नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
सांग मी नसेल तर काय करशील..
कोणाच्या नजरेत पाहशील,
कोणाच्या आठवणी जपशील,
कोणाची मैत्रीण म्हणुन मिरवशील,
सांग मी नसेल तर काय करशील..
कोणाचे लाड़ पुरवशील,
कोणाचे गालगुच्चे घेशील,
कोणाला तु माझाच आहेस असं म्हणशील,
सांग मी नसेल तर....
बाईकवरुन फिरताना कोणाच्या
खांद्याचा आधार घेशील,
कोणासोबत चाँकलेटचा अस्वाद घेशील,
सांग मी नसेल तर....
समुद्रकाठी फिरताना कोणाचा
हात पकड़शील,
दुःखात जेंव्हा सापड़शील तेंव्हा
कोणाच्या मिठीत शिरशील,
गर्दझाड़ीतही निर्भीड़पणे कोणासोबत
बसशील,
सांग मी नसेल तर....
कोणाच्या चेहर्यावरचा घामसुध्दा
स्वताच्या रुमालाने पुसशील,
कोणासाठी घासातला घास
आठवणीने काढ़शील,
सांग मी नसेल तर....
मोबाईलमध्ये बँलंन्स असुनही
कोणाला मिस्ड़काँल करशील,
स्वताचं पोट भरल्यावरतरी
कोणाला केक पुरवशील,
कोणासोबत ऐका ताटात बसशील,
ऐका नारळातलं पाणी दोन स्टाँच्या
मदतिने कोणासोबत पिशील,
सांग मी नसेल तर....
संध्याकाळी अंधारातुन घरी
जेंव्हा परतशील,
ओरड़ा आईचा वाचविण्यासाठी
कोणाचं नाव सांगशील,
झाड़ असेल पण कळी नसेल
मग फुलाचं काय करशील,
खरंच सांग मी नसेल तर....
प्रमोद पाटील
(ओन्ली फाँर हर)
-- प्रमोद पाटील
श्रीमंत पेशवे बाजीराव मस्तानी ही मालिका अफाट लोकप्रियता मिळवून संपली, या मालिकेचे दिग्दर्शक विजय राणे यांचा परिचय.
दरबारात कुत्रे नुसते भुंकायचे नाही तर कधी कधी साखळी तोडून मंत्री आणि सरदाराना चावायला कमी करायचे नाही. पण यात कुत्र्यांची काहीच चुकी नव्हती. कुत्रे म्हणजे एकनिष्ठ आणि आज्ञाकारी. आपल्या दिव्यचक्षुंनी घोटाळेबाज मंत्री आणि सरदाराना ओळखून राजाला सावध करण्यासाठी ते मंत्र्यांवर भुंकायचे. पण त्यांस काय माहित, अधिकांश घोटाळ्यामागे राजाचे आणि राणीचे नातलग असल्यामुळे, राजाला माहित असूनही राजा दुर्लक्ष करायचा. पण कुत्र्यांच्या ह्या भुंकण्यामुळे, मंत्री आणि सरदार घाबरायचे त्या मुळे राजसभेचे कामकाज नेहमीच अर्धवट राहायचे. आणि एक दिवस तर कहरच झाला, कुत्रे शयनग्रहात चक्क ‘राणी’ वर भुंकले……
घेउनी सोबत ‘गीता’???
समुद्र आणि धरतीचे असे अद्भुत मीलन पाहून कवींनी मेघ आणि धरतीच्या प्रेमावर लांखो कविता रचल्या असतील पण त्यांस काय माहित मेघांमध्ये असते समुद्राचे काळीज…..
चिऊताइंचा दार न उघडण्याचा निर्णय तर कावळेदादांचा दार उघडण्याचा निर्णय हा आपापल्या परीने योग्यच होता.
आधुनिक वाल्मीकी ग.दि.माडगूळकरांच्या जीवनातील अनेक अज्ञात ह्रदयस्पर्शी प्रसंग…..
सर्वाना आपली आजी खुप आवडत असते. जेथे फक्त प्रेम व माया भरपूर प्रमाणात तुमच्यावर सतत बरसत असते. त्यात कोणताच राग नसतो. शिस्त लावण्याची गरज भासण्याची वृत्ती नसते. कोणताही लोभ व्यक्त झालेला दिसत नाही. फक्त निर्मळ प्रेम. वासना विकार रहीत. कदाचित हे वयाचे व परिस्थितीचे गुणधर्म असू शकतील. आजी म्हणून ती जी भूमिका करते, ती एकदम त्यात एकरूप होऊन गेल्या प्रमाणे भासते. लहान मुलगी कुमारिका विवाहित स्त्री माता, ह्या सर्व भूमिका, तिने जगाच्या व्यासपिठावर केलेल्या असतात. तिने जीवनाचा संसारिक अनुभव अनेक प्रसंगातून घेतलेला असतो. आजपर्यंत ती जीवनाची गाठोडी, केवळ जमा करण्यातच व्यस्त होती. आज्ञा ऐकणे पाळणे, वा करणे, ह्याच कार्यचक्रात ती गुंतलेली होती. आता ती परिपक्व भूमिकेत आलेली आहे. येथे जे जे आजपर्यंत जमा केलेले होते ते सारे वाटीत जाणे आता तिचे काम झाले आहे. निसर्ग चक्रानुसार घटनाची सतत पुनुरावृती होत असते. तशाच गोष्टी थोड्याश्या फरकाने होत असतात. ज्या इतरांना सर्वस्वी नवीन व वेगळ्या वाटणाऱ्या असतात, त्याचा आंतरिक गुंता आजीच्या अनुभव चौकटी मधलाच असतो. त्यामुळे त्याचा धागा तिच्या लक्षात येत असतो. अनुभवाच्या मार्ग दर्शनाचे पैलू येथेच मदत करतात.
मराठी चित्रपटसृष्टीतच नव्हे तर एकूण भारतीय चित्रपटसृष्टीतच दर्जेदार चरित्रपटांची वानवा आहे. शंभर वर्षांची परंपरा सांगणार्या भारतीय चित्रपटसृष्टीला खरं तर अशोभनीय अशी ही बाब आहे. परंतु, ही बाब ठळकपणे जाणवून देणारी एक आशादायक घटना म्हणजे ‘“बालगंधर्व”’ हा चित्रपट!
आपल्या श्रीमतीची रेसिपीज टाईप करताना सुचलेली वात्रटिका, तशी ती माझ्या कविता कधीच वाचत नाही (माझे सौभाग्य), पण तिने ही वात्रटिका वाचली तर काय होईल…
Copyright © 2025 | Marathisrushti