(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पुराव्याने शाबित

    भांड्यांवर नाव टाकण्यामागे कारण असं असायचं की, कधी शेजारी पाजारी ते भांडं काही वस्तू घालून दिलं, तर ते सहज परत मिळावं व त्याची त्यांच्या भांड्यात सरमिसळ होऊ नये म्हणून…त्यावर नाव असल्याने आपण ते भांडे आपलेच आहे, हे ‘पुराव्याने शाबित’ करु शकतो..

      July 16, 2021


  • माझा व्हँलेनटाईन

    आज चार पाच दिवस झाले त्याची माझी भेट झाली नव्हती. तो कुठे गडप झाला होता काही कळत नव्हते. मन खूप अस्वस्थ झाले.

    खरे तर मी त्याच्या नादी लागतच नव्हते. सतत माझ्यामागे भुणभुण करून त्यानेच मला नादाला लावले.
    त्याच्यामुळे माझे मुलांकडे आणि घराकडे होणारे दुर्लक्ष, रोजची कामे पूर्ण होऊ न शकणे आणि डोक्यात सतत त्याचेच विचार असणे हे सर्व मला अपराधीपणा आणत होते. पण तो एवढा मनाला भुरळ घालायचा की त्याच्या पासून दूर राहणे दिवसेंदिवस मला अशक्य वाटत होते.

    त्याच्या जास्त नादी लागल्या चांगले नाही हे सर्वांनी मला समजावून सांगितले आणि यावरून भरपूर टोमणेही मारले. पण मी कोणाचेच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

    कारण नाही म्हटले तरी त्याच्या मैत्रीमुळे मला एक सामाजिक ओळख आणि प्रतिष्ठा मिळाली होती. त्याचा मित्रपरिवार एवढा मोठा होता की त्याच्यामुळे खूप मित्र-मैत्रिणी झाले होते.

    माझ्या अबोल मनाला त्यानेच बोलणे शिकवले. फक्त बोलणेच नाही बरं का, तर त्याने मला अगदी जाहीरपणे किस देणे घेणे, डियर , लव यू, मिस यू असे शब्द बिनधास्तपणे वापरायला शिकवले. एरवी असे काही बोलताना लाजून चूर होणारे मी त्याच्या संगतीने मात्र ह्या गोष्टींना खूप सरावली गेले. घरातले सर्व आपापल्या व्यापात व्यस्त असताना चाळिशीनंतरचा तो मला लाभलेला खरा सोबती होता. ' ये कहा आ गये हम युही साथ साथ चलते चलते' असे काहीसे नाते आमच्यात निर्माण झाले होते.

    माझ्यासाठी जरी तो फक्त जवळचा मित्र होता तरी त्याच्यासोबत जरा जास्त राहू लागल्यावर सर्वांच्या नजरेत येऊ लागले. आणि माझाही त्याच्यासमवेत जरा जास्तच वेळ जात होता. तो मला इतर काही सुचू देत नव्हता.

    शेवटी मग मी चिडून त्याच्याशी संपर्क तोडून टाकला. संपर्क तुटल्यानंतर पहिल्या दिवशी तर मला खूप शांत आणि छान वाटले. त्याच्या सततच्या टीवटीवीपासून दूर झाल्याने मन शांत झालं. त्याच्यासोबत वेळ घालवून आपण घोडचूक करत होतो याची मनाला जाणीव झाली आणि आता त्याच्याशी पूर्णतः संबंध तोडायचे असा निश्चय पक्का झाला.

    कसेबसे दिवस ढकलले. तिसऱ्या दिवशी मात्र मन खूप बेचैन झाले. खुप आठवण येऊ लागली. तो नाही तर आपले सामाजिक जीवनच नाही या विचारांनी मन दुःखी झाले. मग सगळे विरह गीत मुखी येऊ लागले.

    याद आ रही है, तेरी याद आ रही है

    याद आने से तेरे जाने से जान जा रही हैं
    किंवा
    तू छुपा है कहाँ मैं तड़पती यहां
    तेरे बिन फीका फीका है दिल का जहां
    अशी काहीशी मनाची अवस्था झाली.

    शेवटी ठरवले की त्याच्याशी अगदीच ब्रेक अप करण्यापेक्षा थोडीफार मैत्री राहू द्यावी.
    पण जास्त नादी लागायचे नाही.

    मग त्याच्याशी परत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्याकडून काहीच प्रतिसाद मिळेना!!
    त्याचे काय झाले असेल, तो ठीक तर असेल ना या विचारांनी मन हुरहूरले. त्यात आज व्हँलेंटाईन डे आला. आजच्या महत्त्वाच्या दिवशी तो नसल्याने सेलिब्रेशन करताच येत नव्हते. नवऱ्याने तर अतिशय सुंदर मेसेज पाठवून मला विश केले. पण मी तो मेसेज वाचू शकले नाही. मन आणि तन फक्त त्याचाच शोध घेत होते. अखेरीस व्हॅलेंटाईन डे संपत आला. तशीच दुःखी मनाने अंथरुणात शिरले. काय आश्चर्य तो माझ्या उशी जवळ निवांत पहुडला होता. मी त्याला प्रेमाने जवळ घेतले आणि भराभर त्याचे मुके घेतले. आपल्याकडे कोण पाहतेय, कोण काय म्हणतील कसलेच मला भान उरले नव्हते. दिसत होता फक्त तो आणि तोच..... म्हणजे माझा मोबाईल हो.........
    त्याला बघून मी म्हटले,

    तुम जो मिल गये हो
    तो ये लगता है, के जहाँ मिल गया
    मग मात्र त्याच्याकडून वचन घेतले,
    वादा करले साजना
    तेरे बिना मै ना रहू, मेरे बिना तू ना रहे
    ना होंगे जुदा, ये वादा रहा

    शेवटी व्हॅलेंटाईन डे संपायच्या आधी म्हणजे रात्री बाराला पाच कमी असताना मला माझा मोबाईल मिळाला आणि नवर्याचा मेसेज वाचून त्याला आय लव यू म्हणत मी माझा व्हॅलेंटाईन डे साजरा केला.

    @मंजुषा देशपांडे, पुणे.

      February 16, 2020


  • द्विशतक महोत्सव

    एव्हाना मी दोनशे कार्यक्रमाच्या जवळ पोहोचलो होतो. दोनशेव्या जाहीर पोस्ट केली. मुक्काम कार्यक्रमाची आखणी आम्ही जोरात सुरू एक हजारच्या वाटेवरचा पुढचा मैलाचा दगड जवळ आला होता. या प्रोजेक्टची आखणी करीत असतानाचे भाऊंचे शब्द आठवले. 'या हजार कार्यक्रमांसाठी बराच मोठा कालावधी लागेल. आज तुझ्याबरोबर आहेत ती माणसे कदाचित एवढा काळ असणार नाहीत.' आज दोनशेव्या कार्यक्रमाच्या आखणीच्या वेळीच बरोबर भाऊ नव्हते. इतकेच काय पण प्रियांकाही नव्हती. कारण शर्वरी फारच लहान होती. या कार्यक्रमाच्या आयोजनात माझी काकू दीपा जोशी आणि माझा जवळचा मित्र महेश वर्दे, तसेच माझा चुलतभाऊ नितीन जोशी यांनी अतिशय मोलाचे सहकार्य केले. आमचे स्वर-मंचचे वादक कलाकार मित्र होतेच. महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री श्री. जावेद खान यांना कार्यक्रमाचे अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली. जावेद खान माझ्या गझलचे चाहते होते. त्यांनी आनंदाने या कार्यक्रमासाठी ठाण्याला येण्याचे मान्य केले. अनेक मान्यवर कलाकार आणि विविध पक्षांचे राजकीय नेते कार्यक्रमासाठी येणार होते.

    माननीय मंत्रीमहोदय येणार असल्याने पोलिस बंदोबस्तापासूनच सर्व जय्यत तयारी आम्ही केली. प्रत्येक माणसाप्रमाणेच प्रत्येक कार्यक्रम स्वतःचे नशीब घेऊन येतो. आपण कितीही तयारी आणि प्रयत्न केले तरी कार्यक्रमाच्या दिवशी काय घडणार ही डोर नेहमीच 'उपरवालेके हाथ में' असते, याचा एक वस्तुपाठच या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला मिळाला. ठाणे जिल्ह्याचे शिवसेनाप्रमुख श्री. आनंद दिघे यांनी मला बोलावून घेतले आणि स्पष्टपणे सांगितले की, एका राजकीय वादामुळे गृहनिर्माण मंत्री श्री. जावेद खान यांना आम्ही ठाणे शहरात प्रवेश करू देणार नाही. त्यांनी मला समजावले की त्यांचा विरोध माझ्या कार्यक्रमाला नाही, पण कार्यक्रमाच्या अध्यक्षांना आहे. मी काळजीत पडलो. माझ्या अडचणी वाढतच गेल्या. ९ जानेवारी १९९३ हा कार्यक्रमाचा दिवस उजाडला आणि मुंबईत मोठे बॉम्बस्फोट आणि दंगे सुरू झाले. सर्व प्रकारची वाहतूक बंद झाली. त्यामुळे मंत्री जावेदखान आणि इतर कोणीही कलाकार कार्यक्रमाला येऊ शकत नाही, असा फोन करू लागले. सुदैवाने ठाण्यात काही गडबड नव्हती. वाईटातून चांगले हे घडले की संपूर्ण दिवस या तणावपूर्ण वातावरणामुळे ठाणेकर कंटाळून गेले होते. त्यांना मनोरंजनाची आवश्यकताच होती. त्यामुळे कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांची भरपूर उपस्थिती लाभली. तसेच डॉ. वा.ना. बेडेकर, आमदार वसंतराव डावखरे, महापौर अशोक राऊळ, शिवसेनानेते प्रकाश परांजपे, विनोदी लेखक वि. आ. बुवा, शशिकांत कोनकर इत्यादी मान्यवरांच्या साक्षीने माझा द्विशतक महोत्सवी कार्यक्रम संपन्न झाला. गेले अनेक दिवस आयोजनाची मेहनत आणि तणावपूर्ण वातावरणात गेल्यामुळे आम्ही सगळेच थकून गेलो होतो. त्यामुळे पुढील काही दिवस पूर्ण विश्रांती घेतली.

    त्या सुमारास पुरस्कृत जाहीर कार्यक्रमांचा जमाना सुरू होत होता. काही कंपन्या आपल्या जाहिरातीसाठी किंवा व्यावसायिक फायद्यासाठी काही जाहीर कार्यक्रम करू लागल्या. कलाकारांचे मानधन कंपनी देत असे आणि रसिकांसाठी हे कार्यक्रम विनामूल्य असत. अर्थातच सुरुवातीला प्रथितयश कलाकारांचेच कार्यक्रम या प्रकारात होत असत. दोनशे जाहीर कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर आपणही या क्षेत्रात प्रयत्न करावे असे मला वाटू लागले. माझा आत्तापर्यंतचा अनुभव होता की, आपण शंभर टक्के प्रयत्न केल्यानंतर आपल्याला निश्चित यश मिळते. फक्त ते किती टक्के आणि किती लवकर हे नशिबावर अवलंबून असते. बरेच प्रयत्न केल्यानंतर माझा मित्र महेश वर्दे याच्या मदतीने गॉडफ्रे फिलीप्सच्या अधिकाऱ्यांबरोबर काही मिटींग्ज झाल्या. याच कंपनीच्या श्री. बेंद्रे या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. गॉडफ्रे फिलीप्स आणि सुमन मॉटेल्स यांच्या संयुक्त विद्यमाने होणारे दोन कार्यक्रम मला मिळाले. यातील पहिल्या गझलचा कार्यक्रम सुमन मॉटेल्स, खोपोली येथे सादर केला. दुसरा कायर्यक्रम सुमन मॉटेल्स पाचगणी येथे झाला.

    एव्हाना कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम सुरू केल्यानंतर दोन वर्षे पूर्ण होत आली होती. गेली दोन वर्षे मी फक्त कंपनी चालवली नव्हती, तर तिचे कामही वाढवले होते. लिक्वीड सोपबरोबरच रंगनिर्मितीत मदत करणारी काही रसायने आम्ही बनवायला लागलो. त्यासाठी बरीच मागणी येऊ शकेल, असा माझा अंदाज होता. संपूर्ण भारतभर हिंडून अनेक रंग कंपन्यांपर्यंत मी पोहोचलो. माझा अंदाज खरा ठरला. आमचा व्यापार अनेक पटींनी वाढला. त्यामुळे कंपनीचे कामगार व कर्मचारी वाढले. एकूणच कंपनीचा व्याप वाढला. माझा संपूर्ण दिवस ऑफिसातच जाऊ लागला. मिळणारे वाढीव पैसे मी शेअर मार्केट आणि रिअल इस्टेटमध्ये नियमितपणे इन्व्हेस्ट करत होतो. सगळे छान चालले होते. पण आता कंपनी, गुंतवणूक आणि गाण्याचे कार्यक्रम अशा तीन आघाड्यांवर मला लढावे लागत होते. कामाचा ताण बराच असायचा, पण मी सगळे झेपवत होतो. ते वयच असे असते, की कितीही जबाबदाऱ्या तुम्ही मनाच्या हिंमतीवर पेलवू शकता. या काळात केवळ पाच तासांच्या झोपेवर मी काही वर्षे काम केले. कारण मला पक्के ठाऊक होते, की मुक्काम पोस्ट एक हजार प्रोजेक्टसाठी मला मोकळा वेळ आणि पैसा नंतरच्या काळात हवा आहे. त्याची तजवीज या काही वर्षात होणार होती. एक मात्र झाले की, त्या काळात कार्यक्रमांची संख्या थोडी कमी झाली. पण नंतर होणाऱ्या मोठ्या फायद्यासाठी थोडे फार नुकसान सहन करावे लागतेच. दुसरा महत्त्वाचा भाग असा होता की, १९७८ पासून सुरू झालेली हिंदी-ऊर्दू गझलची लाट आता उतरणीला लागली होती. गझलच्या कार्यक्रमांची संख्या कमी होत होती. मराठी चित्रपटांची संख्या कमी होत होती. त्यामुळे गाणीही कमी रेकॉर्ड होत होती. कारण चित्रपट व्यवसायावर टीव्ही चॅनल्सने आक्रमण सुरू केले होते. त्यामुळे गाणीही कमी रेकॉर्ड होत होती. पण... टीव्ही चॅनल्स फार वाढलेले नव्हते. त्यामुळे तिथेही फार काम नव्हते. मी फक्त व्यावसायिक गायक असतो तर तो काळ थोडा कठीण होता. सुदैवाने माझ्याकडे कंपनी व इन्व्हेस्टमेंटस् असल्यामुळे मला व्यावसायिक काळजी नव्हती. पण कलाकार म्हणून मात्र एक हजार कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी बरेच जास्त कष्ट करावे लागणार होते.

    -अनिरुद्ध जोशी

      July 16, 2022


  • आठवण चाळवणारे अनामिक !

    एक दिवशी एका अनामिक व्यक्तीला  मी बागेत बघितले. एका बाकावर डोळे  मिटून चिंतन करीत, शांत बसलेले होते. मी अतिशय अचंबित झालो. तीच   आकृती तीच चेहऱ्याची ठेवण, तशीच शांत मुद्रा, तशीच बसण्याची पद्धत. अगदी तसेच जसे माझे वडील होते.

      September 3, 2020


  • किती कोण हा मोठा पंडित (सुमंत उवाच – १७)

    सुमंत जयंत परचुरे. 

    मला किती कळतं किंवा मलाच सारं कळतं या भावनेच्या पोटी जर एखाद्या विषयातील व्यक्ती राहू लागला तर हा समाज त्याच्या तोंडावर चांगलं तर पाठीमागे वाईट बोलू लागतो.

      September 8, 2021


  • आमचा नाना आप्पा

    नाना आप्पा म्हणजे एक विलक्षण माणूस. क्षणात इथे तर दुसऱ्या क्षणात दुसरीकडे, एखाद्या पाखरासारखा त्याचा संचार असतो. नारद मुनी जसे स्वर्ग, मृत्यू व पाताळ असे सतत भ्रमण करतात. तसाच हा. जसे नारदाकडे कोणतेही वाहन नाही. तसेच नाना आप्पा कडे ही अद्याप कोणतेही वाहन नाही.

      November 15, 2025


  • खरे सुख

    संत तुलसीदासाच्या काळातच रैदास नावाचे एक संतकवी होऊन गेले. त्यांचे खरे नाव रविदास. मात्र रैदास या नावानेच ते ओळखले जातात.

    संत तुलसीदासांनी 'तुलसीरामायण' लिहिले तर संत रैदासाने अनेक भक्तिगीते लिहिली. ते वाराणसीत गंगेच्या किनाऱ्यावर एका झोपडीत राहत असत. आपल्या झोपडीच्या बाहेर बसून ते वहाणा शिवत असत. त्याच्यातून जेवढे उत्पन्न मिळायचे त्यावरच त्यांची गुजराण व्हायची.

    त्यांची पत्नीही अतिशय समंजस होती. रैदास जेवढे काही मिळवून आणायचे त्यातच ती सुखासमाधानाने संसार चालवित असे. वहाणा शिवताशिवताच रैदास भक्तिगीते करीत असे त्यामुळे हातात काम व ओठात ईश्वराचे नाम असाच त्यांचा दिनक्रम चालत असे.

    एकदा एक साधू वहाणा दुरुस्त करण्याच्या हेतूने संत रैदासाकडे आला. त्याच्या वहाणा दुरुस्त केल्यावर त्याने त्याच्या झोळीतून एक वेगळ्या रंगाचा दगड काढला आणि तो रैदासांना म्हणाला, '' हा परीस आहे. त्याला लोखंड लावल्यास त्याचे सोने होऊ शकते. त्यामुळे हा परीस तुझ्याकडे ठेव म्हणजे तुझे जन्माचे दारिद्र्य मिटेल.''

    साधू एवढेच बोलून थांबला नाही. त्याने तेथलाच एक लोखंडाचा तुकडा घेतला. त्याला परीस लावताच त्याचे सोन्यात रूपांतर झाले. हा सोन्याचा तुकडा साधूने रैदासाला देऊ केला. मात्र रैदासाने तो सोन्याचा तुकडा नाकारला.

    रैदास साधूला म्हणाला, 'मी दिवसभर कष्ट करतो.. त्यातून पोटापाण्यापुरते जे काही मिळते, त्यात मी व माझी पत्नी मुखी व आनंदी. आहे. सोन्याचा हा तुकडा घेऊन मला माझा नेहमीचा आनंद हरवायचा नाही. कारण माझी सुखासमाधानाची व्याख्याच वेगळी आहे. तुला हा परिसाचा तुकडा कोणाला द्यायचाच असेल तर तो जे रात्रंदिवस पैशाच्या मागे लागले आहेत त्यांना दे.'

    असे म्हणून रैदास पुन्हा आपल्या वहाणा शिवण्याच्या कामात मग्न झाले व तो साधू संत रैदासापुढे नतमस्तक होऊन तेथून निघून गेला.

      January 31, 2017


  • काजळ

    एका घरामध्ये एक गोजीरवाणं बाळ जन्माला आले. गोरे, गोरेपान. गोबरे, गोबरे गाल. लालचुटुक जिवणी. पाणीदार डोळे, मानेवर रुळणारे कुरळे जावळ आणि इवले, इवलेसे हातपाय. त्या गुटगुटीत बालकाला पाहून सर्वजण मोहून जायचे. त्याला अंजारायचे, गोंजारायचे.

      July 9, 2010


  • शाळा हेच आमचे समाज माध्यम..

    तेंव्हा शिक्षकाजवळ छडी असायचीच आज जसं मोबाईल असतो तशी.. त्या छडीमुळेच तर व्हायरल व्हायचे आमचे पराक्रम.. त्या छडीचीच फ्रेन्ड रिक्वेस्ट यायची आमच्या पाठीवर.. मग काय.. त्यात वेगवेगळे राग, आलाप, ताना घेऊन सुरु व्हायचे संगीत.. थोडी धूसफूस.. हे आमचं फेसबुक.. बुकात फेस लपवून फुंदत-फुंदत रहायचं कितीतरी वेळ.. थोड्या वेळात सारं विसरलं जायचं… आजही हे आठवलं की हसू आवरता येत नाही. सगळं आमच्या सोशल मिडिया मध्ये लोकप्रिय होतं.. कारण शाळा हेच आमचं समाज माध्यम होतं.. प्रभावी !!!

      May 12, 2021


  • युगांतर – भाग ३

    सुमंत जयंत परचुरे. 

    दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ताईने राहिलेल्या दुधाचा चहा करून घराची आवरा आवर आणि साफ सफाई करायला घेतली. डिसेंबर चा काळ असल्याने थंडी पडली होती. समुद्र जरी जवळ असला, उष्म वातावरण असले तरी थंडीत हवामान त्या उष्म्याला जुमानायचे नाही.

      October 24, 2021