नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
त्या वेळी मी नुकताच जपान दौर्याहून परतलो होतो. जपानमध्ये वावरताना तेथील महागाईचा विचार मनात असे अन् स्वाभाविककपणे सारे हिशोब रुपयांत होत असत. पुण्याला आल्यानंतर रस्ते, वाहतूक इथली आणि स्वच्छता, टापटीप, शिस्त या बाबी जपानच्या, अशी तुलना सतत होत असे. एका अर्थानं मी पुण्यात सरावत चाललो होतो.
‘हे असंच चालायचं’ हे वाक्य जवळचं वाटू लागलं होतं. त्या वेळी मी पुण्यापासून वीस किलोमीटरवर निगडी येथे राहत असे अन् रोज बसने प्रवास करीत असे. पुण्याच्या पालिका बस स्टॅन्डवरून पिंपरी-चिंचवड-निगडीसाठी बस निघत. तर, असाच एकदा निगडीला जाण्यासाठी म्हणून बस स्टॉपवर आलो. बरीच मोठी रांग होती, पण बस डबलडेकर होती, ती मिळण्याची शक्यता अधिक होती... पण तसे व्हायचे नव्हते. दहा-बारा प्रवाशांसह मला खालीच थांबावे लागले. आता किमान वीस मिनिटांची प्रतीक्षा होती. एकूणच बस स्टॅन्डही काहीसा आळसावलेला होता. हालचाली कमी होत्या; कारण एवढ्यातच सर्व बस मार्गस्थ झालेल्या होत्या. बस स्टॅन्डवरच्या दुसर्या रांगेत मी होतो. तोंडात पान चघळत होतो. अचानक माझ्या समोरच्या रांगेतल्या एका प्रवाशानं काही हालचाल केली अन् बस स्टॉपवर, जिथं बस उभी राहते तिथं एक लांबलचक लालभडक पिचकारी आकाराला आली. त्या प्रवाशानं त्याच्या रंगत जाणार्या पानाचा मुखरस स्वतःच्या कौशल्यानं रेखाटावा तसा बाहेर फेकला होता. काळ्याभोर डांबरी रस्त्यावर लालभडक पानाची पिचकारी आकाराला आली होती. दिसायला ते फारच विचित्र दिसत होते, पण त्या प्रवाशाला किवा इतरांना त्यात वेगळे असे काही वाटत नव्हते. स्टॅन्डवर जो कंट्रोलर असतो तो बहुधा या सार्या घटना त्याच्या छोट्याशा खोलीतून पाहत असावा. हे सारं झाल्यानंतर तो बाहेर आला. त्यानं त्या संभावित प्रवाशाकडे एक कटाक्ष टाकला अन् वळला. बाजूला गेला. तो प्रवासी क्षणभर हबकला, पण नंतर मनाच हसला. मी मात्र तोंडात पान असल्यानं उगाचच वरमलो. तो कंट्रोलर बाजूला गेला, जिथं बसमध्ये पाणी घालण्यासाठी झार्या ठेवलेल्या असतात तिथून त्यानं एक झारी घेतली. ती पाण्यानं भरून काढली अन् ती झारी घेऊन तो जिथं रंगारंग झालेलं होतं तिकडे चालू लागला. स्वच्छतेची आच असली की माणूस काय करू शकतो, असा भाव तोवर प्रतीक्षा करणार्या प्रवाशांच्या मनात आला असावा. पण, तो जवळ येऊन थांबला, त्यानं ती झारी तिथंच ठेवली, पुढे येऊन म्हणाला, ‘‘ओ, मिस्टर, या पुढं. घ्या ती झारी अन् साफ करा ते सारं.’’ हे त्या प्रवाशाला आणि आम्हालाही अपेक्षित नव्हतं; पण घडलं. मी पिचकारी मारली नाही, असं रेटून बोलण्याची संधीही त्या कंट्रोलरनं दिली नाही. तो प्रवासी निमूटपणे पुढे आला. हातात झारी घेऊन त्यानं स्वतःच्या मुखरसानं रंगलेला रस्ता स्वच्छ केला आणि आपल्या जागेवर येऊन बसला. अवघ्या दहा मिनिटातला हा सगळा प्रसंग, पण त्या प्रवाशाला त्याची चांगली अद्दल घडली होती. कधी काळी पान खाऊन तोंड रंगवणार्या मलाही ‘आपण किती पाण्यात’ याची जाणीव झाली होती. बस स्टॉपवरचा प्रत्येक माणूस त्या कंट्रोलरकडे अत्यंत आदरानं, विस्मयानं पाहत होता. तो प्रवासी मात्र आता बस लवकर येऊ देत, अशी प्रार्थना करीत असावा.
हे सारं आज आठवण्याचं कारणही तसंच आहे. आजच्या वृत्तपत्रात एक वाचकाचं पत्र वाचलं. एका वृद्धानं लिहिलंय ते. पत्रातच त्यांनी स्वतःचं वयही दिलंय. ते म्हणतात, ‘‘पुण्यात किवा महाराष्ट्रात हेल्मेटची सक्ती करण्याचा कायदा झाला. त्यावर आंदोलनं झाली, तरीही कायदा अस्तित्वात आला. काही दिवस कारवाईच्या बातम्या येत असत. आता त्याही बंद झाल्यात. पुण्यातील हेल्मेटसक्ती रद्द झाली आहे का, कृपया संबंधित खात्यानं खुलासा करावा.’’ हे पत्र वाचताना पुण्यात हे असं पत्र येणारच असं मनात येत होतं; पण हेल्मेटच्या सक्तीसाठीचं या वृद्धानं दिलेलं कारण आणखीही ज्ञानात भर टाकणारं होतं. पत्रात म्हटलं होतं, की हेल्मेट वापरणार्या व्यक्तीला दुचाकीवर बसून पान, तंबाखू किवा अशीच पिक मारता येत नाही. स्वाभाविकपणे माझ्यासारख्या वृद्धाचे कपडे रंगण्याचं प्रमाण कमी होण्याची शक्यताही आता हेल्मेट वापराचं प्रमाण संपल्यानं मावळली आहे. ते असंही म्हणतात, की मी मोपेड वापरतो. या वयात तेच सोईचं पडतं, पण अशात कोणी पिक मारली, तर वेगानं जाऊन त्याची गच्ची पकडण्याची क्षमताही आता नाही; तेव्हा हेल्मेटचा हाही एक लाभ होता.
-- किशोर कुलकर्णी
दाखल झालेले होते. माझी थोरली बहीण आणि मी असे आम्ही दोघं
मुलं. आई-वडील खूश होते. दुष्काळी भागातील शेती सोडून
बसले.
त्या वेळी शिर्डी एवढी विस्तारली नव्हती अन् गर्दीचा तर प्रश्नच नव्हता. घरी जावं का? गेलो तर घरी काय सांगावं की
-- किशोर कुलकर्णी
शब्द अन् त्याचे अर्थ याविषयी खरं तर खूप काही बोलता, लिहिता येईल; पण त्याची ही जागा नव्हे आणि तसा हेतूही. तरीही संवादासाठी शब्दांचा आधार घ्यावाच लागतो. जेव्हा तुम्ही अशा देशात किंवा प्रदेशात जाता तेव्हा शब्दही मुके होऊन जातात. रशिया, जपान एवढंच काय दक्षिणेतल्या ग्रामीण भागात गेल्यावर शब्दांना अर्थ उरत नाही आणि मग अभिनयाचा कस लागतो. तरीही आपण बोलतो. म्हणजे शब्दाचा वापर करतो. काही वेळा वाटू लागतं शब्दांना अर्थ प्राप्त होण्यासाठी संस्कार व्हावे लागत असावेत. ज्यावेळी लहान मुलांना बोलताही येत नसतं त्यावेळी ते सभोवतालच्या संभाषणाचा, संवादाचा अन् शब्दांचा अन्वयार्थ लावत असावेत. `तू छान दिसतोस' आणि `घाण दिसतोस' यामध्ये केवळ एका शब्दाचा फरक आहे; पण तो एखाद्याचे भावविश्वच बदलून टाकू शकतो. भाषासंस्कारानुसार त्याचे परिणामही बदलतात. कोल्हापूर भागात `रांडच्या' हा शब्द प्रेमानं वापरला जातो. त्यातला जिव्हाळा सर्वत्र सारखाच असेल असं नव्हे. याचाच अर्थ या शब्दाबद्दलचे संस्कार सर्वत्र समान नसावेत. तुमच्या मनात सहजी आलं असेल, की शब्द, अर्थ आणि संस्कार अशी ही एवढी प्रस्तावना कशासाठी? पण त्याला कारणही तसंच आहे, संदर्भही शब्द, अर्थ अन् संस्काराचे आहेत. परवा `वसंत विशेष' या `लोकमत'च्या उन्हाळी विशेष पानासाठी मी काही लिहावं अशी सूचना माझ्या सहकाऱयानं केली. त्याला म्हटलं, ``तू सांग. काय हवं ते लिहून देतो.'' तो म्हणाला, ``आयुष्यात एखादी गोष्ट हरवून जाते अन् मग कधी तरी आठवते, त्या गोष्टीची रूखरूख वाटत राहते, असं काही तरी लिहा.'' मी ``हो'' म्हटलं; पण अशी एकही घटना, गोष्ट, प्रसंग किंवा इप्सित आठवेना, की जे हरवून गेलेलं असावं. एखादी गोष्ट हरवलीय म्हटलं, की ती आपली होती असं वाटू लागतं किंवा तो क्षण तरी पुन्हा जगावासा वाटतो; पण कसं शक्य आहे ते? ज्या क्षणाला ही अक्षरं उमटली तोच क्षण पुन्हा मिळत नाही म्हणून तर त्याला आयुष्य म्हणतात, जीवन म्हणतात. पाण्याच्या प्रवाहात पाय टाकून बसतो आपण आणि आपल्या पावलांना पाण्याचा स्पर्श सुखावून जातो. हाच आनंद अनेकवेळा घेता येतो माणसाला; पण पाण्याचे तेच बिंदू पुन्हा तेच असतील का? तसंच काहीसं क्षणांचं आहे. ते क्षणोक्षणी हरवतच असतात.
-- किशोर कुलकर्णी
हसणं. किती साधी, सोपी कृती! पण कित्येकदा आपण ती विसरून जातो. कधी कधी तर आपल्याला आपण हसलो तर आपली प्रतिष्ठा हरवते की काय असे वाटते.
माणसाचं मन, मन म्हणजे नेमकं काय असावं? कुठे असावं ते? मेंदूत की हृदयात? की कोठेच नाही?
सदिच्छा. एक शब्द. भावना व्यक्त करणारा. सद्-इच्छा, चांगली इच्छा, काय बळ आहे या शब्दात? अनेक वेळा प्रश्न पडतो.
वर्षापूर्वीची गोष्ट. आर्थिक व्यवहारात फसल्याने माझ्या एका मित्राला कोर्टाचा दरवाजा खटखटावा लागला. `खरे तर कोर्टाची पायरी नको रे बाबा' हे सगळ्याच सामान्य माणसांचे सूत्र. तर हे महाशय कोर्टात गेले. न वटलेल्या चेकची ती केस. अर्थातच फौजदारी. प्रतिपक्षही काही कमी नव्हता. त्यांनी माझ्या मित्रावर फसवणुकीचीच फिर्याद ठोकली. `एक तर कोर्टाची पायरी चढू नये; अन्यथा सर्व काय ते सहन करावे.' हे सांगण्यासाठी सोपे आहे; पण प्रत्यक्षात अशा प्रसंगाने काय होते, याचा अनुभव मी या माझ्या मित्राबरोबर घेतला. आपण फसवणूक केलेली नसताना आपल्यावर आरोप? आपले पैसे अडकलेले असताना हा मनस्ताप? या आणि अशा प्रश्नांनी मित्राचे सारे कुटुंबच अस्वस्थ झालेले. आता काय करावे? काय करायला हवे? आपल्याला कोण, कसे प्रश्न विचारतील? लोक काय म्हणतील? समाजातल्या माणसांचा माझ्याबद्दल काय ग्रह होईल? कोणता वकील द्यावा? की दोन द्यावेत? आपल्याला जो ताण येतो तो वकिलांना नाही का? ते पैसे घेऊन मोकळे? असे अनेक प्रश्न सर्वच अस्वस्थ करणारे, ताण वाढविणारे, झोप उडविणारे...त्या घटनेनंतरची ही गोष्ट. न्यायालयीन कामासाठी मी विदर्भात गेलो होतो. प्रकरण फौजदारी होते. कोर्टाने कळवूनही मी हजर राहू शकलो नव्हतो. आता हजर राहणे आवश्यकच होते. वॉरंट काढले गेले होते. हजर राहून ते रद्द करून घेणे आवश्यक होते. पुढील तारखांना हजर न राहण्याची परवानगीही मिळवायची होती. प्रकरण फौजदारी आणि वेळ अटक होण्यापर्यंत आलेली; पण माझ्या मनात तणावही नव्हता किंवा अस्वस्थताही! न्यायालयाचे काम सुरू असताना आणखी एक लक्षात आले, की आणखी एका फौजदारी प्रकरणातही मी `वॉन्टेड' होतो. त्याचे समन्स आजच बजावले जाण्याची शक्यता होती. तसे ते झालेही. त्याचा स्वाभाविक अर्थ होता तो तातडीने जामीन घेणे, तो नसेल, तर रोख रकमेची हमी घेणे, वगैरे.
अखेर कोर्टातील माझी दोन्ही कामे आटोपली. जामीन मिळाला आणि अन्य तारखांना अनुपस्थित राहण्याची संमतीही. न्यायालयात येतानाही मी तणावरहित होतो आणि जातानाही. प्रवासात एकच विचार येत होता. मित्राच्या प्रकरणात मित्रच नव्हे, तर त्याचे सारे कुटुंब अस्वस्थ होते. काही काळ का होईना, मीही अस्वस्थ होतो. मग या आपल्या प्रकरणात ती अस्वस्थता, तो तणाव का येऊ नये? तो का नसावा? उत्तरेही पटापट येत होती. हे न्यायालयीन प्रकरण माझ्या कार्यालयीन कामाचा, कर्तव्याचा एक भाग होता. त्यात काहीही झाले, तरी त्याचा माझ्यावर परिणाम होणार नव्हता. या प्रकरणात जो शारीरिक त्रास अपेक्षित असतो, त्याबद्दलही अस्वस्थता नव्हती, तोही तुमच्या कर्तव्यपालनाचा भाग असतो. त्यात स्वार्थ किंवा हितसंबंध नाहीत आणि स्वाभाविकपणे त्याच्या वेदना, अस्वस्थताही नाही. या उलट मित्राच्या प्रकरणामध्ये मात्र हा तणाव, यातना, अस्वस्थता होती. मित्राला ती असणे हे स्वाभाविक होते; कारण त्याची मोठी रक्कम अडकलेली होती. ती मिळेल ना? त्रासाशिवाय मिळेल का? आणखी काही गुंतागुंत होईल का? या त्याच्या चिंता व्यक्तिगत हितसंबंधातून निर्माण झालेल्या होत्या. याच स्थितीत वर्तमानाचा स्वीकार केला, तर या यातनांचा प्रभाव, परिणाम आणि कालावधी कमी होण्याची किंवा या यातनाच न होण्याचीही शक्यता असते. अर्थात, त्यासाठी तुमची अवस्था जीवनमुक्त असायला हवी. त्या अवस्थेत राहतो तो केवळ आनंद आणि निखळ आनंद. आपले काय अन् किती पणाला लागले आहे? त्यासाठी किती किंमत मोजायची आणि त्यासाठीचे मार्ग, उपाय काय, हे कळणे, हाही जीवनमुक्ततेचाच टप्पा आणि कर्तव्ये. म्हणून, कर्म करीत जाणे आणि फळासाठी त्या परमेश्वरावर अवलंबून राहणे ही जीवनमुक्त अवस्था. साध्या भाषेत सांगायचे, तर एखाद्या प्रश्नाचा वस्तुनिष्ठ विचार करणे आणि त्याच्या हितसंबंध-स्वार्थ यांच्या वलयापासून दूर राहण्यातच खरे समाधान लाभत असावे. मी विचार करू लागलो. कर्तव्यपालनात माझ्यावर आलेला प्रसंग स्वार्थातून आला तर? माझ्या मित्राने त्याच्यावर आलेला प्रसंग कर्तव्यभावनेने पाहिला तर?
-- किशोर कुलकर्णी
आज त्यांना कदाचित हा प्रसंग आठवणारही नाही. खरं आहे, अमृतवर्षावाला थोडंच माहित असतं, की, अमृत कुठं कुठं साडतं आहे. पण तो वर्षाव, त्या कणांना टिपण्याचं भाग्य लाभलेल्या आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या आयुष्याला अमृतमय करतो!!
माणसाच्या आयुष्यात सतत, वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी कोडी येत असतात. त्यातली काही सोडविता
येतात तर काही नाही. वृत्तपत्रातल्या कोड्यांचं तसं नसावं. एक तर ती सहजी सुटतात. आपल्यालाही कोडी सोडविता येतात, हा
विश्वास बळावतो अन् मग तो पुन्हा नव्या कोड्याची प्रतीक्षा करीत राहतो. ही कोडी सोडविताना वास्तवातल्या कोड्यांचं काय, हा
प्रश्न मनात अजूनही कायम आहे. पाहा, तुम्हाला उत्तर सापडतंय का?
त्या वेळी मी पुण्यातल्या वाडिया कॉलेजमध्ये शिकत होतो. रविवार पेठेत मावशीकडे राहण्याची सोय होती अन् काही तरी रोजगार मिळविण्याचे प्रयत्न असत. घरचा, आई-वडिलांचा आधार नव्हता असं नव्हे; पण स्वत कमवावं आणि शिकावं अशी प्रवृत्ती होती. माझ्या मावशीच्या हाताला खूप चव होती. तिनं काहीही करावं अन् ते सर्वांना आवडावं, असं होतं. ती बटाटेवडे छान करायची. एकदा आमच्याकडे त्यांचे दीर आले होते. सहज गप्पा चालल्या होत्या. ते म्हणाले, `वहिनी, तू आमच्या शाळेत वडे का नाही विकत? छान खपतील. चार पैसे मिळतील.' तेव्हा ते मॉडर्न हायस्कूलमध्ये लॅब असिस्टंट म्हणून काम करीत असत. झालं, चर्चेचं रूपांतर विचारात आणि योजनेत झालं. त्या वेळी माझ्याबरोबरच माणिक भंवर नावाचा माझा मित्रही मावशीकडे राहत असे. दरमहा 20 रुपये त्यानं द्यावेत आणि जेवून-खाऊन राहावं असं ठरलं होतं. त्यालाही पैशाची गरज होती. झालं, आमचं ठरलं. मावशीनं वडे रावेत आणि आम्ही ते गरमागरम शाळेत नेऊन विकावेत. दुपारच्या सुटीत शिक्षकांना एक छान, चवदार पदार्थ या सेवेतून मिळाला होता. 25 पैशाला एक वडा. त्या वेळी रस्त्यावर तो 10 पैशात मिळायचा. आमचा घरगुती, अस्सल म्हणून 25 पैसे. चांगला, दर्जेदार पदार्थ दिला, की जास्त पैसे द्यायला णी मागे-पुढे पाहत नाही, याचा अनुभव आला. गोविंद हलवाई चौक ते मॉडर्न हायस्कूल- रोज दुपारी आमच्या सायकली अशा पळत की कोणालाही वाटावे, वड्यांचा घाणा इथंच काढलाय. आमचा रोजचा रतीब सुरू झाला. रोज 30 वड्यांवरून संख्या 50-60 वर गेली. गुरुवारी-शनिवारी त्यात साबुदाण्याची खिचडीही सुरू झाली. टिकाऊ काही असावं म्हणून ज्वारीच्या फोडणीच्या लाह्याही देऊ लागलो. एकूण धंद्याला बरकत होती. रोज हातात काहीतरी रक्कम खेळती असे. मजा येत होती. आज 80 वडे करायचं असं ठरलं. त्याच दिवशी माझे
वडील आले. त्यांनाही हा
पदार्थ आवडे. जरा जास्तच वडे करायचा बे
झाला. आज त्यांच्या निमित्तानं आम्हालाही वडे खायला मिळणार होते. अन्यथा, रोज वड्यांबरोबर तयार होणाऱया छोट्या मण्यांवर आम्ही समाधान मानत असू. दुपारी एकच्या सुमारास पहिला डबा घेऊन माणिक रवाना झाला आणि अवघ्या वीस मिनिटांत मीही शाळेत खल झालो. आज शाळेत वेगळंच चित्र होतं. त्या वेळच्या शाळेच्या संचालिका जयश्रीबाई वैद्यांनी शाळेत बाहेरचा कोणताही पदार्थ विकण्यास प्रतिबंध केला होता. आता काय? हा प्रश्न आमच्यापुढे होता. बाहेर वडे विकावेत, तर इतरांचा वडा दहा पैशात; आमचा महागाचा वडा कोण घेणार? थोडा प्रयत्न ला. चार वडे विकले गेले. डबे अजून खूपच जड होते; पण आता घरी जाण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. खालच्या मानेनं घरी आलो. काय झालं ते सांगू लागलो. आमचे पिताश्री घरी होतेच. आपले चिरंजीव अपयशी होऊन घरी आलेले पाहताच त्यांचा संताप झाला. त्यांनी शेलक्या शब्दांत आमची संभावना
-- किशोर कुलकर्णी
Copyright © 2025 | Marathisrushti