(User Level: User is not logged in.)

बाल-साहित्य

मराठीतील बालसाहित्य येथे वाचूया.

Sort By:

  • कळीचा माकड

    (इंडोनेशियन लोककथा)

    इंडोनेशियन लोक म्हणतात की, फार वर्षांपूर्वी, आता जसे माणसांत व जनावरांत आपापसांत वैर आहे, तसे नव्हते. सगळेजण एकमेकांशी गुण्यागोविंदाने राहात. हे सगळे वैर एका कळीच्या नारदाने – ‘माकडाने निर्माण केले. ते कसे केले याबद्दल एक गंमतीदार गोष्ट सांगतात; ती अशी..

  • इंद्रधनुष्य

    (गढवाली लोककथा)

    वसंतऋतू नुकताच सुरू झाला होता. अलखनंदेच्या काठी एक अत्यंत सोयीची जागा वसंतोत्सवासाठी निवडली गेली होती. आर्य युवक युवती यांचा जल्लोष सुरू झाला होता. आपल्यायोग्य वर वधू निवडण्याची स्पर्धा वसंतोत्सवात सुरू व्हायची!

  • सागर आणि समुद्र पक्षी

    नाताळची सुटी लागली. सुटीत काय करायचे असा प्रश्न सागर, सीमा, परेश या मुलांपुढे पडला. सीमा म्हणाली, अभ्यासापेक्षा वेगळं काहीतरी करूया? परेश म्हणाला, संक्रांत येतेच आहे. आपणपतंग उडवू या. सागरने आकाशाकडे पाहिलं तर खरंच, काही मुलांनी पतंग उडवायला सुरुवातही केली होती. प्रत्येकाने पॉकेट मनीतले पैसे एकत्रित केले.

  • झाडावर चढणारा कोल्हा

    कोल्हा इतर जनावरांशी लबाडीनं वागतो हे जगजाहीर होते. त्यामुळे त्याच्यावर कोणी विश्वास ठेवत नसे. पण तरीही कोल्हा सतत कुणा ना कुणाला फसवायचा आणि जनावरं फसायची. ‘हा बढाया मारणारा आहे’ म्हणून सगळे त्याला टाळायचे.

  • मेघ राजा

    एक होता मेधी राजा. मोठा भरभक्कम ताजा तवाना. रंगानं काळा. पण मोठा ऐटबाज. मनात आलं की, आभाळात उंच उंच भरारी मारायचा. धावल्या ढगांना पकडायचा. त्यांची मानगूट धरायचा. धक्काबुक्की करायचा. त्यामुळं पाऊस अवचितच पडायचा. माणसं मग, आच्यारी का विच्यारी व्हायची. ते बघून हा असा हसायचा की, दोन पर्वतांची टक्करच जणू झालीय असा दणका उडायचा! त्याच्याजवळ एक छानदार लहान पिशवी असायची. देवानं ती त्याला दिलेली होती. म्हणून ती तो आपल्या केसात लपवून ठेवायचा. पण हा खुशीत आला की, ती एकदम चकाकायची.

  • यक्षप्रश्न

    वनामध्ये युधिष्ठिराची चारही भावंडे मृत झाली होती. तो प्रसंग असा की, महाभारतात वनपर्वाच्या अखेरीस यक्षप्रश्नांचा प्रसंग वर्णिला आहे.

  • बोरोली पिकली गांडोली शेकली

    एका बोरगाव नावाच्या खेड्यात सारजा नावाची एक आजी राहायची. ती गरीब होती पण कुणाकडे हात पसरायची नाही. परसात अळू, मेथी, काकडी लावायची. बाजारात विकून चार पैसे मिळवायची. शेंगदाणे, हरभरे भाजायची. कागदाचे कोन करून त्यात भरायची व शाळेतल्या मुलांना दहा- वीस पैशात विकायची. अंगणाला बोरीचे, वेलाचे कुंपण घालायची. हंगामात फळं आली की ती विकायची. चिमणी एकेक दाणा टिपते तशी संसार करायची. तरुणपणी नवरा गेला तरी ती हरली नाही. कष्ट करून आनंदाने जगत होती. गावातली उनाड मुलं कधी तिची बोरं चोरायची. पोरंच ती! खायची गोष्ट खाणारच, म्हणून ती कानाडोळा करायची. गावाबाहेरच्या जंगलातला कोल्हा तिच्या परसातली काकडी, बोरं खायला यायचा. आजीची नजर चुकवून तो काकडी फस्त करायचा.

  • नचिकेताची गोष्ट

    प्राचीन काळी उद्दालक नावाचे एक ऋषी होऊन गेले. त्यांना नचिकेता नावाचा एक पुत्र होता. नचिकेता फार चाणाक्ष हुषार व चौकस बुद्धीचा होता. अवतीभवती घडणा-या घटनांबद्दल नानाप्रश्न विचारून तो आपल्या पित्याला भंडावून सोडी. एकदा उद्दालक ऋषींनी ‘विश्वजित’ नावाचा फार मोठा यज्ञ आरंभिला.

  • मोठया अंडयाची छोटी गोष्ट

    एका जंगलात एक कोंबडी रहात होती. एका काटेरी कुंपणाजवळ तिने चार अंडी ठेवली. त्यानंतर ती चारापाणी शोधायला जंगलात गेली. थोड्या वेळानंतर ती परत आली. तिला तेथे तिच्या चार अंड्यांशेजारी आणखी एक पाचवे अंडे दिसले. ते अंडे इतर चार अंडयांपेक्षा खूपच मोठे होते. “हे अंडे आपले नाही, मग ते कुणाचे असेल?“ असा प्रश्न तिच्या मनात निर्माण झाला. तिने त्याचा तपास करायचा ठरवले.

  • चतुर कोल्हा

    एक जंगल होते. जंगलात अनेक प्राणी राहत होते. वाघ, कोल्हा, लांडगा, अस्वल अशा हिंस्त्र प्राण्यांचे वास्तव्य तिथे होते. एके दिवशी कोल्हा जंगलात फिरत असताना खूप जोरात पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू झाला. कोल्हा घाबरला. पळत सुटला.