(User Level: User is not logged in.)

बाल-साहित्य

मराठीतील बालसाहित्य येथे वाचूया.

Sort By:

  • मुलगा आणि अस्वल

    एका गावातील शिकारी नदीच्या वरच्या भागात सांबरांची शिकार करण्यास गेलेले असताना रहस्यमयरित्या गायब होतो. त्याच गावातील एक तरुण आणि अनाथ असलेला मुलगा विलक्षण साहस आणि धोका पत्करून ते कुठे गेले होते हे कसे शोधून काढतो आणि एक सामर्थ्यवान शिकारी कसा बनतो, हे सांगणारी ही कथा थक्क करून सोडणारी आहे.

  • नू’चे नाणे

    फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. चीनमधील ‘ताओन लिन’ या गावी एक पुजारी होता. त्याचं नाव होतं ‘वान चिंग.’ देशभर भ्रमण करून तो आपल्या गावी परतला. फावल्या वेळेत तो गावकऱ्यांना आपल्या भटकंतीतील अनुभव ऐकवत असे. गावकरी मोठ्या उत्सुकतेने त्याच्या गोष्टी ऐकत असत. विशेषतः चीनमधील भव्य आणि प्रसिद्ध अशा बुद्ध मंदिरांची जेव्हा तो वर्णने करीत असे तेव्हा लोक ती वर्णने ऐकून स्तिमित होत. ही वर्णने ऐकून ऐकून आपल्या गावातही एखादं भव्य मंदिर उभारावं असं गावकऱ्यांना वाटू लागलं.

  • घारीचे बाळ

    एक कुंभार होता. त्याला तीन मुली होत्या. मुलगा नव्हता. त्याला आता पुन्हा चौथी मुलगी नको होती. कुंभार बायकोला म्हणाला, “आता तुला पुन्हा मुलगी झाली तर मी तुला घरात घेणार नाही.” कुंभाराची बायको माहेरी गेली. दुर्दैवाने तिला चौथी मुलगीच झाली. तिच्या अंगाचा थरकाप झाला. आता नवऱ्याला कसे तोंड दाखवायचे याची तिला काळजी लागली. तो आपल्याला घरात घेणार नाही, याची तिला खात्री होती. तिच्या आईने पुढे काय होईल याचा अंदाज घेऊन त्या बाळाला कपड्यात गुंडाळले, टोपलीत घातले आणि टोपली नदीत सोडून दिली. तरंगत तरंगत टोपली पाण्याच्या प्रवाहाबरोबर वहात गेली.

  • सिंह आणि चर्मकार

    फार फार वर्षांपूर्वी एकदा एका खेडेगावात एक चर्मकार राहात होता. त्याचा एक छोटासा ग्रामधंदा होता. तो धंदा चांगला चालावा म्हणून त्याला असंख्य कातड्यांची गरज लागत असे. तो अरण्यात जात असे आणि मेलेल्या जनावरांची कातडी गोळा करीत असे. एखादे मेलेले जनावर त्याला आढळले की तो त्याची कातडी सोलायचा.

  • समुद्रतळीचा राजवाडा

    दोन भाऊ सख्खेच. पण दोघांच्या दोन तन्हा होत्या व्यवसायाच्या मोठा “होना” पाण्यात गळ टाकून मासे पकडून विकत असे, तर धाकटा “होकी” हा डोंगरदऱ्यात हिंडून धावून शिकार करणारा. पक्षी मारणारा फासेपारधी म्हणून लोक त्याला ओळखीत असत.

  • गाईचे सैन्य

    एके दिवशी ‘तांबू’ गाय रानात गेली. रानात चरता चरता दिवस कसा संपला ते कळलंच नाही. जरासं अंधारून आलं होतं. हळूहळू ती परतीच्या वाटेवर आली. परंतु बरोबरीच्या ‘पांढरी’, ‘ढवळी’, ‘राणू’ कुणीच दिसत नाही, हे लक्षात येताच तांबू गायीने आपला चालण्याचा वेग वाढवला. जवळजवळ रानातली वाट संपतच आली होती. दूरवर दिवे दिसत होती. इतक्यात वाघोबाराजे दत्त म्हणून समोरी आले! क्षणभर तांबू गायीला काही सुचेनासे झाले. भीती वाटली.

  • मेघ राजा

    एक होता मेधी राजा. मोठा भरभक्कम ताजा तवाना. रंगानं काळा. पण मोठा ऐटबाज. मनात आलं की, आभाळात उंच उंच भरारी मारायचा. धावल्या ढगांना पकडायचा. त्यांची मानगूट धरायचा. धक्काबुक्की करायचा. त्यामुळं पाऊस अवचितच पडायचा. माणसं मग, आच्यारी का विच्यारी व्हायची. ते बघून हा असा हसायचा की, दोन पर्वतांची टक्करच जणू झालीय असा दणका उडायचा! त्याच्याजवळ एक छानदार लहान पिशवी असायची. देवानं ती त्याला दिलेली होती. म्हणून ती तो आपल्या केसात लपवून ठेवायचा. पण हा खुशीत आला की, ती एकदम चकाकायची.

  • चित्रकाराचे चातुर्य

    एक चित्रकार होता. फारच सुंदर अशी चित्रे काढायचा तो. त्याची चित्रे पाहून लोक अत्यंत प्रभावीत होत असत. दूरवर त्याची ख्याती पसरली होती. त्यानं काढलेलं चित्र प्राप्त करण्यासाठी लोकांची नेहमी धडपड चालत असे. या प्रतिभावान कलावंताचे चित्र मिळविण्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्याची तयारी लोक दाखवीत.

  • हत्ती आणि पाऊस

    एके काळी निसर्गात दोन बलवंत शक्ती होत्या. हत्ती आणि पावसाचा देव. अभिमानी आणि बढाईखोर हत्ती पावसाशी नेहमी वाद घालायचा. दोघात हत्ती मोठा आहे असं पावसानं मान्य करावं हा हत्तीचा हेतू असायचा. एकदा अशाच वादात आपल्या ओल्या आणि खळखळाट करणाऱ्या आवाजात पावसानं हत्तीला विचारलं ‘अहो गजराज, जिथं मी तुम्हाला चारा देतो तिथं माझ्यापेक्षा तुम्ही कसे मोठे असाल ?’ अभिमानी हत्ती हे कसे मान्य करणार ? काहीही विचार न करता तो म्हणाला, ‘तू नाही मला चारा देत. माझा मी शोधतो आणि खातो. स्वतःच्या हिंमतीवर मी जगतो.’

  • वशिष्ठ विश्वामित्रांची गोष्ट

    राजा विश्वामित्र आपल्या सैन्यासह अरण्यात शिकारीला गेला होता. फिरत फिरत तो वसिष्ठ मुनींच्या आश्रमाजवळ आला. महर्षी वसिष्ठांनी कुटित राहूनसुद्धा राजा विश्वामित्र आणि त्याच्या सैन्याचा भोजन देऊन राजेशाही पद्धतीने आदरसत्कार केला याचे विश्वामित्राला आश्चर्य वाटले.