(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • बाल दिनाच्या शुभेच्छा..!

    जीवन आता ‘चक्रीवादळ’ बनले आहे, ते निरागस बालपण कोणत्या हवेच्या झुळकेसोबत तरंगत गेलं कळलं पण नाही. ज्या जवाणीच्या हट्टापायी बालपण गमावलं, तीनं तर चक्रव्यूहातचं सोडलं..!

  • काव्यसुमनांजली – म्हणजेच अपेक्षा वाढविणार्‍या कविता

    एक उत्साही, विद्यार्थीप्रिय, प्रयोगशील शिक्षक म्हणून जिल्हास्तरीय ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. हरिश्चंद्र कोळी, एक कवी म्हणूनही ज्ञात आहेत. अध्यापनाच्या कार्यात कवितांना चाली लावून शिकविणे, विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण करून त्यांना कविता लिहिण्यास प्रवृत्त करणे, शाळेची उत्कृष्ट हस्तलिखिते तयार करणे, अनेक नाटिका बसवून त्या मुलींकडून करवून घेणे वेगैरे कार्यामधून त्यांनी आपल्या प्रतिभा शक्तीचा अवकाश वाढवला आहे. ‘काव्यसुमनांजली’ या कवितासंग्रहाच्या माध्यमातून ते आता सर्व वाचकांपर्यंत पोहचत आहेत. त्यांच्या या सेवेला मन:पूर्वक धन्यवाद!

    p-22946-Kavyasumananjali-Coverहरिश्चंद्र कोळी हे मुळात शिक्षक असल्यामुळे शिक्षण, शिक्षक, विद्यार्थी, शाळा, सुट्टी, बालमन, सर्वधर्म समभाव, स्वच्छ भारत, साक्षरता, शिक्षकदिनासह, निरोपसमारंभ गीता पर्यंतचे सर्व विषय त्यांच्या कवितांमधून आलेले आहेत. सावित्रीबाई फुले यांनी रुजवलेले शिक्षण प्रमाणभूत मानल्यामुळे सामाजिक मूल्ये त्यांच्या कवितांमधून आलेली दिसतात. म्हणूनच, ‘शाळा माझी माऊली’ या कवितेत ते म्हणतात -

    ‘शाळा आपुली माय माऊली

    तिच देते तुम्हां साऊली

    हसा, खेळा, पडा, धडपडा

    राखा देशाचा मान

    वेचा कण-कण ज्ञान’

    हसत खेळत शिक्षण घेण्याचे मूल्य रुजतांनाच देशाचा मान राखण्याचा संस्कार ही ते मुलांवर करतात. साने गुरुजींचा आदर्श जपण्याचा ते प्रयत्न करतांना दिसतात.

    स्वतंत्र भारतात आपण स्वतंत्र आहोत का? ‘स्वातंत्र्या नंतरही’ या कवितेमध्ये आजच्या भ्रष्ट समाजाचा आरसा तर ते दाखवतातच पण आपण या स्वतंत्र राष्ट्रात सुरक्षित आहोत का? असा प्रश्नही विचारतात. आणि मुलांना सांगतात -

    ‘एक दिलाने गाऊ आपण

    देशाचे गुणगाण रे

    श्रमातुनी आणि त्यागातुनी

    घडवू भारत छान रे

    घडवू भारत छान’

    श्रम आणि त्यागाचे मूल्य सांगतानाच ‘कुठलंही व्यसन न करण्याचा’ आदर्श व्यक्त करतात. जीवन म्हणजे काय? जगणं म्हणजे काय? सुख - दु:ख म्हणजे काय? याची सुंदर व्याख्या ‘जीवन’ या कवितेमध्ये त्यांनी केलेली आहे. ते म्हणतात -

    ‘जीवन म्हणजे केवळ जगणं नसतं तर

    सुख - दुःखाच्या दरम्यान

    श्वास आणि उच्छवास

    यातील अंतर

    म्हणजे खरं जीवन’

    जीवनाची अशी व्याख्या त्यांच्या विचारांचा पोत ठरवते. ‘महिला दिन’ या कवितेमध्ये इतिहासातील अनेक क्रांतिकारी स्त्रियांचे दाखले देत असतांनाच... आजच्या स्त्रीला प्रेरणा देण्यासंबंधी भाष्य करून तिचा पाय मागे न ओढण्याची विनंती करतात.

    ‘शाळेतील मुलांना मला शिकवायचे आहे

    समाजात जगण्यालायक बनवायचे आहे’

    (आदर्श शाळा)

    त्यासाठी श्रमप्रतिष्ठा, नैतिकमूल्य, अंधश्रद्धेचे उच्चाटन, साक्षरतेचा प्रसार करण्याचा मार्ग ते सुचवतांना दिसतात -

    ‘एका जागी राहून उभा

    आला असेल वीट

    विठ्ठला s s s सोड तुझी वीट’ (वारकरी)

    असे विठ्ठलाला अगदी सहजपणे सांगतात. ‘उन्हं पाहून पाठ फिरवणारी माणसं’ त्यांना नको आहेत. ‘भाकरीचा चंद्र शोधणारी माणसं हवी आहेत.’ ‘मी अडाणी कसा’ या कवितेमध्ये नैतिकता ही शिक्षणावर अवलंबून नसते तर ती नैतिक वागण्यावर अवलंबून असते. हे सांगताना कवी म्हणतात, ‘निरक्षर माणसाला लिहिता वाचता येत नाही पण बाकी सगळा व्यवहार समजतो. मान - अपमान समजतो. भ्रष्ट्राचार लक्षात येतो. पाहुणचार करता येतो’ मग असा माणूस अडाणी कसा? भ्रष्ट वागणारे साक्षर शहाणे कसे?... विचार करायला लावणारा प्रश्न कवीने उपस्थित केला आहे.

    ‘आम्ही सालस प्रेमळ

    निर्व्यसनी माणसं पेरली

    पण निरक्षर, लाचार

    पण हावरट माणसंच जन्मली’ (निर्दयी माणसे)

    या काव्यसंग्रहातील ‘भारती’ ही भारत मातेची आजची अनावस्था दाखविणारी कविता मुळातूनच वाचायला हवी. शिवाय ‘गर्दी’, ‘जगणं’, ‘कलियुग’, ‘बाप’, ‘चेंडू’, ‘पोर वयात आली’, ‘विटंबना’, ‘वादळ’ सारख्या कवितांनी कवी बद्दलच्या अपेक्षा वाढवल्या आहेत. साध्या - सोप्या सरळ भाषे मधील कविता गेय, गझल, मुक्तछंद, चारोळ्या, लावणी वगैरे प्रकारातील असून काही कविता गीतांच्या चालीवर लिहिलेल्या आहेत.

    हरिश्चंद्र कोळी यांचा लिहिता हात आहे. विचारांची झेप आहे. ती अधिक खोल व व्यापक व्हावी. त्यांना त्यांची लय सापडावी. भविष्यातील अधिकाधिक कसदार लेखनासाठी त्यांना अनेकानेक हार्दिक शुभेच्छा! आणि ‘काव्यसुमनांजली’ या पहिल्या कविता संग्रहाचे मन:पूर्वक स्वागत!

    - नीलम माणगावे,

    कवयित्री व लेखिका, जयसिंगपूर

    Title - Kavyasumananjali (काव्यसुमनांजली)

    Poet - Harishchandra Mahadev Koli (हरिश्चंद्र महादेव कोळी)

    Edition - First Edition

    Price - Rs. 100/- (मूल्य 100/- रुपये)

    Publisher - Dr. Sunil Patil (डॉ. सुनील पाटील)

    Publication - KavitaSagar Publication (कवितासागर प्रकाशन)

    Contact - 02322 - 225500, 09975873569

    Email - kavitasagarpublication@gmail.com

  • एक कृतज्ञ चोर

    मी एक गरीब सेवानिवृत्त बँक अधिकारी आहे. मी माझ्या पत्नीसह काही दिवस रत्नागिरीतील आमच्या मूळ गावी जायचे ठरवले. आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी आहेत, मुलीचे लग्न झाले आहे आणि ते ती कुटुंबासह दूरच्या शहरात राहतात. तथापि, आम्ही दौऱ्यावर गेलो तेव्हा त्यांच्यापैकी कोणीही आमच्या घराची देखभाल करण्यासाठी नव्हते. त्यामुळे, जर चोर आमच्या घरात घुसला तर घराची तोडफोड होईल, खोके, कपाट आणि कॅबिनेटमधून चोरटे उडाले तर घराचे नुकसान होईल आणि पैसे न मिळाल्याने चोर निराश झाल्यास आमच्या सामानाचे नुकसान करू शकेल, अशी भीती आम्हाला वाटत होती.

  • आभासी दुनियेत.. (माझी लंडनवारी – 25)

    पुलंच्या अपूर्वाईमध्ये मी मादाम तुसाद बद्दलचे त्यांचे मत वाचले होते. त्यामुळे मला तशी फार अपेक्षा नव्हती आणि त्यामुळे अपेक्षाभंगाचे दुःख ही माझ्या वाट्याला आले नाही.आलोच आहोत तर, रॉयल परिवाराबरोबर फोटो घ्यावा म्हणून तिथे फोटो घेतला.

  • ओळख नर्मदेची – भाग आठवा

    अमरकंटकच्या आधी “घुघवा“ गांव लागते तिथे थांबुन “जिवाश्म राष्ट्रीय उद्यान“ बघितला. इथे भुगर्भ विभागातर्फे भुखननानंतर आढळलेले दगड, त्यावर दिसणारी पुरातन काळातील चिन्ह, कोरीव भाग, खुणा इ. स्पष्ट दिसतात. अशा गोष्टी पुरातत्व विभागातर्फे संग्रहित करुन ठेवल्या आहेत. वेगवेगळ्या पध्दतींनी अशा गोष्टींच्या आयुष्याचा अंदाज बांधता येतो.

  • नाट्याभिमानी शशी जोशी

    व्यावसायिक रंगभूमीवर त्यांना मिळालेली पहिली नवी कोरी भूमिका होती 1974 साली रंगभूमीवर आलेल्या श्याम फडके लिखित आणि राम मुंगी दिग्दर्शित ‘बायको उडाली भुर्रर्र...’ या नाटकातील. धोपेश्वरकर ही विनोदी व्यक्तिरेखा शशी जोशींनी आपल्या ढंगात अशी फर्मास सादर केली की, त्यांना प्रेक्षक आणि समीक्षकांची भरभरून दाद मिळाली. या नाटकात त्यांना ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्याबरोबर एकच प्रसंग होता, पण त्यात ते धम्माल उडवायचे. मग व्यावसायिक रंगभूमीवर एकामागून एक नाटके मिळत गेली

  • गंध’ पुण्याचा गेला सांगून

    जर एखाद्या अस्सल पुणेकराचे डोळे व कान बंद करुन पुण्याची सफर घडवली तर तो त्याला नाकाने जाणवणाऱ्या त्या त्या परिचित गंधावरुन ते ते ठिकाण हमखास सांगू शकतो. मी हा प्रयोग एकदा केला. एका अस्सल पुणेकर मित्राचे डोळे व कानावरुन काळी पट्टी लावून त्याला पुण्यातून अनेक ठिकाणी उलटे सुलटे गाडीवरुन फिरविले. मी जिथे जिथे त्याला घेऊन गेलो, त्यानं मला पोपटासारखी ‘अचूक उत्तरं’ दिली.

  • संसार

    कुमार गंधर्वांच्या आवाजातली ही अमर भूपाळी शंकर मथार्‍याच्या टेपरिकॉर्डरवर लागली तसं सारजाची झोप मोडली.शंकर मथार्‍याच्या टेपरिकॉर्डरचा भोंगा वाजनं आण गल्लीतल्या बायामाणसांचं पहाटचं उठनं हे मागील काही वर्षांपासून गल्लीतल्या बायकांसाठी नेहमीचच होतं.गावात फक्त शंकर म्हाताऱ्याच्या घरीच टेपरिकॉर्डर होता. शंकर मथरा पहाट सुखाची चांदणी निघाली की मोठ्ठया आवाजात आपला टेपरेकॉर्डर सुरू करायचा. सारजा जरा गडबडीनच उठली. कामाचा लय रोंभा पडला व्हता,त्यात पेरणीचे दिवस व्हते. पहाटचे सगळे कामं आटपुन शेतात जायचं व्हतं. तिनं उठून तोंडावर पाण्याचा सपकारा मारला,केसं नीट करून बुचडा बांधला अन चुली जवळ जाऊन चुलीतला एक भला मोठा ढेपसा हातावर घेऊन दात घासत घासत तिच्या नवऱ्याल,दौलतल आवाज दिला.पेरणी पाण्याचे दिवस असल्यानं दिवसभरच्या कष्टानं थकून दौलत आरमोडून झोपला व्हता. त्यालं तसं झोपलेलं पाहून सारजाच्या डोळ्यालं समाधान वाटत होतं. खरं म्हंजे कामाचा लय रोंभा पडला होता पण तरी बी त्याची झोप न मोडु देता तशीच ती उठली . पारोश्या अंगानं सयपाक पाणी करू नाही मंतात…! सारजीलं लहानपणापासूनच थंड पाण्यानं आंघुळ करायची सवय होती,म्हणून मग आधी तिनं आंघुळ करून घेतली. तव्हरोक दौलत बी उठला होता. त्याच्याकडं रेडीओ होतख.रेडिओवर गाणे ऐकण्याचा त्यालं लय नाद होता. झोपतून उठून त्यांनं रेडिओवर विवीध भारती लावलं.तेव्हड्यातं नहानीतून आंघुळ करून बाहिर येणारी सारजा त्यालं दिसली. सारजालं पाहून त्याचे डोळे उघडे ते उघडेच राहिले.तिचा तो लांब लांब केसांचा वलबट केशसंभार पाहून तो खुळ्यागत तिच्याकडं पाहू लागला. तेवढ्यात रेडिओवर गाणं लागलं होतं…

  • वरुणपुत्र भृगची गोष्ट

    वृक्षतोड हेच महान पाप आहे असे सांगणारी एक कथा ‘शतपथ ब्राह्मणात’ आली आहे. भृगुऋषी हा वरुणाचा मुलगा होता. त्याला आपल्या विद्येचा इतका गर्व झाला की, वरुणापेक्षाही आपण जास्त विद्वान आहोत असे त्याला वाटू लागले.

  • आयुष्यातील आठवणी

    १९४९-५० सालचा काळ होता तो, नासिक जवळील संसरी या टुमदार गावातील वास्तव्य.मला स्पष्ट पणे आठवते. देवळाली कॅम्पातुन नंतर जवळच्या संसरी गावी आम्ही रहायला गेल्याचे आठवते.