मराठीतील बालसाहित्य येथे वाचूया.
वाराणशीचे राज्य. राजाचे नाव ब्रह्मदत्त. या राज्यातल्या एका व्यापाऱ्याच्या
कुळात बोधिसत्त्वाचा जन्म झाला. बोधिसत्त्व मोठा झाला. देशोदेशी हिंडून
व्यापार करू लागला.
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा देव देखील दिवाळी साजरी करायचे. देव, देवता, यक्ष, गंधर्व, किन्नर, पन्या आभाळात दिवाळीची मजा करायचे.पृथ्वीवरच्या माणसांना, मुलामुलींना देखील देवांची दिवाळी बघायला मिळायची. त्यावेळीची ही गोष्ट.
एकदा यशोदेने त्याला नीट न्हाऊ घातले, अंगात कपडे घालून ओव्या गात
दह्यादुधाच्या गाड्याखाली त्याला पाळण्यात निजविले, आणि आपण कामाला
गेली. इकडे कृष्ण जागा होऊन वर पाय करून नाचू लागला, आणि पायांनी
सबंध गाडाचा गाडा उलथून पाडला!
श्रावण नदीवर आला. त्याने लोटा धुतला आणि तो पाण्यात बुडविला. लोट्यात पाणी भरताना त्याचा आवाज झाला. दशरथ राजाने तो आवाज ऐकला. त्याला वाटले, हत्तीच पाणी पिऊ लागला आहे. आवाजाच्या दिशेने त्याने बाण सोडला आणि “आई ग!” अशी आर्त किंकाळी त्याच्या कानावर पडली. घात झाला असे वाटून तो घाईघाईने नदीवर आला. श्रावणाच्या बरगडीत बाण घुसल्याचे त्याला दिसले. रक्त भळाभळा वहात होते. धावत जाऊन त्याने श्रावणाचे मस्तक आपल्या मांडीवर घेतले.
खूप खूप वर्षांपूर्वी म्हणजे अगदी ट्लिंगट जमात अस्तित्वात येण्यापूर्वी साळू आणि बीव्हर हे चांगले मित्र होते. नेहमी एकमेकांच्या घरी जात येत होते. साळू घरी आली की ती परत जाताना तिचे खूप काटे पडत. बीव्हरला ते आवडत नव्हते. म्हणून बीव्हर ठरवतो की साळूच्या घरी जाऊन तिला कधीही आपल्या घरी येण्याचे आमंत्रण द्यायचे नाही. एके दिवशी साळूने त्याच्या घरी येण्याची इच्छा आहे, असे बीव्हारला सांगितले.
एका गावात एक पादरी (धर्मगुरू) राहत होता. त्याने एक नोकर ठेवला होता. अनेक वर्षांपर्यंत चांगल्या रीतीने काम करण्याबद्दल नोकराने त्याच्याशी करार केला होता. जर कराराप्रमाणे त्याने बरोबर काम केले नाही, तर त्याच्या पाठीचे पेटीच्या आकाराचे चामडे काढण्यात येईल, आणि जर का नोकराने आपली नोकरी चांगल्या रीतीने केली तर हाच व्यवहार पादरी साहेबांबरोबर करण्यात येईल. यापूर्वी पोप साहेबांजवळ पुष्कळ नोकर येवून गेले होते. पण कुणीही टिकू शकला नव्हता.
एक दिवस एका चिमणीला शेतात एक मटारचा दाणा सापडला. तिने तो चोचीत उचलला आणि खूप आनंदीत झाली. आता याने नक्कीच पोट भरेल.
मग तिने विचार केला की देवाने माझ्यावर इतकी कृपा केली आहे तेव्हा खाण्याच्या आधी देवाची पूजा करावी. ती आंघोळीसाठी पवित्र नदीकडे जाऊ लागली. पण प्रश्न होता की हा मटारचा दाणा कुठे लपवावा. जर जमिनीवर ठेवला तर मुंग्या खाऊन टाकतील. किंवा पक्षी उचलून घेऊन जाईल. तिने तो दाणा एका पुलावर ठेवला तेथे एक सुतार काम करीत होता. ती त्याला म्हणाली, “भाऊ, जरायाच्याकडे लक्ष्य ठेव.”
एक मौलवी होते. त्यांनी सगळीकडे आपल्या प्रामाणिकपणाचा प्रचार प्रसार केला. मशीदीत बसून दिवसभर मुलांना शिकवित असत आणि जी फी मिळे त्यात आपला उदर निर्वाह करीत असे. एक दिवस संध्याकाळी ते घरी आले आणि पत्नीला म्हणाले, “आज काय स्वयंपाक केला आहे.
मारुती नावाचा एक सालदार होता. खूप कष्टाळू होता. सगळ्या गावातील लोक म्हणत, मारुती कामाला जसा वाघ आहे, तसा खायला बकासूर आहे.
सकाळ झाली. गोगलबाई उठल्या. आपल्या पाठीवरच्या घरातून बाहेर अंगणात आल्या. सकाळचे कोवळे ऊन खात बसून राहिल्या. तेवढ्यात त्यांची एक मैत्रीण चिऊताई समोरून येताना दिसली. तिला पाहून गोगलबाईनी विचारले, “काय चिऊताई, आज सकाळीच कसे येणे केले?” चिऊताई म्हणाली, “मी आले आहे, बोलावणे करायला. उद्या किनई माझ्या बाळाचे बारसे आहे. मुद्दाम तुम्हांला सांगायला आले आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti