मराठीतील बालसाहित्य येथे वाचूया.
(ब्रह्मदेशातली लोककथा )
आज आपण जगभरात जेवढी लोकसंख्या पाहातो, तेवढी एके काळी नव्हती. या जगात खूप कमी लोक राहत होते. तेव्हा आजच्यासारखी शहरे नव्हती. प्रत्येक जण उंच बर्फाच्छादित डोंगरांच्या दरीत राहत असत. डोंगरात रहाणाऱ्या या लोकांना ‘चीन्स’ म्हणत.
सुतार उत्तमसा
तुजसाठी मिळवीला
पाळणा रंगित बनवीला ।।
चहूबाजूंनी
राघु-मोर बसविले
'पाळण्यात बाळ निजवीले ।।
निज निज बाळा
झोके देते मी तुजला
खेळुनि बाळ बहु दमला ।।
अनेक जन्मींच्या संसारात संसरत असता आमचा बोधिसत्त्व एकदा हत्तीच्या योनीत जन्माला येऊन वयात आल्यावर मोठ्या गजसंघाचा धुरीण झाला होता. वृद्धापकाळामुळे त्याची आई अंध झाली व हत्तीच्या कळपाबरोबर तिला रानावनात फिरणे अशक्य झाले. तिला एका सुरक्षित स्थळी ठेऊन बोधिसत्त्व इतर हत्तींबरोबर चांगली चांगली फळे वगैरे आहाराचे पदार्थ पाठवीत असे. परंतु ते रसलोलुप हत्ती वाटेतच ती फळे खात असत व बिचाऱ्या वृद्ध हत्तीणीच्या वाट्याला पालापाचोळा वगैरे नीरस पदार्थच येत असत.
कौरवांनी पांडवांना कुंतीसह ठार मारण्याचा प्रयत्न केला. पण ते वाचले. पांडव ब्राह्मणाचा वेश धारण करून एकचक्रा नगरीत एका ब्राह्मणाच्या घरी येऊन राहिले. कुंती व भीम घरी रहात. बाकीचे चौघे पांडव भिक्षा मागून आणीत. ते ती भिक्षा कुंतीकडे देत.
गोदाकाठच्या परिसरात फाल्गुन महिन्यात होळी हा सण अत्यंत आनंदाने साजरा केला जातो. या होळी सणाविषयी एक लोककथा अशी सांगितली जाते: ‘विष्णुच्या दरबारात दोन द्वारपाल राहात होते. इतक्यात भृगु महाऋषी विष्णूस यज्ञाचे फळ देण्यासाठी विष्णुच्या घरी जात असतात. तेव्हा विष्णूचे द्वारपाल जय आणि विजय हे भृगुऋषीला विष्णुच्या दर्शनासाठी जाण्यास सक्त मनाई करतात. तेव्हा भृगु महाऋषी त्या द्वारपालाला शाप देतात, “तुम्ही तीन जन्म पृथ्वीतलावर उन्मत्त असे राक्षस होऊन पडाल तेव्हा द्वारपालांनी शरण येऊन भृगु महाऋषीस उःशाप मागितला. भृगु ऋषी म्हणाले “तुम्ही राक्षस होऊन पडल्यावर श्रीविष्णु तुमचा उद्धार करतील व तुम्ही पुन्हा द्वारपाल व्हाल तेव्हा ते पृथ्वीतलावर हिरण्याक्ष व हिरण्यकश्यप असे दोन राक्षस होऊन पडले. हे दोन्ही भाऊ उन्मत्त व महाअंतुरबळी युद्धिष्ठर असे बनले.
श्रावण नदीवर आला. त्याने लोटा धुतला आणि तो पाण्यात बुडविला. लोट्यात पाणी भरताना त्याचा आवाज झाला. दशरथ राजाने तो आवाज ऐकला. त्याला वाटले, हत्तीच पाणी पिऊ लागला आहे. आवाजाच्या दिशेने त्याने बाण सोडला आणि “आई ग!” अशी आर्त किंकाळी त्याच्या कानावर पडली. घात झाला असे वाटून तो घाईघाईने नदीवर आला. श्रावणाच्या बरगडीत बाण घुसल्याचे त्याला दिसले. रक्त भळाभळा वहात होते. धावत जाऊन त्याने श्रावणाचे मस्तक आपल्या मांडीवर घेतले.
राजाच्या मंत्र्याचा मुलगा अजय पण मूर्त्या बनवित असे पण तो काही उत्कृष्ट मूर्तिकार नव्हता. परंतु त्याची इच्छा हीच असे की कसेही करून प्रथम पारितोषिक पटकावे. मंत्री पण चतुर होता. तो काही तरी युक्ती करून मुलाला कसे बक्षीस मिळेल याचा तो विचार करू लागला.
ठरलेल्या दिवशी सर्व मूर्तिकार मूर्त्या घेऊन आले. रामकिरण नावाच्या मूर्तिकारने राजाची अतिशय सुंदर मूर्ती तयार केली होती. ती पहाताच मंत्री समजून गेला की नक्कीच या मूर्तीला प्रथम पारितोषिक मिळेल. त्याने रामकिरणला एकीकडे नेऊन सांगितले, खरंच, तू सुंदर मूर्ती बनविली आहेस.
एक कुंभार होता. त्याला तीन मुली होत्या. मुलगा नव्हता. त्याला आता पुन्हा चौथी मुलगी नको होती. कुंभार बायकोला म्हणाला, “आता तुला पुन्हा मुलगी झाली तर मी तुला घरात घेणार नाही.” कुंभाराची बायको माहेरी गेली. दुर्दैवाने तिला चौथी मुलगीच झाली. तिच्या अंगाचा थरकाप झाला. आता नवऱ्याला कसे तोंड दाखवायचे याची तिला काळजी लागली. तो आपल्याला घरात घेणार नाही, याची तिला खात्री होती. तिच्या आईने पुढे काय होईल याचा अंदाज घेऊन त्या बाळाला कपड्यात गुंडाळले, टोपलीत घातले आणि टोपली नदीत सोडून दिली. तरंगत तरंगत टोपली पाण्याच्या प्रवाहाबरोबर वहात गेली.
एके काळी निसर्गात दोन बलवंत शक्ती होत्या. हत्ती आणि पावसाचा देव. अभिमानी आणि बढाईखोर हत्ती पावसाशी नेहमी वाद घालायचा. दोघात हत्ती मोठा आहे असं पावसानं मान्य करावं हा हत्तीचा हेतू असायचा. एकदा अशाच वादात आपल्या ओल्या आणि खळखळाट करणाऱ्या आवाजात पावसानं हत्तीला विचारलं ‘अहो गजराज, जिथं मी तुम्हाला चारा देतो तिथं माझ्यापेक्षा तुम्ही कसे मोठे असाल ?’ अभिमानी हत्ती हे कसे मान्य करणार ? काहीही विचार न करता तो म्हणाला, ‘तू नाही मला चारा देत. माझा मी शोधतो आणि खातो. स्वतःच्या हिंमतीवर मी जगतो.’
वनामध्ये युधिष्ठिराची चारही भावंडे मृत झाली होती. तो प्रसंग असा की, महाभारतात वनपर्वाच्या अखेरीस यक्षप्रश्नांचा प्रसंग वर्णिला आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti