(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • चंदर – बाल कुमार कादंबरी – भाग ९

    कॉलेजचे पहिले वर्ष पाहता -पाहता संपले, अभ्यासात बुडालेल्या चंदरला सरांनी त्याचा दाखवला, सर्व विषयात “प्रथम-श्रेणीचे गुण “,मिळालेले पाहून चंदर ला समाधान वाटले. आता कॉलेजात चंदर चे नाव दुमदुमत होते. सर्व सरांच्या नजरेत चंदर चे स्थान आता फार उंचावले होते.

  • नातं..

    एका माणसाचं दुसऱ्या माणसाशी नातं जुळणं ही या संसारातील सगळ्यात मोठी आणि भाग्यशाली गोष्ट. रस्त्याने जातांना कुणी ओळखीचं दिसलं की आपण लगेच हसतो, गालातल्या गालात. जवळचे आप्त-नातेवाईक हे तर असतातच… पण त्यांच्याही पलिकडे काही नाती अगदीच घट्ट होत जातात… टिकतात आणि आयुष्यभर साथ देणारी होतात…. माणुसपणाचं नात दृढ झालं पाहिजे… वाढले पाहिजे…..हेच मागणे..!

  • मन एक पाखरू

    मन …….मन ही खूप कोमल भावना आहे ,जी प्रत्येकाच्या अंतःकरणात वसलेली आहे.मन हे भणभंनाऱ्या वाऱ्यासारखे , असंख्य प्रश्नासारखे,सागराच्या उफनत्या लाटांप्रमाणे उठणार्‍या भावना लहरी…… मन कधी अनेक समस्यांचे तुफान…..

  • व्हिएतनाम – एक बेधडक राष्ट्र – भाग १

    व्हिएतनाम हे दक्षिण पूर्व आशिया खंडातील एक राष्ट्र. एकेकाळी चीन, कधी फ्रान्स तर कधी अमेरिका यांच्या अधिपत्याखाली असलेले राष्ट्र.. ह्यांच्या खुणा आजही आपल्याला पहायला मिळतात. तर मागच्या दोन दशकापासून जगावर आपला ठसा उमटवण्याच्या दृष्टीने पाऊल टाकणाऱ्या ह्या देशाला तुम्ही जर स्वतःहून भेट देणार असाल तर काय काय करावे याचे माझ्या अनुभवावर आधारित मार्गदर्शन आणि अश्या मी केलेल्या काही भ्रमंतीचे वर्णन येत्या काही भागात मी करणार आहे.

  • भक्ती

    माझी एक “मैत्रिणी” होती रांगेत माझ्यापुढे काही अंतरावर. एक माणूस कुणीतरी येऊन तिच्याशी काही बोलला आणी ती निघुन .गेली. अर्ध्या तासानं ती नामदेवाच्या पायरीकडून परत जाताना दिसली.. बहुधा संध्याकाळीचं तिच फ्री बुकिंग झालं होतं .तिचं. आणि दर्शनही.

  • सृष्टीकर्त्याचे अप्रतिम चित्र

    डोक्यात प्रकाश पडला,जे माहित नाही ते तिमिर कारण अंधारत कुणाला काहीच दिसत नाही. तिमिराच्या आवरणात दडलेला विभु, अर्थात स्वयं प्रकाशित आत्मा अर्थात सृष्टी निर्माता परमेश्वर, कुणाला दिसणे शक्यच नाही.  त्याच सृष्टीकर्त्याचे चित्र सॉफ्टवेअरच्या  मदतीने काढले.

  • अहिल्योध्दार : गोमंतकीय रंगभूमीचा पाया

    गोव्यात गावागावात जेवढी म्हणून देवस्थाने आहेत, तेवढाच नाट्यमंडळांचाही आकडा आहे. गोव्यातील नाट्यपरंपरा कधीपासून सुरू झाली, याला अनेकांचे दुमत आहे. परंतु "अहिल्योध्दार" नाटकाच्या मूळप्रतीवरून एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच गोमंतकीय रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली असावी असे अनेक जाणकारांचे मत.

    गोव्याचे संतकवी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकर लिखित "अहिल्योध्दार" या नाटकाच्या प्रतीवरून आणि त्यांंच्या इतर लिखाणावरून जाणकारांनी कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकर यांचा आद्यनाटककार म्हणून उल्लेख केला आहे.

    गोव्याचे अष्टपैलू व्यक्तीमत्व साहित्यिक, नाटककार, नट, गायक, लेखक विष्णू सुर्या वाघ हे गोव्यातील डोंगरी गावातले. याच डोंगरी गावात कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकर होऊन गेले. 2012च्या निवडणूकीत विष्णू वाघ विधासभेवर निवडून आले, तेव्हा गोमंतकीय कलाकारांनी, कलाकारांचा आवाज विधानसभेत पोचला अशा प्रतिक्रीया व्यक्त करून वाघांचे कौतुक केले. त्याच काळात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यांना कला अकादमीचे अध्यक्षपद प्रदान केले होते. वाघ कला अकादमीत आल्यावर अनेक नवे उपक्रम, नवकल्पना, स्पर्धांतील बक्षीसांच्या रक्कमेत वाढ अशा गोष्टी घडत गेल्या. यातील मुख्य गोष्ट म्हणजे वाघांनी गोमंत रंगभूमी दिनाची घोषणा केली. तीही बांदकरांच्या जन्मदिनी. तेव्हापासून गोव्यात रंगभूमी दिन जुलै महिन्यात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने ज्येष्ठ नाट्यकलाकारांचा सन्मान केला जातो. हा एकप्रकारे बांदकरांच्या कार्याचा गौरव म्हणावा लागेल.

    उपलब्ध माहितीनुसार बांदकरांचा जन्म 1844 साली झाला. डोंगरीत राममंदिरात होणार्‍या रामनवमीला ते स्वत: लिहून नाटके सादर करायचे. हे नाटक म्हणजे संगितिकेच्या स्वरूपातील नाट्य. ते स्वत: मंदिरातील पुरोहित असल्याने स्थानिक तरूण त्यांच्या शब्दाला मान देत. त्यांना घेऊनच ते नाटकं सादर करायचे. कीर्तनी बाजातील ही मराठी नाटके तेव्हा प्रेक्षकांना फार आवडायची. त्यांची ख्याती दूरवर पसरली होती. गोव्यातीलच नव्हे शेजारील राज्यांमधूनही त्यांची नाटके पाहायला लोक यायचे. बांदकरांनी विपूल प्रमाणात लेखन केले आहे. त्याचा दाखलाही मिळतो. कीर्तने, श्लोक, अभंग हे तर आहेच. शिवाय काही नाटकांचा संदर्भही आढळतो. त्यांनी लिहिलेल्या नाटकांमध्ये "लोपामुद्रा संवाद", "नटसुभद्रा विलास", "शुक रंभा संवाद", "अहिल्योध्दार" या नाटकांचा समावेश आहे. परंतु या नाटकांच्या प्रती कुठे गेल्या याचा ठाव लागत नाही. केवळ "अहिल्योध्दार" या नाटकाची मूळ प्रत त्यांचे पणतू सिताराम बांदकर यांच्याकडे आहे. गोमंतकीय नाट्यपरंपरा सांगताना अण्णासाहेब किर्लोसकरांचाही बांकरांच्या माहितीत उल्लेख झाला आहे.

    गोमंतकीय विश्वकोषात बांदकरांच्या साहित्याविषयी थोडक्यात माहिती मिळते. अण्णासाहेब किर्लोसकर त्याकाळात मिठाच्या व्यवसायानिमित्त गोव्यात असताना त्यांना बांदकरांच्या "शुक रंभा संवाद" नाटकाचा प्रयोग पाहाण्याचा योग आला. किर्लोसकरांना त्यांना तो फार आवडला. त्यांनी बांदकरांना आपल्या सोबत मुंबईला येण्याचे आमंत्रण दिले. परंतु बांदकरांनी आमंत्रण स्वीकारले नाही. आणि वर हेही सांगितले की आपण श्रीराम भक्त असून, केवळ भग्वदभक्तीच्या मार्गाने श्रध्दाळू भक्तांना सुजाण करण्याचे काम करतो. ही केवळ आपली रामभक्ती असल्याचे त्यांनी किर्लोसकरांना सांगितले. हीच प्रेरणा घेऊन, बांदकर महाराजांच्या आशिर्वादाने पुढे किर्लोसकरांनी मुंबईत "संगीत शाकुंतल" नाटकाची निर्मिती केली असल्याची महिती विश्वकोषात सापडते. अशा काही गोष्टी त्यांच्या संदर्भातील आढळतात. आणि म्हणूनच "अहिल्योद्धार" ही नाट्यकृती गोमंत रंगभूमीचा पाया असे संबोधले जाते.

    तसं पाहिल्यास गोव्यात कितितरी देवस्थाने आहेत, जिथे उत्सवी रंगभूमीची चळवळ आजतागायत चालू आहे. म्हापसा शहरातील श्री महारूद्र प्रासादिक नाट्य मंडळ हे 1843 सालचे जेव्हा महारूद्र देवस्थान सुरू झाल तेव्हाचे. या नाट्यमंडळाची परंपरा म्हणजे रामनवमी ते हनुमानजयंतीपर्यंत उत्सव चालतो. या मंडळाच्या नाट्यपरंपरेचा उल्लेख आढळतो तो गौळणकाला सादर करण्यापासून. सुरूवातीला पाच दिवस उत्सव झाल्यावर शेवटच्या दिवशी गौळणकाला व्हायचा. स्थानिक बालकलाकार या गौळणकाल्यात सहभागी व्हायचे. पुढे याच उत्सवातून दर्जेदार, अभिजात अशी नाटके सादर होऊ लागली. महाराष्ट्रात मराठी रंगभूमी गाजवलेले रघुवीर सावकार, गोपीनाथ सावकार, वसंत सावकार हे याच नाट्यमंडळाचे कलाकार. सावकारांच्या "नाट्यबोधेच्छू नाट्य समाज" या संथेची मुहूर्तमेढ म्हापशाच्या महारूद्र देवस्थानातच रोवली गेली. गोव्यात अशा कितीतरी नाट्यसंस्था आहेत ज्यांची सुरूवात गौळणकाला, दशावतारी नाटके यापासून झाली आहे.

    तर अशी ही गोमंतकीय नाट्यपरंपरा गोव्याच्या मातीत रुजलेली. बांदकरांनी त्याला समाजमान्यता दिली. रामभक्तीच्या माध्यमातून उदयास आलेली ही नाट्यपरंपरा. आजही गोव्याच्या कानाकोपर्‍यात उत्सवी रंगभूमीची सेवा होते आहे. विष्णू वाघांनी कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरांच्या जयंतीदिनी गोमंत रंगभूमी दिन साजरा करण्याची घोषणा केली. परंतु त्याही आधी 2004 साली गोव्यातील एक ज्येष्ठ नाटककार विजयकुमार नाईक़ यांनी "अहिल्योध्दार" नाटकाची पुन:रचना करून ते नाटक ठिकठिकाणी सादर केले. शंभर वर्षांच्या कालावधीनंतर बांदकरांच्या नाटकाला तसेच्या तसे रंगभूमीवर आणण्याचे धाडस विजयकुमार नाईक यांनी केले. विजयकुमार सांगतात, गोव्यातील गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष कै.शशिकांत नार्वेकर यांनी त्यांना अहिल्योध्दार नाटकाच्या मूळ प्रतीची झेरॉक्स प्रत दिली होती, जी जीर्ण झाली होती. त्यातून काहीच साध्य करण्यासारखे नव्हते. पुढे त्यांनी बांदकरांचे पणतू सिताकांत बांदकर यांची भेट घेऊन मूळ प्रत मिळवली व काम झाल्यावर ती त्यांच्या स्वाधीन परत केली. खरं तर या प्रतीत पुसटसे शब्द होते. तेव्हाची लिहिण्याची पध्दही वेगळी होती. परंतु विजयकुमार नाईक़ यांनी त्यांच्या संस्थेचे कलाकार मंदार जोग यांना घेऊन ती प्रत तशीच्या तशी लिहून काढली. आणि गोव्यातील आघाडीचे संगीतकार अजय नाईक यांनी नाट्यपदांना संगीत दिले. जसे बांदकर नाटक सादर करायचे, त्याच पध्दतीने विजयकुमार नाईक यांनी अहिल्योध्दारची निर्मिती केली. या नाटकाचे गोव्यात आणि गोव्याबाहेर मिळून चाळीसच्या वर प्रयोग झालेत. पहिला प्रयोग फोंड्याच्या राजीव कला मंदिरात 5 डिसेंबर 2004 साली झाला. गोव्याच्या सर्वच्या सर्व तालुक्यांमध्ये हे नाटक सादर करून विजयकुमार नाईक यांनी गोमंतकीय नाट्यकलेचा पाया कसा होता याची साक्ष दिली. त्यानंतर सोलापूर येथील नाट्य आराधना, चाळीसगावमधील रंगगंध संस्था, दादर माटुंगा येथील कल्चरल सेंटर, नेहरू सेंटरच्या संगीत नाटक फेस्टीव्हलमध्ये हे नाटक सादर करण्यात आले. हे नाटक विजयकुमार नाईक यांनी प्रकाशितही केले होते. तसेच अजय नाईक यांनी संगीतबध्द केलेली सीडीही आहे. यंदाच्या गोमंत रंगभूमीदिनी या सीडीचे आनावरण करण्यात आले.

    विष्णू वाघांनी गोमंत रंगभूमीदिन सुरू करून बांदकरांच्या कार्याचा गौरव केला. आता कला अकादमीचे विद्यमान अध्यक्ष आणि गोवा राज्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे अकादमीचे उपक्रम पुढे नेत आहेत. यंदाच्या कार्यक्रमात त्यांनी कला अकादमीतर्फे "अहिल्योध्दार" नाटकाच्या सीडीसाठी पुढाकार घेतला. ते स्वत: एक उत्तम नाट्यकलाकार, लोककलाकार असल्याने, कलाकारांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोचतो, असे गोव्यातील कलाकार मानतात. ते स्वत:ला विष्णू वाघांचे शिष्य मानतात आणि तसे आहेही. वाघांमुळेच आपण रंगभूमीवर आलो आणि पुढे राजकारणातही असे ते प्रांजळपणे सांगतात. विष्णू वाघांनी आपल्या "शिवगोमंतक" या नाटकात त्यांना शिवाजीची भूमिका दिली होती, असे ते आवर्जुन सांगतात.

    -- कालिका बापट,
    पणजी, गोवा

    नुकत्याच झालेल्या गोमंतक रंगभूमी दिनाला ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते प्रमुख पाहुण्या होत्या. त्यांच्या हस्ते कलाकारांचा गौरव आणि "अहिल्योध्दार" सीडीचे अनावरण करण्यात आले.

    अहिल्योध्दार नाटकाच्या सीडीचे अनावरण करताना कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, अभिनेत्री वंदना गुप्ते. सोबत अजय नाईक़ व इतर मान्यवर.

    अहिल्योध्दार नाटकातील प्रसंग

  • “I Is”

    पण त्या दिवशी अशी काही घटना घडली की मी खडबडून जागी झाले आणि मला त्याच्या उपदेशाचे शब्दन् शब्द आठवत होते. असे नक्की काय झाले होते….. अचानक माझी तब्येत बिघडली. हृदयातील धडधड वाढली आणि ती काही केल्या थांबेना. त्यामुळे थेट दवाखान्यात भरती व्हावे लागले.

  • सिंगापूरच्या आठवणी

    काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्रामध्ये सिंगापूरला मलेशियापासून स्वतंत्र होऊन ५० वर्षे पूर्ण झाल्याची बातमी वाचली व मनाने एकदम सिंगापूरमधल्या आठवणींमध्ये धाव घेतली. १८ वर्षे कशी वायुवेगाने पळाली ते कळलेच नाही पण असंख्य सुखद आठवणी मनात ठेऊन गेली. जगाच्या नकाशावर एकाद्या ठिपक्या एवढा छोटासा देश पण किती विविधतेने भरलेला आहे हे तिथे राहिल्याशिवाय समजत नाही.

  • अब्दुल !

    परवा टी.व्ही. वर 'तानी' सिनेमा पहिला. त्यातील सायकल रिक्षा पाहून मला माझ्या परळीतीलवास्तव्याची आठवण झाली. चाळीस -पन्नास वर्षापूर्वीचा तो काळ होता. त्याकाळी 'पब्लिक ट्रांस्पोर्ट ' साठी देवांनी दिलेले दोन पाय किंवा सायकल रिक्षा असायची.फटफटी, जीप हि खूपच श्रीमंती वहन. सामान्यांसाठी विरळच!

    या सायकलरिक्षा फक्त दोन आसनी असत. सामान, लहान पोर याना 'पॅसेंजर'च्या पायाशी जागा असे. रिक्षावाले आपापल्या रिक्षांना खूप सजवायचे. हॅण्डलला रंगीत ग्रीपर, त्या ग्रीपरला झिरमाळ्या, प्रत्यकचाकाला नायोलॉनचे गजरे, टपाल चमचमणाऱ्या टिकल्यांच्या माळा, काही विचारू नका! अश्या सजवलेल्या रिक्षात बसलेकी, आपण कोणी -राजे-महाराजे असल्या सारखे वाटायचे!

    अब्दुल, असाच एका 'सजी-सवरी ' रिक्षाचा चालक. कळकट चौकटीघराची लुंगी, मळका पांढरासदरा, वेडी-वाकडी वाढलेली, विरळ काळ्या -पांढऱ्या केसांची टोकदार दाढी, बंडाच्या पायित्र्यातले करडे-वरडे डोईवर केस, त्यांना पाय बंध घालण्यासाठी कपाळा लाबांधलेलं लाल/हिरव फडकं! असलं पाच साडेपाच फुटी काटकुळ ध्यान! उन्हानं रापलेल्या चेहऱ्यावर गरिबी म्हणावे कि लाचारी असले भाव!

    मी नुकताच बँकेत लागलो तेव्हा, त्याची 'ओळख' झाली. तसा मी परळीतच लहानाचा मोठा झालो. त्याला बरेचदा रिक्षा ओढताना पहिले होते.
    " साब, एक रिक्षा लेनी है." एक दिवस तो बँकेत येऊन मलाम्हणाला.
    "अभी एक है ना तेरे पास?"
    " हां, है पर भाडे से चलता हू."
    "फिर?"
    " कर्जा, देवना! खुद् कि लुंगा! भाडा जाकु कुच्छीच नय बचता." त्याचा आवाज खूप लाचार अन दिन होता.
    मी त्याला मॅनेजर समोर उभा केला. आर्थिक द्रुष्ट्या अति गरिबाना साठी DIR नामक योजने खाली आमच्या मॅनेजरने त्याला केवळ चार टक्के व्याजदराने रिक्षा मंजूरकेली. दोन दिवसांनी अजून दोन-चार भाऊबंद घेऊन आला!
    "अब्दुल, ये क्या?"मॅनेजर भडकला.
    "इंकू, भी रिक्षा देव ना!"
    "क्यू, सारी परली मी रिक्षा बाटनी है क्या?"
    "ये भी बहुत गरीब है! सच्ची! दुवा देंगे साब! भुक्को मारलेले है ये लोंगा! देव ना साब!" अजिजीचा तो कडेलोट होता. आमचा मॅनेजर 'रहेम दिलाचा'. सब को मंजुरी दे दि!

    आठ - दहा दिवस हे पाच सहा जणांचं टोळकं गायब झालं. बहुदा रिक्षा प्रकरण सम्पले असावे. मी हि विसरून गेलो. पण कसले काय? एका सोमवारी हे टोळकं रिक्षाच्या कोटेशनसहहजर! कोटेशन पाहून मी हादरलोच. सारी कोटेशन्स हैदराबादची! परळीत रिक्षाचीचार दुकाने होती! मग हैद्राबाद का? काही काळे बरे तर नसेल? त्यांच्या हेतू बद्दल मनात शंका आलीच!
    "ऐसा नय चलेगा! हैद्राबाद का कोटेशन क्यू? परलीमे दुकान है ना?"
    "साब मेहरबानी करो, बडीमुश्किलसे ये कोटेशन मिले है, येच लेव ना. " तो पुन्हा पुन्हा लाचारीने विनवीत होता.
    "मै तो ना करू! " मी हि हट्टाला पेटलो.
    तो साहेबाकडे गेला. त्याने साहेबाला काय सांगितले, माहित नाही पण दहा मिनिटात केबिन बाहेर आला . मला ते कोटेशन दिले. 'pay by DD on Haydrabad " या कोटेशन वरील शेरा मी पहात राहिलो!

    सारी कागद पत्रांची पूर्तता, लोन documents, सह्या, सगळे सोपस्कार करून दोन दिवसांत अब्दुल&कम्पनीला हैदराबादचे DD दिले. त्यानंतर आमचा साहेब आठवड्याभरा साठी रजेवर गेला.

    पाच सहा दिवस झाले तरी अब्दुल्यागायबच! तडक हैद्राबाद शाखेला फोन लावला. सगळे DD पेड झाले होते! बोंबला! पंधराशे गुणिले पाच, साडेसात हजारांची बँकेला चुना लागला! (तेव्हा साडेसात हजार बरीच रक्कम होती!).गरीब लाचार तोंडाने अबदुल्याने गंडवले ! काय बनेल माणूस? असेलच काही काही विचार मनात घोंगावत राहिले. त्यात साहेब सुट्टीवर, काय करावे कळेना. आज मंगळवार बँक सुटल्यावर, अब्दुल्याच्या घरी जायचे ठरवले, तेव्हा मनाला कोठे चैन पडली. पण कामाच्या रगाड्यातजमले नाही.

    बुधवारी सकाळी साडे दहाच्या दरम्यान मी बँकेत आलो. माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना. सकाळच्या कोवळ्या उन्हात, नव्या कोऱ्या पाच रिक्षा ओळीने उभ्या होत्या! व त्यांची हॅन्डल धरून मलूल चेहऱ्यांची त्यांची मालक हि उभे होते!
    "अब्दुल पावत्या आणल्यास का?" मी विचारले
    " हा, साब लाया हू."
    मी खुर्चीत बस्ताना त्याच्या हातातून पावत्या घेतल्या. त्या घेताना त्याच्या हाताला हात लागला. चटकाचबसला! मानवी देह इतका तापू शकतो?!
    "तेरे कु, तो तेज बुखार है !"
    " हा, थोडा है, हम सबकुच है!"
    "मतलब ?"
    त्यानंतर त्याने सांगितलेली कथा (कि व्यथा ) अशी होती. हैद्राबादला रिक्षा दोनशे रुपयांनी स्वस्त मिळतात, म्हणून तेथून घेतल्या! रेल्वे खर्चा साठी, हि मंडळी चार दिवस हमाली करत होती! शिवाय जमेल तसे पै -पै जमवत होती! हैद्राबादला रिक्षा घेतल्या नंतर, तेथेच फिटिंग करून घेतली होती. आणि ..... आणि ... त्या तेथूनचालवत सुमारे चारशे कि. मी. परळी पर्यंत आणल्या होत्या! सहा दिवस लागले होते! शेवटच्या दोन दिवसात पैसे संपले! उपाशी पोटी उन्हात .... रिक्षाआणल्या! सहाजिकच देहाने या अत्याचारा विरुद्ध, तापाच्या रूपाने निषेध व्यक्त केला!

    मला मेल्याहून मेल्या सारखे झाले! त्यांच्या बद्दल मी, इतका का शंकेखोर झालो? थोडा सुद्धा धीर धरला नाही. गुन्हेगार ठरवून मोकळा झालो होतो! त्यांच्या प्रामाणिक कष्टाचा, एक प्रकारे मी अपमानच केला होता!

    आज पर्यंत मी अनेक दाहक प्रसंगांना सामोरे गेलो आहे. पण अब्दुलच्या ओझरत्या स्पर्शाने जो 'चटका' दिला त्याची दाहकता, अजूनही मनात जिवंत आहे. प्रमोशनने बदली झाली, परळीचे पाश तुटले, अब्दुल हि दुरावला. कधी कधी असे वाटते कि, असेच उठून परळीस जावे, रेल्वेतून उतरून, अब्दुलच्या 'सजी -सवरी ' रिक्षात बसून ', मंदिर चलो ' म्हणावे! पण क्षणात लक्षात येते कि, आज अब्दुल नसेल! त्याची ती रिक्षा हि नसेल! मग ...मग एकदम रिकामं, पोकळ वाटायला लागत! काहीतरी कायमच गमावल्या सारखं उदास वाटत रहात!

    -- सु र कुलकर्णी
    आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय . पुन्हा भेटूच . Bye .