अबोलाही बोलतो काही
ऐकूनी होतो असे ।
अबोल मी आहे कधीचा
कोणाही न कळले कसे?
.....मी मानसी
लाल ओढणी डोक्यावर ओढते,
लोलक कानांतले तरी डोकावू देते
हलकासा लायनर,
लिपस्टीक ओठांवर,
शेड, त्याच्या आवडीची लावते.
केसांच्याही चार बटा, सवयीने
कपाळाच्या बाजूने क्लिप करते.
थोडासा परफ्यूम तिथेही लावते..
थोडासा परफ्यूम तिथेही लावते,
बाकी कपड्यांवर शिंपडताना..
तो धुंद धुंद झाला पाहीजे..
मागाहून आठवणींत रमताना..
तीन-चार गिरक्या घेते मन
आरशात निरखून बघते जेंव्हा,
बावरी राधा शरमून जाते मग;
कान्हा प्रतिबिंबातून हसतो तेंव्हा!
चित्तचोर सखा तो आला आला
म्हणून सावरू लागते जशी,
हृदयाची धडधड सांगू लागते
“आंतच वाकून पाहा ना सखी!
जीवा-शिवाचे ऐक्य गं अपुले
तू नको शोधू मज बाहेरी
शृंगार तुझ्यावर मीच चढवितो
पाहातो तुझ्याच डोळ्यांतुनी.
सखे, राधे, तुला नित्य गं,
पाहातो मी तुझ्याच डोळ्यांनी.”
-- प्रज्ञा वझे घारपुरे
चिंब भिजल्या आभाळातून
पाऊस अविरत रिमझीमतो
टपटपणाऱ्या थेंबांमधुनी
सुगंध मातीचा दरवरळतो
भिरभिरणाऱ्या वाऱ्यामधुनी
मेघांचे तोरण हलते
नितळ ओल्या क्षितिजावरती
वीज रुपेरी चमचमते
घनघोर भरुनी आभाळ असा
पाऊस कितीदा तरी कोसळतो
परी मनास भिजवून जाईल ऐसा
वळीव एकदाच येतो...
---आनंद
विलासराव देशमुखांना विचारले- का हो तुम्हाला मुख्यमंत्रीपद का सोडावे लागले? तेव्हा ते म्हणाले- माहित नाही यापूर्वीही असेच झाले होते-
मनोहरला विचारले
का रे बाबा का दूर केले?
म्हणाला माहित नाही
विलास ला विचारले
का रे बाबा का दुर केले?
म्हणाला माहित नाही
सुशीलला विचारले
का रे बाबा कधी दूर होशील?
म्हणाला माहित नाही
जनतेला विचारले
का हो का दूर करतात असे?
जनता म्हणजे माहित नाही
कारण जनतेला कधी
आपल्या मतांची किंमत
कळलेच नाही
-- विनायक अत्रे.
दिनांक: १७/०१/२००३.
उडत उडत एक मक्षिका,
देवघरांत शिरली,
पूजा- साहित्य आणि मूर्तीवरी
स्वच्छंदानें नाचूं लागली ।।१।।
धुंदीमध्ये बागडत होती,
मूर्तीच्या बसे शिरावरी,
धूप, गंध आणि सुमनावरूनी,
जाई मध्येच प्रभू चरणावरी ।।२।।
पंख चिमुकले हलवीत ती,
मूर्तीपुढें गांऊ लागली,
प्रसाद दिसतां पंचामृताचा,
प्रभू अर्पिण्यासी झेपावली ।।३।।
नैवेद्याच्या क्षीर सागरीं,
आत्मसमर्पण तिने केले,
प्रभू सेवेत तल्लीन होऊनी,
जन्माचे सार्थक केले ।।४।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
शेरो शायरी करन माझा पेशा नाही,
माझा पेशा दूसराच आहे
चुकुन पडलो या प्रेमात
आता मी तुमच्या सारखाच आहे
रुजविता बियाणें
अंकूर फुटती
असतील दाणे जसे
तेच उगवती
पेरता आनंद
आनंदचि मिळे
प्रेमाची बियाणें
प्रेम आणी सगळे
शिवीगाळ करुनी
आदर येई कसा
शत्रुत्त्वासंगे नसे
मैत्रीचा ठसा
घृणा दाखवूनी
कसे येई प्रेम
क्रोधाच्या मोलाचे
शांती नसे दाम
पेरावे तसें उगवतें
नियम हा निसर्गाचा
सुख दुःखाला कारण
स्वभाव ज्याचा त्याचा
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
मानवता आहे जगात,-?
प्रश्न खूपदा पडे,
आई बापा टाकून देतात,
कोणते पुण्य मग मिळे,--?
संसारी रममाण होतात, भूतकाळाचा पडे विसर,
उभे ज्यांनी केले ते,
वृद्धाश्रमी सापडतात,--!!!
हेच संस्कार मुलांवर,
का बरे करतात,--?
आईबापाला अंतर देऊन,
कोणते समाधान मिळवतात,?
वरील चित्रफितीतुनी,
कोणता मिळे संदेश,
वागणे प्राण्यांचे पहा,
प्रेम केवढे हे विशेष,--!!!
जिने त्यांना सांभाळले,
माया ममता दाखवून,
इतकी वर्षे गेली मध्ये,
तरी ना गेले ते विसरून,--!!!
हिंस्त्र प्राणी म्हणत म्हणत,
जग त्यांना हिणवते,
माणसांहून भावना थोर प्राणिजगत सांभाळते,--!!!
*प्रेम त्यांचे असते मूक,
तरीही किती बोलके,
अनुभव घ्यावा त्यांचा,
ठरतील श्रेष्ठ ते शेलके*,--!!!
हिमगौरी कर्वे.©
Copyright © 2025 | Marathisrushti