नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
सिद्धहस्त, अभिजात लेखक, प्रतिभावान, संशोधक, इतिहासकार, उदार, मतवादी आणि द्रष्टा संपादक म्हणून सर्व परिचित, ‘महाराष्ट्र टाईम्स’ चे भूतपूर्व प्रसिद्ध संपादक श्री. गोविंदराव तळवळकर. तळवळकरांच्या विचारधनावर महाराष्ट्रातील तीन पिढ्यांचे पोषण झाले आहे. असं ‘मराठी वाङ्मय कोशात’ म्हटलं आहे आणि म्हणूनच टिळकयुगानंतर ‘ तळवळकर युग’ हे पत्रकारितेत महत्वाचे समजले जाते.
महाराष्ट्राची मायबोली मराठी असली, तरी प्रत्येक जिल्ह्यागणिक ती बदलत जाते. जसे भाषेचे आहे, तसेच खाण्याचे. काही मैलांनी खाद्यसंस्कृतीतही थोडा बदल जालेला दिसतो. माई देशपांडे यांनी या पुस्तकात मराठवाड्याचा खाद्यखजिना मोकळा केला आहे.
९८ च्या मार्चमधील चौदा तारखेला आम्हाला ‘दादा गेले’ असा फोन आला. दादा गेले हे मानायला मन तयार नव्हतं. दादांच्या सहवासात राहून अजून खूप काम करायचं बाकी होतं. त्यांना नवीन चित्रपट निर्मिती करायची होती. सगळंच अर्धवट सोडून दादा निघून गेले.
मग येते गंगोत्री! येथील मुख्य आकर्षण म्हणजे ‘गंगेचे मंदिर.’ गंगेच्या मूळ मंदिराचा जिर्णोद्धार अमरसिंह थापा या नेपाळच्या गुरखा जनरलने केला. मात्र सध्याचे गंगेचे मंदिर जयपूर राजघराण्याने बांधले.
आज तो माझ्या समोर स्टेशनवर असताना उभा राहिला, कुठे निघालास मी विचारले तेव्हा त्याच्याबरोबरचा भाऊ त्याला म्हणाला ह्याला मुंबई दाखवतो.
घरी आई व पत्नी डोळ्यांत प्राण आणून माझीच वाट पाहात होत्या. मी त्यांच्यासह गाडीने प्रसृतीगृह गाठले. तिथले प्रवेशाचे सोपस्कार पार पडले. खाली येऊन गाडीवाल्याचे आभार मानले व किती पैसे द्यायचे अशी विचारणा केली; पण तो भला मनुष्य होता. तो म्हणाला, ``मी माझ्या बहिणीला दवाखान्यात दाखल केलं असं समजतो. तेव्हा त्याचे कसले पैसे? उलट काही गरज भासली, तर मला
केव्हाही हाक मारा.'' माझ्या स्वतवर विश्वासच
बसला नाही. सध्याच्या काळात माणुसकीचा गहिवर असणारी अशीही माणसे असतात. बोलण्याच्या ओघात त्याने मला सांगितले, की त्याचे नाव शेट्टी असून, चेकनाक्यावर त्याचे हॉटेल आहे. ते बंद करून घरी जात असताना माझी भेट झाली. तो म्हणाला, ``करायचं असेल तर एकच करा. जेव्हा तुमची पत्नी बाळंत होईल, तेव्हा मला हॉटेलमध्ये येऊन पेढे द्या.'' दुसर्याच दिवशी, म्हणजे 25 नोव्हेंबर 1990 ला मला सकाळी आठ वाजता कन्यारत्न झाले. मी लगेच त्याला मिठाई नेऊन दिली.
-- किशोर कुलकर्णी
संतुकराव आणि जसवंत बोलत असताना मनोहर गेट बाहेर पडला. त्याने फोन काढला आणि रुद्राचा नम्बर लावला. “म्हातारा आऊट हाऊस मध्ये आहे!”एकच वाक्य बोलून त्याने फोन कट केला! रूद्रा तयारीतच होता. तो ‘नक्षत्र’च्या रोखाने निघाला!
ल्युसर्नला लायन मॉन्युमेंट पाह्यला आणि त्याच भागात बुखरर आणि कासाग्रँडे या भव्य दालनांमधे मनमुराद (विंडो) शॉपिंग केले. काहींनी स्विसमेक घड्याळ आणि देण्याघेण्यातली सॉव्हेनीर्सही घेतली. या नंतर ल्युसर्नची बोट राईड, वाईन, स्विस फोक म्युझिक आणि डिनर असा दीड तासाचा मौज मस्तीचा कार्यक्रम पार पडला. धमाल आली. #वीणा वल्ड# च संघटन कौशल्य या कार्यक्रमात दिसुन आल. सर्व अबालवृध्द मनमोकळेपणे नाचले, बागडले.
भर दुपारची येळ व्हती.वर आभाळातुन सुर्य आग वकत व्हता.उन्हाळ्याचे दिवस आसल्यानं सगळा परिसर भकास दिसत व्हता.रस्त्यानं चिट पाखरूबी नवतं.आश्यात शिवराम मसनजोगी,त्याची बायको शेवंती,पोरगी सारजी आन पोरगं पिर्या बाभळगावच्या दिशेनं निंघाले होते.
पुस्तके माणसाला सातत्याने काही ना काही देतच असतात. पुस्तके बोलत नसली तरी माणसाला बोलणं शिकवतात. जगणं शिकवतात, लढणं शिकवतात. पुस्तके माणसला सांगतात जीवनाचं तत्वज्ञान, पुस्तके माणसाला सांगतात, गुजगोष्टी, पुस्तके साधतात हितगुज, पुस्तके घडवतात वास्तवाचं दर्शन, पुस्तके देतात जगण्याचं भान, पुस्तके असतात दोस्त, पुस्तके असतात मार्गदर्शक.
Copyright © 2025 | Marathisrushti