उंच चढूनी हिमालयी, झेंडा तो रोविला
गीरीराजाचे शिरावरी, विजय संपादिला
उंचाऊनी बघे मानव, अथांग जगताला
विज्ञानाच्या जोरावरती, अंतराळात गेला
युगा युगाचा चंद्रमा, केला अंकित त्याने
त्याच्या देही ठेवी पाऊल, मोठ्या अभिमानाने
अगणित दिसती गृहगोल, त्याचा दृष्टीला
सीमा न उरली आता मग, चौकस बुद्धीला
चकित होतो प्रथम दर्शनी, विज्ञाना बघता
दिसून येती अनेक गुढे, एक एक उकलता
किती घेशी झेप मानवा, उंच उंच गगनी
वाढत जातील क्षितिजे, तितक्याच पटींनी
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
गोवा मुक्ती संग्रामातील रानडे यांची कामगिरी धाडसी आणि रोमांचक अशी होती. त्यांनी शिक्षक म्हणून गोव्यामध्ये आपले बस्तान बसवले आणि पोर्तुगीजांविरोधात सशस्त्र बंड उभारले. या कारवायांमध्ये बेती येथील पोलीस चौकीवर केलेल्या हल्ल्यात ते जखमी झाले होते. त्यानंतर या कारवाईविरोधात त्यांना अटक झाली. त्यानंतर पुर्तुगीज पोलिसांनी त्यांना पोर्तुगालमधील लिस्बन येथे तुरुंगात ठेवले.
लग्न म्हणजे काय असतं ?
एक चुकलेलं गणित असतं
कारण तिथे एक आणि एक तीन असतं...
लग्न म्हणजे काय असतं ?
उगाच त्याग करणं असतं
कारण त्यातून काहीतरीमिळवायचं असतं
लग्न म्हणजे काय असतं ?
दोन जीवांचं मिलन असतं
कारण एक अगोदर जाणार हे ठरलेलं असतं
लग्न म्हणजे काय असतं ?
मोक्षाकडे नेणारं दार असतं
कारण ते तोडावसंकित्येकांना वाटत असतं
लग्न म्हणजे काय असतं ?
जगण्याला एक निमित्त असतं
कारण त्याशिवाय जिवंत राहण अवघड असतं
© कवी – निलेश बामणे
दिवाळीच्या पदार्थात आधी गोडात हात जाणारे साधारण तुल ,धनु राशीचे .
चकलीवाले मेष,वृश्चिक,सिंह
आधी चहाचा घोट घेणारे कर्क राशीचे
वृषभ प्रत्येकाची थोडी थोडी चव घेतील
मिथुन वाले चिवड्यातील काजू ,शेंगदाणे हळूच फस्त करतील .
कन्यावाले आधी थोडा क्यालरीचा विचार करतील .
मकरवाले चिवडा घेतील पण नेमका पहिलाच दाणा यांना कुजका मिळतो !
कुंभवाले लाडू हवा असताना अनवधानाने कडबोळ चावायला सुरवात करतील .
मीनवाले कायम गोंधळात, यांचा नक्की काय घ्यायचं हे ठरेपर्यंत मेषेच्या चार चकल्या फस्त झालेल्या असतात !
गझल
वृत्त :- व्योमगंगा
लाच घेणे पाप आहे सांगणारे पाहिले मी
वाट सत्याची धरूनी चालणारे पाहिले मी
झोपडी माझी सुखाची खाण व्हावी वाटते मज ;
गर्व मोठ्या बंगल्याचा मानणारे पाहिले मी
फाटका माझा खिसा पण दान देणे जाणतो मी
पावत्या छापून खोट्या मागणारे पाहिले मी
लोकशाही श्रेष्ठ आहे हेच लोका सांगती ते
लोकनेते साफ खोटे बोलणारे पाहिले मी
वाचवावी लेक, मित्रा फार झाले बोलणे हे
वारसासाठी सुनेला जाळणारे पाहिले मी
© जयवंत वानखडे,कोरपना
भ्रमणध्वनी ९८२३६४५६५५
माझ्या स्वप्नातील विमान जमिनीवर स्थिरावताच माझ्यातील माणुसकीही क्षणात मेली होती… © कवी – निलेश बामणे
सारेच आहे प्रभूमय,
अणूपासून ब्रह्मांड होय...१,
ब्रह्मांड भाग तो ईश्वराचा,
आकाश भाग हा ब्रह्मांडाचा....२,
सर्वत्र व्यापले आकाश,
न जाणती त्याचे पाश, ....३,
वायूचा होवून संचार,
जीव जंतू जगविणार....४
वायू असे शक्तीचे रूप,
पेटवी तो प्राणदीप....५,
प्राण आपल्या अंतरी,
तेच असे रूप ईश्वरी....६
जसे शिव आणि शक्ती,
तसे प्राण व वायू असती...७,
बाहेरची वायू शक्ती,
अंतरिच्या प्राणास भेटती....८,
जाता दोन्ही एक होवूनी,
चेतना मिळते जीवनी...९
- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
मुरलीधरा वाजीव रे मुरली
जीवसृष्टी सारी आसुसलेली...
सुर वेणुचे दशदिशा उजळती
खगगण, मंजुळ स्वरे गाती...
गोकुळीची जित्राबे गोधूली
तुझ्याच ओढ़ी हंबरत येती...
झुळझुळती मोदे वृक्षवल्ली
मीरा, राधा भक्तिगीत गाती...
स्वर तव मुरलीचे मनोहारी
प्रेमस्पर्शे जीवास जगविती
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
(9766544908)
रचना क्र. २८०
२/११/२०२२
रंग बदलले ढंग बदलले, साऱ्या जीवनाचे
बदलणाऱ्या परिस्थितीने, तत्व शिकवले जगण्याचे....१,
कैफ चढूनी झेपावलो, नभात स्वच्छंदे
यश पायऱ्या चढत असतां, नाचे मनीं आनंदे....२,
धुंदीमध्यें असता एका, अर्थ न कळला जीवनाचा
आले संकट दाखवूनी देयी, खरा हेतू जगण्याचा....३,
दु:खामध्ये होरपळून जाता, धावलो इतरांपाठीं
अनेक दु:खे दिसून येता, झालो अतिशय कष्टी....४,
दु:ख आपले निवारण्याते, आनंद वाटे मनीं
इतर जणांची दु:खे हाटविता, द्विगुणीत गेला होऊनी....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
जगातील वस्तू, वाटे आकर्षक
देह सुख देण्या, समजे त्या ठिक...१
प्रत्येक गोष्टीला, डब्याचा आकार
सुखाचे वेष्ठन, ते चमकदार...२
चमक बेगडी, फसवी सर्वाला
काय डब्यामध्ये, कळेना कुणाला...३
झाकण उघडा, दुःख दिसे आंत
लपून बसले, प्रत्येक गोष्टीत...४
हात लावताच, दुःख हाती येई
भासलेले सुख, नष्ट होत जाई...५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti