नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
विजय बारा वर्षाचा होता . गावात याला सगळे विज्या म्हणूनच हाक मारायचे. समुद्राच्या काठावर वसलेले ते छोटेसे कोकणातले मच्छीमारांचे गाव. बहुतांशी कुटुंबांचा उदरनिर्वाह मासेमारीवरच चालायचा. विज्याच्या वडिलांची पण एक होडी होती. गावातली चार पाच लोकं त्याच्या होडीवर कामाला होती. एकत्र कुटुंब असल्यामुळे विज्याच्या घरी माणसांचा राबता खूप होता. विज्याला दोन भावंड होती, नववीत असलेला एक मोठा भाऊ आणि त्याच्याहुन लहान असलेली एक बहीण. त्याच्या काकाला पण चार मुले होती त्यामुळे घरी सात जणांची ही टोळी खूप मस्ती करायची.
मासेमारी करणाऱ्या गावातील होड्या संध्याकाळी समुद्रात जाऊन पहाटे पर्यंत परत यायच्या. आजकाल मोबाईल ची सोय झाल्यामुळे एक बरे झाले होते, माशाचा भाव किनाऱ्याला यायच्या आधीच व्यापारी ठरवून सकाळी टेम्पो हजर करायचे. उरली सुरली छोटी मासळीच कायती लोकल बाजारात जायची.
विज्या हे सारे लहानपणापासून बघत आला होता. विज्याला अभ्यासात चांगली गती होती त्यामुळे घरातल्यांच्या अपेक्षा त्याच्याकडून फार होत्या. त्याने चांगले शिकून मुंबईला नोकरी करावी असेच सर्वांना वाटत होते. पण विज्याच्या मनात मात्र मासेमारी बद्दल भलतेच कुतूहल होते. कित्येकदा त्याने बाबा कडे रात्री होडीवर यायची इच्छा बोलून दाखवली होती पण त्याला सतत नकार मिळत होता.
*********
गणपती दोन दिवसांवर येऊन ठेपले होते. चतुर्थी चा सण म्हणजे कोकणातली दिवाळीच. घरातील प्रत्येकजण बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत गुंतला होता. शाळांना पण सुट्ट्या पडलेल्या त्यामुळे बच्चे कंपनी पण घरीच होती. संध्याकाळी दिवेलागणीची वेळ झाली आणि घरच्यांच्या लक्षात आले विज्या कुठे दिसत नाहीएय. गावात शोधाशोध सुरू झाली. सुरुवातीला वाटले कुठल्या तरी मित्राच्या घरी असेल पण कुणाच्याच घरी नाही हे आढळल्यावर मात्र सगळ्यांचेच धाबे दणाणले. गावकऱ्यांनी गावातली सारी ठिकाणे पालथी घातली पण विज्याचा कुठेच थांगपत्ता लागत नव्हता. त्याच्या आईने तर एव्हाना रडायला सुरुवात केली होती. आता पोलिसांना कळवावे असे सर्वांचे मत पडले. पण त्या अगोदर कुणीतरी त्याच्या वडिलांना होडीवर फोन केला. त्यांना घडल्या प्रकाराची कल्पना दिली. ते पण चिंतेत पडले. त्यांनी लगेच इतर खलाशांना परत किनाऱ्या च्या दिशेने होडी घेण्यास सांगितले. सारेच जण चिंतेत होते. होडीवरचे सारे जण विज्याच्या वडिलांची समजूत काढत होते. पण बापाचा जीव पार टांगणीला लागला होता.
**********
विज्या बसल्या जागी एकदम अवघडून गेला होता! होडीच्या सतत खालीवर होण्याने त्याच्या पोटात माळमळायला पण लागले होते. त्याच्या कानावर त्याच्या बाबाचे आणि इतर खलाशांचे बोलणे पडत होते. समुद्रात मासेमारीसाठी जायला मिळावे म्हणून तो कधीपासून हा प्लॅन बनवत होता. संध्याकाळी समुद्रात होडी लोटायच्या आधी सगळ्यांची नजर चुकवून तो बुडाशी लपून बसला होता. एवढा सगळा मोठा प्रकार होईल याचा त्याने विचारच नव्हता केला नव्हता. आता आपल्याला पडणाऱ्या माराच्या विचाराने तो जागच्या जागी थिजून गेला होता. लपण्याच्या जागेतून बाहेर येऊन वडिलांसमोर उभे राहण्याची हिम्मत त्याच्यात नव्हती. त्याला आता खूप रडायला येत होते.
होडी जेवढ्या वेगाने शक्य होईल तेवढ्या वेगाने किनाऱ्याकडे जात होती तेवढ्यात एक खलाशाला हुंदक्यांचे आवाज ऐकू आले. त्याने वाकून पाहिले असता थर थर कापत आणि हुंदके देऊन रडत असलेला विज्या नजरेस पडला!
“अरे तू हय काय करतंस?” तो खलाशी जोरात ओरडला
ते ऐकल्या बरोबर विज्याच्या रडण्याचा जोर अजून वाढला! आता काय प्रकार नक्की झालाय तो सगळ्यांच्या लक्षात आला. लपलेल्या जागेतून विज्या बाहेर यायला तयार नव्हता!
“विज्या, भायर ये” त्याच्या बाबाने ओरडून सांगितले.
“बाबा , मारू नको… मिया चुकलंय.. परत नाय करूंचय” विज्या रडत रडत बोलत होता.
बाबाने मारणार नाही असे आश्वासन दिल्यावरच तो बाहेर आला. बाबाने सर्वात प्रथम घरी फोन लावून विज्या मिळाल्याची खबर दिली तेव्हा कुठे सगळ्यांचा जीव भांड्यात पडला!
मंत्रोच्चारयुक्त जप हा झाला आध्यात्मीक उपासनेचा एक भाग.मनुष्य जेव्हा रोग व्याधींनी त्रस्त होतो तेव्हा त्याला कोणाच्या तरी आधाराची गरज भासते व तो दैवी शक्तीच्या उपासनेकडे वळतो.आपणास आरोग्य देतो “सुर्य “व मारक शक्ती ही त्याचाच पुत्र “यम “याकडे असते.त्या दोघांचा कर्ता शिव.म्हणुनच त्यांच्या कृपेच्या अपेक्षेत गायत्री व मृत्युंजय मत्रांचे अनन्य महत्व आहे.मृत्यु अटळ असला तरी त्याच्या अनुषंगाने अवती- भोवतीच्या स्नेहजनांना येणार्या भितीवजा वलया ला सुसह्य करता आले तरी तो जणु मृत्यूवर विजयच म्हणजे “मृत्यूंजय” ह्या कल्पनेवर आधारित प्रस्तुत लेखात विद्यमान परिस्थीतीचा आढावा घेत विविध दृष्टीकोनांना हाताळीत, मृत्युनंतर काय ह्या प्रश्नचिन्हाला अलगद स्पर्श केला आहे.
नागपूरकडल्या परिसरातील एका सुखवस्तू कुटुंबात जन्मलेल्या प्रेमानंद गज्वी यांना एकांकिका आणि नाट्यलेखनाने आकृष्ट केले. पुढे १९८०-१९८५च्या सुमारास ते मुंबईला आले आणि त्यांची प्रतिभा अधिकच पल्लवीत झाली. ‘देवनवरी'(१९८१), ‘तनमाजोरी'(१९८४), ‘वांझ माती'(१९८४), ‘जय जय रघुवीर समर्थ'(१९८८), गांधी-आंबेडकर(१९८८), ‘किरवंत'(१९९१), ‘पांढरा बुधवार'(१९९५) अशी एकाहून एक सरस नाटके त्यांनी लिहिली *आणि विद्यमान मराठी नाटककारांच्या मांदियाळीत त्यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले.
आम्हाला मुजीबुर रहमान यांचे पहिले दर्शन झालं ते एका कुठल्यातरी कार्यक्रमात! ते व्यस्त होते. त्यावेळी त्यांच्या बाजूला कोणी जवळ जाऊ नये म्हणून बॉडीगार्ड होते. संबंधिताशी आम्ही बोललो. दुसर्या दिवशी सकाळी त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी भेटायला वेळ दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही त्यांच्या घरी ३२ धनमंडी या पत्त्यावर गेलो. तो दोन मजली बंगला होता. सकाळी त्यांच्यासोबत चहा घेतला. त्यांनी आमचं कौतुक केलं आणि आम्ही त्यांचा निरोप घेतला. अतिशय प्रसन्न सहृदय आणि प्रेमळ व्यक्तिमत्व होतं. इतका साधा प्रेमळ माणूस अशा लढ्याचे नेतृत्व करू शकतो? यावर विश्वास बसत नव्हता. पण ते सत्य होतं.
ऑस्टिन! सकाळी साडेआठची वेळ! पारा पाच अशांवर! आभाळ म्हणजे, राखेडी रंगाचं विशाल घुमट. सूर्याचे अस्तित्व म्हणजे, त्या घुमटातून पाझरलेला, वस्त्रगाळ प्रकाश. पडून गेलेल्या पावसाचे अवशेष परिसरात आणि आसमंतात बिलगून राहिलेले. वातावरणात एक गूढ आणि गोड अशी (‘ती’च्या आठवणींची) कातरता! अधून मधून, गार रेशमी झुळका आसपास लहरून जात होत्या.
पूर्वी आमच्या गावात एक डॉक्टर यायचे महिण्या पंधरा दिवसातून एकवेळा. त्यांना बसण्यासाठी हक्काचं ठिकाण म्हणजे आमच्या शाळेचा व्हरांडाच. तिथंच पेशंट यायचे तपासून घ्यायचे. आम्ही निरीक्षण करायचो. एकदा डॉक्टर ते त्यांचे साहित्य तिथेच सोडून थोडे कुठे तरी गावात गेले होते. आम्हाला त्या साहित्याचे खूप कुतूहल होते. आम्ही चार-पाच मुले तिथे आलो आणि व्हरांडयातील एक एक सहित्य हाताळून पाहू लागलो. कधीच न हाताळलेले ते साहित्य हातात घेऊन एकमेकांना दाखवून मजा घेत होतो बिनधास्तपणे.
आयुष्य हे कधीच न संपणारे कोडे आहे आणि मला तर ते कधीच सोडवता येणार नाही म्हणून हताश होऊन बाकावर बसलो होतो, तर अचानक दिलीप दिसला, ताईचा मुलगा,माझा भाचा. खूप हुशार मुलगा, गेल्यावर्षी सातवीच्या परीक्षेत पहिला आला तेंव्हा त्याला प्लेटो चं पेन बक्षीस देणार होतो, पण कसचं काय, प्लेटोच्या पेन पेक्षा पोटाची खळगी आणि ती भरण्याची पेन प्रचंड मोठी होती.
मी लांबूनच तिला बघत होतो…बघत बघत जवळ येऊ लागलो… ती म्हणाली ..पहेचाना .. मी असेच उत्तर दिले….. कैसी हो..आप….
नुसते मोठे नव्हे तर शिक्षकांनी सुशिक्षित ही बनवलं ! ते शाळेचे दिवस आठवले की मन अस्वस्थ होतं . आज ती दहावीत आहे पण पूर्वा शाळेत जायला लागल्यापासून पहातोय शिक्षणाची वर्षा वर्षा ला चाललेली अधोगती !
भारत अमेरिकेची तुलना होऊ शकणार नाही. तो देश दोनशे वर्षा पासून स्वतंत्र आहे, आपण त्यामानाने खूप उशिरा स्वतंत्र झालोय. चांगल्या गोष्टी आपण आत्मसात करत गेलो, तर कोणत्याही प्रगत देशा पेक्षा आपण मागे रहाणार नाही. अन एक दिवस, ‘सारे जहासे अच्छा हिंदूस्ता हमारा!’ आपणच अभिमानाने म्हणू. शेवटी एकच सांगावस वाटत, स्वर्ग काय अन अमेरिका काय? या गोष्टी फक्त पहायच्या असतात, राहायच्या नसतात. शेवटी ‘आपला गाव बरा!’ हेच सत्य असत!
Copyright © 2025 | Marathisrushti