(User Level: User is not logged in.)

बाल-साहित्य

मराठीतील बालसाहित्य येथे वाचूया.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • करुणा

    (जैन लोककथा)

    एका कुटुंबात तीन भाऊ होते. त्यांच्या बायका आळीपाळीने स्वयंपाक करीत असत. एके दिवशी लहान सूनेला स्वयंपाक करावयाचा होता.

  • महादेव पार्वतीची जन्मकथा

    फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. इथे फक्त पाणीच पाणी होते. त्या पाण्यातील एका कमलपत्रावर देवाचा जन्म झाला. देवाने एकदा आपला खांदा घासला तर त्यातून कावळ्याची अन् खेकड्याची निर्मिती झाली

  • सशाचं हृदय

    कोणे एके काळी समुद्राच्या तळाशी एक महाल होता. या महालात विविध प्रकारचे मासे, कासव आणि साप राहत असत. एके दिवशी सापांचा राजा पोटदुखीमुळे इकडेतिकडे सरपटत होता. दिवसरात्र वेदना असह्य झाल्यामुळे तळमळत होता. त्याच्या कुटुंबातील राजकुमार, राजकन्या, राणी, प्रधान सगळेच काळजी करू लागले. काय करावं कुणालाच काही सुचत नव्हते आणि राजाच्या वेदनाही कुणाला बघवत नव्हत्या. प्रधान म्हणाले, “आपण आपले मुख्य राजवैद्य माशाला बोलावू.” राजवैद्यांनी राजाची नाडी पाहिली आणि म्हणाले, ”महाराजांना सशाचं हृदय उकडून खायला दिलं तर लवकर आराम पडेल.”

  • भाजीचा प्रताप

    एक राजा होता. तो एकदा आपल्या महालाच्या खिडकीपुढं बसला होता. तिथं त्याला रस्त्यावरून एका फेरीवाल्याची आरोळी ऐकू आली.. ‘भाजी घ्या हो भाजी ! चमत्काराची भाजी! भाजी घ्या भाजी!’ राजाला नवल वाटलं. चमत्काराची भाजी म्हणजे कसली भाजी बुवा? त्यानं नोकराला सांगितलं, ‘जा, त्या भाजीवाल्याला बोलाव.’ भाजीवाला आला तेव्हा राजानं त्याला विचारलं चमत्काराची भाजी म्हणालास काय?

  • सर्वात वाईट वस्तू

    एक मौलवी होते. त्यांनी सगळीकडे आपल्या प्रामाणिकपणाचा प्रचार प्रसार केला. मशीदीत बसून दिवसभर मुलांना शिकवित असत आणि जी फी मिळे त्यात आपला उदर निर्वाह करीत असे. एक दिवस संध्याकाळी ते घरी आले आणि पत्नीला म्हणाले, “आज काय स्वयंपाक केला आहे.

  • अंशुच मासेमारीची मोहीम

    अंशू हा एक विचित्र मुलगा होता. नको ते करण्यात पटाईत होता. एकदा मात्र त्याचा डाव त्याच्याच अंगलट आला. आपण फेकलेल्या जाळ्यात तो स्वत:च फसला.

  • सिंह आणि चर्मकार

    फार फार वर्षांपूर्वी एकदा एका खेडेगावात एक चर्मकार राहात होता. त्याचा एक छोटासा ग्रामधंदा होता. तो धंदा चांगला चालावा म्हणून त्याला असंख्य कातड्यांची गरज लागत असे. तो अरण्यात जात असे आणि मेलेल्या जनावरांची कातडी गोळा करीत असे. एखादे मेलेले जनावर त्याला आढळले की तो त्याची कातडी सोलायचा.

  • वेडया कासवाची गोष्ट

    कोणे एके काळी, एका तळ्यांत कंब्रुग्रीव या नावाचा एक कासव रहात होता. कंबुग्रीव म्हणजे कमानदार मानेचा. तर हा कमानदार मानेचा कासव ज्या तळ्यांत रहात होता, त्या तळयांत दोन हंस पक्षीही रहात होते. त्या तिघांची छान मैत्री जुळली होती नि ते दिवसभर एकमेकांशी खेळण्यात आणि गप्पा मारण्यात रमत असत.

  • पहिला झेब्रा

    पृथ्वीवर सगळंच नवं नवं होतं, तेव्हा सगळी जनावरं एकसारखी होती. त्यांची शिंगं वेगळी आहेत, त्यांच्या अंगावरची कातडी चमकदार पिवळी तांबडी आहे आणि तिच्यावर काळे ठिपके आहेत असं काहीच नव्हतं. सृष्टिनिर्माता निर्माण करीत असलेल्या विशाल व्यवस्थेला पूर्ण स्वरूप देण्यात गढलेला होता. त्याने नाना प्रकारची शिंगं बनवली. आकार, लांबी, रुंदी ह्यात अफाट वेगवेगळेपणा ठेवला. नाना प्रकारची कातडी केली. केसाळ, रंगीबेरंगी, ठिपकेवाली, पट्टेवाली. काम झालं तेव्हा निर्मात्याने शिंगं, कातडी सरोवराच्या काठी असलेल्या एका गुहेत ठेवली.

  • रे हिंद बांधवा !

    रे हिंद बांधवा, थांब या स्थळी
    अश्रू दोन ढाळी
    ती पराक्रमाची ज्योत मावळे
    इथे झाशीवाली । धृ ।।

    तांबे कुलवीरश्री ती
    नेवाळकरांची कीर्ती,
    हिंदभूध्वजा जणु जळती
    मर्दानी राणी लक्ष्मीबाई
    मूर्त महाकाली ।।१।।

    घोड्यावर खंद्या स्वार,
    हातात नंगी तरवार
    खणखणा करित ती वार
    गोऱ्यांची कोंडी फोडित पाडित
    बीर इथे आली ।।२।।

    कडकडा कडाडे बिजली,
    शत्रुचि लष्करे थिजली,
    मग कीर्तीरुप ती उरली,
    ती हिंदभूमीच्या पराक्रमाची
    इतिश्रीच झाली ।३।।

    मिळतील इथे शाहीर,
    लववितील माना वीर
    तरु, झरे ढाळतिल नीर
    या दगडा फुटतिल जिभा
    कथाया कथा सकळ काळी ।!४॥।

    रे हिंद बांधवा, थांब या स्थळी
    अश्रू दोन ढाळी
    ती पराक्रमाची ज्योत मावळे
    इथे झाशीवाली ।।५।।