नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
मुळात भुविकाचा दोष काय होता??? ती सुंदर होती हा तिचा दोष??? की तिने समीरला नकार दिला हा तिचा दोष…अद्याप समीर फरारच…आपल्या कायद्यात एवढ्या पळवाटा आहेत, तो सापडला तरी त्याला शिक्षा होणार का??? हा मोठा प्रश्न आहे. भुविका सारख्या अनेक निष्पाप तरुणींचा बळी घेणारे आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत……
शेवटी चार दिवसांपासून वाट बघत असलेला वामनरावांचा टेस्ट रिपोर्ट आल्याचे त्यांच्या चिरंजीवांनी शेखर ने संध्याकाळी कळविले. रिपोर्ट निगेटिव्ह आलेला होता. खुप हायसे वाटले. चार दिवसापासुन सुतकी झालेले चेहेरे एकदम प्रफुल्लित झाले. सौ ने लगेच चहा टाकला. दोघांनी ही चार दिवसानंतर चवीन चहा घेतला. तरतरी आली. वामनरावांसी बोलले पाहिजे होते. फोन लावला. चार दिवसांनी त्याचा खळखळून हसण्याचा आवाज कानी आला. फार फार बरे वाटले.
तसा वामन माझ्या नात्यातला नाही. रोज फिरायला जायचो तेथे तोंडओळख झाली. परिचय वाढला. विचार जुळले. अन घनिष्ट मैत्री कधी झाली कळलेच नाही. दहा दिवसांपूर्वी शेखरचा फोन आला बाबांना बरे नाही. पण भेटता येत नव्हते. कोरोनाचा विळखा वाढला होता. कोणीही घराबाहेर पडणे पसंद करत नव्हते. पुढे लक्षणे दिसू लागली होती म्हणून सहा दिवसापुर्वी वामनरावांची टेस्ट करुन घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. टेस्ट करुन आल्यानंतरचे दिवस अतिशय त्रासदायक ठरत होते. पण निगेटिव्ह रिपोर्ट मुळे सारे भय पळून गेले व 'हायसे' वाटले.
किती छान शब्द आहे ना हा `हायसे वाटणे'. चपलक मराठी शब्द. बरे वाटणे, आनंद,सुख, वाटणे दुखः नाहिसे होणे. फारच छान व सकारात्मक प्रतिसाद देणारा शब्द आहे हा. कुठे ही चांगली घटना घडली की हायसे वाटले की ती जीवंत मनाची पावती समजावी. आजच एसटीच्या कर्मचार्यांना त्यांचा थकित पगार मिळणार या बातमीने हायसे वाटले.
त्यांच्या आनंदात सहभागी झालो आहोत असे वाटले. धो धो कोसळणारा नकोसा असलेला पाउस थांबला 'हायसे 'वाटले. गेलेली विज आली हायसे वाटले. धरणे भरली पाणीपुरवठ्यांत कपात करण्यात येणार नाही हायसे वाटले. दुखः परीवर्तनाची कोणतीही घटणा घडली की 'हायसे' वाटणे ही फार सुंदर अनुभुती आहे. हा शब्द सुंदर त्याचा अर्थ सुंदर व अनुभव सुंदर.
मला लाईक मिळाले तर मलाही हायसे वाटेल ना. !!
-- भास्कर पवार
रिमझिम पाऊस चालू असताना झाडांनी आपले कांद्याचे हात पसरून घ्यायला सुरुवात केलेली.. जिकडे तिकडे ओली ओली माती मधूनच वा-याची गार लहर.. अगदी अंगावर शहारे आणणारी… आसपासच्या नदी नाल्यात खळखळ सुरू झालेली.. भिजलेल्या पाखरांचे फांदी आड दडणे.. वाऱ्याच्या लहरीने झाडांचे शहारणे.. या गोष्टी जितक्या सूक्ष्म निरीक्षणातून येतात तितक्याच त्या सुंदर वाटतात..
नाही.. सम्राट अशोकांबद्दल हा लेख नाही.. सम्राट अशोकां सारखा हा अशोक पराक्रमी राजा वगैरे नाही तरी, हा जितका मला विलक्षण वाटतो तितकाच, पुढे वाचल्यानंतर तुम्हालाही विलक्षण वाटेल या बद्दल खात्री आहे..
सेंट जॉनमध्ये आम्ही रहात असलेल्या इमारतीत, सॉफ्टवेअर कंपनीत काम करणारे मराठी युवक आता आमचे मित्र बनले होते. एक भाषा, एक देश या नात्याने विदेशातली आमची ओळख घट्ट बनली होती. न कळत आपलेपणा निर्माण झाला होता. आम्ही दिवसभर पर्यटन स्थळाना भेटी देऊन यायचो नि ते ऑफिसची आपली ड्युटी संपवून घरी परतायचे. मग रात्री चर्चेचा तास रंगायचा. कुठे गेलो होतो ? काय, काय पाहिले? कसे आहे.... ? बरीच चर्चा रंगायची. एक दिवस त्यांनी मिस्कीलपणे हसत सहज विचारले,
‘थ्री सिस्टर्स' पाहिलात का ?'
त्यांच्या बोलण्यातील मिस्किलपणामुळे मी कांहीसा गोंधळलो. त्यांच्या बोलण्याचा रोख माझ्या लक्षात आला नाही. मात्र त्यामुळे मनाला उत्कंठा लागली. म्हणून मीच विचारले,
‘थ्री सिस्टर्स !' ....... काय भानगड आहे ?
‘भानगडबिनगड कांही नाही, बंदराशेजारी हा एक पॉईंट आहे. पहा आणि जाणून घ्या'
सेंट जॉन नदीवरील भव्य पूल पार करून बंदराशेजारील नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर आम्ही सलग दोन दिवस फेरफटका मारला होता. पण ‘थ्री सिस्टर्स’ पॉईंट आमच्या निदर्शनास आला नव्हता. त्यांच्या मिस्कील बोलण्यामुळे ‘थ्री सिस्टर्स' भानगड जाणून घेण्याची ओढ लागली. संतोषीला याबाबत विचारले त्यावर ‘आपण तिथे उद्या जाऊ' असे ती म्हणाली.
दुसऱ्या दिवशी आम्ही तिथे गेलोही. प्रिन्स विल्यम स्ट्रीट रस्त्याच्या शेवटच्या टोकावर एका उंचवट्यावर हे ठिकाण आहे. इथून दूरवर पसरलेला फंडीचा उपसागर स्पष्ट दिसतो. सेंट पेट्रीक स्क्वेअरच्या शेजारी एका खांबावर तीन लाल दिवे दाखवित संतोषी म्हणाली,
‘याच त्या थ्री सिस्टर्स ........!'
‘लाल दिवे ....... थ्री सिस्टर्स .....' कांहीच अर्थबोध होत नव्हता. मी गोंधळून तिला प्रश्न केला.
‘हे तर तीन लाल दिवे, यात एवढे काय आहे ?' माझी कन्या विचारी नि तेवढीच भाऊकही आहे. ती म्हणाली,
‘पप्पा, तुम्ही शिक्षक आहात. त्या तीन दिव्यांच्या मागे कांही इतिहास असू शकतो; तो जाणून घ्या. लाल दिव्यांच्या शेजारी असलेली माहिती वाचा म्हणजे लक्षात येईल.'
गोष्ट दिसायला साधी असली तरी त्याच्या मागे दडलेला इतिहास कांही वेळा मोठा असतो. तो जाणून घेतल्यानंतर त्यामागच्या लोकांच्या भावना नि त्याचे महत्व समजून येते. या तीन लाल दिव्यांच्यामागे अशीच एक कथा आहे. ‘थ्री सिस्टर्स' (तीन बहिणीं) .... नावावरून कोणा तीन बहिणीची यामागे कथा असावी हे समजण्यास वेळ लागला नाही. तीन दिवे हे त्या तीन बहिणींचे जणू प्रतिकच आहे.
दिव्याच्या रुपात या तीन बहिणी शेकडो वर्षे उभा आहेत. महासागरत वादळ, वाऱ्यात अडकलेल्या प्रवाशांना दिशा दाखविण्याचे काम करीत आहेत. पर्यटन स्थळ म्हणून पहाण्यासरखे इथे विशेष कांही दिसणार नाही, परंतु एक स्मारक म्हणून त्याचे संवर्धन करण्यामागची भावना व उद्देश मला महत्वाचा वाटला.
मी तीन लाल दिव्यांच्या स्तंभाशेजारी गेलो. स्तंभावर असलेल्या तीन दिव्यांकडे निरखून पाहिले. पण केवळ दिवे पाहून कांही उमजण्या सारखे नव्हते. शेजारीच एक माहिती फलक दिसला. स्वाभाविक ओढीने मी फलकाशेजारी गेलो. तेवढ्याच उत्कंठेने त्यावर लिहिलेली कथा वाचली. इंग्रजी नि प्रेंचमध्ये कथा अगदीच थोडक्यात लिहिली होती. मी पुन्हा, पुन्हा ती वाचली नि जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ती सत्य कथा कि दंत कथा हे सांगता येणार नाही; मात्र त्या मागचा उद्देश समाज प्रबोधनाचा होता नि आहे, हे लक्षात आले.
रात्रीची वेळ. तीन बहिणी महासागराच्या किनाऱ्यावर उभ्या होत्या. समुद्रात गेलेल्या आपल्या प्रियकरांची त्या आतुरतेने वाट पहात होत्या. एव्हाना सर्वत्र गडद आंधार दाचला. सोसाट्याचा वारा सुरू झाला. उफाळलेल्या वादळाबरोबर समुद्र किनाऱ्यावर येऊन धडकणाऱ्या लाटांचा भयंकर आवाज, त्यांच्या काळजाचा थरकाप उडवून द्यायचा. त्यामुळे त्यांच्या मनात भितीचे वादळ घोंघाऊ लागले. त्या दीनवाने आपल्या प्रियकरांना हाका मारू लागल्या. अन्न-पाण्याविना त्यांच्या प्रतीक्षेत त्यांनी संपूर्ण रात्र कडाक्याच्या थंडीत जागून काढली.
समुद्रात गेलेल्या त्यांच्या प्रियकरांचे पुढे काय झाले, याचा कुठे स्पष्ट उल्लेख आढळला नाही. परंतु त्या काळात समुद्रात जाणे किती धोक्याचे होते. पाठिमागे तुमचे लोक तुमची आतुरतेने वाट पहात आहेत, वेळेत नि सुखरुप परत या हाच संदेश देण्याचा या कथेमागे उद्देश आहे हे निश्चित. हे तीन दिवे म्हणजे त्या तीन बहिणींचे प्रतिक आहे.
या दंत कथेत वास्तविक अंश असू शकतो. परंतु आज या लाल दिव्यांचा दिशा दर्शक म्हणून वापर होत आहे. बंदराकडे येणाऱ्या जहाजाना रात्रीच्या अंधारात योग्य मार्ग दाखविण्याचे काम हे दिवे करतात. किनाऱ्यापासून तीन मैल दूर समुद्रात असलेल्या खलाशांना हे दिवे दिसतात. तिन्ही दिवे दिसल्यास आपण योग्य दिशेने जात असल्याची त्यांना खात्री होते. परंतु केवळ दोन किंवा एकच दिवा त्यांच्या दृष्टीस पडल्यास आपल्या मार्गक्रमणाची दिशा चुकल्याचे त्यांच्या निदर्शनास येते व ते योग्य दिशेला आपले जहाज वळवितात.
थ्री सिस्टर्स लॅंपच्या जागी 1842 मध्ये एका खांबावर एकच तेलाचा दिवा लावण्यात आला होता. पुढे 1847 मध्ये सेंटजॉन गॅस कंपनीने नाविकांना दिशादर्शक म्हणून त्याच ठिकाणी एक गॅसचा दिवा उभा केला. एका पायलट बोटमध्ये प्राण गमविलेल्या खलाशांच्या स्मृतीप्रित्यर्थ सेंटजॉन आयर्न वर्क्सने 1967 मध्ये त्याचे तीन दिव्यांमध्ये रुपांतर केले. आज समुद्रातून प्रवास करणाऱ्या खलाशांना या ‘थ्री सिस्टर्स' (तीन दिवे) वरदान ठरले आहेत. समुद्र सपाटीपासून 42 फूट उंचीवर हे दिवे आहेत. या आधी पाहिलेले लाईट हाऊस आणि थ्री सिस्टर्स दिव्यांच्या उभारणीचा उद्देश दूरवर सहसागरात गेलेल्या लोकांना दिशा दाखविणे हाच आहे.
-- मनोहर (बी. बी. देसाई)
गावाला गेले की रानावनांत भटकायचे, पिके न्याहाळत फिरायचे, मग उंच टेकडीवर जाऊन बसायचे, समोर हजारो एकर जमीन. त्यात लांब कोठेतरी डोंगराने आपल्या नजरेला घालून दिलेला बांध! त्या शांततेत मनाला मोहुन टाकणारी ही दृश्यं आणि त्यांच्या साथीला मी…
कोणत्यातरी गावाचं क्रॉसींग होतं तिथे थोडा वेग कमी झाला पण परत गाडी फोर्थ गिअर मधे घेतली व वेग आणखीन वाढवला. अचानक माझ्या शेजारी को-ड्रायव्हर सीट वर बसलेली मनी स्टिअरींग ला गच्च धरत आणि डोळे मिटत अचानक ओरडली
भूतलावर कोठेही जा खड्डा पाहायला मिळतोच या खड्ड्याला ना देशाचे बंधन असते ना प्रांताचे ना प्रदेशाचे.. फरक एवढाच की कुठला खड्डा मोठा असेल तर कुठला लहान… कुठला खड्डा मुद्दामहून पडलेला असेल तर कुठला निसर्गतः तयार झाला असेल.. अशी खड्डा निर्मितीची खूप कारणे सांगता येतील..
कोणतीही चळवळ जनमानसामध्ये घेऊन जाण्यासाठी जशी एखाद्या कुशल नेतृत्वाची आवश्यकता असते तशीच संवेदनशील साहित्यिकाची देखील आवश्यकता असते असे माझे स्पष्ट मत आहे. सर्व सामान्य जनतेच्या मनातील शल्य, त्यांचे प्रश्न समाजापुढे आग्रहाने मांडण्याचे महत्कार्य; एक झुंझार लेखणीचा साहित्यिकच करू शकतो असे मला वाटते. अश्याच झुंझार साहित्यिकांमधील एक अविस्मरणीय नाव म्हणजे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ” .
सांगायचा मुद्दा हाच की आपल्याला झेपेल,आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला पटेल असेच संकल्प केले पाहिजेत.आणि ठाम निश्चयाने वर्षभर त्याची कास न सोडता ते पूर्णत्वास नेण्याचे प्रयत्न शर्थीने केले पाहिजे. नाहीतर नवे वर्ष नवे संकल्प हे कोड कधीच सुटणार नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti