मराठीतील बालसाहित्य येथे वाचूया.
(जपानी लोककथा)
तशी ही जुनीच गोष्ट आहे. जपानमधल्या बांबुबनातली आहे. एक गरीब म्हातारा नित्यनेमाने बांबूबनात यायचा. तिथून बांबूची रोपे जमा करायचा. रोपे विकून आपली उपजीविका करायचा. एके दिवशी धारदार कोयता घेऊन म्हातारा बांबूबनात गेला होता. त्याने कोयत्याने एक बांबूची फांदी कापली. त्याबरोबर बांबूच्या पोकळीतून चंद्रकिरणासारखी प्रकाशाची रेषा बाहेर आली.
एकदा एक राजा राज्य करीत होता. त्याने एका झाडावर एक मधाचे पोळे राखून ठेवलेले होते. एके दिवशी एका सशाने उंदराशी मैत्री केली. त्याच्या मदतीने त्याने त्या मधाची चोरी करायचे ठरविले. सशाने त्या झाडाखाली आगीचा जाळ केला. त्यातून धुराचे लोट बाहेर पडू लागले. तोपर्यंत तो उंदीर झाडावर चढून गेला आणि त्याने ते मधाचे पोळे आपल्या अणकुचीदार दातांनी कुरतडायला सुरवात केली. राजाने तो धूर पाहिला.
“तुझ्या गळा
माझ्या गळा
गुंफू मोत्यांच्या माळा'
“ताई, आणखि कोणाला ?'
“चल रे दादा चहाटळा ! ॥१॥
“तुज कंठी
मजअंगठी !
“आणखि गोऽफ कोणाला?"
“वेड लागले दादाला !'
“मला कुणाचे ? ताईला !' ॥२॥
“तुज पगडी
मज चिरडी !
“आणखि शेला कोणाला ?'
“दादा, सांगूं बाबाला ?'
“सांग तिकडल्या स्वारीला !' ॥1३॥
खुसू खुसू
गालि हंसू -
वरवर अपुले रुसू रुसू !'
“चल निघ, येथे नको बसू
“घर तर माझे तसू तसू ॥४॥
कशी कशी
आज अशी
गंमत ताईची खाशी !'
“अता गट्टी फू दादाशी'
“तर मग गट्टी कोणाशीं?' ॥ ५॥
एका गावातील शिकारी नदीच्या वरच्या भागात सांबरांची शिकार करण्यास गेलेले असताना रहस्यमयरित्या गायब होतो. त्याच गावातील एक तरुण आणि अनाथ असलेला मुलगा विलक्षण साहस आणि धोका पत्करून ते कुठे गेले होते हे कसे शोधून काढतो आणि एक सामर्थ्यवान शिकारी कसा बनतो, हे सांगणारी ही कथा थक्क करून सोडणारी आहे.
कुणा आवडतो मोर पिसाऱ्याचा
असे कोणाला छंद कोकिळेचा,
कुणी असतो नादिष्ट पोपटाचा
मला आहे परि नाद कोंबड्याचा ।।१॥।
किती माझा कोंबडा ऐटदार
चाल त्याची किति बरे डौलदार
शिरोभागी छानसा तुरा हाले
जणू जास्वंदी फूल उमललेले ।।२॥।
पिसारा त्याचा किती झोकदार
चोच त्याची चिमुकली बाकदार
अर्धपायी पांढरीशी विजार
गमे विहगातिल बडा फौजदार ।1३।।
“उठा मूर्खांनो ! झोप काय घेता ?
अरुण उदयाचा काळ असे झाला
करा काही तरि आळसा त्यजून”
उष:काली सांगतो ओरडून ।।४।।
किती माझा कोंबडा हो शहाणा
लोक कल्याणा झटतसे पहाना !
मोर, पोपट, कोकिळा, राजहंस
रिकाम्यांचा या बडेजाव खास ।।५।।
अति परिचय जाहला कोंबड्याचा
म्हणुनि करिता का मानभंग त्याचा ?
जरी आवडला नाही तो तुम्हाला
सदा देई आनंद मन्मनाला ।॥६॥
बळीराजा आपल्या नगरीत सुखाचे राज्य करीत होता. धर्माचे, समृद्धीचे, दानाचे अधिष्ठान असा ह्या नगरीचा लौकिक होता. सर्व प्रजा आनंदाने नांदत होती. आपल्या राज्यात सर्वत्र आबादी आबाद असावे म्हणून नेहमीच राजा देशोदेशीच्या विद्वान दशग्रंथी ब्राह्मणांना व ऋषिजनांना बोलावून यथासांग यज्ञयाग करीत असे. अगणित दानधर्म करीत असे. विद्वानांचा आणि प्रजेचा दुवा घेत असे.
भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे
दाबीत सतत रुप आगळे ।।
वसंत वनात जनात हसे
सृष्टी देवी जणू नाचे उल्हासे
गातात संगीत पृथ्वीचे भाट
चैत्र-्वेशाखाचा ऐसा हा थाट ।।१॥।
ज्येष्ठ आषाढात मेघांची दाटी
कडाडे चपला होतसे वृष्टी
घालाया सृष्टीला मंगल स्नान
पूर अमृताचा सांडे वरुन
गगनी नर्तन कृष्ण मेघांचे
भूतली मयूर उत्तान नाचे ।।२।।
श्रावणी पाऊस हास्याचा पडे
श्रीकृष्ण-जन्माची दंगल उडे
बांधिती वृक्षांना रम्य हिंदोळे
कामिनी धरणी वैभवी लोळे ।।३॥।।
एका गावात एक बुद्धिमान आणि अनुभवी वृद्ध रहात होता. त्याला एक मुलगा होता. एक दिवस त्याने आपल्या मुलास सांगितले, “बेटा, तीन महत्त्वाच्या गोष्टी लक्ष्यात ठेव. एक – कधीही अशा माणसास आपला मित्र करू नकोस. ज्यावर तुझा विश्वास नसेल. दोन – कधीही अशा माणसाकडून कर्ज घेवू नकोस. जो खानदानी श्रीमंत नसेल आणि तीन कधीही कोणतीही गुपित गोष्ट कोणालाही सांगू नकोस मग ती तुझी बायको का असेना.”
वासुदेव आला दारी, वासुदेव आला
चिमणा वासुदेव आला ।।धृ ।।
टोपीवर मोरपिसांना
खोवोनि येथें आला,
काही दान करा त्याला ।
दारी वासुदेव आला. ।।१।।
बांधुनिया घुंगुर पायी
थय थय थय नाचत येई
सुखवी गाऊनि तुम्हाला ।
दारी वासुदेव आला ।।२।।
“द्याल जरी पैसा एक,
देव तुम्हां देईल लाख,
माई धर्म करा याला' ।
दारी वासुदेव आला ।।३॥)।
“वडिलांच्या तुमच्या नावे
पैशाचे दान करावे,
माई, पुण्य मिळविण्याला ।
दारी वासुदेव आला ।।४॥।
नाचुनिया आता थकला
द्या एकच पैसा त्याला
खाऊ गोड घ्यावयाला ।
वासुदेव दारी आला ।।५।।
एके दिवशी ‘तांबू’ गाय रानात गेली. रानात चरता चरता दिवस कसा संपला ते कळलंच नाही. जरासं अंधारून आलं होतं. हळूहळू ती परतीच्या वाटेवर आली. परंतु बरोबरीच्या ‘पांढरी’, ‘ढवळी’, ‘राणू’ कुणीच दिसत नाही, हे लक्षात येताच तांबू गायीने आपला चालण्याचा वेग वाढवला. जवळजवळ रानातली वाट संपतच आली होती. दूरवर दिवे दिसत होती. इतक्यात वाघोबाराजे दत्त म्हणून समोरी आले! क्षणभर तांबू गायीला काही सुचेनासे झाले. भीती वाटली.
Copyright © 2025 | Marathisrushti