(User Level: User is not logged in.)

बाल-साहित्य

मराठीतील बालसाहित्य येथे वाचूया.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गोगलगाई बारशाला जातात

    सकाळ झाली. गोगलबाई उठल्या. आपल्या पाठीवरच्या घरातून बाहेर अंगणात आल्या. सकाळचे कोवळे ऊन खात बसून राहिल्या. तेवढ्यात त्यांची एक मैत्रीण चिऊताई समोरून येताना दिसली. तिला पाहून गोगलबाईनी विचारले, “काय चिऊताई, आज सकाळीच कसे येणे केले?” चिऊताई म्हणाली, “मी आले आहे, बोलावणे करायला. उद्या किनई माझ्या बाळाचे बारसे आहे. मुद्दाम तुम्हांला सांगायला आले आहे.

  • हान्या महाराज

    खानदेशातील पाटबारा नावाच्या गावात एक अत्यंत गरीब माणूस राहात होता. तो भिल्ल समाजाचा असून अतिशय दु:खी, कष्टी होता.

  • दोन बेडूक मित्रांची गोष्ट

    एक सुंदर बाग होती. बागेत एक तळे होते. तळ्याकाठी दोन बेडूक रहायचे. दोघे अगदी जिवाभावाचे मित्र. एकाचे नाव राम, दुसऱ्याचे श्याम. राम शूर, तर श्याम भित्रा. आजुबाजूला थोडा खुट्ट आवाज झाला तरी श्यामराव तळ्यातल्या पाण्यात लपून बसायचे. श्यामरावांच्या या भित्रेपणाला तळ्यातले मासे, कासव हसायचे. ‘भित्रे मंडुकराव’ म्हणून चिडवायचे. रामने श्यामला भिऊ नको म्हणून खूप वेळा सांगून पाहिले. पण त्याचा काही उपयोग होईना. तळ्यातले इतर जलचर राम बेडकाला म्हणायचे, ‘माणूस लोकात मुलांनी भिऊ नये म्हणून त्यांना हनुमान चाळीशी म्हणायला शिकवतात. तसा हा राम बेडूक श्यामला ‘मंडुकोपनिषद” शिकवतो.

  • देवी व कंस यांची गोष्ट

    यादववंशांत शूरसेन नांवाचा एक राजा झाला. हा मथुरेंत राहून राज्याचा कारभार पाहत असे. म्हणून मथुरा ही सर्व यादव राजांची राजधानी असे लोक समजू लागले. या शूरसेनाचा मुलगा वसुदेव याचे कंसाची बहीण देवकी हिच्याशी मोठ्या थाटाने लग्न झाले. लग्नसमारंभ उरकल्यावर देवकीला घेऊन वसुदेव जाण्यास निघाला, तेव्हां कंस हा आपल्या बहिणीस व मेहुण्यास पोचविण्यासाठी मोठ्या इतमामानें सोन्याचे शेकडों रथ घेऊन निघाला; इतकेच नाही, तर आपल्या बहिणीच्या संतोषासाठी तिचा रथ हांकण्याचे काम त्याने स्वतः हातीं घेतले.

  • पावसाचे गाणे

    उघड पावसा ऊन पडू दे
    उडू बागडू हसू खेळु दे ।

    कळी उमलू दे, फुला फुलू दे
    पाने वाऱ्यावरी डुलु दे
    टप टप खाली थेंब पडु दे
    तालावर त्या मला नाचू दे ॥१॥

    पाय उठवू दे वाळूवरती
    समुद्र झाला ! आली धरती,
    आभाळ पडे खोल खालती
    डोकावुनि ढग आत पाहु दे ॥२॥

    उंच चालल्या घारी वरती
    बगळे रांगा धरुनि उडती
    ढगात भरभर रंग बदलती
    पाठशिवणीचा खेळ बघू दे ।।३॥

    चिमणी ओले पंख सुकविते
    घरट्यामधुनी पिलू पहाते
    मुंगी रांगेमधे धावते
    साखर-खाऊ तिला घालु दे ।।४॥।

    बसे फुलावर फूलपाखरु
    मला सांगते मौज चल करु
    थांब पावसा ऊन पडू दे
    गाता गाता मला खेळु दे !

  • कृत्तिका नक्षत्राची गोष्ट

    (ऑस्ट्रेलियन लोककथा)

    एका राजाची एक सुंदर राणी होती. एका कावळ्याला ही राणी खूप आवडत होती. एके दिवशी राणी आपल्या सहा दासींसोबत रानात पांढरे सुरवंट शोधीत होत्या. कावळ्याने पाहिले आणि कावळ्याला एक युक्ती सुचली. कावळ्याने सुरवंटाचे रूप घेतले. रानातील दाट झुडपात लपून बसला. राणीच्या दासींनी सुरवंट पकडण्यासाठी साधे लाकडी गळ टाकले.

  • बकासुराची गोष्ट

    कौरवांनी पांडवांना कुंतीसह ठार मारण्याचा प्रयत्न केला. पण ते वाचले. पांडव ब्राह्मणाचा वेश धारण करून एकचक्रा नगरीत एका ब्राह्मणाच्या घरी येऊन राहिले. कुंती व भीम घरी रहात. बाकीचे चौघे पांडव भिक्षा मागून आणीत. ते ती भिक्षा कुंतीकडे देत.

  • दहा पायांचे अस्वल

    एकदा एक दहा पायांचे ध्रुवप्रदेशी अस्वल अलास्काच्या उत्तरेला असलेल्या समुद्रकिनाऱ्याजवळ राहत होते. समुद्रातील हिमपर्वत आणि दूरवर तरंगणाऱ्या हिमखंडाच्या पलीकडील सील माशांची शिकार करणे यात त्याचा बहुतांश वेळ ते घालवीत असे. त्यामुळे हे अस्वल एस्किमोंच्या दृष्टीस अगदी क्वचितच पडत असे. त्या अस्वलाला प्रत्येक बाजूने पाच पाच असे पाय होते. जेव्हा ते अस्वल चालत असे किंवा पळत असे तेव्हा ते त्याच्या एका बाजूच्या पाचही पायांवर चालून किंवा पळून पुढे जात असे.

  • मुलास उपदेश

    बरे सत्य बोला यथातथ्य चाला ।
    बहू मानिती लोक येणे तुम्हाला ।।
    धरा बुद्धी पोटी विवेके मुले हो ।
    बरा गुण तो अंतरामाजी राहो ।1१।।

    सदा दात घासोनि तोंडा धुवावे ।
    कळाहीन घाणेरडे बा नसावे ।
    सदा सर्वदा यत्न सांडू नये रे ।
    बहुसाळ हा खेळ कामा नये रे ।।२॥।

    दिसामाजी काही तरी ते लिहावे ।
    प्रसंगी अखंडित वाचित जावे ।
    गुणम्रेष्ठ उपास्य त्यांचे करावे ।
    बरे बोलणे सत्य जीवी धरावे ।।३ ।।

    बहु खेळ खोटा सदालस्य खोटा ।
    समस्तासि भांडेल तोचि करंटा ।
    बहुतां जनालागी जीवी भजावे ।
    भल्यासंगती न्याय तेथे रिझावे ।।४ ।।

    प्रचितीविणे बोलणे व्यर्थ वाया ।
    विवेकेविणे सर्वही दंभ झाला ।
    बहु सज्जला नेटका साज केला ।
    विचाराविणे सर्वही व्यर्थ गेला ।।५ ।।

    भला रे भला बोलती ते करावे ।
    बहुता जनांचे मुखे येश घ्यावे ।
    परी शेवटी सर्व सोडोनि द्यावे ।
    मरावे परी कीर्तिरुपे उसवे ।।६।।

  • रेव्हनची गोष्ट

    सुरुवातीच्या काळात रात्रीच्या वेळी सूर्य, चंद्र आणि तारे नव्हते. रेव्हन हा सर्वशक्तिमान होता. त्याने सगळ्या प्राण्यांना, माशांना आणि माणसांना निर्माण केले होते. तरी ते सगळे प्राणी अंधारातच राहत होते. कारण त्याने अजून सूर्य तयार केला नव्हता.