(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • काजळी धरल्या वाती

    तेवत होती ज्योत दिव्याची,
    प्रकाश देऊनी सर्व जनां,
    आनंदी करण्या आनंद वाटे,
    तगमग दिसे तिच्या मना ।।१।।

    शांत जळते केंव्हां तरी,
    भडकून उठते कधी कधी,
    फडफड करीत मंदावते,
    इच्छा दाखवी घेण्या समाधी ।।२।।

    जगदंबेच्या प्रतिमेवरती,
    प्रकाश टाकुनी हास्य टिपते,
    हास्य बघूनी त्या देवीचे,
    चरण स्पर्शण्या झेपावते ।।३।।

    अजाणपणाच्या खेळामधली,
    स्वप्न तरंगे दिसती,
    दिव्यामधले तेल संपता,
    काजळी धरती वाती ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • ईश्वरीय सत्ता

    जीवनात जेंव्हा जेंव्हा
    पहुडावं विश्रांतीसाठी
    एकांती मिटावेत डोळे.
    आणि तूच दिसावीस
    सतत हेच घडते आहे
    प्रितीची ओढ अनावर
    ओठात दडलेले सत्य
    हेच मात्र खरं
    तू जरी आज दूरदूर
    तरी तुझा स्पर्शभास
    मनांतरी मुक्तमुग्ध भेट
    सारी निर्मलतेची साक्ष
    हीच सत्यप्रितीची ओढ
    अनाहत ध्यास, भास
    भावनांचाच कल्लोळ
    हेच मात्र खरं
    जर भाग्यात असते
    सत्यस्पर्शाचे वरदान
    ललाटी नसता दुरावा
    जरी कुठेही असतो तरी
    सदैव एकरूप असतो
    सर्वत्र ईश्वरीय सत्ता
    त्यालाच स्मरत रहावे
    हेच मात्र खरं
    -- वि.ग.सातपुते (भावकवी)
    9766544908
    रचना क्र. ७६.
    १० - ३ - २०२२.
  • नशीब

    का असा धांवतोस तूं ,

    नशिबाच्या मागें मागें,

    यत्न होता भगिरथी,

    नशीब येईल संगे ।।१।।

    प्रयत्न होतां जोमाने,

    दिशा दिसताती तेथें,

    यशाचे ध्येय सदैव,

    योग्य मार्गानें मिळते ।।२।।

    प्रयत्न करूनी बघा,

    ईश्वर देखील मिळेल,

    इच्छा शक्ती प्रभावानें,

    नशीबही बदलेल ।।३।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • प्रेमाचा झरा

    निशब्द झाली होतीस तू मीही निशब्द झालो होतो
    नदी किनारी आपण दोघे एकमेकांत गुंतलो होतो
    प्रेम म्हणजे काय असते दोघांनाही माहित नव्हते
    प्रथम दर्शनी मन दोघांचे घायाळ मात्र झाले होते |

    जे मनात तेच ओठात पटकन रिते केलेस तू मन
    मी मात्र तुजसवे बोलण्यास शब्दात अडकत होतो
    जितक्या वेगाने आलीस तितक्याच वेगाने दूर गेलीस
    मी मात्र आठवणी जागवत कविता रोज करीत होतो |

    अजूनही रोज त्या नदी किनारी मी जाऊन बसत असतो
    वाटतं परत कधीतरी येशील या आशेवर जगत असतो
    नदी तर ती कधीच आटली आहे ना तिथं पाणी आहे
    नुसतंच वैराण वाळवंट पण डोळ्यात प्रेमाचा झरा आहे |

    -- सुरेश काळे
    मो.९८६०३०७७५२
    सातारा
    १ जून २०१९

  • विश्रांती

    धावपळीचे जीवन सारे,

    मिळे न कुणा थोडी उसंत

    विश्रांतीच्या मागे जाता,

    दिसून येतो त्यातील अंत ।।१।।

    चैतन्यमयी जीवन असूनी,

    चक्रापरी ते गतीत राही

    चक्र थांबता क्षणभर देखील,

    मृत्यूची ते चाहूल पाही ।।२।।

    थांबत नसते कधीही जीवन,

    अंत ना होई केंव्हां त्याचा

    निद्रा असो वा चीर निद्रा,

    विश्रांती ही भास मनीचा ।।३।।

    थकून जाई शरिर जेंव्हां,

    प्रयत्न करि ते विश्रांतीचा

    चैत्यन्य आत्मा देह सोडूनी,

    घेई आसरा पुन्हा दुजाचा ।।४।।

    आत्मा देखील थकून जाता,

    परमात्म्याशी विलीन इच्छितो

    चैतन्यातूनी विश्रांतीचा

    ‘मुक्ती’ मार्ग अखेरचा तो ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • प्रभू मिळण्याचे साधन

    ध्येय मिळण्या तुमचे योग्य लागते साधन

    कष्ट होतील व्यर्थचे चूक मार्ग अनुसरुन ।।

    अंतराळातील शोध महान बुद्धीचे प्रतीक

    घेण्या अचूक वेध अवकाशयान असे एक ।।

    अनंत दूरचे तारे न दिसती डोळ्यानी

    दुर्बिणीच्या नजरें बघती सर्व कौतूकानी ।।

    सूक्ष्म जंतूंचे अवलोकन, चक्षु घेण्या असमर्थ

    त्याचे मिळण्या ज्ञान लागते सूक्ष्मदर्शक यंत्र ।।

    यंत्र असे साधन जाणण्या कांहीं गोष्टी

    इंद्रियाना मर्यादा असून न बघे सारी सृष्टी ।।

    तसेंच आहे प्रभूचे जाणण्या त्याचे आस्तित्व

    साधन पाहिजे तपाचे देऊनी परीक्षा सत्व ।।

    दया क्षमा शांति ठरे श्रेष्ठ गुण

    सत्य तप भक्ती, प्रभू मिळण्याचे साधन ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    e-mail- bknagapurkar@gmail.com

  • कृपा तुजवरती

    कृपा होऊनी शारदेची,

    कवित्व तुजला लाभले

    शिक्षणाच्या अभावांतही,

    भावनांचे सामर्थ्य दिसले ।।१।।

    कुणासी म्हणावे ज्ञानी,

    रीत असते निराळी,

    शिक्षणाचा कस लावती,

    सर्व सामान्य मंडळी ।।२।।

    कोठे शिकला ज्ञानोबा,

    तुकोबाचे ज्ञान बघा,

    दार न बघता शाळेचे,

    अपूर्व ज्ञान दिले जगा ।।३।।

    जिव्हेंवरी शारदा,

    जेव्हा वाहते प्रवाही,

    शब्दांची गुंफण होवूनी,

    कवितेचा जन्म होई....४

    भाव शब्दांचा सुगंधी हार,

    माझी अंबिका भवानी

    वाहत रहा आनंदाने,

    यशस्वी होशील जीवनी ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • मैत्रगंध

    उंच उंच नारळाच्या बागा आणि त्या झावळ्या वर बसलेले पक्षी,किनाऱ्यावर पोहचताच होणारा तो वाळूचा स्पर्श,गलबताकडे धाव घेणारी कोळ्यांची पोरं. समुद्राच्या भोवताली असलेल्या किनाऱ्यावर तासनतास घालवलेला वेळ, आल्हाददायक होणारा हवेचा स्पर्श, त्यातून मिळणारा आनंद; अपर्णाला कायमच शहरातून तिच्या छोट्याश्या समुद्रकिनारी असणाऱ्या गावात ओढून आणायचा. दोन दिवसांनी ती पुन्हा तिच्या कामात व्यस्त असायची.. तिच्या नोकरीच्या निमित्ताने तिला पुन्हा परत जायला लागायचं, मन मात्र तिथच राहिलं आहे सतत असंच वाटायचं तिला. आपल्या स्वतःच्या कामाची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मात्र अपर्णा फारच तत्पर होती.

  • तुझ्या जाण्याच्या आधी

    तुझ्या इथून जाण्याआधी राहिलेलं सगळं पूर्ण करतो,
    अर्धवट राहिलेल्या श्वासांनाही आज मोकळं करतो.

    तू गेलीस तरी तुझी चाहूल घरभर रेंगाळते,
    रिकाम्या खोलीत बसून मी अजूनही तुझी वाट बघतो.

    काळाच्या ओघात बरंच काही मागे पडून गेलं,
    तरी एक जुना क्षण मी अजूनही मनाशी जपतो.

    “सोडून दे” म्हणालीस,
    शब्द शांत होते तुझे,
    पण सोडण्याआधीच्या प्रत्येक आठवणी
    मी पुन्हा पुन्हा आठवतो.

    आज निरोपाच्या टप्प्यावर उभा आहे एकटाच मी,
    स्वतःलाच समजावत,
    शेवटचं धैर्य गोळा करतो मी.

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे

  • जेव्हा लेखणी बोलते

    (१)
    जेव्हा लेखणी बोलते
    भाव मनीचे सांगते
    सत्य प्रकाशी करते
    नवे साहित्य योजते

    (२)
    जेव्हा लेखणी बोलते
    शस्त्रा सम ती भासते
    गुपित उलगडते
    मनीची व्यथा मांडते
    (३)
    जेव्हा लेखणी बोलते
    साहित्य शब्दी डोलते अंतरंगी झेपावते
    स्वैर नभी संचरते
    (४)
    जेव्हा लेखणी बोलते
    शब्दबाग फुलवते
    स्व-गंधी दरवळते
    सारस्वतात धुंदते
    (५)
    जेव्हा लेखणी बोलते
    काव्यसरिता वाहते
    हक्कासाठी ती झुंजते
    माझ्यातच सामावते

    सौ.माणिक शुरजोशी
    नाशिक
    १३/१/२०