(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • शिखरावरी बांधली मंदिरे

    विचारांच्या उठती लहरी, वलये त्यांची होत असती ।
    सुविचारांची वलये सारी, नभाकडे जात दिसती ।।१।।

    पवित्र निर्मळ विचारांच्या, तरल अशा लहरी असती ।
    अशुद्ध साऱ्या विचारांची, जड लहरी तळांत राहती ।।२।।

    फार पूरातन काळी देखील, उकल दिसते या गोष्टीची ।
    पवित्रतेच्या सर्व स्थळांनी, शोधली जागा शिखरावरची ।।३।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • सदरा

    शैशव माझे सरताना मी स्वप्नांना विकाया शिकलो
    गुंजेत तोलुनी पेढीवरती सोन्यास विकाया शिकलो

    अकारण इथेच कधीही काही काहीच घडले नाही
    अभिषेकाचे साहित्य तरीही रांगाना विकाया शिकलो

    शाळेच्या पाटीवरल्या रेघोट्यांच्या मिठीत आसमंत
    क्षितिजांच्या करुनी भिंती अंगणास विकाया शिकलो

    आंधळ्या कोशिंबिरीचा घडीभराचा डाव आयुष्याचा
    उगवतीस पाठ करुनी मी दिशांना विकाया शिकलो

    ही वाट एकाकी अन कुठे उद्याच्या सूर्याचा भरोसा
    अंधारास फितूर होणाऱ्या सावल्या विकाया शिकलो

    साक्षात्कार जरी मोक्षाचा आहे मृत्यूस चुंबल्यानंतर
    सुखी माणसाचा नागव्याने सदरा विकाया शिकलो

    रजनीकान्त

  • आनंद छंदी

    “सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…

  • घोडपदेवचे  ग्रामदैवत : श्री कापरेश्वर महाराज

    ग्रामीण संस्कृती आणि परंपरा या यात्रौत्सवानिमित्त पहायला मिळते.

  • आधार

    वेलींना तो आधार होता, वृक्ष वाटला दणकट परि
    बुंधा ज्याचा किडूनी गेला, कोसळणार मग कधीतरी

    नष्ट करिल तो तरूवेलींना, धरणीवरती आडवा होता
    सौंदर्य दिले लताफूलांनी, सारे कांहीं विसरूनी जाता

    वेलींनो आणि झुडपानों, सोडूनी घ्या तो आधार पोकळ
    स्वतंत्रपणे तुम्ही जगण्या , स्वावलंबनाचे टाका पाऊल

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • आठव स्मृतींचे

    कधीतरी बोलना तूं एकदा
    गुज तुझ्या अव्यक्त अंतरीचे
    आता सरला हा जन्म सारा
    गहिवरले हे हुंदके भावनांचे
    गोठले स्नेहार्द भाव अंतरात
    भिजले चिंब पदर पापण्यांचे
    सांग! मनास कसे समजवावे
    दारुण दग्धदुःख या जीवनाचे
    हरविले सारे व्याकुळला जीव
    तरीही लोचनी आठव स्मृतींचे
    रचना क्र. १३४
    / ४ / १० / २०२३
    -वि.ग.सातपुते.(भावकवी )
    9766544908
  • नियतीची चाकोरी

    अथांग सारे विश्व हे, असंख्य त्याचे व्यवहार ।

    कसे चालते अविरत, कुणा न कधी कळणार ।।

    खंड न पडता केव्हाही, सूर्य-चंद्र येई आकाशी ।

    वादळ वारा ऋतू बदले, चूक न होई त्यांत जराशी ।।

    घटना घडे पुन्हा पुन्हा, आकार रूपे बदलत ।

    हर घटनेचे वलय, फिरे एकची चाकोरीत ।।

    प्रत्येक कालक्रमणाच्या आखून, दिल्या मर्यादा ।

    ठेवी अडकवून त्यामध्ये, सर्वाना नियती सदा ।।

    जरी भासे नवीन कुणा, नाविन्य सारे त्याचेसाठी ।

    बघत नाही जूनेपण तो, येई नंतर त्याचे पाठी ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • वळून पहा

    उडून गेली दूर दूर तू
    झेप घेउनी आकाशी
    बघू लागलो चकीत होऊनी
    पंखामधली भरारी कशी

    नाजूक नाजूक पंखाना
    आधार होता मायेचा
    चिमुकल्या त्या हालचालींना
    पायबंध तो भीतीचा

    क्षणात आले बळ कोठून
    विसरुनी गेलीस घरटे आपुले
    बंधन तोडीत प्रेमाचे
    आकाशासी कवटाळले

    कधीतरी उडणे, आज उडाली
    बघण्या साऱ्या जगताला
    किलबिल करून वळून पहा
    दाणे भरविल्या चोचीला

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • दर्पण

    चित्र दिसते दर्पणी ,

    जसे असेल तसे,

    धूळ साचता त्यावरी,

    अस्पष्ट ते होतसे ।।१।।

    दर्पणा परि निर्मळ मन,

    बागडते सदैव आनंदी,

    दूषितपणा येई त्याला,

    भावविचारांनी कधी कधी ।।२।।

    निर्मळ ठेवा मन आपले,

    झटकून द्या लोभ अहंकार,

    मनाच्या त्या पवित्रपणाने,

    जीवन होत असे साकार ।।३।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • अजाणतेतील अपमान

    स्फुर्ति येऊन कविता केली आनंद झाला मनीं ।
    चटकन कागदावरी लिहीली शब्द येतां ध्यानी ।।

    कवितेतील शब्दरचना झाली बहरदार ।
    कौतूकाची येई भावना बघुनी शब्द भांडार ।।

    पुर्ण करुनी कविता टिपूनी घेतली वहीत ।
    काव्य रचना परत वाचतां मग्न झालो आनंदात ।।

    फेकूनी दिला कागद ज्यावरी रचिली कविता ।
    विचारांत होतो धुंद कृत्य केले मी अजाणतां ।।

    अघटित घटना झाली काव्य स्फुर्ति गेली निघूनी ।
    नंतर मजला काव्य सुचेना बेचैन झालो मनीं ।।

    चूक मनां उमगली अपमान केला अजाणतां ।
    शारदा कागदावरी अवतरली बनोनी एक कविता ।।

    खिन्नता वाटली मनासी कागद घेतले उचलून
    निर्माल्य समजोनी त्यासी गंगाजलीं केले अर्पण ।।

    पुनरपि सुचले काव्य लिहूं लागलो कविता ।
    शब्द रचना भव्य लेखणीतून उतरतां ।।

    अनावधाने झाला मजकडूनी अपमान ।
    प्रायश्चित्त घेतां गेला शारदेचा राग निघून ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com