नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
पहिल्यांदा जहाजावर गेल्यावर एन आर आय स्टेटस म्हणजे नेमकं काय असतं याचा उलगडा झाला कारण जहाजावर जाण्यापूर्वी एन आर आय, एन आर आय हे फक्त ऐकून होतो.
August 2, 2021
तिसर्या पहारची येळ व्हती. अजून शिरू झोपडीकडं आला नवता.त्याची कारभारीन ईमली भाकर आन कोरड्यासं घेऊन केधोळची आलती .
February 4, 2026
महाराष्ट्राला वारकरी सांप्रदाय ही खूप मोठी अध्यात्मिक देणगी लाभलेली आहे.त्यातील वारी हा अविभाज्य भाग. दर आषाढ- कार्तिक महिन्यात असंख्य दिंड्या निघतात. पताका खांद्यावर घेऊन , टाळ आणि मृदंगाच्या गजरात ह्या दिंड्या पंढरीकडे आगेकुच करतात. हरिनामाचा घोष होतो. उत्साही वातावरण असते. मजूर, शेतकरी, व्यावसायिक सर्वच स्तरातील माणसं वारीत सहभागी होतात.आनंदाचे डोही, आनंद तरंग ची अनुभुति घेत.मुलांसाठी हा औत्सुक्याचा विषय. आमच्या लहानपणी अनेक दिंड्या, पालखी आमच्या गाव परिसरातून जायच्या.पैठणचे शांतीब्रम्ह संत एकनाथांची पालखी पंढरपूरला जाते. ती गावापासून दोन कि.मी. अंतरावरून. पोरांना दुपारी शाळेला सुट्टी असायची. मायबापाच्या मागं टुमणं लावायचं. चारदोन रूपये मिळावयाचे. तेही 'लेकरू देवाच्या पाया पडाया जातय' म्हणत द्यायचे. बरेच अंतरावर नाथांची पालखी थांबलेली असे.फूगेवाले, स्टेशनरीवाले , शिट्टी विकणारे मुलांना आकर्षित करत असत. रंगीबेरंगी फूगे पाहिले की मग कोणता घ्यायचा यावर खल व्हायचा.काही आत्राब पोर्ह लहान लेकरांचे फूगेवाले फोडण्यासाठी टपलेली. फूगा वार्यानं लांब गेला अथवा फुटला त् पोर्ह मोठ्यानं भोकाड पसरायचे. मोठ्यानं , भेसूर आवाज काढणारे भोंगे विकायला यायचे. तो घेऊन कुणाच्यातरी जवळ जाऊन गपकन् वाजवायच. ते दचकायच्. मग आनंद.मोकळा हशा. लहान थोर सगळे च या उत्साहात सहभागी होत.कपाळी बुक्का लावत.उभा गंध लावणारेही भेटत. त्यांच्याकडून गंध लावून घेण्याचं नवखेपण होतं. नेमकी एकादशीच्या दिवशी ही पालखी बंडावर यायची. भाविक मग भूईमुगाच्या शेंगा आलेल्या वारकर्यांना वाटायचे. पोर्ह लटकेच वारकरी बनून समोर शेंगा घेण्यासाठी हात पसरायचे.' आम्हाला द्या.आम्हाला द्या.' म्हणायचे. ओरडायचे.गर्दी झाली की वाटणारे शेंगा उधळून द्यायचे. मग वेचायला मजा यायची. नांगरची रानं तुडवायची.पण शेंगा वेचायच्याच. गावचं भजनीमंडळ पालखीला वाटं लावायचं. सोबत मुस्लिम बांधवांचा बँड असायचा. एकता आणि सहिष्णूता ओतप्रोत भरलेली. पालखी मुक्कामी गावाच्या दिशेने प्रस्थान करी. मनाला हुरहूर लागे.
दिंड्या परत कधी येतात. याची वाट पहायची. भगवानगडाची दिंडी पंढरीवरून परत येताना गावातून जायची. दिंडीचं स्वागत खूप आदराने होई. भिमसिंह महाराजांचे दर्शन घेणे. पादुकांचे दर्शन. गावात दवंडी व्हायची. प्रत्येक घरच्या दहा भाकरी दहा रूपये आणि दाळ. गावात मग ढक्कू ( अनेक दाळींची एकत्र फोडणीची भाजी) बनवला जाई.त्याची चव पंचतारांकितमध्ये सुद्धा मिळणार नाही अशी.तुळशीच्या माळा. पिपाण्या, खुळखूळे, पिना,ट्रक अशा खेळण्यात मुलं रमत.हट्ट करीत. मोबाईलच्या दुनियेत तो अध्यात्मिक सहवास असलेला आनंद काही औरच.
© विठ्ठल जाधव
शिरूरकासार ( बीड)
सकाळ मध्ये प्रकाशित लेख
July 12, 2017
शांत, संथ लयीत चालणारं आपलं जीवन आपणच घाई गर्दीत हरवून टाकतोय असं नाही का वाटत. काय फरक पडतो थोडसं सिग्नलवर थांबलं तर.. काय फरक पडतो एसटीत चढतांना थोडा संयम बाळगला तर. काय फरक पडतो.. रांगेत उभे असताना थोडी शिस्त बाळगली तर… पटतं सगळं.. पण वळत नाही.. काय करणार…!
October 23, 2019
भोग आणि लालसा मनुष्याला कुठे घेऊन जाईल- अतृप्त मनुज – का चालला आहे विनाशाचा मार्ग वरमार्गावर – ययातिच्या मनातिल द्वंद्व
January 1, 2011
दिनूची ठिगळ लावलेली चड्डी आणि विरलेला शर्ट असला तरी त्याची भेगाळलेली पाटी स्वच्छ असायची. खिशात पेन्सिलचा एक इंचाचा एकच तुकडा.
April 6, 2023
साधे -सुधे पोस्त कार्ड , आंतरदेशीय-पत्र आणि पाकिटे ” यातून एकमेकांना ख्याली-खुशाली “कळवली जात असे. घरातील वडीलधार्या व्यक्तींनी पत्रातील मजकूर वाचून सगळं खुशाल आहे बरं का ! असे भरल्या आवाजात सांगितले की ..भरलेले डोळे पदराने कोरडे करून मोठ्या समाधानाने ..घरातली बाई-माणसं पुन्हा कामाला लागत .
January 16, 2019
अशा मालिकेतला २०१९ चा एक चित्रपट अचानक नेटफ्लिक्स वर दिसला- The Sky is pink ! आयेशा चौधरीच्या सत्यकथेवर आधारीत हा चित्रपट आवडून गेला. नांव असं का ठेवलंय, खूप वेळ संदर्भ लागला नाही. मग ट्यूब पेटली- आजकालच्या परिभाषेत प्रसूतिगृहात बाळ जन्माला आले की मुलगा असेल तर ब्लू आणि कन्यारत्न झाले असेल तर पिंक असं म्हणायची पद्धत आहे.
January 15, 2022

जगाच्या पाठीवर मंचकरावांसाठी सर्वात कठीण काम म्हणजे ‘विचार करणे ‘ हेच होते , आणि वारंवार ते त्यांना करावे लागत असे . आत्ता हि ते आपल्या झुपकेदार मिशीचे डावे टोक चिमटीत धरून विचारमग्न झाले होते . चिंतेचे कारण होते कि ‘ भीमा काकीस अर्जेंट कसे बोलावून घावे ?’ असे काय कारण होते कि भीमा काकीस पाचारण करण्याची वेळ अली होती ?
May 1, 2018
पेशानं डॉक्टर असूनही सरळ साधे जीवन जगणारा आणि गोर-गरीबांविषयी, समाज रचनेंत तळाशी असलेल्या बहुजनांविषयी आंतरिक तळमळ असणार्या व्यक्ती आजकालच्या व्यवहारी जमान्यांत विरळच ! समाजाची बांधिलकी, समाजाचे रक्षण अशा बोजड शब्दांचा जरासाही आधार न घेतां जनसामान्यांची निरागस सेवा करणारा आणि त्यांच्या भल्यासाठी - हातचे न राखता - सतत झिजणारा “साधा माणूस” !! दीनांचा कैवारी - दीनबंधू दिनकर !!!
डॉ. दिनकर लक्ष्मण बडकस मुळचे नागपुरचे. काका प्रथितयश न्यायाधीश. नावाजलेले न्यायमूर्ती बडकस महाराष्ट्र शासनाचा “बडकस आयोग” त्यानींच साकारला. असे जरी असले तरी दिनकरांच्या घरची स्थिती विपरीत. पितृछत्र लहानपणीच विरले. पाच मुलांचा सांभाळ त्यांच्या मातेकडून धड होण्याजोगी परिस्थिती नव्हती. अंगावरची सदरा-चडडी आणि पाठीवर दुसरी जोडी, दुसर्या दिवसासाठी! अशा अवस्तथेत, नशीब आजमावण्यासाठी मुंबई गाठली. मुंबईत जसे परप्रांतीय येतात तशी. योगायोगाने त्यांचे एक नातेवाईक डॉ. बांडखे हे मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत होते. त्या तत्वशील माणसांन या ------------ दिनूला नगरपालिकेच्या दवाखान्यांत कंपाऊंडरच्या जागेवर ठेऊन घेतले.
हाती आलेल्या संधीचं सोनं करण्याची किमया दिनूच्या अंगी होती. कुणाशीही जमवुन घेण, जमेल त्याला तशी मदत करण्याचा त्यांचा मनमिळाऊ स्वभाव तसेंच अविरत अथक कष्ट उपसण्याची तयारी या अंगभूत गुणांमुळे हा हा म्हणता मोठा लोकसंग्रह केला - अगदी लहानांपासून ते थोरांपर्यंत. गंमत अशी की लग्नासाठी त्यांना मुलगी देण्यास त्यांच्या व्यवसायामुळे कधी कधी अडचणी आल्या पण ------- जोशी सरांची सुकन्या सुशिला त्यांच्या मागे सुशील म्हणून छायेप्रमाणे उभी राहिली आणि ती “छाया” आजपर्यंत त्यांच्यामागे खंबीरपणे उभी ठाकली आहे. तोच त्यांचा मानसिक आधार.
पंधरा वर्षांच्या सेवेनंतर R.M.P CERTIFICATE / DEGREE मिळवली. नगर पालिकेच्या सेवेंत राहुन १९६२ पासून स्वतंत्र व्यवसायास सुरुवात केली. व्यवसाय क्षेत्र होते : कापुरबावडी-बाळकुम. दिनकर दिवसभर महानगरपालिकेच्या कर्मचार्यांची /वरिष्ठांची मनापासून सेवा करी. संध्याकाळी घाटकोपर ते बाळकुम तिथं ७ ते ११ पर्यंत ग्रामस्थांची सेवा. सुमारे ३० वर्षांहून अधिक काळ लोटला, पण सेवेत कधी खंड पडला नाही. निवृत्ती नंतरही वयाच्या अमृतमयी वर्षापर्यंत उत्साह दुथडी भरुन वाहत होता.
कुणाकडे पैसे कधी मागितले नाहीत, असलेत तर द्या नाहीतर नंतर बघू ! या त्यांच्या उदार स्वभावांन त्यांनी बाळकुम-कापुबावडी आपलेसे केले. रात्री-अपरात्री स्वत: जाऊन जातीनं विचारपूस करावी. औषध आणि धीर द्यावा. प्रसंगी स्वत:कडे असलेली औषधे द्यावीत, कसलीही अपेक्षा न ठेवता. कुठलीही बांधिलकी नसतांना बहुजन समाज मनाला प्रेमाच्या धाग्यानं बांधून ठेवण्याची किमया एकटा दिनूच करु जाणे. निरागस सेवा म्हणतात ती हीच! मानवतेची पूजा बांधणार्यांचीच ही किमया !! पेशंट हाच परमेश्वर!!!
अज्ञा फिकिरी वृत्तीवर सारेचजण डॉ. दिनकरांवर फिदा. जयांच्याकडे पैसे नव्हते, त्या घरांतून डॉक्टरांच्या घरी पापड, कुरडया, शेवया, गहू, तांदूळ, आणि नाही नाही ते पदार्थ शेतमाल येऊन पडत असे, दिनुच्या ते गांवी हे नसे ! बाळकुम-कापुरबावडी मधल्या कोणत्याही छोट्या वा मोठ्या व्यक्तीच्या घरी समारंभास दिनू दादांना हमखास आमंत्रण, अन् ते ही अगदी हळदीपासून !! चिकन बनवणे हा त्यांचा छंद केंटुकी चिकन इतकेच सरस पण झणझणीत. ते बनवून इतरांना आग्रहाने खाऊ घालताना दिनू दादा जास्त प्रसन्न दिसतात. कापुरबावडीच्या अमिनाबाईचे पुसपुशीत चिकन महिन्यांतून ती ते चार वेळा त्यांच्या घरी असायचे.
गोतावळा, गणगोत विस्तारलेले त्यामुळे वरचेवर लग्न-मुंजी आधि समारंभ होत असत. दिनकर दादांची हजेरी अनिवार्य, नव्हे पाहिजेच ! पाहिजेच ! पण दादा येतीलच याची खात्री नसे. पेशंटचे बोलावणे त्यांना लग्नकार्यापेक्षा जास्त मोलाचे होते. दादा मनानं हळवे लोकसेवा हीच त्यांना समारंभाचा आनंद देऊन जाई. आपले मात्र तसे नसते, म्हणूनच सर्वार्थानं ते आमचे “दादा” आहेत!
नाशहिकची एक आठवण : लग्नकार्यात मग्न असतांना त्यांना कुणाचातरी निरोप मिळाला. कुणीतरी नात्यांतलं आजारी आहे, हे त्यांना कळले मात्र त्यांनी न जेवतां कार्य सोडून मुंबईस प्रयाण केले. असे प्रसंग, या सेवाभावी माणसाच्या आयुष्यांत वरचेवर येत असत. ते खर्या अर्थानं “अर्थपूर्ण” जीवन जगत होते, जगत आहेत. कुणीतरी आप्त स्वकीय, परिचित आजारी म्हटला की, दादा सर्व प्रथम तेथे हजर! पैशाची, मानधनाची, मानाची अपेक्षा मुळीच नाही. निखळ साधेपणा, हीच साधना नि ईश्वर सेवा !!
अतीव साधेपणानं आणि आपुलकीच्या वागण्यानं दादांनी प्रत्येक शाखेतले उत्तमोत्तम डॉक्टर्स स्ने-- जोडून ठेवले. डॉ. मुळेकर, डॉ. व्हि.बी. आठवले, डॉ. व्यास, डॉ. वर्तक आणि अनेकानेक, यादी खूप मोठी. ही सारी त्यांच्या घरची माणसं. मला एक प्रसंग आठवतो. एकदा ते स्वत: आजारी होते. घाटकोपरच्या हिंदुमहासभा रुग्णालयात त्यांना ठेवले होते. त्यांना भेटण्यासाठी मी सप्तनिक गेलो. दादा त्यांच्या बेडवर नव्हते. इकडे तिकडे चौकशी केली. दादा वेगळ्या वार्डात. दादा दुसर्या एका पेशंटला तपासतांना आढळले! जरा बरे वाटल्यावर इतरांच्या प्रकृतीची चौकशी. असे व्यक्तिमत्व विरळच. धन्य ते दिनकर .
स्वत:च्या मधुमेहाला सुमारे पन्नास वर्षे ते सांभाळून आहेत, सवत:ची प्रकृती सांभाळून, इतरांना हळूवारपणे सक्रीय आधार देणारा, प्रसंगी स्वत:च्या प्रकृतीची तमा न बाळगणारा दानशूर कर्ण दिनकरा सारखा विराळाच! नुकतीच वयाची अठ्ठ्यातरी ओलांडली. स्वत:पेक्षा इतरेजनांची काळजी वाहणार्या या दिनू दादांची दैदिप्यमान कारकीर्द शतायुषी व्हावी हीच या क्षणी गुरुमाऊली चरनी विनम्र विनवणी, हीच एक प्रार्थना !!
०७-१०-२००९
मुलुंड (पूर्व)
शब्दांकन : सुरेश नाईक, मुंबई ४०००८१
February 25, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti