(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • अपण्णक जातक

    वाराणशीचे राज्य. राजाचे नाव ब्रह्मदत्त. या राज्यातल्या एका व्यापाऱ्याच्या
    कुळात बोधिसत्त्वाचा जन्म झाला. बोधिसत्त्व मोठा झाला. देशोदेशी हिंडून
    व्यापार करू लागला.

  • प्लॅन्ड सीझर

    मे महिन्यात घराचे बांधकाम सुरु झाले होते तशातच डिसेंबर महिन्यात आम्हाला दुसरे बाळ होणार आहे समजल्यावर आनंद झाला. किमया ताईने ह्यावेळी आपण कोणतीही रिस्क न घेता प्लॅन्ड सीझर करू त्यासाठी तिने तिच्या हॉस्पिटलला येणाऱ्या डॉ. रेखा थोटे यांच्याकडे कन्सल्ट करायला सांगितले, त्यांनी पण मागील डिलिव्हरीचे सगळे रिपोर्ट आणि हिस्टरी पाहिली आणि सीझरच करायचा निर्णय घेतला.

  • नवरात्र .. माळ सातवी

    उत्तर कर्नाटकामधल्या एका लहानशा खेडेगावात आपल्या आजी आजोबांबरोवर रहाणारी ती दहा बारा वर्षाची छोटी परकरी पोर ….

    तिचे आजोबा निवृत्त शाळा शिक्षक .. घरी पुस्तकंच पुस्तकं आणि आजोबां प्रचंड व्यासंगी !मग काय … रोज रात्री जेवण झाल्यावर अंगणात बसून आकाशातल्या लुकलुकणाऱ्या ताऱ्यांच्या साथीनं ती आजोबांकडून गोष्टी ऐकत असे . कधी रामायण ,महाभारत , इसापनिती कथासरितसागर , पंचतंत्र तर कधी अरेबियन नाईट्स … कधी परदेशात घडलेल्या काही प्रसंगांच आजोबा गोष्टीत रुपांतर करून तिला सांगत …

    कधी तिला गावातल्या छोटया वाचनालयात घेऊन जात आणि मग ती काळ वेळेचं भान विसरून तिथे पुस्तकात रमून जाई …

  • विस्मयो आनंदवनभुवनी

    अयोध्या नगरीचा अवघा आसमंत रंगीत दीप आणि दीपमालांनी प्रकाशमान झाला होता. आकाशातील द्वितीयेचा चंद्र आज जरा जास्तच तेजस्वी जाणवत होता. शरयूच्या तीरावरून येणाऱ्या सुखद गारव्यामुळं वातावरण प्रसन्न वाटत होतं. सर्वत्र उभारलेल्या राहुट्यातून , मंदिरांच्या प्रांगणातून , शरयू नदीच्या किनाऱ्यावरून केवळ आणि केवळ राम धून ऐकू येत होती.

  • सूर्याला प्रदक्षिणा

    मराठी भाषेचं सौष्ठव अधोरेखित करण्याचं काम करणारी आणि मला कायम स्तिमित करणारी चार व्यक्तिमत्वं म्हणजे ज्ञानोबा माउली, समर्थ रामदास, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि श्री. दा. पानवलकर ! या मंडळींच्या लेखणीतून व्यक्त होणारी मराठी काही औरच ! तुम्ही -आम्ही बोलतो ती मराठी त्यांच्या भाषेपेक्षा वेगळीच वाटते.

  • आमचा नाना आप्पा

    नाना आप्पा म्हणजे एक विलक्षण माणूस. क्षणात इथे तर दुसऱ्या क्षणात दुसरीकडे, एखाद्या पाखरासारखा त्याचा संचार असतो. नारद मुनी जसे स्वर्ग, मृत्यू व पाताळ असे सतत भ्रमण करतात. तसाच हा. जसे नारदाकडे कोणतेही वाहन नाही. तसेच नाना आप्पा कडे ही अद्याप कोणतेही वाहन नाही.

  • निर्णय

    रस्त्यावरच्या हातगाडीवरील केळीवाल्याकडे मी केळी घेत होतो. त्याला पैशांची मोड देत असताना, त्याचे लक्ष्य नाही, हे बघून एका ९-१० वर्षाच्या मुलाने, त्याच्या गाडीवरील दोन केळी उचलून घेतली. मुलगा लपून जाऊ लागला.

    "बघ त्या मुलाने तुझी केळी घेतली व तो चालला." सामाजिक जाणिवेने एकदंम प्रेरीत होऊन, मी ते त्या केळीवाल्याच्या निदर्शनास आणून दिले. केळीवाला धावत गेला. त्याने त्या मुलास पकडून एक शिवी हसडली. व केळी हिसकाऊन परत आला. "फार हरामखोर असतात हो ही मुले." पुटपुटत माझे आभार मानले.

    मी केळी घेऊन निघालो. मनाला एक समाधान होत असल्याची जाणीव होत होती. एक तर त्या मुलास पकडवून शिक्षा देवविली. अप्रत्यक्षपणे चोरी करणे वाईट, ही जाणीव करुन दिली. शिवाय केळीवाल्याचे होऊ घातलेले नुकसान पण टाळले.

    थोड्याश्या अंतरावर गेल्यावर, तोच मुलगा ऊभा असलेला मला दिसला. माझ्या समोर येऊन मला म्हणाला "आजोबा काय मिळवलत मला पकडवून देवून. मी सकाळपासून ऊपाशी होतो. दुसऱ्या गावाहून येथे आलो. मजजवळ पैसे नव्हते. नाईलाज म्हणून मी हे केले." त्याच्या डोळ्यांत सत्याची चमक होती. परिस्थितीची जाण होती. अपराधित्वाची भावना होती. परंतु भुकेपुढे तो हतबल झालेला होता. क्षणार्धांत माझे डोळे पाणावले. मी चटकन तीन केळी काढून त्याच्या हाती दिली.

    अशांत, तरीही एका वेगळ्याच समाधानांत मी निघालो. दोन्हीही वेळचे माझे निर्णय मला समाधान देऊ बघत होते. मनाची चलबिचल वेग धरु लागली. माझा निर्णय सामाजिक चौकटीवर आधारलेला होता. जो की मानव निर्मित होता. परंतु त्याच वेळेला निसर्गाला कांही वेगळच अपेक्षित होत.

    एक जगप्रसिद्ध निसर्ग शास्त्रज्ञ डार्विन म्हणतो

    " निसर्ग सदा सुचवित असतो. अस्तित्वासाठी आणि जगण्यासाठी झगडणे गरजेचे "

    " Theory of Darwin says Struggle for Existance & Survival of fittest"

    बरेच दिवस मी माझ्या या निर्णयावर बैचेन होतो.

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • पहाटे येणारी नर्स

    बाय पास सर्जरी झालेली, छातीत लागलेय टाक्यांमुळे वेदना या होत्याच त्यात भर म्हणून साठी दोन्ही पायातून नसा काढल्या मुळे, पायांना ही टाके लागलेले. संपूर्ण शरीलाला मुंग्या चावल्या वर जश्या वेदना होतात, तश्या वेदना. अश्या परिस्थितीत रात्री झोपेच्या गोळ्या घेऊन ही झोप येणे शक्य नाही. सकाळची वाट पाहण्या शिवाय गत्यंतर काय?

  • वास्तुविशेषांक

    आप्पा महाशब्दे यांच्या बोटांना लाभलेले वरदान केवळ बोर्डाच्या अक्षरांपाशीच घोटाळत राहिले नाही. तर कलाक्षेत्राशी निगडित असलेल्या विविध अंगांनी ते बहरून आले. विविध संस्थांच्या अनेकविध कार्यक्रमांसाठी गौरवचिन्हे, स्मृतिचिन्हे यामधील त्यांचे कौशल्य वाखाणण्याजोगे. आतापर्यंत अशी हजारो स्मृतिचिन्हे त्यांच्या हातून बनली आहेत. याशिवाय बॅनर्स, बॅचेस, साइन बोर्ड्स, मानपत्रे अशा कितीतरी बाबीत आप्पांची मुशाफिरी वैशिष्ट्यपूर्ण आहे.

  • उगाच काहीतरी – १७

    सोयीसाठी लावलेली वस्तू नेहमी उपयोगीच राहील असं नाही आणि बायको हा जीव फोन वर बोलताना नवऱ्याचा आवाज कमी आणि बॅकग्राऊंड चा आवाज जास्त ऐकत असतो. त्यामुळे वेळ काळ आणि परिसर बघून थाप मारावी.