(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ऐका हो ऐका’

    ऐका हो ऐका’ कामाच्या निमित्ताने आम्ही ग्राहक पेठेत पाठक सरांना वारंवार भेटत होतो किंवा कधी काही काम निघालं की, माणूस पाठवून ते आम्हाला बोलावून घ्यायचे. केबिनमध्ये गेल्यावर पहिल्यांदा पाणी आणि नंतर चहा हा ठरलेलाच असे.

  • युगमानव

    “तुमची मानव जमात अगदी भांडखोर, क्षुद्र आणि कोत्या मनोवृत्तीची आहे. हेवा, दावा, स्वार्थ मत्सर शी. हे सगळे वाईट गुण आम्हाला आमच्या ग्रहावर नको होते. या गुणांची लागण आमच्यातल्या काही कमकुवत देवांनाही झाली. ते कोपिष्ट होऊ लागले. ज्याला त्याला शाप देऊ लागले. शेवटी आम्ही सर्वांनी ठरवलं की तुम्हा मानवांचा सहवासच टाळला पाहिजे. म्हणून एकूण एक मानवप्राणी शोधून काढला आणि पृथ्वीवर पाठवून दिला. बसा भांडत. आम्ही तुमच्यावर नजर ठेवून होतो. किती तन्हांनी भांडता येतं. किती तन्हांनी मानवा मानवात भेद पाडता येतात आणि लोकांना आणि स्वतःलाही कष्टी करता येतं हे तुमच्यावरून आमच्या लक्षात येत होतं. तुमचा अर्ध्यापेक्षा जास्त वेळ आणि शक्ती नुसती भांडणात आणि दुसऱ्यांचं वाईट करण्यात जाते

  • मोजमाप नाही ज्याचे (सुमंत उवाच – ४९)

    सुमंत जयंत परचुरे. 

    जे दिसत नाही त्याला काबूत कसे आणणार? जे हातात येऊ शकत नाही त्याला पकडून कसे ठेवणार?

  • आठवणी गावाकडच्या..।

    ग्रामीण भागामध्ये दिवाळी हा सण अतिशय महत्त्वाचा असा आहे. वर्षातील बारा महिन्यांपैकी हा महत्वपूर्ण दिवाळी सण या सणाला गोड गोड खाण्याची मज्जा व खारट चिवडा. प्रत्येकाच्या जिभेला चव देणारा हा चिवडा कायम आठवणीत राहणारा असा आहे. शहरातील दिवाळीपेक्षा ग्रामीण भागातील दिवाळी अतिशय मजेशीर अशी असते. ग्रामीण भागातील नवीन लग्न झालेल्या मुली नागपंचमी गवर गणपती व दिवाळी या सणावर खास करून माहेरी येत असतात. नवीन लग्न झालेल्या मुली यांचा विषय अतिशय रंगेल असा असतो. कार्तिक महिन्यातील दिवाळी दिवाळ काढून गेली तरी आठवण मात्र कायम प्रत्येकाच्या स्मरणात राहते हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

  • योद्धा (कथा)

    अजित हा एकदम हुशार मुलगा ! एकपाठी असला तरी फक्त  घोकमपट्टी न करणारा ! सतत नवे प्रश्न विचारून शिक्षकांना सतावणारा.शाळेच्या वेळेत अभ्यासपूर्ण करून इतर वेळात वर्तमानपत्रे, मिळतील ती पुस्तके वाचणारा. रोज न चुकता प्रादेशिक व राष्ट्रीय बातम्या रेडिओवर ऐकणारा.कसलीही सभा असली तरी तिथे जाऊन वक्त्यांची व्याख्यानं ऐकणारा.

  • अडजस्टमेंट

    इंग्रजी बोलता येत नाही शाळेत आणि कॉलेज मधील ऍव्हरेज मार्क्स आणि डिग्रीला मिळालेला एक वर्षाचा ड्रॉप आणि आठही सेमिस्टरना लागलेल्या केट्या यामुळे जिथं काम करावं लागेल तिथं अडजस्टमेंट करावीच लागणार होती.

  • मुलाखत

    ही गोष्ट आहे २० वर्षांपूर्वीची. त्यावेळी मी पुण्यातल्या ख्यातनाम वृत्तपत्रात वृत्तसंपादक म्हणून काम करीत होतो. पत्रकारितेमध्ये सातत्यानं नवे पत्रकार यायला हवेत, नवे उमेदवार तयार व्हायला हवेत ही स्वाभाविक बाब होती. पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरही तो तरुण वा तरुणी थेट काम करण्यास पात्र होतेच असंही नाही. म्हणून आम्ही पत्रकारांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवायचं ठरविलं होतं. त्याच्या जाहिराती केल्या होत्या. शेकडो अर्जातून अपेक्षित उमेदवारांची छाननी केली होती. आता वेळ होती मुलाखतींची. मुलाखतीसाठी आम्ही किमान तिघे किवा चौघे असत. एकानं पत्रकारिता, आवड, निवड यावर प्रश्न फेकायचे, एकानं सामान्यज्ञान पाहायचं, एकानं उमेदवाराची कौटुंबिक पार्श्वभूमी, व्यसन वगैरेंचा वेध घ्यायचा. मुलाखत देणार्‍याला नेहमीच मुलाखत घेण्याविषयी आदर, भीती, असूया वाटत असते; पण हे काम अवघड. कारण अवघ्या १५-२० मिनिटांच्या चर्चेतून आपल्याला हवा तसा उमेदवार शोधून काढणं सोपं नसतं. वारंवार जाहिराती आणि मुलाखती हेही परवडणारं नसतं. तर अशा या मुलाखती सुरू झाल्या. एम.एस्सी. झालेल्या एका मुलीला मी विचारलं, ‘ग्रीन हाऊस इफेक्टस म्हणजे काय?’ तिला उत्तर नाही देता आलं. ती परतली तेव्हा माझ्या सहकार्‍यानं विचारलं ‘तुला तरी माहीत आहे का? किमान मला तरी नाही.’ मुलाखतीत एक बरं असतं. मुलाखत घेणार्‍याला कोणी प्रश्न विचारात नाही. मला मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर माहीत होतं; पण तो विषय तिथंच राहिला. कारण पुढचा उमेदवार आत आला होता. त्याची फाईल चाळली. तो बी. ई. झालेला होता. त्याला नोकरीही होती. सध्याचा पगार म्हणून त्यानं चार हजाराची रक्कम लिहिलेली होती. अपेक्षित वेतन मात्र संस्थेच्या नियमाप्रमाणे असा उल्लेख होता. उमेदवाराबद्दल रस वाटावा, अशी ही केस होती. आम्ही चौघेही सर
    ावलो आणि एका पाठोपाठ एकप्रश्नांची सरबत्ती सुरू केली. आमचा एकही प्रश्न परत येत नव्हता. सगळ्या प्रश्नांची उत्तरं धडाधड

    मिळत होती. अशा स्थितीत आणखी अवघड प्रश्न विचारले जातात. तसे सुरू झाले. एखादेवेळी त्यानं प्रश्नाचा नेमकेपणा समजावून घेण्यासाठी प्रतिप्रश्न केला असेल इतकंच. त्याची उत्तरं चोख होती. त्याला थोडा वेळ बाहेर थांबायला सांगितलं. आमची सल्लामसलत झाली. या उमेदवाराला संधी द्यावी असं ठरलं; पण माझा एक सहकारी म्हणाला, ‘घ्या तुम्ही; पण तो टिकणार नाही. इंजिनिअर आहे तो. चार हजार पगार मिळतोय. आपण काय देणार? १५००, फार तर दोन हजार.’ या प्रतिक्रियेनंतरही त्याला बोलावलं. तो आला. आता प्रश्न सुरू झाले होते. ते वेगळ्याच वळणावरचे होते. इंजिनिअरिंग आवडत नव्हतं, तर तो अभ्यासक्रम केलाच का? आता नोकरी असूनही ती का सोडणार? पगार कमी होईल त्याचं काय? एकापाठोपाठ प्रश्न आले. तो म्हणाला, ‘तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देतो. एकत्रच येतील ती.’ तो बोलू लागला. ‘मी सातारा जिल्ह्यातला, वडील पोस्टात नोकरीला; सचोटीनं काम करायचं हे त्यांचं जीवनसूत्र. पैसा साठवावा अशी स्थितीही नव्हती आणि वृत्तीही. मुलांनी शिकावं, चांगलं शिकावं हीच काय ती आमची पुंजी, असं ते म्हणत. मी एसएससी झाल्यावर ते मला म्हणाले, ‘तू इंजिनिअर व्हावं अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी हवा तो खर्च मी करीन. तू हुषार आहेस. तुला ते जमेल.’ मला इंजिनिअर व्हायचं नव्हतं; पण वडिलांची इच्छा मोडणंही शक्य नव्हतं. त्यांनी कसे दिवस काढले हे अनुभवत होतो. त्यांच्या इच्छेला मान दिला. अभ्यास सुरू केला. बुद्धीनं साथ दिली आणि शिष्यवृत्तीही मिळत गेली. फारसा खर्च न होताच मी इंजिनिअर झालो. आता नोकरीचा आग्रह. तीही मिळाली; पण हे आपलं ध्येय नव्हे याची जाणीव होती. वाचन, अभ्यास सुरू होता. चार महिन्यांपूर्वी वडील वारले. आई आधीच गेलेली होती. आता
    मी वडिलांच्या शब्दातून मुक्त होतो. याचकाळात तुमची जाहिरात आली. पत्रकारिता म्हणजे काय असते याची माहिती नानासाहेब परुळेकरांच्या चरित्रातून मिळालेली होती. वाटलं, आपला मार्ग सापडला. आज मी इथं आहे. तुम्ही निवड केलीत तर प्रशिक्षण घेईन. पगार, मानधन महत्त्वाचं नाही. कारण माझा पगार माझ्या गुणवत्तेवर, कौशल्यावर ठरला होता. इथं मी प्रशिक्षणार्थी आहे. माझ्यात गुणवत्ता असेल, तर मी टिकेन.’

    मुलाखत संपली. त्याची निवड झाली होती. त्यावेळच्या उमेदवारात सर्वाधिक स्टायपेन्ड त्याला देण्यात आला होता. प्रशिक्षणाच्या काळात तो चमकत होता. तो पत्रकार बनला होता. त्याची रीतसर नेमणूक झाली. सातारा भागात काम करू लागला तो; पण तेवढ्या विश्वात त्याचे मन रमत नव्हतं. नोकरी सोडून त्यानं मुंबई गाठली. मुंबईच्या मोठ्या वृत्तपत्रात तो आजही यशस्वी पत्रकार म्हणून काम करतोय.
    माझा मुलगा पराग. त्याला मी आग्रह करीत होतो; संगणकात बी. टेक. कर. काय हवं ते मी देतो. आज तो डिजिटल डिझायनर, अॅनिमेटर आहे. इंजिनिअर नाही. तो केवळ माझ्या शब्दाखातर इंजिनिअर झाला नाही, याचा मला अभिमान आहे.

    -- किशोर कुलकर्णी

  • साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १५)

    माझा मुद्रण व प्रकाशनाचा व्यवसाय असल्यामुळे त्या निमित्त सर्व महाराष्ट्रभर सतत भ्रमंती असे. कामे संपल्यावर ज्या ज्या ठिकाणी जी जी माहिती असणारी प्रेक्षणीय ठिकाणे मंदिरे असत ती ती मी वेळ असेल त्याप्रमाणे प्रवासात जरूर पहात असे. प्रत्येक प्रवासात मी किमान एक पुस्तक किंवा एक छान गाण्याची कैसेट घेत असे कोडैक कंपनीचा छान कैमेरा होता फोटोही काढत असे. असे माझे छंद होते.

  • पाखरे बघ गेली कोटरी

    गाई वळल्या घरी
    पाखरे बघ गेली कोटरी ।। धृ. ।।

    'दिवेलागणी देवाघरची
    झाली गगनांतरी
    पाखरे बघ गेली कोटरी ।॥॥९॥।

    उड्या मारिता धावत जाता.
    हरणे आली घरी,
    पाखरे बघ गेली कोटरी ।॥२॥।

    चंचु चंचु हे एक मिळाले
    निजली वृक्षावरी,
    पाखरे बघ गेली कोटरी ।३।।

    रजनी आली रिझवायाला
    ही चंद्राच्या घरी.
    पाखरे बघ गेली कोटरी ।॥४॥।

    शांत शांत ही अंगाईची
    अंगुलि फिरते शिरी,
    पाखरे बघ गेली कोटरी ।५॥।

    चिऊमाउच्या गोष्टी कथिता
    बाळे निजली घरी,
    पाखरे बघ गेली कोटरी ।६॥।

  • हत्ती आणि ससा

    खूप खूप वर्षे झाली. एका रानात एक हत्ती रहात होता. त्याचा एक मित्र होता. तो होता ससा. एके दिवशी हत्ती सशाला म्हणाला,‘आपण एक जमिनीचा तुकडा विकत घेऊया आणि त्या जमिनीत आपण एक सुंदर बाग तयार करुया.’