(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • भारतमातेच्या वीरांगना – ५८ – सरला बहन

    १९३२ साली भारतात आल्या. भारतात आल्यावर दोन वर्षे उदयपूर येथे एका शाळेत काम केले. त्यानंतर त्या गांधीजीसमवेत सेवाग्राम येथे आल्या. तिथे त्यांनी ८ वर्ष काम केलं. पण वर्ध्याचे वातावरण त्यांना फार पोषक ठरले नाही, इथल्या उन्हाने त्यांची वारंवार तब्येत बिघडू लागली, मग त्या कसोली, अलमोडा येथे आल्या. कुमाऔ घाटीतल्या महिलांसाठी त्यांनी फार मोठे काम उभे केले. त्याच बरोबर जंगल तोडी विरोधात सुद्धा मोठी मोहीम राबविली. १९४२ च्या चलेजाव आंदोलनात कुमाऔ जिल्ह्या त्यांनी एकत्रित आणला, तिथल्या लोकांमध्ये स्वातंत्र्यज्योत पेटविली. त्यांचे नेतृत्व केले, परिणामी त्यांना दोनदा कारावास भोगावा लागला. त्याचा अवधी एकूण दोन वर्षांचा होता.

  • घर हरवलेला पोलीस

    शासकीय विभागातच नाही तर खाजगी क्षेत्रातसुध्दा काही ठिकाणी कामकाज चोवीस तास चालू असतं. परंतु अशा क्षेत्रात आठ किंवा बारा तासांच्या शिफ्टमध्ये कामकाज चालतं. काही क्षेत्रात तर फक्त दिवसा काम चालतं. रात्री कार्यालयं बंद असतात. अनेक अशी सरकारी कार्यालयं आहेत, ज्या ठिकाणी जनतेशी निगडीत कामकाज चालतं, पण ते फक्त दिवसापुरतं मर्यादित असतं.

  • जादुई नगरीत (माझी लंडनवारी – 15)

    तेजस्वी कोहिनूर आणि मोहक थेम्स ह्यांच्या आठवणीतच प्रसन्न सकाळ उजाडली. फ्रेश होवून निलेशच्या रूम मध्ये आले. उमेशसुद्धा माझ्या फ्लॅटवरून तोपर्यंत आला होता. चहा नाश्ता करताना पुढचं प्लॅनिंग सुरू झालं.

  • चतुर दूरदर्शी राजकारणी कैकयी

    रामायण वाचताना वा ऐकताना, रामाबद्दल आदर, प्रेम भाव निर्माण होतो. त्याच वेळी त्याच्या सावत्र आई कैकयी विषयी अनादर व राग मनांत उत्पन्न होतो. अर्थात ह्या दोन्ही भावनिक बाबी आहेत. हा ज्याचा त्याचा वैयक्तीक समजण्याचा भाग आहे. आपण ह्याच्या विश्लेशनाच्या मागे सतर्कतेने जात नसतो.

  • अमर आभाळा एवढा – अमर शेख नावाचे वादळ

    ‘सुटलाय वादळी वारा’ आणि ‘माझी मैना गावाला राहिली’ या दोन शाहिरी गीतांनी भारावेला कामगार चळवळीचा तो काळ, जीवनातील दु:खे, जीवलगांची ताटातूट आणि पिळवणूकीतील मानहानी या सर्वांना झंजावाताचे रुप देण्याचे कार्य अमर, आणि अण्णा या कामगार  दलित शाहिरांनी केले.

  • हृदय परिवर्तन

    क्षमाशील वृत्तीमुळे वाईटातल्या वाईट माणसाचेही हृदयपरिवर्तन घडू शकते. यासंदर्भात समर्थ रामदास स्वामींची एक कथा खूपच अंतर्मुख करणारी आहे. समर्थ रामदास रोज भिक्षा मागून त्यावर आपला उदरनिर्वाह करीत असत. एकदा ते असेच भिक्षा मागण्यासाठी एका घरात गेले. त्या घरातील एक बाई शेणाने आपले अंगण सारवत होती. घरात काहीतरी कुरबूर झाल्याने ती बाई आधीच चिडली होती. त्यातच समर्थांनी तेथे येऊन भिक्षा मागितली. त्वामुळे ती बाई त्यांच्यावरच भडकली व त्यांना उद्देशून म्हणाली, हे गोसावड्या, भिक्षा मागायला तुला लाज कशी नाही वाटत, असे म्हणत तिने आपल्या हातातील शेणाचे पोतेरे समर्थांच्या अंगावर फेकले. त्यामुळे समर्थांचे अंग खराब झाले. मात्र ते त्या बाईवर मुळीच रागावले नाहीत. उलट ते तिला म्हणाले, माई हीच भिक्षा समजून मी ती आनंदाने स्वीकारेन. असे म्हणून ते पोतेरे घेऊन नदीवर गेले आणि नदीच्या खडकावर ते पोतेरे त्यानी स्वच्छ धुवायला सुरुवात केली. जसजसे ते पोतेरे स्वच्छ होऊ लागले. तसतसे इकडे त्या बाईच्या मनाची घालमेल सुरू झाली. कारण तिला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप होऊ लागला होता. म्हणून ती स्वतःच समर्थांची माफी मागण्यासाठी बाहेर पडली. समर्थांना शोधत शोधत ती नदीवर गेली. तोपर्यंत समर्थांनी ते पोतेरे -स्वच्छ धुऊन वाळत घाललेले होते व वाळल्यानंतर त्यांनी त्या कापडाच्या वाती करायला सुरुवात केली होती. समर्थांना पाहताच त्या बाईने त्यांच्या पायावर डोके ठेवले व आपल्या कृत्याबद्दल माफी मागितली. मात्र समर्थांनी तिला केव्हाच माफ केले होते. ते तिला म्हणाले तुझी 'भिक्षा' खरोखरच मोठी होती, कारण त्याच वातीने श्रीराम व मारुतीरायाची मूर्ती उजळणार आहे. समर्थांचे बोल ऐकून ती बाई धन्य झाली.

  • ती आठवण, ते सूर आणि मी

    क्षणा पुरता घडणाऱ्या गोष्टी आपण सहजतेने विसरून जातो. पण पंचवीस – सव्वीस वर्षानंतर तीच घटना आपल्या समोर येते व आयुष्याला एक नव वळण देते. निराश मनात आशेचा संचार करते. असाच एक अनुभव.

  • निसर्गाची अशी ही खेळी

    क आमेरिकेच्या वैद्यकीय मासिकांत, वैद्यकीय जीवशास्त्र Biomedical Science ह्याच्यावर आधारीत एक अहवाल वजा लेख वाचण्यांत आला. लेख मनोरंजक परंतु खुप माहीतीपर होता.

  • उसवलेले जोडे

    हिंदी कलाकारांची उदाहरणं देण्याचा उद्देश असा की, सर्वसामान्य माणसाला असं वाटतं.. यांच्याकडे पैसा, प्रसिद्धी, मालमत्ता सर्व काही आहे. यांना कशाची कमतरता? प्रत्यक्षात तसं नसतं. ही माणसं त्यांच्या खऱ्या जीवनात दुःखी, कष्टीच असतात. जणूकाही ‘उसवलेले जोडे’….

  • हिंदीची ऐशीतैशी

    ….मी पुढील संभाषण ऐकण्याच टाळल कारण बाईंच हिंदी ऐकुन “मै खुद बहुत बावचळ गया था.”