(User Level: User is not logged in.)

बाल-साहित्य

मराठीतील बालसाहित्य येथे वाचूया.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मतिपोसक जातक

    अनेक जन्मींच्या संसारात संसरत असता आमचा बोधिसत्त्व एकदा हत्तीच्या योनीत जन्माला येऊन वयात आल्यावर मोठ्या गजसंघाचा धुरीण झाला होता. वृद्धापकाळामुळे त्याची आई अंध झाली व हत्तीच्या कळपाबरोबर तिला रानावनात फिरणे अशक्य झाले. तिला एका सुरक्षित स्थळी ठेऊन बोधिसत्त्व इतर हत्तींबरोबर चांगली चांगली फळे वगैरे आहाराचे पदार्थ पाठवीत असे. परंतु ते रसलोलुप हत्ती वाटेतच ती फळे खात असत व बिचाऱ्या वृद्ध हत्तीणीच्या वाट्याला पालापाचोळा वगैरे नीरस पदार्थच येत असत.

  • बोरोली पिकली गांडोली शेकली

    एका बोरगाव नावाच्या खेड्यात सारजा नावाची एक आजी राहायची. ती गरीब होती पण कुणाकडे हात पसरायची नाही. परसात अळू, मेथी, काकडी लावायची. बाजारात विकून चार पैसे मिळवायची. शेंगदाणे, हरभरे भाजायची. कागदाचे कोन करून त्यात भरायची व शाळेतल्या मुलांना दहा- वीस पैशात विकायची. अंगणाला बोरीचे, वेलाचे कुंपण घालायची. हंगामात फळं आली की ती विकायची. चिमणी एकेक दाणा टिपते तशी संसार करायची. तरुणपणी नवरा गेला तरी ती हरली नाही. कष्ट करून आनंदाने जगत होती. गावातली उनाड मुलं कधी तिची बोरं चोरायची. पोरंच ती! खायची गोष्ट खाणारच, म्हणून ती कानाडोळा करायची. गावाबाहेरच्या जंगलातला कोल्हा तिच्या परसातली काकडी, बोरं खायला यायचा. आजीची नजर चुकवून तो काकडी फस्त करायचा.

  • हत्ती आणि ससा

    खूप खूप वर्षे झाली. एका रानात एक हत्ती रहात होता. त्याचा एक मित्र होता. तो होता ससा. एके दिवशी हत्ती सशाला म्हणाला,‘आपण एक जमिनीचा तुकडा विकत घेऊया आणि त्या जमिनीत आपण एक सुंदर बाग तयार करुया.’

  • लेझीम

    दिवस सुगीचे सुरू जाहले
    ओला चारा, बैल माजले
    शेतकरी-मन प्रफुल्ल झाले
    छन्‌ खळ खळ छन्‌
    ढुम्‌ ढुम्‌ पट ढुम्‌ । लेझिम चाले जोरात !

    दिवटी फुरफुर करु लागली
    पटक्यांची वर टोके डुलली
    रांग खेळण्या सज्ज जहाली
    छन्‌ खळ खळ.छन्‌
    ढुम ढुम्‌ पट ढुम्‌ । लेझिम चाले जोरात !

    भरभर डफ तो बोले घुमुनी
    लेझिम चाले मंडल धरुनी
    बाजुस, मागे, पुढे वाकुनी
    छन्‌ खळ खळ छन्‌
    ढुम्‌ ढुम्‌ पट ढुम्‌ । लेझिम चाले जोरात !

    पहाट झाली, तारा थकल्या
    मावळतीला चंद्र उतरला

    परी न थकला लेझिम-मेळा
    छन्‌ खळ खळ छन्‌
    ढुम्‌ ढुम्‌ पट ढुम्‌ । लेझिम चाले जोरात !

  • अपण्णक जातक

    वाराणशीचे राज्य. राजाचे नाव ब्रह्मदत्त. या राज्यातल्या एका व्यापाऱ्याच्या
    कुळात बोधिसत्त्वाचा जन्म झाला. बोधिसत्त्व मोठा झाला. देशोदेशी हिंडून
    व्यापार करू लागला.

  • रानपाखरा

    रानपाखरा, रोज सकाळीं येसी माझ्या घरा
    गाणे गाउन मला उठविसी मित्र जिवाचा खरा.
    शरीर निळसर, शोभे झालर ठिपक्यांची त्यावरी
    सतेज डोळे चमचम करती जणु रत्ने गोजिरी. ॥१॥

    पाय चिमुकले, पंख चिमुकले, देह तुझा सानुला,
    अफाट आभाळातुन कैसे उडता येते तुला ?
    रात्र संपता डोंगर चढुनी वर येतो भास्कर
    तूही त्याच्या संगें येसी गात गात सुस्वर ।।२।।

    वाट चालुनी संध्याकाळी रवि सोडी अंबरा
    आणि तूहि मग पंख उभारुन जासी अपुल्या घरा
    सूर्यासंगे जासी येसी सदाकदा का बरे?
    शेजारी आहेत काय रे परस्परांची घरे? ।।३।।

    देह एवढा, अपाय कोणी करील तुजला इथें
    म्हणून का तुज रवीबरोबर माय तुझी धाडिते ?
    सांगतोस का तिला कसा हा छानदार बंगला ?
    होते का रे कधी आठवण माझी सखया तुला ? ।।४।।

    तुझ्यासारखे जावे वाटे उडत मजेने वरी
    नेशिल का मज तुझ्या बिऱ्हाडी बसवुनि पंखावरी ?
    माय तुझी येईल, सूर्यही येइल भेटायला,
    मजाच होइल सख्या पाखरा, नेह एकदा मला ।।५।।

  • पाळणा

    सुतार उत्तमसा
    तुजसाठी मिळवीला
    पाळणा रंगित बनवीला ।।

    चहूबाजूंनी
    राघु-मोर बसविले
    'पाळण्यात बाळ निजवीले ।।

    निज निज बाळा
    झोके देते मी तुजला
    खेळुनि बाळ बहु दमला ।।

  • ससा आणि कासवाची शाळा

    ससा आणि कासव म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर एकच गोष्ट उभी राहते ती म्हणजे ‘ससा व कासवाची शर्यत’. पण माझी गोष्ट यापेक्षा निराळीच आहे बरं का.

  • आई, बघना कसा हा दादा?

    आई, बघ ना कसा हा दादा?
    मला चिडवायचं हाच याचा धंदा ! ।। धृ. ।।

    लग्न बाहुलीचं लावतां आम्ही
    म्हणतो, नवरदेव आहे मी
    आतां मलाच मुंडावळि बांधा !' ।। १।।

    कधीं मोठमोठे करतो डोळे
    कधीं उगाच विदूषकि चाळे
    भारी खट्याळ, नाहि मुळि साधा ! ।। २।।

    दादा भलताच द्वाड आहे आई !
    खोड्या करून छळतो बाई
    याला ओवाळायचि नाहि मी यंदा ।। ३।।

  • आदिमानवाची चंद्रावर स्वारी

    (ब्रह्मदेशातली लोककथा )

    आज आपण जगभरात जेवढी लोकसंख्या पाहातो, तेवढी एके काळी नव्हती. या जगात खूप कमी लोक राहत होते. तेव्हा आजच्यासारखी शहरे नव्हती. प्रत्येक जण उंच बर्फाच्छादित डोंगरांच्या दरीत राहत असत. डोंगरात रहाणाऱ्या या लोकांना ‘चीन्स’ म्हणत.