(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • जिनके घर शिशेके होते है…

    काही काही माणसं स्वत:वर इतकं अफाट प्रेम करतात की त्यातुन त्यानां बाहेर येणं जमतच नाही. त्यात त्यांचे स्वत:चे असे काही अंगभूत गूण वैशिष्ठ्यही असतात त्यामुळे अशी माणसं दीर्घकाळ लक्षात राहतात. त्यात ती जर कलावंताच्या कुळीतील असतील तर मग बोलायलाच नको !!!! अनेकदा त्यांच्या विक्षिप्त वागण्याने ते सर्वांचं लक्ष वेधून घेतात. गमंत म्हणजे त्यांच्यावर मना पासून प्रेम करणारा एक मोठा वर्गही असतो. शास्त्रज्ञ, साहित्य, खेळाडू, कलावंत या क्षेत्रातील अनेक नामवंत त्यांच्या विशिष्ट अशा स्वभावामुळे कायम चर्चेत राहतात.

    बलुचिस्थान येथे एका काश्मिरी पंडीताच्या घरात एक देखणे मूल जन्मले. इतर मुलां सारखेच शालेय व कॉलेज शिक्षण घेत मोठे झाले. १९४० च्या दरम्यान या तरूण मुलाला मुंबईतल्या माहिम पोलिस स्टेशनात पोलिस इन्स्पेक्टरची नोकरी लागली. या चौकीतला हा एकदम रूबाबदार व देखणा इन्स्पेक्टर अनेकानां भूरळ घालत असे. मग एक दिवस कुणी तरी त्याला म्हटले -‘तुम तो एकदम हिरो दिखते हो. फिल्मोमे काम क्यूँ नही करते.’ मग काय ? त्याच्याही डोक्यात किडा गेला की मी का प्रयत्न करू नये. पोलिस स्टेशनला अनेकदा चित्रपटसृष्टीतली अनेक माणसे येत असत. यापैकी एक होते चित्रपट निर्माते बलदेव दुबे. या तरूण इन्स्पेक्टरची एक खासियत होती ती म्हणजे त्यांची बोलण्याची विशेष ढब. दुबेला ती जाम आवडली. त्यांनी या तरूणाला चित्रपटात भूमिका देण्याची ऑफर दिली. ज्या क्षणाची हा तरूण वाट बघत होता ताक चालून त्याच्याकडे आला होता. क्षणाचाही विलंब न करता तो हो म्हणाला. दूबे यांनी आपल्या “शाही बाजार” या चित्रपटासाठी मूख्य नायकाची भूमिका त्याला देऊ केली.

    या तरूणाचे नाव होते कुलभूषण पंडित. मागचा पूढचा फारसा विचार न करता मग त्याने चित्रपटासाठी धाडकन् नोकरीचा राजीनामा दिला. ही घटना १९५२ ची. विशेष म्हणजे पूढच्या पाच वर्षात या तरूणाला रंगीली, अनमोल, सहारा, अवसर, घमंड, निलमणी,कृष्ण सुदामा असे चित्रपट मिळाले खरे पण सूर काही सापडेना. कलावंत असो की शाही माणूस पोट नावाचा अवयव त्याला नेहमीच आपल्या ताब्यात ठेवत असतो. नोकरी गेल्यामुळे आथिर्क परिस्थिती पण बिघडली. मग १९५७ मघ्ये मेहबूब खानचा महत्वकांक्षी चित्रपट ‘मदर इंडिया’ आला. हा संपूर्ण चित्रपट नर्गिसच्या राधा या मूख्य पात्रा भोवती केंद्रीत केलेला होता. त्यात तिच्या नवऱ्याची एक छोटीशी भूमिका कुलभूषणला मिळाली आणि त्या छोट्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या चित्रपटा पासून कुलभूषणचा खऱ्या अर्थाने नवीन जन्म झाला व मग सुरू झाला ‘राजकूमार’ या काहीशा विक्षिप्त अभिनेत्याचा चित्रपट प्रवास.

    एस.एस. वासन या दक्षिणेतील प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शकाचा १९५९ मध्ये “पैगाम” हा चित्रपट आला जो सूपरहिट झाला. या चित्रपटात राजकुमार (रामलाल) दिलीपकूमारचा मोठा भाऊ होता. खरे तर राजकुमार ज्या सामाजिक घटकात व परिस्थितीत वाढलेला होता त्याला बरीचशी छेद देणारी भूमिका पैगाम मधील रामलाल या पात्राची होती. रामलाल हा एक सामान्या मील कामगार पण आपल्या भावावर अत्यांतिक प्रेम असणारा व यासाठी अफाट कष्ट करून त्याला शहरात शिकायला पाठवणारा. ही भूमिका त्याने खरोखच मना पासून केली. दिलीप राज या दोन्ही कुमारांनी आपापल्या अभिनयात जान ओतली. त्यांची जुगलबंदी बघावयास मिळाली. पण नंतर मात्र हे दोघे एकत्र कधीच दिसले नाही. दिसले ते थेट ३२ वर्षानंतर सुभाष घईच्या ‘सौदागर’ मध्ये. मी कुठे तरी वाचल्याचे आठवते की पैगाम चित्रपटातल्या एका प्रसंगात राजकुमारला दिलीपकुमारला थप्पड मारायची होती आणि ती त्याने खरोखरीच सणकावून लगावली आणि मग दोघांचा बेबनाव झाला व कधी एकत्र आलेच नाही. असो. अभिनेत्यातील अहंकारी माणूस किंवा माणसातील अहंकारी कलाकार असे अनेकदा आमने सामने येतात तेव्हा असा बेबनाव होणे चित्रपटसृष्टीसाठी काही नवे नाही. त्यानंतर लगेचच आलेल्या दिल अपना प्रित पराई, घराना, गोदान, दिल एक मंदिर, दूज का चांद या चित्रपटांतील सहजसुंदर व नैसर्गिक अभिनयाने राजकुमार यांना अभिनय सम्राटाच्या पदावर पोहचवले. मदर इंडियातील छोट्याशा भूमिकेने सुरु झालेला हा यशस्वी प्रवास अव्याहतपणे सुरु राहिला.

    मग त्यांच्या आयुष्यात १९६५ मध्ये आणखी एक कलाटणी देणारा चित्रपट आला. बी.आर. चोप्राचा भारतातील पहिला मल्टीस्टार चित्रपट ‘वक्त’. बलराज सहानी, राजकूमार, सुनील दत्त, शशी कपूर, साधना, शर्मिल टागोर, रेहमान, मदन पूरी असे सर्वच नामवंत अभिनेते यात होते. चित्रपटात भव्यते सोबत संगीताची मेजवानीही होती. विविध सुंदर लोकेशन्स वरील चित्रीकरण, श्रीमंती थाट व गरीबीचा खास भावूक ड्रामा सर्व काही यात होते. या चित्रपटातील राजकुमारची भूमिका आगोदरच्या सर्व चित्रपटापेक्ष वेगळी होती. कृष्णधवल चित्रपटातील गरीब, कामगार, मध्यमवर्गीय अश्सा चेहरा असणारा राजकूमार या चित्रपटात एकदम लॅव्हीश व्हाईट कॉलर गुन्हेगार म्हणून पडद्यावर आला. जिच्यावर आपण प्रेम करतो ती आणखी कुणावर प्रेम करते आणि योगायोगाने तो आपलाच भाऊ आहे हे समजल्यावर होणारे भावनिक ताणतणाव यात राजकुमार यांनी अप्रतिम साकार केले. या चित्रपटातील त्यांचे सर्व डायलॉग “हम” या शब्दाने सुरू होत किंवा संपत.मात्र या चित्रपटा नंतर ही “हम”ची बाधा त्यानां कायम जडली किंवा बिंबवून घेतली. राजकूमार स्वत:ला ‘हम’ या संबोधना पासून बोलायला लागले ते अखेरचा श्वास घेई पर्यंत. या चित्रपटातील त्यांच्या तोंडचे संवाद हे तुफान लोकप्रिय झाले. संवाद बोलण्याच्या त्यांच्या अंदाजावर प्रेक्षक इतके फिदा होते की ज्या चित्रपटात राजकुमार असत तो चित्रपट कसा का असेना प्रेक्षक डॉयलागबाजी ऐकायला चित्रपटाला तुफान गर्दी करायचे. याच वर्षातला त्यांचे “काजल” हा मिना कुमारी सोबतचा “रिश्तेनाते” आणि “उंचे लोग” हे चित्रपट चांगलेच गाजले.

    भारतीय ग्रामीण नायकाचा चेहरा म्हणून ते अनेक चित्रपटात शोभले. भारतीय संस्कृतीत वडीला नतंर मोठा भाऊ हा वडीलाच्या ठायी असतो. हा भाऊ बहूतेक वेळा कुटूबांसाठी आपल्या अनेक इच्छा व भावनानां दडपून टाकतो. राजकुमार यांचा अशा भूमिकेतील अभिनय खरोखरच अप्रतिम असे. मनाचा होणारा कोंडमारा ते आपल्या अभिनयातुन उत्कृष्ट सादर करत. सोबत त्यांच्या आवाजाचा एक विशिष्ठ पोत आणि संवादफैकीमुळे अभिनय सहज व नैसर्गिक होत असे. खरे तर प्रत्यक्षात ते अत्यंत उजळ कांतीचे अभिनेते होते. कृष्णधवल चित्रपटामुळे त्यांचा रंग फारसा आडवा आला नाही. पण म्हणून कदाचित रंगीत चित्रपटात नंतर त्यांना तशा भूमिका मिळाल्या नसाव्यात.

    चेतन आनंद या निर्माता दिग्दर्शक शिवाय अख्ख्या चित्रपटसृष्टीत या अभिनेत्याचे कुणाशी वैयक्तिक असे सूर कधी जुळले नाही चेतन आनंदच्या सर्व चित्रपटात राजकुमार आणि प्रिया राजवंश हे हमखास असत. चेतन आनंद यांचा ‘हिर रांझा’ (१९७०) हा चित्रपट एक वेगळा प्रयोग होता. या चित्रपटातील काव्यमय संवाद हा त्या चित्रपटाचा आत्माच होता. राजकुमार आणि प्रिया राजवंश या दोघांनही यातील सर्व काव्यमय संवाद अप्रतिमच म्हटले आहेत. हमराज, नई रोशनी (१९६७), मेरे हुजूर, नील कमल, वासना (१९६८), लाल पत्थर, मर्यादा (१९७१), पाकिजा, दिल का राजा(१९७२), हिंदुस्तान की कसम(१९७३), ३६ घंटे(१९७४), एक से बढकर एक (१९७६), बुलंदी व चंबल की कसम (१९८०), कुदरत (१९८१), या सर्व चित्रपटापैकी काही वगळता ते मूख्य नायक जरी नसले तरी त्यांची समातंर भूमिका लक्षणीय असे. १९९१ मधील सुभाष घई निर्मित दिग्दर्शीत “सौदागर” मध्ये ते दिलिपकुमार सोबत पुन्हा दिसले. ९० च्या दशकात चित्रपटाच्या तंत्रात लक्षणीय बदल झाले होते. या दोघांचे समोरा समोरचे प्रसंग शूट करतानां हे तंत्र कामी आले. या चित्रपटात एकाच फ्रेममध्ये हे दोघे क्वचितच दिसतात. चित्रपटात जरी दोघे एकत्र दिसत असले तरी प्रत्यक्षात या दोन्ही अभिनेत्याच्या मनातील अतंर कमी झाले होते का? माहित नाही. पण व्यावसायिक तडजोडी करतानां खाजगी आयुष्य शक्यतो मिसळू देता कामा नये हे अनुभवाने अनेकानां समजते तसे ते या दोघानाही कदाचित समजले असावे. १९९३ मधील काहीसा भडक असणारा “तिरंगा” हा मराठमोळा नाना आणि राजकुमार यांच्यामुळे चांगलाच गाजला. याती दोघांनीही आपापल्या स्टाईलने संवादाची चांगलीच फटकेबाजी केली.

    ८० च्या दशका नंतरच्या बहूतेक चित्रपटात त्यांच्या डायलॉगबाजीने त्यांच्यातल्या सहज सुंदर अभिनयावर मात केली. संवाद फेकीच्या नादात अभिनय लुप्त होत गेला. आयुष्यभरात ६०-६५ चित्रपटात काम करणारा हा अवलिया नट सर्वांच्या लक्षात राहिला तो संवाद फेकीमुळे आणि स्वत:च्या खाजगी आयुष्यात कुणालाच कधीच शिरकाव करू न देण्या बाबत. “दिल एक मंदीर” आणि “वक्त” या दोन चित्रपटाने त्यांना सह कलाकाराचा फिल्मफैअर पुरस्कार मिळवून दिला पण पुरस्कारात त्याना अजिबातच रस नव्हता आपल्या चित्रपट कारकिर्दीत त्यांनी कधीच आपल्या कुटूबांला कुठल्याही सिने पार्टीत् वा शुटींग वा प्रिमियरमध्ये येऊ दिले नाही. आयुष्यभर हा अभिनेता कायम चर्चेत राहिला. अत्यंत लॅव्हिश जगला. चित्रपट सुष्टीत त्यांच्या केसां बद्दल एक चर्चा नेहमी होत असे. त्याना खूप लवकर टक्कल पडले व त्यांनी विग वापरायला सुरूवात केली. हा विग त्यांनी आपल्या केसांच्या मूळ वळणा सारखा हुबेहुब बनवुन घेतला आणि वाढत्या वया सोबत विगचे केसही पांढुरके करून घेतले. स्वत:च्या प्रेमा पडलेला माणूस ही पण त्यांची एक ओळख होती त्यामुळे ही खरीखोटी चर्चा होत असावी. जेनीफर या अंग्लो-इंडियन एअर होस्टेसशी त्यांनी लग्न केले. नंतर जेनिफरने हिंदू धर्म स्विकारला व गायत्री हे नाव घेतले. पूरू, पाणिणी हे दोन मुलगे आणि वास्तविकता ही मुलगी..पूरू ने काही चित्रपटात काम केले पण तो टिकू शकला नाही. राजकुमारने आपल्या मुलाला शेवटची इच्छा सांगितली ती अशी- ‘मौत और जिंदगी इंसान का निजी मामला होता है। मेरी मौत के बारे में मेरे मित्र चेतन आनंद के अलावा और किसी को नही बताना। मेरा अंतिम संस्कार करने के बाद ही फिल्मउद्योग को सूचित करना।’ ‘जानी’ ही दोन अक्षरे राजकुमारची ओळख होती असे म्हटले तर वावगे होणार नाही. तर अशा या झक्की अभिनेत्याचे काही खास संवाद-
    # चिनायसेठ, जिनके घर शीशे के होते है…..,(वक्ता)आपके पांव देखे, बहुत हसीन हैं, इन्हेंग जमीन पर मत उतारिएगा मैले हो जाएंगे……. (पाकीजा)
    # हम तुम्हें मारेंगे और जरूर मारेंगे। लेकिन वह वक्त भी हमारा होगा। बंदूक भी हमारी होगी और गोली भी हमारी होगी…..। (सौदागर)
    # काश कि तुमने हमे आवाज दी होती तो हम मौत की नींद से भी उठकर चले आते….। ('सौदागर')
    # हम आंखो से सुरमा नहीं चुराते। हम आंखें ही चुरा लेते हैं……। (तिरंगा)
    # हम तुम्हें वह मौत देंगे जो न तो किसी कानून की किताब में लिखी होगी और न ही किसी मुजरिम ने सोची होगी…¬¬। (मरते दम तक)
    # हमारी जुबान भी हमारी गोली की तरह है। दुश्मन से सीधी बात करती है………..। ('तिरंगा')
    # दादा तो इस दुनिया में दो ही हैं। एक ऊपर वाला और दूसरा मैं………….।

    …….आज त्यांचा जन्म दिवस. मन:पूर्वक अभिवादन..

    -दासू भगत

    ( ८ ऑक्टोबर २०१८ )

  • मैत्रीचे नाते

    “मैत्री” म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातलं एखादं छानसं जाळीदार पान आहे.जसंजसं त्याचं आयुष्य वाढत जातं तसंतसं त्याच्या सुंदरतेला तेज चढत जातो.आपल्या life index मधला सगळ्यात वरचा कप्पा…

  • नारीशक्ती हीच आदिशक्ती

    प्रसन्न, उत्साही आणि सकारात्मक उर्जेची अनुभूती वातावरणात जाणवते कारण नवरात्रीस आरंभ झाला. आई अंबेच्या अनन्या रूपांना घरारात पुजल जातं कारण ती जगतजननी, विश्वनिर्माती आहे, आदिशक्ती आहे. ज्या आई अंबेचरणी आपण नतमस्तक होतो त्या आदिमायेची अनुभूती ही प्रत्येक घरात आहे ही वस्तुस्थिती आहे.

    वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार सुध्दा ऊर्जेचा प्रथम स्त्रोत " स्त्री" आहे. स्त्री हीच आदिशक्ती, यथाशक्ती आहे. स्त्री ही ऊर्जेचा केंद्रबिंदू नसुन ती स्वतः "ऊर्जाउगम"आहे. प्रत्येक स्त्री मध्ये ही अनन्य साधारण अशी ऊर्जा सामावलेली आहे. आणि म्हणूनच फक्त स्त्री हीच सृजननिर्मिती, सजिवनिर्मिती करू शकते. ती आधिशक्ति नसुन "आदिशक्ती" आहे. म्हणून सृष्टीवर असणार्या तिच्या उपस्थित रूपाचा सन्मान केला पाहीजे.

    नवचैतन्य, नवऊत्साह घेऊन जेव्हा ती कन्या म्हणून घरात जन्माला येते तेव्हा शैलपूत्री म्हणून तिचं स्वागत केलं पाहिजे. विवाहपश्चात कुणाचीतरी अर्धांगींनी होऊन संसार समतोल राखण्याच कार्य जेव्हा स्त्री करत असते तेव्हा तिच्यातलं सतिरूपी, पार्वतीरूपी अस्तित्व मान्य केलं पाहिजे.

    स्वतः मृत्यूच्या मूखात जाऊन जेव्हा ती नवजिवनिर्मिती करते तेव्हा तिच्यातील जगतजननी प्रत्येकाला शोधता आली पाहिजे. इवले इवलेशे हात हातात घेऊन जेव्हा ती अक्षरे गिरवायला शिकवते तेव्हा आपल्याला सरस्वतीचा साक्षात्कार झाला पाहिजे.

    स्वतःच्या गुणकौशल्याने जेव्हा ती कुटूंबाच्या अर्थाजनात हातभार लावते व विवेकबूध्दिने आर्थिक नियोजन करून सदैव संपतीत वृध्दि करते तेव्हा ती निश्चितच लक्ष्मी असते. तिचं अस्तित्व अमान्य झाल्यास , तिची अवहेलना केल्यास जाज्वल रूप धरून बाणेदारपणे समाजाला तिच्या उपस्थितीची जाणिव करून देते तेव्हा तिच्यात दुर्गा जागृत झालेली असते.

    जेव्हा ती सौंदर्यवती , रूपवती होवून जगाला भुरळ घालते तेव्हा ती महामाया असते. चारही बाजूंनी दुराचाराने कुरघोडी केल्यास रौद्र रूप धारण करून संहार करते तेव्हा ती काली असते.........

    घराघरात असणार्या या दैवी रूपाचा सन्मान प्रत्येक पूरूषान केला पाहीजे. देवीच्या मुर्तीसमोर नतमस्तक होताना आपल्या घरातही देवीचं मुर्त रूप आहे याची जाणीव असली पाहिजे. तसेच मीच आदिशक्ती, यथाशक्ती , ऊर्जाऊगम, सृजनकारीनी, जगतजननी, असुरसंहारनी आहे याची अनुभूती प्रत्येक स्त्री ला असली पाहिजे.

    -- श्रध्दा मधुकर पाटील

  • पासपोर्ट : एक सुखद अनुभव

    माझा पासपोर्ट अप्लाय केल्यापासून तिसर्‍या दिवशी तो घरात आला आणि माझ्या डोक्यातल्या सरकारी यंत्रणेला छेद बसला. थोडक्यात म्हणजे गोगलगायच्या गतीने काम करणार्‍या गवरमेंटवरचा विश्वास उडाला. लोकांच्या कामाच्या बाबतीत अतिदक्ष असणारे आपले सरकार एवढे कार्यक्षम झाले असेल ही स्वप्नातदेखील कल्पना नव्हती. मी साध्या पासपोर्टबद्दल बोलतोय. तात्काल नव्हे. जिथे तात्काल पासपोर्ट यायला आठ दिवस लागतात तिथे साधारण पासपोर्ट तिसर्‍या दिवशी घरात? आणि ते ही जुन्या आणि नव्या पासपोर्टवरचा पत्ता वेगवेगळा असताना! निदान पासपोर्ट या सरकारी सेवेची टर उडवण्याचे दिवस आता इतिहासजमा झाले असे म्हणायला हरकत नाही.

    मला दहा वर्षापूर्वीची अवस्था आठवली. पहिल्यांदा एजंट पकडायला लागायचा. तो लेकाचा माझी सगळी ओरिजिनल कागदपत्रे घेउुन गायब झाल्यावर एखाद्या डिटेक्टिवसारखा त्याला हुडकून काढायला पंधरा दिवसात ज्या यातना झाल्या होत्या त्या विचारू नका. नंतर पासपोर्ट गेला खड्ड्यात माझी ओरिजीनल्स तरी परत मिळू देत म्हणून मी देवाकडे प्रार्थना केली आणि देव पावला. किती कागदपत्रे आणि किती फोटो लागायचे!

    आता पासपोर्ट काहीच्या काहीच सुधारले आहे असे बर्‍याचजणांकडून ऐकले होते मात्र मागचा अनुभव पाठीशी असल्यामुळे आयत्यावेळी घोटाळा नको म्हणून मी दहावीपासून आतापर्यंतच्या जेवढ्या म्हणून परीक्षा पास केल्या होत्या त्या सगळ्यांची सर्टिफिकेट्स घेउुन गेलो होतो. तेवढेच नाही तर माझ्या नावावर येणारे लाईटबिल, आम आदमी का आधिकार आधार, पॅनकार्ड, ड्रायविंग लायसेन्स, इलेक्शनचे वोटिंग कार्ड, जुना पासपोर्ट असा सगळा बाडबिस्ताराच घेउुन गेलो होतो. शिवाय अमक्याची झेरॉक्स द्या आणि तमक्याचे ओरिजिनल दाखवा ही भानगड नको म्हणून दोन बंडल झेरॉक्स घेउुन गेलो होतो. काही जरी झाले तरी तिथे कुणाच्याही कचाट्यात सापडायचे नाही हे ठरवले होते. त्यातला एखादा कागद जरी हरवला असता तर तो पुन्हा मिळवणे महामुश्किल होते याची जाणीव मलादेखील होती.

    पहिला पासपोर्ट संपून एक वर्ष उलटून गेले होते. तो रिन्यु करायला टाईम जुळून येत नव्हता. आज उद्या करत एकदाची अपॉईंटमेंट बूक केली. अपॉईंटमेंटदिवशी तिथे गेल्यावर आश्चर्याचा धक्काच बसला कारण काम भलतेच सिस्टेमॅटिक होते. गेटवरच्या वाचमनपासून त्याची सुरवात. आत जाणार्‍या लोकांना वेळेनुसार रांगा करून तो आत सोडत होता. एकदा आत गेले की कोणत्याही नॉर्मल (सिनीयर सिटीझन आणि अतिलहान बालके यांची रांग वेगळी असते) लाईनमध्ये उभे राहून टोकन घ्यायचे. टोकन घेताना तिथले लोक अमाप कार्यक्षम आहेत हे लगेच कळते. पटापट आपल्याकडचे पेपर घेउुन चेक करतात आणि टोकन देतात.

    मग ते टोकन घेउुन पुढल्या ‘ए’ या सेक्शनमध्ये जायचे. हा सेक्शन सर्वात महत्वाचा. कारण तुमचे पेपर, तुमच्याबद्दलची माहिती आणि फोटो ही सगळी कार्यवाही या ठिकाणी पार पडते. पासपोर्टसाठी आता तर पहिल्याप्रमाणे फोटो घेउुन जायचीही गरज नाही. तिथल्या प्रत्येक टेबलावर असणार्‍या डीएसएलआरच्या कॅमेराने फोटो काढले जातात. आपल्याशी गप्पा मारत आपली माहिती सर्व्हरवर अपलोड केलेली कळतदेखील नाही. तिथेच आपला पासपोर्ट कुठपर्यंत पोहोचलाय याची खुशाली मेसेजद्वारे पाहिजे असल्यास केवळ पंचेचाळीस रुपये भरून ती सुविधा घ्यायची सोय आहे शिवाय पासपोर्टसाठी कव्हर हवे असल्यास इथे पैसे भरायचे आणि रिसीट घ्यायची. मग ते पोष्टाने घरी येते.

    पण आॅनलाईन फॉर्म भरताना मी एक छोटासा घोटाळा केलाच होता. जन्मठिकाण आणि जिल्हा या रकान्यात जन्मभूमी आणि जन्मभूमीचा जिल्हा म्हणून सांगलीऐवजी ठाणे अशी चूक माझ्याकडून झाली होती. मी भरलेली माहिती पासपोर्टवर प्रिंट होणार नसल्याने मी बिनधास्त होतो. पण आत गेल्यागेल्या सुरवातीलाच त्या मुलीने माझे नाव, पूर्ण पत्ता आणि शिक्षण विचारल्यानंतर ती माझ्या जन्मगावाकडे वळली. मी ते सांगितल्यावर “हे कोणत्या जिल्ह्यात येते?” अशी विचारणा झाली.

    “सांगली.”

    “मग तुम्ही ठाणे लिहून आणले आहे.”

    मी स्वत:ची अक्कल लावून सांगलीतल्या जागेवर ठाण्याची जागा म्हणून कब्जा केल्यामुळे गप्प बसलो. मग बहुधा माझी दया येउुन तिने दोन जिल्ह्यांमधला प्रादेशिक तिडा सोडवून नीट केला. वास्तविक चूक लक्षात आल्यावर मीही तो सोडवायचा प्रयत्न केला होता पण मला ती माहिती बदलता आली नव्हती. तिने त्या सगळ्या कागदपत्रांपमधून लाईटबिल, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि पासपोर्टच्या झेरॉक्स घउुन बाकीचे काही नको म्हणून सांगितले आणि केवळ तीच कागदपत्रे पुढच्याही सेक्शनमध्ये दाखवा म्हणून बजावले.

    टोकन नंबर दिसण्यासाठी जागोजागी डिस्प्ले लावलेले आहेत. त्याही आकड्यांनी लोक बावरून जाउु नयेत म्हणून मदत करायला स्वयंसेवकही आहेत. कोणत्या टोकनचा नंबर आलाय हे ते मोठ्याने सांगतात. त्यामुळे शक्यतो चुकायला होत नाही. पुढे ‘बी’ आणि ‘सी’ सेक्शनमध्ये जाउुन तिथल्या साहेबांना तीच कागदपत्रे दाखवली. कागदपत्रे वेगवेगळ्या रंगाच्या पेनने चेक करून पुन्हा ती आपल्याच हातात देण्यात येतात. शेवटच्या सेक्शनमध्ये माझ्या जुन्या पासपोर्टवर पंचने छिदे्र मारून साहेबाने तो खराब केला आणि “झाले आता, निघा.” म्हणून त्यांनी मला बाहेरचा रस्ता दाखवला.
    ती चेक केलेली कागदपत्रे माझ्याच हातात होती. हा बाबा तर “झाले. बाहेर जा.” म्हणतोय. पुन्हा विचारावे म्हटले तर तो उत्तर सांगायच्या मूडमध्ये दिसत नव्हता म्हणून सगळी लोक जाताहेत तिकडे गेलो. एक्झिट दरवाजावर उभ्या असलेल्या वॉचमनला विचारल्यावर त्यानेही बाहेरचाच रस्ता दाखवला.

    त्या सर्वांनी चेक केलेला माझी ओळख, शिक्षण आणि कुठे रहातोय या पुराव्यांच्या झेरॉक्सचा गठ्ठा माझ्याकडेच होता आणि वॉचमनही तेवढ्याच निष्काळजीने बाहेर जा म्हणाल्यावर मी त्याला हातातले पेपर कुठे द्यायचे म्हणून विचारले.

    “तुमच्याकडेच ठेवा.” असे उत्तर आले.

    म्हणजे त्या सगळ्यांकडून पेपर तपासून घ्यायचे आणि तो बंडल घेउुन आपण घरी यायचे. पुढे पासपोर्टचे काय होईल माहित नाही, हे मला पटण्यासारखे नव्हते.

    “पासपोर्ट नक्की घरी येईल ना?” म्हणून विचारल्यावर तो माझ्याकडे “काय येडा माणूस आहे, एवढ्यांदा सांगितले तरी कळत नाही.” अशा नजरेने पहात होता. डोक्यात डाउुट घेउुन बाहेर रिक्षात बसतो की नाही एवढ्यात पासपोर्ट सेवा केंद्राचा “तुमचा पासपोर्ट प्रिंटींगसाठी पाठवण्यात येत आहे.” असा मेसेज आला. मी ट्राफिकजाममधून घरी पोहोचतो की नाही तोपर्यंत “तुमचा पासपोर्ट प्रिंट झाला.” म्हणून मेसेज. पुन्हा थोडा वेळ गेल्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशनचा मेसेज आणि संध्याकाळी साक्षात पोलिसांचा फोन! “तुमचा पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी आला आहे. तुमची सगळी कागदपत्रे घेउुन उद्या सकाळी अकरा वाजता पोलीस स्टेशनला या.”

    या सर्व गोष्टी काही तासांत घडल्या हे पचवणे माझ्यासारख्याला खूप जड जात होते. मग मी पोलीस स्टेशमध्ये देण्यासाठीची सोसायटीची एनओसी तेवढी घेतली. बाकीच्या झेरॉक्स होत्याच. मला कुठल्याही सरकारी आॅफिसमध्ये जाताना काहीही कारण नसताना उगाचच भीती वाटते. म्हणजे एकेक अनुभवच तसे आहेत. कुठलीही कागदपत्रे घेउुन जा, जो नसतो नेमका तोच कागद विचारला जातो. बरं पराभव मान्य केला तरी पुरेसे नाही. हे लोक त्यांच्या आॅफिसमधून आपल्याला आउुटच करतात.

    बरोबर अकरा वाजता आमच्या एरियात झालेल्या चकचकीत पोलीसस्टेशनमध्ये वेळेआधीच गेलो. उगाच लफडी नकोत. खिडकीत बसलेल्या एका हवालदारमामांना “पासपोर्ट व्हेरीफिकेशन?” म्हणून विचारल्यावर त्यांनी दुसर्‍याबाजूने आत जा म्हणून सांगितले. दुसर्‍या बाजूने आत गेल्यावर मी कुठल्यातरी भलत्याच आॅफिसमध्ये प्रकटलो आणि तिथले सगळेजण माझ्याकडे “आता हा आणि कोण आला?” अशा नजरेने पाहू लागले. काहीतरी घोटाळा होता म्हणून तसाच बाहेर आलो पुन्हा “दुसर्‍या बाजूने आत..” असे दोनदा स्वत:शीच पुटपुटत ज्या गुप्तमार्गाने घुसलो ते समोर मुद्देमाल कक्ष लिहीलेल्या दरवाजाजवळ निघालो. समोरून एक हवालदार “अहो, तुम्ही इकडे काय करताय?” म्हणून ओरडल्यावर आपण नको त्या ठिकाणी अतिक्रमण केले आहे याची मला कल्पना आली. त्यांना काहीही उत्तर न देता अक्षरश: तिथून बाहेरच पळालो. मग तिथे उभा असणार्‍या एका जाणकार माणसाला विचारून खात्री करून घेतल्यावरच पुढल्या आॅफिसच्या दिशेने पाउुल उचलले.

    दहा मिनीटांत पोलीस व्हेरीफिकेशन झाले. दोनतीन ठिकाणी माझ्या सह्या घेउुन व्हेरीफिकेशन फॉर्मवर फोटो चिकटवण्यात आले. पोलीसमामांच्या टॅबने माझा फोटो घेण्यात आला आणि त्याचदिवशी संध्याकाळी “तुमचा पासपोर्ट डिस्पॅच झाला.” असा मेसेज आला आणि माझा सरकारी यंत्रणेवरचा विश्वासच उडाला.

    आॅफिसमध्ये असताना दुसर्‍यादिवशी बाराच्या आसपास बायकोचा फोन आला, “वॉट्सअप चा मेसेज बघून लगेच कॉल करा.” अशी आॅर्डर होती.

    बायकोला स्मार्टफोन घेउुन दिल्यापासून अमेझॉन, फ्लिपकार्टवरच्या लेटेस्ट आॅफर्स, नको असलेली फर्निचर युनिट्स वगैरे पहावे लागते. अगदीच काही नसलं तरी ही फेसबुकवरच्या हजारो फोटोंपैकी कुठलेतरी इंटेरियरचे फोटो पाठवते आणि “आपण आपल्या घरी तसे करून घ्यायचे.” असे टुमणे मागे लावते. आता काय पाठवले आहे म्हणून मी मेसेज उघडला तर परवा जो पासपोर्ट रिन्यू करायला मी अपॉईंटमेंट घेतली होती त्या पासपोर्टचा खराखुरा फोटो होता. अवघ्या अठ्ठेचाळीस तासात पासपोर्ट घरी पोहोचवून एका सरकारी आॅफिसने सरकारी यंत्रणा किती कार्यक्षम असू शकते याचा प्रत्यय दिला होता.

    “विनात्रासाचा एवढ्या लवकर निघतो तर आमचाही पासपोर्ट काढून घ्या ना.”

    आता ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब,’ ही सबबही उरली नव्हती कारण झालेल्या घटनांची साक्षीदारही तीच होती.

    © विजय माने, ठाणे
    http://vijaymane.blog

  • सावली प्रेमाची

    अॉफीसमधून घरी आल्यावर नेहमीप्रमाणे बॅग बायकोकडे दिली व फ्रेश व्हायला गेलो. पंधरा मिनिटांत फ्रेश होऊन किचनमधे आलो. तो पर्यंत अंजूचे पोहे तयार झाले होते. मी व अंजू पोहे खात होतो त्याचबरोबर तिची चहाची तयारी चालू होती. मी म्हणालो “अग पोहे तरी शांतपणे खा मग चहा कर.” नको, मला आता इतके वर्ष तुमच्या बरोबर राहून माहिती झालंय की पोहे संपले की शेवटच्या घासाबरोबर तुम्हाला चहा प्यायला आवडतो.

  • मला भावलेला युरोप – भाग २

    खरं म्हणजे युरोप विषयी लिहितांना युरोपियन लोकांचे शिष्टाचार, शिस्त,स्वच्छता, त्यांची रहदारीची पद्धत, त्यांनी आत्मसात केलेले तंत्रज्ञान वगैरे गोष्टींवर प्रकाश टाकला नाही तर ते अन्यायकारकच ठरेल.

  • अॅडव्होकेटांची बासुंदी

    वकिली सोडून देऊन अ‍ॅडव्होकेट चार दिवस सुन्न बसले होते. मग त्यांच्या डोक्यात मराठवाड्यात लग्नांच्या जेवणावळीत बर्‍यापैकी माहीत असलेली कानविंद्यांची बासुंदी चमकून गेली. तशी बासुंदी करून विकली तर? नक्कीच पुण्यात फेमस होईल! चितळेंच्या बाकरवडी सारखी! किंवा कयानीच्या श्रूजबेरी बिस्किटांसारखी! आणि अशा तर्‍हेनं ‘अ‍ॅडव्होकेटांच्या बासुंदी’चा उदय झाला होता.

  • लाल्या

    गावखेड्याची वास्तव कथा..

  • ख्याली – खुशाली

    साधे -सुधे पोस्त कार्ड , आंतरदेशीय-पत्र  आणि पाकिटे ” यातून एकमेकांना ख्याली-खुशाली “कळवली जात असे. घरातील वडीलधार्या व्यक्तींनी पत्रातील मजकूर वाचून सगळं खुशाल आहे बरं का ! असे भरल्या आवाजात सांगितले की ..भरलेले डोळे पदराने कोरडे करून मोठ्या समाधानाने ..घरातली  बाई-माणसं पुन्हा कामाला लागत .

  • रंगछटा

    प्रश्न नेहमीच सोपे असतात. अवघड असतं ते उत्तर. इतरांना द्यायच्या उत्तरापेक्षा मनाला देण्याचं उत्तर जास्त अवघड!कारण सगळचं त्यातल्या मूळ रंगछटासह स्पष्ट आपल्या मनात असतं. पण तरिही