगा किंवा मुलगी असा प्रेफरन्स मला नव्हता, हे त्याला सांगायचं होतं. हल्ली मुली मुलांच्या बरोबरीने चमकतात, स्त्रिया पुरुषांपेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नाहीत, हेही सांगायचं होतं. ह्या विषयाचे वेगवेगळे पैलू आहेत, त्यांची चर्चा करायची होती. पण साठेचा मूड् बघून मी विषय वाढवला नाही. बाकीची मंडळीही उरलेला रस्ता गप्पच राहिली.
संध्याकाळी साठे ओव्हरटाईमला थांबल्यामुळे आमच्याबरोबर नव्हता. साहजिकपणें पुन्हां साठेचाच विषय सुरुं झाला. ‘‘साठेनं मुलगी झाल्याचं फारच मनाला लावून घेतलं आहे’’, मी म्हणालो , ‘‘खरं म्हणजे मुलगा किंवा मुलगी होणं किंवा न होणं हें आपल्या हातात नसतं’’. ‘‘खरं आहे, पण साठेसारखे लोक बरेच आहेत, पराडकर’’ , इति पाटील.
पाटील सांगूं लागला, म्हणाला, ‘‘माझा एक परिचित आहे, लिमये. त्याला दोन मुली आहेत. बायकोची प्रकृती यथातथाच आहे. तिसरं मूल नको असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. पण ह्या सद्.गृहस्थाला मुलगा हवाच होता, म्हणायचा, ‘मुलगा नसला तर मला सद्गती मिळणार नाहीं’. जग एकविसाव्या शतकात पोंचलंय आणि याचे असे जुनाट विचार ! बायकोला तिसर्यांदा दिवस राहिले. ह्याला कांही चैन नाहीं, मुलगा होईल की मुलगी ? गर्भतपासणी करून घेतली”. ”अरे, पण तशी चाचणी तर बेकायदेशीर आहे”. ”हो, पण तरीही घेतली करून. मुलगी आहे असा निर्णय समजला. झालं. हा पठ्ठ्या बायकोच्या मागे लागला की गर्भपात करून घे. दोनचार दिवस तिनं तग धरला. पण हा कांही पाठ सोडेना. शेवटी ती बिचारी नाइलाजानें तयार झाली. अन् सांगायची गोष्ट म्हणजे गर्भपाताच्या वेळी ती बाई रक्तस्त्रावाने जवळजवळ मेलीच होती, केवळ सुदैव म्हणून वाचली ! त्या वेळी तिची मोठी मुलगी होती चार वर्षांची अन धाकटी दोन वर्षांची. आतां बोला ! ”. ”बिचारी बाई खरोखरच जर मेली असती तर त्या लहान जिवांचे काय हाल झाले असते !’’, काळे त्वेषानं उद्गारला. ‘‘खरी गंमत पुढेच आहे’’, पाटील म्हणाला, ‘‘थोड्या दिवसांनी बाईला पुन्हां दिवस राहिले, अन या वेळी मात्र तिला मुलगाच झाला’’. ‘‘त्या लिमयेला अगदी धन्य धन्य झालं असेल!’’ मी म्हणालो. ‘‘हो ना ! त्याला आता आभाळ ठेंगणं झालंय. आतां स्वर्गात जायची सोय झाली ना !’’ पाटीलची प्रतिक्रिया.
”पण साठे काय किंवा लिमये काय, यांच्या या अवस्थेला आपली समाजरचनाच जबाबदार आहे”, काळे म्हणाला, ”अगदी माझ्या घरातलंच उदाहरण सांगतो. परवाचीच गोष्ट. माझी बायको नलू सांगत होती – ‘दुपारी मी आणि शेजारची सुमा बोलत उभ्या होतो. पलिकडच्या मालतीकाकू त्यांच्या पुष्पाच्या बाळाला घेऊन जात होत्या. त्या आमच्याशी बोलायला थांबल्या. मी कौतुकानं म्हणाले, कित्ती छान जावळ आहे बाळाचं. तर म्हणतात कशा, ‘असं बोलूं नये हो. बाळाला दृष्ट लागेल’. मला अस्सा राग आला. नंतर मी सुमाला म्हटलं सुद्धा, आमची कशी दृष्ट लागेल ? आम्हाला मुलं नाहींत की काय ?’. नलूचं बोलणं ऐकून मी थक्कच झालो . म्हटलं , ‘मालतीकाकूंचं जाऊं दे ; अल्पशिक्षित म्हातारी ती. पण तूं ! तूं तर कॉलेजात फिजिक्सची लेक्चरर आहेस ! दृष्ट लागणं अन त्यातूनही निपुत्रिकेची दृष्ट लागणं असल्या अंधश्रद्धांवर तुझ्यासारखी बाई विश्वास ठेवते म्हणजे मात्र कमाल आहे !’ . ’माझा विश्वास आहे की नाहीं ते जाऊं द्या’, नलू म्हणाली, ‘जगाचा तर आहे ना ! आपला विश्वास असो वा नसो, समाज आपल्याला अशा गोष्टींमध्ये जखडून ठेवतो. इतकी वर्ष आपल्याला मूल नव्हतं. तेव्हां याच बायकांच्या बोचर्या नजरा मला घायाळ करत, त्यांची कुत्सित बोलणी ऐकवत नसत. आतां देवानं मला सोन्यासारखी मुलगी दिली आहे. आतां मी दुसर्यांची बोलणी कां म्हणून ऐकून घ्यावी ?’ या अजब तर्कानं मी सर्द झालो”, काळेंनं गोष्ट पूर्ण केली. मग काळेनं विचार मांडला, ”सांगायचा मुद्दा असा की, समाजाची रचना, समाजाच्या रूढी बदलायला हव्यात. तरच साठे आणि लिमयेसारखे लोक मुलगी झाली म्हणून दुःखी होणार नाहींत”.
*
पाटील अन् काळे नेहमीच्या कोपर्यावर उतरून गेले. कार घराकडे धावत होती. कारबरोबर माझे विचारही धावत होते. कधी बदलणार हा समाज ? दुष्ट रुढी कधी नाहींशा होतील ? कधी स्त्रियांना समाजात बरोबरीचं, मानाचं, स्थान मिळेल ? आपल्यासारखी माणसं त्यासाठी काय काम करूं शकतील? एक ना दोन, अनेक विचार.
विचारांच्या नादात घर केव्हां आलं ते मला कळलंच नाहीं, कार पार्क करतां करतां मी ठरवलं की गेल्या गेल्या लगेचच स्त्रीस्वातंत्र्य-पुरस्कर्त्या आपल्या बायकोला आजची सर्व चर्चा सांगायची.
घरात पाऊल टाकतांच दिसलं की माझी चुलतबहीण रजनी आलेली होती अन् ‘मुलगा व्हावा’ म्हणून कुठलसं व्रत धरल्याचं ती माझ्या बायकोला सांगत होती. मी ओठावरचे शब्द तात्पुरते गिळून टाकले.
+ + +
( Note – This story is based on a real-life experience. The Author has taken some literary liberties. Name of characters have been changed ).
_ _ _
[ पूर्वप्रसिद्धी : ‘कीर्तिस्तंभ’ पाक्षिक, वडोदरा ( बडोदा) , आवृत्ती दि. ०१.०९.१९९६.
कांहीं बदल : १४ फेब्रु. २०१८ ]
= = =
- सुभाष स. नाईक Subhash S. Naik
मुंबई.
M - 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com , www.snehalaatnaik.com
Copyright © 2025 | Marathisrushti