(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आमच्या गावान

    वयाच्या आठव्या वर्षापर्यंत माझे बालपण आमच्या गावातच गेले. त्यावेळेस चार आणे आणि आठ आण्यासह जस्ताचे दहा आणि वीस पैसे पण चालायचे. गावात असलेल्या दुकानात तेव्हा चार आण्यात काचेच्या बरणीत ठेवलेली गोळ्या बिस्कीट मिळायची.

      August 30, 2021


  • हुंदका…..

    शाळा सुटली होती. सर्व मुले वेगाने गेटकडे धावत सुटली होती. प्रत्येकाचे आई-बाबा मुलांना घ्यायला यायचे. ती मात्र ह्या सर्वच गोष्टी नुसतं पाहण्याचे काम करीत होती, तिच्या मनाला वाटणारी हुरहूर मात्र तिला नकळत रडवून जायची. आज कितीतरी दिवस झाले होते सुमनला तिची आई सोडून गेली त्याला.

    तिची आईच होती तिच्या आयुष्यात तिचे सर्वस्व... तिचे आई-बाबा आणि तिचा परिवारसुद्धा... दोघींचे अनोखे विश्व होते. सुमनचे बाबा ती दहा महिन्यांची होती तेव्हाच वारले होते. सुखवस्तू घरात तिचे लहानपण गेले होते. तिला कशाचीच कमी नव्हती. उणीव असायची ती केवळ तिच्या बाबाची. ती नेहमी तिच्या आईला विचारायची आई बाबा कसे दिसायचे? ते माझा खूप लाड करायचे का? त्यांना माझी आठवण येत असेल का? आई शाळेतील सर्वच मुली त्यांच्या बाबांसोबत येतात तेव्हा मला बाबाची खूपच आठवण येते गं... जेमतेम तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या सुमनचे शब्द ऐकून मात्र तिची आई सुन्न व्हायची. ती सुमनला बाबाच्या आठवणी सांगायची. असे करता करता अनेक दिवस निघून गेले. सुमन पाचवीला शिकत होती. सुमन अभ्यासात फार हुशार होती, त्याचबरोबर ती आईला मदत करायची. तिची आई लहान मुलांना शिकवायची. त्यातून मिळणारे पैसे ती सुमनच्या शिक्षणाला लावायची. सुमन फार हळवी होती. कुणाचेही दुःख पाहून लवकरच ती भावूक व्हायची. शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या आवडीची होती सुमन. तिला निसर्गात स्वतःला विसरून बेभान व्हायला आवडायचं, तर कधी ते बालमन तासनतास त्या वेड्या पाखरांचा लपंडाव पहायचे. ई... आई बघ की ते पाखरू किती उंच उडतंय... व्वा किती गं ही उंच भरारी... आई मलापण या पाखरासारखे उडावेसे वाटते. चल ना मला घेऊन कुठेतरी या जगाला विसरून या पाखरासारखं लपंडाव करायला, असे ती आईला म्हणत होती. आई मात्र त्या कोवळ्या बालमनाचे ते निरागस प्रश्न ऐकत होती.

    "जाऊ रे माझ्या राजा", असे म्हणत आई तिची समजूत काढत होती.

    तिला सुमनचा एकही शब्द मोडवेना पण कालपर्यंत सुखात वाढलेल्या या पोरीला कधीतरी तिला नाही म्हणावं लागेल याचे आईला फार दुःख व्हायचे. आता तर आणखीच भलमोठं संकट येणार होतं, असा ती विचार करते न करते तर बाहेर पोस्टमन आला पत्र घेऊन. जसे पत्र हाती पडले तशी तिच्या पायाखालची जमीन सरकली होती. ती घाबरून नुसतं पाहण्याचे काम करायची. सुमन आली, तिला हलवले, आई आई म्हटले तेव्हा कुठेतरी तिला जाग आली. तिने सुमनला घट्ट पकडून आक्रोश केला. सुमा... माझ्या बाळा, आता आपण कुठे जावे, कुठे राहावे मला काहीच कळत नाही रे माझ्या राजा... आई सुमनला सांगत होती कारण सुमनचे बाबा गेले तेव्हापासून तिच्या काकाने त्यांना घरातून जायला भाग पाडले होते. पण खूप विनंत्या करून त्यांनी आजपर्यंत राहू दिले कारण त्या काकाने सर्व संपत्ती धोक्याने मिळवली होती. त्याला थोडाही तरस येत नव्हता सुमा आणि तिच्या आईवर... आता त्याने ते घर विकले होते. त्या घरमालकाला आता घर पाहिजे होते त्याकरिता काहीपण करून उद्या घर सोडून जाणे भागच होते. सुमनची आई खूप रडत होती... तिला काहीच कळेना, काय करायचे ते... तिला सुमनच्या भविष्याची चिंता वाटू लागली. माझी लहान पोर घेऊन मी कुठे जाऊ... माहेरी अनाथ असलेल्या सुमनच्या आईला सुमनशिवाय कोणीच नव्हते. अगदी लहान वयात सुमनला काय करावं काही सुचेना.

    आसवांच्या पुरात ती रात्र निघून गेली होती. सकाळ झाली... सुमन डोळे चोळत उठली... आई आई करून आईला हाक मारीत होती पण तिला आई मात्र कुठेच दिसत नव्हती. ती बागेत गेली जिथे तिची आई तिच्यासोबत खेळायची... तिथेही तिला आई कुठेही दिसत नव्हती. शेवटी ही आई गेली तरी कुठे... तिला काळजी वाटू लागली. ती शेवटी आईला शोधत स्वयंपाकगृहात गेली तर पाहते तर काय तिची आई झोपलेलीच होती. तिला पाहताच लहान सुमन धावतच गेली... आई आई म्हणाली. आई काही उठेना... सुमन रडत होती. त्या दिवशी तिचा काका तिच्या आईला घरातून काढून देण्याच्या आसुरी आनंदाने पाहायला आला होता. त्या घराचे मालक आणि तो गेटवर उभे होते. आता कुठे जातील ह्या मायलेकी हे पाहण्यासठी तो आला होता. तो सुमनच्या आई-बाबाचा पक्का वैरीच होता. धोक्याने त्याने त्याची संपत्ती मिळवली होती, पण सुमनच्या आईला मात्र आता काहीच संपत्तीचा लोभ नव्हता, पण तिच्या काकाने सुमनच्या रडण्याचा आवाज ऐकला. त्यांना वाटलं घर सोडून जाण्याचा आवाज असेल... त्याच आनंदासाठी तो पाहण्यासाठी ते इथे आले होते. इकडे सुमन आईला हलवून हलवून थकली. तिचा आवाज ऐकून शेजारील बाया आल्या. त्यांनी सुमनला जवळ घेतले आणि त्यांनी एकच आक्रोश केला तिला पकडून... बाळ सुमा... तुझी आई गेली... आपल्या सर्वांना सोडून... सुमाला काय करावं काही सुचेना. रडण्याचा आवाज ऐकून तो राक्षसी प्रवृत्तीचा काका आला. तो आला तर खरं पण हा सर्व क्षण पाहून मात्र त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती, त्याच्यातील माणूस जागा झाला होता. सुमाच्या आसवांनी त्याला माणूस केले होते. त्याला हा आयुष्याचा विध्वंस पहावला नाही. तो लहान सुमनजवळ आला. त्याच्या आईचे पाय पकडून माफी मागत होता. त्याच्या बदल्याच्या वृत्तीमुळेच आज हा दिवस आला होता. बाळा... मला माफ कर, मी तुझी माफी मागतो. मी तुझ्या आईच्या आणि तुझ्या आयुष्याचा गुन्हेगार आहे, मी तुझ्या आईची माफी मागण्याच्या लायक नाही. बाळा पण आजपासून तूच माझं आयुष्य आणि तूच माझी खरी संपत्ती... असे म्हणून त्या दिवसापासून निरागस सुमाचे हसणे बोलणे गेले. होता केवळ हुंदका... जो फक्त ती जिवंत आहे याचा भास करून जायचा.

    आई गेल्यावर तिच्या काकाचा प्राण आणि सर्वस्व होती सुमन... पण तिच्यातील जीव आईसोबत गेला होता. आज ती मुलींना पाहते तेव्हा तिच्याजवळ असतो तो केवळ हुंदका आणि हुंदका आणि फक्त हुंदका...

    अॅड विशाखा समाधान बोरकर

      October 5, 2019


  • चारोळी – प्रेम म्हणजे..

    prem 3 poem

      February 22, 2016


  • रस्सीखेच

    रात्र चढत होती. सगळी चाळ झोपेत बरी-वाईट स्वप्ने पाहत होती. दिनेशचा मात्र डोळ्याला डोळा लागत नव्हता. नुसती तळमळ, तडफड, गुदमर! सकाळी उठायची घाई नसती तर उठून काहीतरी वाचत तरी बसला असता. कुणाच्या तरी घरातून घड्याळाचे दोनचे ठोके ऐकू आले. बापरे ! दोन वाजले पाच वाजता उठावेच लागणार होते. थोडी तरी झोप झालीच पाहिजे. त्याने मेंढ्या मोजायला सुरूवात केली.

      June 4, 2026


  • नंदराज जटयात्रा – भाग 2

    ही यात्रा हरिद्वार-बद्रीनाथ रस्त्यावरील कर्णप्रयागजवळील नौटी या गावापासून सुरू होते. ही यात्रा खडतर आहे. पण निसर्गाचे विलोभनीय दृश्य व गढवाल, कुमाऊँमधील रीतीरिवाज, संस्कृती, लोकगीते, लोककथा या यात्रेत अनुभवायला मिळतात. सरकार तसेच स्थानिक लोक या यात्रेला पूर्ण सहकार्य करतात. ही यात्रा अतिशय पुण्यप्रद समजली जाते. स्थानिक लोक मोठ्या संख्येने तसेच परदेशी पर्यटकसुद्धा या यात्रेत सहभागी होतात. या यात्रेचे कार्यक्रम व टप्पे कासुवाचे राजघराणे व नौटी येथील नंदादेवी मंदिर व्यवस्थापन निश्चित करते. दिवस व टप्पे असे आयोजले जातात की यात्रा अमावास्येला कुलसारीला व नंदाष्टमीला होमकुंडला पोहचेल. वसंत पंचमीच्या दिवशी ह्या यात्रेची व्यवस्थापनाकडून अधिकृत घोषणा करण्यात येते.

    कार्यक्रम निश्चित झाल्यावर राजघराण्यातील प्रतिष्ठित नौटीला येतात. येताना ते वस्त्रालंकार, आभूषणे व किंमती भेटी घेऊन येतात. बरोबर चार शिंगी मेंढ्याला पण आणलेले असते. यापुढे हाच मेंढा यात्रेत प्रमुख आकर्षण असतो व शेवटपर्यंत यात्रेचे नेतृत्व तोच करत असतो. विशेष म्हणजे प्रत्येक मुक्कामाच्या रात्री त्याचे वास्तव्य नंदादेवीच्या उत्सवमूर्तीपाशी असते. या यात्रेचा सर्वसाधारण कार्यक्रम असा असतो यात्रेच्या पहिल्या दिवशी नंदादेवीच्या सुवर्णमूर्तीला व मेंढ्याला गंगाजळाने स्नान घालून विधियुक्त पूजा केली जाते. भेटी अर्पण केल्या जातात. भेटवस्तू, वस्त्रालंकार डोलीत ठेवले जातात. हिमालयाच्या पुत्रीला, सर्वांच्या लाडक्या नंदाला सासरी पाठवायची तयारी होते. छत्रचामरे, रंगीबेरंगी सजवलेल्या छत्र्या जमा होतात. नंदादेवीची उत्सवमूर्ती सजवलेल्या डोलीत ठेवली जाते. वाद्यांचा गजर होतो. नंदादेवीचा जयजयकार होतो. गढवाली पारंपरिक वाद्ये वाजू लागतात व यात्रा सुरू होते व इडावधणीकडे कूच करते. हे अंतर १० कि.मी. आहे.

    कर्णप्रयागपासून साधारण ६-७ कि.मी. अंतरावर इडावधणी ही वस्ती आहे. अशी कथा सांगतात की एके दिवशी नंदा स्नानाला गेली असता तिने हे गाव पाहिले व या गावाच्या ती प्रेमातच पडली. नंदा इडावधणी गावात आली. त्या ठिकाणी जदौडा गोसावी नावाचा नंदाचा भक्त रहात होता. नंदाला पाहून त्याला खूप आनंद झाला. त्याने नंदाचे खूप प्रेमाने स्वागत केले. तिचा पाहुणचार केला. नंदापण त्याचे प्रेम, भक्ती पाहून मनस्वी आनंदी झाली. तिने प्रेमाने आपल्या भक्ताला सांगितले, “सासरी जाण्यापूर्वी मी तुला भेटल्याशिवाय सासरी जाणार नाही.” जदौडा गोसावीला दिलेल्या शब्दाप्रमाणे आजही नंदा सासरी जाण्यापूर्वी इडावधणीला येते. नंदाचा या ठिकाणी रात्री मुक्काम असतो.

    ही रात्र नंदागीते गाऊन जागवली जाते. त्या रात्री सुंदर गढवाली तरुणी नृत्ये करतात व नृत्यातून सासरी जाणाऱ्या मुलीच्या भावना व्यक्त करतात. गीताचा आशयही तसाच असतो.

    दुसऱ्या दिवशी यात्रा परत नौटीला येते. परतीच्या प्रवासात या यात्रेत सहभागी होणारे भाविक यात्रेबरोबर नौटीला येतात पण सर्वांच्या मनात एक हुरहूर असते की त्यांची लाडकी नंदा आता सासरी जाणार आहे.

    तिसऱ्या दिवशी यात्रा नौटीचा निरोप घेते व कसुवा या ठिकाणी येते. हे पण अंतर साधारण १० कि.मी. आहे. या ठिकाणी महादेव घाटावर व चांदगढीत पूजाअर्चा होते. चौथ्या दिवशी यात्रा सेमला पोहचते. हे अंतर साधारण १२ कि.मी. आहे. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील लोक आपल्या ग्रामदेवतांना डोलीतून नंदा भेटीसाठी आणतात. बरोबर येताना ते रंगीबेरंगी सजवलेल्या छत्र्या घेऊन येतात. काही लोक यात्रेत सहभागी होतात, तर काही देवाच्या डोल्या घेऊन परत आपल्या गावी जातात. प्रत्येक मुक्कामावर यात्रेत सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या वाढतच जाते. पाचव्या दिवशी यात्रा कोटीला पोहचते. कोटीमध्ये 'कोटीचा लाटू' व 'भगोलीचा लाटू' नंदाला भेटतात. 'लाटू' म्हणजे भाऊ! आता यात्रेत त्यांची निशाणे अग्रभागी राहतात. कोटी या ठिकाणी काही अति प्राचीन दगडी मूर्ती आहेत.

    सहाव्या दिवशी यात्रा कोटीहून निघून भगोलीसाठी मार्गस्थ होते. मार्गात धारकोट व सिमतोली घाट या ठिकाणाहून नौटी दृष्टिआड होते. नंदाचे डोळे भरून येतात. वारंवार तिची नजर पाठीमागे वळत असते. ती खाली बसते. त्यावेळी गीतातून तिला उपदेश केला जातो. तिची समजूत घातली जाते. शेवटी जड अंतःकरणाने ती उठते. माहेरचे डोळे भरून शेवटचे दर्शन घेते व वाटचाल सुरू करते. या सर्व भावना गीतातून व्यक्त केल्या जातात. यात्रा भगोलीला पोहचते.

    सातव्या दिवशी यात्रा कुलसारीकडे चालू लागते. भगोलीच्या पुढे क्यूर, चांदपूर, गधेरा या नद्या म्हणजे नंदाच्या माहेराची हद्द! गधेरा नदी ओलांडून नंदा सासरच्या हद्दीत प्रवेश करते. माहेर संपले! माहेराच्या विरहाने तिचे डोळे अश्रूंनी भरतात. नंदाचा संचार झालेली तरुणी खूप शोक करते. हा प्रसंग मोठा कारूण्यपूर्ण असतो. सर्वांचे डोळे पाणावतात. शोकाकुल नंदाचे प्रार्थना व लोकगीते गाऊन सांत्वन केले जाते. शेवटी नंदा आपल्या माहेराचा निरोप घेते.

    यात्रा कुलसारीला पोहचते. नंदाने आता आपल्या सासरी प्रवेश केला. या ठिकाणी नंदादेवीचे खूप उत्साहाने स्वागत होते. हा दिवस अमावास्येचा असतो. या रात्री जमिनीत पुरलेले कालीयंत्र बाहेर काढले जाते व नंदाशी त्याची स्पर्शभेट घडवली जाते व कालीयंत्र परत आपल्या मूळ जागी पुरले जाते. कुलसारीला दक्षिणकाली, हनुमान, सूर्य, त्रिमुखी शिव, लक्ष्मीनारायणाची मंदिरे आहेत. आठव्या दिवशी यात्रा चेपूडिया या गावी येते. बुटोला थोकदार या पहाडी जमातीचे हे गाव आहे. हे अंतरसुद्धा साधारण १२ कि.मी. आहे. पारंपरिक वाद्ये वाजवून लोक नंदाचे स्वागत करतात. यात्रेकरूंच्या सुविधांची काळजी घेतात. मुक्कामातील प्रत्येक गावातील लोक आपल्या घराचे दरवाजे यात्रेकरूंसाठी उघडे ठेवतात व प्रत्येकजण यात्रेकरूंना मदत करण्याचा मनापासून प्रयत्न करत असतो.

    नवव्या दिवशी यात्रा फलदिया या मुक्कामी येते. हे अंतर साधारण १५ कि.मी. आहे. गावात मीधधार मंदिरात देवीचा मुक्काम असतो. या स्थळी नंदाने म्हणून हे चंडिकेचे रूप घेतले व तिलवा राक्षसाला मारले, असे मानतात. स्थळ 'तीलफाडा' म्हणून सुद्धा ओळखले जाते.

    या मार्गावर नंदकेसरी नावाचे ठिकाण आहे. या ठिकाणी नंदाने अष्टभुजाधारी रूप घेऊन मधुकैटभ राक्षसाचा वध केला, अशी श्रद्धा आहे. हे स्थळ पवित्र मानले जाते. असेही सांगतात की, या परिसरात फिरत असताना नंदाचा केशसंभार सुराईच्या झाडात अडकला. नंदा हतबल झाली. राक्षसांनी तिला वेढले. असहाय्य नंदा भैरवाची, शंभू महादेवाची करूणा भाकू लागली. श्रीशंकर प्रकट झालं. त्यांनी असुरांचा वध केला. त्या वेळेपासून हे स्थान नंदकेसरी म्हणून ओळखले जाऊ लागले. यात्रेच्या वेळी गढवाल-कुमाऊँमधील देव-देवतांचे हे भेटीचे स्थळ आहे. करुडची नंदा पण या ठिकाणी भेटण्यासाठी येते व सर्वजण मुख्ययात्रेत सहभागी होतात. चारशिंगी मेंढ्याला या ठिकाणी प्रसाद चढवला जातो.

    नंदप्रयागपासून साधारण १८ कि.मी. अंतरावर घाट नावाचे गाव आहे. या घाट गावाजवळ नंदाकिनी नदीच्या काठावर चीड-पाईन वृक्षांच्या दाटीत करूड नावाचे छोटेसे गाव दडले आहे. या गावातील नंदादेवीचे स्थान परिसरात खूप प्रसिद्ध आहे. नंदादेवीचे हे रूप राज-राजेश्वरी म्हणून ओळखले जाते. नंदादेवीच्या मंदिरात देवीची सुवर्ण मूर्ती आहे. करूडहून सुद्धा नंदराज यात्रेचे आयोजन मोठ्या उत्साहाने केले जाते. या यात्रेत नंदादेवीची सुवर्णाची उत्सवमूर्ती वाजत-गाजत उस्तोली, भेनटी, सुना, कोटी मार्गे नंदकेसरीला येते. या ठिकाणी करूडची ही राज-राजेश्वरी नौटीहून आलेल्या नंदाला भेटते व सर्वजण नौटीहून आलेल्या मुख्य यात्रेत सहभागी होतात.

    फलदिया नंतरचा मुक्काम १० कि.मी. अंतरावरील 'मुंडोली' या ठिकाणी! मुंडोलीजवळ 'लुहाजंग' म्हणून पर्वत आहे. या पर्वतावर नंदादेवीचे 'रक्तबीज' राक्षसाशी युद्ध झाले व देवीने त्याचा वध केला. म्हणून हा पर्वत 'लुहाजंग' म्हणून ओळखला जातो. देवीच्या विजयाप्रीत्यर्थ यात्रेकरू या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करतात. रात्री नंदागीते गायली जातात. नौटी ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसाद बनवला जातो व प्रसाद सर्व यात्रेकरूंना वाटतात. दुसरे दिवशी सकाळी पूजा व आरती होते. ज्यांची वंशवृद्धी होत नाही, असे लोक मुंडोली या ठिकाणी सुराईचे झाड लावतात व चौथरा बांधतात. हा चौथरा बांधणाऱ्या व्यक्तींच्या नावाने ओळखला जातो.

    अकराव्या दिवशी यात्रा वाणला येते. हे पण अंतर १५ कि.मी. आहे. २४३९ मी. उंचीवरील वाण हे या यात्रामार्गातले शेवटचे मनुष्यवस्तीचे स्थान आहे. हा १५ कि.मी. रस्ता चढउताराचा व दुर्गम आहे. पण नंदादेवीवरील श्रद्धा सर्व गोष्टींवर मात करते. ४०-५० घरांचे वाण गाव! हे निसर्गरम्य स्थळ आहे. लोककथेनुसार देवीने या ठिकाणी लोहासर दैत्याचा वध केला. या ठिकाणी नंदादेवीची स्थापना एका घरी केली जाते. या ठिकाणी दशमद्वार दशोली व अल्मोडा येथून अनेक भक्त नंदादेवीच्या मूर्ती घेऊन येतात. देवांच्या नंदादेवीशी भेटी घडवल्या जातात. भाविक लोक देवीचे दर्शन घेतात. मग देवता आपल्या गावी परत फिरतात. आतापर्यंत यात्रेत जवळजवळ २०० छत्र्या/निशाणे सहभागी झालेली असतात.

    वाण गावात नंदादेवीच्या चुलतभावाचे 'लाटुदेवाचे' मंदिर आहे. नंदा सासरी जात असताना याने नशापाणी करून गोंधळ घातला. नंदा रागावली. तिने लाटुदेवाला या ठिकाणी बंद करून टाकले. आज हे मंदिर उघडले जाते. नंदादेवीची व लाटुदेवाची भेट होते व परत मंदिर बंद केले जाते. आता मंदिर उघडण्यासाठी लाटुदेवाला पुढील यात्रेची वाट पाहावी लागते. पण पाठीराखण म्हणून त्याचे निशाण यात्रेत सहभागी होते. मेंढ्याच्या पाठीमागे त्याचा मान असतो.

    वाणच्या पुढे स्त्रिया या यात्रेत सहभागी होत नाहीत. नंदाला सासरी पोहोचवण्यासाठी आलेल्या स्त्रिया अश्रू आवरत नंदाचा निरोप घेतात.

    वाणच्यापुढे मात्र राहण्याचा कोणत्याही सुविधा नाहीत. यात्रेकरूंना या सर्व सुविधा स्वत:लाच कराव्या लागतात.

    यापुढे यात्रा मौन धरून चालते. वाद्ये बंद होतात. एक गंभीर वातावरणात मेंढ्यापाठोपाठ जनसरिता वाहत असते.

    -प्रकाश लेले

      August 1, 2022


  • का चिंतामणी जालिया हाती। सदा विजयवृत्ति मनोरथीं। ……. ज्ञानेश्वरी, अध्याय १, ओवी २२

    गुरू अनेक प्रकारचे असतात व ते आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्यासाठी उभे असतात. आपण घेतलेल्या श्वासाच्या पहिल्या क्षणी आपल्याला, आपला पहिला गुरू भेटतो- मातृगुरू! आपली आई. आई श्वास घ्यायला शिकवते, बोलायला शब्द देते, जगण्याची मूल्ये देते.

      August 9, 2015


  • किल्ली

    मी ठरवून टाकलं, आजचा दिवस आपण पूर्वी जसा साधासुधा होतो, तसाच सर्वसामान्य माणसासारखा घालवायचा..

      October 27, 2021


  • नागरी बॅंकांसाठी सहकारी परिपत्रके 1988 ते 2007

    सहकार खात्याच्या मागील 20 वर्षांतील नागरी बॅंकांना लागू असणाऱ्या सर्व परिपत्रकांचे एकमेव व प्रथम संकलन. एकूण 106 परिपत्रकांचा यात समावेश आहे. पृष्ठे 160 असून आकार एक अष्टमांश डेमी आहे. नागरी बॅंकेच्या प्रत्येक शाखेत असावेच, असे हे संकलन असून हाताळण्यास अत्यंत सुलभ आहे.

      June 17, 2014


  • मराठी ग्रंथाभिमान

    महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळाने मराठी ग्रंथांच्या अनुवादासाठी प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. अर्थात, राज्याच्या सांस्कृतिक धोरणाचा एक भाग म्हणून ही महत्त्वाकांक्षी योजना पूर्ण करण्याचे निर्देश शासनाने मंडळास दिले आहेत. त्यानुसार, ‘मराठीतील उत्तम साहित्यकृती अन्य भारतीय भाषांमध्ये विशेषतः हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये अनुवादित होण्यासाठी उपक्रम राबविले जातील.

      December 31, 2023


  • वेगळा (कथा) भाग ४

    नेहमी प्रमाणे बाबू शाळेत अशोकला भेटत होता , आणि कधी कधी तो त्याची इच्छा नसताना देखील अशोक सोबत डोंगरावर जाई, त्याला कळत नसे हे दोघ इतक्या लांब येऊन का भेटतात ते पण चोरून काय गरज असेल , आणि मुळात मला लांब का बसवतात , एकदा बाबू असाच अशोक सोबत गेला असताना बराच वेळ अशोक आणि सरिता बोलत बसले होते , बाबुला बसून बसून पाठीला रग लागली म्हणून तो उठला त्याने त्याचे दोन्ही हात वर ताणून धरले आणि त्याच वरच शरीर उजव्या बाजूला ताणल आणि अचानक त्याच लक्ष अशोक आणि सरिता कडे गेल , आणि पाहतो तर काय अशोक आणि सरिता एकमेकांना मिठी मारून बसले होते , त्याने लगेच त्याची नजर फिरवली , का जाणे त्याला आपण काहीतरी चुकीच पाहिलं म्हणून अपराध्या सारख वाटायला लागल , तो तसाच सुन्न अवस्थेत बसून राहिला , आणि काही वेळातच अशोक ची पाठीवर पडलेली थाप पडताच भानावर आला.

      July 21, 2022