नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
बनगरवाडी’ वाचल्यानंतर मला यावर चित्रपट व्हायलाच हवा, असं मनापासून वाटत होतं. व्ही. शांताराम यांनी या कादंबरीवर चित्रपट करण्याचे ठरविले होते, मात्र प्रत्यक्षात घडले नाही. अमोल पालेकर यांनी मात्र माझं हे स्वप्नं प्रत्यक्षात उतरवलं.. चित्रपट निर्मिती अप्रतिम झाली. चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचे अनेक पुरस्कार मिळाले.

त्यांनी कार सिग्नलवर थांबवली आणि ते सिग्नल हिरवा होण्याची वाट पाहू लागले. एका मागे एक गाड्या यंत्रवत उभ्या रहात गेल्या. नेहमीच हो काही क्षणांची प्रतीक्षा सतीश कुमार यांच्यासाठी विचित्र प्रकारची असते. अश्याच कुठेतरी बसलेल्या व्यक्तीशीच याची तुलना होऊ शकते. अशा व्यक्तीच्या मनात न कुठले विचार असतात… न समोर बघण्यासारखे एखादे दृश्य असते. ती व्यक्ती अचल, स्थिर असते. आपल्यातच मग्न असते. जगात काय घडते आहे याची त्या व्यक्तीला कल्पनाच नसते. जे काही घडते आहे त्याच्याशी तिला काही घेणे देणे नसते. सिग्नलवर देखील लाल, हिरवा दिवा बघण्याशिवाय त्या व्यक्तीच्या मनात इतर कोणताही विचार नसतो. कोणतीही कविता, कोणतेही गीत नसते. फक्त इतकेच लक्ष असते की, दिवा हिरवा होईल तेंव्हा एक्सीलेटर वरचा पाय दाबून कारला गती द्यायची आहे.
नऊ वाजले होते आणि सतीश कुमार यांना भूक लागली होती. ते घाईने घरी पोहोचण्यासाठी बेचैन होते. पण शहरातील ही गर्दी पंधरा मिनिटाचा रस्ता एक तासाचा करते.
विजापूर दारी चाकरी करणारे मोरे बंधु शिवाजीच्या कर्तृत्वाने चिडले होते. आपल्यापेक्षा लहान असलेल्या एका मुलाने आम्हास नोकरी द्यावी, हा त्यांचा अपमान होता आणि म्हणूनच त्यांनी शिवाजीला पकडून आणण्याचे आदेश दिले होते.
“काल “ची असा शब्द वापरण्याऐवजी या शब्दसमूहात “पूर्वाश्रमीची” असा शब्द वापरलाय, बहुधा “महत्वाची” असावीत म्हणून ! महत्व लोप पावल्याने/ निरुपयोगी असल्याने हळूहळू गृहीत धरली जाणारी, काळाच्या ओघात विसरली जाणारी, एका कोपऱ्यात ढकलली गेलेली माणसे यांच्या संदर्भात नुकतेच काही वाचनात आले.
सकाळचा गोंधळ संपल्यावर मी सुटकेचा निश्वास टाकला. मला सोमवारी कळणार होते की, मी कुठे जाणार होते, तरीही आता एक दिलासा होता की जर का आपल्याला कम्फर्टेबल वाटले नाही तर आपल्याला कोणीही जबरदस्ती दुसरीकडे शिफ्ट करणार नाही.

नेहमीप्रमाणे समुद्रावर गेलो, संध्याकाळची वेळ होती सूर्य डुबत होता…. माझ्या दृष्टीने वातवरण सुन्न होते….
ऑल इंडिया रेडिओसाठी माझी रेकॉर्डिंग सुरू होतीच. २२ डिसेंबर २००२ रोजी रेडिओसाठी माझे २००वे गाणे रेकॉर्ड झाले. माझ्या गाण्याच्या करिअरच्या सुरवातीपासून रेडिओ माझ्या पाठिशी उभा राहिला. या २०० गाण्यांनी मला प्रचंड आत्मविश्वास दिला. माननीय प्रभाकर पंडित, यशवंत देव, भूमानंद बोगन या रेडिओच्या संगीतकारांचे ऋण मी कधीही विसरू शकणार नाही.
ठाण्याच्या सरस्वती मराठी हायस्कूलच्या सुवर्णजयंतीननिमित्त आयोजित गाण्याच्या कार्यक्रमामध्ये मी सुरेश बापट आणि मुकुंद मराठे यांच्याबरोबर गायलो.
२००३ च्या कार्यक्रमांची सुरुवात ११ जानेवारी रोजी झाली. 'गोल्डन स्वान कन्ट्री क्लब'साठी मी गझलचा कार्यक्रम सादर केला. २००३ सालचा हा पहिला कार्यक्रम होता पण माझा हा ६००वा जाहीर कार्यक्रम होता. एक पुढचा मोठा मैलाचा दगड मी पार केला होता. पण अजून बरीच वाटचाल करायची होती. ही वाटचाल आधीपेक्षा सोपी वाटत होती. कारण गायनाच्या क्षेत्रात थोडे नाव झाल्यामुळे कार्यक्रम समोरून येत होते. कार्यक्रम मिळवण्यासाठीचे कष्ट आता कमी झाले होते.
आर.सी.एफ. आयोजित नाट्यसंगीत आणि गझल यांची मैफल मी प्रल्हाद अडफळकर यांच्याबरोबर गायलो. युनायटेड जैन या संस्थेसाठी संदीप कर्नावट यांनी माझा कार्यक्रम क्रूझवर आयोजित केला. पाण्यावर तरंगत गाण्याची माझी पहिलीच वेळ होती. माझी मुलगी शर्वरी माझ्याकडे गाणे शिकत होतीच. या कार्यक्रमात तीही माझ्याबरोबर गायली. माझ्यापेक्षा शर्वरीने हा कार्यक्रम एन्जॉय केला. आता कार्यक्रमांची भौगोलिक कक्षा रुंदावली होती. दिल्ली, कलकत्ता, इंदौर अशा अनेक ठिकाणी प्रवास होत होता. सुप्रसिद्ध विको लॅबोरेटरीजच्या सुवर्ण जयंतीनिमित्त गोव्याच्या सिदादे दे गोवा या पंचतारांकित हॉटेलमध्ये गोव्याचे मुख्यमंत्री श्री. मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत मी गाणे सादर केले. ख्यातनाम गझलकार सुरेश भट यांना आदरांजली वाहणारा गझलचा कार्यक्रम संगीतकार अनिल मोहिले यांच्या समवेत ठाणे येथे आणि गोरेगाव पत्रकार संघासाठी मी गायलो. मुंबईच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख उपस्थित होते. ते सुरेश भटांचे जवळचे मित्र आणि गझलचे चाहते असल्याने सुरेश भटांच्या अनेक गझल त्यांनी तोंडपाठ पेश केल्या. मित्रावर आणि गझलवर प्रेम करणारी एक व्यक्ती म्हणून विलासरावांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळा पैलू पहायला मिळाला.
‘शेजारी-शेजारी' चित्रपटाचे माझे आवडते संगीतकार विश्वासजी पाटणकर यांनी 'रामगाथा' हा रामायणावरील संपूर्ण नवीन गीतांचा कार्यक्रम बसवला. ही गीते अरविंद आगाशे यांची होती. या कार्यक्रमात माझ्याबरोबर दाढे-जोशी, श्रुतकिर्ती मराठे-बने, राजेश पंड्या हे गायक कलाकार होते. या मृदुला कार्यक्रमाचे प्रयोग आम्ही मुंबई, पुणे, नागपूर अशा अनेक ठिकाणी केले.
-अनिरुद्ध जोशी
आर्थिक अडचणी वाढू लागल्या की नातेसंबंध बिघडू लागतात, ते सावरायचे कसे याचा विचार करताना स्वतःची प्रकृती ढासळू लागते.संकट येऊ लागली की एकाच वेळी अनेक बाजूनी येतात आणि अनेकांचे सल्ले मानून मी मारुतीला दर मंगळवारी लवंगांचा हार आणि शनिवारी शनिमंदिरात बाटलीभर तेल घालू लागतो.
पहाणाऱ्या साठी मी एक सुखी माणूस आहे . वयाच्या पासष्टीत हि उत्तम प्रकृती . सुंदर पत्नी ,हो अजूनही म्हणजे वयाच्या साठीत सुद्धा जान्हवीने स्वतःस सुरेख मेनटेन केलाय . मुलगी आणि जावाई दोघे डॉक्टर , ग्रीन कार्ड मिळालेले न्यू जर्सीत वेल सेटल्ड . मुलगा - सून बेन्ग्लोरला , आयटी क्षेत्रात . आम्ही दोघे पुण्यात . राहायला छोटेसेच असले ,तरी सर्व सोयीनीयुक्त घर . दोन वेळेच्या वरण भाता साठी पेन्शन मिळतीय . चार पैसे बाळगून आहे . दृष्ट लागण्या सारखा संसार आहे माझा ! माझ्या सारख्या ' सुखी ' माणसाचा 'सदरा'घेण्यासाठी मोठी वेटिंग लिस्ट लागेल . पण मी 'तो' कोणालाच देणार नाही !
का ? तुम्ही विचारलं .
आजवर याचे उत्तर मी कोणालाच दिलेले नाही . पण आज मात्र मी तुम्हाला सागणार आहे ! फक्त एकाच विनंती आहे , हे गुपित फक्त तुमच्या पुरतेच ठेवा , इतरांशी शेयर करू नका .
000
पाहता क्षणी जान्हवी मला आवडली . किंचित सावळी , नजरेत भरणारी उंची , सडपातळ बांधा ,रेखीव चेहरा ,( थोडासा गंभीर) , मधेच मंद स्मित करण्याची सवय , आणि त्या वेळेस पडणारी गालावरची खळी ! या पेक्षा अप्सरा वेगळी असते का हो ? मी त्याच बैठकीत होकार देवून टाकला . मुलगी पहाण्यासाठी घेतलेली सी. एल . प्रीव्हीलेज लिव मध्ये वाढवून घेतली . पंधरा दिवसात आमचे लग्न झालेही !
मझ्या लग्नाच्या नवलाईचे नऊ दिवस थोड म्हणजे तब्बल पाच वर्ष लांबले ! तोवर स्वाती आणि शेखर अंगणात खेळत होते . हळू हळू मला जान्हवी समजू लागली . ती घरात खूप कमी बोलायची . घरची सगळी काम करायची . आईच्या औषध पाण्याचा वेळा , मुलाचं खाण - पीण ,माझा डब्बा . सगळ व्यवस्तीत वेळच्या वेळी !
"जान्हवी , काय झाल ?तू खूप अबोल असतेस . " मी एकदा तिला विचारल .
"काही नाही . मला बोलणच कमी आहे !"
" मोकळ बोलत जा ना. लग्न झाल्या पासून पहातोय ,तू कधी काही मागितल नाहीस . कशाचा हट्ट हि केला नाहीस. मी जे आणीन ते नबोलता ठेवून घेतेस . अजून तुझी आवड -निवड पण मला कळू शकली नाही . "
"मला सगळ मिळतय .मग हट्ट का करू ?"
असतो एखाद्याचा स्वभाव समाधानी . आणि अश्या स्वभावाची बायको मिळायला शेकडो जन्माची पुण्याई लागते ! माझ्या मनातल्या तिच्या बद्दलच्या प्रेमाला आदराची प्रभावळ लाभली .
000
एक दिवस मी ऑफिस मधून येताना मला वेडावणारा गंध नाकात शिरला . मोगऱ्याच्या फुलाचा वास ! जीव टाकतो याच्या साठी मी ! पांढऱ्या शुभ्र ,ताजा टवटवीत , मोगऱ्याच्या फुलांचे गजरे त्या फुलवाल्याच्या दुरडीत ऐटीत बसले होते . गजरा मळलेली जान्हवी डोळ्या समोर तरळून गेली . आजवर कसे लक्षात आले नाही कोणास ठावूक ? जान्हवीच्या नाजूक चेहऱ्याला हा गजरा काय शोभून दिसेल ! आता रोज जानू साठी गजरा घेणार ! मी गजरा घेवून घरी आलो .
"जान्हवी ,गजरा पाहताच तुझी आठवण झाली . मुद्दाम तुझ्या साठी आणलाय . "मी जान्हवीला गजरा देत म्हणालो . तिने होकारार्थी डोके हलवून गजरा एक शब्द हि न बोलता घेवून गेली . मला तिचा अबोल स्वभाव पुन्हा खटकला .
चार दोन दिवसांनी माझ्या लक्षात आले कि जान्हवी मी आणलेला गजरा घालत नाही.
"जान्हवी , मी तुझ्या साठी मुद्दाम गजरा आणतो . पण तू घालत नाहीस . का ?"
"घालते कि !"
"मला कधी दिसल नाही. "
"---"ती पुन्हा गप्प बसली .
"आजवरच जावू दे . आज घाल . "
"हो.जेवण झाल्यावर घालते . "तिने मी दिलेली वेणी माठा वरच्या ओल्या झाकणीत ठेवली . आणि कामात गुंतली .
"जानू ,आग वेणी ?"
रात्री मी पुन्हा विचारले.
"आता कंटाळा आलाय. सकाळी घालीन. "
सकाळी घाईत ऑफिसला जाताना माझे लक्ष माठा कडे गेले. मलूल झालेला तो गजरा माठा खालच्या बादलीत तरंगत होता.
संध्याकाळी पुन्हा मी वेणी आणलीच . घरात जाताना अंगणातल्या तुळशी वृदावनात पडलेले कालच्या गजऱ्याचे कलेवर पडलेले दिसले !
"जानू ,हे काय ?तुला गजरा छान दिसतो . घालत जा ना. माझ्या साठी तरी!"
"खरे सांगू . मला मोगऱ्याचा वास नाही आवडत !आणि मोगराच काय मला कुठलीच फुल नाही आवडत . नका आणत जावू माझ्या साठी काही !"
बापरे ! किती तोडून टाकणार बोलली आज . तारुण्यात बायकांना फुलांचा तिटकारा असू शकतो ? असेल हि . नसेल तिला फुलांची आवड . मी तरी का एव्हडा 'गजरा घाल' म्हणन हट्ट करावा ? हि बळजबरी बरी नाही. माझी आवड तिच्यावर का लादावी? तिच्या दृष्टीने मी विचारच केला नव्हता . मला बराच वेळ अपराधी वाटत राहील . मग मी तिच्या साठी वेणी /गजरा आणणे बंद केले . आणि झाला प्रकार विसरूनही गेलो .
एक दिवस मिटिंग कॅनसल झाली म्हणून लवकर घरी आलो. घराला कुलूप होते. बायको माहेरी गेल्याचे शेजारच्या काकुनी सांगितले . माहेर गावातच असल्याने ती आधन - मधन माहेरी जावून येते . ऑफिस सुटण्याचा सुमासार ती परतली. मस्त लाईट मूड मध्ये होती. काही तरी गाण गुणगुणत होती. आणि मोकळ्या केसात नाजूक जाईची वेणी ! मला पहातच एकदम गप्प झाली. चेहऱ्यावर गंभीर मुखवटा आला.
"काय ,आज माहेर ?काही विशेष ?"
"हो ,आईने बोलावल होत . "
"तुला फुल आवडत नाही ना ?मग आज वेणी कशी ?"मी नको तो प्रश्न विचारल्याची झाली.
"घालते कधी कधी ! माझ्या मूडवर असत ! "तुटक उत्तर देत घरात निघून गेली! काही तरी चुकतय याची मनाला जाणीव झाली.
000
त्या दिवशी दिनकरकाका रस्त्यात भेटले. त्यांच्याच मध्यस्तीने आमचे लग्न जुळले होते.
"का हो काका , जान्हवी लहानपणा पासूनच अशी अबोल आहे का हो ?"
बोलता बोलता मी सहज विचारले.
" कोण ? बबडी ! छे रे तिला खूप बोलायला आवडत !तोडात तीळ भिजत नाही तिच्या!पण तू का विचारतोयस ?"
"काही नाही . लग्न झाल्यापासून खूप अबोल असते . "
"अरे ,नव्या संसाराच्या जवाबदारीने थोडी बावरली असेल. तू नको काळजी करूस. पोर खूप गोड आहे. लग्नाला पण 'नको' म्हणत होती, मीच तिची समजूत घालून तयार केली होती !"
मग मात्र मन सर्व गोष्टींची उकल करू लागल .गजराच काय मी आणलेल्या साड्या ,ड्रेस पण ती घालत नव्हती !तिने मला विरोध कधीच केला नाही ,पण सहकार्य पण केले नाही !' नव्या संसाराच्या जवाबदारीने थोडी बावरली असेल.'म्हणे ! हे बावरेपण पाच वर्षा नंतर हि टिकू शकत ? म्हणजे हे लग्न जान्हवीच्या मना विरुद्ध झालेलं होत! तिच्या तुटक बोलण्या -वागण्याचा अर्थ आता लागत होता! तिच्या पद्धतीने तो केलेला आणि आज तगायत चालू ठेवलेला , लग्नाचा निषेध होता!
प्रेम म्हणजे व्यभिचार आणि प्रेमविवाह म्हणजे सामाजिक गुन्हा! हा अलिखित नियम असणारा तो काळ होता . एक वेळ जगाशी दोन हात करता येतात ,पण आपल्याच आप्तांशी , जन्मदात्यांशी नाही सगळ्यानाच नाही झगडता येत! अश्या इमोशनल अत्त्याचाराचे बळी घरोघर असत. वडिलधाऱ्या मंडळीच्या संमतीनेच लग्न ठरत. पाच - सात मिनिटाच्या 'कांदा-पोह्या 'ने जन्माचा गाठी करकचून बांधल्या जायच्या. त्यातहि मुलीना खूप कमी स्वातंत्र्य असायचे. काही विरोधी सूर लावला कि ' सहवासान प्रेम होत निर्माण ! आमचे नाही का झाले संसार सुखाचे !' हा ठोकळेबाज सल्ला तयार असायचा.
मला या सर्व परस्ठीतीची पूर्ण कल्पना आहे . मी जान्हवीची बाजू समजू शकतो . हा घे 'नवरा ' अन कर प्रेम. अस नाही करता येत प्रेम ! सहवासाने आदर , आपुलकी ,वाटेलही पण प्रेमाची उस्पुर्ततता नाही येत. जान्हवी एक आदर्श गृहिणी आहे, आई आहे, सून सगळ आहे !आणि हो , काल पर्यंत ती आदर्श बायको पण होती !पण --पण आता मला तिचा छुपा विरोध जाणवतोय !
आजवर जे झाल ते झाल. या नंतर मीही खूप संयमाने वागतोय. तिच्यावर माझ्या आवडी - निवडी लादण्याच टाळतोय . पूर्वी सारख हक्काच अस काही राहिलेलं नाही. जगाच्या दृष्टीने ती एक आदर्श गृहिणी/पत्नी आहे . मी हि एक आदर्श पती आहे . सहवास , संगत ,सोबत ,सामंजस्य आहे पण ------
आज आमच्या लग्नाला चाळीस वर्ष झाली आहेत. गेल्या चाळीस वर्षात ती एकदाही ' LOVE U ' नाही म्हणाली .किवा त्या अर्थाची जाणीव पण होवू दिली नाही ! मी अजूनही वाट पहातोय ! मावळतीला आलेली एक आशाअजूनहि आहे. केव्हा तरी तिला माझ्या बद्दल प्रेम वाटेल .
000
आता सांगा ज्या माणसाच्या बायकोचे त्याचावर प्रेम नाही, आणि हे त्याला पक्के माहित आहे अश्या माणसाचा ' सदरा ' तुम्ही घ्याल का ? आणि जरी तुम्ही घेतला तरी तो मी तुम्हास कसा देईन ? न भरून येणाऱ्या जखमा साठी मी कारणीभूत का ठरू?माझे ते संस्कार नाहीत !
-- सु र कुलकर्णी
आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . Bye.
जमीनदाराने त्याची हीही मागणी मान्य केली. कारण शंकर त्याला ‘शेरास सव्वाशेर’ भेटला होता.
Copyright © 2025 | Marathisrushti