मराठीतील बालसाहित्य येथे वाचूया.
(जपानची पुराणकथा)
फार फार वर्षांपूर्वी आकाशाच्याही वर तोका आमाहारा येथे विश्व निर्मात्याचे
घर होते. त्याकाळी ‘अमेनो मिनाकानुसि’ नावाच्या देवाचा सर्वत्र संचार होता.
‘अमेनो मिनाकानुसि’ या देवाने अनेक देव-देवता निर्माण केल्या.
एका बोरगाव नावाच्या खेड्यात सारजा नावाची एक आजी राहायची. ती गरीब होती पण कुणाकडे हात पसरायची नाही. परसात अळू, मेथी, काकडी लावायची. बाजारात विकून चार पैसे मिळवायची. शेंगदाणे, हरभरे भाजायची. कागदाचे कोन करून त्यात भरायची व शाळेतल्या मुलांना दहा- वीस पैशात विकायची. अंगणाला बोरीचे, वेलाचे कुंपण घालायची. हंगामात फळं आली की ती विकायची. चिमणी एकेक दाणा टिपते तशी संसार करायची. तरुणपणी नवरा गेला तरी ती हरली नाही. कष्ट करून आनंदाने जगत होती. गावातली उनाड मुलं कधी तिची बोरं चोरायची. पोरंच ती! खायची गोष्ट खाणारच, म्हणून ती कानाडोळा करायची. गावाबाहेरच्या जंगलातला कोल्हा तिच्या परसातली काकडी, बोरं खायला यायचा. आजीची नजर चुकवून तो काकडी फस्त करायचा.
आटपाट नगर होतं. तिथं एक कुणब्याची म्हातारी होती, तिला एक सून होती. गाई-गुरं होती. ढोरं म्हशी होत्या. गव्हाळी-मुगाळी वासरं होती. एके दिवशी काय झालं, आश्विनमास आला. पहिल्या द्वादशीच्या दिवशी सकाळी म्हातारी उठली, शेतावर जाऊ लागली.
(उत्तर अमेरिकेतील लोककथा)
जमीन तयार केल्यानंतर रेव्हनने माणूस निर्माण करायचे ठरवले. त्याने माती व समुद्राकाठची वाळू घेतली आणि पहिला माणूस तयार केला.
आतां विश्वात्मकें देवें । येणे वागयज्ञें तोषावें ।
तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ।।
जे खळांची व्यंकटी सांडो ।
तया सत्कर्मी रति वाढो ।
भूतां परस्परें जडो । मैत्र जीवाचें ।।
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्ये पाहो ।
जो जें बांडील तो तें लाहो । प्राणिजात ।।
वर्षते सकळमंगळीं । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळीं । भेटतु भूतां ।।
चलां कल्पतरुंचे आरव । चेतना चिंतामणींचें गांव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ।।
चंद्रमे जे अलांछन । मार्तण्ड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ।।
किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं ।
भजिजो आदिपुरुखीं । अखण्डित ।।
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इये ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवें जी ।।
येथ म्हणे विश्वेश्वरावो । हां, होईल दान पसावो ।
येणें बरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ।।
‘जोजा ही एका राजाची मुलगी, पाय घसरून पडलेल्या एका म्हातारीला कुचेष्टेने हसली. तशी म्हातारीने चिडून शाप दिला: ‘तादेव’ नावाचा मृत राजपुत्र तुला पती मिळू दे अन् तुझे खूप हाल होऊ देत !’ बिचारी राजकन्या, तिने म्हातारीची विनवणी केली. तो मृत राजपुत्र कशाने उठेल म्हणून विचारले. तशी म्हातारीने सांगितले की, त्याच्या उशाशी थडग्यात एक मोठे चांदीचे पिंप ठेवलेले आहे, ते जी तरुणी तीन दिवसांत अश्रूंनी भरून टाकील तीच त्याला जीवदान देऊ शकेल व मग त्यांचे लग्न होईल.
एकदा देव आणि दैत्य दोघांनी मिळून समुद्रमंथन करून चौदा रत्ने मिळवली. वाटणी करता करता सुधा (अमृत) कोणी घ्यावे याबाबत वाद निर्माण झाला. या वादात दैत्यांनी सुधेचा कुंभ जबरदस्तीने देवांपासून हिसकून घेतला. तेव्हा विष्णूने मोहिनीचे रूप घेतले. मोहिनीरूप विष्णूने दैत्यांना अमृत वाटण्याचे काम मी करतो असे सांगितले.
एका गावात एक पादरी (धर्मगुरू) राहत होता. त्याने एक नोकर ठेवला होता. अनेक वर्षांपर्यंत चांगल्या रीतीने काम करण्याबद्दल नोकराने त्याच्याशी करार केला होता. जर कराराप्रमाणे त्याने बरोबर काम केले नाही, तर त्याच्या पाठीचे पेटीच्या आकाराचे चामडे काढण्यात येईल, आणि जर का नोकराने आपली नोकरी चांगल्या रीतीने केली तर हाच व्यवहार पादरी साहेबांबरोबर करण्यात येईल. यापूर्वी पोप साहेबांजवळ पुष्कळ नोकर येवून गेले होते. पण कुणीही टिकू शकला नव्हता.
आश्विन वद्य त्रयोदशीचा दिवस ‘धनतेरस’ या नावाने वाखाणला जातो. तेरस याचा अर्थ तेरा! म्हणून त्रयोदशीला बोली भाषेत तेरस म्हणू लागले.
धनतेरस ह्या दिवसाला बायकांची दिवाळी असेही म्हणतात. कारण या दिवशी प्रभातकाली घरातील सर्व स्त्रिया व मुली अभ्यंगस्नान करतात. धनतेरस या सणामागे प्राचीन काळची एक कथा जडलेली आहे.) प्राचीन काळी यमुना नदीच्या काठी हरीतपूर नावाची एक नगरी होती. तेथे हंस नावाचा एक राजा राज्य करीत होता. तो मोठा शूर व प्रजाहितदक्ष होता.
धरू नका ही बरे,
फुलांवर उडती फुलपाखरे । धृ. ।।
काल पाकळ्या रात्री निजल्या
सकाळ होता सगळ्या उठल्या
आणि त्याच का उडू लागल्या
पंख फुटुन गोजिरे,
फुलांवर उडती फुलपाखरे ।।१॥।
मजेमजेचे रंग तयांचे
संध्याकाळी जसे ढगांचे
ऊन कोवळे त्यावर नाचे
सकाळचे हासरे,
फुलांवर उडती फुलपाखरे ।।२।।
फुलाफुलाशी हासत खेळत
फिरती भवती पिंगा घालित
बघा दुरूनच त्यांची गंमत
दृश्य मनोहर खरे,
फुलांवर उडती फुलपाखरे ।।1३॥।
हात लावता पंख फाटतिल
दोरा बांधुन पायहि तुटतिल
घरी कशी मग सांगा जातिल ?
दूर तयांची घरे,
फुलांवर उडती फुलपाखरे ।।४।।
उगाच धरिता त्यास कशाला ?
अपाय करिता मुक्या जिवाला ?
आवडेल का हे देवाला?
ही देवाची मुले,
फुलांवर उडती फुलपाखरे ! ।५॥।
Copyright © 2025 | Marathisrushti