नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
ऐका हो ऐका’ कामाच्या निमित्ताने आम्ही ग्राहक पेठेत पाठक सरांना वारंवार भेटत होतो किंवा कधी काही काम निघालं की, माणूस पाठवून ते आम्हाला बोलावून घ्यायचे. केबिनमध्ये गेल्यावर पहिल्यांदा पाणी आणि नंतर चहा हा ठरलेलाच असे.

“तुमची मानव जमात अगदी भांडखोर, क्षुद्र आणि कोत्या मनोवृत्तीची आहे. हेवा, दावा, स्वार्थ मत्सर शी. हे सगळे वाईट गुण आम्हाला आमच्या ग्रहावर नको होते. या गुणांची लागण आमच्यातल्या काही कमकुवत देवांनाही झाली. ते कोपिष्ट होऊ लागले. ज्याला त्याला शाप देऊ लागले. शेवटी आम्ही सर्वांनी ठरवलं की तुम्हा मानवांचा सहवासच टाळला पाहिजे. म्हणून एकूण एक मानवप्राणी शोधून काढला आणि पृथ्वीवर पाठवून दिला. बसा भांडत. आम्ही तुमच्यावर नजर ठेवून होतो. किती तन्हांनी भांडता येतं. किती तन्हांनी मानवा मानवात भेद पाडता येतात आणि लोकांना आणि स्वतःलाही कष्टी करता येतं हे तुमच्यावरून आमच्या लक्षात येत होतं. तुमचा अर्ध्यापेक्षा जास्त वेळ आणि शक्ती नुसती भांडणात आणि दुसऱ्यांचं वाईट करण्यात जाते
जे दिसत नाही त्याला काबूत कसे आणणार? जे हातात येऊ शकत नाही त्याला पकडून कसे ठेवणार?
ग्रामीण भागामध्ये दिवाळी हा सण अतिशय महत्त्वाचा असा आहे. वर्षातील बारा महिन्यांपैकी हा महत्वपूर्ण दिवाळी सण या सणाला गोड गोड खाण्याची मज्जा व खारट चिवडा. प्रत्येकाच्या जिभेला चव देणारा हा चिवडा कायम आठवणीत राहणारा असा आहे. शहरातील दिवाळीपेक्षा ग्रामीण भागातील दिवाळी अतिशय मजेशीर अशी असते. ग्रामीण भागातील नवीन लग्न झालेल्या मुली नागपंचमी गवर गणपती व दिवाळी या सणावर खास करून माहेरी येत असतात. नवीन लग्न झालेल्या मुली यांचा विषय अतिशय रंगेल असा असतो. कार्तिक महिन्यातील दिवाळी दिवाळ काढून गेली तरी आठवण मात्र कायम प्रत्येकाच्या स्मरणात राहते हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
अजित हा एकदम हुशार मुलगा ! एकपाठी असला तरी फक्त घोकमपट्टी न करणारा ! सतत नवे प्रश्न विचारून शिक्षकांना सतावणारा.शाळेच्या वेळेत अभ्यासपूर्ण करून इतर वेळात वर्तमानपत्रे, मिळतील ती पुस्तके वाचणारा. रोज न चुकता प्रादेशिक व राष्ट्रीय बातम्या रेडिओवर ऐकणारा.कसलीही सभा असली तरी तिथे जाऊन वक्त्यांची व्याख्यानं ऐकणारा.
इंग्रजी बोलता येत नाही शाळेत आणि कॉलेज मधील ऍव्हरेज मार्क्स आणि डिग्रीला मिळालेला एक वर्षाचा ड्रॉप आणि आठही सेमिस्टरना लागलेल्या केट्या यामुळे जिथं काम करावं लागेल तिथं अडजस्टमेंट करावीच लागणार होती.
मिळत होती. अशा स्थितीत आणखी अवघड प्रश्न विचारले जातात. तसे सुरू झाले. एखादेवेळी त्यानं प्रश्नाचा नेमकेपणा समजावून घेण्यासाठी प्रतिप्रश्न केला असेल इतकंच. त्याची उत्तरं चोख होती. त्याला थोडा वेळ बाहेर थांबायला सांगितलं. आमची सल्लामसलत झाली. या उमेदवाराला संधी द्यावी असं ठरलं; पण माझा एक सहकारी म्हणाला, ‘घ्या तुम्ही; पण तो टिकणार नाही. इंजिनिअर आहे तो. चार हजार पगार मिळतोय. आपण काय देणार? १५००, फार तर दोन हजार.’ या प्रतिक्रियेनंतरही त्याला बोलावलं. तो आला. आता प्रश्न सुरू झाले होते. ते वेगळ्याच वळणावरचे होते. इंजिनिअरिंग आवडत नव्हतं, तर तो अभ्यासक्रम केलाच का? आता नोकरी असूनही ती का सोडणार? पगार कमी होईल त्याचं काय? एकापाठोपाठ प्रश्न आले. तो म्हणाला, ‘तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देतो. एकत्रच येतील ती.’ तो बोलू लागला. ‘मी सातारा जिल्ह्यातला, वडील पोस्टात नोकरीला; सचोटीनं काम करायचं हे त्यांचं जीवनसूत्र. पैसा साठवावा अशी स्थितीही नव्हती आणि वृत्तीही. मुलांनी शिकावं, चांगलं शिकावं हीच काय ती आमची पुंजी, असं ते म्हणत. मी एसएससी झाल्यावर ते मला म्हणाले, ‘तू इंजिनिअर व्हावं अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी हवा तो खर्च मी करीन. तू हुषार आहेस. तुला ते जमेल.’ मला इंजिनिअर व्हायचं नव्हतं; पण वडिलांची इच्छा मोडणंही शक्य नव्हतं. त्यांनी कसे दिवस काढले हे अनुभवत होतो. त्यांच्या इच्छेला मान दिला. अभ्यास सुरू केला. बुद्धीनं साथ दिली आणि शिष्यवृत्तीही मिळत गेली. फारसा खर्च न होताच मी इंजिनिअर झालो. आता नोकरीचा आग्रह. तीही मिळाली; पण हे आपलं ध्येय नव्हे याची जाणीव होती. वाचन, अभ्यास सुरू होता. चार महिन्यांपूर्वी वडील वारले. आई आधीच गेलेली होती. आता
मी वडिलांच्या शब्दातून मुक्त होतो. याचकाळात तुमची जाहिरात आली. पत्रकारिता म्हणजे काय असते याची माहिती नानासाहेब परुळेकरांच्या चरित्रातून मिळालेली होती. वाटलं, आपला मार्ग सापडला. आज मी इथं आहे. तुम्ही निवड केलीत तर प्रशिक्षण घेईन. पगार, मानधन महत्त्वाचं नाही. कारण माझा पगार माझ्या गुणवत्तेवर, कौशल्यावर ठरला होता. इथं मी प्रशिक्षणार्थी आहे. माझ्यात गुणवत्ता असेल, तर मी टिकेन.’
-- किशोर कुलकर्णी

माझा मुद्रण व प्रकाशनाचा व्यवसाय असल्यामुळे त्या निमित्त सर्व महाराष्ट्रभर सतत भ्रमंती असे. कामे संपल्यावर ज्या ज्या ठिकाणी जी जी माहिती असणारी प्रेक्षणीय ठिकाणे मंदिरे असत ती ती मी वेळ असेल त्याप्रमाणे प्रवासात जरूर पहात असे. प्रत्येक प्रवासात मी किमान एक पुस्तक किंवा एक छान गाण्याची कैसेट घेत असे कोडैक कंपनीचा छान कैमेरा होता फोटोही काढत असे. असे माझे छंद होते.
गाई वळल्या घरी
पाखरे बघ गेली कोटरी ।। धृ. ।।
'दिवेलागणी देवाघरची
झाली गगनांतरी
पाखरे बघ गेली कोटरी ।॥॥९॥।
उड्या मारिता धावत जाता.
हरणे आली घरी,
पाखरे बघ गेली कोटरी ।॥२॥।
चंचु चंचु हे एक मिळाले
निजली वृक्षावरी,
पाखरे बघ गेली कोटरी ।३।।
रजनी आली रिझवायाला
ही चंद्राच्या घरी.
पाखरे बघ गेली कोटरी ।॥४॥।
शांत शांत ही अंगाईची
अंगुलि फिरते शिरी,
पाखरे बघ गेली कोटरी ।५॥।
चिऊमाउच्या गोष्टी कथिता
बाळे निजली घरी,
पाखरे बघ गेली कोटरी ।६॥।
खूप खूप वर्षे झाली. एका रानात एक हत्ती रहात होता. त्याचा एक मित्र होता. तो होता ससा. एके दिवशी हत्ती सशाला म्हणाला,‘आपण एक जमिनीचा तुकडा विकत घेऊया आणि त्या जमिनीत आपण एक सुंदर बाग तयार करुया.’
Copyright © 2025 | Marathisrushti