नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
शेक्सपियरचे ‘To be or not to be’ हें वाक्य प्रसिद्धच आहे ; तसेंच, ज्यूलियस सीझर नाटकामधील, ‘You too Brutus ; then fall Ceasar’ हें वाक्यही तितकेंच प्रसिद्ध आहे. अशी, मृत्यूच्या प्रत्यक्षाप्रत्यक्ष उल्लेखाची इंग्रजी नव्याजुन्या साहित्यातील बरीच उदाहरणें उद्धृत करतां येतील.
जाहिरातींच्या व्यवसायातील सुमारे चाळीस वर्षांच्या कालावधीत, सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी आमच्या संपर्कात आली. साहित्य विषयाची तर मला शाळेपासूनच गोडी असल्याने, एखादा लेखक किंवा कवी भेटल्यावर, माझ्या आनंदाला पारावार रहात नाही..

ते आवाज आता वजनदार आणि जास्त जोरात येवू लागले…. पालापाचोळ्यावरील त्या आवाजांचा वेग तिला जाणवू लागला…. सगळं बळ एकवटून, मनाचा हिय्या करून ती येणार्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी, येणार्या आवाजांचा कानोसा घेत सावधपणे त्या दिशेने पाहू लागली आणि …..
ताजमहल’ हा बीना राय सोबतचा चित्रपट त्यातील सुमधुर गीतांइतकाच, अप्रतिम होता. १९४१ साली प्रदर्शित झालेल्या ‘चित्रलेखा’चा रिमेक १९६४ साली झाला. हा चित्रपट भव्य सेट्स व मातब्बर कलाकारांमुळे नेत्रदीपक ठरला. नर्गिस सोबतचा ‘रात और दिन’ हा नायक म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी चरित्र अभिनेत्याच्या भूमिका केल्या..
एकसारख्या दिसणाऱ्या दोन घरांमध्ये दोन वेगवेगळ्या व्यक्ती रहात होत्या. पहिल्या घरामध्ये एक सेवानिवृत्त आजोबा आणि दुसऱ्या घरामध्ये गलेलठ्ठ पगाराचा आय. टी. इंजिनिअर.
घराच्या कुंपणासाठी एकाच प्रकारची शोभेची झाडं दोघांनी लावली होती. इंजिनिअर साहेब आपल्या झाडांना भरपूर पाणी आणि खत देत असे. आजोबा मात्र फारचं थोडं पाणी आणि खत देत असत. इंजिनिअर साहेबांची झाडं एकदम भरगच्च आणि घनदाट वाढली होती, आणि आजोबांची झाडं टुमदार, छान अंग धरून होती.
एका रात्री अचानक जोराचा वारा आणि पाऊस आला. दुसऱ्या दिवशी सकाळी नेमकं काय घडलाय हे पाहायला दोघेही घराबाहेर आले. समोरच चित्र पाहून इंजिनिअर साहेबांना धक्काच बसला. कारण त्यांची सर्व झाडे अगदी मुळापासून उखडून पडली होती आणि आजोबांची मात्र छान शाबूत होती.
इंजिनिअर साहेब विचारात पडले, भरपूर पाणी आणि मुबलक खत देऊनसुद्धा एका साध्या वाऱ्यात आणि पावसात माझ्या झाडांची अशी दशा आणि गरजेपेक्षा कमी गोष्टी मिळणाऱ्या आजोबांची झाडे जशीच्या तशी. शेवटी न राहून इंजिनिअर साहेबांनी आजोबांना याचे कारण विचारले.त्या निवृत्त आजोबांचे उत्तर म्हणजे आजच्या सर्व पालकांसाठी खूप मोठी शिकवण आहे.
आजोबा म्हणाले "इंजिनिअरने झाडांना लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरविल्या पण अति प्रमाणात आणि त्यामुळेच झाडांची मुळे पोषणाच्या शोधार्थ खोलवर गेली नाहीत. तेच मी माझ्या झाडांना गराजेपुरतेच किंवा थोडे कमी खत आणि पाणी दिले, त्यामुळेच त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झाडांची मुळे खोलवर गेली. इंजिनिअर साहेबांच्या झाडाची मुळे खोलवर गेली नसल्याने थोड्याश्या वाऱ्याला आणि पावसाला बळी पडले. माझ्या झाडांची मुळे खोलवर गेल्याने त्यांना मजबुती मिळाली आणि वाऱ्याला आणि पावसाला न जुमानता माझी झाड मस्त उभी आहेत."
आपल्या मुलांच्या बाबतीतही असेच असते.
जीवनातील जरा ( वृद्धत्व ) अवस्था हा निसर्ग आहे. ती सर्वांना येत असते. पण तेंव्हा या अशा अत्यन्त नाजूक वृद्धावस्थेत आपले आरोग्य सुदृढ ठेवणे, आपली स्वतःची वैचारिक मानसिकता विवेकी सकारात्मक ठेवणे मात्र गरजेचे आहे.
एका शहरात तीन मित्र रहात होते. एक राजपुत्र, एक मंत्रिपुत्र आणि एक वणिक पुत्र. एकदा तिघंही एकत्र आले आणि विचार करू लागले की कोण कशामुळे जिंकला आहे. राजपुत्र म्हणाला, “मी आपल्या पुण्यामुळे जिंकलो आहे.” मंत्रीपुत्र म्हणाला, “मी आपल्या बुद्धिबळावर जिंकलो आहे.” वणिक पुत्र म्हणाला, “मी आपल्या चतुराईने जिंकलो आहे.” तिघे मित्र परदेशात गेले आणि एका शहरातील बगीच्यात थांबले. वणिक पुत्रास जेवण्याची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले. वणिक पुत्र एका वाण्याच्या दुकानावर गेला. त्या दिवशी कोणतातरी सण होता आणि दुकानात इतकी गर्दी होती की तो वाणी सर्व ग्राहकांना लवकर किराणा देवू शकत नव्हता.
भारतीय गुन्हेगारी जगतातील तो पहिला ‘लाईव्ह एनकाऊंटर’ होता. मनोहर अर्जुन सुर्वे ऊर्फ मन्या सुर्वे हा मुंबईतील गुन्हेगारी विश्वातील पहिला हिंदू-भंडारी डॉन होता. मन्याची हत्या हा सर्वात पहिला एनकाऊंटर असल्याची नोंद करण्यात आली आहे.
माणसाच्या जीवनात स्त्रीचा सहवास सुरु होतो, तो आईपासून. त्यानंतर मावशी, आत्या, काकू, आजी, पणजी, भाची, पुतणी, मुलगी, सून, नात या नात्यांची भर पडत जाते.
जीवनातील प्रत्येक वळणावर स्त्री कोणत्या ना कोणत्या भूमिकेतून त्याला आयुष्यभर भेटतच रहाते. काहीजणी, काही क्षणांसाठी भेटतात तर काही शेवटपर्यंत साथ देतात. मात्र प्रत्येकीची नोंद ही त्यांच्या मनाच्या ‘हार्ड डिस्क’मध्ये झालेली असते. जी कधीही ‘करप्ट’ होत नाही.

हिंसा परमो धर्म: नावाची, डोळ्यात अंजन घालणारी एक सुंदर कथा मुन्शी प्रेमचंद यांनी लिहिली आहे. एका प्रसंगी नीचवृत्ती मौलवीच्या तावडीतून एका हिंदू युवतीला साधाभोळा जामीद वाचवतो व घरी सुखरुप पोहचवतो. या उपकाराची परतफेड कशी करु असे तिचा पती विचारतो. त्यावर जामीद म्हणतो, ” संकटात सापडलेल्या कुणाचीही मदत कर. तीच माझी परतफेड असेल.” या कथेतून माझ्या विचारचक्रास गती मिळाली.
Copyright © 2025 | Marathisrushti