मराठीतील बालसाहित्य येथे वाचूया.
एके दिवशी नदीकडे जाणाऱ्या वाटेवर हत्तीला खार आडवी आली. सम्राटासारख्या तोऱ्यात चालणाऱ्या मातब्बर हत्तीनं तिला सोंडेनं वाटेतून बाजूला सारून म्हटलं, “बाजूला हो ग भिक्कार. चिमुरडे.” खारीला हा मोठा अपमान वाटला. तीही कोणी होतीच की. ह्या हत्तीला नीट वागायचं शिकवायला पाहिजे असं तिला वाटलं.
(गोदाकाठची लोककथा )
गोदाकाठच्या परिसरात फाल्गुन महिन्यात होळी हा सण अत्यंत आनंदाने
साजरा केला जातो. या होळी सणाविषयी एक लोककथा अशी सांगितली जाते:
अनेक जन्मींच्या संसारात संसरत असता आमचा बोधिसत्त्व एकदा हत्तीच्या योनीत जन्माला येऊन वयात आल्यावर मोठ्या गजसंघाचा धुरीण झाला होता.
कृष्ण लहानपणी सांदीपनी गुरूपाशी विद्या शिकत होते, तेव्हा तेथे
त्यांच्याबरोबर सुदामदेव नावाचा ब्राह्मणाचा एक मुलगा विद्याभ्यास करीत
होता. तो कृष्णाचा जिवलग मित्र होता. पुढे कृष्ण मथुरेला गेला, आणि
सुदामदेव आपल्या घरी गेला.
एका जंगलात एक कोंबडी रहात होती. एका काटेरी कुंपणाजवळ तिने चार अंडी ठेवली. त्यानंतर ती चारापाणी शोधायला जंगलात गेली. थोड्या वेळानंतर ती परत आली. तिला तेथे तिच्या चार अंड्यांशेजारी आणखी एक पाचवे अंडे दिसले. ते अंडे इतर चार अंडयांपेक्षा खूपच मोठे होते. “हे अंडे आपले नाही, मग ते कुणाचे असेल?“ असा प्रश्न तिच्या मनात निर्माण झाला. तिने त्याचा तपास करायचा ठरवले.
समुद्राच्या काठी एक गाव होतं. तिथं एक मगर आणि एक कोल्हा राहायचे.
त्यांनी दोघांनी मिळून शेती करायचं ठरवलं. सुरवातीला बटाट्याची शेती केली. मगर म्हणाले, “आपण उत्पन्नाची वाटणी कशी करायची ते आधी ठरवून टाकू.” कोल्ह्याने त्याला मान्यता दिली. मगर म्हणाले, “मी झाडांचा वरचा भाग घेईन, खालचा तू घे.” कोल्हा म्हणाला, “चालेल, तू म्हणशील ते मला मान्य आहे.” पुढे बटाट्याचं पीक तयार झालं.
यादववंशांत शूरसेन नांवाचा एक राजा झाला. हा मथुरेंत राहून राज्याचा
कारभार पाहत असे. म्हणून मथुरा ही सर्व यादव राजांची राजधानी असे लोक
समजू लागले.
(व्रतकथा)
आटपाट नगर होतं. तिथं एक कुणब्याची म्हातारी होती, तिला एक सून
होती. गाई-गुरं होती. ढोरं म्हशी होत्या. गव्हाळी-मुगाळी वासरं होती. एके
दिवशी काय झालं, आश्विनमास आला. पहिल्या द्वादशीच्या दिवशी सकाळी
म्हातारी उठली, शेतावर जाऊ लागली.
(स्वित्झर्लंडची लोककथा)
एक होता राजा. त्याला एकुलती एक मुलगीच होती. त्या मुलीला त्यानं खूप
कोडकौतुक करून वाढविलं होतं. एकदा राजा राजकुमारीला बरोबर घेऊन
फिरायला बाहेर पडला. फिरता फिरता एके ठिकाणी त्यांना लोकांची गर्दी
जमलेली दिसली. राजा आणि राजकुमारी दोघेही त्या गर्दीत घुसले. बघतात तर
एक गारुडीण नागाला खेळवीत होती. एकदा नागाची बांगडी करून ती हातात
घाली, तर एकदा कंठीसारखी त्याच्या गळ्यात घाली
खूप खूप वर्षे झाली. एका रानात एक हत्ती रहात होता. त्याचा एक मित्र होता.
तो होता ससा. एके दिवशी हत्ती सशाला म्हणाला,‘आपण एक जमिनीचा तुकडा विकत घेऊया आणि त्या जमिनीत आपण एक सुंदर बाग तयार करुया.’
Copyright © 2025 | Marathisrushti