(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • राजस यमन

    चालायला सुरवात करताना, साथीला ३ ४ झाडांची साथ असताना, हळूहळू, नजरेसमोर हिरव्या गर्द वृक्षांची दाटी होऊन, त्यातच आपले मन गुंतून जावे त्याप्रमाणे यमन रागाचे काहीसे वर्णन करता येईल. तसे बघितले तर, सगळ्याच रागांच्या बाबतीत कमी अधिक प्रमाणात असलाच अनुभव येतो म्हणा. यमन राग हा बहुदा एकमेव राग असावा, ज्या रागाची सुरवात "सा" स्वराने न होता, "नि" स्वराने होते म्हणजे "नि" स्वर,या रागाचा "सा"!! आपल्या रागसंगीतात "सा" स्वराला अपरिमित महत्व आहे.

    या दृष्टीने "नि" स्वराचे इथले महत्व समजून घेता येईल. यमन राग हा खरोखरच अफाट आहे, असे मी म्हटले म्हणजे किती? अजूनपर्यंत थांग लागलेला नाही. दरवर्षी या रागावर आधारित नवनवीन गाणी तयार होतात आणि या रागाचे नवीन रूप आपल्या कानावर येते. मला तर असेच वाटते, निदान भारतात तरी, अजूनपर्यंत एकही संगीतकार झाला नसेल, त्याने आयुष्यात कधी ना कधीतरी या रागावर आधारित गाणे बनविले नाही!! एकतर या रागात सगळे स्वर लागतात आणि "म" स्वराचा अपवाद करता, सगळे स्वर शुद्ध स्वरूपात लागतात. त्यामुळे या रागाचा विस्तार, कलाकार करेल तितका थोडा, अशी परिस्थिती आहे. आत्तापर्यंत इतकी अगणित गाणी तयार झाली आहेत की, केवळ यमन रागातील गाणी, या विषयावर एखादे छोटेखानी पुस्तक तयार होईल!!

    शास्त्रानुरूप, या रागाचा समय जरी संध्याकाळचा असला तरी या स्वरांची गोडी आणि विविधता इतकी आहे की, दिवस/रात्री कधीही हा राग सादर झाला तरी काहीही फरक पडत नाही.याच्या स्वरांची मोहिनी विलक्षण आहे. अगदी, ज्यांना स्वरज्ञान नसते (ते बहुतेकांना नसते म्हणा) त्यांना देखील हा राग सर्वसाधारणपणे आवडून जातो."ग" आणि "नि" या रागाचे प्रमुख स्वर. असे असले तरी बरेच कलाकार, तीव्र "म" स्वरावर अधिक भर देतात. अर्थात, प्रत्येक रागात अशी वैशिष्ट्ये असतात. रागातील स्वरस्थाने ही, सुंदर रुपवतीच्या चेहऱ्यासारखी असतात!! चेहऱ्यावरील "नाक", "कान","डोळे","ओठ" यांमुळे त्या चेहऱ्याला सौंदर्य प्राप्त होते पण तरीदेखील, प्रत्येक अवयव "सुटा' बघितला तर ते सौंदर्य जाणवेलच असे नाही.
    "त्या दाट लांब केसांचा, वाऱ्यावर उडतो साज;
    दु:खात अंबरे झुलती, की अंग झाकते लाज….
    तरि हळू हळू येते ही, संध्येची चाहूल देवा;
    लांबली उदासीन क्षितिजे, पाण्यांत थांबल्या नावा….
    कविवर्य ग्रेस यांच्या "उर्मिला" या कवितेतील या ओळी. एकाच वेळी शृंगाराची चाहूल तर दुसऱ्या वेळी "उदासीन क्षितिजे" या शब्दांतून आर्त जाणीव. यमन रागाच्या ज्या अनंत छटा आहेत, त्यातली ही काही शब्दरूपे.
    "इटवाह" घराण्यातील सुप्रसिद्ध सतारीये उस्ताद शाहिद परवेझ यांनी वाजवलेला यमन राग केवळ अपूर्व असा आहे. देशी, परदेशी असंख्य दौरे करून, आपल्या वादनाची प्रचीती त्यांनी दिली आहे. थोडे खोलवर निरीक्षण केले तर उस्ताद विलायत खान आणि पंडित रविशंकर, या दोन्ही वादन पद्धतीचा संकर यांच्या वादनात ऐकायला मिळतो तरीही उस्ताद विलायत खान साहेबांची पद्धत अंगीकारलेली आढळते, विशेषत: वादनात जेंव्हा "गायकी" अंग मिसळले जाते तेंव्हा तर प्रभाव उठून दिसतो. असे असले तरी वादनाचा आविष्कार स्वतंत्र आहे.
    वादन ऐकताना, सुरवातीची आलापी ऐकताना "गायकी अंग" ऐकायला मिळते. इथेच "नि रे ग म" ही सुरावट ऐकायला मिळते. पुढे ठाय लयीत गत सुरु होते आणि सगळा यमन राग आपल्या समोर उभा राहतो. तारेवर ठेवलेला "दाब" आणि त्यातून निर्माण केलेली "खेंच", हे वादनाचे विलोभनीय रूप आहे.
    हिंदी चित्रपटात असंख्य प्रणयगीते बांधली गेली आहेत. त्यातील खास संदर्भ घ्यायचा झाला तर '"हम दोनो" चित्रपटातील "अभी ना जाओ छोडकर" हे युगुलगीत यमन रागाची चेष्टेखोर प्रणयाची छटा दाखवणारे गाणे आहे. "अभी ना जाओ छोडकर" ही ओळ जेंव्हा रफीच्या गळ्यातून निघते, त्या लडिवाळ सुरांतच यमन राग दडलेला आहे. अर्थात गाण्यात पुढे दोन्ही "मध्यम" ऐकायला मिळतात, तिथे चाल यमन रागापासून वेगळी होते पण हे "स्वातंत्र्य" प्रत्येक रचनाकार घेतच असतो. अखेर गाण्यात शब्दातील भावना महत्वाची.
    "अभी ना जाओ छोडकर, के दिल अभी भरा नही.
    अभी अभी तो आयी हो, बहार बन छाई हो;
    हवा जरा महक तो ले, नजर जर बहक तो ले;
    ये शाम ढल तो ले जरा, ये दिल संभल तो ले जरा;
    मैं थोडी देर जी तो लू, नशे के घूंट पी तो लू;
    अभी तो कुछ कहा नहीं, अभी तो कुछ सुना तो नहीं".
    साहिरने गाणे लिहिले देखील प्रणयाच्या मस्तीत!! अगदी अबोध, किंवा ज्याला Platonic म्हणतात, अशा पातळीवरील जरी प्रणय नसला तरी प्रेमातील संयत गोडवा आणि चालीतील अवगुंठीत सुश्राव्यता, या गुणांमुळे हे गाणे लोकप्रिय झाले. गाण्यातील हरकती देखील, शब्दांतील भाव कुठेही दुखावला जाणार नाही, या बेतानेच घेतलेल्या आहेत."नशे के घूंट पी तो लू" ही ओळ म्हणताना, रफी किंचित "नाटकी" वाटतो पण ते देखील गाण्याच्या प्रकृतीत व्यवस्थित सामावले जाते. संध्याकाळची रमणीय वेळ, गाणे ऐकताना मात्र सुगंधित होऊन जाते.
    केवळ हिंदीच नव्हे तर एकूणच भारतीय चित्रपटात, ज्या गाण्यांना खऱ्याअर्थी "पवित्र" असे म्हणता येईल अशी असामान्य रचना, "ममता" चित्रपटात, "छुपा लो युं दिल मे प्यार मेरा" या हन्यातून अनुभवायला मिळते. निखळ यमन राग!! मुळात संगीतकार रोशन यांच्या चाली या नेहमीच शांत स्वभावाच्या असतात, अगदी प्रणयी भाव व्यक्त करायचा झाला तरी त्यात, संगीतकाराची "संस्कृती" दिसून येते. इथे तर, विरहाची आस आणि तडफड आहे. यमन रागात किती असंख्य भावभावना मांडता येतात, यासाठीचे हे मनोरम उदाहरण.
    "छुपा लो युं दिल मे प्यार मेरा
    के जैसे मंदिर में लौ दिए की,
    तुम अपने चरणो में रख लो मुझको
    तुम्हारे चरणो का फुल हुं मैं,
    मैं सर झूकाए खडी हुं प्रीतम
    के जैसे मंदिर में लौ दिए की".
    शायर मजरुह यांची कविता देखील तितकीच असामान्य आहे. प्रेमाला मंदिरातील ज्योतीची उपमा देणे आणि त्या भावनेला पार उंची गाठून देणे, केवळ सक्षम शायर(च) करू शकतो. कवितेतील प्रत्येक ओळ ही इतकी अपरिहार्य आहे की तिथे दुसरा कुठलाच शब्द आपल्या अभिप्रेत करता येत नाही. गाणे हळूहळू टिपेच्या स्वरांना साद घालते आणि त्या उच्च स्वरांनी गाण्यातील आशय आपल्या मनात कायमचा उतरतो. उत्तम भावकविता कशी असू शकते, याचे सुंदर उदाहरण. सगळे गाणे यमन राग व्यापून उरला आहे पण तरीही अखेर रागाच्या बाराखडी पलीकडे आपल्याला नेउन ठेवणारे हे गाणे आहे. किंबहुना रागाची आकृती अधिक जिवंत आणि विस्तारित करणारी ही कलाकृती आहे.
    मिर्झा गालिब यांची एक अतिशय प्रसिद्ध गझल,"हर एक बात पे कहेतो हो तुम की तू क्या है" लताबाईंच्या आवाजात ऐकणे, हा अनुभव केवळ अवर्णनीय आहे. संगीतकार फैय्याज शौकत यांनी यांनी या रचनेची तर्ज बांधली आहे. गाण्यातील पहिलाच आलाप इतका अवघड आहे की तो आलाप घेणे, हीच एक परीक्षा ठरते. खरतर शायरी म्हणून गालिब यांच्या काही रचना फार अवघड आहेत. एकतर तुम्हाला उर्दू भाषेचा गाढा अभ्यास लागतो अन्यथा शायरीचा गंध समजून घेणे अशक्य. याचा रचनेत एक "मतला" आहे.
    "रही ना ताकत-ए-गुफ्तार और अगर हो भी,
    तो किस उम्मीद पे कहिये के आरजू क्या है" .
    आता या ओळींतील, " ताकत-ए-गुफ्तार" याचा जर अर्थ(च) कळला नाही तर मग कवितेची मजा घेता येणे कठीण. "संवाद किंवा बोलण्याची ताकद" हे एकदा समजून घेतले म्हणजे सगळ्या शेराचा अर्थ ध्यानात येतो आणि गालिब किती "श्रीमंत" आहे, याची कल्पना येते.
    "हर एक बात पे कहेतो हो तुम की तू क्या है,
    तूम्ही कहो के ये अंदाज-ऐ-गुफ्तगू क्या है".
    यमन रागात भरपूर गझला सापडतात. या रागाची खासियत अशी आहे, इथल्या प्रत्येक हरकतीला, विस्ताराची जोड देता येते आणि मग तो विस्तार, आपापल्या मगदुराप्रमाणे विस्तारता येतो. एकतर रागात सगळे सूर लागतात आणि प्रत्येक सुराची स्वत:ची अशी "किंमत" आहे. त्यामुळे या रचनेसारखी रचना घेतली तर समेवर उतरताना, आधीच्या कुठल्यातरी रचनेशी साम्य सापडेलच याची खात्री देत येत नाही. परिणाम, रागाची व्याप्ती अपरिमित होते.
    आताच वरती आपण, एका गझलेचा आस्वाद घेतला तर आता, असेच अप्रतिम गोडवा लाभलेले भजन बघुया. ""किनु संग खेलू होली" - मीराबाईचे भजन. काव्य वाचले तर लगेच राजस्थानी मातीचा गंध अनुभवायला मिळतो. गाण्याची चाल, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी दिली आहे. खरेतर मंगेशकरांची चाल म्हटल्यावर, काही ठराविक वळणाच्या हरकती ऐकायला मिळणे क्रमप्राप्त(च) ठरते परंतु त्याबाबतीत ही रचना फार वेगळी आहे. शब्दातील आर्त भाव तसेच काहीशी रुखरुख, चालीत सुंदररीत्या उतरली आहे.
    "किनु संग खेलू होली
    पिया तज गये हैं अकेली"
    रचनेच्या सुरवातीलाच सतारीचे टोकदार सूर ऐकायला येतात आणि त्या ध्वनिसोबत आपल्या कानात यमन राग रुंजी घालायला लागतो. काव्यात रुखरुख स्पष्ट वाचता येते पण ती देखील किती मार्दवतेने चालीत मांडली आहे. गायनात कुठेही शब्द ओढलेला नाही की शब्द्फोड केलेली नाही. चाल सलगपणे आपला मार्ग आक्रमित असते आणि आपल्या मनावर गारुड घालीत असते. लताबाईंची गायकी कसली अप्रतिमपणे खुलून आली आहे. भजनात एकाबाजूने आळवणी असते तर दुसऱ्या बाजूने मागणे असते. या दोन्ही मागण्या इथे केवळ काव्यातून(च) नव्हे तर संगीतातून व्यक्त होतात.
    १९७५ च्या सुमारास आलेल्या "आंधी" या चित्रपटात - "इस मोड से जाते है" हे गाणे यमन रागाची अनोखी ओळख करून देते. वास्तविक प्रणयी थाटाचे गाणे पण गाण्याची चाल सरळ, सोपी तो राहुल देव बर्मन कसला!! खरतर ही गुलजार यांची असमान्य भावकविता आहे. केवळ कविता म्हणून स्वतंत्र आस्वाद घेणे तितकेच आनंददायी आहे. गुलजार यांच्या बहुतेक कवितेंत, नेहमीचे शब्द नेहमी वेगळच आशय दर्शवतात आणि वाचताना वाचकाला चकित करून टाकतात. प्रसंगी उर्दू शब्दांची देखील पखरण केली जाते. शब्दांशी खेळण्याचे, या कवीचे कसब वाखाणण्यासारखे आहे.
    "इस मोड से जाते है
    कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम राहें;
    पत्थर की हवेली को, शीशे के घरोन्दो में,
    तिनके के नशेमन तक, इस मोड पे जाते है".
    या गाण्याची सुरवात देखील दीर्घ आलापीने होते. वरती आपण, "हर एक बात पे" मधील आलाप ऐकल्यास आणि आता या गाण्यातील आलाप ऐकल्यास, त्यात सत्कृत्दर्शनी काहीही साम्य ऐकायला मिळत नाही पण, जशी रचना पुढे सरकते, तशी लगेच दोन्ही गाण्यातील आलापीत साम्य आढळून येते. हे कसब संगीतकाराचे. गाण्याचा मुखडा "दिलखेचक" असेल तर त्या गाण्याची पुढील बांधणी मनोरम होण्यास मदत होते. अर्थात, अशा अफलातून रचनेत देखील संगीतकाराने, आपल्या हातखंडा तालाचा प्रयोग केला आहे. इथे "मोड" शब्दावर जी हरकत घेतली आहे, ती जितकी लताबाईंची तितकीच या संगीतकाराची, असे सहज म्हणता येईल. मात्रा मोजून बघितल्या तर केरवा ताल आपल्याला मिळतो पण त्याचे सादरीकरण ऐकले आणि त्याचा मागोवा घेतला तर संगीतकाराचे कौशल्य अनुभवायला मिळते.
    काही वर्षांपूर्वी आलेल्या "रेफ्युजी" सिनेमात - "मेरे हमसफर, मेरे हमसफर;मेरे पास आ, मेरे पास आ" हे गाणे ऐकायला मिळाले आणि परत एकदा या यमन रागाच्या दर्शनाने नव्याने दिड:मूढ व्हायला झाले. संगीतकार अन्नू मलिक यांची चाल असून, शायरी जावेद अख्तर यांची आहे. गायन प्रामुख्याने अलका याज्ञिक यांचे असून गाण्याच्या शेवटी सोनू निगमचा स्वर ऐकायला मिळतो. गाण्यात, एरव्ही फारसा ऐकायला मिळत नसलेला "रूपक" ताल ऐकायला मिळतो. गाणे अतिशय सुश्राव्य आहे आणि मनाची लगेच पकड घेणारे आहे.
    "मेरे हमसफर, मेरे हमसफर,
    मेरे पास आ, मेरे पास आ,
    हमे साथ चलना है उम्रभर,
    मेरे पास आ, मेरे पास आ".
    गाण्याची चाल जरी यमन रागावर असली त्याला राजस्थानी लोकसंगीताची फोडणी आहे. गाण्यातला रूपक ताल तर केवळ खास असा आहे.
    अर्थात यमन रागावर मी इथे काही गाण्यांची ओळख करून दिली परंतु केवळ हिंदी गाण्यांचाच विचार केला तरी एक पुस्तक तयार करता येईल, इतका प्रचंड पसरलेला आहे. कधी कधी वाटते, या यमन रागाला कुठे "अंत" आहे का? अजूनतरी या रागाचा "किनारा" दृष्टीक्षेपात नाही आणि म्हणूनच राग आपल्याला सतत चकवा देत असतो, आपल्या आजूबाजूला आनंदाची पखरण करीत!!
    -- अनिल गोविलकर

  • मेघमल्हार

    मेघमल्हार आता ऐकूया ऑडिओ स्वरुपात...

    लेखक - नितीन आरेकर

    आवाज - माधुरी लोणकर

  • कळ्या मोहरताना !

  • १.०० ते ४.०० झोप म्हणजे झोप

    एक मॅटर्निटी होम

    वेळ दुपार १.१५

    एक प्रसूती होते

    आई नॉर्मल

    बेबी नाॉर्मल

    पण बाळ शांत

    निपचित पडून
    सगळी कडे आनंद मिश्रीत टेशंंन
    नर्सेसची धावपळ
    डाॅक्टरची गडबड

    मुख्य डॉक्टरला पाचारण
    मुख्य डॉक्टर कडून तपासणी
    निरनिराळ्या तपासण्या

    सगळे रिपोर्ट नॉरमल
    बाळ अजूनही शांत पणे पडून

    असे होईतो ४.०० वाजले , सगळे चिंतेत ,
    आणि अचानक
    बाळ मोठ्या मोठ्याने रडू लागले

    सगळे हसले
    त्यांना कळले

    १.०० ते ४.०० झोप म्हणजे झोप.

    ठिकाण कुठेले सांगायला हवय?

  • प्रेमःएक आठवणींची कविता- भाग

    प्रेमःएक आठवणींची कविता. क्रमशः पुढे चालू….

  • मराठी भाषेचे अुत्क्रांत स्वर

    27 फेब्रुवारीच्या जागतिक मराठी भाषा दिवसानिमित्तानं....

    सोपी मराठी ... प्रवाही मराठी ... अुत्क्रांत मराठी ... समृध्द मराठी.... :: मराठी भाषेचे अुत्क्रांत स्वर

    पारंपारिक स्वर : अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं (अुच्चार...अनुस्वार) अ: (विसर्ग, नेहमीचा सामान्य अुच्चार.... अहा..), ऋ (र्‍हस्व आणि दीर्घ. दीर्घ ऋ संगणकावर मला टाअीप करता आला नाही), लृ (र्‍हस्व आणि दीर्घ) असे अेकूण 16 स्वर आहेत.

    इ ई उ ऊ ए ऐ या स्वरचिन्हांअैवजी अि, अी, अु, अू, अे अै ही चिन्हे स्वीकारावी.

    आ, ओ, औ ही स्वरचिन्हे आपण आधीच स्वीकारली आहेत.

    स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, सुमारे 85 वर्षांपूर्वी, भाषाशुद्धीची चळवळ सुरू केली. त्यात थोडी लिपीशुद्धीही होती. त्यांची तर्कशुध्द विचारसरणी म्हणजे....क ला वेलांटी लावली तर ‘की’ होते आणि ते आपण स्वीकारलं आहे तर अ ला वेलांटी लावून ‘अि’ का स्वीकारू नये? त्यानुसार इ, ई, उ, ऊ, ए, ऐ या चिन्हांबद्दल (अक्षरांबद्दल..स्वरांबद्दल..) अि, अी, अु, अू, अे अै ही चिन्हे स्वीकारावी.

    आ, ओ, औ, अं ही स्वरचिन्हे आपण आधीच स्वीकारली आहेत. अशारितीनं अ ची बाराखडी जर आपण स्वीकारली तर, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ या स्वरचिन्हांची आवश्यकता राहणार नाही.

  • शरीररुपी परिस

    विचारान्चे सोने

  • राजकारणातील काही ‘गुळगुळीत’ वाक्ये

    राजकारणात नेहमी वापरली जाणारी काही वाक्ये वर्षानुवर्षे वापरून इतकी ‘गुळगुळीत’ झालेली आहेत की, लोक त्यावरून घसरून सुद्धा पडतील, पण जरी घसरून पडले तरी त्यांनाही हसू आल्याशिवाय राहणार नाही. तर बघा काही ‘गुळगुळीत’ नमुने :

  • काळजाला हात घालणारा गायक : मुकेश

    प्रत्येक व्यक्तीच्या घशात “व्होकल कॉर्ड’’ नावाचा अवयव निसर्गत: असतो. एक अत्यंत पातळ पापूद्र्या सारखा दिसणारा हा अवयव आम्हाला बोलताना किंवा गाताना मदत करत असतो. मी कुठे तरी वाचल्याचं आठवतं की लता दिदीनी आपल्या घशाचा विमा उतरविला आहे. कारण त्यांचा घसा हाच सर्वात महागडा असा अवयव आहे. निसर्गत:च आवाजाची देगणी अनेक कलावंताना लाभलेली असते मात्र प्रत्येक आवाजाचा एक विशिष्ठ पोत असतो. या पोतावरूनच आम्हाला सहज ओळखता येते की आवाज कुणाचा आहे. चित्रपटसृष्टीतल्या अनेक नामवंत गायक गायिकेचा आवाज म्हणूनच आम्ही सहज ओळखू शकतो. चित्रपटसृष्टीत आपले बस्तान बसविण्यासाठी अनेकजण येत असतात. पण अनेकदा त्याला जे व्हायचं असतं ते मात्र राहून जातं आणि त्याची वेगळीच ओळख तयार होते. लुधियानातील जोरावर चंद आणि चाँद रानी यांच्या पोटी जन्मलेलेल्या एका तरूणाचे काहीसे असेच होणार होते.

    खरं तर दिसायला सुंदरच होता हा तरूण. ३०-४० च्या दशकातल्या चित्रपटातले अनेक नायक स्वत:ची गाणी स्वत:च गात कारण तेव्हा पार्श्व गायन पूर्ण रूजले नव्हते. याला गाताही येत असल्यामुळे नायक होण्याची महत्वकांक्षा होती यात गैर काहीच नव्हते. मोठी बहिण संगीत शिकत असतानां याला लहानपणीच संगीताची गोडी लागलेली. जोरावर चंद् आणि चाँद रानी यांचे एक दूरचे नातेवाईक होते मोतीलाल. चित्रपटसृष्टीतले नामवंत अभिनेते. त्यांनी या तरूणाला बहिणीच्या लग्नाच्या कार्यक्रमात गाताना ऐकले. त्यांच्या आवाजातील वेगळेपण त्यांच्या लक्षात आले व ते त्याला मुंबईला घेऊन आले. मोतीलाल या तरूणापेक्षा १३ वर्षे मोठे होते. पण त्यावेळी त्यांनी ही कल्पनाही केली नसेल की याच तरूणाचा उसना आवाज घेऊन एके दिवशी त्यानां गावे लागणार आहे. मुंबईत त्याची रहाण्याची सोय मोतीलालनी स्वत:च्या घरातच केली व एक संगीत शिक्षक पण त्याच्यासाठी नेमला. १९४१ मध्ये या तरूणाला शेवटी एका चित्रपटात नायकाची भूमिका मिळाली. चित्रपट होता ‘निर्दोष’ यातील गाणीही त्याने स्वत: म्हटली होती. त्या काळात कुंदनलाल सैगल गायकात सर्वोच्च शिखरावर होते. आणखी तीन वर्षांनी हा तरूण सर्वांचे लक्ष वेधून घेणार होता पण अभिनयाने नव्हे तर आपल्या गोड गळ्याने…….
    मध्ये मजहर खान नावाच्या दिग्दर्शकाचा “पहली नजर” हा चित्रपट थिएटरमध्ये झळकला.

    मोतीलाल, वीणा, मुन्वर सुलताना, बाबूराव पेंढारकर, प्रसिद्ध शाहीर बाळकराम,बिब्बो अशी तगडी स्टार कास्ट होती. दोन पठाण मुस्लिम घराण्यातील शोकातिंका यात दाखविली होती. या चित्रपटाचे संगीतकार होते अनिल विश्वास. सफदर आह सितापूरी यांनी गाणी लिहली होती. पैकी एक गाणे होते “दिल जलता है तो जलने दे……” हे गीत कुणी गायले यावर त्यावेळच्या अनेक चित्रपट रसिकांनी पैजा लावल्याचे बोलले जाते. गाणे कुंदनलाल सैगलचे आहे म्हणणारे बहूतेक रसिक ही पैज हरले होते. स्वत: सैगलही हे गाणे ऐकून अचंबित झाले होते. कारण आवाज थेट तयांच्या सारखाच होता. हे गाणे गायले होते मुकेश चंद जोरावर चंद् माथूर या २२ वर्षीय तरूणाने जो पूढे चित्रपटसृष्टीतला महान गायक मुकेश बनला…….या गाण्याने भारतभर त्याला ओळख मिळवून दिली. नंतर हळूहळू मुकेश सैगलच्या प्रभावातुन मुक्त झाले. प्रत्येक कलावंत मग तो कोणत्याही क्षेत्रातला असो, सुरूवातीस कुणाच्या तरी प्रभावाखाली असतोच. जर त्याने स्वत:ला यातुन मुक्त केले नाही तर मात्र त्याची ओळख फार काळ टिकू शकत नाही.अनेक गायक-गायिकेच्या बाबतीत असे झाले आहे. मुकेशचा किंचीत अनुनासिक पण दर्दभरा आवाज हीच त्यांची खरी ओळख बनली. संगीतकार नौशाद यांनी दिलीपकुमारसाठी अनेक गाणी गाऊन् घेतली. मेहबूब खानच्या ‘अंदाज’ चित्रपटतील मुकेशची सर्वच गाणी गाजली. तु कहे अगर…..झूमझूम के नाचो आज…..हम आज कही दिल खो बैठे….वगैरे. ‘गाए जा गीत मिलनके’, धरती को आकाश पूकारे (मेला), ये मेरा दिवानपन है (यहुदी), सुहाना सफर और ये मोसम हँसी (मधूमती), जीवन सपना टूट गया (अनोखा प्यार)…इत्यादी. ही सर्व दिलीपकुमार साठी मुकेशने गायलेली गाणी. १९५० नंतर मात्र मुकेशचा गळा खऱ्या अर्थाने राज कपूरलाच शोभला. आणि रफीच्या उदया नंतर दिलीप कुमार रफीच्या आवाजात गाऊ लागला…याच वेळी किशोरदा चा आवाज देव साहबसाठी चपखल बसला.

    मुकेशच्या आवाजात एक वेगळीच आर्तता असायची. महंमद रफी सारखी सर्व सप्तकातील रेंज वा मन्नादाच्या आवाजतला शास्त्रीय टच भलेही नव्हता मुकेशच्या आवाजात मात्र हृदय भेदून जाणारा दर्द नक्कीच होता. काही मोजकीच गाणी सोडली तर संगीतकार तार सप्तकात त्यांना गायला सांगत नसत. ‘मात्र झूमती चली हवा’ हे सोहनी रागातील गाणे (संगीत समांट तानसेन) आणि शिवरंजनी रागातील ‘जाने काहाँ गए वो दिन’ (मेरा नाम जोकर) या गाण्यात मुकेशजीने खूप वरचे स्वर लावले आहेत..जे आजही ऐकतानां हृदयाच्या आरपार जातात. मुकेशची सर्वच गाणी ओठात सहज बसणारी आहेत. त्यांनी गायलेली उडत्या चालीची अनेक गाणी खूप हीट झाली. मेरा जूता है जापानी (आवारा ), किसी की मुस्कूराहटो पर हो निसार सब कुछ सिख हमने(अनाडी), डम डम डिगा डिगा (छलिया), रूक जा वो जानेवली रूक जा (कन्हैया), मेरा जुता है जापानी (श्री ४२०)वगैरे…….राज कपूरसाठी गातानां मुकेश ख्रोखरच अप्रतिम गात असत. राज कपूरचा चेहरा विलक्षण बोलका. चेहऱ्यावरची प्रत्येक नस न नस हलायची. डोळयातील भाव मुकेशच्या आवाजाने अधिक गहिरे होत जायचे. स्वत: राज कपूर पण सुंदर गात असत. मुकेशने त्यांची आठवण सांगतानां म्हटले होते की- ‘मनात आणले असते तर ते माझ्यापेक्षाही उत्तम गायक झाले असते.’ राज कपूरनी मुकेशला वचन दिले होते की मी आयुष्यभर तुझ्याच गळ्याने गायील व ते त्यांनी मुकेश यांच्या शेवटा पर्यंत पाळले देखिल. सत्यम् शिवम सुंदरम हा खरा नायिका प्रधान चित्रपट. पण या चित्रपटात मुकेश यांच्या गाण्यासाठी राज कपूरने प्रसंग निर्माण केले.

    मुकेश प्रत्यक्ष जीवनात अत्यंत भावूक आणि संवेदनशील होते. एकदा एक मुलगी खूप आजारी पडली. तिला मुकेश खूप आवडत असत. आजार वाढू लागला तसे तिने आई जवळ मागणी केली की मला जर मुकेशने गाणे म्हणून दाखवले तर मी लवकर बरी होईल. आईने तिला समजाविण्याचा खूप प्रयत्न केला की- ते खूप नामवंत गायक आहेत, ते कसे येऊ शकतील? शिवाय त्यानां खूप पैसेही द्यावे लागणार. पण तिचा हट्ट सुरूच…शेवटी डॉक्टरांनी मुकेशशी संपर्क साधला. आणि खरोखरच मुकेश त्या मुलीला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले आणि गाणे ही गायले. मुलीच्या चोहऱ्या वरील आनंद बघून ते म्हणाले- ती आता जितकी आनंदी दिसतेय त्याच्या किती तरी पट आनंद मला झाला आहे. त्यांच्या याच संवेदनशीलतेमुळे त्यांचे गाणे बहूदा हृदया पासून येत असावे. राज कपूरच्या “श्री ४२०” आणि “आह” चित्रपटात मुकेश तुम्हाला दिसतील. आह मधील ‘छोटीसी ये जिंदगानी’…हे गाणे गाणारा गाडीवान स्वत: मुकेश आहे. स्वत: मुकेशने दोन चित्रपटाची निर्मिती पण केली. १९५१ मध्ये त्यांनी ‘मल्हार’ हा चित्रपट निर्माण केला. यातील प्रमूख भमिका मोती सागर(रामानंद सागर यांचे चिरंजीव) आणि शम्मी यांनी केली होती. यातील मुकेश आणि लताचे ‘बडे आरमानसे रखा है बलम तेरी कसम’…..हे रोशनने संगीत दिलेले गाणे खूप लोकप्रिय झाले. दुसरा चित्रपट १९५६ मधील “अनुराग” हा होता. यात त्यांनी प्रमूख नायकाची भूमिका केली होती. या नंतर बहुदा त्यांच्या लक्षात आले असावे की अभिनय हा आपला प्रांत नाही. मग त्यांनी गाण्यावरच लक्ष केंद्रीत केले व आपला ठसा उमटवला.

    ६० च्या दशकातल्या सर्वच संगीतकारानी मुकेश कडून गाणी गाऊन घेतली. त्यांच्या यशस्वी कारकिर्दीचे सर्वोच्च शिखर असलेला काळ.सुनील दत्त, मनोज कुमार यांच्यासाठी गायलेली गाणी देखिल तुफान गाजली. १९६७ मध्ये सुनीलदत्त-नुतनच्या “मिलन” मधील ‘सावन का महिना’…. हे लताजी बरोबर गायलेले ड्युअट तुफान लोकप्रिय झाले. त्यावर्षीचे बिनाका मधील ते क्रमांक एक चे गाणे होते….’सब कुछ सिख हमने’( अनाडी: १९५९), ‘सबसे बडा नादान’…(पहचान:१९७०),’जय बोलो बेईमान की…’(बेईमान:१९७२), ‘कभी कभी मेरे दिलमे’…(कभी कभी:१९७६ )असे चार फिल्म फेअर पुरस्कार त्यांना मिळाले. तर १९७४ मधील रंजनीगंधा सिनेमातील ‘कई बार यूं देखा है….’या गाण्याने त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. त्यांनी रायचंद्र त्रिवेदी यांची मुलगी सरला त्रिवेदी यांच्याशी २२ जुलै १९४६ मध्ये लग्न केले. त्यावेळी गाणे बजावणे हे खालच्या पातळीवरचे समजण्यात येई. त्यामुळे रायचंद यांनी विरोध केला. मग दोघांनी कांदीवलीच्या एका देवळात जाऊन् लग्न केले.त्यावेळी मुकेश २३ वर्षाचे होते. मोतीलाल व आर.डी. माथूर (मुगल-ए-आझम या चित्रपटाचे छायाचित्रकार) यांनी त्यानां मदत केली. त्यानां नितीन मुकेश या गायक मुलासह सह एकूण चार अपत्ये आहेत. अभिनेता नील नितीन मुकेश हा त्यांचा नातू.
    मुकेशजी अनेकदा स्टेज शो देखिल करत असत. गातानां सोबत त्यांची हर्मोनियम नेहमी असे. किशोर कुमार जसे स्टेजवर मस्ती करत त्यांच्या नेमके उलट मुकेशचे असे. टापटीप कोट टाय, वळणदार भांग अशा वेषात ते जेव्हा सूर लावत तेव्हा त्यानां लोक उभे राहून सन्मान देत. त्यांच्या गाण्यात एका प्रकारचा साधेपणा असायचा. त्यांचे गाणे प्रेक्षक अत्यंत शांतपणे ऐकत असत मध्येच शिट्टया वा टाळ्या वाजत नसत. २२ जुलै १९७४ ला मुकेशनी त्यांच्या लग्नाची ३० वर्षे झाल्याचा सोहळा साजरा केला आणि लगेच चार दिवसांनी अमेरिकेला प्रयाण केले. डेट्रईट, मिचीगन येथे त्यांचा स्टेज शो होता. २७ ऑगष्टला एरवी पेक्षा लवकर उठून स्नान केले. कपडे घालतानां त्यांच्या छातीत दुखायला लागले म्हणून त्यानां लगेच डॉक्टरांकडे नेले. पण तो पर्यंत खूपच उशीर झाला होता. हॉस्पीटल मध्ये डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. शिल्लक राहिलेला स्टेज शो लतादीदी आणि त्यांच्या मुलगा नितीन मुकेश यांनी पूर्ण केला. लताबाई त्यांचे शव घेऊन भारतात आल्या त्यावेळी चित्रपटसृष्टीतले असंख्य मान्यवर उपस्थित होते. राज कपूर यांच्या कानावर जेव्हा वृत्त गेले त्यावेळी त्यांचे उदगार होते-‘आज माझा आवाज हरवला आहे’ त्यांच्या मृत्यू नंतर त्यांनी गाणी गायलेले चित्रपट प्रदर्शीत झाले. मुकेशजी देखिल वयाच्या ५३ व्या वर्षी हे जग सोडून गेले. म्हणजे तसे ते तरूणच होते. चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज असे अवेळी का सोडून गेले असावेत? हा प्रश्न मनाला सतत बोचणी लावतो.

    -दासू भगत (२२ जुलै २०१७)

  • भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणे

    भरत नाट्य मंदिर हे पुणे शहरातील एक प्रसिद्ध नाट्यगृह आहे. भरत नाट्यमंदिर हे पुण्यातील जुन्या नाट्यगृहांपैकी एक अतिशय नाट्यगृह आहे. पुणेकरांसाठी ही वास्तू म्हणजे त्यांचा अभिमान आहे.